* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789937
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
RIKTA` IS MOHANA PRABHUDESAI JOGLEKAR`S SECOND STORY COLLECTION. EACH STORY FROM THIS COLLECTION SHOWS DIFFERENT SHADES AND VARIATIONS IN HUMAN NATURE. BECAUSE OF THE AUTHOR`S RESIDENCE IN BOTH THE UNITED STATES AND INDIA, HER KALEIDOSCOPE OF STORIES INCLUDE PECULIAR SUBJECTS. MOHANA`S UNIQUE STYLE KEEPS READERS INVOLVED AND BUILDS CURIOSITY TO READ FURTHER. HER STYLE TO SHOW EACH CHARACTER`S MICROSCOPIC REACTIONS AND THINKING IS AMAZING AND GIVES JUSTICE TO ALL OF THE CHARACTERS IN THE STORY.
‘रिक्त’ या कथासंग्रहात वेगवगळ्या कारणांमुळे भावनांच्या आवर्तात सापडलेल्या व्यक्तिरेखांच्या मनाचं सूक्ष्म दर्शन घडविणाऱ्या कथा आहेत. परिाQस्थतीशरण, कोणता ना कोणता सल मनात बाळगत जगणारी किंवा एखाद्या घटनेने जीवनात उलथापालथ झालेली अनेक माणसं ‘रिक्त’ या कथासंग्रहातून भेटतात. मग समलिंगी आकर्षणातून मुलीने एखाद्या मुलीशी लग्न करण्याच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालेली ‘जोडीदार’ कथेतील डॉ. मीरा असेल किंवा एका तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेला ‘वाट’ कथेतील शिंदे ड्रायव्हर असेल, नवऱ्याच्या संशयीपणाचं भूत मानगुटीवर असहायतेने वागवणारी ‘अस्तित्व’ कथेतील उज्ज्वला असेल किंवा सावत्रआईमुळे वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेली ‘समाधान’ कथेतील कमू असेल. या कथा मनोविश्लेषणात्मक असल्या तरी त्या वाचकाची उत्कंठा वाढवत राहतात. व्यक्तिरेखांचं मनोविश्लेषण आणि ओघवती, लालित्यपूर्ण भाषा या बलस्थानांसाठी वाचकांनी हा कथासंग्रह मुळातून वाचावा असा आहे. वाचनीय आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#RIKTA# MOHANA PRABHUDESAI JOGLEKAR#रिक्त# मोहना प्रभुदेसाई जोगळेकर#पाश# किनारा# अमरचा दिवस# जोडीदार# संभ्रम# पूल# वाट# अस्तित्व# समाधान# सावट# मळभ# मार्ग
Customer Reviews
  • Rating StarNilesh Malvankar

    प्रसिद्ध लेखिका मोहना जोगळेकर यांचा रिक्त हा मेहता प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला कथासंग्रह वाचनात आला. बऱ्याच काळाने दर्जेदार कथा वाचल्याचं समाधान मिळालं. या कथांमधून मानवी स्वभावाचे विविध कंगोरे समर्थपणे उलगडून दाखवले आहेत. मानवी मनाच्या भावभावनांचंबारकाईने केलेलं चित्रण या कथांमधून जाणवतं. विक्षिप्त स्वभावाच्या माणसांमुळे त्यांच्या जवळच्यांना सोसावे लागणारे त्रास. पालकांच्या अमेरिका-भारत-अमेरिका अशा स्थलांतरामुळे मुलांना स्थिरावण्यात येणाऱ्या अडचणी, ताणतणाव. हुशार पण शिकायची इच्छा असूनही परिस्थितीमुळे हतबल झालेला अमर दोन मुलींचा स्वतःबद्दलचा शोध आणि त्याचे त्यांच्या कुटुंबावर होणारे परिणाम समाजसेवेच्या क्षेत्रात आलेले काही अनुभव आणि त्याचा एका तरुणीच्या आयुष्यावर होणार परिणाम. परदेशातून बऱ्याच वर्षांनी भारतात आल्यावर गावी ओळखीच्या खुणा शोधणारी स्त्री. एका चुकीमुळे आयुष्यभराची होणारी फरफट संशयी नवऱ्यामुळे द्विधा मनस्थितीत असणारी स्त्री. काही काही गोष्टी जेव्हाच्या तेव्हा होण्याला अर्थ असतो हे सांगणारी कमुताईची कथा. आईवडिलांच्या संबंधांचं पुढे मुलीच्या आयुष्यावर पडणारी छाया. प्रेमविवाहामुळे माहेरच्यांनी संबंध तोडले, तरी जिद्दीने स्वतःच्या हिंमतीवर संसार समर्थपणे निभावून नेणारी स्त्री. परक्यांच्या मुलासाठी झटणारी तरुणी. अनोरेक्सीयाशी झगडणारी युवती अशा विविध विषयांवरील कथा या संग्रहात आहेत. बरेचसे विषय मराठीत कदाचित पहिल्यांदाच हाताळले गेलेले आहेत. हे विषयांचं नावीन्य तसेच त्या विषयांचा खोल अभ्यास कथेतून जाणवतो. एवढं असूनही कथा प्रवाही आहेत. वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यात कथा यशस्वी ठरतात. हा कथासंग्रह किंडलवरदेखील उपलब्ध आहे. या पूर्वी मोहना जोगळेकर यांचा `मेल्टिंग पॉट` हा कथासंग्रह प्रकाशित झाला होता आणि त्याला कोमसापचं पारितोषिक मिळालेलं आहे. माहेर, श्री व सौ, अनुराधा, प्रसाद, रोहिणी, साप्ताहिक सकाळ, मायबोली, BMM वृत्त तसेच अमेरिकेतील विविध दिवाळी अंकांमध्ये मोहना जोगळेकर यांच्या कथा प्रकाशित होत असतात. त्या व्यतिरिक्त लोकसत्ता, रत्नागिरी टाइम्स, प्रहार, सकाळ अशा वर्तमानपत्रांमधूनही त्यांनी लेख आणि सदरलेखन केलं आहे. लेखिकेस पुढील लेखनासाठी शुभेच्छा !! ...Read more

  • Rating Starसंवेदनशील, प्रवाही आणि वाचनीय कथा

    प्रसिद्ध लेखिका मोहना जोगळेकर यांचा रिक्त हा मेहता प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला कथासंग्रह वाचनात आला. बऱ्याच काळाने दर्जेदार कथा वाचल्याचं समाधान मिळालं. या कथांमधून मानवी स्वभावाचे विविध कंगोरे समर्थपणे उलगडून दाखवले आहेत. मानवी मनाच्या भावभावनांचंबारकाईने केलेलं चित्रण या कथांमधून जाणवतं. विक्षिप्त स्वभावाच्या माणसांमुळे त्यांच्या जवळच्यांना सोसावे लागणारे त्रास. पालकांच्या अमेरिका-भारत-अमेरिका अशा स्थलांतरामुळे मुलांना स्थिरावण्यात येणाऱ्या अडचणी, ताणतणाव. हुशार पण शिकायची इच्छा असूनही परिस्थितीमुळे हतबल झालेला अमर दोन मुलींचा स्वतःबद्दलचा शोध आणि त्याचे त्यांच्या कुटुंबावर होणारे परिणाम समाजसेवेच्या क्षेत्रात आलेले काही अनुभव आणि त्याचा एका तरुणीच्या आयुष्यावर होणार परिणाम. परदेशातून बऱ्याच वर्षांनी भारतात आल्यावर गावी ओळखीच्या खुणा शोधणारी स्त्री. एका चुकीमुळे आयुष्यभराची होणारी फरफट संशयी नवऱ्यामुळे द्विधा मनस्थितीत असणारी स्त्री. काही काही गोष्टी जेव्हाच्या तेव्हा होण्याला अर्थ असतो हे सांगणारी कमुताईची कथा. आईवडिलांच्या संबंधांचं पुढे मुलीच्या आयुष्यावर पडणारी छाया. प्रेमविवाहामुळे माहेरच्यांनी संबंध तोडले, तरी जिद्दीने स्वतःच्या हिंमतीवर संसार समर्थपणे निभावून नेणारी स्त्री. परक्यांच्या मुलासाठी झटणारी तरुणी. अनोरेक्सीयाशी झगडणारी युवती अशा विविध विषयांवरील कथा या संग्रहात आहेत. बरेचसे विषय मराठीत कदाचित पहिल्यांदाच हाताळले गेलेले आहेत. हे विषयांचं नावीन्य तसेच त्या विषयांचा खोल अभ्यास कथेतून जाणवतो. एवढं असूनही कथा प्रवाही आहेत. वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यात कथा यशस्वी ठरतात. हा कथासंग्रह किंडलवरदेखील उपलब्ध आहे. या पूर्वी मोहना जोगळेकर यांचा `मेल्टिंग पॉट` हा कथासंग्रह प्रकाशित झाला होता आणि त्याला कोमसापचं पारितोषिक मिळालेलं आहे. माहेर, श्री व सौ, अनुराधा, प्रसाद, रोहिणी, साप्ताहिक सकाळ, मायबोली, BMW वृत्त तसेच अमेरिकेतील या विविध दिवाळी अंकांमध्ये मोहना जोगळेकर यांच्या कथा प्रकाशित होत असतात. त्या व्यतिरिक्त लोकसत्ता, रत्नागिरी टाइम्स, प्रहार, सकाळ अशा वर्तमानपत्रांमधूनही त्यांनी लेख आणि सदरलेखन केलं आहे. लेखिकेस पुढील लेखनासाठी शुभेच्छा !! ...Read more

  • Rating Star- संजय वैशंपायन, 21/1/2020

    आशयाने परिपूर्ण रिक्त कथासंग्रह भारतातून अमेरिकेत स्थायिक होऊन पुढची पिढी हाताशी आणि तरी भारतीयत्वाची नाळ तुटत नाही हेच खरं आणि अशाच प्रकारच्या भावना व विचार मूळच्या रत्नागिरीकर मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर, यांनी त्यांच्या स्वतंत्रपणे प्रकाशित झालेल्या‘रिक्त` या कथासंग्रहामधील कथांमधून मांडल्या आहेत. लेखिकेचा ‘मेल्टिंग पॉ` हा पहिला कथासंग्रह. त्याची फार मोठी चर्चा झाली होती. कोमसापचा लेखिकेचा पुरस्कारही या पुस्तकाच्या मध्यमातील सृजनासाठी लेखिकेला प्राप्त झाला आहे. यामुळे ‘रिक्त` या संग्रहातून मोठ्या अपेक्षा होत्याच आणि त्या पूर्ण होतात, असंच म्हणावं लागेल. मुखपृष्ठ पाहताच यामधील कथा नव्या युगाच्या, नव्या धाटणीच्या असणार असंच वाटतं. ‘रिक्त` कथासंग्रहातील कथाविषय, पात्र, घटना, काळ यांचे निराळे संदर्भ घेऊन येतात आणि त्यामुळेच दीर्घ काळ मनात रेंगाळत राहतात. पात्रांचा कथेतील घटनांबद्दल स्वत:चा दृष्टीकोन हेही कथांचं वैशिष्ट्य. वाटेत घडलेल्या घटनेने बदललेलं आयुष्य, आईच्या निधनानंतर परदेशातून आलेली ती, स्वत:ची ओळख पटलेल्या दोन मुलींमुळे त्यांच्या घरात उठलेलं वादळ, मुलीवर आपल्या हातून अन्याय झाला हे अखेर तिच्यासमोर कबूल करणारे वडील, शाळकरी मुलाला त्याच्या पालकांनीच शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटायला लागणारं वास्तव, जातिभेद करायचा नाही, या निश्चयाने वेगळं पाऊल उचलणारी तरुणी, आई-वडिलांच्या घटस्फोटाचं सावट मनावर असताना लग्न केलेली युवती, समाजसेवेच्या अनुभवातून झालेली द्विधा मन:स्थिती, अनाथ मुलासाठी एका तरुणीने उचललेलं अनोखं पाऊल, घरातील ‘फूकट` गेलेला मुलगा, अशा असंख्य विषयांमधून व्यक्तिरेखांचं बारीक निरीक्षण कथेतील पात्रापात्रांतून डोकावत राहतं. सारीच पात्रं वाचकाला अलगद त्या त्या काळात नेऊन सोडतात, कथेतील काळाशी, वातावरणाशी वाचक नकळत एकरूप होऊन जातो. ‘रिक्त` कथासंग्रहातील प्रत्येक कथा ‘पुढे काय’ ही उत्कंठा वाढवणारी आणि पुढील कथेबद्दल उत्सुकता ताणणारी आहे; पण पहिल्याच ‘पाश’ या कथेमध्ये निखळ कोकणातील धोपेश्वरमधील कुटुंबाची घरातील सदस्यांमुळे झालेली परवड आणि नंतर ते रक्ताच्या नात्यांचे पाश तुटताना व तोडताना झालेली तडफड फार उत्कटपणे मांडली आहे. हा कथासंग्रह १३ भरगच्च कथांचा आहे. यामुळे सर्वच कथांबद्दल स्वतंत्रपणे लिहिणे शक्य होणार नाही; परंतु त्यातील उल्लेखनीय ‘अमरचा दिवस’ टिपिकल झोपडपट्टीतील वातावरणात वाढणार्या मुलांची घुसमट, प्रगतीची आस अन् परीस्थितीचा तणाव ही संपूर्ण मध्यमवर्गीय वाचकाला अनभिज्ञ परिस्थिती मांडण्यात व त्यातील काळीज पिळवटून टाकणारी वस्तुस्थिती अत्यंत प्रखर तीव्रतेने शब्दबद्ध करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. मोगरेबार्इंच्या रूपाने सुशेगात मध्यमवर्गीय स्थिती आणि सुटू न शकणार्या परिस्थितीच्या प्रश्नांची उकल शोधणार्या मंगलातार्इंच्या भांबावलेपणाची मांडणी सुरेखच साधली आहे. ‘संभ्रम’चा कथाविषय, खरंतर लेखिकेचं प्रोफाईल पाहिलं तर अनवट वाटणारा. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मानवी गिनीपिग्ज उपलब्ध करून देण्याचा वेगळा व्यापार, त्यातील प्रश्न आणि सज्जन मनाला पडणारे प्रश्न फार धाडसाने मांडण्यात आले आहेत. कथा जरी मीना- चेतनची असली तरी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आक्रमणात माणसांचा प्रयोग म्हणून वापर करण्याच्या प्रवृत्तीचा फायदा घेणाNयांचा उद्योग कथापटावर मांडण्यात आला आहे. ‘समाधान’ ही कथा ५५ ते ७० या कालखंडातील असल्याचे निश्चितपणे वाटते. अशा पाश्र्वभूमीवर कमू, गीताई, आबा या व्यक्तिरेखा थोडक्या लेखनात अतिशय समर्थपणे लेखिका उभ्या करते. वर्षाला बावन्न चित्रपट सावत्र मुलीला दाखवणारी गीताई आणि सावत्र मुलीची आत्या सुधा यांचे नातेसंबंध, त्यांची अपरिहार्यता उभी करण्याचे शिवधनुष्य लेखिकेने समर्थपणे पेलले आहे. भरगच्च आशयमूल्य असणार्या १३ कथा समाविष्ट असणार्या या कथासंग्रहाचं नाव ‘रिक्त’ का, याचं उत्तर या संग्रहातील शेवटची कथा ‘रिक्त’ हे आहे. वयात येणार्या अमिताकडे सगळ कुटुंब लक्ष देत असूनही शाळेतील मुलांचं चिडवणं मनाला लागतं आणि मनोरुग्ण व्हावं अशा परिसीमेने अमिता अन्न उलटून टाकणं, अवाजवी एरोबिक्स करते. युरोपात राहण्याचे भारतीयांवर होणारे मानसिक परिणाम बारीक बारीक कंगोर्यासह समर्थपणे मांडणारी कथा म्हणजे ‘रिक्त.’ खरंतर संग्रहातील सर्वच कथा परिपूर्ण आहेत; परंतु लेखिकेच्या मते यातील परमोच्च कथा ‘रिक्त’ असावी आणि त्यामुळेच संग्रहाला ‘रिक्त’ नाव दिलं असावं. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक अतिशय व्यावसायिक पद्धतीने प्रकाशित केलं आहे. सुरेख मुखपृष्ठ, छान टाईप व कागद देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचा वापरल्याने वाचताना बरं वाटतं. लेखिकेच्या निरीक्षणाचा, स्मरणाचा आणि सगळा एकत्रित परिणाम देणारं लिखाण फार आश्वासक आणि साहित्य जगात उज्ज्वल भवितव्य निश्चित करणारं आहे. खरंतर संग्रहातीलच एखाद्या कथेचं नाव संपूर्ण कथासंग्रहाला देण्याऐवजी स्वतंत्र ओळख ठरावी, असं नाव देणं गरजेचं वाटतं आणि बर्याच कथा या छोटी कादंबरी होण्याच्या जवळपास असल्याने भविष्यात लेखिकेने आपल्या शैलीमधील कादंबरी लेखनाचा टप्पा गाठावा, असं वाटणं साहजिकच! एकंदरीत काय, तर भरगच्च आशयाचा ‘रिक्त’ कथासंग्रह आपल्या संग्रहात हवाच. आणि हो, पुन: वाचताना देखील कंटाळा नाही येत! ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 26-08-2018

    उत्कंठावर्धक कथासंग्रह... मोहना प्रभुदेसाई जोगळेकर यांचा ‘रिक्त’ हा कथासंग्रह नुकताच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहातील कथाविषय, पात्र, घटना, काळ यांचे निराळे संदर्भ घेऊन येतात आणि दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतात. पात्रांचा कथेतल घटनांबद्दल स्वत:चा दृष्टिकोन हेही कथांचं वैशिष्ट्य. वाटेत घडलेल्या घटनेने बदललेलं आयुष्य, आईच्या निधनांनंतर परदेशातून आलेली ती, स्वत:ची ओळख पटलेल्या दोन मुलींमुळे त्यांच्या घरात उठलेलं वादळ, मुलीवर आपल्या हातून अन्याय झाला हे अखेर तिच्यासमोर कबूल करणारे वडील, शाळकरी मुलाला त्याच्या पालकांनीच शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटायला लागणारं वास्तव, जातीभेद करायचा नाही या निश्चयाने वेगळे पाऊल उचलणारी तरुणी, आईवडिलांच्या घटस्फोटाचं सावट मनावर असताना लग्न केलेली युवती, समाजसेवेच्या अनुभवातून झालेली द्बिधा मन:स्थिती, अन्याय मुलांसाठी एका तरुणीने उचललेलं एक अनोखं पाऊल, अशा असंख्य विषयांमधून व्यक्तिरेखाचं बारीक निरीक्षण कथेतील पात्रांमधून डोकावत राहतं. या सगळ्या कथांतील वातावरणाशी वाचक नकळत एकरूप होऊन जातो. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा उत्कंठा वाढवणारी. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.