* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789937
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
RIKTA` IS MOHANA PRABHUDESAI JOGLEKAR`S SECOND STORY COLLECTION. EACH STORY FROM THIS COLLECTION SHOWS DIFFERENT SHADES AND VARIATIONS IN HUMAN NATURE. BECAUSE OF THE AUTHOR`S RESIDENCE IN BOTH THE UNITED STATES AND INDIA, HER KALEIDOSCOPE OF STORIES INCLUDE PECULIAR SUBJECTS. MOHANA`S UNIQUE STYLE KEEPS READERS INVOLVED AND BUILDS CURIOSITY TO READ FURTHER. HER STYLE TO SHOW EACH CHARACTER`S MICROSCOPIC REACTIONS AND THINKING IS AMAZING AND GIVES JUSTICE TO ALL OF THE CHARACTERS IN THE STORY.
‘रिक्त’ या कथासंग्रहात वेगवगळ्या कारणांमुळे भावनांच्या आवर्तात सापडलेल्या व्यक्तिरेखांच्या मनाचं सूक्ष्म दर्शन घडविणाऱ्या कथा आहेत. परिाQस्थतीशरण, कोणता ना कोणता सल मनात बाळगत जगणारी किंवा एखाद्या घटनेने जीवनात उलथापालथ झालेली अनेक माणसं ‘रिक्त’ या कथासंग्रहातून भेटतात. मग समलिंगी आकर्षणातून मुलीने एखाद्या मुलीशी लग्न करण्याच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालेली ‘जोडीदार’ कथेतील डॉ. मीरा असेल किंवा एका तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेला ‘वाट’ कथेतील शिंदे ड्रायव्हर असेल, नवऱ्याच्या संशयीपणाचं भूत मानगुटीवर असहायतेने वागवणारी ‘अस्तित्व’ कथेतील उज्ज्वला असेल किंवा सावत्रआईमुळे वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेली ‘समाधान’ कथेतील कमू असेल. या कथा मनोविश्लेषणात्मक असल्या तरी त्या वाचकाची उत्कंठा वाढवत राहतात. व्यक्तिरेखांचं मनोविश्लेषण आणि ओघवती, लालित्यपूर्ण भाषा या बलस्थानांसाठी वाचकांनी हा कथासंग्रह मुळातून वाचावा असा आहे. वाचनीय आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#RIKTA# MOHANA PRABHUDESAI JOGLEKAR#रिक्त# मोहना प्रभुदेसाई जोगळेकर#पाश# किनारा# अमरचा दिवस# जोडीदार# संभ्रम# पूल# वाट# अस्तित्व# समाधान# सावट# मळभ# मार्ग
Customer Reviews
  • Rating StarNilesh Malvankar

    प्रसिद्ध लेखिका मोहना जोगळेकर यांचा रिक्त हा मेहता प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला कथासंग्रह वाचनात आला. बऱ्याच काळाने दर्जेदार कथा वाचल्याचं समाधान मिळालं. या कथांमधून मानवी स्वभावाचे विविध कंगोरे समर्थपणे उलगडून दाखवले आहेत. मानवी मनाच्या भावभावनांचंबारकाईने केलेलं चित्रण या कथांमधून जाणवतं. विक्षिप्त स्वभावाच्या माणसांमुळे त्यांच्या जवळच्यांना सोसावे लागणारे त्रास. पालकांच्या अमेरिका-भारत-अमेरिका अशा स्थलांतरामुळे मुलांना स्थिरावण्यात येणाऱ्या अडचणी, ताणतणाव. हुशार पण शिकायची इच्छा असूनही परिस्थितीमुळे हतबल झालेला अमर दोन मुलींचा स्वतःबद्दलचा शोध आणि त्याचे त्यांच्या कुटुंबावर होणारे परिणाम समाजसेवेच्या क्षेत्रात आलेले काही अनुभव आणि त्याचा एका तरुणीच्या आयुष्यावर होणार परिणाम. परदेशातून बऱ्याच वर्षांनी भारतात आल्यावर गावी ओळखीच्या खुणा शोधणारी स्त्री. एका चुकीमुळे आयुष्यभराची होणारी फरफट संशयी नवऱ्यामुळे द्विधा मनस्थितीत असणारी स्त्री. काही काही गोष्टी जेव्हाच्या तेव्हा होण्याला अर्थ असतो हे सांगणारी कमुताईची कथा. आईवडिलांच्या संबंधांचं पुढे मुलीच्या आयुष्यावर पडणारी छाया. प्रेमविवाहामुळे माहेरच्यांनी संबंध तोडले, तरी जिद्दीने स्वतःच्या हिंमतीवर संसार समर्थपणे निभावून नेणारी स्त्री. परक्यांच्या मुलासाठी झटणारी तरुणी. अनोरेक्सीयाशी झगडणारी युवती अशा विविध विषयांवरील कथा या संग्रहात आहेत. बरेचसे विषय मराठीत कदाचित पहिल्यांदाच हाताळले गेलेले आहेत. हे विषयांचं नावीन्य तसेच त्या विषयांचा खोल अभ्यास कथेतून जाणवतो. एवढं असूनही कथा प्रवाही आहेत. वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यात कथा यशस्वी ठरतात. हा कथासंग्रह किंडलवरदेखील उपलब्ध आहे. या पूर्वी मोहना जोगळेकर यांचा `मेल्टिंग पॉट` हा कथासंग्रह प्रकाशित झाला होता आणि त्याला कोमसापचं पारितोषिक मिळालेलं आहे. माहेर, श्री व सौ, अनुराधा, प्रसाद, रोहिणी, साप्ताहिक सकाळ, मायबोली, BMM वृत्त तसेच अमेरिकेतील विविध दिवाळी अंकांमध्ये मोहना जोगळेकर यांच्या कथा प्रकाशित होत असतात. त्या व्यतिरिक्त लोकसत्ता, रत्नागिरी टाइम्स, प्रहार, सकाळ अशा वर्तमानपत्रांमधूनही त्यांनी लेख आणि सदरलेखन केलं आहे. लेखिकेस पुढील लेखनासाठी शुभेच्छा !! ...Read more

  • Rating Starसंवेदनशील, प्रवाही आणि वाचनीय कथा

    प्रसिद्ध लेखिका मोहना जोगळेकर यांचा रिक्त हा मेहता प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला कथासंग्रह वाचनात आला. बऱ्याच काळाने दर्जेदार कथा वाचल्याचं समाधान मिळालं. या कथांमधून मानवी स्वभावाचे विविध कंगोरे समर्थपणे उलगडून दाखवले आहेत. मानवी मनाच्या भावभावनांचंबारकाईने केलेलं चित्रण या कथांमधून जाणवतं. विक्षिप्त स्वभावाच्या माणसांमुळे त्यांच्या जवळच्यांना सोसावे लागणारे त्रास. पालकांच्या अमेरिका-भारत-अमेरिका अशा स्थलांतरामुळे मुलांना स्थिरावण्यात येणाऱ्या अडचणी, ताणतणाव. हुशार पण शिकायची इच्छा असूनही परिस्थितीमुळे हतबल झालेला अमर दोन मुलींचा स्वतःबद्दलचा शोध आणि त्याचे त्यांच्या कुटुंबावर होणारे परिणाम समाजसेवेच्या क्षेत्रात आलेले काही अनुभव आणि त्याचा एका तरुणीच्या आयुष्यावर होणार परिणाम. परदेशातून बऱ्याच वर्षांनी भारतात आल्यावर गावी ओळखीच्या खुणा शोधणारी स्त्री. एका चुकीमुळे आयुष्यभराची होणारी फरफट संशयी नवऱ्यामुळे द्विधा मनस्थितीत असणारी स्त्री. काही काही गोष्टी जेव्हाच्या तेव्हा होण्याला अर्थ असतो हे सांगणारी कमुताईची कथा. आईवडिलांच्या संबंधांचं पुढे मुलीच्या आयुष्यावर पडणारी छाया. प्रेमविवाहामुळे माहेरच्यांनी संबंध तोडले, तरी जिद्दीने स्वतःच्या हिंमतीवर संसार समर्थपणे निभावून नेणारी स्त्री. परक्यांच्या मुलासाठी झटणारी तरुणी. अनोरेक्सीयाशी झगडणारी युवती अशा विविध विषयांवरील कथा या संग्रहात आहेत. बरेचसे विषय मराठीत कदाचित पहिल्यांदाच हाताळले गेलेले आहेत. हे विषयांचं नावीन्य तसेच त्या विषयांचा खोल अभ्यास कथेतून जाणवतो. एवढं असूनही कथा प्रवाही आहेत. वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यात कथा यशस्वी ठरतात. हा कथासंग्रह किंडलवरदेखील उपलब्ध आहे. या पूर्वी मोहना जोगळेकर यांचा `मेल्टिंग पॉट` हा कथासंग्रह प्रकाशित झाला होता आणि त्याला कोमसापचं पारितोषिक मिळालेलं आहे. माहेर, श्री व सौ, अनुराधा, प्रसाद, रोहिणी, साप्ताहिक सकाळ, मायबोली, BMW वृत्त तसेच अमेरिकेतील या विविध दिवाळी अंकांमध्ये मोहना जोगळेकर यांच्या कथा प्रकाशित होत असतात. त्या व्यतिरिक्त लोकसत्ता, रत्नागिरी टाइम्स, प्रहार, सकाळ अशा वर्तमानपत्रांमधूनही त्यांनी लेख आणि सदरलेखन केलं आहे. लेखिकेस पुढील लेखनासाठी शुभेच्छा !! ...Read more

  • Rating Star- संजय वैशंपायन, 21/1/2020

    आशयाने परिपूर्ण रिक्त कथासंग्रह भारतातून अमेरिकेत स्थायिक होऊन पुढची पिढी हाताशी आणि तरी भारतीयत्वाची नाळ तुटत नाही हेच खरं आणि अशाच प्रकारच्या भावना व विचार मूळच्या रत्नागिरीकर मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर, यांनी त्यांच्या स्वतंत्रपणे प्रकाशित झालेल्या‘रिक्त` या कथासंग्रहामधील कथांमधून मांडल्या आहेत. लेखिकेचा ‘मेल्टिंग पॉ` हा पहिला कथासंग्रह. त्याची फार मोठी चर्चा झाली होती. कोमसापचा लेखिकेचा पुरस्कारही या पुस्तकाच्या मध्यमातील सृजनासाठी लेखिकेला प्राप्त झाला आहे. यामुळे ‘रिक्त` या संग्रहातून मोठ्या अपेक्षा होत्याच आणि त्या पूर्ण होतात, असंच म्हणावं लागेल. मुखपृष्ठ पाहताच यामधील कथा नव्या युगाच्या, नव्या धाटणीच्या असणार असंच वाटतं. ‘रिक्त` कथासंग्रहातील कथाविषय, पात्र, घटना, काळ यांचे निराळे संदर्भ घेऊन येतात आणि त्यामुळेच दीर्घ काळ मनात रेंगाळत राहतात. पात्रांचा कथेतील घटनांबद्दल स्वत:चा दृष्टीकोन हेही कथांचं वैशिष्ट्य. वाटेत घडलेल्या घटनेने बदललेलं आयुष्य, आईच्या निधनानंतर परदेशातून आलेली ती, स्वत:ची ओळख पटलेल्या दोन मुलींमुळे त्यांच्या घरात उठलेलं वादळ, मुलीवर आपल्या हातून अन्याय झाला हे अखेर तिच्यासमोर कबूल करणारे वडील, शाळकरी मुलाला त्याच्या पालकांनीच शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटायला लागणारं वास्तव, जातिभेद करायचा नाही, या निश्चयाने वेगळं पाऊल उचलणारी तरुणी, आई-वडिलांच्या घटस्फोटाचं सावट मनावर असताना लग्न केलेली युवती, समाजसेवेच्या अनुभवातून झालेली द्विधा मन:स्थिती, अनाथ मुलासाठी एका तरुणीने उचललेलं अनोखं पाऊल, घरातील ‘फूकट` गेलेला मुलगा, अशा असंख्य विषयांमधून व्यक्तिरेखांचं बारीक निरीक्षण कथेतील पात्रापात्रांतून डोकावत राहतं. सारीच पात्रं वाचकाला अलगद त्या त्या काळात नेऊन सोडतात, कथेतील काळाशी, वातावरणाशी वाचक नकळत एकरूप होऊन जातो. ‘रिक्त` कथासंग्रहातील प्रत्येक कथा ‘पुढे काय’ ही उत्कंठा वाढवणारी आणि पुढील कथेबद्दल उत्सुकता ताणणारी आहे; पण पहिल्याच ‘पाश’ या कथेमध्ये निखळ कोकणातील धोपेश्वरमधील कुटुंबाची घरातील सदस्यांमुळे झालेली परवड आणि नंतर ते रक्ताच्या नात्यांचे पाश तुटताना व तोडताना झालेली तडफड फार उत्कटपणे मांडली आहे. हा कथासंग्रह १३ भरगच्च कथांचा आहे. यामुळे सर्वच कथांबद्दल स्वतंत्रपणे लिहिणे शक्य होणार नाही; परंतु त्यातील उल्लेखनीय ‘अमरचा दिवस’ टिपिकल झोपडपट्टीतील वातावरणात वाढणार्या मुलांची घुसमट, प्रगतीची आस अन् परीस्थितीचा तणाव ही संपूर्ण मध्यमवर्गीय वाचकाला अनभिज्ञ परिस्थिती मांडण्यात व त्यातील काळीज पिळवटून टाकणारी वस्तुस्थिती अत्यंत प्रखर तीव्रतेने शब्दबद्ध करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. मोगरेबार्इंच्या रूपाने सुशेगात मध्यमवर्गीय स्थिती आणि सुटू न शकणार्या परिस्थितीच्या प्रश्नांची उकल शोधणार्या मंगलातार्इंच्या भांबावलेपणाची मांडणी सुरेखच साधली आहे. ‘संभ्रम’चा कथाविषय, खरंतर लेखिकेचं प्रोफाईल पाहिलं तर अनवट वाटणारा. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मानवी गिनीपिग्ज उपलब्ध करून देण्याचा वेगळा व्यापार, त्यातील प्रश्न आणि सज्जन मनाला पडणारे प्रश्न फार धाडसाने मांडण्यात आले आहेत. कथा जरी मीना- चेतनची असली तरी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आक्रमणात माणसांचा प्रयोग म्हणून वापर करण्याच्या प्रवृत्तीचा फायदा घेणाNयांचा उद्योग कथापटावर मांडण्यात आला आहे. ‘समाधान’ ही कथा ५५ ते ७० या कालखंडातील असल्याचे निश्चितपणे वाटते. अशा पाश्र्वभूमीवर कमू, गीताई, आबा या व्यक्तिरेखा थोडक्या लेखनात अतिशय समर्थपणे लेखिका उभ्या करते. वर्षाला बावन्न चित्रपट सावत्र मुलीला दाखवणारी गीताई आणि सावत्र मुलीची आत्या सुधा यांचे नातेसंबंध, त्यांची अपरिहार्यता उभी करण्याचे शिवधनुष्य लेखिकेने समर्थपणे पेलले आहे. भरगच्च आशयमूल्य असणार्या १३ कथा समाविष्ट असणार्या या कथासंग्रहाचं नाव ‘रिक्त’ का, याचं उत्तर या संग्रहातील शेवटची कथा ‘रिक्त’ हे आहे. वयात येणार्या अमिताकडे सगळ कुटुंब लक्ष देत असूनही शाळेतील मुलांचं चिडवणं मनाला लागतं आणि मनोरुग्ण व्हावं अशा परिसीमेने अमिता अन्न उलटून टाकणं, अवाजवी एरोबिक्स करते. युरोपात राहण्याचे भारतीयांवर होणारे मानसिक परिणाम बारीक बारीक कंगोर्यासह समर्थपणे मांडणारी कथा म्हणजे ‘रिक्त.’ खरंतर संग्रहातील सर्वच कथा परिपूर्ण आहेत; परंतु लेखिकेच्या मते यातील परमोच्च कथा ‘रिक्त’ असावी आणि त्यामुळेच संग्रहाला ‘रिक्त’ नाव दिलं असावं. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक अतिशय व्यावसायिक पद्धतीने प्रकाशित केलं आहे. सुरेख मुखपृष्ठ, छान टाईप व कागद देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचा वापरल्याने वाचताना बरं वाटतं. लेखिकेच्या निरीक्षणाचा, स्मरणाचा आणि सगळा एकत्रित परिणाम देणारं लिखाण फार आश्वासक आणि साहित्य जगात उज्ज्वल भवितव्य निश्चित करणारं आहे. खरंतर संग्रहातीलच एखाद्या कथेचं नाव संपूर्ण कथासंग्रहाला देण्याऐवजी स्वतंत्र ओळख ठरावी, असं नाव देणं गरजेचं वाटतं आणि बर्याच कथा या छोटी कादंबरी होण्याच्या जवळपास असल्याने भविष्यात लेखिकेने आपल्या शैलीमधील कादंबरी लेखनाचा टप्पा गाठावा, असं वाटणं साहजिकच! एकंदरीत काय, तर भरगच्च आशयाचा ‘रिक्त’ कथासंग्रह आपल्या संग्रहात हवाच. आणि हो, पुन: वाचताना देखील कंटाळा नाही येत! ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 26-08-2018

    उत्कंठावर्धक कथासंग्रह... मोहना प्रभुदेसाई जोगळेकर यांचा ‘रिक्त’ हा कथासंग्रह नुकताच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहातील कथाविषय, पात्र, घटना, काळ यांचे निराळे संदर्भ घेऊन येतात आणि दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतात. पात्रांचा कथेतल घटनांबद्दल स्वत:चा दृष्टिकोन हेही कथांचं वैशिष्ट्य. वाटेत घडलेल्या घटनेने बदललेलं आयुष्य, आईच्या निधनांनंतर परदेशातून आलेली ती, स्वत:ची ओळख पटलेल्या दोन मुलींमुळे त्यांच्या घरात उठलेलं वादळ, मुलीवर आपल्या हातून अन्याय झाला हे अखेर तिच्यासमोर कबूल करणारे वडील, शाळकरी मुलाला त्याच्या पालकांनीच शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटायला लागणारं वास्तव, जातीभेद करायचा नाही या निश्चयाने वेगळे पाऊल उचलणारी तरुणी, आईवडिलांच्या घटस्फोटाचं सावट मनावर असताना लग्न केलेली युवती, समाजसेवेच्या अनुभवातून झालेली द्बिधा मन:स्थिती, अन्याय मुलांसाठी एका तरुणीने उचललेलं एक अनोखं पाऊल, अशा असंख्य विषयांमधून व्यक्तिरेखाचं बारीक निरीक्षण कथेतील पात्रांमधून डोकावत राहतं. या सगळ्या कथांतील वातावरणाशी वाचक नकळत एकरूप होऊन जातो. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा उत्कंठा वाढवणारी. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more