* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789937
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
RIKTA` IS MOHANA PRABHUDESAI JOGLEKAR`S SECOND STORY COLLECTION. EACH STORY FROM THIS COLLECTION SHOWS DIFFERENT SHADES AND VARIATIONS IN HUMAN NATURE. BECAUSE OF THE AUTHOR`S RESIDENCE IN BOTH THE UNITED STATES AND INDIA, HER KALEIDOSCOPE OF STORIES INCLUDE PECULIAR SUBJECTS. MOHANA`S UNIQUE STYLE KEEPS READERS INVOLVED AND BUILDS CURIOSITY TO READ FURTHER. HER STYLE TO SHOW EACH CHARACTER`S MICROSCOPIC REACTIONS AND THINKING IS AMAZING AND GIVES JUSTICE TO ALL OF THE CHARACTERS IN THE STORY.
‘रिक्त’ या कथासंग्रहात वेगवगळ्या कारणांमुळे भावनांच्या आवर्तात सापडलेल्या व्यक्तिरेखांच्या मनाचं सूक्ष्म दर्शन घडविणाऱ्या कथा आहेत. परिाQस्थतीशरण, कोणता ना कोणता सल मनात बाळगत जगणारी किंवा एखाद्या घटनेने जीवनात उलथापालथ झालेली अनेक माणसं ‘रिक्त’ या कथासंग्रहातून भेटतात. मग समलिंगी आकर्षणातून मुलीने एखाद्या मुलीशी लग्न करण्याच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालेली ‘जोडीदार’ कथेतील डॉ. मीरा असेल किंवा एका तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेला ‘वाट’ कथेतील शिंदे ड्रायव्हर असेल, नवऱ्याच्या संशयीपणाचं भूत मानगुटीवर असहायतेने वागवणारी ‘अस्तित्व’ कथेतील उज्ज्वला असेल किंवा सावत्रआईमुळे वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेली ‘समाधान’ कथेतील कमू असेल. या कथा मनोविश्लेषणात्मक असल्या तरी त्या वाचकाची उत्कंठा वाढवत राहतात. व्यक्तिरेखांचं मनोविश्लेषण आणि ओघवती, लालित्यपूर्ण भाषा या बलस्थानांसाठी वाचकांनी हा कथासंग्रह मुळातून वाचावा असा आहे. वाचनीय आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#RIKTA# MOHANA PRABHUDESAI JOGLEKAR#रिक्त# मोहना प्रभुदेसाई जोगळेकर#पाश# किनारा# अमरचा दिवस# जोडीदार# संभ्रम# पूल# वाट# अस्तित्व# समाधान# सावट# मळभ# मार्ग
Customer Reviews
  • Rating StarNilesh Malvankar

    प्रसिद्ध लेखिका मोहना जोगळेकर यांचा रिक्त हा मेहता प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला कथासंग्रह वाचनात आला. बऱ्याच काळाने दर्जेदार कथा वाचल्याचं समाधान मिळालं. या कथांमधून मानवी स्वभावाचे विविध कंगोरे समर्थपणे उलगडून दाखवले आहेत. मानवी मनाच्या भावभावनांचंबारकाईने केलेलं चित्रण या कथांमधून जाणवतं. विक्षिप्त स्वभावाच्या माणसांमुळे त्यांच्या जवळच्यांना सोसावे लागणारे त्रास. पालकांच्या अमेरिका-भारत-अमेरिका अशा स्थलांतरामुळे मुलांना स्थिरावण्यात येणाऱ्या अडचणी, ताणतणाव. हुशार पण शिकायची इच्छा असूनही परिस्थितीमुळे हतबल झालेला अमर दोन मुलींचा स्वतःबद्दलचा शोध आणि त्याचे त्यांच्या कुटुंबावर होणारे परिणाम समाजसेवेच्या क्षेत्रात आलेले काही अनुभव आणि त्याचा एका तरुणीच्या आयुष्यावर होणार परिणाम. परदेशातून बऱ्याच वर्षांनी भारतात आल्यावर गावी ओळखीच्या खुणा शोधणारी स्त्री. एका चुकीमुळे आयुष्यभराची होणारी फरफट संशयी नवऱ्यामुळे द्विधा मनस्थितीत असणारी स्त्री. काही काही गोष्टी जेव्हाच्या तेव्हा होण्याला अर्थ असतो हे सांगणारी कमुताईची कथा. आईवडिलांच्या संबंधांचं पुढे मुलीच्या आयुष्यावर पडणारी छाया. प्रेमविवाहामुळे माहेरच्यांनी संबंध तोडले, तरी जिद्दीने स्वतःच्या हिंमतीवर संसार समर्थपणे निभावून नेणारी स्त्री. परक्यांच्या मुलासाठी झटणारी तरुणी. अनोरेक्सीयाशी झगडणारी युवती अशा विविध विषयांवरील कथा या संग्रहात आहेत. बरेचसे विषय मराठीत कदाचित पहिल्यांदाच हाताळले गेलेले आहेत. हे विषयांचं नावीन्य तसेच त्या विषयांचा खोल अभ्यास कथेतून जाणवतो. एवढं असूनही कथा प्रवाही आहेत. वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यात कथा यशस्वी ठरतात. हा कथासंग्रह किंडलवरदेखील उपलब्ध आहे. या पूर्वी मोहना जोगळेकर यांचा `मेल्टिंग पॉट` हा कथासंग्रह प्रकाशित झाला होता आणि त्याला कोमसापचं पारितोषिक मिळालेलं आहे. माहेर, श्री व सौ, अनुराधा, प्रसाद, रोहिणी, साप्ताहिक सकाळ, मायबोली, BMM वृत्त तसेच अमेरिकेतील विविध दिवाळी अंकांमध्ये मोहना जोगळेकर यांच्या कथा प्रकाशित होत असतात. त्या व्यतिरिक्त लोकसत्ता, रत्नागिरी टाइम्स, प्रहार, सकाळ अशा वर्तमानपत्रांमधूनही त्यांनी लेख आणि सदरलेखन केलं आहे. लेखिकेस पुढील लेखनासाठी शुभेच्छा !! ...Read more

  • Rating Starसंवेदनशील, प्रवाही आणि वाचनीय कथा

    प्रसिद्ध लेखिका मोहना जोगळेकर यांचा रिक्त हा मेहता प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला कथासंग्रह वाचनात आला. बऱ्याच काळाने दर्जेदार कथा वाचल्याचं समाधान मिळालं. या कथांमधून मानवी स्वभावाचे विविध कंगोरे समर्थपणे उलगडून दाखवले आहेत. मानवी मनाच्या भावभावनांचंबारकाईने केलेलं चित्रण या कथांमधून जाणवतं. विक्षिप्त स्वभावाच्या माणसांमुळे त्यांच्या जवळच्यांना सोसावे लागणारे त्रास. पालकांच्या अमेरिका-भारत-अमेरिका अशा स्थलांतरामुळे मुलांना स्थिरावण्यात येणाऱ्या अडचणी, ताणतणाव. हुशार पण शिकायची इच्छा असूनही परिस्थितीमुळे हतबल झालेला अमर दोन मुलींचा स्वतःबद्दलचा शोध आणि त्याचे त्यांच्या कुटुंबावर होणारे परिणाम समाजसेवेच्या क्षेत्रात आलेले काही अनुभव आणि त्याचा एका तरुणीच्या आयुष्यावर होणार परिणाम. परदेशातून बऱ्याच वर्षांनी भारतात आल्यावर गावी ओळखीच्या खुणा शोधणारी स्त्री. एका चुकीमुळे आयुष्यभराची होणारी फरफट संशयी नवऱ्यामुळे द्विधा मनस्थितीत असणारी स्त्री. काही काही गोष्टी जेव्हाच्या तेव्हा होण्याला अर्थ असतो हे सांगणारी कमुताईची कथा. आईवडिलांच्या संबंधांचं पुढे मुलीच्या आयुष्यावर पडणारी छाया. प्रेमविवाहामुळे माहेरच्यांनी संबंध तोडले, तरी जिद्दीने स्वतःच्या हिंमतीवर संसार समर्थपणे निभावून नेणारी स्त्री. परक्यांच्या मुलासाठी झटणारी तरुणी. अनोरेक्सीयाशी झगडणारी युवती अशा विविध विषयांवरील कथा या संग्रहात आहेत. बरेचसे विषय मराठीत कदाचित पहिल्यांदाच हाताळले गेलेले आहेत. हे विषयांचं नावीन्य तसेच त्या विषयांचा खोल अभ्यास कथेतून जाणवतो. एवढं असूनही कथा प्रवाही आहेत. वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यात कथा यशस्वी ठरतात. हा कथासंग्रह किंडलवरदेखील उपलब्ध आहे. या पूर्वी मोहना जोगळेकर यांचा `मेल्टिंग पॉट` हा कथासंग्रह प्रकाशित झाला होता आणि त्याला कोमसापचं पारितोषिक मिळालेलं आहे. माहेर, श्री व सौ, अनुराधा, प्रसाद, रोहिणी, साप्ताहिक सकाळ, मायबोली, BMW वृत्त तसेच अमेरिकेतील या विविध दिवाळी अंकांमध्ये मोहना जोगळेकर यांच्या कथा प्रकाशित होत असतात. त्या व्यतिरिक्त लोकसत्ता, रत्नागिरी टाइम्स, प्रहार, सकाळ अशा वर्तमानपत्रांमधूनही त्यांनी लेख आणि सदरलेखन केलं आहे. लेखिकेस पुढील लेखनासाठी शुभेच्छा !! ...Read more

  • Rating Star- संजय वैशंपायन, 21/1/2020

    आशयाने परिपूर्ण रिक्त कथासंग्रह भारतातून अमेरिकेत स्थायिक होऊन पुढची पिढी हाताशी आणि तरी भारतीयत्वाची नाळ तुटत नाही हेच खरं आणि अशाच प्रकारच्या भावना व विचार मूळच्या रत्नागिरीकर मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर, यांनी त्यांच्या स्वतंत्रपणे प्रकाशित झालेल्या‘रिक्त` या कथासंग्रहामधील कथांमधून मांडल्या आहेत. लेखिकेचा ‘मेल्टिंग पॉ` हा पहिला कथासंग्रह. त्याची फार मोठी चर्चा झाली होती. कोमसापचा लेखिकेचा पुरस्कारही या पुस्तकाच्या मध्यमातील सृजनासाठी लेखिकेला प्राप्त झाला आहे. यामुळे ‘रिक्त` या संग्रहातून मोठ्या अपेक्षा होत्याच आणि त्या पूर्ण होतात, असंच म्हणावं लागेल. मुखपृष्ठ पाहताच यामधील कथा नव्या युगाच्या, नव्या धाटणीच्या असणार असंच वाटतं. ‘रिक्त` कथासंग्रहातील कथाविषय, पात्र, घटना, काळ यांचे निराळे संदर्भ घेऊन येतात आणि त्यामुळेच दीर्घ काळ मनात रेंगाळत राहतात. पात्रांचा कथेतील घटनांबद्दल स्वत:चा दृष्टीकोन हेही कथांचं वैशिष्ट्य. वाटेत घडलेल्या घटनेने बदललेलं आयुष्य, आईच्या निधनानंतर परदेशातून आलेली ती, स्वत:ची ओळख पटलेल्या दोन मुलींमुळे त्यांच्या घरात उठलेलं वादळ, मुलीवर आपल्या हातून अन्याय झाला हे अखेर तिच्यासमोर कबूल करणारे वडील, शाळकरी मुलाला त्याच्या पालकांनीच शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटायला लागणारं वास्तव, जातिभेद करायचा नाही, या निश्चयाने वेगळं पाऊल उचलणारी तरुणी, आई-वडिलांच्या घटस्फोटाचं सावट मनावर असताना लग्न केलेली युवती, समाजसेवेच्या अनुभवातून झालेली द्विधा मन:स्थिती, अनाथ मुलासाठी एका तरुणीने उचललेलं अनोखं पाऊल, घरातील ‘फूकट` गेलेला मुलगा, अशा असंख्य विषयांमधून व्यक्तिरेखांचं बारीक निरीक्षण कथेतील पात्रापात्रांतून डोकावत राहतं. सारीच पात्रं वाचकाला अलगद त्या त्या काळात नेऊन सोडतात, कथेतील काळाशी, वातावरणाशी वाचक नकळत एकरूप होऊन जातो. ‘रिक्त` कथासंग्रहातील प्रत्येक कथा ‘पुढे काय’ ही उत्कंठा वाढवणारी आणि पुढील कथेबद्दल उत्सुकता ताणणारी आहे; पण पहिल्याच ‘पाश’ या कथेमध्ये निखळ कोकणातील धोपेश्वरमधील कुटुंबाची घरातील सदस्यांमुळे झालेली परवड आणि नंतर ते रक्ताच्या नात्यांचे पाश तुटताना व तोडताना झालेली तडफड फार उत्कटपणे मांडली आहे. हा कथासंग्रह १३ भरगच्च कथांचा आहे. यामुळे सर्वच कथांबद्दल स्वतंत्रपणे लिहिणे शक्य होणार नाही; परंतु त्यातील उल्लेखनीय ‘अमरचा दिवस’ टिपिकल झोपडपट्टीतील वातावरणात वाढणार्या मुलांची घुसमट, प्रगतीची आस अन् परीस्थितीचा तणाव ही संपूर्ण मध्यमवर्गीय वाचकाला अनभिज्ञ परिस्थिती मांडण्यात व त्यातील काळीज पिळवटून टाकणारी वस्तुस्थिती अत्यंत प्रखर तीव्रतेने शब्दबद्ध करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. मोगरेबार्इंच्या रूपाने सुशेगात मध्यमवर्गीय स्थिती आणि सुटू न शकणार्या परिस्थितीच्या प्रश्नांची उकल शोधणार्या मंगलातार्इंच्या भांबावलेपणाची मांडणी सुरेखच साधली आहे. ‘संभ्रम’चा कथाविषय, खरंतर लेखिकेचं प्रोफाईल पाहिलं तर अनवट वाटणारा. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मानवी गिनीपिग्ज उपलब्ध करून देण्याचा वेगळा व्यापार, त्यातील प्रश्न आणि सज्जन मनाला पडणारे प्रश्न फार धाडसाने मांडण्यात आले आहेत. कथा जरी मीना- चेतनची असली तरी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आक्रमणात माणसांचा प्रयोग म्हणून वापर करण्याच्या प्रवृत्तीचा फायदा घेणाNयांचा उद्योग कथापटावर मांडण्यात आला आहे. ‘समाधान’ ही कथा ५५ ते ७० या कालखंडातील असल्याचे निश्चितपणे वाटते. अशा पाश्र्वभूमीवर कमू, गीताई, आबा या व्यक्तिरेखा थोडक्या लेखनात अतिशय समर्थपणे लेखिका उभ्या करते. वर्षाला बावन्न चित्रपट सावत्र मुलीला दाखवणारी गीताई आणि सावत्र मुलीची आत्या सुधा यांचे नातेसंबंध, त्यांची अपरिहार्यता उभी करण्याचे शिवधनुष्य लेखिकेने समर्थपणे पेलले आहे. भरगच्च आशयमूल्य असणार्या १३ कथा समाविष्ट असणार्या या कथासंग्रहाचं नाव ‘रिक्त’ का, याचं उत्तर या संग्रहातील शेवटची कथा ‘रिक्त’ हे आहे. वयात येणार्या अमिताकडे सगळ कुटुंब लक्ष देत असूनही शाळेतील मुलांचं चिडवणं मनाला लागतं आणि मनोरुग्ण व्हावं अशा परिसीमेने अमिता अन्न उलटून टाकणं, अवाजवी एरोबिक्स करते. युरोपात राहण्याचे भारतीयांवर होणारे मानसिक परिणाम बारीक बारीक कंगोर्यासह समर्थपणे मांडणारी कथा म्हणजे ‘रिक्त.’ खरंतर संग्रहातील सर्वच कथा परिपूर्ण आहेत; परंतु लेखिकेच्या मते यातील परमोच्च कथा ‘रिक्त’ असावी आणि त्यामुळेच संग्रहाला ‘रिक्त’ नाव दिलं असावं. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक अतिशय व्यावसायिक पद्धतीने प्रकाशित केलं आहे. सुरेख मुखपृष्ठ, छान टाईप व कागद देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचा वापरल्याने वाचताना बरं वाटतं. लेखिकेच्या निरीक्षणाचा, स्मरणाचा आणि सगळा एकत्रित परिणाम देणारं लिखाण फार आश्वासक आणि साहित्य जगात उज्ज्वल भवितव्य निश्चित करणारं आहे. खरंतर संग्रहातीलच एखाद्या कथेचं नाव संपूर्ण कथासंग्रहाला देण्याऐवजी स्वतंत्र ओळख ठरावी, असं नाव देणं गरजेचं वाटतं आणि बर्याच कथा या छोटी कादंबरी होण्याच्या जवळपास असल्याने भविष्यात लेखिकेने आपल्या शैलीमधील कादंबरी लेखनाचा टप्पा गाठावा, असं वाटणं साहजिकच! एकंदरीत काय, तर भरगच्च आशयाचा ‘रिक्त’ कथासंग्रह आपल्या संग्रहात हवाच. आणि हो, पुन: वाचताना देखील कंटाळा नाही येत! ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 26-08-2018

    उत्कंठावर्धक कथासंग्रह... मोहना प्रभुदेसाई जोगळेकर यांचा ‘रिक्त’ हा कथासंग्रह नुकताच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहातील कथाविषय, पात्र, घटना, काळ यांचे निराळे संदर्भ घेऊन येतात आणि दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतात. पात्रांचा कथेतल घटनांबद्दल स्वत:चा दृष्टिकोन हेही कथांचं वैशिष्ट्य. वाटेत घडलेल्या घटनेने बदललेलं आयुष्य, आईच्या निधनांनंतर परदेशातून आलेली ती, स्वत:ची ओळख पटलेल्या दोन मुलींमुळे त्यांच्या घरात उठलेलं वादळ, मुलीवर आपल्या हातून अन्याय झाला हे अखेर तिच्यासमोर कबूल करणारे वडील, शाळकरी मुलाला त्याच्या पालकांनीच शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटायला लागणारं वास्तव, जातीभेद करायचा नाही या निश्चयाने वेगळे पाऊल उचलणारी तरुणी, आईवडिलांच्या घटस्फोटाचं सावट मनावर असताना लग्न केलेली युवती, समाजसेवेच्या अनुभवातून झालेली द्बिधा मन:स्थिती, अन्याय मुलांसाठी एका तरुणीने उचललेलं एक अनोखं पाऊल, अशा असंख्य विषयांमधून व्यक्तिरेखाचं बारीक निरीक्षण कथेतील पात्रांमधून डोकावत राहतं. या सगळ्या कथांतील वातावरणाशी वाचक नकळत एकरूप होऊन जातो. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा उत्कंठा वाढवणारी. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more