* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE CURE
  • Availability : Available
  • Translators : DR.SUBHASH DANDEKAR
  • ISBN : 9788184984996
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 352
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
JOHN AND AILEEN CROWLEY WERE ON TOP OF THE WORLD. WITH JOHN’S BRAND-NEW HARVARD BUSINESS SCHOOL DEGREE, A GREAT JOB, AND THREE BEAUTIFUL CHILDREN, THEY THOUGHT THEY FINALLY HAD IT ALL. THEN THEIR TWO YOUNGEST CHILDREN WERE DIAGNOSED WITH POMPE DISEASE – A MUSCULAR DISORDER SO RARE THAT NO COMPANY HAD YET DEVELOPED A MEDICINE FOR IT. OVERNIGHT, EVERYTHING CHANGED. THE CHILDREN WERE GIVEN ONLY MONTHS TO LIVE. BUT JOHN CROWLEY REFUSED TO ACCEPT FATE. DETERMINED TO FIND SCIENTISTS WHO COULD DEVELOP AN ENZYME THAT WOULD KEEP HIS CHILDREN ALIVE, JOHN QUIT HIS JOB AND INVESTED HIMSELF AND HIS LIFE SAVINGS IN A BIOTECH START-UP COMPANY. THE COMPANY WENT ON TO MAKE MEDICAL AND BUSINESS HISTORY. BUT THE STRUGGLE WASN’T OVER YET, AND SCIENTIFIC SETBACKS, ACCUSATIONS OF CONFLICT OF INTEREST, BUSINESS TROUBLES, AND THE CHILDREN’S OWN WORSENING CONDITION WOULD TEST THE LIMITS OF JOHN AND AILEEN’S MINDS AND HEARTS AS THEY FOUGHT FOR A CURE.
पॉम्पे व्याधी ही एक जनुकीय दोषामुळे होणारी व्याधी असून या रुग्णांमध्ये विशिष्ट वीकराच्या अभावामुळे रुग्णाचे सर्व स्नायू दुर्बल होत जातात. इतके अशक्त की, त्या बालकाला हसणे, बोलणे, गिळणे, श्वास घेणे अशक्य होते. श्वसन यंत्राच्या मदतीने श्वसन चालू ठेवावे लागते. दोन-तीन वर्षांत बाळ मृत्युमुखी पडते. ही व्याधी झालेल्या आपल्या दीड वर्षांच्या मुलीला व सहा महिन्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी जिवाचे रान करून जॉन क्रौली शंभर दशलक्ष डॉलर्स जमवून संशोधनाला मदत करतो आणि अखेरीस आपली मुले आणि या व्याधीने ग्रस्त असलेल्या जगभरातल्या बालकांना जीवनदायी औषध मिळवून देतो. जॉन व त्याची पत्नी एलीन यांचे परस्परांवरील व मुलांवरील प्रेम आणि दुर्दम्य आशा यांची ही सत्यकथा कल्पनेपेक्षाही वास्तवावर आधारित आहे. हे पुस्तक वाचणे, हा एक वेगळाच अनुभव आहे. पुस्तक वाचताना दु:खाने आणि आनंदाने डोळ्यांत अश्रू आले नाहीत, रोमांचित झाला नाहीत, असे होणे अशक्यच आहे!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #GEETAANAD #SUBHASHDANDEKAR #THECURE #VYADHIMUKTA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK GOMANTAK SHABDSOHALA 30-03-2014

    ‘व्याधिमुक्त’ पुस्तकाचं शीर्षक वाचलं तेव्हा वाटलं की असाध्य रोगाचा धीरोदत्तपणे सामना करणाऱ्या व्यक्तीच्या अनुभवांवर आधारित असं हे लेखन असेल. या प्रकारची काही पुस्तकं वाचनात आलीही होती, पण जेव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा या सत्यकथेचं वेगळेपण लक्षातयेत गेलं. अनेकदा मन भरून आलं, विस्मित, स्तिमित आणि सुन्नही झालं... अतिशय उमदा, देखणा, बुद्धिमान, उत्साही जॉन आणि सुंदर, सुस्वभावी, मुलांची आवड असणारी एलिन... या तरूण निरोगी दांपत्याची तीन मुलं... सुदृढ, निकोप, गोड, खूप चळवळ्या, हुशार जॉन ज्युनियर, मोहक, सुंदर मेगन आणि छोटुसा गोंडस पॅट्रिक हॉवर्ड बिझनेस स्कूलचा पदवीधर असलेला धडाडीचा, कर्तृत्ववान जॉन उत्तम कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. सगळं छान चाललेलं होतं, पण अनपेक्षितपणे एक भयानक वास्तव, आकाशीची कुऱ्हाड कोसळावी तसं त्याच्यासमोर आलं. जॉन आणि एलिन यांच्या धाकट्या दोन मुलांना (मेगन वय साडेनऊ वर्षे आणि पॅट्रिक, वय ६ महिने) कधी न ऐकलेली व्याधी असल्याचं निदान करण्यात आलं. पॉम्पे व्याधी आणि असं सांगण्यात आलं की, या रोगावर कोणताही उपाय उपलब्ध नाही. पॉम्पे व्याधी ही एका जनुकीय दोषामुळे होणारी व्याधी असून, या रुग्णामध्ये विशिष्ट विकराच्या अभावामुळे रुग्णाचे सर्व स्नायू दुर्बल होत जातात. इतके अशक्त की, त्या बालकाला हसणे, बोलणे, श्वास घेणे अशक्य होत जाते. श्वसन यंत्राच्या साहाय्याने श्वसन चालू ठेवावे लागते. दोन-तीन वर्षांत बाळ मृत्युमुखी पडते. हे काळीज पिळवटून टाकणारं निदान ऐकल्यावर त्या दोघांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करणं सुद्धा कठीण. या धक्क्यातून हळूहळू मनाला सावरल्यानंतर सुरू होतो, वेगळा, फार विलक्षण असा लढा... आपल्या बाळांना वाचवण्यासाठी जॉन ज्याप्रकारे जीवाचे रान करतो आणि एलिन आपल्या मुलांची सर्वकाळ काळजी घेत असताना ज्याप्रकारे साथ देतो हे सर्व थक्क करणारेच! या व्याधीवर औषध तयार करण्याच्या/शोधून काढण्याच्या संशोधनाला गती देण्यासाठी जॉन आपलं शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक असं सर्व प्रकारचं बळ पणाला लावतो. दुर्दम्य आशावाद, अदम्य अथक प्रवास, दृढ आत्मविश्वास, तीव्र इच्छाशक्ती यांच्या बळावार ते साध्य करतो. संशोधक लिखाण करणाऱ्या वार्ताहर असलेल्या गीता आनंद यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक हे पुस्तक लिहिले आहे. स्वत: केलेले निरिक्षण, या संशोधनाशी संबंधित शेकडो लोकांच्या मुलाखती, विविध नोंदी, वर्तमापत्रे, व्हिडिओज यांचा आधार घेऊन ५ वर्षे परिश्रम घेऊन सर्व तपशील व बारकावे समोर आणत हे प्रेरणादायी पुस्तक साकारले आहे. डॉ. सुभाष दांडेकर यांनी उत्तम अनुवाद केला आहे. आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने ही सत्यकथा प्रसिद्ध केली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more