ANNE FRANK

About Author

Birth Date : 12/06/1929
Death Date : 01/01/1945


ANNELIES MARIE "ANNE" FRANK WAS A GERMAN-BORN JEWISH GIRL WHO KEPT A DIARY IN WHICH SHE DOCUMENTED LIFE IN HIDING UNDER NAZI PERSECUTION. SHE IS A CELEBRATED DIARIST WHO DESCRIBED EVERYDAY LIFE FROM HER FAMILY HIDING PLACE IN AN AMSTERDAM ATTIC.

अ‍ॅन प्रँÂक यांचा जन्म जर्मनीमधील प्रँÂकफर्ट येथे झाला. नाझीवादाची बळी ठरलेली अ‍ॅन प्रँÂक जगभर प्रसिद्ध झाली ती तिच्या लिखाणामुळे. नाझींच्या छळाचे वर्णन असलेली तिची ‘डायरी’ जगभर गाजली. पुढे त्यावर आधारित अनेक नाटके व चित्रपट निघाले. दुसNया जागतिक महायुद्धात जर्मनीने नेदरलँडवर कब्जा करेपर्यंत प्रँÂक कुटुंब नेदरलँडमध्येच होते. १९४० मध्ये या कुटुंबाने नाझी सैन्यापासून वाचण्यासाठी ओटो प्रँÂक यांच्या कार्यालयातील तळघरात आश्रय घेतला होता. तिथे अ‍ॅन प्रँÂकने आपली ‘डायरी’ लिहिली दोन वर्षानंतर तेथून बाहेर पडल्यावर त्यांनी निर्वासित छावण्यात आश्रय घेतला. तेथेच मार्च १९४५ मध्ये अ‍ॅन प्रँÂक आणि तिची बहीण मार्गेट प्रँÂक यांचा मृत्यू झाला. नाझींच्या अत्याचारांनंतरही प्रँÂक कुटुंबातील अ‍ॅन प्रँÂकचे वडील ओटो प्रँÂकच जिवंत राहिले. अ‍ॅमस्टरडॅमला परत आल्यानंतर त्यांना अ‍ॅन प्रँÂकची ‘डायरी’ सापडली. ती त्यांनी १९४७ मध्ये प्रसिद्ध केली. डच भाषेत लिहिलेले हे लिखाण १९५२ मध्ये ‘द डायरी ऑफ ए एन्ग गर्ल’ नावाने इंग्लिशमध्ये पहिल्यांदा भाषांतरीत झाले. त्यानंतर अनेक भाषांत याचे भाषांतर झाले आहे. ही डायरी अ‍ॅन प्रँÂकला तिच्या १३ व्या वाढदिवसाला भेट दिली होती. त्यामध्ये तिने १२ जून १९४२ पासून १ ऑगस्ट १९४४ पर्यंत जीवनातील घटनांची नोंद केली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DIARY OF ANNE FRANK Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more