* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ALIVE
  • Availability : Notify Me
     
  • Translators : ASHOK PATHARKAR
  • ISBN : 9788177668339
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
12TH OCTOBER 1972. A RUGBY TEAM OF AMATEUR PLAYERS, THEIR FRIENDS AND RELATIVES FROM URUGUAY, SOUTH AMERICA, LEAVE FOR ARGENTINA BY AN AIR FORCE PLANE. THE PLANE CRASHES AT A HIGH ALTITUDE WHILE CROSSING THE ANDES. FROM THE 45 PASSENGERS AND CREW, 13 DIE ON THE SPOT. FROM THE 32 SURVIVORS, SOME GET SERIOUSLY INJURED. THE PLACE GETS COVERED WITH THICK SNOW. THERE IS NO VEGETATION, NO FOOD OR WATER EXCEPT FOR SOME CHOCOLATES AND A LITTLE WINE FROM LEFT OVERS OF THE PLANE. EFFORTS TO LOCATE THE PLANE FROM THE AIR AND FROM THE GROUND ARE UNSUCCESSFUL. SEVERAL ATTEMPTS MADE BY THE SURVIVORS TO FIND A ROUTE TO CIVILIZATION ALSO FAIL - TILL THE LAST ONE. THEY ARE TRAPPED FOR 72 DAYS DURING WHICH PERIOD 16 MORE OF THEM DIE LEAVING ONLY 16 ALIVE. HOW DID THEY SURVIVE FOR 72 DAYS ? HOW DID THEY BEHAVE ? HOW WERE THEY RESCUED IN THE END ? WHAT DID THEY HAVE TO GO THROUGH AFTER THEY WERE RESCUED ? THIS IS A STORY OF CATASTROPHE, HUMAN ENDURANCE AND A STUDY IN HUMAN PSYCHOLOGY.
चाळीस उतारू व पाच कर्मचारी यांना घेऊन उड्डाण केलेले ते विमान अँडीज पर्वतावर आदळले. तुकडे झालेल्या विमानाचा अर्धा भाग हाच त्या उतारूंचा आसरा! थोडीशी वाईन व काही चॉकलेटस् एवढेच खाद्य! अपघात झाला तेव्हा फक्त ३२ जण वाचले होते. काही दिवसांत २७ उरले. मग १९ आणि शेवटी फक्त १६. शेवाळंही नसलेल्या बर्फाच्छादित पर्वतावर ७२ दिवस ते कसे जिवंत राहिले? कसे वागले? त्यांची सुटका कशी झाली? आणि सुटकेनंतर त्यांना कोणत्या अनुभवाला सामोरे जावे लागले? याची ही रोमांचकारी सत्यकथा!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #ALIVE #ASOKPATHARKAR #PIERSPAULREAD #BIOGRAPHYA&TRUESTORIES
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    12 ऑक्टोबर 1972 ला हौशी खेळाडूंची रब्बीची टीम उरुग्वे हवाईदलाच्या विमानाने सांटीयागोला जाण्यास निघाली .विमानात चाळीस प्रवासी आणि पाच कर्मचारी होते .विमान अँडीज पर्वतावर आदळले. अपघात झाला तेव्हा त्यातील बत्तीसजण शिल्लक राहिले . सोबतीला खाण्यासाठी थोडीवाईन आणि काही चॉकलेट्स आणि राहण्यासाठी तुटलेल्या विमानाचा अर्धा भाग. चिली ,अर्जेंटिना ,उरुग्वे या तिन्ही देशांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला .पण अँडीजवरील अतिशुभ्र बर्फामुळे आणि खराब वातावरणामुळे त्यांचा शोध घेण्यास अडचण येऊ लागली.काही दिवसांनी त्यातील 27 प्रवासी उरले तर नंतर फक्त सोळा .अडीज महिन्यांनी ( सुमारे बहात्तर दिवसांनी )एक चिलीयन शेतकऱ्याला गुरे चरायला घेवुन जाताना दोन माणसे दिसली . तो घाबरून पळून गेला .नंतर दुसऱ्या दिवशी परत त्याला ती दिसली आणि त्यांची यातून सुटका झाली .ते कसे जिवंत राहिले आणि सुटकेनंतरही त्यांनी काय अनुभवले याची रोमांचकारी सत्यकथा ...Read more

  • Rating StarDainik Aikya ,Satara 3-2-2008

    विसाव्या शतकातील एक विलक्षण घटना म्हणून १९७२ साली अँडीज पर्वतावर झालेल्या विमान अपघाताची नोंद केली जाते. विमान अपघात ही काही आता अपरिचित वा अनोखी घटना मानली जात नाही. परंतु हा अपघात मात्र विलक्षण ठरला याचे कारण त्यातील प्रवाशांना अपघातानंतर तब्बल सततर दिवस त्या हिमाच्छादित पर्वताच्या भीषण थंडीवा-यात काढावे लागले. त्या पर्वतावर गवतही उगवत नाही. झाडेझुडपे नाहीत. शंभर फूटांपर्यंत बर्फाचे थर... काही प्रवासी अपघातानंतर लगेच मृत झाले, जे उरले त्यातील काहीजण जखमी... घायाळ... आजूबाजूला वस्ती नाही. गावही पन्नाससाठ मैल दूर. संपर्काचे साधन नाही. फक्त चार तासाच्या प्रवासासाठी निघालेल्या या विमानातील प्रवाशांजवळ खाण्यापिण्याच्या वस्तूही मोजक्याच होत्या. चॉकलेटस, चीज, वाइन, अँपल. सर्व फारच तोटके. या प्रवाशांनी मदतीसाठी वरून जाणाऱ्या विमानांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. सुटकेसाठी प्रयत्न करणा-या हेलिकॉप्टर्सचेही लक्ष आपल्याकडे जावे म्हणून खाणाखुणा केल्या. परंतु बर्फात गाडल्या गेलेल्या विमानाच्या अवशेषांकडे कोणाचे लक्ष गेले नाही. पुढले सत्तर दिवस अठ्ठावीस प्रवाशांना त्या भयाण थंडीत, मोडलेल्या छोट्या विमानात काढावे लागले. रॉबिन्सन ब्रूसोला जहाज बुडाल्याने एका निर्जन बेटावर एकाकी राहावे लागले. येथे मैलोगणती केवळ बर्फ बर्फ... एकही झाडझुडुप नाही... दरीकपार नाही... मोडक्या विमानाच्या आत सर्वांना धड झोपता येण्याएवढीही जागा नाही... खायला फारसे काही नाही. प्यायला पाणी नाही अशा अवस्थेत काढावे लागते. काहीजण जखमी. हातापाय तुटलेले... काहीजण आजारी... काहीजण मरणासन्न... सत्तर दिवस त्यांनी कसे काढले असतील? मानवी जीवनातले हे एक अभूतपूर्व असे प्रकरण मानावे लागेल. या प्रवाशांमधले परस्परसंबंध या सत्तर दिवसात कसे राहिले? एकमेकांच्यात संघर्ष कसे झाले? जगण्यासाठी काय व्यूहरचना केली गेली? खाण्यापिण्याचे रेशनिंग कसे अंमलात आणले गेले? परस्परांच्या सोयीसाठी, स्वास्थ्यासाठी स्वेच्छा स्वार्थत्याग करणे कुठवर शक्य झाले? मोजक्या महिला असताना त्यांच्याशी इतरांचे वर्तन कसे राहिले? आलेल्या परिस्थितीला हे सर्वजण कसे सामोरे गेले? आपल्याच मित्रांची प्रेते विमानाशेजारी बर्फात पुरताना भावनांचे कल्लोळ कसे उठले? उपलब्ध मनुष्यबळाचा वापर कसा करण्यात आला? ...हे सर्व तपशील वाचताना आपल्या अंगावर काटा येतो. आपल्या मध्यमवर्गीय संवेदनांना धक्का बसावा असे खूप काही घडताना दिसते. माणसाला जगण्यासाठी अशा दुर्धर परिस्थितीत काय काय करावे लागते? माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो? याबाबत आपली कल्पनाशक्तीही थिटी पडते. माणसाची कल्पकता आणि उद्यमशीलता कशा प्रकारे काम करते? एकेक तपशील थक्क करतो. सत्तर दिवस हे अठ्ठावीस जण वीस फूट बाय आठ फूट एवढ्या मोकळ्या जागेत राहतात. तशात हे विमान तीस अंशांनी कललेले, तिरपे घसरगुंडीसारखे. एकजण जरासा हलला, कूस बदलू लागला तरी सर्वांना हलावे लागे. मुले झोपेत नकळत हात वा पाय झटकत. त्याचा प्रसाद दुसऱ्याला मिळे. काहीजण मानसिक धक्का बसलेले. रात्री उठून मी फ्रीजमधून कोक घेऊन येतो-असे काहीतरी म्हणत इतरांच्या देहावरून चालत जात... भ्रमात असत. पंचेचाळीसपैकी फक्त ३२ प्रवासी जिवंत... त्यातलेही चौघेजण पुढे गतप्राण होतात. विमान बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच शोध घेण्याची मोहिम सुरू होते. रेडिओवर बातमी येते. प्रतिकूल हवामानामुळे शोधकार्यात अडथळे येतात. प्रचंड ढग आणि बर्फ यामुळे अँडीजचा पृष्ठभाग पूर्ण झाकला गेलेला. सर्वजणच अपुऱ्या आहारामुळे अशक्त झालेले, थकलेले, अंगात शक्ती आणायची कशी? जवळ खाद्यपदार्थ नाहीत. सुटकेची आशा नाही. तेव्हा व्हॅनेसा सुचवतो, ‘आपल्या अंगी शक्ती राहिली पाहिजे. अन्न तर येथे नाही. येथे फक्त हे मृतदेह आहेत. जिवंत राहण्याचा प्रयत्न करणे हे आपले नैतिक उत्तरदायित्व आहे. त्यासाठी कोणतेही मार्ग क्षम्य होत. अखेरीस हे देह म्हणजे तरी काय? मांस आणि हाडे, त्यांचा प्राण स्वर्गात देवापाशी आहे... जे उरले आहे ते बकरीच्या-डुकराच्या मांसासारखेच नव्हे का?’ काहीजणांना हे पटते. काहीजणांना ते ऐकूनच मळमळते. एकजण एका देहावरील वस्त्रे दूर करून काचेच्या तुकड्याने त्याची त्वचा दूर करतो. गोठून दगडाप्रमाणे कठीण झालेल्या मांसाचे आगपेटीतल्या काडीसारखे लांब तुकडे कापून विमानाच्या छपरावर पसरतो... व्हॅनेसा प्रार्थना करतो, ‘देवा, मी आता जे करणार आहे ते योग्य आहे असा माझा विश्वास आहे. ते करायला मला तू सामर्थ्य दे.’ तो त्यातील एक काडी घेऊन तोंडात टाकतो. वीस वर्षे वयाचा गुस्टावो निकोलिच आपल्या प्रेयसीला पत्र लिहितो. ‘तुझा विश्वास बसणार नाही. माझाही बसणार नाही अशी एक गोष्ट आज घडली. ती म्हणजे आहारासाठी आम्ही मृतदेह कापणे सुरू केले... दुसरा पर्यायच नाही. देवाची इच्छा हीच खरी गोष्ट आहे. त्यामुळे आलेल्या प्रसंगाला धैर्याने आणि श्रद्धेने तोंड देणे आम्हाला भाग आहे... आपण पाप करीत आहोत असे मला वाटत नाही. ‘आपल्या देहाचा वापर होऊन दुसऱ्याचा प्राण वाचणार असेल तर त्याला मी आनंदाने तयार होईन...’ सत्तर दिवसांनी या प्रवाशांकडे बाह्य जगाचे लक्ष जाते. त्यांची सुटका होते... १२ डिसेंबरला तिघेजण सांतियागोला पोहोचतात. २० डिसेंबरला उर्वरित चौदा जणांना घेण्यासाठी हवाईदलाचे विमान येते. सांतियागोला ते पोहोचते. दहा आठवडे केवळ बर्फावर हे तरूण जिवंत राहणे शक्य नाही हे तेथील डॉक्टरांचे मत... ते चौकशी करतात, ‘शेवटी तुम्ही काय खाल्ले?’ इन्शियाटें उत्तर देतो, ‘माणसाचे मांस.’ एक फारदर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मुलाखती टेप करतात. एका दैवी चमत्काराचे प्रतीक म्हणून त्यांचे कौतुक होते. वृत्तपत्रात याबद्दलच्या बातम्या झळकतात. जगभर टीव्ही-रेडिओद्वारे त्या जातात. उरुग्वेमध्ये मात्र या बातम्या कोणी छापत नाही. पत्रकार परिषदेत एक निवेदन देण्यात येते. ‘उंच बर्फाच्छादित शिखरांवर भव्यदिव्य सृष्टीच्या सान्निध्यात असताना आपण एकाकी आहोत याची जाणीव होते... आपण आणि परमेश्वर असे दोघेच आहोत असे वाटते. आपण परमेश्वराच्या जवळ आहोत, तो आपल्या प्रत्येकात आहे अशी जाणीव होते... जे घडणार आहे, जे घडते ते परमेश्वराच्या इच्छेनुसार... आमच्याकडे खाण्यासाठी काही उरले नाही तेव्हा आम्हाला येशूचे स्मरण झाले. येशूने आपले मांस आणि रक्त लोकांना दिले तसे आपण का करू नये असे वाटले. त्या दृष्टांतामुळेच आज आम्ही आपल्यापुढे दिसत आहोत... त्याबद्दल काही विचारवंताना आमच्या या भावनांची आपण कदर करावी एवढीच प्रार्थना आहे.’ त्या ४५ प्रवाशांपैकी फक्त १६ जण उरले होते. जिवंत परतले होते. अर्तुरो नोगिराचे वडील वृत्तपत्रांना पत्र पाठवतात. ‘या सोळा वीर मुलांचे कौतुक करतो. त्यांनी दाखवलेली एकजूट, श्रद्धा, धारिष्ट्य यासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी अपघातानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या केलेल्या सेवेसाठी प्रत्येकाने त्यांच्यापासून धडा घ्यायला हवा. आपला अहंपणा, आपली स्वार्थी आणि संकुचित विचारसरणी बदलायला हवी.’ ‘अलाइव्ह’द्वारे एक विलक्षण अनुभवमालिका आपल्यापुढे उभी राहते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more