* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BEIJING CONFIDENTIAL
  • Availability : Available
  • Translators : MOHAN GOKHALE
  • ISBN : 9789386175496
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 332
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
JAN WONG HAS RETURNED TO BEIJING. HER QUEST: TO FIND SOMEONE SHE ENCOUNTERED BRIEFLY IN 1973, AND WHOSE LIFE SHE WAS CERTAIN SHE HAD RUINED FOREVER. IN THE EARLY 70S, JAN WONG TRAVELLED FROM CANADA TO BECOME ONE OF ONLY TWO WESTERNERS PERMITTED TO STUDY AT BEIJING UNIVERSITY. ONE DAY A YOUNG STRANGER, YIN LUOYI, ASKED FOR HELP IN GETTING TO THE UNITED STATES. WONG, THEN A STARRY-EYED MAOIST, IMMEDIATELY REPORTED YIN TO THE AUTHORITIES. THIRTY-THREE YEARS ON, AND MORE THAN A DECADE AFTER THE PUBLICATION OF HER BESTSELLING RED CHINA BLUES, JAN WONG REVISITS THE CHINESE CAPITAL TO BEGIN HER SEARCH FOR THE PERSON WHO HAS HAUNTED HER CONSCIENCE. SHE WANTS TO APOLOGIZE, TO SOMEHOW MAKE AMENDS. AT THE VERY LEAST, SHE WANTS TO DISCOVER WHETHER YIN SURVIVED. AS JAN WONG HUNTS THROUGH THE CITY, SHE FINDS HERSELF TRAVELLING BACK THROUGH THE DECADES, BACK TO HER EXPERIENCES IN THE CULTURAL REVOLUTION, TO PLACES THAT WERE ONCE OF HUGE IMPORTANCE TO HER. SHE HAS CHANGED, OF COURSE, BUT NOT AS MUCH AS BEIJING. ONE OF THE WORLD’S MOST ANCIENT CITIES IS NOW ONE OF ITS MOST MODERN. THE NEON SIGNS NO LONGER SAY “LONG LIVE CHAIRMAN MAO” BUT INSTEAD TOUT MARY KAY COSMETICS AND KENTUCKY FRIED CHICKEN. PLACES SHE ONCE KNEW HAVE VANISHED, BULLDOZED INTO OBLIVION AND REPLACED BY AVANT-GARDE ARCHITECTURE, TRENDY BARS, AND SLEEK CONDOS. THE PEOPLE SHE ONCE KNEW HAVE CHANGED, TOO, FOR BETTER OR FOR WORSE. MEMORIES ARE EVERYWHERE. BY SEARCHING OUT OLD FRIENDS AND ACQUAINTANCES, JAN WONG UNCOVERS TANTALIZING CLUES ABOUT THE WOMAN SHE WRONGED. SHE REALIZES HER DEEPEST FEARS AND REGRETS WERE JUSTIFIED. BUT YIN HERSELF REMAINS ELUSIVE–UNTIL THE DAY SHE PHONES JAN WONG. EMOTIONALLY POWERFUL AND RICH WITH DETAIL, BEIJING CONFIDENTIAL WEAVES TOGETHER THREE DISTINCT STORIES–WONG’S JOURNEY FROM REMORSE TO REDEMPTION, YIN’S JOURNEY FROM DISGRACE TO RESPECTABILITY, AND BEIJING’S STUNNING JOURNEY FROM COMMUNISM TO CAPITALISM.
जेन वाँग या, तिसऱ्या पिढीतील चिनी-कॅनेडियन, पुरस्कारविजेत्या लेखिकेचे हे चीनसंबंधीचे तिसरे पुस्तक. सन १९७०च्या दशकाच्या सुरुवातीला बीजिंग विद्यापीठामध्ये मँडरिन भाषा शिकण्यासाठी प्रवेश मिळणाऱ्या पहिल्या दोन विद्यार्थिनींपैकी एक. माओ झेडाँग यांच्या `सांस्कृतिक क्रांतीच्या` ऐन बहराचा तो काळ होता. एकीकडे साम्यवादी विचारसरणीचे आकर्षण, तर दुसरीकडे कॅनडामध्ये परकेपणा अनुभवल्यामुळे कोठेतरी आपली चिनी ओळख पटवण्याची, त्यांच्यामध्ये सामावले जाण्यासाठी धडपड अशा द्वंद्वामध्ये सापडलेल्या लेखिकेच्या हातून अजाणतेपणे एक चूक झाली आणि त्यामुळे तिच्या मैत्रिणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मनावरील दडपण असह्य झाल्याने आणि जमले तर झालेल्या चुकीचे परिमार्जन करण्याच्या उद्देशाने, तब्बल चौतीस वर्षांनी जेन वाँग चीनच्या राजधानीत, एक महिन्याची रजा घेऊन परतली. तिच्या हातामध्ये एक महिना होता आणि एकशेतीस कोटींच्या लोकसंख्येतून, संपूर्ण नावही धडपणे माहीत नसलेल्या मैत्रिणीला शोधून काढण्याचे आव्हान तिच्यासमोर होते. काहीही झाले तरी तिला तिच्या चुकीचे परिमार्जन करायचे होते. `यीन`ला शोधून तिची माफी मागायचीच होती आणि जमले तर तिच्यासाठी काहीतरी करायचे पण होते. `यीन`चा शोध घेण्याच्या प्रयत्नांत आणि जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठींतून तिने चीनमधील गेल्या ५० वर्षांत झालेल्या सामाजिक, र्आिथक, सांस्कृतिक आणि राजकीय बदलांचा शोध पण घेतला आणि चीनच्या साम्यवादाकडून भांडवलशाहीकडे झालेल्या प्रवासादरम्यान चिनी जनतेच्या जीवनात झालेले परिवर्तन आणि मानसिकतेमधील झालेले बरेवाईट बदल पण संवेदनक्षमतेने टिपले. सामाजिक, आर्थिक बदलांविषयीची तिची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य आपल्याला पण कोठेतरी ओळखीचे वाटते. यीनला शोधण्यात ती यशस्वी झाली का? चढउतारांनी भरलेल्या आयुष्यात यीनने काय-काय भोगले होते? यीनने जेनला माफ केले का? जेनच्या शोधाची आणि यीनच्या आयुष्याची चित्तवेधक आणि हेलावून टाकणारी कहाणी म्हणजे हे पुस्तक- `बीजिंगचे गुपित`.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#JAN WONG #BEIJING CONFIDENTIAL #CHINA #CULTURAL REVOLUTION #MOHAN GOKHALE #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 16-06-2018

    चीनच्या साम्यवादी राजवटीला कंटाळून यीन लुयी ही तरुणी चीन सोडून जायचा विचार करते आणि सरकारी कारवाईत अडकते. पलायनाचा प्रयत्न करत असताना यीन चीनमध्ये शिकायला आलेल्या जेनला मदत मागते पण हा प्रयत्न फसतो. या प्रसंगाची टोचणी जेनला लागून राहते. यीन लुयीचे न्की काय होते याचा शोध घेण्यासाठी पत्रकार झालेली जेन वाँग चीनमध्ये काही दशकानंतर परत येते. मधल्या काळात चीनमध्ये यीन लुयीवर काय वेळ येते? या तरुणीला कोणत्या हालअपेष्टांना तोंड द्यावे लागते? याची कहाणी म्हणजे ‘बीजिंगचे गुपित’... ...Read more

  • Rating StarLOKPRABHA - 21-07-2017

    मैत्रिणीसाठी चीनचा शोध... जेन वाँग यांच्या पत्रकारिता अभ्यासकालीन घटना, त्या वेळचे त्यांचे जीवनमान, चिनी पद्धती आणि दिनक्रम यांवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक. महाविद्यालयीन जीवनात मैत्रिणीची चुगली करण्याची अनवधानाने झालेली चूक काही वर्षांनी लक्षात आल्यवर पश्चात्ताप झाल्याने आणि पापक्षालन करण्याच्या निमित्ताने त्या मैत्रिणीला एवढ्या मोठ्या चीनमध्ये शोधून काढणे, हा लेखिकेचा हेतू आहे. त्या दरम्यान इतर ही अनेक जुनी माणसे भेटणे, प्रत्येकाची भेट घेताना, ती ठरवताना होणारे अनेक अपेक्षाभंग, मनस्ताप, मानसिक त्रास, लेखिकेच्या या शोधकार्यात तिच्या कुटुंबाची कधी अनिच्छेने, कधी उत्साहाने मिळणारी साथ तसेच मुख्य शोधकार्यात अनपेक्षितरीत्या उलगडणारी अनेक रहस्ये, काही विलक्षण गंभीर काही उपयुक्त तर काही विनोदी आहेत. या सर्व गदारोळात जे घडलं ते कथानक म्हणजे या पुस्तकाचा मुख्य विषय. लिहिता लिहिता चीनची काही गुपितेही उघड करण्याची संधी लेखिकेने अनायसेच साधली आहे. किंबहुना चीनची काही गुपिते उघड करण्यासाठी हा विषय निवडला असावा. पुस्तकाचे शीर्षक आणि मुख्य कथानक यांचा संबंध एकमेकांशी मुद्दाम जुळवण्यात आला असावा असे जाणवते. माओवाद्यांचा अंमल सातत्याने जाणवत राहतो. आंतरराष्ट्रीय वार्ताहराला स्वत:चे काम करताना वैयक्तिक त्रासही बऱ्याच प्रमाणात होतो. उदा. एखादी विशिष्ट लक्षवेधी घटना लिहिल्यावर जे पडसाद जनमानसांत उठतात ते थेट घरापर्यंत जाऊन त्यांचे वैयक्तिक आयुष्य ढवळून काढतात. जेन वांग या उत्तम निरीक्षक आहेत हे काही वाक्यांवरून जाणवतं. त्यांनी चंद्रकोरीला नखाच्या तुकड्याची उपमा दिली आहे. शहरामधील घरांच्या सोनेरी रंगांच्या कौलावरून प्रकाश परावर्तित झाल्याने ‘ठिणग्या’ उडाल्याचा भास होतो. रात्रीच्या वेळी तर बीजिंग शहर एखाद्या प्रचंड व्हिडिओ गेमप्रमाणे दिसतं. तरुणाने नाईकेची सेलमधील जॉगिंग पॅन्ट घातली होती, हे अप्रतिम निरीक्षण आहे. लेखिकेच्या कॉलेजातील मँडरिन भाषेची शिक्षिका ‘फु मिन’ ही साम्यवादाची अतिआग्रही होती किंवा साम्यवाद हा तिच्या नसानसांमध्ये ठासून भरला होता. लेखिका त्या शिक्षिकेला हुकूमशहा म्हणत असे. चीनमध्ये लावल्या जाणाऱ्या पाट्यांची वर्णने वाचताना पुणेरी पाट्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. काही घटना अनावश्यक असल्या तरी चीनबाहेरील लोकांसाठी त्या अतिशय मजेदार ठरू शकतील. भाषांतरकार मोहन गोखले यांनी कथानक ओघवते ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत. -पूर्वा देवधर ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 25-06-2017

    अथांग भावनांचे शब्दचित्र... एक पत्रकार व्यक्ती विविध बातम्या किंवा विशिष्ट विषयांवरील लेख या व्यतिरिक्त अन्य साहित्यप्रकारातील लेखन करते, त्यावेळी त्या व्यक्तीमधल्या पत्रकाराच्या ठायी असलेली शोधक व चिकित्सक वृत्ती आणि घटनेच्या गाभ्याला हात घालण्याचेधाडस असे पैलू त्यांच्या लेखनात अवतरतात आणि या मर्मग्राही लेखनामुळे त्या कलाकृतीला वेगळा आयाम प्राप्त होतो. जेन वाँग ही एक पारितोषिकप्राप्त व लोकप्रिय महिला पत्रकार असून तिने यापूर्वी तीन वेगवेगळ्या पुस्तकांचे लेखन केले आहे. यानंतर ‘बीजिंगचे गुपित’ ही त्यांची नवीन कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. आणि या कादंबरीचा मराठी अनुवाद मोहन गोखले यांनी केला आहे. बीजिंगच्या विद्यापीठात ‘जेन वाँग’ आणि ‘येल’हून आलेली चिनी-अमेरिकन ‘एरिका’ या केवळ दोनच परदेशी विद्यार्थिनींना प्रवेश मिळतो. तेथील वास्तव्यात ‘जेन’ला यीन लूओयी’ नामक विद्यार्थिनी भेटते आणि अमेरिकेला जाण्यासाठी तिची मदत मागते, परंतु माओवादाचा प्रभाव असलेली जेन ही खबर साम्यवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला देते. यानंतर ‘यीन’चे काय होते याची माहिती न मिळाल्याने जेन अस्वस्थ होते, ती स्वत:ला अपराधी समजते आणि साधारणपणे तीस वर्षांनतर पुन्हा बीजिंगला येते. कॅनडास्थित जेन वाँग ही नेवार्क विमानतळावर विमानात बसल्यापासून बीजिंगला पोहचून तेथे अठ्ठावीस दिवस राहून स्वगृही परतण्यासाठी विमानात बसेपर्यंतच्या कालावधीमधील घडलेल्या घडामोडी आणि विषयाच्या अनुषंगाने दिलेली माहिती यांचा समग्र गोफ म्हणजे ‘बीजिंगचे गुपित’ ही कादंबरी होय. ‘यीन’ला विद्यापीठातून काढून टाकण्यास आपणच कारणीभूत आहोत या भावनेने जेनला पश्चात्ताप झालेला आहे. या चुकीचे प्रायश्चित्त घेण्याचे ठरवून ‘यीन’ला शोधण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे; सोबतीच्या विद्यार्थ्याना संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असताना, ‘गु वेमिंग’ या एका मित्राकडून तिला ‘पॅन’चा पत्ता मिळतो आणि याचवेळी पॅनची दूरध्वनीवरून भेट होते. यानंतर ‘जेन’ला ‘यीन’च्या अस्तित्वाचा सुगावा लागतो. साधारणपणे कादंबरीच्या मध्यंतरानंतर तिला ‘यीन’चा ठावठिकाणा समजतो आणि अखेर महत्प्रयासाने तिची यीनशी भेट होते. या कादंबरीमध्ये ‘यीन’च्या भेटीपूर्वी तिला शोधण्याच्या प्रयत्नात असताना वेगवेगळ्या ठिकाणी जाताना किंवा अनेक लोकांच्या भेटीमधल्या चर्चेतून लेखिकेने अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण दिले आहे. बीजिंगच्या व पर्यायाने चीनच्या ऐतिहासिक घटनांची माहिती देताना मानवाच्या उत्क्रांतीच्या काळापासून बाराव्या व तेराव्य शतकातील अनुक्रमे ‘खितान’ व ‘जुर्चेड’ या रानटी जमातींच्या लोकांच्या राज्यापासून नंतरची मिंग राजवट आणि आतापर्यंत चीनमध्ये झालेल्या राजवटींचा इतिहास येथे मांडला आहे. ‘यीन’च्या भेटीनंतर तिच्याशी झालेल्या संवादातून तिच्या भूतकाळातील परिस्थितीचे संपूर्ण वर्णन येथे झाले आहे. ‘यीन’ने ज्यांच्यावर विश्वास टाकला तो साम्यवादी पक्ष, तिचे मित्र-मैत्रिणी व शिक्षक या सर्वांनीच तिचा विश्वासघात कसा केला आणि ज्या शेतकऱ्यांबद्दल तिच्या मनात कणव होती त्यांनीच तिला कसे वाळीत टाकले या वर्णनासह तिची शोकांतिका, तिला सोसाव्या लागलेल्या यातना व तिच्यावर आलेले प्रसंग याचेही वर्णन येथे केले आहे. जेन वाँग ही ‘यीन’चा शोध घेण्यासाठी गुप्तहेर संघटनेची मदत घेण्याचे ठरवते तेव्हा गुप्तहेर संस्था, विवाहबाह्य संबंध शोधून काढणे, व्यावसायिक बोधचिन्हांच्या होत असलेल्या चोरीचा छडा लावणे, स्थावर व जंगम मालमत्तांचा शोध घेणे, दूरध्वनीवरील संभाषणांचा माग काढणे, घरापासून दूर असलेल्या मुलांवर लक्ष ठेवणे, औद्योगिक क्षेत्रात हेरगिरी करणाNयांचे पुरावे शोधणे आणि हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणे अशी अनेक कामे करीत असल्याचे तिला आढळून येते. यावरून तेथील सामाजिक परिस्थितीची ओळख करून देण्याचा तिने प्रयत्न केला आहे. याशिवाय बीजिंगचे पोलीस व गुप्तहेर यांची व्यक्तिमत्त्वे कशी असतात हेही दाखवले आहे. तसेच गुप्तहेरांच्या कार्यपद्धतीचे वर्णन करताना त्यांच्यामध्ये साम्यवाद व भांडवलशाही यांचा संगम झाल्याचे म्हटले आहे. एका पत्रकार महिलेने धाडसी वृत्तीमधून, शोधक नजरेतून आणि सूक्ष्म निरीक्षणातून लिहिलेली ही सत्यकथा असून, लेखिकेच्या अथांग भावनाच्या या शब्दचित्राचा मोहन गोखले यांनी ओघवत्या शैलीत मराठी अनुवाद करून अनुवादित साहित्यात मोलाची भर घातली आहे. -कमलाकर राऊत ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL - SAPTRANG - 26-3-2017

    चीनमधल्या जुन्या आणि समकालीन व्यवस्थेचं चित्रण करणारी ही वेगळ्या प्रकारची कादंबरी. जेन वाँग ही पत्रकार बऱ्याच वर्षांनी चीनमध्ये परतते. चौतीस वर्षांपूर्वीच्या एका घटनेची सल तिच्या मनात आहे. कॅनडामधून बीजिंगमध्ये शिकायला गेली असताना यीन लुयी नावाच्या एा तरुणीनं अमेरिकेला जायची इच्छा तिच्याकडे व्यक्त केलेली असताना वाँगनं ती गोष्ट साम्यवादी पक्षाच्या पदाधिकाऱयांकडे सांगितलेली असते. त्या घटनेचा नक्की काय परिणाम झाला, हे वाँगला आता जाणून घ्यायचं आहे. तिच्या या प्रवासात चीनमधली बदलत गेलेली संस्कृती, साम्यवादाकडून भांडवलशाहीकडे झालेला बदल अशा अनेक गोष्टी कादंबरीत उलगडत जातात. जेन वाँगनंच तटस्थपणे चित्रण केले आहे. मोहन गोखले यांनी या कादंबरीचा अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more