CHETAN BHAGAT

About Author

Birth Date : 22/04/1974


CHETAN BHAGAT IS AN INDIAN AUTHOR, COLUMNIST AND YOUTUBER. HE WAS INCLUDED IN TIME MAGAZINES LIST OF WORLDS 100 MOST INFLUENTIAL PEOPLE IN 2010. FIVE OF HIS NOVELS HAVE BEEN ADAPTED INTO FILMS.

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने चेतन भगत यांचा उल्लेख ‘भारताच्या इतिहासातील सर्वोच्च खपाच्या इंग्रजी कादंबऱ्यांचे लेखक’ असा केला आहे. नवी दिल्लीतील पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या चेतन भगत यांचे शिक्षण आर्मी पब्लिक स्कूल, दिल्ली येथे झाले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या पदवीनंतर अहमदाबाद येथून एम. बी. ए. ची पदवी घेऊन बाहेर पडताना ‘द बेस्ट आउट गोइंग स्टुडंट’ असे मानांकनही मिळाले. त्यांच्या नावावर एक हिंदी पटकथा, चार इंग्रजी कादंबऱ्यां आहेत. त्यांच्याकडे केवळ लेखक म्हणून बघण्यापेक्षा एक ‘यूथ आयकॉन’ म्हणून बघितले जाते. आघाडीच्या हिंदी, इंग्रजी वर्तमान पत्रांमधून ते तरुण पिढीच्या आणि भारताच्या प्रगतीसाठी पायाभूत असणार्या मुद्द्यांवर स्तंभलेखन करतात. त्यांनी निदर्शनास आणलेल्या मुद्द्यांची संसदेतही दखल घेण्यात आली आहे. २००९ पासून आपले इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट बँकिंग हे करीयर सोडून, भारताच्या सद्यःस्थितीत बदल घडविण्यासाठी पूर्ण वेळ लेखनाला द्यायचे त्यांनी ठरवले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
25 %
OFF
CHETAN BHAGAT COMBO SET- 3 BOOKS Rating Star
Add To Cart INR 900 INR 675
FIVE POINT SOMEONE Rating Star
Add To Cart INR 240
ONE NIGHT @ THE CALL CENTRE Rating Star
Add To Cart INR 420
THE 3 MISTAKES OF MY LIFE Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more