* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘RAJARSHI SHAHU CHHATRAPATI ANI SAMAJIK NYAYA’ IS A SMALL BOOK WHICH HELPS US UNDERSTAND CHHATRAPATI SHAHU MAHARAJ’S EARNEST WISH TO HELP THE DOWNTRODDEN. HIS PANCHASUTRI (FIVE GOALS), SOCIAL JUSTICE, THE SATYASHODHAK MOVEMENT, SHAHU CHHATRAPATI AND PALACE THEATRE, LIFE OF STUDENTS FROM BAHUJAN SAMAJ STAYING IN SHIVAJI MARATHA BOARDING, ARE A PERFECT GUIDE FOR OUR NATION. ALL THE ELEVEN ARTICLES INCLUDED THEREIN REFLECT UPON CHHATRAPATI SHAHU’S VISIONARY THOUGHTS ABOUT FAMILY, SOCIETY AND EDUCATION. HE WAS FOND OF THE MUSIC MAESTRO KESHAVRAV BHONSALE AND ADORED HIS CREATION ‘LALIT KALADARSHA.’ TO MAKE IT POSSIBLE FOR THE COMMON PEOPLE OF KOLHAPUR TO WATCH GREAT ARTISTS LIKE BALGANDHARVA AND KESHAVRAO ON THE STAGE, HE CREATED THE ‘PALACE THEATRE.’ THE VELVET CURTAIN IN MARATHI DRAMA IS KESHAVRAO’S ARTISTIC GIFT TO MAHARASHTRA. SHAHURAJE FORMED MANY RULES TO STOP INJUSTICE, HELP WOMEN, AND GIVE JUSTICE IN THE CHANGING SOCIAL AND CULTURAL SCENARIO. TO PREVENT CASTEISM, HE MARRIED HIS SISTER IN THE HOLKAR FAMILY. HE IMPLEMENTED LAWS LIKE REMARRIAGE OF WIDOWS, DIVORCE, THE RIGHT TO INHERIT, PROHIBITION OF DEVDASI, AND PROHIBITION OF MISTREATMENT OF WOMEN. BASAWESHWAR MAHARAJ FROM THE 12TH CENTURY INHERITED GAUTAM BUDDHA’S IDEOLOGY AND SHAHU MAHARAJ INHERITED THOSE FROM BOTH. MAHATMA PHULE, THE SAVIOUR OF BAHUJAN SAMAJ WROTE THE BOOK ‘SARVAJANIK SATYADHARMA’. HE ESTABLISHED THE ‘SATYASHODHAK SAMAJ.’ SHAHU MAHARAJ IMPLEMENTED ALL THESE EXPERIMENTS OF TRUTH IN REALITY. HE MADE EDUCATION EASILY AVAILABLE TO BOYS AND GIRLS. HE RECOGNISED THE DANGER OF FANATISM. TODAY, INDIA IS IN THE CLUTCHES OF DIFFERENCES BASED ON CASTE, COLOUR, RELIGION, REGION, ETC. KEEPING AWAY FROM POLITICS, POWER AND SELFISHNESS, THE PROFOUND THOUGHTS OF NATIONAL LEADERS LIKE SHAHU-PHULE-AMBEDKAR WILL PROVE INSPIRING TO NEW INDIA.
‘राजर्षी शाहू छत्रपती आणि सामाजिक न्याय’ या छोटेखानी पुस्तकातून आपल्याला राष्ट्रपुरुष छत्रपती शाहू महाराजांचे समाजक्रांतीचे कार्य व दीन-दलित-पतितांविषयीची तळमळ दिसून येते.सामाजिक न्याय,सत्यशोधक चळवळ,संगीतसूर्य केशवराव भोसलेंचे कलेसाठीचे कष्ट,शाहू छत्रपती व पॅलेस थिएटर,प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग मधील बहुजन समाजातील विद्याथ्र्यांचे जीवन,शाहूपंचसूत्री आजही देशाला मार्गदर्शक ठरते.या सर्व अकरा लेखांतून छत्रपती शाहूंचे कौटुंबिक,सामाजिक,शैक्षणिकविचार व द्रष्टेपण दिसते. कलेविषयीची आस्था,जाण, केशवराव भोसले या अभिजात कलावंताविषयीचे प्रेम-जिव्हाळा,‘ललित कलादर्श’ची निर्मिती,याचे शाहूराजेंना कौतुक होते. म्हणूनच बालगंधर्व,केशवराव या दिग्गजांचे संगीतनाट्याचे प्रयोग कोल्हापुरातील सामान्य जनतेलाही पाहायला मिळावेत,म्हणून त्यांनी ‘पॅलेस थिएटर’ची निर्मिती केली.मराठी नाटकातील ‘मखमली पडदा’ ही केशवरावांची महाराष्ट्राला मिळालेली कलात्मक देणगी.बदलत्या परिस्थितीत सामाजिक-सांस्कृतिक न्याय,स्त्रीजातीचा कैवार यांविषयी आवाज उठवून शाहूराजेंनी अन्यायाविरोधात कायदे केले.आंतरजातीय विवाह हा शाहूराजांनी स्वत:च्या बहिणीस होळकर कुटुंबाला देऊन जातीभेद नाहीसा केला.विधवा पुनर्विवाह,घटस्फोट वारसा हक्क,देवदासी प्रतिबंध कायदा,स्त्रीला क्रूर वागणूक दिल्यास प्रतिबंध, या कायद्यांची अंमलबजावणी केली.बाराव्या शतकातील बसवेश्वर महाराज हे गौतम बुद्धांचे वारसदार,तर शाहू महाराज हे बुद्ध व बसवेश्वर या दोहोंचे वारसदार बनले.बहुजन समाजाचे वाली महात्मा पुÂले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ लिहला.सत्यशोधक समाजाची स्थापना केली.हे सत्याचे प्रयोग शाहूराजांनी राबवले.मुला-मुलींना शिक्षणवाट मोकळी केली.देशातील धर्मांधतेचा धोका ओळखला. जातिद्वेष,वर्णद्वेष,धर्मद्वेष,प्रांतद्वेष अशा अनेक समस्यांनी आजही भारताला घेरलंय. राजकारण, सत्ताकारण व स्वार्थाला थारा न देता, शाहू-पुÂले-आंबेडकर या राष्ट्रपुरुषांचे विचार नवभारताला प्रेरणादायी ठरणारे आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#राजर्षीशाहूछत्रपतीआणिसामाजिकन्याय #डॉ.जयसिंगरावभाऊसाहेबपवार #संशोधनात्मक #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #RAJARSHISHAHUCHHATRAPATIANISAMAJIKNYAY #SANSHODHNATMAK #DR.JAYSINGHRAOBHAUSAHEBPAWAR #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो