* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RADHEYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667462
  • Edition : 29
  • Publishing Year : JANUARY 1973
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 280
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE INTRINSICALLY TRAGIC STORY OF `KARNA` HAS ALWAYS INSPIRED CREATIVELY MANY A LITERATURERS. THIS IS ANOTHER SUCH OCCASSION. THE AUTHOR HAS ATTEMPTED TO UNIVERSALISE THE `KARMAKATHA` IN THIS NOVEL. HE TRIES TO SEE INTO IT THE ETERNAL PROBLEM OF VICTORY.
मी योद्धा आहे. जखमाची क्षिती बाळगून भागायचं नाही. जन्माबरोबरच सुरु झालेलं हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे. त्यातच माझ्या जीवनाचं यज्ञ सामावलं आहे.

No Records Found
Original LanguageTranslated LanguageTranslated ByWebsite
MARATHIENGLISHHARPERCOLLING PUBLISHERS INDIA https://harpercollins.co.in/product/karna/
MARATHIHINDIRADHAKRISHNA PRAKASHAN https://www.rajkamalprakashan.com/index.php/radha/radheya-2979
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating Starतेजस यादव

    वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

  • Rating StarDarshan Jadhav

    आज रणजित देसाई यांनी लिहलेली राधेय कादंबरी वाचून पूर्ण झाली. आयुष्यात कोणती कादंबरी आवडली असेल तर ती राधेय. धर्म आणि अधर्म यांच्या कात्रीत सापडलेला कर्ण वाचायला मिळाला.मैत्रीसाठी मृत्यूलाही तळहातावर ठेवणारा, दुर्योधनासारख्या बलाढय मित्राला जो अधर्माचया बाजूने असतांना सुद्धा शेवटपर्यंत तुझ्या सोबत राहीन अस वचन देणारा, कोणताही विचार न करता कवचकुंडले काढून देणारा, मृत्यूच कोणतंही भय न बाळगणारा.. मृत्यूलाही मिठी मारणारा. नेहमी वचनबद्ध असणारा.. ३३ कोटी देवांना सुद्धा ज्याचा अभिमान, सुर्यासारखं प्रखर तेज, आपल्या दातृत्वान समस्त देवसभा ज्याचा आदर करायचे असा तो महारथी कर्ण.बालपणापासून ज्याचा सुतपुत्र म्हणून उल्लेख झाला.सतत अपमान, पितामह भीष्म विदुर ,श्रीकृष्ण यांना त्याच सत्य माहीत असून देखील हा कौतेय शेवटपर्यंत सुतपुत्रच राहिला. युद्धात माता कुंतीला दिलेल्या वचनानुसार आपल्या पाचही भावंडांना अभय देणारा तो जेष्ठ कौतेय. युद्धाच्या शेवटी चिखलात रुतलेल्या रथाच चाक काढण्यात उतरलेल्या कर्णाला कृष्णाच्या कुटणीतीची आठवण जागोजागी झाली.आपल्या तीक्ष्ण बाणांनी घायाळ केलेल्या आपल्या अर्जुनाला बघून माता कुंतीला दिलेलं वचन आठवलं .. आणि मग मनात आलं माते तुला तुझी पाच मुलंच मिळतील. सहावा कधी पाचवा होणार नाही.. संतापाने उठलेल्या अर्जुनाने धनुष्याची प्रत्यंचा खेचली. अर्जुनाचा नेम चुकू नये म्हणून कर्णाने आपली रुंद छाती कलती केली. खर तर कर्णाचा वध कधी झालाच नव्हता. कर्णाने ते दिलेलं दान होत..शेवट हा अश्रू टिपणारा होता. शेवटपर्यंत मित्रता आणि वचनबद्द असणाऱ्या या दानविराला, अंगराज कर्ण, कुरु साम्राज्याच्या सेनापतीला, जेष्ठ कौतेय, राधेय कर्णाला ही प्रस्तावना समर्पित ..... -दर्शन जाधव ...Read more

  • Rating Starयोगिता बुटाला

    ybsworldofbooks.wordpress.com @YBook on Facebook राधेय - लेखक श्री. रणजित देसाई प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस प्रथमावृत्ती : सन १९७३ पृष्ठसंख्या : २६९ “मी योद्धा आहे. जखमांची क्षिती बाळगून भागायचं नाही. जन्माबरोबरच सुरू झालेलं हे युद्ध अखेरच्या क्षणांपर्यंत मला चालवलं पाहिजे. त्यातच माझ्या जीवनाचं यश सामावलं आहे.” – इति ‘राधेय’, ‘सूतपुत्र’, ‘अंगराज’ कर्ण. ‘राधेय’ म्हणजे कृष्णाच्या राधेसंबंधित नसून, नववाचकांची गफलत होऊ शकते. सारथी अधिरथ व त्याची पत्नी राधा यांनी पुत्रवत सांभाळलेल्या कर्णाने तिच्या सन्मानार्थ ‘राधेय’ हे नाव धारण केले. त्याला नेहमी ‘सूतपुत्र’ म्हणजे एक सर्वसामान्य सारथ्याचा मुलगा असे हिणवले जाई. त्यामुळे, पांडवांसमोर कौरवांना ‘अंधपुत्र’ असे म्हणून जशी अपमानास्पद वागणूक मिळते व या भावनेतून निर्माण झालेली वेदना समजून घेऊन, पांडवांना शह द्यायला दुर्योधनाने पांडवांच्या पराक्रमाच्या तोडीसतोड रथीमहारथी वीर कर्णाला ‘अंग’ या देशाचे राजेपद बहाल केले तर कर्णाला स्वतःहून ‘अंगराज’ ही पदवी प्रदान केली. पण याच गोष्टींमुळे कर्णाच्या आयुष्याला दिशा मिळाली की त्याची वाताहत झाली, हे लेखक वाचकांवर सोडतो. प्रत्येक माणसाच्या मनात एक कर्ण असतो हे सत्य सांगून लेखक कादंबरीला सुरवात करतो आणि शेवटी, तिथेच वाचकांना आणून सोडतो. काही प्रसंगी, वर्णनात भाषेची पकड सैल होत जाते तर अचानक घट्ट होत जाते. काही प्रसंग तपशिलाने खुलवणे शक्य होते, जसे लहानमोठी युद्धे व त्यातील वीर, साहसी कर्णाचे पराक्रम. तर, द्रौपदी-विटंबना व वस्त्रहरणाचा वेदनादायी प्रसंग कर्णाबद्दल चीड निर्माण करतो, जरी त्याने कितीही त्याची बाजू मांडली तरी. अर्जुनासह झालेले अंतिम निर्णायक युद्ध डोळ्यासमोर उभे राहते. कर्णाची पत्नी वृषालीसंदर्भातील माहितीमधे थोडी तफावत (उदाहरणार्थ, ती प्रथम की द्वितीय पत्नी याबाबत) ‘राधेय’ आणि ‘मृत्युंजय’ या कर्णविषयक दोन्ही कादंबर्‍यांमधे जाणवते. पण दोघांचे एकमेकांवरील निस्सीम प्रेम आणि परस्परांवरील विश्वास, ही कर्णाची जमेची बाजू आहे. शेवटपर्यंत प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार कर्णाला वापरून घेतले, हे त्याला उमगत जाते व त्यातून निर्माण झालेला उबग वाचकांच्या मनातही निर्माण होतो, हे या कादंबरीच्या भाषेचे सौंदर्य आणि सामर्थ्य आहे. आपल्याच माणसांच्या भल्यासाठी आपल्याच माणसांशी लढाई करावी लागली, तर जिंकूनही हरणे किंवा त्यांच्या भल्यासाठी हरणे या दोन्ही गोष्टी किती अपमान, अवहेलना, तिरस्कार व वेदना पदरी पाडून घेण्यासारखे आहे, हे कादंबरी वाचताना कर्णासह वाचकांच्या मनाला पोखरत जाते आणि वाचक कादंबरीसह मनाने जोडले जातात. तत्वज्ञानयुक्त अनेक विचार वाचताना थांबून विचार करायला लावणारी वाक्ये या कादंबरीचे सौंदर्य आहेत, जसे की “माणसानं एवढं किर्तीवंत व्हावं की, त्याच्या माघारी त्याचं आसन बराच काळ तसंच मोकळं राहावं ती जागा व्यापण्याचं धाडस कुणाला होऊ नये” किंवा “जिंकल्यानं, विजयानं पराक्रम सिद्ध होत नसतात. पराजय सोसण्यातही पराक्रम असतो”. ‘राधेय’ या कादंबरीच्या नव्या आवृत्तीचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ श्री. सुभाष अवचट यांनी आपल्या कलेतून निर्माण केले असून, त्यावर नजर फिरवताना त्यातील बारकावे लक्षात येतात आणि ‘कर्ण’ ही महाभारतातील व्यक्तिरेखा दिसते तितकी समजायला सोपी नाही हे जाणवते. तसेच, थेट सूर्यनारायणाकडून दैवी कवचकुंडले जन्मजात प्राप्त झालेल्या या माणसाचे पायही इतरांसारखे मातीचेच आहेत, ही बाजूदेखील या कादंबरीतून वाचकांसमोर मांडली आहे. कर्णाचे जगण्याचे प्रयोजन हे त्याच्या जन्मविषयक रहस्याभोवती फिरत राहते. मात्र हे सत्य उघडल्यानंतर कर्णाचे जगण्याचे प्रयोजनच नष्ट होईल, त्याचे आवेशपूर्ण लढाईचे अवसान गळून पडेल, या हेतूने कृष्ण व कुंती यांनी जाणीवपूर्वक कौरव-पांडव अंतिम युद्धापूर्वी सांगून पांडव सुरक्षित ठेवले, ही खंत त्याला सलत राहते. याच हेतूने खुद्द इंद्रदेव त्याच्याकडे कवचकुंडले दान म्हणून मागतो, आणि माता कुंती याचक म्हणून ‘माझे पाच पुत्र वाचव’ असे दान मागते, ते देखील तो मान्य करतो. कर्णाचे अनेक गुण-अवगुण, अहंकार, गर्व, पराक्रमाचा सार्थ अभिमान, असामान्य दातृत्व, स्वतःचा जन्मविषयक सत्याचा सातत्यानं शोध व त्यातून कुरुक्षेत्रावर होऊ घातलेल्या युद्धाच्या तोंडावर अचानक वर्मावर घाला घातल्याप्रमाणे जन्मविषयक सत्य जाणीवपूर्वक सामोरे आणले जाणे, वास्तवाची जाणीव होताच अवसानच गळून पडणे, आप्तस्वकीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी विजयी असूनही पराजयी होणे, सर्व काही असूनही काहीच हाती न उरणे किती गुंतागुंत निर्माण करणारे आहे हे कळते…. पदोपदी अपमान, अवहेलना, दुःख, वेदना, साहस, प्रेम, स्नेह, मैत्री, स्पष्टवक्तेपणा, असे अनेक कंगोरे पानोपानी उलगडत जातात. मोठा भाऊ म्हणून कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेत, माता कुंतीला दान म्हणून दिलेले वचन पाळायला, लढणे शक्य असूनही मृत्यूला सामोरे जाणे, ही बाब दुर्योधनाला फसवणे नसून दुर्योधनाच्या निस्सीम मैत्रीत आणि माता कुंतीला दिलेल्या वचनाच्या कात्रीत सापडून तात्विक लढाईमधे जिंकणे की हरणे, हे सर्व लेखक वाचकांच्या पारड्यात टाकतात. या निर्णयामुळे कर्णावर लागत आलेला चुकीचा व खोटा ‘पळपुटेपणा’चा आरोप परत एकदा शेवटच्या निर्णायक क्षणी स्वतःहून सिद्ध करण्यासारखं झालं. या निर्णयामुळे कर्णाने आत्तापर्यंत अनेकदा अहंकारातून केलेल्या चुका व पापांचे प्रायश्चित्त घेणे असे तो मानतो, तरीही दुर्योधनाला सगळ्यात जवळचा मित्र म्हणून शेवटचे भेटण्यासाठी आणि त्याला सत्याची जाणीव देण्यासाठी अतिशय जखमी असूनही स्वतःचे प्राण जाण्यापासून रोखून धरणे, हे कोणत्याही संवेदनशील मनाला उद्विग्न करणारे आहे. मराठी भाषाप्रेमींना आणि मनातील वेदना ठसठसत राहिलेल्य सर्वांना आपलासा वाटेल असा हा ‘राधेय’ वाचलाच पाहिजे, मात्र, ‘मृत्युंजय’ ही अधिक सखोल कादंबरी वाचण्यापूर्वी, दोन्हीची तुलना न करता, तरच खऱ्या अर्थाने ‘कर्ण’ ही व्यक्तिरेखा कुणा एका माणसाची नसून, पिढ्यानपिढ्या मानसिक द्वंद्व लढणार्‍या प्रत्येक माणसाची भावना आहे हे लक्षात येईल. एकदा नक्की वाचा, श्री. रणजित देसाई लिखित ‘राधेय’! माझे ‘राधेय’ या कादंबरीला स्टार रेटिंग्स : ४-स्टार्स ⭐⭐⭐⭐ ...Read more

  • Rating StarAdesh Khomane

    राधेय वाचून झालं..महाभारत खूप वेळा बघितलंय,मृत्यूनजय वाचलंय,कर्णावरील मालिका बघितल्या पण कर्णा बद्दल च कुतूहुल काही कमी होत नाही..राधेय वाचताना सगळे प्रसंग डोळयांसमोर उभे राहतात...सोपी भाषा, कुठेही काल्पनिकतेचा भास वाटत नाही...एकंदरीत सगळ्यांनी वाावी अशी कादंबरी❣️ "मी योद्धा आहे... जखमाची भीती बाळगून भागायचं नाही. जन्मबरोबरच सुरू झालेल हे युद्ध अखेरच्या क्षणपर्यंत मला चालवलं पाहिजे. त्यातच माझ्या जीवनाच यश समावलं आहे" -राधेय ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more