* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667462
  • Edition : 32
  • Publishing Year : JANUARY 1973
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 280
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE INTRINSICALLY TRAGIC STORY OF `KARNA` HAS ALWAYS INSPIRED CREATIVELY MANY A LITERATURERS. THIS IS ANOTHER SUCH OCCASSION. THE AUTHOR HAS ATTEMPTED TO UNIVERSALISE THE `KARMAKATHA` IN THIS NOVEL. HE TRIES TO SEE INTO IT THE ETERNAL PROBLEM OF VICTORY.
मी योद्धा आहे. जखमाची क्षिती बाळगून भागायचं नाही. जन्माबरोबरच सुरु झालेलं हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे. त्यातच माझ्या जीवनाचं यज्ञ सामावलं आहे.

No Records Found
Original LanguageTranslated LanguageTranslated ByWebsite
MARATHIENGLISHHARPERCOLLING PUBLISHERS INDIA https://harpercollins.co.in/product/karna/
MARATHIHINDIRADHAKRISHNA PRAKASHAN https://www.rajkamalprakashan.com/index.php/radha/radheya-2979
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating Starविश्वजीत श्रीपती शिंत्रे.

    राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

  • Rating Starस्वप्निल सोनवडेकर

    #वाचनवेडा लेखक रणजित देसाई यांचा मी खूप मोठा चाहता आहे. त्यांची लेखन शैली मला वेगळ्या जगात घेऊन जाते. त्यांच्या पुस्तकात शब्दसंपत्ती मुबलक लाभते.ओघवते लिखाण कांदबरीची पुढील पानं झपझप पलटवतात.त्यांच्या प्रत्येक कादंबरीतलं अलवार लिखाण मनाला भिडणारं असत.राधेय हि अशी कादंबरी आहे,जी प्रत्येक पुस्तकप्रेमीने वाचली आहे.राधेय पुस्तकाचे वैशिष्ट्य असं आहे की आपल्या वाढत्या वयाच्या परिपक्वतेवर ही कादंबरी पुन्हा पुन्हा वाचावी वाटते.जेवढी नव्याने वाचावी ती अजून उलगडत जाते. राधेय वाचताना कर्ण,दुर्योधन,शकुनी तथा महाभारताचा खरा राजकारणी कृष्ण यांची प्रतिमा मेहंदीसारखी रंगू लागते.कारण ती वाचकांच्या ओंजळीत रणजीत देसाई यांनी रेखाटलेली असते. एखाद्या लेखकाने कादंबरी लिहावी आणि ती अजरामर व्हावी ती ही अशी... महाभारतात उपेक्षित ठरलेला योद्धा म्हणजे कर्ण.जन्मानंतर ज्याला स्वतःच्या आईनेच स्वतःपासून दूर केलं असा कर्ण आयुष्यात कधी कुणाचा कसा झाला असता..! सूतपुत्र म्हणून आयुष्यभर हिणवल्या गेलेल्या कर्णाला तो राधेय नाही तर कौंतेय आहे हे कृष्णाकडून उमगतं तेव्हा तो भावविभोर नं होता रोरांवत्या प्रश्नांच्या वादळात गुरफटून जातो.धरणीकंप व्हावा आणि हे सत्य असं ज्वालारसाप्रमाणे बाहेर यावं.ह्या ज्वालारसातील दाह कसा कोणी सहन करावा..! अर्ध आयुष्य जगल्यानंतर,नात्यांची मूळं खोल शिरल्यानंतर हे सत्य ऐकून काय बदलणार होत.?कानात तळपता रस टाकल्याप्रमाणे या सत्याचा त्रासच अधिक होईल. हे सत्य कळल्यानंतर देखील आपल्या मैत्रीला जपणाऱ्या ह्या वीर योद्धाची जीवनगाथा रणजीत देसाई यांनी या पुस्तकात काय सुंदर मांडली आहे. राधेय कादंबरी वाचताना उलगडत जाणारा कर्ण हा उगवत्या इंद्रधनुष्यप्रमाणे वाटू लागतो. त्याच्या व्यक्तिमत्वातील विविध छटा आपल्या मनाला स्पर्श करू लागतात. द्रौपदी स्वयंवर आणि द्रौपदी चीरहरण प्रसंग काय सुंदर मांडले आहेत या कादंबरीत.या पुस्तकातील काही ओळी मला फार भावतात. `हे नरेंद्र धर्म वाकवावा तसा तो वाकतो.` हे वाक्य वाचलं आणि सध्याचं राजकारण डोळ्यांसमोर तरळतं . `अग्रपूजेचा मान बलानं तोलला जात नाही,तो अधिकार धारण करणाऱ्या पुरुषांच्या ठायी सत्वगुणांचा अधिकार असावा लागतो.`ह्या वाक्याला देखील काय सुंदर अर्थ आहे. द्युतपटात तरबेज असणारा शकुनी म्हणतो.`नाना देशींच्या बरोबर मी फासे घोळवले आहेत.प्रियकराला आपल्या सखीची अंगप्रत्यंग जाणवावी तशा कोरलेल्या मुद्रा माझ्या सरावलेल्या हातांना रात्री अंधारातही जाणवतात.` द्रौपदीचे चीरहरण होत असताना तिची अब्रू वाचवायला आलेला कृष्ण उर्मट दुर्योधनाला म्हणतो.`सामर्थ्यशाली पुरुषाला दुर्बलांच्या सभेत प्रवेश करण्यास आमंत्रणाची आवश्यकता नसते.` या पुस्तकातील बरीच वाक्य मी अधोरेखित करून ठेवली आहेत, सगळ्याच ओळी इथे लिहायला गेलो तर अर्ध पुस्तकच लिहावे लागेल. रणजीत देसाई यांच्या कांदबरीवर समीक्षण पोस्ट लिहिणारा मी कोण! ही पोस्ट समीक्षण पोस्ट नसून कौतुक लिखाण आहे. तर राधेय पुस्तकाच्या तुमच्या आठवणी काय आहेत हे नक्की कमेंट्स मध्ये लिहा. ...Read more

  • Rating Starप्रज्ञा शितोळे शिर्के

    #राधेय नुकतीच राधेय कादंबरी वाचली. प्रत्येक पान वाचताना कर्ण उलगडत गेला. तसे तर कर्ण पूर्वीपासूनच माहीत होता पण विशेष असा तो कधीच प्रिय नव्हता. राधेय वाचताना त्याच्या भावविश्वाला स्पर्श झाला आणि कधी नव्हे ते तो माझ्या मनाला स्पर्श करून गेला. दानशूर क्ण ,शूरवीर कर्ण, महारथी कर्ण अशा अनेक उपाधींनी गौरवान्वित असणारा हा महापराक्रमी कर्ण आपलं संपूर्ण आयुष्य,एका योद्धासारखे लढला. नदीच्या प्रवाहाबरोबर सुरू झालेला त्याचा जगण्याचा हा संघर्ष अखंड चालू होता अगदी मरणापर्यंत. सूर्यासारखे तेजस्वी असणाऱ्या या शूरवीर सूर्यपुत्राने दान म्हणून फक्त अंगावरील तेजस्वी कवच कुंडलेच नव्हे तर आपल आयुष्य ही दान दिले...यासारखं दुसरे महान दान काय.....! युद्धात कर्ण हरला पण खऱ्या अर्थाने तो जिंकलाच होता...आपल्या आईला दिलेलं वचन...त्या वचनपूर्ती मध्ये तो जिंकला. मित्राशी केलेली निष्ठा... त्या निष्ठेत तो जिंकला होता....याचकाला कधीही रिकाम्या हाताने न पाठवणारा कर्ण आपल्या जगण्याला दान करून जिंकला होता....आपण कौंतय आहे हे माहीत झाल्यानंतर आपल्या भावाच्या भल्यासाठी त्यांच्यापासून स्वतःचे सत्य लपून ठेऊन, त्यांच्याविरुद्ध युद्धाला उभा राहणारा ... युधिष्ठर आणि नकुलाला अभयदान देणारा मोठा भाऊ कर्ण जिंकला होता. त्याच्या मृत्यूनेच त्याला महान बनवले होते. कर्ण महापराक्रमी होता पण त्यांच्या मृत्युला कारणीभूत ठरले ते म्हणजे भर सभेत असहाय स्त्रीला विवस्त्र करण्याची त्याने व्यक्त केलेली इच्छा आणि अधर्माशी केलेली सख्ख्य. मित्रनिष्ठा असावी पण मित्र अधर्म करत असेल तर मित्रप्रेमासाठी साथ न देता मित्राला योग्य धर्माचा मार्ग दाखवणे यातच खरे मित्र प्रेम आहे. अन्यथा अधर्माला दिलेली साथ विनाशाला कारणीभूत ठरते. ...Read more

  • Rating Starतेजस यादव

    वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो