* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667462
  • Edition : 30
  • Publishing Year : JANUARY 1973
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 280
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE INTRINSICALLY TRAGIC STORY OF `KARNA` HAS ALWAYS INSPIRED CREATIVELY MANY A LITERATURERS. THIS IS ANOTHER SUCH OCCASSION. THE AUTHOR HAS ATTEMPTED TO UNIVERSALISE THE `KARMAKATHA` IN THIS NOVEL. HE TRIES TO SEE INTO IT THE ETERNAL PROBLEM OF VICTORY.
मी योद्धा आहे. जखमाची क्षिती बाळगून भागायचं नाही. जन्माबरोबरच सुरु झालेलं हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे. त्यातच माझ्या जीवनाचं यज्ञ सामावलं आहे.

No Records Found
Original LanguageTranslated LanguageTranslated ByWebsite
MARATHIENGLISHHARPERCOLLING PUBLISHERS INDIA https://harpercollins.co.in/product/karna/
MARATHIHINDIRADHAKRISHNA PRAKASHAN https://www.rajkamalprakashan.com/index.php/radha/radheya-2979
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating Starविश्वजीत श्रीपती शिंत्रे.

    राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

  • Rating Starस्वप्निल सोनवडेकर

    #वाचनवेडा लेखक रणजित देसाई यांचा मी खूप मोठा चाहता आहे. त्यांची लेखन शैली मला वेगळ्या जगात घेऊन जाते. त्यांच्या पुस्तकात शब्दसंपत्ती मुबलक लाभते.ओघवते लिखाण कांदबरीची पुढील पानं झपझप पलटवतात.त्यांच्या प्रत्येक कादंबरीतलं अलवार लिखाण मनाला भिडणारं असत.राधेय हि अशी कादंबरी आहे,जी प्रत्येक पुस्तकप्रेमीने वाचली आहे.राधेय पुस्तकाचे वैशिष्ट्य असं आहे की आपल्या वाढत्या वयाच्या परिपक्वतेवर ही कादंबरी पुन्हा पुन्हा वाचावी वाटते.जेवढी नव्याने वाचावी ती अजून उलगडत जाते. राधेय वाचताना कर्ण,दुर्योधन,शकुनी तथा महाभारताचा खरा राजकारणी कृष्ण यांची प्रतिमा मेहंदीसारखी रंगू लागते.कारण ती वाचकांच्या ओंजळीत रणजीत देसाई यांनी रेखाटलेली असते. एखाद्या लेखकाने कादंबरी लिहावी आणि ती अजरामर व्हावी ती ही अशी... महाभारतात उपेक्षित ठरलेला योद्धा म्हणजे कर्ण.जन्मानंतर ज्याला स्वतःच्या आईनेच स्वतःपासून दूर केलं असा कर्ण आयुष्यात कधी कुणाचा कसा झाला असता..! सूतपुत्र म्हणून आयुष्यभर हिणवल्या गेलेल्या कर्णाला तो राधेय नाही तर कौंतेय आहे हे कृष्णाकडून उमगतं तेव्हा तो भावविभोर नं होता रोरांवत्या प्रश्नांच्या वादळात गुरफटून जातो.धरणीकंप व्हावा आणि हे सत्य असं ज्वालारसाप्रमाणे बाहेर यावं.ह्या ज्वालारसातील दाह कसा कोणी सहन करावा..! अर्ध आयुष्य जगल्यानंतर,नात्यांची मूळं खोल शिरल्यानंतर हे सत्य ऐकून काय बदलणार होत.?कानात तळपता रस टाकल्याप्रमाणे या सत्याचा त्रासच अधिक होईल. हे सत्य कळल्यानंतर देखील आपल्या मैत्रीला जपणाऱ्या ह्या वीर योद्धाची जीवनगाथा रणजीत देसाई यांनी या पुस्तकात काय सुंदर मांडली आहे. राधेय कादंबरी वाचताना उलगडत जाणारा कर्ण हा उगवत्या इंद्रधनुष्यप्रमाणे वाटू लागतो. त्याच्या व्यक्तिमत्वातील विविध छटा आपल्या मनाला स्पर्श करू लागतात. द्रौपदी स्वयंवर आणि द्रौपदी चीरहरण प्रसंग काय सुंदर मांडले आहेत या कादंबरीत.या पुस्तकातील काही ओळी मला फार भावतात. `हे नरेंद्र धर्म वाकवावा तसा तो वाकतो.` हे वाक्य वाचलं आणि सध्याचं राजकारण डोळ्यांसमोर तरळतं . `अग्रपूजेचा मान बलानं तोलला जात नाही,तो अधिकार धारण करणाऱ्या पुरुषांच्या ठायी सत्वगुणांचा अधिकार असावा लागतो.`ह्या वाक्याला देखील काय सुंदर अर्थ आहे. द्युतपटात तरबेज असणारा शकुनी म्हणतो.`नाना देशींच्या बरोबर मी फासे घोळवले आहेत.प्रियकराला आपल्या सखीची अंगप्रत्यंग जाणवावी तशा कोरलेल्या मुद्रा माझ्या सरावलेल्या हातांना रात्री अंधारातही जाणवतात.` द्रौपदीचे चीरहरण होत असताना तिची अब्रू वाचवायला आलेला कृष्ण उर्मट दुर्योधनाला म्हणतो.`सामर्थ्यशाली पुरुषाला दुर्बलांच्या सभेत प्रवेश करण्यास आमंत्रणाची आवश्यकता नसते.` या पुस्तकातील बरीच वाक्य मी अधोरेखित करून ठेवली आहेत, सगळ्याच ओळी इथे लिहायला गेलो तर अर्ध पुस्तकच लिहावे लागेल. रणजीत देसाई यांच्या कांदबरीवर समीक्षण पोस्ट लिहिणारा मी कोण! ही पोस्ट समीक्षण पोस्ट नसून कौतुक लिखाण आहे. तर राधेय पुस्तकाच्या तुमच्या आठवणी काय आहेत हे नक्की कमेंट्स मध्ये लिहा. ...Read more

  • Rating Starप्रज्ञा शितोळे शिर्के

    #राधेय नुकतीच राधेय कादंबरी वाचली. प्रत्येक पान वाचताना कर्ण उलगडत गेला. तसे तर कर्ण पूर्वीपासूनच माहीत होता पण विशेष असा तो कधीच प्रिय नव्हता. राधेय वाचताना त्याच्या भावविश्वाला स्पर्श झाला आणि कधी नव्हे ते तो माझ्या मनाला स्पर्श करून गेला. दानशूर क्ण ,शूरवीर कर्ण, महारथी कर्ण अशा अनेक उपाधींनी गौरवान्वित असणारा हा महापराक्रमी कर्ण आपलं संपूर्ण आयुष्य,एका योद्धासारखे लढला. नदीच्या प्रवाहाबरोबर सुरू झालेला त्याचा जगण्याचा हा संघर्ष अखंड चालू होता अगदी मरणापर्यंत. सूर्यासारखे तेजस्वी असणाऱ्या या शूरवीर सूर्यपुत्राने दान म्हणून फक्त अंगावरील तेजस्वी कवच कुंडलेच नव्हे तर आपल आयुष्य ही दान दिले...यासारखं दुसरे महान दान काय.....! युद्धात कर्ण हरला पण खऱ्या अर्थाने तो जिंकलाच होता...आपल्या आईला दिलेलं वचन...त्या वचनपूर्ती मध्ये तो जिंकला. मित्राशी केलेली निष्ठा... त्या निष्ठेत तो जिंकला होता....याचकाला कधीही रिकाम्या हाताने न पाठवणारा कर्ण आपल्या जगण्याला दान करून जिंकला होता....आपण कौंतय आहे हे माहीत झाल्यानंतर आपल्या भावाच्या भल्यासाठी त्यांच्यापासून स्वतःचे सत्य लपून ठेऊन, त्यांच्याविरुद्ध युद्धाला उभा राहणारा ... युधिष्ठर आणि नकुलाला अभयदान देणारा मोठा भाऊ कर्ण जिंकला होता. त्याच्या मृत्यूनेच त्याला महान बनवले होते. कर्ण महापराक्रमी होता पण त्यांच्या मृत्युला कारणीभूत ठरले ते म्हणजे भर सभेत असहाय स्त्रीला विवस्त्र करण्याची त्याने व्यक्त केलेली इच्छा आणि अधर्माशी केलेली सख्ख्य. मित्रनिष्ठा असावी पण मित्र अधर्म करत असेल तर मित्रप्रेमासाठी साथ न देता मित्राला योग्य धर्माचा मार्ग दाखवणे यातच खरे मित्र प्रेम आहे. अन्यथा अधर्माला दिलेली साथ विनाशाला कारणीभूत ठरते. ...Read more

  • Rating Starतेजस यादव

    वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.