C. NORTHCOTE PARKINSON, M. K. RUSTOMJI, S. PAVRI

About Author


NA

हे सुप्रसिद्ध लेखक असून त्यांचं शिक्षण सेंट पीटर स्वूÂल, न्यू यॉर्वÂ व इम्यनुएल कॉलेज, वेंÂब्रिज इथे झालं. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी वेंÂब्रिज महाविद्यालयाचं सदस्यत्व मिळवण्याचा मान त्यांनी पटकावला. इलिऑनिस, लिव्हरपूल, हार्वर्ड आणि मलाया यांसारख्या देशोदेशींच्या विद्यापीठांमध्ये त्यांनी व्याख्याते म्हणून काम केलं. त्यांची ‘पार्विÂन्सन लॉ’ व अशी इतर अनेक पुस्तवंÂ जगभरात लोकप्रिय आहेत. यांची बरीच पुस्तवंÂ अमेरिका, इंग्लंड, प्रÂान्स, जपान इत्यादी देशांमध्ये प्रकाशित झाली असून ती अत्यंत लोकप्रिय ठरली आहेत. रुस्तुमजी यांची सहा पुस्तवंÂ ‘हिब्रू’ या इस्रायलच्या राष्ट्रभाषेतही प्रसिद्ध झाली आहेत. ‘चिल्ड्रन – हाउ टु मॅनेज देम, नाउ दॅट यू हॅव गॉट देम’ हे रुस्तुमजी- पार्विÂन्सन या जगप्रसिद्ध लेखक-जोडीचं पाचवं पुस्तक. अवघड व किचकट माहिती-विचार, अत्यंत सोप्या भाषेत, स्पष्टपणे सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याची कला रुस्तुमजी यांना लाभली आहे. हे पुस्तक जगभरात इतर अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे. रुस्तुमजी हे ‘टेल्को’ उद्योगसमूहाचे अनेक वर्षं वरिष्ठ व्यवस्थापक होते. व्यवस्थापन-शास्त्रातील त्यांच्या दोन पुस्तकांना, व्यवस्थापन-क्षेत्रातील ‘एस्कॉर्ट बुक अ‍ॅवॉर्ड’ हा सर्वोच्च बहुमान दोन वेळा मिळाला आहे. रुस्तुमजींच्या व्यवस्थापन-कलेवरील एका पुस्तकावर भारत सरकारने काढलेल्या एका चित्रपटालाही बक्षीस मिळालं आहे. हे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व बालमानसतज्ज्ञ असून, अनेक विख्यात शाळांच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
TUMHI AANI TUMACHI MULA Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more