C. NORTHCOTE PARKINSON, M. K. RUSTOMJI, S. PAVRI

About Author


NA

हे सुप्रसिद्ध लेखक असून त्यांचं शिक्षण सेंट पीटर स्वूÂल, न्यू यॉर्वÂ व इम्यनुएल कॉलेज, वेंÂब्रिज इथे झालं. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी वेंÂब्रिज महाविद्यालयाचं सदस्यत्व मिळवण्याचा मान त्यांनी पटकावला. इलिऑनिस, लिव्हरपूल, हार्वर्ड आणि मलाया यांसारख्या देशोदेशींच्या विद्यापीठांमध्ये त्यांनी व्याख्याते म्हणून काम केलं. त्यांची ‘पार्विÂन्सन लॉ’ व अशी इतर अनेक पुस्तवंÂ जगभरात लोकप्रिय आहेत. यांची बरीच पुस्तवंÂ अमेरिका, इंग्लंड, प्रÂान्स, जपान इत्यादी देशांमध्ये प्रकाशित झाली असून ती अत्यंत लोकप्रिय ठरली आहेत. रुस्तुमजी यांची सहा पुस्तवंÂ ‘हिब्रू’ या इस्रायलच्या राष्ट्रभाषेतही प्रसिद्ध झाली आहेत. ‘चिल्ड्रन – हाउ टु मॅनेज देम, नाउ दॅट यू हॅव गॉट देम’ हे रुस्तुमजी- पार्विÂन्सन या जगप्रसिद्ध लेखक-जोडीचं पाचवं पुस्तक. अवघड व किचकट माहिती-विचार, अत्यंत सोप्या भाषेत, स्पष्टपणे सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याची कला रुस्तुमजी यांना लाभली आहे. हे पुस्तक जगभरात इतर अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे. रुस्तुमजी हे ‘टेल्को’ उद्योगसमूहाचे अनेक वर्षं वरिष्ठ व्यवस्थापक होते. व्यवस्थापन-शास्त्रातील त्यांच्या दोन पुस्तकांना, व्यवस्थापन-क्षेत्रातील ‘एस्कॉर्ट बुक अ‍ॅवॉर्ड’ हा सर्वोच्च बहुमान दोन वेळा मिळाला आहे. रुस्तुमजींच्या व्यवस्थापन-कलेवरील एका पुस्तकावर भारत सरकारने काढलेल्या एका चित्रपटालाही बक्षीस मिळालं आहे. हे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व बालमानसतज्ज्ञ असून, अनेक विख्यात शाळांच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
TUMHI AANI TUMACHI MULA Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more