* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353175092
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2020
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 352
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Sub Category : INDIAN
  • Discount : WORLD BOOK DAY OFFER 23 APRIL(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘TREAT ALL FAIRLY, OR THEY WILL SEEK REVENGE.’ A GREAT WORDS FROM CHRISTOPHER PAOLINI FORMS THE BASELINE FOR THE NOVEL. THE NOVEL IS BASICALLY A HISTORICAL EVENTS BASED REVENGE STORY, BUT DON’T GET MISUNDERSTOOD OVER HERE. IT IS NOT A PERSONAL REVENGE STORY, IT IS A NATIONAL REVENGE STORY. WE ARE VERY FORTUNATE THAT WE ARE LIVING IN A COUNTRY WHOSE HISTORICAL HERITAGE HAS ENRICHED WITH NUMBER OF STORIES AND THE PLOT OF NOVEL IS ONE OF THESE STORIES. WE ALL KNOW THE BLOODY CARNAGE HAPPENED AT JALIANWALABAGH. 13 APRIL, 1919 WAS THAT STAR CROSSED DAY. GENERAL DYER HAD SET UP FIRING ON NUMBERS OF INNOCENT PEOPLE WHO HAD GATHERED UP IN JALIANWALA BAGH. BUT WHAT WAS THE REASON BEHIND THIS CARNAGE? WHAT ACTUALLY HAPPENED OVER THERE? IS THIS INCIDENT LIMITED FOR THIS CARNAGE ONLY? OR THERE ARE MANY INCIDENTS WHICH LEADS TO THIS BLOODSHED AND FURTHER MORE HAPPENINGS? DOES THIS STORY END WITH MASSACRE? THE NOVEL GIVES ANSWER TO THE ABOVE MENTIONED QUESTIONS. THIS IS A STORY OF AN IDEALIST WHO HAS TAKEN OATH TO AVENGE THIS INHUMAN TREATMENT GIVEN TO INDIANS. THIS IS A STORY OF A CONTUMACIOUS HERO WHO NEVER LOSE HOPE.
इंग्रजांच्या विरोधात पंजाबात १९०७मध्ये घडून आलेली ‘पगडी संभाल जट्टा` चळवळ आणि १९१४मधील गदर उत्थान चळवळ यामुळे इंग्रज सरकारने सुरू केलेली दडपशाही... त्यामुळे पेटून उठलेली पंजाबी जनता... ब्रिटिशांनी लागू केलेला रौलट कायदा, ज्यानुसार सरकारने राज्यकत्र्यांना मनमानी कामकाज करण्याचा दिलेला परवाना... त्याची परिणती म्हणून १३ एप्रिल, १९१९ या दिवशी ब्रिटिश सरकारने जालियनवाला बागेत बैसाखी निमित्त जमलेल्या शीख समुदायावर केलेला बेछूट गोळीबार... या गोळीबारातून वाचलेला एक विशीचा तरुण राम मोहम्मद सिंग आझाद... या हत्याकांडाचा सूड घेण्याची त्याने घेतलेली शपथ... मार्गात आलेल्या अनेक अडचणींना तोंड देत या शपथेच्या मार्गाने सुरू राहिलेली त्याची वाटचाल... या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यास या ध्येयवेड्याने लंडनमध्ये जाऊन दिलेले देहान्त शासन... एका स्वातंत्र्यवीराची धगधगती कहाणी
1.कै. इंदुबाई शिर्के स्मृती कादंबरी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, दामाजीनगर, मंगळवेढा 2.सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, अखिल भारतीय साहित्य परिषद, नाशिक 3.श्री. अशोकसिंह ठाकुर पुरस्कृत राज्यस्तरीय कादंबरी पुरस्कार, सूर्यांश साहित्य आणि संस्कृती मंच, चंद्रपुर 4.राज्यस्तरीय कादंबरी पुरस्कार, साहित्य विहार संस्था, नागपूर 5.राष्ट्रीय संत नामदेव कादंबरी साहित्य पुरस्कार, हिंगोली
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#जालियनवालाबाग #कादंबरी #अमेयअशोकजाधव #उधमसिंग #लंडनमधलादहशतवादी #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #JALLIANWALABAG #AMEYASHOKJADHAV #UDHAMSINGH #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating Starस्नेहल ठाकरे

    कादंबरीत केवळ ऐतिहासिक घटना सांगितल्या नाहीत, तर त्या घटनांचे परिणाम, लोकांच्या भावना आणि ब्रिटीश सत्तेचा क्रूर चेहरा यांचे वास्तवदर्शी चित्रण केले आहे. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नायकांचे संघर्ष, त्याग आणि त्यांच्या बलिदानाची कथा अतिशय उत्कटपणे मांडल आहे. "जलियांवाला बाग" ही केवळ इतिहास जाणून घेण्यासाठीच नव्हे, तर स्वातंत्र्यसंग्रामातील नायकांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठीही आवश्यक वाचन आहे. इतिहासाची गोडी असलेल्या प्रत्येकाने ही कादंबरी वाचली पाहिजे. ...Read more

  • Rating StarPrasad J

    खुप सुंदर लिखाण....must read👍 इतिहासात हरवलेली एक क्रांतिकारी गाथा..

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more