* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: JALLIANWALA BAGH
  • Availability : Available
  • ISBN : 9789353175092
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2020
  • Weight : 5.00 gms
  • Pages : 352
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Sub Category : INDIAN
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘TREAT ALL FAIRLY, OR THEY WILL SEEK REVENGE.’ A GREAT WORDS FROM CHRISTOPHER PAOLINI FORMS THE BASELINE FOR THE NOVEL. THE NOVEL IS BASICALLY A HISTORICAL EVENTS BASED REVENGE STORY, BUT DON’T GET MISUNDERSTOOD OVER HERE. IT IS NOT A PERSONAL REVENGE STORY, IT IS A NATIONAL REVENGE STORY. WE ARE VERY FORTUNATE THAT WE ARE LIVING IN A COUNTRY WHOSE HISTORICAL HERITAGE HAS ENRICHED WITH NUMBER OF STORIES AND THE PLOT OF NOVEL IS ONE OF THESE STORIES. WE ALL KNOW THE BLOODY CARNAGE HAPPENED AT JALIANWALABAGH. 13 APRIL, 1919 WAS THAT STAR CROSSED DAY. GENERAL DYER HAS SET UP FIRING ON NUMBERS OF INNOCENT PEOPLE WHO HAD GATHERED UP IN JALIANWALABAGH. BUT WHAT WAS THE REASON BEHIND THIS CARNAGE? WHAT ACTUALLY HAPPENED OVER THERE? IS THIS INCIDENT LIMITED FOR THIS CARNAGE ONLY? OR THERE ARE MANY INCIDENTS WHICH LEADS TO THIS BLOODSHED AND FURTHER MORE HAPPENINGS? DOES THIS STORY END WITH MASSACRE? THE NOVEL GIVES ANSWER TO THE ABOVE MENTIONED QUESTIONS. THIS IS A STORY OF AN IDEALIST WHO HAS TAKEN OATH TO AVENGE THIS INHUMAN TREATMENT GIVEN TO INDIANS. THIS IS A STORY OF A CONTUMACIOUS HERO WHO NEVER LOSE HOPE.
इंग्रजांच्या विरोधात पंजाबात १९०७मध्ये घडून आलेली ‘पगडी संभाल जट्टा` चळवळ आणि १९१४मधील गदर उत्थान चळवळ यामुळे इंग्रज सरकारने सुरू केलेली दडपशाही... त्यामुळे पेटून उठलेली पंजाबी जनता... ब्रिटिशांनी लागू केलेला रौलट कायदा, ज्यानुसार सरकारने राज्यकत्र्यांना मनमानी कामकाज करण्याचा दिलेला परवाना... त्याची परिणती म्हणून १३ एप्रिल, १९१९ या दिवशी ब्रिटिश सरकारने जालियनवाला बागेत बैसाखी निमित्त जमलेल्या शीख समुदायावर केलेला बेछूट गोळीबार... या गोळीबारातून वाचलेला एक विशीचा तरुण राम मोहम्मद सिंग आझाद... या हत्याकांडाचा सूड घेण्याची त्याने घेतलेली शपथ... मार्गात आलेल्या अनेक अडचणींना तोंड देत या शपथेच्या मार्गाने सुरू राहिलेली त्याची वाटचाल... या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यास या ध्येयवेड्याने लंडनमध्ये जाऊन दिलेले देहान्त शासन... एका स्वातंत्र्यवीराची धगधगती कहाणी
1.कै. इंदुबाई शिर्के स्मृती कादंबरी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, दामाजीनगर, मंगळवेढा 2.सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, अखिल भारतीय साहित्य परिषद, नाशिक 3.श्री. अशोकसिंह ठाकुर पुरस्कृत राज्यस्तरीय कादंबरी पुरस्कार, सूर्यांश साहित्य आणि संस्कृती मंच, चंद्रपुर 4.राज्यस्तरीय कादंबरी पुरस्कार, साहित्य विहार संस्था, नागपूर 5.राष्ट्रीय संत नामदेव कादंबरी साहित्य पुरस्कार, हिंगोली
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#जालियनवालाबाग #कादंबरी #अमेयअशोकजाधव #उधमसिंग #लंडनमधलादहशतवादी #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #JALLIANWALABAG #AMEYASHOKJADHAV #UDHAMSINGH #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarPrasad J

    खुप सुंदर लिखाण....must read👍 इतिहासात हरवलेली एक क्रांतिकारी गाथा..

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more