* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE RUNAWAY JURY
  • Availability : Available
  • Translators : ANIL KALE
  • ISBN : 9788184980264
  • Edition : 2
  • Publishing Year : MAY 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 496
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JOHN GRISHAM COMBO- 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
JURY; SELECTED BY THE WELL KNOWN, RICH, FAMOUS, SUCCESSFUL ADVOCATES, WITH THE WHOLE AND SOLE INTENTION OF WINNING THE CASE. THESE JURIES ARE NOW INVOLVED IN A CASE AGAINST A MULTI BILLION DOLLARS CIGARETTE COMPANY, THEY ARE IN THE MIDST OF A STRONG PETITION; THEY HAVE AN OPPORTUNITY TO PROVE THE INNOCENCE OF THEIR MINDS. BUT ONLY A FEW KNOW THE SECRET, AND THEIR LEADER HAS THE ABILITY TO CHANGE THEIR DECISION. THE PERSON WHO IS KNOWN AS JURY NUMBER 2 HAS A VERY MYSTERIOUS PAST. HE IS PLAYING EVERY MOVE WITH THE HELP OF HIS BEAUTIFUL, YOUNG GIRL FRIEND.THE FUTURE OF ALL THE CIGARETTE COMPANIES IS IN DARKNESS. A FAMILY IS AWAITING JUSTICE. THE ATTORNEY`S CAREER IS ON THE VERGE OF DESTRUCTION. THERE IS TERRIBLE CORRUPTION, GREED AND BRIBE…. EVERYTHING POINTS TO JUST ONE THING, SURELY THE SECRET ABOUT THE JURY NUMBER 2 IS ABOUT TO BE REVEALED.
ज्यूरी... वाटेल ते करून आपल्याच बाजूनं निकाल लावू बघणा-या महागड्या वकिलांनी खास निवडलेली माणसं... कोट्यवधी डॉलर्सच्या नुकसानभरपाईसाठी एका प्रचंड सिगारेट कंपनीविरुद्धच्या वादळी खटल्याच्या मध्यभागी सापडलेली... एक अत्यंत पथदर्शक निकाल देण्याची संधी मिळालेली... पण अगदी निवडक लोकांनाच एक रहस्य माहिती आहे : या ज्यूरींचा निर्णय पडद्याआडून फिरवण्याची क्षमता आहे त्यांच्या नेत्याकडे... फक्त ज्यूरी नंबर दोन म्हणून ओळखल्या जाणा-या या व्यक्तीचा भूतकाळ अत्यंत रहस्यमय आहे, आणि आपल्या सुंदर, तरुण मैत्रिणीच्या सहकार्यानं तो प्रत्येक चाल खेळतोय... संपूर्ण सिगारेट उद्योगाचं भवितव्य अधांतरी आहे... एक कुटुंब न्यायदानाची वाट बघतंय... वकिलांचं करिअरच बरबाद होण्याची पाळी आली आहे... प्रचंड लाचलुचपत, हाव आणि भ्रष्टाचार होतोय... आणि अशा परिस्थितीत ज्यूरी नंबर दोनबद्दलचं सत्य प्रकाशात येणार असं दिसतंय...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #THE RAINMAKER #THE STREET LAWYER # THE PARTNER #THE CHAMBER #BIOGRAPHYA&TRUESTORIES #THE FIRM #THE ASSOCIATE #THE LAST JUROR #JOHNGRISHAM #RAVINDRAGURJAR #THECLIENT #THE TESTAMENT #THEPELICANBRIEF #MADHAVKARVE #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 20-02-2011

    प्रदीर्घ सूडकथा... ‘द रनअवे ज्युरी’ ही जॉन ग्रिशॅम यांची कादंबरी. जॉन ग्रिशॅम हा बांधकाम कामगाराचा मुलगा. ‘व्यावसायिक बेसबॉल खेळाडू’ व्हायची स्वप्ने बघत होता, परंतु त्यासाठी आवश्यक गोष्टी आपल्याकडे नाहीत हे लक्षात येताच त्यांनी कायद्याची पदवी घेऊन दा वर्ष वकिली केली. १९८३ ते १९९० या काळात विधनसभेवर निवडून येऊन त्यांनी कार्य केले. एक दिवस बारा वर्षांच्या बलात्कारित मुलीची कहाणी ऐकून त्यांनी कादंबरी लिहायला सुरुवात केली. काम करून लिखाण करायचं, पण प्रकाशक पटकन स्वीकारायचे नाहीत. नंतर ‘कायदेविषयक रोमांचक वाङ्मय लिहिणारा लेखक’ ही पदवी मिळण्याआधी ते मिसिसिपीमध्ये आठवड्याला साठ ते सत्तर तास काम करणारे वकील होते. त्यातून ते लेखन छंद जोपासत. लवकरच लेखन छंदाचे पूर्ण वेळ व्यवसायात रूपांतर होऊन त्यांनी लोकप्रिय आणि रोमांचक कादंबऱ्यांचा सिलसिला चालू केला. त्यांच्या नऊ कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले. त्यांच्या अनेक कादंबऱ्या बेस्ट सेलर ठरल्या. फक्त कायद्याशी संबंधित विषयांवरच कादंबऱ्या लिहिण्यात हातखंडा असलेला हा जगीर नावाजलेला अमेरिकन कादंबरी लेखक. या कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे अनिल काळे यांनी. या अगोदरही काळे यांनी मराठी अनुवाद केलेला आहे. त्यांची साधीसोपी, रंजक भाषाशैली अभ्यासू वृत्तीची जाणीव करून देते. या कादंबरीमध्ये अमेरिकन न्यायपद्धतीप्रमाणे अगदी ज्युरींच्या निवडीपासून ते पार खटल्याच्या निकालापर्यंत जे काही भयंकर आणि भ्रष्ट प्रकार दाखवले आहेत, ते खरोखर सुज्ञ वाचकांचे मन सुन्न करणारे आहेत. (इथे हिंदुस्थानात तरी यापेक्षा वेगळी परिस्थिती कुठे आहे?) या प्रकारांबरोबरच ‘बिग बिझनेस’मधील सर्व तऱ्हेचे उच्च पातळीवरचे गैरप्रकारही असेच आहेत. मात्र खटल्यातील साक्षीपुराव्यांच्या निमित्ताने ‘सिगारेट’, ‘तंबाखू’, ‘निकोटिन’ या विषयांवर झालेल्या आणि होत असलेल्या प्रचंड संशोधनाची एक झलक आपल्याला पाहायला मिळते आणि ती माहिती मात्र शहारे आणणारी आहे. सिगारेट ओढण्याच्या किंवा इतर प्रकारांनी तंबाखू सेवनाच्या ‘स्वत:पुरत्या निर्णयाचा अधिकार प्रत्येकाला आहे खरा, पण प्रचंड जाहिरातबाजी करून आणि निकोटिनसारखे तंबाखूची सवय लावणारे रसायन अजिबात कमी न करता सिगारेट व इतर तंबाखूची उत्पादने सर्रास प्रचंड प्रमाणावर उत्पादित करून ती विकली जातात. तेव्हा हा तथाकथित स्वयंनिर्णयाचा अधिकार केवळ कागदावरच उरत नाही का? हा या कादंबरीत विचारलेला प्रश्न मोठा विचार करायला लावणारा आहे. सिगारेट कंपन्या, न्यायव्यवस्था, राजकीय दबाव गट अशा प्रचंड व्यापक पार्श्वभूमीवर अत्यंत कल्पकपणे रंगवलेली, सत्य आणि कल्पना यांचे अनोखे मिश्रण असलेली ही एक प्रदीर्घ सूडकथा आहे. या कादंबरीस योग्य न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न आपल्या कौशल्यपूर्ण अनुवादाने अनिल काळे यांनी केला आहे. फाल्गुन ग्राफिक्सने तयार केलेलं मुखपृष्ठ साजेसं आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 25-10-2009

    गुंगवून टाकणारी रहस्यमय कादंबरी… सिगारेट ओढण्याच्या किंवा इतर प्रकारांनी तंबाखू सेवनाच्या स्वत:पुरत्या निर्णयाचा अधिकार प्रत्येकाला आहे खरा, पण प्रचंड जाहिरातबाजी करून आणि निकोटिनसारखे तंबाखूची सवय लावणारे रसायन अजिबात कमी न करता सिगारेट व इतर तंबाखची उत्पादने सर्रास प्रचंड प्रमाणावर उत्पादित करून ते विकली जातात, तेव्हा हा तथाकथित स्वयंनिर्णयाचा अधिकार केवळ कागदावरच उरत नाही का, हा या कादंबरीत विचारलेला प्रश्न मोठा विचार करायला लावणारा आहे. ‘सिगारेट स्मोकिंग इज इन्ज्युरिअर टू हेल्थ’ असा तथाकथित वैधानिक इशारा आपल्याकडेही सिगारेटच्या पाकिटांवर छापलेला असतो. पण तेवढ्याने भागते का? अगदी शाळांपासून पन्नास फुटांवर असलेली आपल्याकडची सिगारेट, तंबाखू व गुटखा विक्रेत्यांची दुकाने, गुटख्याच्या उत्पादनांवर व विक्रीवर घातलेले निर्बंध आणि त्यांची राजरोस होत असलेली तुफान विक्री, कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अत्यंत कल्पकतेने बनवलेल्या त्यांच्या जाहिराती हेच नाही का दाखवत, की कायदा आणि त्याची अंमलबजावणी यात प्रचंड मोठी तफावत आहे. सिगारेट कंपन्या, न्याय व्यवस्था, राजकीय दबावगट अशा प्रचंड व्यापक पार्श्वभूमीवर अत्यंत कल्पकपणे रंगवलेली, सत्य आणि कल्पना यांचे अनोखे मिश्रण असलेली ही एक प्रदीर्घ अशी सूडकथा आहे. कादंबरीचा लेखक जॉन ग्रिशॅम हा बांधकाम कामगाराचा मुलगा. व्यावसायिक बेसबॉल खेळाडू व्हायची स्वप्ने बघत होता. परंतु त्यासाइी आवश्यक गोष्टी आपल्याकडे नाहीत हे लक्षात आल्यावर त्याने कायद्याची पदवी घेतल्यानंतर दहा वर्षे वकिली केली. १९८३ ते १९९० या काळात विधानसभेवर निवडून येऊन त्यांनी कार्य केले. कायदेविषयक रोमांचक वाड्:मय लिहिणारा लेखक ही पदवी मिळण्याच्या आधी ते मिसिसिपीमध्ये आठवड्याला साठ ते सत्तर तास काम करणारे वकील होते. कधी कामाला जाण्याच्या आधीचा तर कधी मधल्या सुटीचा वेळ ते कादंबरी लेखनाच्या छंदासाठी देत असत. लवकरच छंदाचे पूर्ण वेळ व्यवसायात रुपातंर झाले. त्यांच्या नऊ कादंबऱ्यावर चित्रपट निघाले आहेत. त्यांच्या अनेक कादंबऱ्या ‘बेस्ट सेलर’ ठरल्या. ज्यूरी... वाटेल ते करून आपल्याच बाजूनं निकाल लावू पाहणाऱ्या महागड्या वकिलांनी खास निवडलेली माणसं. कोट्यवधी डॉलर्सच्या नुकसान भरपाईसाठी एका प्रचंड सिगारेट कंपनीविरुद्धच्या वादळी खटल्याच्या मध्यभागी सापडलेली; एक अत्यंत पथदर्शक निकाल देण्याची संधी मिळालेली, पण अगदी मूठभर निवडक लोकांनाच एक रहस्य माहिती आहे. या ज्यूरींचा निर्णय पडद्याआडून फिरवण्याची क्षमता आहे. त्यांच्या नेत्यांकडे. फक्त ज्यूरी नंबर दोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तींचा भूतकाळ अत्यंत रहस्यमय आहे आणि आपल्या सुंदर, तरुण मैत्रिणींच्या सहकार्यानं तो प्रत्येक चाल खेळतोय. संपूर्ण सिगारेट उद्योगाचं भवितव्य अधांतरी आहे. एक कुटुंब न्यायदानाची वाट बघंतय. वकिलांचं करिअरच बरबाद होण्याची पाळी आली आहे. प्रचंड लाचलुचपत, हाव आणि भ्रष्टाचार होतोय आणि अशा परिस्थितीत ज्यूरी नंबर दोनबद्दलचं सत्य प्रकाशात येणार असं दिसतंय. अमेरिकेतील ‘बिग फोर’ सिगारेट कंपन्या. त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती. धूम्रपानामुळे प्राण गमावलेल्या लोकांची मुलं, बायका त्यांच्यावर एकामागून एक खटले भरत होती. नुकसान भरपाई मागत होती. ते सगळे खटले भरत होती. ते सगळे खटले बिग फोरनीच जिंकलेले होते. आता मात्र त्यांच्यावरचा दबाव वाढत होता. एका जरी विधवेनं खटला जिंकला, तरी खटल्यांचं धरणच फुटणार हे उघड होतं. त्याची सुरुवात झाली होती. कोर्टाच्या वाढत्या हल्ल्यांना तोंड देता यावं म्हणून ‘बिग फोर’ कंपन्यांनी ‘द फंड’ नावानं एक भली मोठी रक्कम गोळा केलेली होती. आताचा खटला ‘वूड विरुद्ध पायनेक्स’ असा होता. पायनेक्स तिसऱ्या नंबरची कंपनी होती व सेलेस्ट वुडने हा खटला भरला होता. ज्यूरर्सनी जर पायनेक्सच्या बाजूनं निकाल दिला, तर पुढची दहा वर्षे तरी सिगारेट उद्योगांविरुद्धां हे आक्रमण थंड पडणार होतं. मुळात कोणताही कायदा करत असताना तो ज्या उद्देशाने केलेला असतो, तो उद्देश त्यांच्या अंमलबजावणीच्यावेळी बऱ्याचदा सफल होत नाही. कारण कायदा राबवणारे लोक त्यातून पळवाटा शोधण्याच्या मागे लागतात. कायद्याचा अर्थ लावणारेही तेच करत असतात. अनेकदा कायदा तयार करतनाच त्यात पळवाटा ठेवलेल्या असतात. त्यामुळे मूळ उद्देशापासून कायदा भरकटत जातो. या कादंबरीमध्ये अमेरिकन न्यायपद्धतींप्रमाणे अगदी ज्यूरींच्या निवडींपासून ते पार खटल्याच्या निकालापर्यंत जे काही भयंकर आणि भ्रष्ट प्रकार दाखवले आहेत, ते खरोखरच सुज्ञ वाचकांचे मन सुन्न करणारे आहेत. या प्रकारांबरोबरच ‘बिग बिझिनेस’ मधले सर्व तऱ्हेचे उच्च पातळीवरचे गैरप्रकारही असेच आहेत. मात्र खटल्यातील साक्षीपुराव्यांच्या निमित्ताने सिगारेट, तंबाखू, निकोटिन या विषयावर झालेल्या आणि होत असलेल्या प्रचंड संशोधनाची एक झलक आपल्याला पाहायला मिळते आणि ती माहिती मात्र शहारे आणणारी आहे. सिगारेटच्या व्यसनामध्ये अडकल्यामुळे फार भयंकर यातनामय मृत्यू आलेल्या आई-वडिलांच्या एकुलत्या एका मुलीने घेतलेल्या सूडाची ही कथा आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more