* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SABHET KASE BOLAVE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663266
  • Edition : 14
  • Publishing Year : FEBRUARY 1988
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 92
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SHYAM BHURKE COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ONCE THE TEACHER ASKED THE STUDENTS A QUESTION- ‘WHO IS THE GREATEST, A MOTHER OR A TEACHER?’ THIS GOT THE WHOLE CLASS THINKING. NO DOUBT THAT MOTHER WAS THE GREATEST. BUT THEN THE QUESTION WAS ASKED BY THE TEACHER. SO HE MAY NOT LIKE THE TRUE ANSWER. HOW COULD THE STUDENTS SAY THAT THE TEACHER WAS NOT THE GREATEST AS AGAINST MOTHER? A BOY STOOD UP AND SAID, ‘SIR, I WILL ANSWER YOUR QUESTION.’ THE TEACHER PERMITTED HIM TO DO SO. THE STUDENT SAID, ‘THE TEACHER IS THE GREATEST.’ THE TEACHER WAS NATURALLY VERY PLEASED TO HEAR THIS. HE ASKED THE STUDENT TO STAND IN FRONT OF THE CLASS AND REPEAT LOUDLY. THE STUDENT CAME FORWARD AND SAID IN A LOUD VOICE; ‘MOTHER SINGS LULLABY AND PUTS HER BABY TO SLEEP WHILE THE TEACHER PUTS THE WHOLE CLASS TO SLEEP WITH HIS MONOTONOUS VOICE.’ THIS BOOK SHOWS US THE VARIOUS WAYS TO MAKE OUR TALK INTERESTING RATHER THAN BORING. THERE ARE PEOPLE WHO HAVE STAGE FEAR. THEY ARE UNABLE TO SPEAK IN PUBLIC. THIS BOOK HELPS THEM TO OVERCOME THIS FEAR. THIS BOOK ALSO SHOWS A PATH TO GREAT ORATORY SKILLS TO THOSE WHO ARE ALREADY GOOD ORATORS. IT WILL HELP TO OVERCOME SPEECH ANXIETY. THERE ARE PEOPLE WHO THINK THAT GIVING A SPEECH IS NOT THEIR CUP OF TEA. THIS BOOK WILL SURELY GUIDE THEM WELL ON THIS PARTICULAR PATH. THOUGH A SMALL BOOK, IT WILL HELP ALL TO GET PREPARED FOR FUTURE SPEECHES-THOUSANDS OF THEM-WHICH WILL BE THOROUGHLY ENJOYED BY ALL THE LISTENERS WITHOUT GETTING BORED FOR A SINGLE MOMENT.
एकदा गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला– मुलांनो, जगामध्ये आई श्रेष्ठ, की गुरू श्रेष्ठ?’ प्रश्न ऐवूÂन सारा वर्ग शांतपणे विचार करू लागला. खरं पाहिलं तर आई श्रेष्ठ. पण प्रश्न विचारणारे आहेत गुरुजी! ते श्रेष्ठ नाहीत कसं म्हणायचं? तेव्हा एक मुलगा उभा राहिला व म्हणाला, ‘गुरुजी मी सांगतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर.’ गुरुजींनी संमती देताच तो मुलगा म्हणाला, ‘गुरुजी श्रेष्ठ!’ हे उत्तर ऐवूÂन गुरुजी खूश झाले. ते प्रसन्न वदनाने त्याला म्हणाले, बाळ, असा पुढं ये! आणि साNया वर्गाला सांग, गुरू का श्रेष्ठ, ते!’ तो मुलगा साNयांपुढं येऊन म्हणाला ‘‘आई अंगाई-गीत गाऊन, आपल्या एकाच बाळाला झोपविते! तर गुरुजी आपल्या एकसुरी आवाजात संपूर्ण वर्गाला झोपवितात!!’’ व्याख्यान वंÂटाळवाणे न होता आकर्षक, खुसखुशीत होण्यासाठी काय करायला हवं ते या पुस्तकात प्रभावीपणे मांडलं आहे. ज्याला भाषणाची भीती वाटते, त्याची भीती नाहीशी करण्याचा कानमंत्रही इथं सांगितलाय. जो आता भाषण करतोय् तो प्रभावी वक्ता होण्यासाठी काय करायला हवं त्याचं मार्गदर्शन इथं आहे. ज्याला भाषण हा प्रकार भीषण आहे; तो आपल्यासाठी नाहीच, असं वाटतंय, त्याला या प्रकाराकडे प्रेमानं आणण्याचं सामथ्र्य या पुस्तकात आहे. आपण हे छोटेखानी पुस्तक एकदा वाचायचं अन् हजारो व्याख्यानं द्यायला तयार व्हायचं. आपल्या व्याख्यानाच्या वेळी श्रोत्यांतून जांभया येणार नाहीत, याची खात्री आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SABHETKASEBOLAVE #SABHETKASEBOLAVE #सभेतकसेबोलावे #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #MARATHI #SHYAMBHURKE #श्यामभुर्के "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    एकूणच लिखाणाची शैली खूपच आवडली. उदाहरणांमुळे जास्तच परिणामकारक. कैलास लोंढे

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more