* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MANS SEARCH FOR MEANING
  • Availability : Available
  • Translators : VIJAYA BAPAT
  • ISBN : 9788184980721
  • Edition : 10
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 148
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Sub Category : FAMILY & RELATIONSHIPS, PARENTING
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A PROMINENT VIENNESE PSYCHIATRIST BEFORE THE WAR, VIKTOR FRANKL WAS UNIQUELY ABLE TO OBSERVE THE WAY THAT HE AND OTHER INMATES COPED WITH THE EXPERIENCE OF BEING IN AUSCHWITZ. HE NOTICED THAT IT WAS THE MEN WHO COMFORTED OTHERS AND WHO GAVE AWAY THEIR LAST PIECE OF BREAD WHO SURVIVED THE LONGEST - AND WHO OFFERED PROOF THAT EVERYTHING CAN BE TAKEN AWAY FROM US EXCEPT THE ABILITY TO CHOOSE OUR ATTITUDE IN ANY GIVEN SET OF CIRCUMSTANCES.NNTHE SORT OF PERSON THE PRISONER BECAME WAS THE RESULT OF AN INNER DECISION AND NOT OF CAMP INFLUENCES ALONE. ONLY THOSE WHO ALLOWED THEIR INNER HOLD ON THEIR MORAL AND SPIRITUAL SELVES TO SUBSIDE EVENTUALLY FELL VICTIM TO THE CAMP`S DEGENERATING INFLUENCE - WHILE THOSE WHO MADE A VICTORY OF THOSE EXPERIENCES TURNED THEM INTO AN INNER TRIUMPH.NNFRANKL CAME TO BELIEVE THAT MAN`S DEEPEST DESIRE IS TO SEARCH FOR MEANING AND PURPOSE. THIS OUTSTANDING WORK OFFERS US ALL A WAY TO TRANSCEND SUFFERING AND FIND SIGNIFICANCE IN THE ART OF LIVING.
दररोज, दर तासाला, दर मिनिटाला स्वत:च्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा नाश करणाऱ्या , तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणाऱ्या शक्तींना शरण जायचे की नाही हे पदोपदी ठरवावे लागते. तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणे बनता की नाही हे तुमच्या निर्णयांवर अवलंबून असते. आपले मानसिक स्वातंत्र्य घालवून, आत्मसन्मान गमावून, मेंढरांसारखे मनानेही वैÂदी होता की नाही हे ठरविण्याचे तुमचे स्वातंत्र्य अबाधित असते...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ARTHACHYASHODHAT #MANSSEARCHFORMEANING #अर्थाच्याशोधात #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIJAYABAPAT #विजयाबापट #VIKTORE.FRANKL "
Customer Reviews
  • Rating StarSumitabh SP

    🎀`अर्थाच्या शोधात`🎀 दुःखाने ग्रासलेल्या, मनाने खचलेल्या, रोगाने पीडित अश्या माणसाला मरण्याचे/जीवन संपवण्याचे कित्त्येक कारणं सापडतात, पण जगण्याचा एकही मार्ग, एकही कारण सापडू नये? `अर्थाच्या शोधात` ह्या डॉ.व्हिक्टर फ्रँकल ह्यांच्या आत्मचरित्रातत्यांनी लिहिलेले अनुभव हे एक मनोवैज्ञानिक म्हणून तर आहेच परंतु त्याहीपेक्षा जास्त एक सामान्य कैदी म्हणून आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी ऑशवीत्झ आणि इतर काही concentration कॅम्प (यतानातळांवर) तीन वर्षे घालवली. तिथे नाझींच्या छळछावण्यांचा अनुभव घेतलेल्या फ्रँकल यांनी `लोगोथेरपी` ही पद्धत निर्माण केली. जगण्यास सामर्थ्य देणारे मनोबल कसे मिळवले पाहिजे, याचे विवेचन करणारे लेखन. सोप्या सुटसुटीत निवेदन शैलीतील तत्वज्ञानाचा विचार. यतानातळांवरील परिस्थिती बद्दल बोलताना फ्रँकल लिहितात, "दररोज, दर तासाला, दर मिनिटाला स्वत:च्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा नाश करणार्‍या , तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणार्‍या शक्तींना शरण जायचे की नाही हे पदोपदी ठरवावे लागते. तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणे बनता की नाही हे तुमच्या निर्णयांवर अवलंबून असते. आपले मानसिक स्वातंत्र्य घालवून, आत्मसन्मान गमावून, मेंढरांसारखे मनानेही वैदी होता की नाही हे ठरविण्याचे तुमचे स्वातंत्र्य अबाधित असते..." यतानातळांवर कैद्यांचा होणारा छळ, त्यांची मानसिक स्थिती, त्यांची मरणाला शरण जाण्याची तीव्र इच्छा ह्या सगळ्या गोष्टी वाचतांना अंगावर काटा येतो. त्या परिस्थितीत, कैद्यांचं एव्हढ मानसिक खच्चीकरण करण्यात येत होतं की, मरण म्हणजे सुटका असं समीकरण झालं. स्वतःच्याच विष्ठेत पडून राहणं, आप्तस्वकीयांच्या वियोगाच्या दुःखाने खचून जाऊन भूतकाळात जगणं सुसह्य वाटणे आणि अखेरीस मनोविकार जडणे, रोज मरणाची भीक मागणे, छावणीतील इतर मित्रांना जिवंत जाळतांना बघणे इत्यादी दाखले वाचतांना माणूस म्हणून स्वतःचीच लाज वाटू लागते. पुस्तकाच्या उत्तरार्धात लेखकाने `लोगोथेरपी` ह्या उपचारपद्धतीबद्दल माहिती दिली आहे. ह्या संज्ञांचा अर्थ सांगताना प्रत्येक वेळी लेखकाने उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे. एक कैद्याच्या मनोविकाराबद्दल सांगताना लेखक सांगतात की, त्या कैद्याला असं स्वप्न पडलं की 31 मार्च रोजी युद्ध संपणार आहे. तो कैदी दिवसभर ह्याच विचारात असायचा आणि दिवस मोजायचा, अखेरीस 31 मार्च चा दिवस उगवला पण युद्ध काही संपले नाही आणि तो कैदी 1 एप्रिल रोजी मरण पावला. यातानातळामध्ये कैद्यांना वाटलेली सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे `अनिश्चितता`. लिहिण्यासारखं खूप आहे परंतु हे पुस्तक प्रत्येकाने वाचून लेखकाचे अनुभव, त्यांनी concentration कॅम्प मध्ये मनोविकार जडलेल्या रुग्णांवर/कैद्यांवर केलेली थेरपी, कैद्यांचं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं आणि त्यांना जीवनाचा अर्थ शोधायला लावणं हे सगळं स्वतः अनुभवावं. मी अत्यंत आभारी आहे माझा मित्र Hrishi Endait ह्यांचा, ज्यांनी मला हे पुस्तक सुचवले. धन्यवाद!🙏 ...Read more

  • Rating StarBharat Gaikwad

    #व्हिक्टर_फ्रॅन्कल यांचं #Man_Search_for_Meaning हे इंग्रजी पुस्तक #डॉ_विजया_बापट यांनी "#अर्थाच्या_शोधात" या नावानं मराठीत अनुवादित केलं आहे. नुकतंच हे पुस्तक वाचून झालं. 📚📖 आज आपण सर्वजणच जीवनाच्या अर्थाच्या शोधात आहोत. त्यामुळे "अर्थाच्या शोधत" या मथळ्यानच लक्ष वेधताच मलाही पुस्तक वाचल्याशिवाय राहवलं नाही. डॉ. व्हिक्टर फ्रॅन्कल या न्यूरॉलॉजिस्ट आणि सायकिऍट्रिस्ट असलेल्या व्यक्तीला (लेखकाला) दुसऱ्या महायुद्धादरम्यान तो केवळ `ज्यू` असण्याच्या अपराधा बद्दल पकडण्यात आले. नाझींच्या छळछावण्याच्या यातनातळांवर (कॉन्संट्रेशन कॅम्प) मध्ये फ्रॅन्कल यांनी जी 3 वर्षे घालवली त्या अनुभवांचे सखोल वर्णन या पुस्तकाच्या पूर्वार्धात आहे. फ्रॅन्कल यांच्या बरोबर पकडण्यात आलेल्या 90 टक्क्यापेक्षा जास्त लोकांना विषारी वायूकक्षात अथवा विधुत भट्टीत घालून ठार मारण्यात आले. उरलेल्या लोकांकडून उपाशीपोटी, युरोपातील गारठ्यात, अपुऱ्या वस्त्रानिशी कष्टाची कामे करून घेतली. अशा बिकट आणि भयानक परिस्थितीतीतून जात असतानाही फ्रॅन्कल यांनी आपला आशावाद ढळू दिला नाही. आपल्या ध्येर्याचा त्याग केला नाही. फ्रॅन्कल यांनी माणुसकी जपलीच, पण त्या भयंकर वातावरणातही माणुसकी शोधण्याचं औदार्य उरी बाळगलं. सभोवती हाहाकार माजला असताना तो स्वतःला प्रश्न विचारात राहिला, जीवनाचा अर्थ शोधत राहिला. `ज्याला "का" जगायचे ह्याचा उलगडा झाला कि त्याला "कशाही" परिस्थितीत जगता येते` हाच जीवनाचा अर्थ शोधता यावा, जीवनातील अर्थाचा शोध घेणारी उपचार पद्धती #लोगोथेरपी हा या पुस्तकाचा उत्तरार्ध आहे. बुद्धिबळाच्या खेळात सर्वात चांगली किंवा फक्त चांगली चाल अशी कुठलीच चाल नसते. त्या वेळच्या प्याद्द्यांनुसार, पटावरील त्यांच्या स्थानानुसार आणि प्रतिस्पर्ध्याच्या व्यक्तीमत्वानुसार सर्वात चांगली चाल कुठली ते ठरवावे लागते. जीवनाचेही तसेच आहे प्रत्येक व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यातील ध्येय शोधायला आणि त्याच्या पूर्तीसाठी असलेली जबाबदारी पेलायला शिकते तेव्हाच ती जीवनातील प्रत्येक उत्तर शोधायला सज्ज होते. दररोज, दर तासाला, दर मिनिटाला स्वतःच्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा नाश करणाऱ्या, तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणाऱ्या शक्तींना शरण जायचे कि नाही हे पदोपदी ठरवावे लागते. तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणे बनता कि नाही हे तुमच्या निर्णयावर अवलंबुन असते. तुम्ही जर जीवनाचा अर्थ शोधण्याच्या तयारीत असाल तर हे पुस्तक निश्चितच दिशादर्शक ठरेल.... वाचत रहा....👍🏻 © Bharat Gaikwad ✍🏻📚❣️ ...Read more

  • Rating StarAtul Nanda

    जिथं जगायला नाही तर फक्त मरायला वेगवेगळे पर्याय दिले जातात आणि त्यातूनच जगण्याचा अर्थ शोधणे म्हणजे हे पुस्तक.

  • Rating StarPurva Badave

    "अर्थाच्या शोधात" नाव वाचून हातात घ्यावंसं वाटलं तर हरकत नाही वाचायला, कारण जीवनाला अर्थ असतो का, निरर्थक आहे सगळं, असं वाटतं कधीतरी आणि हे वाटणं जास्त होत असताना हे पुस्तक हातात आलं तर विचारांना एक वेगळा अँगल हे पुस्तकं नक्कीच देऊन जातं. डॉ. वहिक्टर फ्रँकल अशा न्यूरालॉजिस्ट व सायकिअँट्रिस्ट असलेल्या व्यक्तीने दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान नाझींच्या छळछावण्यांच्या यातनातळांवर जी तीन वर्षे घालवली, त्या सर्व अनुभवांचे सूक्ष्म वर्णन त्याने या पुस्तकाच्या पहिल्या भागात केले गेले आहे. मानसोपचार प्रणालीतील पहिला फ्राईडचा `सुखाचा शोध`, दुसरा अँडलरचा `सत्तेची आकांक्षा` आणि तिसरा हा `जीवनाच्या हेतूचा शोध` असे सिद्धांत मांडले गेले. सायकालॉजीची बरीचशी पुस्तके वाचून झाली असली तर वेगळं काय आहे यात, असं वाटतं. पण तसं पाहता फार सूक्ष्म पैलू हा लक्षात येतो, की कुठलीही आशा नसताना, अनिश्चितता सर्वत्र दिसताना माणसाच्या हातात काय असतं? याचं सार म्हणजे या लेखकाने मांडलेली पुस्तकाच्या दुसऱ्या भागातली लोगो थेरपी. यात काही संकल्पना घेऊन विवेकपूर्वक त्या त्या संकल्पनेवरचा संज्ञा परिहार छान मांडला आहे. काही सामान्य कैदी एका पावाच्या तुकड्यावर दिवस काढत असतानाही माणूसकीचे दान म्हणून मित्रांना त्यातला तुकडा देतात आणि काही आत्यंतिक उपोषणास बळी पडून नरमांस खाण्यास ही प्रवृत्त होतात. माणसांचीच ही दोन रूपे लेखकाला तिथं पहायला मिळाली. मूळ प्रवृत्ती म्हणून जी काही स्वभावतःच येते, ती कसल्याही परिस्थितीत तिचा मूळ स्वभाव सोडत नाही, हे खरं असलं तरी नवा दृष्टिकोन आणि आशा लोकांच्या मनात पेरल्या तर त्याच्यातून पुढे निर्माण होणारे आयुष्य हे नक्कीच अर्थपूर्ण असू शकेल, असं डॉक्टर व्हिक्टर फ्रँकल इथं सांगतात. भूक, थकवा, उपासमार, थंडी, छळ अशा निरुत्साही, निराशाजनक वातावरणात ही कशासाठी जगायचे, आयुष्य आपल्याला काय आव्हान करतंय, त्याच्या प्रत्येक क्षणाला आपण काय अर्थ द्यायचा? चित्रकार चित्र रंगवून आपल्यापुढे उभे करतो, पण ही लोगो थेरपी आपला दृष्टिकोन सखोल नि विशाल करायचं काम करते, जेणेकरून जग जसे आहे तसे पाहता यावे, आणि त्याही पलीकडे दृष्टिकोन इतका व्यापक व्हावा की जगताना जरी समोर परिस्थिती क्लेशकारक असेल तरी मानसिक दृष्टिकोनामुळे त्या क्लेशाची सुसह्यता वाढेल, असं डॉ. व्हिक्टर फ्रँकल यांचं म्हणणं आहे. द सायकियाट्रिक क्रिडो म्हणून त्यांचं हे मत मला खूपच हृदयस्पर्शी वाटलं. ते म्हणतात माणसाच्या स्वातंत्र्याचे संपूर्ण अपहरण करील अशी कुठलीच परिस्थिती नसते, मनोविकृत व्यक्तीपाशीदेखील मर्यादित स्वरूपाचे स्वातंत्र्य कायम असते. ती विकृती त्याच्या व्यक्तिमत्वाच्या गाभ्यास शिवू शकत नाही. माणसानेच ऑश विट्झच्या छळछावणीत वापरलेल्या विषारी वायूकक्षांचा शोध लावला आणि माणसानेच विषारी वायूकक्षांत ताठ मानेने, `शेमा ईस्त्रायेल`ची प्रार्थना ओठांवर आणत प्रवेश केला. `अर्थाच्या शोधात` हे पुस्तक मनाचा एक सूक्ष्म कप्पा उघडून जाते. ---पूर्वा बडवे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more