* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RIVANAVYALI MUNGI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661927
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RAJAN GAVAS COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF THE SELECTED STORIES BY RAJAN GAVAS. THEY ARE VERY UNIQUE IN THEIR STYLE AND PRESENTATION. THEY REVEAL THE SINCERITY AND SENSITIVITY OF THE AUTHOR. ALL THESE STORIES ARE WRAPPED IN THE TRADITIONAL SETTINGS OF LITERATURE. THE FOLK TALES ALSO MAINTAIN THEIR CULTURAL CHARACTERISTICS. MANY OF THE STORIES HAVE THE POTENTIALS OF UNFORGETTABLE MASTER PIECES. THIS COLLECTION IS SURE TO ADD A FEATHER IN THE CAP OF MARATHI LITERATURE.
राजन गवस यांच्या आजवर प्रसिद्ध झालेल्या कथांमधील काही निवडक कथांचा हा पहिलाच संग्रह. आशय आणि अभिव्यक्तीदृष्ट्या ह्या कथा वेगळ्या असून, लेखकाची गंभीर जीवनदृष्टी आणि संपन्न जीवनानुभव प्रकट करणाया आहेत. कथात्मक वाङ्मयाच्या प्रदीर्घ परंपरेचे भान जसे ह्या कथा बाळगतात, तसेच, लोककथेतील कथनवैशिष्ट्येही आत्मसात करून वाचकांसमोर येतात. ‘ढव्ह आणि लख्ख ऊन’, ‘रिवणावायली मुंगी’, ‘बाई’, ‘एक होता कावळा’ यांसारख्या कथा मराठीतील श्रेष्ठ कथांच्या पंगतीला बसण्याची क्षमता प्रकट करतात. विविधांगी वैशिष्ट्यपूर्णतेमुळे हा कथासंग्रह कथावाङ्मयात मोलाची भर घालेल, याची खात्री वाटते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAJANGAVAS #DEVDASI# JOGTIN# DEV #YALLUBAI #SULI #SUBANA #BAYAJA #PARADI #LIMB #JAT #BABANYA #SHEWANTAKKA #LAGNA #MELA #NAVAS #HITNI #DONGAR #BHANDARBHOG #RIVANAVAYALIMUNGI #CHOUNDAKA #AAPANMANSATJAMANAHI
Customer Reviews
  • Rating StarB Poorva

    #पुस्तक_ओळख #आपण_माणसात_जमा_नाही #रिवणावायली_मुंगी #राजन_गवस कधी कधी काही काही पुस्तकं फार उशिराच हातात पडली असं वाटतं, त्यातलीच ही दोन. आजवर जरी पुस्तकं वाचली तरी पुस्तक वाचताना आपण पुस्तक वाचत आहोत ही जाणीव मनाच्या तळाशी जिवंत असाची पण राजन गवस यांचे कथासंग्रह त्या अर्थाने मला वेगळेच भासले. त्याच्या कथा एखाद्या चित्रपटाप्रमाणे मनःपटलावर जिवंत होतात,स्मृतीत रेंगाळत राहतात. हे कथासंग्रह प्रत्येक मनाचे आहेत.स्त्री आत्ताची असो वा ऐंशी नव्वदीच्या काळातली असो ,तिची जीवनमूल्ये,तिची घुसमट ,तिची बदलत जाणारी दृष्टी हे जितकं राजन गवस यांनी अस्सल पणे मांडलं आहे तितकंच प्रभावीपणे बदलत्या गावगाड्यातल्या माणसाचे औद्योगिकरण बदलत जाणारे राहणीमान,पालटत जाणारे दोन पिढ्यातील अंतर त्यातून होणारी मानवी मनाची उलाघाल याचे अतिशय प्रभावी चित्रण या कथासंग्रहातून केले आहे.एकसंघतेतून विस्कळीत होत व्यवहारी आणि भोगवादी बनत गेलेली पिढी आणि त्यातून जुन्या संस्कारातील मानवी मनावर येणारा ताण अशा मानवी मनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर या कथा प्रकाश टाकतात. राजन गवस यांच्या कथा जितक्या श्रेष्ठ आहेत तितक्याच विविधांगी आहेत.वाचकाला चौकटीबाहेर विचार करायला लावून जीवनार्थाने समृद्ध करतात. -©पूर्वा बडवे ...Read more

  • Rating StarManasi Lad- Gudhate

    मनाला अत्यंत अस्वस्थ करून जाणार्‍या आणि अंतर्मुख करणार्‍या कथा. समाज म्हणून आपली लायकी काय? संस्कृती म्हणून ज्याला यथेच्छ मिरवावे त्याचे खरे रूप काय? नात्यांमधला जिव्हाळा वगैरे, धार्मिकतेचा आधार वगैरे, व्यभिचार आणि अनैकता वगैरे.... सगळ्या सगळ्याचीमूळ जातकुळी काय? सगळा निव्वळ चिखल आहे. फक्त अन्याय आहे. दडपणूक आहे. - सारे केवळ वाचल्याने अस्वस्थता येत नाही. खरी अस्वस्थता येते ती या भिववणार्‍या विचाराने की - ’हो. हाच माझा समाज आहे!’ आपल्याला आपले खरे स्वरूप समजत जाणे भयावह आहे! पण आवश्यकही आहेच. समाजरचनेच्या संपूर्ण डोलार्‍यात नि:शब्द गाडल्या गेलेल्या एका वेगळ्याच मानल्या जाव्या अश्या ’रिवणावायल्या’ व्यक्तिरेखांची गुदमरवणारी कथामालिका म्हणजे हा कथासंग्रह आहे! या कथा एका अंतापाशी पोचून संपत नाहीत. तशा तर त्या सुरूही एका निश्चित प्रसंगातून होत नाहीत. पण जे सारे आपल्या डोळ्यांसमोर मांडले जाते ते आपला सारा अनादी अनंत अवकाश व्यापून राहते. ...Read more

  • Rating Star‎Nitiraj Jagadale

    एक वेगळ्या धाटणीचा कथासंग्रह समाजातील भयानक वास्तवता मांडून याला तश्याच भयानक पद्धतीने प्रतिकार करताना कथानायकांची होणारी ससेहोलपट त्यांची मानसिकता अंतरंगाचे विविध पदर उलघडनारे राजन सर खरोखर ग्रेट आहेत आता ठरवलंय संपूर्ण राजन गवस वाचायचेच.....

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 10-02-2002

    शोषणाविरुद्ध बंड करणाऱ्या स्त्रियांची कहाणी... ज्याच्या नावावर ‘चौंडक’, ‘भंडारभोग’, ‘धिंगाणा’, ‘कळप’ नावाच्या कादंबऱ्या जमा आहेत ज्याला ‘तणकट’ कादंबरीसाठी नुकताच ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार मिळालाय आणि जो महाराष्ट्र फाउंडेशनने पुरस्कृत केलेल्या ‘बोल’च्या प्रकल्पावर सध्या काम करतोय तो लेखक म्हणजे डॉ. राजन गवस! १९८० नंतर मराठी साहित्य क्षेत्रात ज्यांनी कथासंग्रह वाङ्मयातील इतर (विशेषत: कादंबरी) प्रकार हाताळायला सुरुवात करत आपलं नाव वाचकांसमोर आणलं त्या गवस यांचा एक निवडक कथांचा संग्रह ‘रिवणावायली मुंगी’ संग्रहात एकूण १३ कथा आहेत. या कथासंबंधी आणि एकूणच आपल्या लिखाणासंबंधी गवस म्हणतात, ‘रिवणावायली मुंगी’ या संग्रहातील स्त्रिया शोषणविरुद्ध बंड करणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज काढणाऱ्या आहेत याचं कारण वास्तवातील बदल हेच आहे. खेड्यापाड्यातल्या मुली शिकू लागल्या, परंपरेच्या चौकटीने जाच सैल होत गेले, विविध चळवळी, शहरांशी येणारा संपर्क यामुळे वातावरण बदलत गेलं. त्यामुळे परिस्थतीच्या रेट्यातून बदललेल्या वास्तव स्त्रीचं या कथांमधून येते. ती लेखकिय मनातील नाही हे निश्चित.’’ तर १९७५ पासून डॉ. गवस हे देवदासी चळवळीचा तसा सहप्रवासी चळवळीतला हा कार्यकर्ता आणि अनेक वृत्ती-प्रवृत्तींची माणसं जवळून पाहत अनुभवांती लिखाण करणारा हा लेखक जेव्हा स्त्रीविषयक लिखाण करतो तेव्हा तिची व्यथा, तिची जगण्याची धडपड आणि तिचा तो एकूणच अन्यायाविरुद्धचा लढा हा मनाला खूप भिडतो. ‘रिवणावायली मुंगी’ ही कथा बघूया. २५ वर्षांची ती दहावी झालेली मुलगी जेव्हा आपल्या जातीबांधवांसाठी परिवर्तनवादी चळवळीत आपणहून उतरते आणि मनापासून त्यात काम करते तेव्हा सुरुवातीला ती चळवळ, ते कार्यकर्ते आणि एकूणच ती ‘बंडखोरी’ भावते, पण त्यातील भंपकपणा जेव्हा तिला जाणवतो तेव्हा ती पुन्हा ‘घरा’ का परतते. निमूटपणे परिस्थितीला/चालीरितींना ‘शरण’ जाते. लग्न करते. सुखी संसाराचं स्वप्न पाहू लागते. पण नवरा जेव्हा बाहेरख्यालीपणा करत तिला ‘दासी’ ठरवू पाहतो तेव्हा ती त्याला भर बाजारात ‘उघडं’ करते आणि आपल्यातली ‘कार्यकर्ती’ अजूनही जिवंत आहे हे दाखवून देते बंडखोरी करते. ‘बाई’ ही कथा नवऱ्याने फसवल्यामुळे धंद्याला लागलेली आणि दोन माणसांनी (एकाचवेळी) ठेचलेल्या एका कमळी नावाच्या बार्इंची. कुठेही गेलं तरी बाईला शेवटी उपभोग्य वस्तू म्हणूनच गणलं जातं आणि त्याच एका नजरेनं बघत वागवलं जातं याचं ज्ञान जेव्हा कमळीला होतं तेव्हा ज्यांनी ज्यांनी आपल्याला फसवलं त्यांचा संसार कशाला उधळायचा, असा सुज्ञ विचार करत ती पुढे निघते. ‘ह्याला जीवन ऐसे नाव’ म्हणत आहे त्याचं समाधान मानत ‘कुणाच्या तरी वळचणीला जगू’ म्हणते. संग्रहातील ती बंडखोर मुलगी म्हणा, कमळा म्हणा वा इतर स्त्रिया म्हणा त्या जेव्हा अन्यायाविरुद्ध बंड करून उठतात. परिस्थितीचं भान राखत जेव्हा आवाज उठवतात वा आहे त्या परिस्थितीशी सामना करत स्वत:चं अस्तित्व दाखवून देतात, तेव्हा त्याचं ‘अस्तित्व’ त्याचं वागणं/बोलणं, त्यांचं ‘बंड’ हे मनाला भावून जातं. त्यामुळे लेखक म्हणतो त्याप्रमाणे ‘परिस्थितीच्या रेट्यातून बदललेली वास्तव स्त्रीचं या कथांमधून समोर येते. संग्रहात ‘एक होता कावळा’ नामक वेगळ्या विषयावरची एक कथा आहे. हौदात पडलेल्या एका कावळ्याला एक शाळामास्तर बाहेर काढतो. पुढे त्या कावळ्याला बाकीचे कावळे टोचा मारून हैराण करतात. पुरता ठार मारतात. ‘कावळा माणसावर डूक धरतो का हो?’ ही शंका मनात धरून बसलेल्या त्या मास्तरामागे पुढे कावळ्यांची जमात लागते. ते कावळे त्याला पार सतावून सोडतात. मास्तरांसह सर्व घर ‘कावळेमय’ होत चिडतं. मास्तराची अन्नावरची वासना उडते. इकडे शाळेतील मुलांना कावळ्यांचा त्रास होईल. ही शंका बोलून दाखवत पालक, शिक्षक त्यांना रजा घ्यायला, घरी बसायला सांगतात. मास्तर घरी बसतो. पुढे तो तापाने फणफणतो. अख्खं घर अस्वस्थ होतं. शेवटी तो गावी जातो. मास्तराची आई त्याला बरं करते आणि ‘जा रं शाळेला, कुठला कावळा येतोय बघतो. म्हणत धीर देते आणि त्यानंतर कावळे त्रास देणं सोडतात. ‘एक होता कावळा’ प्रमाणेच एका राजकारणी कावळ्याची गोष्ट आहे ती ‘दादा कोतोलीकर’ नामक कथेत. संग्रहातील ‘संप, ‘झळ’, ‘उचकी’, ‘ढव्ह आणि लख्ख ऊन’ या कथादेखील उल्लेखनीय आहेत. लेखक ज्या सीमाभागालगत राहतो, ज्या परिसरात कन्नड-मराठी मिश्रित बोली बोलली जाते आणि जिथल्या प्रथा परंपरा तसेच ‘गाव उचापती’ लेखकाला अस्सलपणे ज्ञात आहेत, त्यातलं मर्म त्याला कळलंय त्या सर्व गोष्टींचा ‘ठसा’ या कथांवर व्यवस्थितरित्या उमटलाय. तर माणसामाणसातील संबंध, संघर्ष, ताणतणाव, जगण्याची जीवघेणी धडपड आणि स्त्रियांची शोषणविरुद्ध ‘बंड’ करून उठण्याची, लढा देण्याची प्रवृत्ती याचं समग्रदर्शन या ‘रिवणावायली मुंगी’ कथासंग्रहात घडतं. -चंद्रा जळगावकर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more