* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KSHITIJSPARSH
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662771
  • Edition : 4
  • Publishing Year : NOVEMBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TOUCH OF THE HORIZON THIS COLLECTION IS THE LATTER HALF OF V. S. KHANDEKAR`S METEORS. THE HARMONIOUS WEAVING OF NATURE AND HUMAN LIFE IS THE CHARACTERISTIC FEATURE OF A METEOR. THESE METEORS WILL OVERPOWER THE READERS WITH THEIR TECHNIQUE AND UNDERSTANDING. THEY WILL ENGULF THE READERS IN THEIR ARTISTIC THOUGHTS. EVERY SINGLE WORD IN THIS METEOR MIRRORS THE UNIVERSAL HOLY GATHERING. THEY ALL HAVE THE CAPACITY TO TOUCH THE HORIZONS OF HUMAN AUSPICIOUSNESS. EACH POSSESSES THOUSAND IMPULSES. EACH IS WILLING TO TOUCH THE HUMAN MORALS. EVERY SINGLE METEOR EVOKES THE ARDOUR TO LIVE, EVERY SINGLE METEOR EXPLAINS THE LIVING OF A HUMAN BEING AND EVERY METEOR IS ITSELF A"MAHAMANTRA` TO MULTIPLY THE ANXIETY FOR LIVING LIFE.
‘क्षितिजस्पर्श’ हा वि. स. खांडेकरांच्या रूपककथांचा उत्तररंग. निसर्ग नि मनुष्यजीवनाची सुंदर बांधणी हे रूपककथेचं आपलं असं वैशिष्ट्य असतं. खांडेकरीय रूपककथांचं तंत्र नि मंत्रप्रौढत्व घेऊन येणाया या कथा वाचकांना आपले विचार नि कलात्मकतेनं दिङ्गमूढ करतात. साया सृष्टीचं सुमंगल संमेलन प्रतिबिंबित करणाऱ्या या कथांत मानवी मांगल्याचं क्षितिज स्पर्शण्याच्या शतशत ऊर्मी शब्दागणिक प्रत्ययास येतात. माणसाचं जगणं समजावीत वाचकांत जगण्याची आस्था जागविणाऱ्या या कथा म्हणजे जीवन विकासाचा महामंत्रच!

No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #क्षितिजस्पर्श
Customer Reviews
  • Rating StarDAINIK NAVARASHTA - JANUARY 2018

    हस्तिदंती छोटा ताजमहाल... मराठी साहित्य क्षेत्रात असे अनेक साहित्यिक होऊन गेले ज्यांच्या लेखणीतून सकार झालेल्या साहित्यकृतींनी मराठी भाषेचे वैभव वाढविले. आपल्या या मराठी भाषेमध्ये शब्दरूपी रत्नांची खाण उधळून देणारे जे अनेक साहित्यिक आहेत त्यात वि. स खांडेकर यांचे नाव आदराने घेतले जाते. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे खांडेकर हे स्वत: एक मोठे शब्दांचे विद्यापीठ होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी प्रत्येक साहित्य प्रकारात विपूल लेखन केले आहे. वि. स. खांडेकर यांच्या रूपककथांचा ‘क्षितिजस्पर्श’ हा संग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. एका मोठ्या साहित्यिकाच्या लेखनाची समीक्षा करण्याचा आजच्या लेखाचा हेतू नाही. तर जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे... इतकाच या लेखाचा हेतू. क्षितिजस्पर्श या पुस्तकात खांडेकर यांच्या पूर्वी विविध ठिकाणी प्रकाशित झालेल्या निवडक ४६ रूपककथांचा समावेश आहे. यातल्या अनेक कथा तर खूप छोट्या-छोट्या आहेत. पण आजही त्या वाचकाला खूप मोठा अर्थ समजावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. उदाहरणार्थ – खांडेकर यांची दोन प्रवासी की रूपककथा यात दोन प्रवासी अमावस्येच्या रात्री निर्जन मार्गाने चालले आहेत. यात पहिला प्रवासी तरुण आहे तर दुसरा प्रवासी वृद्ध आहे. तरुणाला आशा, स्वप्ने, प्रीती आणि यौवन वेगाने पुढे नेत होती. तो गीत गुणगुणत चालला आहे. तर वृद्ध प्रवासी निराशा, स्वप्नभंग, एकलेपण आणि वार्धक्य यांच्या भाराने वाकून तो ओणवा झाला होता. तो कण्हत इतकी मंद पावले टाकीत होता की, तो पुढे जात आहे की नाही हेच कळत नव्हते. पहिला तरुण एकदम थांबतो आणि मागे वळून म्हणतो की, ‘‘किती सुंदर मार्ग आहे. हा! नाही? जिकडंतिकडं चांदण्याच चांदण्या.’ मागे राहिलेला वृद्ध प्रवासी त्याला उत्तर देताना म्हणतो की, काय भयंकर रस्ता हा. जिथंतिथं काटेकुटें आणि खाचखळगे!’’ इथे ही कथा संपते. याच्यातून तुम्ही काय घ्यायचे आणि काय समजायचे हा निर्णय वाचकावर सोडलेला असतो. आता या कथेमधून निघाणारे अर्थ शोधायचे झाल्यास माणसाच्या दृष्टिकोनातला फरक ही कथा आपल्याला सांगते- हा झाला एक अर्थ. तर दुसरीकडे तारुण्य आणि वार्धक्य यावरही ही कथा भाष्य करते. ऐन उमेदीचा काळ आणि दुसरी मरणासन्न अवस्था जिथे जगण्याचा आधारच उरलेला नाही. कमी पण प्रभावी अशा शब्दांत वि. स. खांडेकर यांच्या रूपककथा आपल्याला खूप काही सांगून जातात. फक्त ते शब्दांच्या पलीकडले समजून घेण्याची वाचकाची वृत्ती हवी. खांडेकर एक उत्कृष्ट लेखक होते याचे दाखले आपल्याला त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीतून मिळत राहतात. नदी, चंद्र, इंद्रधनुष्य, सूर्य, समुद्र इत्यादी निसर्गप्रतिमांचे सुंदर वर्णन आणि शब्दांचा अचूक वापर करत एखादा प्रसंग सुंदर पद्धतीने लोकांसमोर मांडणे किंवा उभा करणे ही कला प्रत्येक लेखकाने शिकण्यासारखी आहे. रूपककथांना खांडेकर ‘हस्तिदंती छोटा ताजमहल’ का म्हणत असतील हे या पुस्तकावरून कळते. -साधना दीपक राजवाडकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 14-09-2003

    अंतर्मुख करणाऱ्या रूपक कथा... रूपक कथा हा काहीस दुर्लक्षित पण महत्त्वाचा साहित्यप्रकार आहे. मराठी साहित्यात या प्रकारात फार मोठे लेखन झालेले नाही. रूपक कथाकार असे स्वतंत्र बिरूद कोणी लेखक मिरवत नाही. लघुत्तम कथेच्या प्रकारासारखा हा लेखनप्रकार आहे. परा. प्र. ना. कवठेकर याला ‘ध्वनिकथा’ म्हणतात. रूपक कथा ध्वनिकथा जरूर आहेत. ध्वनी व ध्वन्यर्थ हे त्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. अल्पाक्षरत्व हेही महत्त्वाचे लक्षण आहे. विष्णू शर्मा, इसाप, खलील जिब्रान, चॉसर, स्पेन्सर इत्यादींची परंपरा त्याला आहे. वि.स. खांडेकर यांचे वर्णन ‘हस्तिदंती छोटा ताजमहाल’ असे करतात. त्यांचा ४६ रूपक कथांचा संग्रह क्षितिजस्पर्श या नावाने डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी प्रकाशझोत केला आहे. प्रत्येक रूपक कथा हा खांडेकरांना घडलेला साक्षात्कार आहे. खांडेकरांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्शवाद त्यांच्या बहुतेक लेखनांतून स्पष्ट झालेला आहे. मानवी जीवनाचा मागोवा घेताना ते जीवनाचा अर्थ, नैतिक भूमिका, सामाजिक मूल्य, आध्यात्मिक अनुभव हे त्यांच्या चिंतनाचे विषय मानतात. त्यांच्या ‘ययाती’ या कादंबरीत हे चिंतन स्पष्ट आणि विस्तृत स्वरूपात प्रकट झाले. मला वाटते या कादंबरी लेखनाच्या पूर्वी त्यांनी हे सर्व चिंतन रूपक कथात प्रकट करण्याचा, सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ययाति’ हे या सर्व चिंतनाचे सार आणि उच्च बिंदू म्हटले तर ते वावगे न ठरावे. रूपक कथात जीवनाचा अनेक अंगावरचा, मानवी विचारांचा आलेख स्फूट स्वरूपात प्रकट होतो. समाज जीवनातील विविध आंदोलने आणि त्यात प्रकट होणाऱ्या मानवी कृती यांचा खोल विचार रूपक कथांतून ध्वनित होतो. प्रत्यक्ष उपदेश करणे किंवा प्रवचन देणे यापेक्षा ते ध्वनित केले तर त्याचा खोल ठसा मानवी मनावर उमटेल असे खांडेकरांना वाटले असावे. बहुतेक रूपक कथांचा विषय मानवी जीवनमूल्यांचा विचार ध्वनित करण्याचा आहे. त्यासाठी त्यांना सृष्टीतील कुठलीही सजीव वा निर्जिव वस्तू वर्ज्य नाही. दगडधोंडे, पशुपक्षी, झाडे, देव, दैव वा नियती, परमेश्वरसुद्धा त्यांच्या रूपक कथेत येतो. त्यांचा परमेश्वरावर फारसा विश्वास नसला तरी ‘श्रीकृष्ण’ त्यांच्या रूपक कथेत येतो. नारदमुनी, कुबेर यांसारख्या देवता येतात. पण सर्वांतून आशय प्रकट होतो तो मानवी जीवनाच्या चिंतनातून काढलेल्या नवनीताचा. एक छोटीशी रूपक कथा गगनाला गवसणी घालणारा आशय सूचित करते. खांडेकरांच्या भाषेचा विचार केला तर त्यांच्या उत्तुंग कल्पना, उपमा अलंकार यांनी अलंकृत होत जाणारी कथा हा एक अमोल ठेवा आहे. संपादन करताना लवटे यांनी खूप परिश्रम घेतले आहेत याचा प्रत्यय येतो. संशोधकांच्या वृत्तीने त्यांनी या कथा संपादन केल्या आहेत. खांडेकरांच्या एकूणच रूपक कथांचा आढावा घेत घेत त्यांनी अप्रसिद्ध अशा रूपक कथांना वाचकांसामोर आणले आहे. त्यांच्या कथांतून सूर्याला सल्ला देणाऱ्या घड्याळाचेही कौतुक वाटू लागते. तर बुद्ध, खिस्त, गांधी आज आले आणि त्यांनी आजचा समाज पाहिला तर काय होईल, त्यांना काय वाटेल, याची कल्पना अंतर्मुख करणारी आहे. प्रत्येक रूपक कथेचा ध्वनित आशय स्पष्ट करीत बसण्यापेक्षा त्या वाचकांनी प्रत्यक्षच वाचाव्यात. या ध्वनिकथांचा आशय स्पष्ट करण्यास विस्तृतच लिहावे लागेल. केवळ या रूपक कथा कालानुक्रमाने लावल्या तर खांडेकरांच्या मनात काय वादळे उठत होती याचा मागोवा घेता येईल. ते काम मोठ्या संशोधनाचे आहे. आहेत त्या क्रमाने जरी त्या कथा वाचल्या तरी त्यातूनही खांडेकर अखेर अखेर कसे अस्वस्थ होत होते याचे दर्शन होईल. सामाजिक मूल्ये ढासळताना आपण अगतिक आहोत याची जाणीव येथे सूचित होते. मानवी मंगळ ढासळत आहेत असे त्यांच्या अनेक कथांतून सूचित होते. यावेळी ते निराशावादी होतात की काय, अशी शंकाही येते. पण या रूपक कथा आपल्याला अंतर्मुख करतात हे नाकारता येणार नाही. ‘क्षितिजस्पर्शा’बरोबरच खांडेकरांच्या इतर रूपककथा वाचण्यास हे पुस्तक प्रवृत्त करेल. -डॉ. रोहिणी टकले ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more