* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KSHITIJSPARSH
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662771
  • Edition : 4
  • Publishing Year : NOVEMBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TOUCH OF THE HORIZON THIS COLLECTION IS THE LATTER HALF OF V. S. KHANDEKAR`S METEORS. THE HARMONIOUS WEAVING OF NATURE AND HUMAN LIFE IS THE CHARACTERISTIC FEATURE OF A METEOR. THESE METEORS WILL OVERPOWER THE READERS WITH THEIR TECHNIQUE AND UNDERSTANDING. THEY WILL ENGULF THE READERS IN THEIR ARTISTIC THOUGHTS. EVERY SINGLE WORD IN THIS METEOR MIRRORS THE UNIVERSAL HOLY GATHERING. THEY ALL HAVE THE CAPACITY TO TOUCH THE HORIZONS OF HUMAN AUSPICIOUSNESS. EACH POSSESSES THOUSAND IMPULSES. EACH IS WILLING TO TOUCH THE HUMAN MORALS. EVERY SINGLE METEOR EVOKES THE ARDOUR TO LIVE, EVERY SINGLE METEOR EXPLAINS THE LIVING OF A HUMAN BEING AND EVERY METEOR IS ITSELF A"MAHAMANTRA` TO MULTIPLY THE ANXIETY FOR LIVING LIFE.
‘क्षितिजस्पर्श’ हा वि. स. खांडेकरांच्या रूपककथांचा उत्तररंग. निसर्ग नि मनुष्यजीवनाची सुंदर बांधणी हे रूपककथेचं आपलं असं वैशिष्ट्य असतं. खांडेकरीय रूपककथांचं तंत्र नि मंत्रप्रौढत्व घेऊन येणाया या कथा वाचकांना आपले विचार नि कलात्मकतेनं दिङ्गमूढ करतात. साया सृष्टीचं सुमंगल संमेलन प्रतिबिंबित करणाया या कथांत मानवी मांगल्याचं क्षितिज स्पर्शण्याच्या शतशत ऊर्मी शब्दागणिक प्रत्ययास येतात. माणसाचं जगणं समजावीत वाचकांत जगण्याची आस्था जागविणाया या कथा म्हणजे जीवन विकासाचा महामंत्रच!

No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #क्षितिजस्पर्श
Customer Reviews
  • Rating StarDAINIK NAVARASHTA - JANUARY 2018

    हस्तिदंती छोटा ताजमहाल... मराठी साहित्य क्षेत्रात असे अनेक साहित्यिक होऊन गेले ज्यांच्या लेखणीतून सकार झालेल्या साहित्यकृतींनी मराठी भाषेचे वैभव वाढविले. आपल्या या मराठी भाषेमध्ये शब्दरूपी रत्नांची खाण उधळून देणारे जे अनेक साहित्यिक आहेत त्यात वि. स खांडेकर यांचे नाव आदराने घेतले जाते. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे खांडेकर हे स्वत: एक मोठे शब्दांचे विद्यापीठ होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी प्रत्येक साहित्य प्रकारात विपूल लेखन केले आहे. वि. स. खांडेकर यांच्या रूपककथांचा ‘क्षितिजस्पर्श’ हा संग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. एका मोठ्या साहित्यिकाच्या लेखनाची समीक्षा करण्याचा आजच्या लेखाचा हेतू नाही. तर जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे... इतकाच या लेखाचा हेतू. क्षितिजस्पर्श या पुस्तकात खांडेकर यांच्या पूर्वी विविध ठिकाणी प्रकाशित झालेल्या निवडक ४६ रूपककथांचा समावेश आहे. यातल्या अनेक कथा तर खूप छोट्या-छोट्या आहेत. पण आजही त्या वाचकाला खूप मोठा अर्थ समजावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. उदाहरणार्थ – खांडेकर यांची दोन प्रवासी की रूपककथा यात दोन प्रवासी अमावस्येच्या रात्री निर्जन मार्गाने चालले आहेत. यात पहिला प्रवासी तरुण आहे तर दुसरा प्रवासी वृद्ध आहे. तरुणाला आशा, स्वप्ने, प्रीती आणि यौवन वेगाने पुढे नेत होती. तो गीत गुणगुणत चालला आहे. तर वृद्ध प्रवासी निराशा, स्वप्नभंग, एकलेपण आणि वार्धक्य यांच्या भाराने वाकून तो ओणवा झाला होता. तो कण्हत इतकी मंद पावले टाकीत होता की, तो पुढे जात आहे की नाही हेच कळत नव्हते. पहिला तरुण एकदम थांबतो आणि मागे वळून म्हणतो की, ‘‘किती सुंदर मार्ग आहे. हा! नाही? जिकडंतिकडं चांदण्याच चांदण्या.’ मागे राहिलेला वृद्ध प्रवासी त्याला उत्तर देताना म्हणतो की, काय भयंकर रस्ता हा. जिथंतिथं काटेकुटें आणि खाचखळगे!’’ इथे ही कथा संपते. याच्यातून तुम्ही काय घ्यायचे आणि काय समजायचे हा निर्णय वाचकावर सोडलेला असतो. आता या कथेमधून निघाणारे अर्थ शोधायचे झाल्यास माणसाच्या दृष्टिकोनातला फरक ही कथा आपल्याला सांगते- हा झाला एक अर्थ. तर दुसरीकडे तारुण्य आणि वार्धक्य यावरही ही कथा भाष्य करते. ऐन उमेदीचा काळ आणि दुसरी मरणासन्न अवस्था जिथे जगण्याचा आधारच उरलेला नाही. कमी पण प्रभावी अशा शब्दांत वि. स. खांडेकर यांच्या रूपककथा आपल्याला खूप काही सांगून जातात. फक्त ते शब्दांच्या पलीकडले समजून घेण्याची वाचकाची वृत्ती हवी. खांडेकर एक उत्कृष्ट लेखक होते याचे दाखले आपल्याला त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीतून मिळत राहतात. नदी, चंद्र, इंद्रधनुष्य, सूर्य, समुद्र इत्यादी निसर्गप्रतिमांचे सुंदर वर्णन आणि शब्दांचा अचूक वापर करत एखादा प्रसंग सुंदर पद्धतीने लोकांसमोर मांडणे किंवा उभा करणे ही कला प्रत्येक लेखकाने शिकण्यासारखी आहे. रूपककथांना खांडेकर ‘हस्तिदंती छोटा ताजमहल’ का म्हणत असतील हे या पुस्तकावरून कळते. -साधना दीपक राजवाडकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 14-09-2003

    अंतर्मुख करणाऱ्या रूपक कथा... रूपक कथा हा काहीस दुर्लक्षित पण महत्त्वाचा साहित्यप्रकार आहे. मराठी साहित्यात या प्रकारात फार मोठे लेखन झालेले नाही. रूपक कथाकार असे स्वतंत्र बिरूद कोणी लेखक मिरवत नाही. लघुत्तम कथेच्या प्रकारासारखा हा लेखनप्रकार आहे. परा. प्र. ना. कवठेकर याला ‘ध्वनिकथा’ म्हणतात. रूपक कथा ध्वनिकथा जरूर आहेत. ध्वनी व ध्वन्यर्थ हे त्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. अल्पाक्षरत्व हेही महत्त्वाचे लक्षण आहे. विष्णू शर्मा, इसाप, खलील जिब्रान, चॉसर, स्पेन्सर इत्यादींची परंपरा त्याला आहे. वि.स. खांडेकर यांचे वर्णन ‘हस्तिदंती छोटा ताजमहाल’ असे करतात. त्यांचा ४६ रूपक कथांचा संग्रह क्षितिजस्पर्श या नावाने डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी प्रकाशझोत केला आहे. प्रत्येक रूपक कथा हा खांडेकरांना घडलेला साक्षात्कार आहे. खांडेकरांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्शवाद त्यांच्या बहुतेक लेखनांतून स्पष्ट झालेला आहे. मानवी जीवनाचा मागोवा घेताना ते जीवनाचा अर्थ, नैतिक भूमिका, सामाजिक मूल्य, आध्यात्मिक अनुभव हे त्यांच्या चिंतनाचे विषय मानतात. त्यांच्या ‘ययाती’ या कादंबरीत हे चिंतन स्पष्ट आणि विस्तृत स्वरूपात प्रकट झाले. मला वाटते या कादंबरी लेखनाच्या पूर्वी त्यांनी हे सर्व चिंतन रूपक कथात प्रकट करण्याचा, सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ययाति’ हे या सर्व चिंतनाचे सार आणि उच्च बिंदू म्हटले तर ते वावगे न ठरावे. रूपक कथात जीवनाचा अनेक अंगावरचा, मानवी विचारांचा आलेख स्फूट स्वरूपात प्रकट होतो. समाज जीवनातील विविध आंदोलने आणि त्यात प्रकट होणाऱ्या मानवी कृती यांचा खोल विचार रूपक कथांतून ध्वनित होतो. प्रत्यक्ष उपदेश करणे किंवा प्रवचन देणे यापेक्षा ते ध्वनित केले तर त्याचा खोल ठसा मानवी मनावर उमटेल असे खांडेकरांना वाटले असावे. बहुतेक रूपक कथांचा विषय मानवी जीवनमूल्यांचा विचार ध्वनित करण्याचा आहे. त्यासाठी त्यांना सृष्टीतील कुठलीही सजीव वा निर्जिव वस्तू वर्ज्य नाही. दगडधोंडे, पशुपक्षी, झाडे, देव, दैव वा नियती, परमेश्वरसुद्धा त्यांच्या रूपक कथेत येतो. त्यांचा परमेश्वरावर फारसा विश्वास नसला तरी ‘श्रीकृष्ण’ त्यांच्या रूपक कथेत येतो. नारदमुनी, कुबेर यांसारख्या देवता येतात. पण सर्वांतून आशय प्रकट होतो तो मानवी जीवनाच्या चिंतनातून काढलेल्या नवनीताचा. एक छोटीशी रूपक कथा गगनाला गवसणी घालणारा आशय सूचित करते. खांडेकरांच्या भाषेचा विचार केला तर त्यांच्या उत्तुंग कल्पना, उपमा अलंकार यांनी अलंकृत होत जाणारी कथा हा एक अमोल ठेवा आहे. संपादन करताना लवटे यांनी खूप परिश्रम घेतले आहेत याचा प्रत्यय येतो. संशोधकांच्या वृत्तीने त्यांनी या कथा संपादन केल्या आहेत. खांडेकरांच्या एकूणच रूपक कथांचा आढावा घेत घेत त्यांनी अप्रसिद्ध अशा रूपक कथांना वाचकांसामोर आणले आहे. त्यांच्या कथांतून सूर्याला सल्ला देणाऱ्या घड्याळाचेही कौतुक वाटू लागते. तर बुद्ध, खिस्त, गांधी आज आले आणि त्यांनी आजचा समाज पाहिला तर काय होईल, त्यांना काय वाटेल, याची कल्पना अंतर्मुख करणारी आहे. प्रत्येक रूपक कथेचा ध्वनित आशय स्पष्ट करीत बसण्यापेक्षा त्या वाचकांनी प्रत्यक्षच वाचाव्यात. या ध्वनिकथांचा आशय स्पष्ट करण्यास विस्तृतच लिहावे लागेल. केवळ या रूपक कथा कालानुक्रमाने लावल्या तर खांडेकरांच्या मनात काय वादळे उठत होती याचा मागोवा घेता येईल. ते काम मोठ्या संशोधनाचे आहे. आहेत त्या क्रमाने जरी त्या कथा वाचल्या तरी त्यातूनही खांडेकर अखेर अखेर कसे अस्वस्थ होत होते याचे दर्शन होईल. सामाजिक मूल्ये ढासळताना आपण अगतिक आहोत याची जाणीव येथे सूचित होते. मानवी मंगळ ढासळत आहेत असे त्यांच्या अनेक कथांतून सूचित होते. यावेळी ते निराशावादी होतात की काय, अशी शंकाही येते. पण या रूपक कथा आपल्याला अंतर्मुख करतात हे नाकारता येणार नाही. ‘क्षितिजस्पर्शा’बरोबरच खांडेकरांच्या इतर रूपककथा वाचण्यास हे पुस्तक प्रवृत्त करेल. -डॉ. रोहिणी टकले ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more