* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GEETANJALI
  • Availability : Available
  • Translators : AMITA GOSAVI
  • ISBN : 9788184984088
  • Edition : 5
  • Publishing Year : AUGUST 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :RAVINDRANATH TAGORE COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GEETANJALI IS A BOOK OF POEMS WRITTEN BY THE OBEL LAUREATE, RABINDRANATH TAGORE. THIS BOOK CONTAINS THE TRANSLATED VERSIONS OF 103 BENGALI POEMS WRITTEN BY THE FAMOUS POET. IT WAS PUBLISHED ORIGINALLY IN THE YEAR 1910, IN BENGALI. THE ENGLISH VERSION OF THE BOOK WAS FIRST PUBLISHED IN THE YEAR 1912. RABINDRANATH TAGORE BECAME THE FIRST NONEUROPEAN TO WIN THE NOBEL PRIZE FOR LITERATURE, THANKS TO GEETANJALI. THE WORD GEETANJALI DIRECTLY TRANSLATES TO ‘SONG OFFERINGS’, AND THE POEMS IN THE BOOK HAVE MANY METAPHYSICAL ELEMENTS. THESE POEMS EVEN REFER TO A UNION WITH THE ‘SUPREME BEING’. RABINDRANATH TAGORE’S POEMS REFLECT HIS VIEWS ON LIFE AND SPIRITUALITY, AND TALK ABOUT THE MYSTERY, MELANCHOLY, AND COLOR SURROUNDING EVERYDAY LIFE. RABINDRANATH TAGORE WAS BORN ON MAY 7, 1861. TAGORE WAS A NOVELIST, POET, ESSAYIST, WRITER, PLAYWRIGHT, SONG COMPOSER, AND PAINTER. HE IS WIDELY KNOWN FOR CHANGING THE FACE OF BENGALI AND INDIAN LITERATURE AND MUSIC THROUGH HIS WORKS. TAGORE IS ONE OF THE MOST ESTEEMED RENAISSANCE FIGURES OF INDIA AND WAS RESPONSIBLE FOR PUTTING INDIA ON THE LITERARY MAP WITH HIS AWARDWINNING WRITING. HE WAS ALSO WIDELY ACCLAIMED AS A POLITICAL, RELIGIOUS, AND SOCIAL THINKER AND INNOVATOR, DUE TO HIS WORK THROUGH SANTINIKETAN AND VISWABHARATI. HIS OTHER FAMOUS WORKS INCLUDE THE HOME AND THE WORLD, THE POST OFFICE, CHOKHER BALI, KABULIWALA, GORA, THE GARDENER, AND THE LAST POEM.
हे छोटंस फूल पटकन खुडून घे, विलंब करू नकोस! अन्यथा ते कोमेजून जमिनीवर धुळीत पडेल, अशी मला भीती वाटते. त्याला तुझ्या गळ्यातील हारात जागा मिळाली नाही तरी चालेल; पण तुझ्या हाताने खुडून घेताना होणाऱ्या वेदनेने बहुमानितकर आणि खुडून घे. मी सावध होण्याआधी बघताबघता दिवस ढळेल आणि तुझ्या अर्चनेसाठी अर्पण होण्याची वेळ निघून जाईल, अशी मला भीती वाटते. ह्या फुलाचा रंग जरासा उडालेला असला आणि गंध मंद झाला असला, तरी त्याला तुझ्या पूजेत सहभागी व्हायची संधी दे. वेळेतच त्याला खुडून घे.
THE NOBEL PRIZE IN LITERATURE 1913
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAVINDRANATHTAGORE#MEDHATASKAR #POSTMASTER #MRUNALINIGADKARI #AMITAGOSAVI #NILIMABHAVE #NASHTANEED #GEETANJALI # BAUTHAKURANEERHAAT #KABULIVALAANI ITARKATHA #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOK #MARATHIBOOKS
Customer Reviews
  • Rating StarDilip Shete

    "गीतांजली " विसाव्या शतकातील राष्ट्रभक्तीचे जाज्वल्य स्वाभिमानी रूप आणि राष्ट्रगीताचे आद्य प्रवर्तक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची नोबेल विजेती काव्यरचना म्हणजे गीतांजली... काव्याचे मनोहारी विभ्रम पद्यरूप अनोख्या आणि मोजक्या शब्दात गुंफून मुक्तंदात घडवलेले शब्द सौष्ठवतेच सौन्दर्यदर्शन म्हणजे गीतांजली... समस्त मानवजातीला `मी कोण आहे` या अनादी काळापासून सतावणाऱ्या प्रश्नाला अगदी अचूक उत्तर म्हणजे गीतांजली... जोपर्यंत हा अनाहत नाद आपल्या स्वमध्ये घुमत नाही, तोपर्यंत याचे उत्तर आपल्याला भेटत नाही कारण मी जो आहे तोच, जसा आहे अगदी तसाच आणि जितका आहे तितकाच स्वीकारन्यात काहीही न्यूनगंड नाही हा सत्याभास आपल्याला प्रथम गुरुदेवांनी गीतांजलीतुन दिला .. 🙏🙏🙏🙏 ब्रिटिशांनी एक तृतीयांश जगावर राज्य केले पण प्लेटोच्या रूपात ग्रीकांनी दिलेलं तत्वज्ञान म्हणजेच सौन्दर्यवाद आणि भारताचा गुरुदेवांनी दिलेला अध्यात्मवाद सगळ्यांना पुरून उरले आहे असं म्हणायला काही हरकत नाही... जिथे सार्त्रचा अस्तित्ववाद, कामूचा निरर्थकवाद आणि काफाचा शून्यवाद जन्मालाही आला नव्हता तिथे गुरुदेव या सर्व इझमच्या पूर्वसंध्येला खाली दिलेल्या एकाच ओळीतून वरील सर्व इझमचे दर्शन घडवतात हा माझा वैयक्तिक अभिप्राय 🙏🙏 `हे छोटंसं फुल पटकन खुडून घे विलंब करू नकोस, अन्यथा ते कोमेजून जाईल, याची मला भीती वाटते.... अशा जादुई ओळींच्या नगरीत आपली आनंदयात्रा सफल होवो अशी आशा... 👏👏 ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 26-01-2013

    जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कविता... १९२०च्या दशतकात भारतात दोन थोर व्यक्ती होऊन गेल्या. एक महात्मा गांधी आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. टागोरांनी स्वत:ला नेहमीच कवी म्हणवून घेतले असले तरी ते एक महान साहित्यिक होते. १९१३ सालचे आशियातील पहिले नोबल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ उत्तम कवी, गीतकार, कादंबरीकार, कथाकार, संगीतकार, नाटककार, चित्रकार, नट, निबंध लेखक आणि समीक्षक होते. चोखेरन बाली, गोरा, घरेबाहर या त्यांच्या कादंबऱ्या आजही जनमानसात उच्च स्थान मिळवून आहेत. त्यांच्या काव्याप्रमाणेच त्यांच्या कथा हे बंगाली साहित्याचेच नव्हे, तर भारतीय साहित्याचे अमूल्य धन आहे. काबुलीवाला, समाप्ती नष्ट नीड वा त्यांच्या काही गाजलेल्या कथा. त्यांनी आपल्या कथांतून माणसाच्या मनाचा वेध घेतला, स्त्री मनाच्या अनेक कंगोऱ्यांचे दर्शन घडविले. सबल स्त्रीची प्रतिमा समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. माणूस केंद्रस्थानी असलेल्या या कथा त्याकाळी आधुनिक बंगाली कथेचा पाया ठरल्या आणि त्या आजही तेवढ्याच ताज्या, टवटवीत वाटतात, कालातीत ठरतात. टागोर यांच्या गीतांजलीचा भावानुवाद करणाऱ्या लेखिका डॉ. अमिता गोसावी आपल्या मनोगतामध्ये म्हणतात. भारतात पहिल्यांदाच साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवून देणाऱ्या थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांचा गीतांजली हा काव्यसंग्रह वाचण्याची आणि त्यातील सौंदर्य जाणून घेण्याची फार दिवसांपासून इच्छा होती. बंगाली भाषा अवगत नसल्यामुळे काव्याचा रसस्वाद घेणे अशक्यच होते पण अचानक एक दिवस रवींद्रनाथांनी स्वत:च गीतांजलीचा बंगालीतून इंग्रजीत केलेला पद्य अनुवाद वाचण्यात आला. सुरुवातीला अनेकदा वाचूनही त्यातला नेमका अर्थ उलगडला नाही. पण हळूहळू पुनर्वाचनानंतर रवींद्रनाथांना नेमके काय म्हणायचे आहे. ते ध्यानात येऊ लागले आणि वाचनातील गोडी वाढली. रवींद्रनाथांचे भाषेवरील प्रभुत्व परमेश्वराच्या भेटीची अनिवार्य ओढ. एका बाजूला मृत्यूबद्दलची भीती, तिरस्कार तर दुसरीकडे त्याची प्राप्तीची तळमळ, स्वत:च्या उणिवांची आणि मलिनतेची जाणीव अंत:करण शुचिर्तेची उत्कट इच्छा, कुठलेही अवजड अलंकार, उपमा, अत्प्रेक्षा न वापरता निसर्गात आढळणाऱ्या चंद्र, सूर्य, तारे, आकाश, प्रकाश, भरती-आहोटी यासारख्या प्रतिमांचा समर्पक वापर करून सहजपणे सांगितलेले जीवनविषयक शून्य व तत्त्वज्ञान या सर्वच गोष्टी थक्क करणाऱ्या होत्या. एके ठिकाणी कवी म्हणतो, -हे छोटंसं फूल पटकन खुडून घे. विलंब करू नकोस! अन्यथा ते कोमेजून जमिनीवर पुढीत पडेल, अशी मला भीती वाटते. त्याला तुझ्या गळ्यातील हारात जागा मिळाली नाही. तरी चालेल, पण तुझ्या हाताने खुडून घेताना होणाऱ्या वेदनेने बहुमानित कर आणि खुडून घे. मी सावध होण्याआधी बघता बघता दिवस ढळेल आणि तुझ्या अर्चनेसाठी अर्पण होण्याची वेळ निघून जाईल. अशी मला भीती वाटते. या फुलाचा रंग जरासा उडालेला असला आणि गंध मंद झाला असला, तरी त्याला तुझ्या पूजेत सहभागी व्हायची संधी दे वेळेतच त्याला खुडून घे. दुसऱ्या एका कवितेत मृत्यूचे स्वरुप विशद करताना कवीने म्हटलं आहे. मला माझी नौका घेऊन निघालेच पाहिजे. किनाऱ्यावर सुस्तावलेला दिवस माझ्यासाठीच दीर्घकाळ रेंगाळला आहे. फुलांना बहर आणून वसंत ऋतूने निरोप घेतला आहे आणि आता पाकळ्या गढणाऱ्या रंग उडालेल्या फुलांचे निरोपयोगी ओझे घेऊन मी रेंगाळत वाट बघतो आहे. लाटा उचंबळायला लागल्या आहेत आणि पलीकडे किनाऱ्यालगत सावली देणाऱ्या वृक्षांची जीर्ण पिवळी पाने पटापट गळू लागली आहेत. तू कुठल्या शून्यात नजर लावून बसला आहेस? पैलतीरावरून धान्याच्या झुळकीबरोबर येणारी दूरवरच्या गाण्याची लकेर तुला जाणवत नाही का? ऐकू येत नाही का? अशी ही भावपूर्ण गीतांजली टागोर स्वत: एक उत्तम चित्रकार आणि संगीतकार असल्यामुळे कुंचल्याने रेखाटलेल्या चित्रासारखे काव्यांतून नादमय शब्द चित्र आपल्या डोळयांसमोर उभे करण्याची त्याची हातोटी केवळ अवर्णनीय! लेखिकेला जे सौंदर्य ... ते मराठीत अनुभवण्यासाठी कलेला हा सुरेख भावानुवाद इंग्रजी न जाणणाऱ्या वाचकांना रवींद्रनाथांची प्रतिमा उलगडून दाखविण्याचा केलेला हा सुंदर प्रयास. -डॉ. शैलजा गायकवाड ...Read more

  • Rating StarDAINIK LOKPRABHA

    रविंद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाचा मराठी भावानुवाद डॉ. अमिता गोसावी यांनी केला असून ते गीतांजली या पुस्तकाच्या रुपात मराठी वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. देशाला प्रथमच साहित्यातील नोबेल मिळवून देणाऱ्या त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाा मराठी भावानुवाद उत्तम साधला आहे. या काव्यसंग्रहातून हळुवार कवी, नितळ मनाचा माणूस उलगडतो. आशा निराशेवर हिंदकळणारं मन या कवितांमधून प्रकट होतं. समर्पक शब्दांमध्ये मांडलेले जीवन तत्वज्ञान, सहज सुलभ भावाविष्कार वैशिष्ट्यांसह टागोरांची कविता व्यक्त होते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more