* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GEETANJALI
  • Availability : Available
  • Translators : AMITA GOSAVI
  • ISBN : 9788184984088
  • Edition : 6
  • Publishing Year : AUGUST 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :RAVINDRANATH TAGORE COMBO SET - 7 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GEETANJALI IS A BOOK OF POEMS WRITTEN BY THE OBEL LAUREATE, RABINDRANATH TAGORE. THIS BOOK CONTAINS THE TRANSLATED VERSIONS OF 103 BENGALI POEMS WRITTEN BY THE FAMOUS POET. IT WAS PUBLISHED ORIGINALLY IN THE YEAR 1910, IN BENGALI. THE ENGLISH VERSION OF THE BOOK WAS FIRST PUBLISHED IN THE YEAR 1912. RABINDRANATH TAGORE BECAME THE FIRST NONEUROPEAN TO WIN THE NOBEL PRIZE FOR LITERATURE, THANKS TO GEETANJALI. THE WORD GEETANJALI DIRECTLY TRANSLATES TO ‘SONG OFFERINGS’, AND THE POEMS IN THE BOOK HAVE MANY METAPHYSICAL ELEMENTS. THESE POEMS EVEN REFER TO A UNION WITH THE ‘SUPREME BEING’. RABINDRANATH TAGORE’S POEMS REFLECT HIS VIEWS ON LIFE AND SPIRITUALITY, AND TALK ABOUT THE MYSTERY, MELANCHOLY, AND COLOR SURROUNDING EVERYDAY LIFE. RABINDRANATH TAGORE WAS BORN ON MAY 7, 1861. TAGORE WAS A NOVELIST, POET, ESSAYIST, WRITER, PLAYWRIGHT, SONG COMPOSER, AND PAINTER. HE IS WIDELY KNOWN FOR CHANGING THE FACE OF BENGALI AND INDIAN LITERATURE AND MUSIC THROUGH HIS WORKS. TAGORE IS ONE OF THE MOST ESTEEMED RENAISSANCE FIGURES OF INDIA AND WAS RESPONSIBLE FOR PUTTING INDIA ON THE LITERARY MAP WITH HIS AWARDWINNING WRITING. HE WAS ALSO WIDELY ACCLAIMED AS A POLITICAL, RELIGIOUS, AND SOCIAL THINKER AND INNOVATOR, DUE TO HIS WORK THROUGH SANTINIKETAN AND VISWABHARATI. HIS OTHER FAMOUS WORKS INCLUDE THE HOME AND THE WORLD, THE POST OFFICE, CHOKHER BALI, KABULIWALA, GORA, THE GARDENER, AND THE LAST POEM.
हे छोटंस फूल पटकन खुडून घे, विलंब करू नकोस! अन्यथा ते कोमेजून जमिनीवर धुळीत पडेल, अशी मला भीती वाटते. त्याला तुझ्या गळ्यातील हारात जागा मिळाली नाही तरी चालेल; पण तुझ्या हाताने खुडून घेताना होणाऱ्या वेदनेने बहुमानितकर आणि खुडून घे. मी सावध होण्याआधी बघताबघता दिवस ढळेल आणि तुझ्या अर्चनेसाठी अर्पण होण्याची वेळ निघून जाईल, अशी मला भीती वाटते. ह्या फुलाचा रंग जरासा उडालेला असला आणि गंध मंद झाला असला, तरी त्याला तुझ्या पूजेत सहभागी व्हायची संधी दे. वेळेतच त्याला खुडून घे.
THE NOBEL PRIZE IN LITERATURE 1913
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAVINDRANATHTAGORE#MEDHATASKAR #POSTMASTER #MRUNALINIGADKARI #AMITAGOSAVI #NILIMABHAVE #NASHTANEED #GEETANJALI # BAUTHAKURANEERHAAT #KABULIVALAANI ITARKATHA #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOK #MARATHIBOOKS
Customer Reviews
  • Rating StarDilip Shete

    "गीतांजली " विसाव्या शतकातील राष्ट्रभक्तीचे जाज्वल्य स्वाभिमानी रूप आणि राष्ट्रगीताचे आद्य प्रवर्तक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची नोबेल विजेती काव्यरचना म्हणजे गीतांजली... काव्याचे मनोहारी विभ्रम पद्यरूप अनोख्या आणि मोजक्या शब्दात गुंफून मुक्तंदात घडवलेले शब्द सौष्ठवतेच सौन्दर्यदर्शन म्हणजे गीतांजली... समस्त मानवजातीला `मी कोण आहे` या अनादी काळापासून सतावणाऱ्या प्रश्नाला अगदी अचूक उत्तर म्हणजे गीतांजली... जोपर्यंत हा अनाहत नाद आपल्या स्वमध्ये घुमत नाही, तोपर्यंत याचे उत्तर आपल्याला भेटत नाही कारण मी जो आहे तोच, जसा आहे अगदी तसाच आणि जितका आहे तितकाच स्वीकारन्यात काहीही न्यूनगंड नाही हा सत्याभास आपल्याला प्रथम गुरुदेवांनी गीतांजलीतुन दिला .. 🙏🙏🙏🙏 ब्रिटिशांनी एक तृतीयांश जगावर राज्य केले पण प्लेटोच्या रूपात ग्रीकांनी दिलेलं तत्वज्ञान म्हणजेच सौन्दर्यवाद आणि भारताचा गुरुदेवांनी दिलेला अध्यात्मवाद सगळ्यांना पुरून उरले आहे असं म्हणायला काही हरकत नाही... जिथे सार्त्रचा अस्तित्ववाद, कामूचा निरर्थकवाद आणि काफाचा शून्यवाद जन्मालाही आला नव्हता तिथे गुरुदेव या सर्व इझमच्या पूर्वसंध्येला खाली दिलेल्या एकाच ओळीतून वरील सर्व इझमचे दर्शन घडवतात हा माझा वैयक्तिक अभिप्राय 🙏🙏 `हे छोटंसं फुल पटकन खुडून घे विलंब करू नकोस, अन्यथा ते कोमेजून जाईल, याची मला भीती वाटते.... अशा जादुई ओळींच्या नगरीत आपली आनंदयात्रा सफल होवो अशी आशा... 👏👏 ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 26-01-2013

    जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कविता... १९२०च्या दशतकात भारतात दोन थोर व्यक्ती होऊन गेल्या. एक महात्मा गांधी आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. टागोरांनी स्वत:ला नेहमीच कवी म्हणवून घेतले असले तरी ते एक महान साहित्यिक होते. १९१३ सालचे आशियातील पहिले नोबल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ उत्तम कवी, गीतकार, कादंबरीकार, कथाकार, संगीतकार, नाटककार, चित्रकार, नट, निबंध लेखक आणि समीक्षक होते. चोखेरन बाली, गोरा, घरेबाहर या त्यांच्या कादंबऱ्या आजही जनमानसात उच्च स्थान मिळवून आहेत. त्यांच्या काव्याप्रमाणेच त्यांच्या कथा हे बंगाली साहित्याचेच नव्हे, तर भारतीय साहित्याचे अमूल्य धन आहे. काबुलीवाला, समाप्ती नष्ट नीड वा त्यांच्या काही गाजलेल्या कथा. त्यांनी आपल्या कथांतून माणसाच्या मनाचा वेध घेतला, स्त्री मनाच्या अनेक कंगोऱ्यांचे दर्शन घडविले. सबल स्त्रीची प्रतिमा समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. माणूस केंद्रस्थानी असलेल्या या कथा त्याकाळी आधुनिक बंगाली कथेचा पाया ठरल्या आणि त्या आजही तेवढ्याच ताज्या, टवटवीत वाटतात, कालातीत ठरतात. टागोर यांच्या गीतांजलीचा भावानुवाद करणाऱ्या लेखिका डॉ. अमिता गोसावी आपल्या मनोगतामध्ये म्हणतात. भारतात पहिल्यांदाच साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवून देणाऱ्या थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांचा गीतांजली हा काव्यसंग्रह वाचण्याची आणि त्यातील सौंदर्य जाणून घेण्याची फार दिवसांपासून इच्छा होती. बंगाली भाषा अवगत नसल्यामुळे काव्याचा रसस्वाद घेणे अशक्यच होते पण अचानक एक दिवस रवींद्रनाथांनी स्वत:च गीतांजलीचा बंगालीतून इंग्रजीत केलेला पद्य अनुवाद वाचण्यात आला. सुरुवातीला अनेकदा वाचूनही त्यातला नेमका अर्थ उलगडला नाही. पण हळूहळू पुनर्वाचनानंतर रवींद्रनाथांना नेमके काय म्हणायचे आहे. ते ध्यानात येऊ लागले आणि वाचनातील गोडी वाढली. रवींद्रनाथांचे भाषेवरील प्रभुत्व परमेश्वराच्या भेटीची अनिवार्य ओढ. एका बाजूला मृत्यूबद्दलची भीती, तिरस्कार तर दुसरीकडे त्याची प्राप्तीची तळमळ, स्वत:च्या उणिवांची आणि मलिनतेची जाणीव अंत:करण शुचिर्तेची उत्कट इच्छा, कुठलेही अवजड अलंकार, उपमा, अत्प्रेक्षा न वापरता निसर्गात आढळणाऱ्या चंद्र, सूर्य, तारे, आकाश, प्रकाश, भरती-आहोटी यासारख्या प्रतिमांचा समर्पक वापर करून सहजपणे सांगितलेले जीवनविषयक शून्य व तत्त्वज्ञान या सर्वच गोष्टी थक्क करणाऱ्या होत्या. एके ठिकाणी कवी म्हणतो, -हे छोटंसं फूल पटकन खुडून घे. विलंब करू नकोस! अन्यथा ते कोमेजून जमिनीवर पुढीत पडेल, अशी मला भीती वाटते. त्याला तुझ्या गळ्यातील हारात जागा मिळाली नाही. तरी चालेल, पण तुझ्या हाताने खुडून घेताना होणाऱ्या वेदनेने बहुमानित कर आणि खुडून घे. मी सावध होण्याआधी बघता बघता दिवस ढळेल आणि तुझ्या अर्चनेसाठी अर्पण होण्याची वेळ निघून जाईल. अशी मला भीती वाटते. या फुलाचा रंग जरासा उडालेला असला आणि गंध मंद झाला असला, तरी त्याला तुझ्या पूजेत सहभागी व्हायची संधी दे वेळेतच त्याला खुडून घे. दुसऱ्या एका कवितेत मृत्यूचे स्वरुप विशद करताना कवीने म्हटलं आहे. मला माझी नौका घेऊन निघालेच पाहिजे. किनाऱ्यावर सुस्तावलेला दिवस माझ्यासाठीच दीर्घकाळ रेंगाळला आहे. फुलांना बहर आणून वसंत ऋतूने निरोप घेतला आहे आणि आता पाकळ्या गढणाऱ्या रंग उडालेल्या फुलांचे निरोपयोगी ओझे घेऊन मी रेंगाळत वाट बघतो आहे. लाटा उचंबळायला लागल्या आहेत आणि पलीकडे किनाऱ्यालगत सावली देणाऱ्या वृक्षांची जीर्ण पिवळी पाने पटापट गळू लागली आहेत. तू कुठल्या शून्यात नजर लावून बसला आहेस? पैलतीरावरून धान्याच्या झुळकीबरोबर येणारी दूरवरच्या गाण्याची लकेर तुला जाणवत नाही का? ऐकू येत नाही का? अशी ही भावपूर्ण गीतांजली टागोर स्वत: एक उत्तम चित्रकार आणि संगीतकार असल्यामुळे कुंचल्याने रेखाटलेल्या चित्रासारखे काव्यांतून नादमय शब्द चित्र आपल्या डोळयांसमोर उभे करण्याची त्याची हातोटी केवळ अवर्णनीय! लेखिकेला जे सौंदर्य ... ते मराठीत अनुभवण्यासाठी कलेला हा सुरेख भावानुवाद इंग्रजी न जाणणाऱ्या वाचकांना रवींद्रनाथांची प्रतिमा उलगडून दाखविण्याचा केलेला हा सुंदर प्रयास. -डॉ. शैलजा गायकवाड ...Read more

  • Rating StarDAINIK LOKPRABHA

    रविंद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाचा मराठी भावानुवाद डॉ. अमिता गोसावी यांनी केला असून ते गीतांजली या पुस्तकाच्या रुपात मराठी वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. देशाला प्रथमच साहित्यातील नोबेल मिळवून देणाऱ्या त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाा मराठी भावानुवाद उत्तम साधला आहे. या काव्यसंग्रहातून हळुवार कवी, नितळ मनाचा माणूस उलगडतो. आशा निराशेवर हिंदकळणारं मन या कवितांमधून प्रकट होतं. समर्पक शब्दांमध्ये मांडलेले जीवन तत्वज्ञान, सहज सुलभ भावाविष्कार वैशिष्ट्यांसह टागोरांची कविता व्यक्त होते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more