* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PAHILE PREM
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663761
  • Edition : 25
  • Publishing Year : JANUARY 1940
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : FANTASY, EROTIC, ROMANCE, SAGAS, CLASSIC
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
T OF THE PEOPLE LEAD VERY SIMPLE LIFE WITHOUT MUCH UPS AND DOWNS. THEY ARE COMMON MEN. THE NEWSPAPER IS LEAST INTERESTED IN DESCRIBING SUCH COMMON MEN. THE CREATIVE LITERATURE HARDLY TAKES NOTICE OF THESE COMMON MEN. THE MOST WRITTEN ABOUT TOPICS OF SUCH LITERATURE ARE USUALLY WARS, EARTHQUAKES, STORMS... SOME OR OTHER SORT OF NATURAL OR MANMADE CALAMITIES. THIS IS THE HYPOTHESIS OF ROBERT LIND. THOUGH IT HAS EXCEPTIONS, THE LOVE THAT IS DESCRIBED IN LITERATURE FOLLOWS IT. IN TRUE LIFE, WE WISH TO HAVE SMOOTH LIVING WITH UNBINDING LOVE EVERWHERE. LOVE WITH ITS FLOWERY TOUCH, FEATHERY APPEARANCE. BUT IN NOVELS, LOVE ALWAYS SUFFERS. IT IS MORE HURTING THAN HEALING AND WE AS READERS GO FOR IT. IN REALITY, THERE ARE NEITHER THORNS, NOR FLOWERS LAID IN THE PATH. THERE ARE ONLY STONES ON THE PATH OF LOVE. THESE STONES PRICK OUR FEET, HURT THEM, MAKE THEM BLEED. THEY GIVE US PAIN THEY MAKE US CRY. AT THE VERY MOMENT, FROM SOMEWHERE COMES A BREEZE COOLING US, HEALING US, SOOTHING US. THE FUNNIEST PART IS WITHOUT NOTICING ITS EFFECTS THE BREEZE MOVES FORWARD COOL AND TO HEAL SOMEONE ELSE.
नाकासमोर जाणाया सरळ, साध्या माणसाच्या जीवनक्रमाचे चित्रण जसे तुम्हाला वृत्तपत्रात आढळणार नाही, तसेच ते ललितवाङ्मयातही प्रामुख्याने प्रतिबिंबित होणार नाही. मानवी जीवनातली युद्धे, भूकंप आणि वादळे हे असल्या वाङ्मयाचे मुख्य विषय असतात. रॉबर्ट लिंडचा हा सिद्धांत निरपवाद नसला, तरी वाङ्मयातल्याच प्रीतीच्या चित्रणाच्या बाबतीत ते बव्हंशी सत्य आहे. प्रत्यक्ष आयुष्यात प्रीतीच्या मार्गावर पारिजातकाची पुष्पे पसरलेली असावीत, असे आपण म्हणत असतो. पण गमतीची गोष्ट ही, की वाङ्मयात मात्र मार्गावरल्या काट्याकुट्यांनी पदोपदी रक्तबंबाळ होणारी प्रीतीची मूर्तीच आपल्याला अधिक मनोहर वाटते; आणि शेवटी मनुष्याला जगात जो अनुभव येतो, त्यात फुलेही नसतात आणि काटेही नसतात. सामान्य मनुष्याच्या प्रीतिमार्गावर फक्त खडे असतात. ते त्याला मधून मधून चांगलेच बोचतात. त्या दु:खाने प्रसंगी तो अगदी रडकुंडीला येतो. पण त्याच वेळी कुठून तरी येणाNया शीतल वायुलहरी त्याचा शीण नाहीसा करून त्याला उल्हसित करीत असतात. तो पुन्हा शीळ घालीत पुढे चालू लागतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #पहिले प्रेम
Customer Reviews
  • Rating StarVijay Nimbalkar

    एकुलत्या लहान मुलाला घेऊन पत्नी दोन महिन्यांसाठी माहेरी जावी आणि आपलं पहिलं प्रेम, आपली प्रेयसी, आपल्या घरी राहायला यावी. असा प्रसंग स्वप्नात किंवा चित्रपटातच घडू शकतो. पण इथे करूणा खरोखरच देवदत्तच्या घरी राहायला येते. माझ्यासारख्या बॅरिस्टर होऊ ाहणाऱ्या शिवाय ज्याच्यावर आपलं खरं प्रेम आहे अशा तरुणाला नाकारून करूणाने एका ड्रॉइंग मास्तरशी का लग्न केलं असेल? देवदत्तला हा प्रश्न नेहमी पडत असे. करूणेने नाकारलं म्हणून देवदत्त एक सोज्वळ मुलगी पाहून तिच्याशी लग्न करतो व नव्या आयुष्याची सुरूवात करतो. देवदत्तची पत्नी इतकी चांगली असते की त्याला करुणेची कमतरता जाणवत नाही, पहिल्या प्रेमाची आठवण अधूनमधून येत असली तरी. आता आपला संसार सुखाचा चालला असताना अचानक करूणा तिच्या पतीला घेऊन देवदत्तच्या घरी येते काय, पतीशी भांडून त्याला तिथून एकटाच पुढे पाठवते काय, आणि देवदत्तची पत्नी असल्यासारखी त्याच्याच घरात राहते काय? सगळंच अजब! देवदत्त दिवसभर ऑफिसला जायचा आणि करूणा घरी थांबायची. त्या संध्याकाळी घरी आल्यावर तो करूणेला घेऊन समुद्रकिनारी जाऊन बसला. त्यांना त्यांचे प्रेमालापाचे जुने दिवस आठवू लागतात. करूणा वाळूवर काहीतरी लिहून पुसत असते. देवदत्त तिरप्या नजरेने तिकडे पाहतो तर करूणा पुसत असलेल्या शब्दांतील `दत्त` ही दोन अक्षरे त्याला स्पष्ट दिसतात. करूणेचं अजूनही देवदत्तवर प्रेम असतं. त्याच्याशी लग्न न करण्याच्या निर्णयाचा तिला पश्चाताप झालेला असतो. त्या रात्री दोघेही वेगवेगळ्या खोलीत झोपलेले असतात. अचानक देवदत्तला करूणेच्या खोलीतून पहिल्यांदा सुस्कारे सोडल्याचा, मग खाट वाजल्याचा व शेवटी त्या खोलीत करुणा येरझाऱ्या घालत असल्याचा आवाज येतो. याचा अर्थ काय? `करूणाऽ` त्या खोलीच्या दाराशी जाऊन देवदत्त आवाज देतो... ‘‘पहिलं प्रेम हा एक ज्वालामुखी आहे! तो शांत झालासा वाटला, तरी पुन्हा केव्हा पेटेल, याचा नेम नसतो!’’ - विजय निंबाळकर, लोहगाव - पुणे #विसखांडेकर #पहिलेप्रेम #मेहताप्रकाशन ...Read more

  • Rating StarSagar Dokhe

    आज पाहिले प्रेम ही कादंबरी वाचून झाली. खुपच अप्रतिम.

  • Rating StarRajesh Rankhamb

    वि.स.खांडेकर यांचा जन्म ११जानेवारी १८९८ साली झाला. मराठी साहित्य क्षेत्रात हे नाव आदराने घेतले जाते कथा,कादंबरी,काव्य, नाटक, निबंध, पटकथा, समीक्षा विनोद, व्यक्तिचित्रे अनुवाद अशा साहित्यप्रकारांत त्यांनी प्रचंड लेखन केले. त्यांच्या या साहित्यविषयक नंद घेऊन भारत सरकारने त्यांना 1968 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 1974 साली उत्कृष्ट भारतीय साहित्य साठी दिला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार खांडेकर यांना लाभला. तर अशा महान लेखकाचं पहिलं प्रेम आपण अनुभवणार आहोत. पहिलं प्रेम हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुखद घटना असते आणि त्याबद्दल आयुष्यभर मनात एक खास हळवा कोपरा प्रत्येकाने जपून ठेवलेला असतो. असं म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात एक ही असते आणि एक ती असते यातील ही म्हणजे पत्नी पण ती म्हणजे पहिलं प्रेम हेच पहिलं प्रेम खांडेकरांनी शब्दात उतरविण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी उत्तम साकारले.एखाद्या रोमॅण्टिक फिल्म ची सुरुवात होताना जशी कानात रोमॅण्टिक म्युझिक टोन वाजते आणि समोर सगळं गुलाबी गुलाबी म्युझिक दिसायला लागतं तसं काहीसं या पुस्तकात या पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहिल्यावर डोक्यात घोळू लागतं. अगदी झाडांच्या पानांचा आकारही पानचं वाटावी पण बदामाचा feel यावा असा ठेवलाय जेणेकरून वाचक पुस्तकाच्या प्रेमात पडतात. हे पुस्तक त्यांनी त्यांचे आवडते साहित्यिक केळकर आणि वा म जोशी यांना समर्पित केले.या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे मनोगत तब्बल 45 पानांच आहे हे मनोगत त्यांनी तीन भागांमध्ये विभागले आहे या तिन्ही विभागांमध्ये त्यांनी पहिल्या प्रेमाची बरीच उदाहरणे दिली आहेत अगदी पुराणकाळापासून आजच्या काळात चक्कल बसतील अशी अनेक उदाहरणे वाचकाला आपलीशी वाटतात. प्रत्येक जण ती आपल्याशी जुळू पाहतो आणि काही काळ आपल्या पहिल्या प्रेमाच्या गट स्मरणात जातो. त्यातही तिसरा भाग म्हणजे पार्श्वभूमी तीन विशेष आहे यामध्ये खांडेकरांनी त्यांना एका वाचकाने पाठवलेल्या पत्राचा नमुना दिला आहे या पत्रात सदर व्यक्तीने स्वतःच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी सांगून त्यावर मार्ग विचारलाय खांडेकरांनी सुद्धा त्यावर खुबीने उत्तर दिलेले आहे. दीर्घ प्रस्तावनेनंतर कथेला सुरुवात होते. कथा प्रामुख्याने देवदत्त करूना आणि बाबासाहेब अशा तीन व्यक्तिरेखांमधून फिरते. करूना ही देवदत्तचं पहिलं प्रेम पण त्यांचा लग्न काही होत नाही. दोघेही आपल्या संसारात असतात.एक दिवशी देवदत्तला करूनाच पत्र येते काही कामा निमित्त करून देवदत्त ज्या शहरात राहतो तेथे येणार असल्याने करुणा आणि तिचा नवरा तेथेच देवदत्त कडे राहायचे ठरवतात त्यामुळे देवदत्त आणि करुणा यांचे पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहते.त्याचबरोबर इतरही काही पात्रे कथेत येतात त्यापैकी काही घटना प्रसंग आणि पात्र म्हणजे प्रभाकर उच्च शिक्षणासाठी हॉस्टेलवर राहत असलेल्या तरुण मुलाचं सुलभा पंडित नावाच्या मुलीशी प्रेम संबंध असतात पण तिचे एका संस्थानच्या युवराज अशी लग्न झाल्याने ते वेगळे कसे होतात याचे उत्तम चित्रण लेखकाने केले आहे. सगळ्यात शेवटी या साऱ्यांचा उत्तम मेळ लेखकांनी सांधलाय.पात्र स्वातंत्र्य ठेवून शेवटी संबंध दाखवून कथा उलगडत नेण्याचं उत्तम कसक खांडेकर यांनी दाखवून दिले आहे. एकूणच पुस्तक हळूहळू वाचकाच्या मनावर पकड घेत.वाचकाला संपूर्ण आपल्यात आत्ममग्न व्हायला लावतो. याचा शेवट इंटरेस्ट वाढवत नेऊन साजेसा केलाय प्रत्येक व्यक्तिरेखा च्या दृष्टिकोनातून खांडेकर यांनी पहिल्या प्रेमाचा समाचार घेतलाय. पहिलं प्रेम हेच खरं प्रेम असं म्हणणार्‍या लोकांना पुस्तक बरच काही शिकवू पाहत थोडक्यात प्रेमाच्या बाबतीत थोडे हळवे आणि अधिक कमकुवत असलेल्यांनी पुस्तक जरूर वाचावे. ...Read more

  • Rating StarSiddhant Jain

    आज पाहिले प्रेम ही कादंबरी वाचून झाली.यात आकर्षण आणि प्रीती या दोन गोष्टीची कश्या परस्पराविरोधी आहे हे सांगितले आहे. आजच्या तरुण पिढीची प्रेमा बद्दलची भावना आणि जीवनातील सत्य यात किती अंतर आहे याचे विश्लेषण रोचक शब्दात मांडले आहे. आजच्या तरुण पिढीच्य मते पहिले प्रेम म्हणजे हेच खरे प्रेम -- ते विफल झाले तर अंतःकर्णाला जबर जखम होते. मग हा जखमी इसम जगरहाटीप्रमाणे लग्न करतो हे खरे. पण त्यामुळे त्याच्या जखमेच्या वेदना कमी होत नाही असे यांचे गैरसमज....... ऐन विशीत तरुनांच्या अंतःकरणात भावनेला अगदी सहज प्रवेश मिळतो. त्यात त्यांना कुठल्याही विचाराची अथवा भावनेची चिरफाड करणाऱ्या विचाराला जागा मिळत नाही. दाट धुक्यातून दगडधोंड्यानी भरलेला डोंगरसुद्धा सुंदर दिसू लागतो. जोराने येणारा पाऊसही यांना वेगळाच उन्मादक आनंद देऊन जातो पण त्यांना हे नाही माहीत की शारीरिक आकर्षणाचा पहिला वहिला उन्मादक अनुभव ज्या व्यक्तीमुळे आपल्याला मिळतो त्या व्यक्तीविषयी मनाला विलक्षण आसक्ती वाटणे हे नैसर्गिकच आहे; पण या आसक्तीमुळे नाविण्यामुळे आडवणारऱ्या अनुभवाचा भाग किती आणि जीवनाला पोषक अशा अनुभवाचा भाग किती याचे पृथक्करण करण्यात मात्र यांची गफलत होते. स्त्री पुरुष्यातल्या प्रीतीची पहिली पायरी शारीरिक आकर्षण हीच आहे हेच खरे! पण समाजातल्या भ्याड आणि ढोंगी संकेतांना बळी पडून,तिचे आस्तित्व तरुण पिढीने नाकारणे आणि पाहिले प्रेम हे चिरकाल टिकणाऱ्या भक्तीच्या स्वरूपाचे असते अशी तिने आपली समजूत करून घेणे या गोष्टी शेवटी अनिष्ट झाल्याशिवाय राहत नाही....... माझ्या मते मानवी मन हे स्वप्नाळू असावे म्हणूनच का स्वप्नाळू मनाला वास्तवापेक्षा अवास्तव अधिक आवडत असल्यामुळे, पडद्यावरील प्रेमकथांमधली कृत्रिमता आणि अस्वाभावीकता तरुणांना बोचक होत नाही. प्रेम आणि जीवन यांच्या परस्परसंबंधाकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतका संकुचित असून चालणार नाही.प्रेमभंग ही मूठभर हळव्या लोकांच्या बाबतीतच जबर जखम ठरते. पण तरुन शरीराची जखम केवढिही मोठी असली तरी भरून येते हे विसरुन चालणार नाही. ज्यांची प्रेमभंगाची जखम कधीच बरी होत नाही, अशी माणसे मुळीच सापडत नाही असे नाही. पण ती माणसे एकप्रकारच्या विकृतीने पछाडलेली असतात. आत्मनिष्ठतेच्या अतिरेकामुळे यांना विलक्षण यातना भोगाव्या लागतात. एक तर ही माणसे स्वतःचे आयुष्य संपवतात नाही तर या जखमेची सळ उराशी बाळगून आयुष्यभर कुढत बसतात....... गुलाबाच्या फुलाच्या दोन पाकळ्या गळून पडल्या, म्हणून काही त्याचा सुवास कमी होत नाही किंवा वेलिवर येणारी फुले खूप फुलतात. आपल्या सुगंधाने अवघा आसमंत दरवळून टाकतात पण तेच फुल गळून खाली पडले म्हणून काही त्या ठिकाणी दुसरे फुल येणार नाही असे नाही. तसेच पहिल्या प्रेमातल्या निराशेने माणूस उदास होईल. त्याच्या डोळ्यावरची काव्याची झापडही कमी होईल. पण एव्हढ्यामुळे त्याला पुन्हा प्रेम करावेसे वाटणार नाही. त्याने प्रेम केले तरी त्या प्रेमाला पहिल्या प्रेमाची सर येणार नाही या गोष्टी फक्त काव्यात आणि पडद्यावर शोभून दिसत असल्या तरी जीवनात त्यांना अवास्तव महत्व देण्यात काही अर्थ नाही. केशवसुतांनी सांगितल्या प्रमाणे प्रीती ही जिवणातील सर्वात मोठी संपत्ती आहे, यात शंका नाही. पण ज्याला आपण पाहिले प्रेम म्हणतो ते या प्रीतीतून फार भिन्न असते. पहिल्या प्रेमाचा आत्मा सौंदर्य आहे, पण जीवनाला उजळणाऱ्या शांत प्रीतीचा उदय नुसता सौंदर्यातून होत नाही. त्या सौंदर्याला सामर्थ्याची नी साधुत्ववाची जोड लागते. त्रिवेणीसंगम एका क्षणात एका घटकेत किंबहुना एका वर्षातही होत नाही. तपेच्या तपे आयुष्याच्या खडतर मार्गाने एकमेकांच्या हातात हात घालून प्रवास करणाऱ्या आणि आपल्या हास्याने एकमेकांना धीर देणाऱ्या जोडप्यांच्या डोळ्यातच त्यांचा आढळ होतो! अशा प्रीतीच्या बाबतींत प्रेमभंगाची आपत्ती संभवतच नाही. मृत्यूलासुद्धा त्या दिव्य मूर्तीला हात लावण्याचा धीर होत नाही! यातील मला आवडलेले एक वाक्य म्हणजे वादळात ज्या होढ्या एकमेकींच्या जवळ येतात, मृत्यूच्या दारात ज्या होढ्यानां एकमेकिंचा आधार मिळतो, त्याचा आयुष्यभर एकत्र प्रवास करतात. थोडक्यात काय तर आकर्षण आणि प्रीती ही परस्परविरोधी भावना आहे हेच खरे! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more