- Vijay Nimbalkar
एकुलत्या लहान मुलाला घेऊन पत्नी दोन महिन्यांसाठी माहेरी जावी आणि आपलं पहिलं प्रेम, आपली प्रेयसी, आपल्या घरी राहायला यावी. असा प्रसंग स्वप्नात किंवा चित्रपटातच घडू शकतो. पण इथे करूणा खरोखरच देवदत्तच्या घरी राहायला येते.
माझ्यासारख्या बॅरिस्टर होऊ पाहणाऱ्या शिवाय ज्याच्यावर आपलं खरं प्रेम आहे अशा तरुणाला नाकारून करूणाने एका ड्रॉइंग मास्तरशी का लग्न केलं असेल? देवदत्तला हा प्रश्न नेहमी पडत असे.
करूणेने नाकारलं म्हणून देवदत्त एक सोज्वळ मुलगी पाहून तिच्याशी लग्न करतो व नव्या आयुष्याची सुरूवात करतो. देवदत्तची पत्नी इतकी चांगली असते की त्याला करुणेची कमतरता जाणवत नाही, पहिल्या प्रेमाची आठवण अधूनमधून येत असली तरी.
आता आपला संसार सुखाचा चालला असताना अचानक करूणा तिच्या पतीला घेऊन देवदत्तच्या घरी येते काय, पतीशी भांडून त्याला तिथून एकटाच पुढे पाठवते काय, आणि देवदत्तची पत्नी असल्यासारखी त्याच्याच घरात राहते काय? सगळंच अजब!
देवदत्त दिवसभर ऑफिसला जायचा आणि करूणा घरी थांबायची. त्या संध्याकाळी घरी आल्यावर तो करूणेला घेऊन समुद्रकिनारी जाऊन बसला. त्यांना त्यांचे प्रेमालापाचे जुने दिवस आठवू लागतात. करूणा वाळूवर काहीतरी लिहून पुसत असते. देवदत्त तिरप्या नजरेने तिकडे पाहतो तर करूणा पुसत असलेल्या शब्दांतील `दत्त` ही दोन अक्षरे त्याला स्पष्ट दिसतात.
करूणेचं अजूनही देवदत्तवर प्रेम असतं. त्याच्याशी लग्न न करण्याच्या निर्णयाचा तिला पश्चाताप झालेला असतो.
त्या रात्री दोघेही वेगवेगळ्या खोलीत झोपलेले असतात. अचानक देवदत्तला करूणेच्या खोलीतून पहिल्यांदा सुस्कारे सोडल्याचा, मग खाट वाजल्याचा व शेवटी त्या खोलीत करुणा येरझाऱ्या घालत असल्याचा आवाज येतो. याचा अर्थ काय?
`करूणाऽ` त्या खोलीच्या दाराशी जाऊन देवदत्त आवाज देतो...
‘‘पहिलं प्रेम हा एक ज्वालामुखी आहे! तो शांत झालासा वाटला, तरी पुन्हा केव्हा पेटेल, याचा नेम नसतो!’’
- विजय निंबाळकर, लोहगाव - पुणे
#विसखांडेकर #पहिलेप्रेम #मेहताप्रकाशन
- Sagar Dokhe
आज पाहिले प्रेम ही कादंबरी वाचून झाली. खुपच अप्रतिम.
- Rajesh Rankhamb
वि.स.खांडेकर यांचा जन्म ११जानेवारी १८९८ साली झाला. मराठी साहित्य क्षेत्रात हे नाव आदराने घेतले जाते कथा,कादंबरी,काव्य, नाटक, निबंध, पटकथा, समीक्षा विनोद, व्यक्तिचित्रे अनुवाद अशा साहित्यप्रकारांत त्यांनी प्रचंड लेखन केले.
त्यांच्या या साहित्यविषयक नोंद घेऊन भारत सरकारने त्यांना 1968 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 1974 साली उत्कृष्ट भारतीय साहित्य साठी दिला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार खांडेकर यांना लाभला. तर अशा महान लेखकाचं पहिलं प्रेम आपण अनुभवणार आहोत.
पहिलं प्रेम हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुखद घटना असते आणि त्याबद्दल आयुष्यभर मनात एक खास हळवा कोपरा प्रत्येकाने जपून ठेवलेला असतो. असं म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात एक ही असते आणि एक ती असते यातील ही म्हणजे पत्नी पण ती म्हणजे पहिलं प्रेम हेच पहिलं प्रेम खांडेकरांनी शब्दात उतरविण्याचा प्रयत्न केला आहे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी उत्तम साकारले.एखाद्या रोमॅण्टिक फिल्म ची सुरुवात होताना जशी कानात रोमॅण्टिक म्युझिक टोन वाजते आणि समोर सगळं गुलाबी गुलाबी म्युझिक दिसायला लागतं तसं काहीसं या पुस्तकात या पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहिल्यावर डोक्यात घोळू लागतं. अगदी झाडांच्या पानांचा आकारही पानचं वाटावी पण बदामाचा feel यावा असा ठेवलाय जेणेकरून वाचक पुस्तकाच्या प्रेमात पडतात.
हे पुस्तक त्यांनी त्यांचे आवडते साहित्यिक केळकर आणि वा म जोशी यांना समर्पित केले.या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे मनोगत तब्बल 45 पानांच आहे हे मनोगत त्यांनी तीन भागांमध्ये विभागले आहे या तिन्ही विभागांमध्ये त्यांनी पहिल्या प्रेमाची बरीच उदाहरणे दिली आहेत अगदी पुराणकाळापासून आजच्या काळात चक्कल बसतील अशी अनेक उदाहरणे वाचकाला आपलीशी वाटतात. प्रत्येक जण ती आपल्याशी जुळू पाहतो आणि काही काळ आपल्या पहिल्या प्रेमाच्या गट स्मरणात जातो. त्यातही तिसरा भाग म्हणजे पार्श्वभूमी तीन विशेष आहे यामध्ये खांडेकरांनी त्यांना एका वाचकाने पाठवलेल्या पत्राचा नमुना दिला आहे या पत्रात सदर व्यक्तीने स्वतःच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी सांगून त्यावर मार्ग विचारलाय खांडेकरांनी सुद्धा त्यावर खुबीने उत्तर दिलेले आहे.
दीर्घ प्रस्तावनेनंतर कथेला सुरुवात होते. कथा प्रामुख्याने देवदत्त करूना आणि बाबासाहेब अशा तीन व्यक्तिरेखांमधून फिरते. करूना ही देवदत्तचं पहिलं प्रेम पण त्यांचा लग्न काही होत नाही. दोघेही आपल्या संसारात असतात.एक दिवशी देवदत्तला करूनाच पत्र येते काही कामा निमित्त करून देवदत्त ज्या शहरात राहतो तेथे येणार असल्याने करुणा आणि तिचा नवरा तेथेच देवदत्त कडे राहायचे ठरवतात त्यामुळे देवदत्त आणि करुणा यांचे पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहते.त्याचबरोबर इतरही काही पात्रे कथेत येतात त्यापैकी काही घटना प्रसंग आणि पात्र म्हणजे प्रभाकर उच्च शिक्षणासाठी हॉस्टेलवर राहत असलेल्या तरुण मुलाचं सुलभा पंडित नावाच्या मुलीशी प्रेम संबंध असतात पण तिचे एका संस्थानच्या युवराज अशी लग्न झाल्याने ते वेगळे कसे होतात याचे उत्तम चित्रण लेखकाने केले आहे.
सगळ्यात शेवटी या साऱ्यांचा उत्तम मेळ लेखकांनी सांधलाय.पात्र स्वातंत्र्य ठेवून शेवटी संबंध दाखवून कथा उलगडत नेण्याचं उत्तम कसक खांडेकर यांनी दाखवून दिले आहे. एकूणच पुस्तक हळूहळू वाचकाच्या मनावर पकड घेत.वाचकाला संपूर्ण आपल्यात आत्ममग्न व्हायला लावतो. याचा शेवट इंटरेस्ट वाढवत नेऊन साजेसा केलाय प्रत्येक व्यक्तिरेखा च्या दृष्टिकोनातून खांडेकर यांनी पहिल्या प्रेमाचा समाचार घेतलाय.
पहिलं प्रेम हेच खरं प्रेम असं म्हणणार्या लोकांना पुस्तक बरच काही शिकवू पाहत थोडक्यात प्रेमाच्या बाबतीत थोडे हळवे आणि अधिक कमकुवत असलेल्यांनी पुस्तक जरूर वाचावे.
- Siddhant Jain
आज पाहिले प्रेम ही कादंबरी वाचून झाली.यात आकर्षण आणि प्रीती या दोन गोष्टीची कश्या परस्पराविरोधी आहे हे सांगितले आहे. आजच्या तरुण पिढीची प्रेमा बद्दलची भावना आणि जीवनातील सत्य यात किती अंतर आहे याचे विश्लेषण रोचक शब्दात मांडले आहे. आजच्या तरुण पिढीच्या मते पहिले प्रेम म्हणजे हेच खरे प्रेम -- ते विफल झाले तर अंतःकर्णाला जबर जखम होते. मग हा जखमी इसम जगरहाटीप्रमाणे लग्न करतो हे खरे. पण त्यामुळे त्याच्या जखमेच्या वेदना कमी होत नाही असे यांचे गैरसमज.......
ऐन विशीत तरुनांच्या अंतःकरणात भावनेला अगदी सहज प्रवेश मिळतो. त्यात त्यांना कुठल्याही विचाराची अथवा भावनेची चिरफाड करणाऱ्या विचाराला जागा मिळत नाही. दाट धुक्यातून दगडधोंड्यानी भरलेला डोंगरसुद्धा सुंदर दिसू लागतो. जोराने येणारा पाऊसही यांना वेगळाच उन्मादक आनंद देऊन जातो पण त्यांना हे नाही माहीत की शारीरिक आकर्षणाचा पहिला वहिला उन्मादक अनुभव ज्या व्यक्तीमुळे आपल्याला मिळतो त्या व्यक्तीविषयी मनाला विलक्षण आसक्ती वाटणे हे नैसर्गिकच आहे; पण या आसक्तीमुळे नाविण्यामुळे आडवणारऱ्या अनुभवाचा भाग किती आणि जीवनाला पोषक अशा अनुभवाचा भाग किती याचे पृथक्करण करण्यात मात्र यांची गफलत होते.
स्त्री पुरुष्यातल्या प्रीतीची पहिली पायरी शारीरिक आकर्षण हीच आहे हेच खरे! पण समाजातल्या भ्याड आणि ढोंगी संकेतांना बळी पडून,तिचे आस्तित्व तरुण पिढीने नाकारणे आणि पाहिले प्रेम हे चिरकाल टिकणाऱ्या भक्तीच्या स्वरूपाचे असते अशी तिने आपली समजूत करून घेणे या गोष्टी शेवटी अनिष्ट झाल्याशिवाय राहत नाही.......
माझ्या मते मानवी मन हे स्वप्नाळू असावे म्हणूनच का स्वप्नाळू मनाला वास्तवापेक्षा अवास्तव अधिक आवडत असल्यामुळे, पडद्यावरील प्रेमकथांमधली कृत्रिमता आणि अस्वाभावीकता तरुणांना बोचक होत नाही. प्रेम आणि जीवन यांच्या परस्परसंबंधाकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतका संकुचित असून चालणार नाही.प्रेमभंग ही मूठभर हळव्या लोकांच्या बाबतीतच जबर जखम ठरते. पण तरुन शरीराची जखम केवढिही मोठी असली तरी भरून येते हे विसरुन चालणार नाही. ज्यांची प्रेमभंगाची जखम कधीच बरी होत नाही, अशी माणसे मुळीच सापडत नाही असे नाही. पण ती माणसे एकप्रकारच्या विकृतीने पछाडलेली असतात. आत्मनिष्ठतेच्या अतिरेकामुळे यांना विलक्षण यातना भोगाव्या लागतात. एक तर ही माणसे स्वतःचे आयुष्य संपवतात नाही तर या जखमेची सळ उराशी बाळगून आयुष्यभर कुढत बसतात.......
गुलाबाच्या फुलाच्या दोन पाकळ्या गळून पडल्या, म्हणून काही त्याचा सुवास कमी होत नाही किंवा वेलिवर येणारी फुले खूप फुलतात. आपल्या सुगंधाने अवघा आसमंत दरवळून टाकतात पण तेच फुल गळून खाली पडले म्हणून काही त्या ठिकाणी दुसरे फुल येणार नाही असे नाही. तसेच पहिल्या प्रेमातल्या निराशेने माणूस उदास होईल. त्याच्या डोळ्यावरची काव्याची झापडही कमी होईल. पण एव्हढ्यामुळे त्याला पुन्हा प्रेम करावेसे वाटणार नाही. त्याने प्रेम केले तरी त्या प्रेमाला पहिल्या प्रेमाची सर येणार नाही या गोष्टी फक्त काव्यात आणि पडद्यावर शोभून दिसत असल्या तरी जीवनात त्यांना अवास्तव महत्व देण्यात काही अर्थ नाही.
केशवसुतांनी सांगितल्या प्रमाणे प्रीती ही जिवणातील सर्वात मोठी संपत्ती आहे, यात शंका नाही. पण ज्याला आपण पाहिले प्रेम म्हणतो ते या प्रीतीतून फार भिन्न असते. पहिल्या प्रेमाचा आत्मा सौंदर्य आहे, पण जीवनाला उजळणाऱ्या शांत प्रीतीचा उदय नुसता सौंदर्यातून होत नाही. त्या सौंदर्याला सामर्थ्याची नी साधुत्ववाची जोड लागते. त्रिवेणीसंगम एका क्षणात एका घटकेत किंबहुना एका वर्षातही होत नाही. तपेच्या तपे आयुष्याच्या खडतर मार्गाने एकमेकांच्या हातात हात घालून प्रवास करणाऱ्या आणि आपल्या हास्याने एकमेकांना धीर देणाऱ्या जोडप्यांच्या डोळ्यातच त्यांचा आढळ होतो! अशा प्रीतीच्या बाबतींत प्रेमभंगाची आपत्ती संभवतच नाही. मृत्यूलासुद्धा त्या दिव्य मूर्तीला हात लावण्याचा धीर होत नाही!
यातील मला आवडलेले एक वाक्य म्हणजे वादळात ज्या होढ्या एकमेकींच्या जवळ येतात, मृत्यूच्या दारात ज्या होढ्यानां एकमेकिंचा आधार मिळतो, त्याचा आयुष्यभर एकत्र प्रवास करतात. थोडक्यात काय तर आकर्षण आणि प्रीती ही परस्परविरोधी भावना आहे हेच खरे!
- Sanjay Karanje
प्रेम या विषयावर आवडलेलं साहित्य
- Niranjan Salaskar
फार सुंदर पुस्तक आहे
- Gautam Koranne
nice book . . .
- Vina Sawant
खरचं .. खुपचं सुंदर आहे हे पुस्तक .
- Vivek Chaugule
Me pan reading kel ahi khup chan ahi
- Digvijay Sulochana Yadaorao
खूपच Interesting आहे...😂😍😍😍
- Prashant Rahate
Khandekar ek lakh manus
- Madhav Limbajirao Gavhane
प्रेम म्हणजे भक्ती आणि भक्ती म्हणजे दुसऱ्यासाठी स्वतःला विसरण्याचा शक्ती..!
- Madhav Limbajirao Gavhane
खूप छान आहे
- Akshay Pawar
Mast aahe