* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SCHINDLERS LIST
  • Availability : Available
  • Translators : SANJAY DABKE
  • ISBN : 9788184980899
  • Edition : 3
  • Publishing Year : NOVEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 296
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
A STUNNING NOVEL BASED ON THE TRUE STORY OF HOW GERMAN WAR PROFITEER AND PRISON CAMP DIREKTOR OSKAR SCHINDLER CAME TO SAVE MORE JEWS FROM THE GAS CHAMBERS THAN ANY OTHER, SINGLE PERSON DURING WORLD WAR II. IN THIS MILESTONE OF HOLOCAUST LITERATURE, THOMAS KENEALLY USES THE ACTUAL TESTIMONY OF THE SCHINDLERJUDEN - SCHINDLER`S JEWS - TO BRILLIANTLY PORTRAY THE COURAGE AND CUNNING OF A GOOD MAN IN THE MIDST OF UNSPEAKABLE EVIL. "A MASTERFUL ACCOUNT OF THE GROWTH OF THE HUMAN SOUL."-LOS ANGELES TIMES BOOK REVIEW "AN EXTRAORDINARY TALE...NO SUMMARY CAN ADEQUATELY CONVEY THE STRATAGEMS AND REVERSES AND SUDDEN TWISTS OF FORTUNE. A NOTABLE ACHIEVEMENT." -THE NEW YORK REVIEW OF BOOKS THOMAS KENEALLY, NOVELIST, PLAYWRIGHT, AND PRODUCER, IS THE AUTHOR OF NUMEROUS CRITICALLY ACCLAIMED NOVELS, INCLUDING THE CHANT OF JIMMIE BLACKSMITH, THE PLAYMAKER, A FAMILY MADNESS, AND WOMAN OF THE INNER SEA.
१९३९ ते १९४५ एका विकृत राजवटीच्या हट्टापायी सगळं जग वेठीला धरलं गेलं होतं. युरोपची भूमी बेचिराख होत होती.ज्यूंचा वंश नष्ट करायची प्रतिज्ञा नाझी भस्मासुराने केली होती.त्या आगीत सगळ्यात जास्त होरपळून निघालेला देश म्हणजे पोलंड. नाझींनी उघडलेल्या ३२० छळछावण्यांपैकी ३०० पोलंडमध्ये होत्या.त्या सगळ्या देशाचाच तुरुंग झाला होता. या दुस-या महायुद्धाच्या कालखंडात माणसामधल्या सैतानी वृत्तीने कळस गाठला होता. पण त्याच बरोबर खूप ठिकाणी देव, माणसांच्या रूपात संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धावून जात होता.शिंडलर्स लिस्ट ही अशाच एका देवमाणसाची कथा आहे, ज्यानं स्वत: जर्मन असून, स्वत:चं सर्वस्व पणाला लावून १२०० ज्यूंचे प्राण वाचवले. लिओपोल्ड पेफरबर्ग हा ऑस्कर शिंडलरने वाचवलेल्या ज्यूंपैकी एक. ही जगावेगळी कथा लोकांसमोर आणण्यासाठी त्यानं अतोनात कष्ट केले. थॉमस केनेलीसारख्या सिद्धहस्त प्रतिभावंताने ही कथा १९८३ साली लिहिली.जगभरात तिला प्रतिष्ठेच्या बुकर पुरस्कारासकट अनेक मानसन्मान लाभले.विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या ऑस्कर शिंडलरचं नाव या कलाकृतीमुळे दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासात चिरंतन झालं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SCHINDLERSLIST #SCHINDLERSLIST #शिंडलर्सलिस्ट #MEMOIRTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SANJAYDABKE #THOMASKENEALLY "
Customer Reviews
  • Rating StarLeshpal Javalge

    WW 2 मध्ये ऑस्कर शिंडलर सारखी पण माणसं जर्मनी मध्ये शिल्लक होती 👌👌👌

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 28-01-2019

    ऑस्कर शिंडलर या उद्योजकाने हजारांहून अधिक ज्यू लोकांना आपल्याकडे कामगार म्हणून नेमलं आणि त्यांना कसं मृत्यूच्या विळख्यातून सोडवलं याची ही कहाणी आहे. कामगारांची नावे जाहीर करणारी शिंडलर्स लिस्ट ही तेव्हा जणू जीवनदायिनी होती. युद्धातल्या कथा या कायमच हदयद्रावक असतात, पण दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं या पलीकडे जात विचारप्रवर्तक आणि रूपकांचा उत्तम वापर असलेली ही अजोड कलाकृती साकारली आहे. लिअम नीसन, राल्फ फिनेस, बेन किंग्स्ले यांच्या अभिनयाप्रमाणेच हा चित्रपट परिणामकारक वाटतो तो जॉन विल्यम्सच्या अर्थपूर्ण संगीतामुळे. प्रत्येकानं आवर्जून पाहावा असा हा वंशभेद, क्रौर्य, माणुसकी आणि आयुष्यांची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे. शेवटी शिंडलर म्हणतो त्याप्रमाणे, ‘व्हूएव्हर सेव्हज वन लाइफ, सेव्ह द वर्ल्ड एन्टायर’, खरंतर माणूस ही एकच ओळख किती महत्त्वाची आहे, हे या कलाकृतीतून व्यक्त होतं. – मुक्ता बाम ...Read more

  • Rating StarPradeep Phadke

    छान पुस्तक

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 31 -01 -2010

    शिंडलर्स लिस्ट जागतिक कीर्तीचा बुकर पुरस्कारीत कादंबरी… जर्मनीची सत्ता हिटलरने हस्तगत केल्यावर त्याने आपल्या हुकूमशाही राजवटीत ज्यू धर्मियांचा पूर्णपणे वंशसंहार करायची प्रतिज्ञा केली होती. त्याच्या आदेशानुसार जर्मनी आणि पोलंडमधील लाखो ज्यूंना प्रारभी छळ छावण्यात डांबण्यात आले. त्या छावण्यांना कॉन्स्ट्रेशन कॅम्प असा शब्दही जगात रूढ झाला. १९३९ ते १९४५ या सहा वर्षांच्या काळात हिटलरच्या नाझी अधिकारी आणि सैन्याने कोवळ्या बालकांसह लाखो ज्यूंची कत्तल केली. त्यांना छळ छावण्यात ठार मारून जाळण्यातही आले. पोलंड काबीज केल्यावर हिटलरच्या नाझी अधिकाऱ्यांनी त्या देशातल्या साऱ्या लहान मोठ्या वृद्ध ज्यूंना ‘घेटो’त म्हणजे पुनर्वसन शिबिरात सक्तीने डांबले. घेटोत त्यांच्यासाठी राहण्याची आणि जेवण्याची योग्य व्यवस्था नव्हती. घेटोतल्या ज्यूंचे जीणे जनावरांसारखे होते. घेटोत जाणे म्हणजे मृत्यूचा आदेश अशी दहशतच ज्यू धर्मियात निर्माण झाली होती. या अत्यंत विकृत, किळसवाण्या आणि माणुसकीला चूड लावणाऱ्या त्या छळ छावण्यांचे, होलोकॉस्टचे प्रभावी चित्रण थॉमस केनेली या साहित्यिकाने ‘शिंडलर्स लिस्ट’ या कादंबरीत केले आहे. ही साहित्यकृती कादंबरी असली तरी शिंडलर ज्युडेन नावाच्या व्यसनी, बदफ़ैली पण मनात माणुसकीचा नंदादीप तेवत असलेल्या जर्मन उद्योजकाची सत्यकथा आहे. आपले नशीब घडवण्यासाठी ऑस्कर शिंडलर पोलंडमधल्या क्रॅकोव्हमध्ये त्यांनी शिंडलरने वाचवलेल्या लिओपाल्ड पेफरबर्ग यांच्या साहाय्याने शिंडलरने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अत्यंत प्रयत्नपूर्वक नाझींच्या मृत्यूच्या छावणीतून १२०० ज्यूंचे प्राण वाचवले. युद्धाच्या काळात या ज्यूंना वाचवणे हेच त्याचे एकमेव ध्येय होते. १९८३ मध्ये केनेली यांची ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि तिला जागतिक कीर्तीचा बुकर पुरस्कार मिळाला. याच कादंबरीच्या कथानकावर जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी १९९३ मध्ये ‘शिंडलर्स लिस्ट’ हा चित्रपट निर्माण केला, तो जगभर प्रचंड गाजला. या चित्रपटाला सात ऑस्कर पुरस्कार मिळाले. शिंडलरच्या मानवतेला वंदन करणाऱ्या केनेली यांच्या जागतिक कीर्तीच्या या कादंबरीचा मराठी अनुवाद अत्यंत प्रभावीपणे संजय दाबके यांनी केला आहे. मराठीत शिंडलरची ही कथा प्रथमच प्रसिद्ध होत आहे. शिंडलर क्रॅकोव्हला गेला तेव्हा त्याने ज्यूंची ससेहोलपट आणि त्यांचा संहार पाहिला. चैनीसाठी वाट्टेल तशी उधळपट्टी करणारा, अनेक लफडी करणारा शिंडलर या मृत्युकांडाने पूर्णपणे हादरून गेला. नाझींच्या छळ छावणीतून जमेल तेवढ्या ज्यूंना वाचवायसाठी त्याने प्रसंगी आपले प्राणही संकटात घातले. क्रॅकोव्हमधल्या नाझी अधिकाऱ्यांना दारू, लाच देऊन त्याने अंकित केले होते. या शहरात त्याने अनॅमल भांडी तयार करणारा कारखाना सुरू केला. या कारखान्यासाठी ज्यू हे सर्वांत स्वस्त आणि सहज मिळणारे मजूर असल्याचे त्याने नाझी अधिकाऱ्यांना पटवून दिले. या कारखान्यात कामाला असलेल्या ज्यूंची त्याने काळजी घेतली. आजारी ज्यूंवर चांगले औषधोपचार केले. आपल्या कारखान्यातल्या ज्यू मजुरांना तो मानवतेने वागवित असे. तुम्ही जगाल, असा दिलासाही देत असे. ज्यूंच्या छळामुळे तो सतत व्यथित असे. पण, शिंडलर जर्मन सैन्याला आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा करीत असल्याने आणि त्याचे वरिष्ठ नाझी अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे, क्रॅकोव्हमधल्या घेटोतल्या अधिकाऱ्यांचे त्याच्यापुढे काही चालत नसे. जेव्हा काही अधिकाऱ्यांनी त्याचा काटा काढायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने वरिष्ठ नाझींशी संपर्क साधून आपली सुटकाही करून घेतली होती. क्रॅकोव्हमधला त्याचा हा कारखाना व्यवस्थित सुरू होता. पण जर्मनीची दुसऱ्या महायुद्धात पिछेहाट सुरू झाली, तेव्हा बहुतांश घेटोतील ज्यूंना ठार मारायचे आदेश बर्लिनहून आले होते. त्यातच क्रॅकोव्हमधील हा कारखाना हलवायचे आदेश आले. शिंडलरने आपला कारखाना ब्रिनालिंटझ् येथे नेण्याचा निर्णय घेतला. त्याने संपूर्ण कारखाना आणि कारखान्यातले मजूर नव्या गावात नेले. या कारखान्यात दारूगोळ्याशी संबंधित साहित्याची निर्मिती होत असे. प्रत्यक्षात मात्र पराभवाच्या छायेत असलेल्या जर्मनीला शिंडलरच्या कारखान्यातल्या या साहित्याचा काहीही उपयोग झाला नाही. सात महिने तो जर्मन लष्करी अधिकाऱ्यांना फसवत राहिला. एकाही पैशाचे उत्पादन या कारखान्यात झाले नाही. लवकरच युद्ध संपेल आणि हे ज्यू स्वतंत्र होतील, अशी त्याला खात्री होती. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीला पराभव झाल्यावर शिंडलरचा हा कॅम्प रशियन सैन्याने ताब्यात घेतला. त्या आधी शिंडलरने वाचवलेल्या सर्व ज्यू मजुरांना तुम्ही आता स्वतंत्र झाला आहात, असे सांगून टाकले. हे सारे ज्यू जिवंत राहिले ते शिंडलरच्या मानवतावादी आणि धोकादायक ठरलेल्या कृतीमुळेच! त्याने स्वतःच जर्मनीच्या भीषण नरसंहाराचा निषेध केला. त्याची आपल्याला शरम वाटते, असे सांगितले. यापुढे माणुसकीने वागा, कायदा हातात घेऊ नका, या साऱ्या दिव्यातून पार पडण्यासाठी मला गैरमार्गांचा, भ्रष्टाचाराचा उपयोग करावा लागला, त्याला माझा नाइलाज होता. तुम्ही सगळ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मला साथ दिली याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे, अशा भावपूर्ण शब्दात शिंडलरने आपल्या या सहकाऱ्यांचा निरोप घेतला. युद्ध संपल्यावर एक काळचा धनाढ्य शिंडलर दिवाळखोर झाला. तो बर्लिनला गेला. तेथून उद्योगासाठी अर्जेंटिनाला गेला. तेथेही त्याला नशिबाने साथ दिली नाही. तेथून तो परत बर्लिनला आला. पण, आपला देवदूत असलेल्या शिंडलरला त्याने वाचवलेले ज्यू मात्र विसरले नव्हते. त्याच्यामुळेच आपण जिवंत राहिलो, हे ऋण ते कधीही विसरले नाहीत. क्रॅकोव्हमधल्या घेटोचा प्रमुख आणि हजारो ज्यूंचा नरसंहार करणाऱ्या अ‍ॅमॉन गॉथला, त्याचा साथीदार लिओपाल्डला फाशी दिली गेली. शिंडलर नशीब काढण्यासाठी अर्जेंटिनाला गेला, तेव्हा ज्यूंच्या संघटनेने त्याला १५ हजार डॉलर्सची मदत केली. शिंडलर हे ज्यूंचे प्राणदाते आहेत, ते देवदूत आहेत असे पत्रही या संघटनेने शिंडलरला दिले होते. अर्जेंटिनाहून पुन्हा जर्मनीत परतल्यावर इस्त्राईलची राजधानी तेलअव्हिहमध्ये तिथल्या नगरपरिषदेने शिंडलरचा सत्कार केला. इस्त्राईल सरकारने, ‘राइटीअस पर्सन’ म्हणजे अतिशय उच्च नीतिमूल्ये पाळणारा माणूस, या सन्मानाने त्याचा गौरव केला. त्याच्या सत्काराच्या बातम्या जर्मन वृत्तपत्र झळकल्या आणि १९६६ मध्ये जर्मन सरकारतर्फे शिंडलरला सन्मानचिन्ह देण्यात आले. नंतर त्याला २०० मार्क्सचे दरमहा निवृत्ती वेतनही सुरू करण्यात आले. त्याची पत्नी एमिली मात्र शेवटपर्यंत अर्जेंटिनातच राहिली. तिला आपल्या पतीच्या मानवतावादी कार्याचा अभिमान वाटत होता. १९७२ मध्ये शिंडलर न्यूयॉर्कला गेला आणि त्याने वाचवलेल्या तिघा ज्यूंनी शिंडलरच्या नावाने हिब्रू विद्यापीठाला एक पूर्ण मजला बांधून दिला. ९ ऑक्टोबर १९७४ रोजी शिंडलरचे निधन झाले. त्याने आपल्या मृत्युपत्रात माझ्या देहाचे दफन इस्त्राईलमधले पवित्र शहर जेरुसलेममध्ये करण्यात यावे, अशी अंतिम इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार ती पूर्ण करण्यात आली. ऑस्कर शिंडलर गेला तेव्हा जगातल्या सर्व ज्यूंनी त्याला श्रद्धांजली वाहिली. ही सत्यकथा अत्यंत प्रवाहीपणे थॉमस केनेली यांनी कथन केली आहे. तर संजय दाबके यांनी मूळ इंग्रजी भाषेतून अनुवाद करताना तो प्रवाहीपणा कुठेही खंडित होऊ नये याची दक्षता घेतली आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more