* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SCHINDLERS LIST
  • Availability : Available
  • Translators : SANJAY DABKE
  • ISBN : 9788184980899
  • Edition : 3
  • Publishing Year : NOVEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 296
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
A STUNNING NOVEL BASED ON THE TRUE STORY OF HOW GERMAN WAR PROFITEER AND PRISON CAMP DIREKTOR OSKAR SCHINDLER CAME TO SAVE MORE JEWS FROM THE GAS CHAMBERS THAN ANY OTHER, SINGLE PERSON DURING WORLD WAR II. IN THIS MILESTONE OF HOLOCAUST LITERATURE, THOMAS KENEALLY USES THE ACTUAL TESTIMONY OF THE SCHINDLERJUDEN - SCHINDLER`S JEWS - TO BRILLIANTLY PORTRAY THE COURAGE AND CUNNING OF A GOOD MAN IN THE MIDST OF UNSPEAKABLE EVIL. "A MASTERFUL ACCOUNT OF THE GROWTH OF THE HUMAN SOUL."-LOS ANGELES TIMES BOOK REVIEW "AN EXTRAORDINARY TALE...NO SUMMARY CAN ADEQUATELY CONVEY THE STRATAGEMS AND REVERSES AND SUDDEN TWISTS OF FORTUNE. A NOTABLE ACHIEVEMENT." -THE NEW YORK REVIEW OF BOOKS THOMAS KENEALLY, NOVELIST, PLAYWRIGHT, AND PRODUCER, IS THE AUTHOR OF NUMEROUS CRITICALLY ACCLAIMED NOVELS, INCLUDING THE CHANT OF JIMMIE BLACKSMITH, THE PLAYMAKER, A FAMILY MADNESS, AND WOMAN OF THE INNER SEA.
१९३९ ते १९४५ एका विकृत राजवटीच्या हट्टापायी सगळं जग वेठीला धरलं गेलं होतं. युरोपची भूमी बेचिराख होत होती.ज्यूंचा वंश नष्ट करायची प्रतिज्ञा नाझी भस्मासुराने केली होती.त्या आगीत सगळ्यात जास्त होरपळून निघालेला देश म्हणजे पोलंड. नाझींनी उघडलेल्या ३२० छळछावण्यांपैकी ३०० पोलंडमध्ये होत्या.त्या सगळ्या देशाचाच तुरुंग झाला होता. या दुस-या महायुद्धाच्या कालखंडात माणसामधल्या सैतानी वृत्तीने कळस गाठला होता. पण त्याच बरोबर खूप ठिकाणी देव, माणसांच्या रूपात संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धावून जात होता.शिंडलर्स लिस्ट ही अशाच एका देवमाणसाची कथा आहे, ज्यानं स्वत: जर्मन असून, स्वत:चं सर्वस्व पणाला लावून १२०० ज्यूंचे प्राण वाचवले. लिओपोल्ड पेफरबर्ग हा ऑस्कर शिंडलरने वाचवलेल्या ज्यूंपैकी एक. ही जगावेगळी कथा लोकांसमोर आणण्यासाठी त्यानं अतोनात कष्ट केले. थॉमस केनेलीसारख्या सिद्धहस्त प्रतिभावंताने ही कथा १९८३ साली लिहिली.जगभरात तिला प्रतिष्ठेच्या बुकर पुरस्कारासकट अनेक मानसन्मान लाभले.विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या ऑस्कर शिंडलरचं नाव या कलाकृतीमुळे दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासात चिरंतन झालं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SCHINDLERSLIST #SCHINDLERSLIST #शिंडलर्सलिस्ट #MEMOIRTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SANJAYDABKE #THOMASKENEALLY "
Customer Reviews
  • Rating StarLeshpal Javalge

    WW 2 मध्ये ऑस्कर शिंडलर सारखी पण माणसं जर्मनी मध्ये शिल्लक होती 👌👌👌

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 28-01-2019

    ऑस्कर शिंडलर या उद्योजकाने हजारांहून अधिक ज्यू लोकांना आपल्याकडे कामगार म्हणून नेमलं आणि त्यांना कसं मृत्यूच्या विळख्यातून सोडवलं याची ही कहाणी आहे. कामगारांची नावे जाहीर करणारी शिंडलर्स लिस्ट ही तेव्हा जणू जीवनदायिनी होती. युद्धातल्या कथा या कायमच हदयद्रावक असतात, पण दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं या पलीकडे जात विचारप्रवर्तक आणि रूपकांचा उत्तम वापर असलेली ही अजोड कलाकृती साकारली आहे. लिअम नीसन, राल्फ फिनेस, बेन किंग्स्ले यांच्या अभिनयाप्रमाणेच हा चित्रपट परिणामकारक वाटतो तो जॉन विल्यम्सच्या अर्थपूर्ण संगीतामुळे. प्रत्येकानं आवर्जून पाहावा असा हा वंशभेद, क्रौर्य, माणुसकी आणि आयुष्यांची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे. शेवटी शिंडलर म्हणतो त्याप्रमाणे, ‘व्हूएव्हर सेव्हज वन लाइफ, सेव्ह द वर्ल्ड एन्टायर’, खरंतर माणूस ही एकच ओळख किती महत्त्वाची आहे, हे या कलाकृतीतून व्यक्त होतं. – मुक्ता बाम ...Read more

  • Rating StarPradeep Phadke

    छान पुस्तक

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 31 -01 -2010

    शिंडलर्स लिस्ट जागतिक कीर्तीचा बुकर पुरस्कारीत कादंबरी… जर्मनीची सत्ता हिटलरने हस्तगत केल्यावर त्याने आपल्या हुकूमशाही राजवटीत ज्यू धर्मियांचा पूर्णपणे वंशसंहार करायची प्रतिज्ञा केली होती. त्याच्या आदेशानुसार जर्मनी आणि पोलंडमधील लाखो ज्यूंना प्रारभी छळ छावण्यात डांबण्यात आले. त्या छावण्यांना कॉन्स्ट्रेशन कॅम्प असा शब्दही जगात रूढ झाला. १९३९ ते १९४५ या सहा वर्षांच्या काळात हिटलरच्या नाझी अधिकारी आणि सैन्याने कोवळ्या बालकांसह लाखो ज्यूंची कत्तल केली. त्यांना छळ छावण्यात ठार मारून जाळण्यातही आले. पोलंड काबीज केल्यावर हिटलरच्या नाझी अधिकाऱ्यांनी त्या देशातल्या साऱ्या लहान मोठ्या वृद्ध ज्यूंना ‘घेटो’त म्हणजे पुनर्वसन शिबिरात सक्तीने डांबले. घेटोत त्यांच्यासाठी राहण्याची आणि जेवण्याची योग्य व्यवस्था नव्हती. घेटोतल्या ज्यूंचे जीणे जनावरांसारखे होते. घेटोत जाणे म्हणजे मृत्यूचा आदेश अशी दहशतच ज्यू धर्मियात निर्माण झाली होती. या अत्यंत विकृत, किळसवाण्या आणि माणुसकीला चूड लावणाऱ्या त्या छळ छावण्यांचे, होलोकॉस्टचे प्रभावी चित्रण थॉमस केनेली या साहित्यिकाने ‘शिंडलर्स लिस्ट’ या कादंबरीत केले आहे. ही साहित्यकृती कादंबरी असली तरी शिंडलर ज्युडेन नावाच्या व्यसनी, बदफ़ैली पण मनात माणुसकीचा नंदादीप तेवत असलेल्या जर्मन उद्योजकाची सत्यकथा आहे. आपले नशीब घडवण्यासाठी ऑस्कर शिंडलर पोलंडमधल्या क्रॅकोव्हमध्ये त्यांनी शिंडलरने वाचवलेल्या लिओपाल्ड पेफरबर्ग यांच्या साहाय्याने शिंडलरने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अत्यंत प्रयत्नपूर्वक नाझींच्या मृत्यूच्या छावणीतून १२०० ज्यूंचे प्राण वाचवले. युद्धाच्या काळात या ज्यूंना वाचवणे हेच त्याचे एकमेव ध्येय होते. १९८३ मध्ये केनेली यांची ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि तिला जागतिक कीर्तीचा बुकर पुरस्कार मिळाला. याच कादंबरीच्या कथानकावर जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी १९९३ मध्ये ‘शिंडलर्स लिस्ट’ हा चित्रपट निर्माण केला, तो जगभर प्रचंड गाजला. या चित्रपटाला सात ऑस्कर पुरस्कार मिळाले. शिंडलरच्या मानवतेला वंदन करणाऱ्या केनेली यांच्या जागतिक कीर्तीच्या या कादंबरीचा मराठी अनुवाद अत्यंत प्रभावीपणे संजय दाबके यांनी केला आहे. मराठीत शिंडलरची ही कथा प्रथमच प्रसिद्ध होत आहे. शिंडलर क्रॅकोव्हला गेला तेव्हा त्याने ज्यूंची ससेहोलपट आणि त्यांचा संहार पाहिला. चैनीसाठी वाट्टेल तशी उधळपट्टी करणारा, अनेक लफडी करणारा शिंडलर या मृत्युकांडाने पूर्णपणे हादरून गेला. नाझींच्या छळ छावणीतून जमेल तेवढ्या ज्यूंना वाचवायसाठी त्याने प्रसंगी आपले प्राणही संकटात घातले. क्रॅकोव्हमधल्या नाझी अधिकाऱ्यांना दारू, लाच देऊन त्याने अंकित केले होते. या शहरात त्याने अनॅमल भांडी तयार करणारा कारखाना सुरू केला. या कारखान्यासाठी ज्यू हे सर्वांत स्वस्त आणि सहज मिळणारे मजूर असल्याचे त्याने नाझी अधिकाऱ्यांना पटवून दिले. या कारखान्यात कामाला असलेल्या ज्यूंची त्याने काळजी घेतली. आजारी ज्यूंवर चांगले औषधोपचार केले. आपल्या कारखान्यातल्या ज्यू मजुरांना तो मानवतेने वागवित असे. तुम्ही जगाल, असा दिलासाही देत असे. ज्यूंच्या छळामुळे तो सतत व्यथित असे. पण, शिंडलर जर्मन सैन्याला आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा करीत असल्याने आणि त्याचे वरिष्ठ नाझी अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे, क्रॅकोव्हमधल्या घेटोतल्या अधिकाऱ्यांचे त्याच्यापुढे काही चालत नसे. जेव्हा काही अधिकाऱ्यांनी त्याचा काटा काढायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने वरिष्ठ नाझींशी संपर्क साधून आपली सुटकाही करून घेतली होती. क्रॅकोव्हमधला त्याचा हा कारखाना व्यवस्थित सुरू होता. पण जर्मनीची दुसऱ्या महायुद्धात पिछेहाट सुरू झाली, तेव्हा बहुतांश घेटोतील ज्यूंना ठार मारायचे आदेश बर्लिनहून आले होते. त्यातच क्रॅकोव्हमधील हा कारखाना हलवायचे आदेश आले. शिंडलरने आपला कारखाना ब्रिनालिंटझ् येथे नेण्याचा निर्णय घेतला. त्याने संपूर्ण कारखाना आणि कारखान्यातले मजूर नव्या गावात नेले. या कारखान्यात दारूगोळ्याशी संबंधित साहित्याची निर्मिती होत असे. प्रत्यक्षात मात्र पराभवाच्या छायेत असलेल्या जर्मनीला शिंडलरच्या कारखान्यातल्या या साहित्याचा काहीही उपयोग झाला नाही. सात महिने तो जर्मन लष्करी अधिकाऱ्यांना फसवत राहिला. एकाही पैशाचे उत्पादन या कारखान्यात झाले नाही. लवकरच युद्ध संपेल आणि हे ज्यू स्वतंत्र होतील, अशी त्याला खात्री होती. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीला पराभव झाल्यावर शिंडलरचा हा कॅम्प रशियन सैन्याने ताब्यात घेतला. त्या आधी शिंडलरने वाचवलेल्या सर्व ज्यू मजुरांना तुम्ही आता स्वतंत्र झाला आहात, असे सांगून टाकले. हे सारे ज्यू जिवंत राहिले ते शिंडलरच्या मानवतावादी आणि धोकादायक ठरलेल्या कृतीमुळेच! त्याने स्वतःच जर्मनीच्या भीषण नरसंहाराचा निषेध केला. त्याची आपल्याला शरम वाटते, असे सांगितले. यापुढे माणुसकीने वागा, कायदा हातात घेऊ नका, या साऱ्या दिव्यातून पार पडण्यासाठी मला गैरमार्गांचा, भ्रष्टाचाराचा उपयोग करावा लागला, त्याला माझा नाइलाज होता. तुम्ही सगळ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मला साथ दिली याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे, अशा भावपूर्ण शब्दात शिंडलरने आपल्या या सहकाऱ्यांचा निरोप घेतला. युद्ध संपल्यावर एक काळचा धनाढ्य शिंडलर दिवाळखोर झाला. तो बर्लिनला गेला. तेथून उद्योगासाठी अर्जेंटिनाला गेला. तेथेही त्याला नशिबाने साथ दिली नाही. तेथून तो परत बर्लिनला आला. पण, आपला देवदूत असलेल्या शिंडलरला त्याने वाचवलेले ज्यू मात्र विसरले नव्हते. त्याच्यामुळेच आपण जिवंत राहिलो, हे ऋण ते कधीही विसरले नाहीत. क्रॅकोव्हमधल्या घेटोचा प्रमुख आणि हजारो ज्यूंचा नरसंहार करणाऱ्या अ‍ॅमॉन गॉथला, त्याचा साथीदार लिओपाल्डला फाशी दिली गेली. शिंडलर नशीब काढण्यासाठी अर्जेंटिनाला गेला, तेव्हा ज्यूंच्या संघटनेने त्याला १५ हजार डॉलर्सची मदत केली. शिंडलर हे ज्यूंचे प्राणदाते आहेत, ते देवदूत आहेत असे पत्रही या संघटनेने शिंडलरला दिले होते. अर्जेंटिनाहून पुन्हा जर्मनीत परतल्यावर इस्त्राईलची राजधानी तेलअव्हिहमध्ये तिथल्या नगरपरिषदेने शिंडलरचा सत्कार केला. इस्त्राईल सरकारने, ‘राइटीअस पर्सन’ म्हणजे अतिशय उच्च नीतिमूल्ये पाळणारा माणूस, या सन्मानाने त्याचा गौरव केला. त्याच्या सत्काराच्या बातम्या जर्मन वृत्तपत्र झळकल्या आणि १९६६ मध्ये जर्मन सरकारतर्फे शिंडलरला सन्मानचिन्ह देण्यात आले. नंतर त्याला २०० मार्क्सचे दरमहा निवृत्ती वेतनही सुरू करण्यात आले. त्याची पत्नी एमिली मात्र शेवटपर्यंत अर्जेंटिनातच राहिली. तिला आपल्या पतीच्या मानवतावादी कार्याचा अभिमान वाटत होता. १९७२ मध्ये शिंडलर न्यूयॉर्कला गेला आणि त्याने वाचवलेल्या तिघा ज्यूंनी शिंडलरच्या नावाने हिब्रू विद्यापीठाला एक पूर्ण मजला बांधून दिला. ९ ऑक्टोबर १९७४ रोजी शिंडलरचे निधन झाले. त्याने आपल्या मृत्युपत्रात माझ्या देहाचे दफन इस्त्राईलमधले पवित्र शहर जेरुसलेममध्ये करण्यात यावे, अशी अंतिम इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार ती पूर्ण करण्यात आली. ऑस्कर शिंडलर गेला तेव्हा जगातल्या सर्व ज्यूंनी त्याला श्रद्धांजली वाहिली. ही सत्यकथा अत्यंत प्रवाहीपणे थॉमस केनेली यांनी कथन केली आहे. तर संजय दाबके यांनी मूळ इंग्रजी भाषेतून अनुवाद करताना तो प्रवाहीपणा कुठेही खंडित होऊ नये याची दक्षता घेतली आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more