* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
GIVING AN ACCOUNT OF THE LIFE OF A SURGEON, THIS BOOK LOOKS AT WHAT IT IS LIKE TO CUT INTO PEOPLE`S BODIES AND THE - LITERALLY LIFE AND DEATH - DECISIONS THAT HAVE TO BE MADE. IT INCLUDES CHRONICLES OF OPERATIONS THAT GO WRONG; OF DOCTORS WHO GO TO THE BAD; WHY AUTOPSIES ARE NECESSARY; AND WHAT IT FEELS LIKE TO INSERT YOUR KNIFE INTO SOMEONE.
सत्य घटनांबद्दल लिहिताना डॉ. अतुल गवांदे आपल्या मनाची अशी काही पकड घेतात की वाटते, वैद्यकशास्त्रविषयाची माहिती मिळवण्यासाठी ते त्याचीच चिरफाड करत आहेत. खरं पाहता, सर्वसामान्यांच्या मनात या शास्त्राविषयी एक प्रकारची उदात्ततेची भावना असते. गवांदे मात्र आपल्यासमोर वास्तव ठेवतात, ते त्याच्या मूळ स्वरूपात. हे वास्तव अत्यंत गुंतागुंतीचे असते, गोंधळात टाकणारे असते आणि कमालीचे मानवी असते. ज्या वेळी हे शास्त्र संदिग्ध स्वरूपाचे असते, उपलब्ध माहिती अगदी मर्यादित असते, जोखमीचे प्रमाण मोठे असते अन् तरीही निर्णय घेणे अपरिहार्य होऊन बसते, तेव्हा गवांदे आपल्यापुढे सगळी परिस्थिती उघडपणे मांडतात, कसलीही लपवा-छपवी करत नाहीत. रुग्णांच्याच नव्हेत; तर डॉक्टरांच्या नाट्यपूर्ण कथाही ते आपल्याला सांगतात तेव्हा त्यामागचा हेतू सत्यशोधनाचा आहे, असे जाणवते. डॉक्टरांच्या हातून घडणाऱ्या चुकांमागची कारणे ते आपल्याला प्रामाणिकपणे सांगतात, चांगल्या शल्यविशारदांना रसातळाला नेण्यामागील कारणांची ते शहानिशा करतात, अनाकलनीय असे वास्तव समोर ठाकल्यानंतर वैद्यकीयशास्त्र त्याला कशा प्रकारे तोंड देते, हे प्रश्न सामान्य वाचकांना गवांदे यांनी सांगितल्यामुळेच कळतात, असे म्हणता येईल. ‘कॉम्प्लीकेशन्स’ हे पुस्तक वाचताना एका बाजूला अतिशय कणखर मनोवृत्तीचे दर्शन घडते, तर दुस-या बाजूला मानवतेचा ओलावाही जाणवतो. वैद्यकीय विषयावरील हे पुस्तक एका वेगळ्याच पठडीतले आहे, असेही मनात येते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #JIVJITHEGUNTALELA #COMPLICATIONS #जीवजिथेगुंतलेला #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #NEELACHANDORKAR नीला चांदोरकर DR.ATUL GAWANDE डॉ.अतुल गवांदे"
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 7-9-2013

    `जीव जिथे गुंतलेला...’ हे डॉ. अतुल गवांदे यांचे मूळ इंग्रजी अनुभवकथन. त्याचा मराठीत अनुवाद नीला चांदोरकर यांनी केला आहे. वैद्यकीय व्यवसायात तंत्रज्ञानाचा कितीही शिरकाव झाला असला, तरी त्याचा पाया अजूनही अधांतरीच आहे. रुग्णाचा जीव वाचवणेहे डॉक्टरचे कामअसले, तरी तोही माणूस असतो. त्याच्या कडूनही चुका होऊ शकतात किंवा कधी कधी काही विचित्र गोष्टींना डॉक्टरांना सामोरे जावे लागते. अशा वेळी समोर असलेल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरने केलेले प्रयत्न योग्य ठरल्यास रुग्ण आनंदाने घरी जातो किंवा ते प्रयत्न चुकल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. वैद्यकीय क्षेत्रात अशा अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी सातत्याने घडत असतात. डॉ. अतुल गवांदे यांनीही त्यांच्या आजवरच्या प्रवासात अशा गुंतागुंतीच्या गोष्टी अनुभवल्या. त्यांचेच कथन म्हणजे हे पुस्तक. या पुस्तकाचे तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात डॉक्टरांच्या चुका कशामुळे होतात, एक नवशिका डॉक्टर हातात सुरी घेऊन कापाकापी करायला कसा शिकतो, कोणाला चांगला डॉक्टर म्हणता येईल याबद्दल उदाहरणांच्या साहाय्याने चर्चा केली आहे. दुसऱ्या भागात वैद्यकशास्त्रातील गूढ आणि अज्ञात गोष्टींचा उल्लेख केला आहे. अशा गोष्टींना सामोरे जाताना डॉक्टर काय प्रयत्न करतात याबाबत चर्चा आहे. चुकांमधून काहीही न शिकता येणं हे अपयश असतं, त्यामुळे तुम्ही चुका सुधारुन कसा मार्ग काढता, यावर यश अवलंबून असते, असे लेखक म्हणतात. लेखकाला आजवर भेटलेल्या रुग्णांच्या (नावे बदलून) सत्यघटना या पुस्तकात दिल्यामुळे पुस्तक अधिक वाचनीय होते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.