* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
GIVING AN ACCOUNT OF THE LIFE OF A SURGEON, THIS BOOK LOOKS AT WHAT IT IS LIKE TO CUT INTO PEOPLE`S BODIES AND THE - LITERALLY LIFE AND DEATH - DECISIONS THAT HAVE TO BE MADE. IT INCLUDES CHRONICLES OF OPERATIONS THAT GO WRONG; OF DOCTORS WHO GO TO THE BAD; WHY AUTOPSIES ARE NECESSARY; AND WHAT IT FEELS LIKE TO INSERT YOUR KNIFE INTO SOMEONE.
सत्य घटनांबद्दल लिहिताना डॉ. अतुल गवांदे आपल्या मनाची अशी काही पकड घेतात की वाटते, वैद्यकशास्त्रविषयाची माहिती मिळवण्यासाठी ते त्याचीच चिरफाड करत आहेत. खरं पाहता, सर्वसामान्यांच्या मनात या शास्त्राविषयी एक प्रकारची उदात्ततेची भावना असते. गवांदे मात्र आपल्यासमोर वास्तव ठेवतात, ते त्याच्या मूळ स्वरूपात. हे वास्तव अत्यंत गुंतागुंतीचे असते, गोंधळात टाकणारे असते आणि कमालीचे मानवी असते. ज्या वेळी हे शास्त्र संदिग्ध स्वरूपाचे असते, उपलब्ध माहिती अगदी मर्यादित असते, जोखमीचे प्रमाण मोठे असते अन् तरीही निर्णय घेणे अपरिहार्य होऊन बसते, तेव्हा गवांदे आपल्यापुढे सगळी परिस्थिती उघडपणे मांडतात, कसलीही लपवा-छपवी करत नाहीत. रुग्णांच्याच नव्हेत; तर डॉक्टरांच्या नाट्यपूर्ण कथाही ते आपल्याला सांगतात तेव्हा त्यामागचा हेतू सत्यशोधनाचा आहे, असे जाणवते. डॉक्टरांच्या हातून घडणाऱ्या चुकांमागची कारणे ते आपल्याला प्रामाणिकपणे सांगतात, चांगल्या शल्यविशारदांना रसातळाला नेण्यामागील कारणांची ते शहानिशा करतात, अनाकलनीय असे वास्तव समोर ठाकल्यानंतर वैद्यकीयशास्त्र त्याला कशा प्रकारे तोंड देते, हे प्रश्न सामान्य वाचकांना गवांदे यांनी सांगितल्यामुळेच कळतात, असे म्हणता येईल. ‘कॉम्प्लीकेशन्स’ हे पुस्तक वाचताना एका बाजूला अतिशय कणखर मनोवृत्तीचे दर्शन घडते, तर दुस-या बाजूला मानवतेचा ओलावाही जाणवतो. वैद्यकीय विषयावरील हे पुस्तक एका वेगळ्याच पठडीतले आहे, असेही मनात येते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #JIVJITHEGUNTALELA #COMPLICATIONS #जीवजिथेगुंतलेला #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #NEELACHANDORKAR नीला चांदोरकर DR.ATUL GAWANDE डॉ.अतुल गवांदे"
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 7-9-2013

    `जीव जिथे गुंतलेला...’ हे डॉ. अतुल गवांदे यांचे मूळ इंग्रजी अनुभवकथन. त्याचा मराठीत अनुवाद नीला चांदोरकर यांनी केला आहे. वैद्यकीय व्यवसायात तंत्रज्ञानाचा कितीही शिरकाव झाला असला, तरी त्याचा पाया अजूनही अधांतरीच आहे. रुग्णाचा जीव वाचवणेहे डॉक्टरचे कामअसले, तरी तोही माणूस असतो. त्याच्या कडूनही चुका होऊ शकतात किंवा कधी कधी काही विचित्र गोष्टींना डॉक्टरांना सामोरे जावे लागते. अशा वेळी समोर असलेल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरने केलेले प्रयत्न योग्य ठरल्यास रुग्ण आनंदाने घरी जातो किंवा ते प्रयत्न चुकल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. वैद्यकीय क्षेत्रात अशा अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी सातत्याने घडत असतात. डॉ. अतुल गवांदे यांनीही त्यांच्या आजवरच्या प्रवासात अशा गुंतागुंतीच्या गोष्टी अनुभवल्या. त्यांचेच कथन म्हणजे हे पुस्तक. या पुस्तकाचे तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात डॉक्टरांच्या चुका कशामुळे होतात, एक नवशिका डॉक्टर हातात सुरी घेऊन कापाकापी करायला कसा शिकतो, कोणाला चांगला डॉक्टर म्हणता येईल याबद्दल उदाहरणांच्या साहाय्याने चर्चा केली आहे. दुसऱ्या भागात वैद्यकशास्त्रातील गूढ आणि अज्ञात गोष्टींचा उल्लेख केला आहे. अशा गोष्टींना सामोरे जाताना डॉक्टर काय प्रयत्न करतात याबाबत चर्चा आहे. चुकांमधून काहीही न शिकता येणं हे अपयश असतं, त्यामुळे तुम्ही चुका सुधारुन कसा मार्ग काढता, यावर यश अवलंबून असते, असे लेखक म्हणतात. लेखकाला आजवर भेटलेल्या रुग्णांच्या (नावे बदलून) सत्यघटना या पुस्तकात दिल्यामुळे पुस्तक अधिक वाचनीय होते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more