* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DOES HE KNOW A MOTHERS HEART?
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184985665
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 384
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
  • Available in Combos :ARUN SHOURIE COMBO SET-9 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
YOUR NEIGHBORS HAVE A SON. HE IS NOW THIRTYFIVE YEARS OLD. GOING BY HIS AGE YOU WOULD THINK OF HIM AS A YOUNG MAN AND ON MEETING HIS MOTHER OR FATHER, WOULD ASK, ALMOST OUT OF HABIT, ‘ AND WHAT DOES THE YOUNG MAN DO ?` THAT EXPRESSION, ‘YOUNG MAN’, DOESN’T SIT WELL AS HE IS BUT A CHILD. BUT WHAT IF THE FATHER OR THE FATHER – THE ‘T’ AND ‘F’ CAPITAL, BOTH WORDS ITALICIZED? THAT IS, WHAT IF THE ‘FATHER’IN QUESTION IS ‘GOD’? WHY DO THE REACTIONS AND ANSWER CHANGE FOR SO MANY OF US?
तुमच्या शेजार्‍यांना एक मुलगा आहे. आता तो पस्तीस वर्षांचा आहे. त्याच्या वयावरून तुम्हाला वाटेल की, तो उमदा तरुण असणार. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना भेटल्यावर तुम्ही अगदी सवयीनं विचारणार, ‘‘तुमचा मुलगा काय करतो?’’ पण ‘उमदा तरुण’ हा तुमचा शब्दप्रयोग इथे योग्य ठरणार नाही, कारण तो तरुण मुलगा अजून लहान मुलासारखाच आहे. पिता, म्हणजे जर ‘तो’ – THE FATHER... यातसुद्धा ‘टी’ आणि ‘एफ’ ही दोन्ही अक्षरं ‘कॅपिटल’ आणि ‘इटॅलिक्स’मध्ये असं असेल तर? हा ‘पिता’ म्हणजे ‘देव’ असेल तर? हे कळताच आपल्यापैकी बर्‍याच जणांचा दृष्टिकोन अचानक का बदलतो?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# GOVERNANCE #HESARVAAPALYALAKOTHEGHEVUNJANAR #MAGILPANAVARUNMAGECH #KALELKATYALAAAICHEMAN #ARUNSHOURIE #THEPARLIMENTARY SYSTEM #TRANSLATEDBOOK #ASHOKPATHARKAR #GOVERNENCE #VALVIGRASTAVRUKSHALAKATERIKUMPANVACHAVUSHAKELKA? #KALELKATYALAAAICHMAN #HESARVAAPALYALAKOTHEGHEVUNJANAR?
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 19-12-2015

    शौरी, दु:खभोग आणि देव... तो चालू शकत नाही. एवढंच काय तो उभाही राहू शकत नाही. उजवा हात काम करत नाही. त्याला फक्त एखादाच शब्दोच्चार करता येतो. त्याचे वडील त्याला चिडून म्हणतात, ‘‘तुझ्यामुळे आमच्या घरात दु:ख आलेय, स्वत:कडे बघ... अशक्त, परावलंबी, तोंडातन लाळ गळतीय, काऽही कामाचा नाही्र्र्र’’ वडील त्याच्यावर ओरडताहेत, शिव्यांची लाखोली वाहताहेत, त्याला मारहाण करताहेत, काळंनिळं होईपर्यंत झोडपताहेत... अशा पित्याबद्दल तुम्हाला काय वाटेल? तुम्ही पोलिसात किंवा तत्सम अधिकारी संस्थेकडे त्याची तक्रार नोंदवून त्याला अटक करायला लावाल ना? त्या मुलाला बापाच्या तावडीतून सोडवण्यासाठी तुम्ही तुम्हाला शक्य ते सगळं काही कराल ना? पण पिता म्हणजे जर तो .... असेल तर? म्हणजेच हा ‘पिता’ म्हणजे ‘देव’ असेल तर? हे कळताच आपल्यापैकी बऱ्याच जणांचा दृष्टिकोन अचानक का बदलतो? अचानक ते म्हणू लागतात, की देवानं असे करण्याला नक्कीच काहीतरी कारण असणार? अचानक ते त्या बिचाऱ्या मुलाच्या माथी खापर फोडू लागतात; त्या मुलानं मागच्या जन्मी काहीतरी भयंकर केलं असणार, त्यामुळे त्याच्या वाट्याला असे हाल आले आहे... वरील परिच्छेद आहे अरुण शौरी लिखित Does he know a mother’s heart? या पुस्तकातला. पुस्तकाची सुरुवात होते तीच मुळी, ‘हा अत्याचारी पिता म्हणजे ‘देव’ असेल तर?’ अशा हृदयभेदी आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करणाऱ्या या प्रश्नाने! आणि वरील परिच्छेदात उल्लेख केलेलं असहाय मूल म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून, अरुण शौरी व त्यांची पत्नी अनिता यांचा पस्तिशीतला मुलगा आदित्य! (प्रेमाने त्याला आदित म्हणतात) वेळेआधी जन्माला आलेले हे बाळ, जेमतेम चार पौंडाचं, यातनांच्या आवर्तात, काचेच्या पेटीत ठेवलेलं. त्यांच्या इवलुशा हाताची शिर सापडत नव्हती म्हणून डॉक्टरांनी म्हणून डॉक्टरांनी त्याच्या डोक्याच्या त्वचेत सुया खुपसल्या होत्या... इनक्युबेटरमध्ये ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आदितला मेंदूचा पक्षाघात झाला होता. याचा परिणाम म्हणजे आदित जन्मभरासाठी परावलंबी बनला होता. एवढेच नव्हे तर फिटस् येणे, डोळ्यांशी निगडीत अत्यंत वेदनादायी दुखणी होणे यांसारखे बरेच काही आदितला सोसावे लागत होते आणि आपल्या गोळ्याला असे यातनांच्या आवर्तात पाहताना शौरी व त्यांची पत्नी अनितावर क्षणोक्षणी मानसिक आघात होत होते. हे सारे कमी होते म्हणून की काय, वयाच्या केवळ बेचाळिसाव्या वर्षी अनिताला पार्किन्सन आजार झाल्याचे निदान झाले! प्रत्येक दिवस हा शौरी कुटुंबीयांसाठी जणू एक आव्हानच. परंतु या साऱ्याला त्यांनी कसे धीराने तोंड दिले. त्यांच्या या संघर्षमय प्रवासात काही व्यक्तींनी अगदी देवदूताप्रमाणे कशी मदत केली आणि हळूहळू परिस्थितीशी दोन हात करायला ते कसे शिकले, याचे वर्णन करणाऱ्या पुस्तकाचा पहिला अध्याय आहे. पुस्तकाचे शीर्षक, मुखपृष्ठ, अर्पणपत्रिका आणि पुस्तकाचा हा प्रथम अध्याय यावरून असे वाटते, की आदितचं दुखणं आणि त्यास अनुषांगिक एकंदरच शौरी कुटुंबीयांनी दिलेला जिद्दीचा लढा हाच पुस्तकाचा मूळ विषय आहे. परंतु पुस्तकाचे लेखक श्री. अरुण शौरी आहेत. ‘इंडियन एक्सप्रेस’ या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्राचे एकेकाळचे मुख्य संपादक, ‘मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड’, ‘दादाभाई नौरोजी अ‍ॅवॉर्ड’, ‘फ्रीडम टू पब्लिश अ‍ॅवॉर्ड’, ‘अ‍ॅस्टर अ‍ॅवॉर्ड’, ‘पद्मभूषण’ आणि अशा अनेक सन्मानांनी विभूषित अरुण शौरी! असे थोर व्यक्तिमत्त्व केवळ वैयक्तिक दु:खांचे कथन करण्याकरिता पुस्तकाचा प्रपंच नक्कीच मांडणार नाहीत. आदितचं दुखणं ही केवळ पार्श्वभूमी आहे. जसजसे आपण पुढे वाचत जातो, तसतसे हे पुस्तक आपल्याला अधिकाधिक गहन आणि मूलभूत प्रश्नांकडे नेत जाते; जर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान शिवाय दयाघन परमेश्वर असेल, तर प्रचंड दु:खभोग इतक्या प्रमाणात कसे काय दिसले असते? आपले पवित्र धर्मग्रंथ या दु:खभोगांचे स्पष्टीकरण कसे करतात? द्याव्या लागणाऱ्या सत्त्वपरिक्षेपुढे ही स्पष्टीकरणे टिकाव धरतात का? निर्मितीच्या क्षणी एखाद्या व्यक्तिची कोणतीच सत्कर्म अथवा दुष्कर्म नसूनही देव असमान क्षमता व प्रवृत्ती कशा काय बहाल करतो? ब्रह्म वा वैश्विक तत्त्व वा परमेश्वर यांनी त्या व्यक्तीला जे करायला लावलं, त्याबद्दल त्या व्यक्तीला शिक्षा का होते? यांसारख्या असंख्य प्रश्नांच्या संदर्भात हिंदू, मुस्लीम, खिस्ती आणि बौद्ध धर्मांचे काय म्हणणे आहे हे संक्षिप्त स्वरूपात पुस्तकामध्ये उद्घृत केलेले आहे. तसेच थोरा-मोठ्यांची, तत्त्ववेत्यांची, साधू-संतांची यासंबंधीची मतेही दिली आहेत. विविध धर्मांच्या पवित्र ग्रंथांमध्ये दु:खभोगांबद्दल जी स्पष्टीकरणे दिली गेली आहेत ती समाधानकारक ठरतात का? शौरींना अखेर कोणत्या धर्मात त्यातल्यात्यात दिलासाजनक उत्तरे सापडतात? गूढ आणि ज्यास आपण ‘आध्यात्मिक अनुभव’ म्हणतो त्याविषयी न्युरोसायंटिस्ट आणि मानसशास्त्रज्ञ कशा प्रकारे अभ्यास करीत आहेत? त्यांचे याबद्दल काय म्हणणे आहे? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकामध्ये मिळतील. अखेर आपल्या दु:खभोगांच्या काळोखात कुढत न बसता त्यास विधायक वळण कसे लावता येईल, या विषयी शौरी यांनी काही अतिशय उद्बोधक असे धडे आहेत. विशेषकरून आपल्यापैकी ज्या कोणाला शौरींप्रमाणेच जिवाभावच्या व्यक्तीचे दीर्घकालीन आजारपण, असहायता पाहावी लागली असेल, त्याची सेवा करावी लागत असेल, अशांना तर शौरींनी दिलेले हे धडे फारच उपकारक ठरतील. एकीकडे आदितची विकलांगता आणि आदितसह एकंदरच शौरी कुटुंबीयांनी त्यांच्या पदरी आलेल्या दु:खभोगाशी दिलेला सन्मानपूर्वक लढा, तर दुसरीकडे दु:ख भोगांबद्दलचे धर्मपर विवेचन, असे दोन्ही विषय पुस्तकात एकत्रितपणे हाताळल्यामुळे दोहोंस परस्परांमुळे वेगळेच परिणाम प्राप्त झाले आहे. पुस्तकामध्ये शौरींनी धर्मनिष्ठांविषयी केलेल्या उहापोहापैकी आपल्याला त्यांची सारीच मते पटतील असे नाही. किंबहुना पटतील की नाही हा मुद्दा निराळा आहे. परंतु त्यांची मते, त्यांनी उबे केलेले प्रश्न यांमुळे आपण विचार प्रवृत्त होऊ हे मत निश्चिंत. शिवाय आपल्या पैकी ज्यांनी कोणी अशाप्रकारच्या विचार मंथनास यापूर्वीच प्रारंभ केला असेल, त्यास विचारांची काही नवी दालने खुली होऊ शकतील. तर अशा या विचारास चालना देणाऱ्या पुस्तकाचा अनुवाद करून मराठी वाचकास उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम ‘सुप्रिया वकील’ यांचे मन:पूर्वक अभिनंदन. अखेर एक गोष्ट नमूद करावी वाटते शौरींनी प्रश्न केल्याप्रमाणे देवाला आईचे मन कळते की नाही ह्याचे उत्तर कदाचित आपल्याला ठाऊक नसेल; परंतु आपण पुस्तकाचे अंतिम पृष्ठ वाचून पुस्तक खाली ठेवतो तोपर्यंत आपल्याला एका बापाच्या काळजाबद्दल मात्र खूप काही कळलेले असते. ...Read more

  • Rating StarDr.Sunilkumar Lawate, Daily Lokmat 31-3-17

    हे पुस्तक अरुण शौरी यांच्या जीवनातील एका घटनेचे सविस्तर विवेचन आहे. त्याला वास्तवाचे कोंदण आहे. अन् चिंतनाची झालरही. शौरींचे मूळ कुटुंब पाकिस्तानातले. भारत-पाकिस्तान विभाजन सन १९४७ मध्ये झाले. तेव्हा जे हजारो लोक भारताच्या ओढीने परतले त्यापैकी हे एक.अरुण शौरी प्रतिवूâल परिस्थितीत शिकत मोठे झाले. विवाह झाला. संसाराची नऊ वर्षे स्वर्ग सुखाची गेली. बाळाच्या ओढीने त्यांनी एका जिवाला जन्म दिला. बाळ सातव्या महिन्यातच जन्मले. खरे तर नैसर्गिक जन्मापूर्वीच बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्याने मुदतपूर्व जन्माला घालावे लागते. जन्मलेले बाळ अवघे चार पौंडाचे असते. जन्मजात यातनांच्या गर्तेत, आवर्तनात सापडलेले हे बाळ वाचविण्यासाठी त्याला काचेच्या पेटीत ठेवण्यात येते. त्याला वाचविण्यासाठी हाताची शिर सापडत नाही म्हणून जन्मजात बाळास डोक्यात सुया खोचल्या जातात. बाळाची साखरेची पातळी अस्थिर म्हणून रक्त चढविले जाते. असे महिनाभर जीव वाचविण्यासाठी पालकांना आटापिटा डॉक्टरानांही असह्य होतो. एक हितचिंतक या पालकांना एका क्षणी कठोर सत्य सांगून मोकळे होतात...‘हे मूल तुमचे आयुष्य संपवेल . पूर्ण आयुष्य. तुम्हाला हा असा मुलगा जगावा असे गांर्भीयाने वाटते का?’ बाळाची आजी निक्षून सांगत होती, असे काही नाही, आता अपंग मुले सुद्धा अगदी सक्षम आयुष्य जगतात. बाळाला जीवदान मिळते खरे, पण ते त्याला अन् पालकांना एक जीवघेणे आयुष्य बहाल करते. पुढे बाळाला मेंदूचा पक्षाघात होतो. तो सात वर्षांचा होतो. तर शाळेत यक्षप्रश्न उभारतो. स्पॅस्टिक (प्लास्टिक नव्हे) मुलांच्या शाळेचा शोध सुरु होतो. शाळा मिळते एकदाची., पण पालकांसाठी रात्रंदिनी युद्धाचा प्रसंग. बाळाला आई रोज गाडीतून घेऊन जायची. एकदा त्यांच्या गाडीला एक जीपनी उडविले. बाळ आणि आई दोन्ही जखमी झाले. अपघातात बाळाच्या आईचे दोन्ही खांदे धरले ते कायमचेच. पुढे त्याचे रुपांतर पार्विâन्सन्समध्ये झाले. तेही वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी. आता अरुण शौरी घरातले ‘सर्वसेवक’ झाले. कल्पनासुद्धा करता येणार नाही असे असह्य आघात झेलत अरुण शौरी अविचल मनोधैर्याने आयुष्याला कसे सामोरे जात राहिले त्याचे हृदयद्रावक आत्मकथन म्हणजे ‘कळेल का ‘त्याला’ आईचं मन?’ हा एक आपदग्रस्त बापाचा व्यक्तिगत असला तरी त्याला एका सामूहिक हुंकार, हुंदक्यांचे रुप येऊन गेले आहे. अशा शरणागत क्षणी बुद्धिजीवी, बुद्धिवंतांची प्रज्ञाही गुंग होऊन जाते. मग तो कधी ईश्वर शरण, कधी नशीबवादी, कधी बुवाबाजीच्याही आहारी जातो. पण, सरतेशेवटी शौरींसारखी शहाणीसुरती माणसे दुःखभोगाचे विश्लेषण करण्यातून आयुष्याचा वस्तुनिष्ठ धांडोळा घेणे श्रेयस्कर समजतात. पूर्वार्ध बाळ जन्मास समर्पित आहे. मध्यभाग सुमारे ३०० पृष्ठांचा असून त्यात अरुण शौरींनी ‘जुना करार’ आणि ‘कुराण’ मधील धर्मचर्चेद्वारे जीवनातील ऐहिक घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. संकटग्रस्त स्थितीत सामान्य माणूस दैवाधिन होतो, पण शौरींसारखा विचारवंत अदैवी स्पष्टीकरणातून आपल्या मनाची कवाडे खुली करीत दुःखभोगाचे स्वरूप स्पष्ट करतो. हे पुस्तक रुढ अर्थाने वाचनीय नसून विचारणीय आहे. वेदेनेचे नवे तत्त्वज्ञान म्हणून या पुस्तकाकडे पाहावे लागते. हे जरुरी नाही की कुणी शौरींच्या मताशी सहमत व्हावे, पण एक निश्तिच की, हे पुस्तक वाचणारा प्रत्येकजण त्यांच्या दुःखाचा नातलग जरुर होऊन जातो. आयुष्यातला दुःखभोग काय असतो? सेवा, धर्म, कर्तव्य, विधायक, उन्नयन, जीवन कौशल्य, त्याग, समपर्ण, शिक्षण आघात काय असते? याचे उत्तर ज्याने आपल्या ववूâब अन् क्षमतेनीच घ्यायचे. मी बालकल्याण संकुलात अनाथ, निराधार बालकांचे संगोपन, पुनर्वसन कार्य करताना आलेल्या एका प्रसंगाची आठवण मला या पुस्तकाने करून दिली. मी संस्था कार्यालयात काम करीत होतो नि पोलिस पार्टी एक वॉरंट घेऊन आली. ‘एस.टी. स्टँडवर एक लोळागोळा मुलगा पडलाय. चला, ताब्यात घ्या, चला. ‘मी अधिकारी, काळजीवाहक गेलो. मुलाला आम्हाला नेणे शक्य नव्हते म्हणून सरकारी दवाखान्यातून रुग्णवाहिका मागविली. ती नव्हती म्हणून पोस्टमार्टमसाठी आलेली शववाहिका बदली म्हणून आली. ती सूचक होती का का कुणास ठाऊक? पण, दवााखान्यात डॉ. रा.अ.पाठक तेव्हा सिव्हिल सर्जन होते. मोठे रुग्णप्रेमी व सेवाधर्मी डॉक्टर. तपासून मला म्हणाले की, ‘डॉक्टर, इसको यही रखना पडेगा. यह तो बेजान है.’ आम्ही त्याचे ‘मानस’ नाव ठेवले. त्याला सलाईन, पुढे पेज ती पण नळीतूनच भरवत जगवत राहिलो होतो. तो जिवंत असेपर्यंत आमची शर्थ वर्णातच हरली. आम्ही त्याला नाही वाचवू शकलो. तो मानस अरुण शौरींच्या आदित्यसारखाच होता. जुळा भाऊच म्हणा ना. अशी मुले, मुली येतच राहत होती. पुढे त्या दशकात अशा मुलांसाठी कार्य करणाNया ‘चेतना’, ‘स्वयंम्’, ‘चैतन्य’, ‘जिज्ञासा’ अशा एकामागून एक संस्था कोल्हापूर जिल्ह्यात सुरु झाल्या. मी त्यांच्याशी वेगवेगळ्या नात्यांनी जोडला गेलो होतो नि आहे. मला वाचकांना अनुभवाने सांगावेसे वाटते की, ‘कळेल का ‘त्याला’ आईचं मन?’ पुस्तक त्या सर्व तगमगीची कहाणी आहे. ज्यांच्या पोटी बहुव्यंग अपत्य जन्मते त्यांचे जीवन समस्याबहुल राहते ते, ते बाळ पदरी असेपर्यंत. ...Read more

  • Rating StarAmartya Sen March 6, 2017

    "Does He Know a Mother`s Heart?" - one of the best books I know (moving, persuasive and very far-reaching)!"

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more