* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DOES HE KNOW A MOTHERS HEART?
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184985665
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 384
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
  • Available in Combos :ARUN SHOURIE COMBO SET-9 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
YOUR NEIGHBORS HAVE A SON. HE IS NOW THIRTYFIVE YEARS OLD. GOING BY HIS AGE YOU WOULD THINK OF HIM AS A YOUNG MAN AND ON MEETING HIS MOTHER OR FATHER, WOULD ASK, ALMOST OUT OF HABIT, ‘ AND WHAT DOES THE YOUNG MAN DO ?` THAT EXPRESSION, ‘YOUNG MAN’, DOESN’T SIT WELL AS HE IS BUT A CHILD. BUT WHAT IF THE FATHER OR THE FATHER – THE ‘T’ AND ‘F’ CAPITAL, BOTH WORDS ITALICIZED? THAT IS, WHAT IF THE ‘FATHER’IN QUESTION IS ‘GOD’? WHY DO THE REACTIONS AND ANSWER CHANGE FOR SO MANY OF US?
तुमच्या शेजार्‍यांना एक मुलगा आहे. आता तो पस्तीस वर्षांचा आहे. त्याच्या वयावरून तुम्हाला वाटेल की, तो उमदा तरुण असणार. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना भेटल्यावर तुम्ही अगदी सवयीनं विचारणार, ‘‘तुमचा मुलगा काय करतो?’’ पण ‘उमदा तरुण’ हा तुमचा शब्दप्रयोग इथे योग्य ठरणार नाही, कारण तो तरुण मुलगा अजून लहान मुलासारखाच आहे. पिता, म्हणजे जर ‘तो’ – THE FATHER... यातसुद्धा ‘टी’ आणि ‘एफ’ ही दोन्ही अक्षरं ‘कॅपिटल’ आणि ‘इटॅलिक्स’मध्ये असं असेल तर? हा ‘पिता’ म्हणजे ‘देव’ असेल तर? हे कळताच आपल्यापैकी बर्‍याच जणांचा दृष्टिकोन अचानक का बदलतो?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# GOVERNANCE #HESARVAAPALYALAKOTHEGHEVUNJANAR #MAGILPANAVARUNMAGECH #KALELKATYALAAAICHEMAN #ARUNSHOURIE #THEPARLIMENTARY SYSTEM #TRANSLATEDBOOK #ASHOKPATHARKAR #GOVERNENCE #VALVIGRASTAVRUKSHALAKATERIKUMPANVACHAVUSHAKELKA? #KALELKATYALAAAICHMAN #HESARVAAPALYALAKOTHEGHEVUNJANAR?
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 19-12-2015

    शौरी, दु:खभोग आणि देव... तो चालू शकत नाही. एवढंच काय तो उभाही राहू शकत नाही. उजवा हात काम करत नाही. त्याला फक्त एखादाच शब्दोच्चार करता येतो. त्याचे वडील त्याला चिडून म्हणतात, ‘‘तुझ्यामुळे आमच्या घरात दु:ख आलेय, स्वत:कडे बघ... अशक्त, परावलंबी, तोंडातन लाळ गळतीय, काऽही कामाचा नाही्र्र्र’’ वडील त्याच्यावर ओरडताहेत, शिव्यांची लाखोली वाहताहेत, त्याला मारहाण करताहेत, काळंनिळं होईपर्यंत झोडपताहेत... अशा पित्याबद्दल तुम्हाला काय वाटेल? तुम्ही पोलिसात किंवा तत्सम अधिकारी संस्थेकडे त्याची तक्रार नोंदवून त्याला अटक करायला लावाल ना? त्या मुलाला बापाच्या तावडीतून सोडवण्यासाठी तुम्ही तुम्हाला शक्य ते सगळं काही कराल ना? पण पिता म्हणजे जर तो .... असेल तर? म्हणजेच हा ‘पिता’ म्हणजे ‘देव’ असेल तर? हे कळताच आपल्यापैकी बऱ्याच जणांचा दृष्टिकोन अचानक का बदलतो? अचानक ते म्हणू लागतात, की देवानं असे करण्याला नक्कीच काहीतरी कारण असणार? अचानक ते त्या बिचाऱ्या मुलाच्या माथी खापर फोडू लागतात; त्या मुलानं मागच्या जन्मी काहीतरी भयंकर केलं असणार, त्यामुळे त्याच्या वाट्याला असे हाल आले आहे... वरील परिच्छेद आहे अरुण शौरी लिखित Does he know a mother’s heart? या पुस्तकातला. पुस्तकाची सुरुवात होते तीच मुळी, ‘हा अत्याचारी पिता म्हणजे ‘देव’ असेल तर?’ अशा हृदयभेदी आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करणाऱ्या या प्रश्नाने! आणि वरील परिच्छेदात उल्लेख केलेलं असहाय मूल म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून, अरुण शौरी व त्यांची पत्नी अनिता यांचा पस्तिशीतला मुलगा आदित्य! (प्रेमाने त्याला आदित म्हणतात) वेळेआधी जन्माला आलेले हे बाळ, जेमतेम चार पौंडाचं, यातनांच्या आवर्तात, काचेच्या पेटीत ठेवलेलं. त्यांच्या इवलुशा हाताची शिर सापडत नव्हती म्हणून डॉक्टरांनी म्हणून डॉक्टरांनी त्याच्या डोक्याच्या त्वचेत सुया खुपसल्या होत्या... इनक्युबेटरमध्ये ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आदितला मेंदूचा पक्षाघात झाला होता. याचा परिणाम म्हणजे आदित जन्मभरासाठी परावलंबी बनला होता. एवढेच नव्हे तर फिटस् येणे, डोळ्यांशी निगडीत अत्यंत वेदनादायी दुखणी होणे यांसारखे बरेच काही आदितला सोसावे लागत होते आणि आपल्या गोळ्याला असे यातनांच्या आवर्तात पाहताना शौरी व त्यांची पत्नी अनितावर क्षणोक्षणी मानसिक आघात होत होते. हे सारे कमी होते म्हणून की काय, वयाच्या केवळ बेचाळिसाव्या वर्षी अनिताला पार्किन्सन आजार झाल्याचे निदान झाले! प्रत्येक दिवस हा शौरी कुटुंबीयांसाठी जणू एक आव्हानच. परंतु या साऱ्याला त्यांनी कसे धीराने तोंड दिले. त्यांच्या या संघर्षमय प्रवासात काही व्यक्तींनी अगदी देवदूताप्रमाणे कशी मदत केली आणि हळूहळू परिस्थितीशी दोन हात करायला ते कसे शिकले, याचे वर्णन करणाऱ्या पुस्तकाचा पहिला अध्याय आहे. पुस्तकाचे शीर्षक, मुखपृष्ठ, अर्पणपत्रिका आणि पुस्तकाचा हा प्रथम अध्याय यावरून असे वाटते, की आदितचं दुखणं आणि त्यास अनुषांगिक एकंदरच शौरी कुटुंबीयांनी दिलेला जिद्दीचा लढा हाच पुस्तकाचा मूळ विषय आहे. परंतु पुस्तकाचे लेखक श्री. अरुण शौरी आहेत. ‘इंडियन एक्सप्रेस’ या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्राचे एकेकाळचे मुख्य संपादक, ‘मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड’, ‘दादाभाई नौरोजी अ‍ॅवॉर्ड’, ‘फ्रीडम टू पब्लिश अ‍ॅवॉर्ड’, ‘अ‍ॅस्टर अ‍ॅवॉर्ड’, ‘पद्मभूषण’ आणि अशा अनेक सन्मानांनी विभूषित अरुण शौरी! असे थोर व्यक्तिमत्त्व केवळ वैयक्तिक दु:खांचे कथन करण्याकरिता पुस्तकाचा प्रपंच नक्कीच मांडणार नाहीत. आदितचं दुखणं ही केवळ पार्श्वभूमी आहे. जसजसे आपण पुढे वाचत जातो, तसतसे हे पुस्तक आपल्याला अधिकाधिक गहन आणि मूलभूत प्रश्नांकडे नेत जाते; जर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान शिवाय दयाघन परमेश्वर असेल, तर प्रचंड दु:खभोग इतक्या प्रमाणात कसे काय दिसले असते? आपले पवित्र धर्मग्रंथ या दु:खभोगांचे स्पष्टीकरण कसे करतात? द्याव्या लागणाऱ्या सत्त्वपरिक्षेपुढे ही स्पष्टीकरणे टिकाव धरतात का? निर्मितीच्या क्षणी एखाद्या व्यक्तिची कोणतीच सत्कर्म अथवा दुष्कर्म नसूनही देव असमान क्षमता व प्रवृत्ती कशा काय बहाल करतो? ब्रह्म वा वैश्विक तत्त्व वा परमेश्वर यांनी त्या व्यक्तीला जे करायला लावलं, त्याबद्दल त्या व्यक्तीला शिक्षा का होते? यांसारख्या असंख्य प्रश्नांच्या संदर्भात हिंदू, मुस्लीम, खिस्ती आणि बौद्ध धर्मांचे काय म्हणणे आहे हे संक्षिप्त स्वरूपात पुस्तकामध्ये उद्घृत केलेले आहे. तसेच थोरा-मोठ्यांची, तत्त्ववेत्यांची, साधू-संतांची यासंबंधीची मतेही दिली आहेत. विविध धर्मांच्या पवित्र ग्रंथांमध्ये दु:खभोगांबद्दल जी स्पष्टीकरणे दिली गेली आहेत ती समाधानकारक ठरतात का? शौरींना अखेर कोणत्या धर्मात त्यातल्यात्यात दिलासाजनक उत्तरे सापडतात? गूढ आणि ज्यास आपण ‘आध्यात्मिक अनुभव’ म्हणतो त्याविषयी न्युरोसायंटिस्ट आणि मानसशास्त्रज्ञ कशा प्रकारे अभ्यास करीत आहेत? त्यांचे याबद्दल काय म्हणणे आहे? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकामध्ये मिळतील. अखेर आपल्या दु:खभोगांच्या काळोखात कुढत न बसता त्यास विधायक वळण कसे लावता येईल, या विषयी शौरी यांनी काही अतिशय उद्बोधक असे धडे आहेत. विशेषकरून आपल्यापैकी ज्या कोणाला शौरींप्रमाणेच जिवाभावच्या व्यक्तीचे दीर्घकालीन आजारपण, असहायता पाहावी लागली असेल, त्याची सेवा करावी लागत असेल, अशांना तर शौरींनी दिलेले हे धडे फारच उपकारक ठरतील. एकीकडे आदितची विकलांगता आणि आदितसह एकंदरच शौरी कुटुंबीयांनी त्यांच्या पदरी आलेल्या दु:खभोगाशी दिलेला सन्मानपूर्वक लढा, तर दुसरीकडे दु:ख भोगांबद्दलचे धर्मपर विवेचन, असे दोन्ही विषय पुस्तकात एकत्रितपणे हाताळल्यामुळे दोहोंस परस्परांमुळे वेगळेच परिणाम प्राप्त झाले आहे. पुस्तकामध्ये शौरींनी धर्मनिष्ठांविषयी केलेल्या उहापोहापैकी आपल्याला त्यांची सारीच मते पटतील असे नाही. किंबहुना पटतील की नाही हा मुद्दा निराळा आहे. परंतु त्यांची मते, त्यांनी उबे केलेले प्रश्न यांमुळे आपण विचार प्रवृत्त होऊ हे मत निश्चिंत. शिवाय आपल्या पैकी ज्यांनी कोणी अशाप्रकारच्या विचार मंथनास यापूर्वीच प्रारंभ केला असेल, त्यास विचारांची काही नवी दालने खुली होऊ शकतील. तर अशा या विचारास चालना देणाऱ्या पुस्तकाचा अनुवाद करून मराठी वाचकास उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम ‘सुप्रिया वकील’ यांचे मन:पूर्वक अभिनंदन. अखेर एक गोष्ट नमूद करावी वाटते शौरींनी प्रश्न केल्याप्रमाणे देवाला आईचे मन कळते की नाही ह्याचे उत्तर कदाचित आपल्याला ठाऊक नसेल; परंतु आपण पुस्तकाचे अंतिम पृष्ठ वाचून पुस्तक खाली ठेवतो तोपर्यंत आपल्याला एका बापाच्या काळजाबद्दल मात्र खूप काही कळलेले असते. ...Read more

  • Rating StarDr.Sunilkumar Lawate, Daily Lokmat 31-3-17

    हे पुस्तक अरुण शौरी यांच्या जीवनातील एका घटनेचे सविस्तर विवेचन आहे. त्याला वास्तवाचे कोंदण आहे. अन् चिंतनाची झालरही. शौरींचे मूळ कुटुंब पाकिस्तानातले. भारत-पाकिस्तान विभाजन सन १९४७ मध्ये झाले. तेव्हा जे हजारो लोक भारताच्या ओढीने परतले त्यापैकी हे एक.अरुण शौरी प्रतिवूâल परिस्थितीत शिकत मोठे झाले. विवाह झाला. संसाराची नऊ वर्षे स्वर्ग सुखाची गेली. बाळाच्या ओढीने त्यांनी एका जिवाला जन्म दिला. बाळ सातव्या महिन्यातच जन्मले. खरे तर नैसर्गिक जन्मापूर्वीच बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्याने मुदतपूर्व जन्माला घालावे लागते. जन्मलेले बाळ अवघे चार पौंडाचे असते. जन्मजात यातनांच्या गर्तेत, आवर्तनात सापडलेले हे बाळ वाचविण्यासाठी त्याला काचेच्या पेटीत ठेवण्यात येते. त्याला वाचविण्यासाठी हाताची शिर सापडत नाही म्हणून जन्मजात बाळास डोक्यात सुया खोचल्या जातात. बाळाची साखरेची पातळी अस्थिर म्हणून रक्त चढविले जाते. असे महिनाभर जीव वाचविण्यासाठी पालकांना आटापिटा डॉक्टरानांही असह्य होतो. एक हितचिंतक या पालकांना एका क्षणी कठोर सत्य सांगून मोकळे होतात...‘हे मूल तुमचे आयुष्य संपवेल . पूर्ण आयुष्य. तुम्हाला हा असा मुलगा जगावा असे गांर्भीयाने वाटते का?’ बाळाची आजी निक्षून सांगत होती, असे काही नाही, आता अपंग मुले सुद्धा अगदी सक्षम आयुष्य जगतात. बाळाला जीवदान मिळते खरे, पण ते त्याला अन् पालकांना एक जीवघेणे आयुष्य बहाल करते. पुढे बाळाला मेंदूचा पक्षाघात होतो. तो सात वर्षांचा होतो. तर शाळेत यक्षप्रश्न उभारतो. स्पॅस्टिक (प्लास्टिक नव्हे) मुलांच्या शाळेचा शोध सुरु होतो. शाळा मिळते एकदाची., पण पालकांसाठी रात्रंदिनी युद्धाचा प्रसंग. बाळाला आई रोज गाडीतून घेऊन जायची. एकदा त्यांच्या गाडीला एक जीपनी उडविले. बाळ आणि आई दोन्ही जखमी झाले. अपघातात बाळाच्या आईचे दोन्ही खांदे धरले ते कायमचेच. पुढे त्याचे रुपांतर पार्विâन्सन्समध्ये झाले. तेही वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी. आता अरुण शौरी घरातले ‘सर्वसेवक’ झाले. कल्पनासुद्धा करता येणार नाही असे असह्य आघात झेलत अरुण शौरी अविचल मनोधैर्याने आयुष्याला कसे सामोरे जात राहिले त्याचे हृदयद्रावक आत्मकथन म्हणजे ‘कळेल का ‘त्याला’ आईचं मन?’ हा एक आपदग्रस्त बापाचा व्यक्तिगत असला तरी त्याला एका सामूहिक हुंकार, हुंदक्यांचे रुप येऊन गेले आहे. अशा शरणागत क्षणी बुद्धिजीवी, बुद्धिवंतांची प्रज्ञाही गुंग होऊन जाते. मग तो कधी ईश्वर शरण, कधी नशीबवादी, कधी बुवाबाजीच्याही आहारी जातो. पण, सरतेशेवटी शौरींसारखी शहाणीसुरती माणसे दुःखभोगाचे विश्लेषण करण्यातून आयुष्याचा वस्तुनिष्ठ धांडोळा घेणे श्रेयस्कर समजतात. पूर्वार्ध बाळ जन्मास समर्पित आहे. मध्यभाग सुमारे ३०० पृष्ठांचा असून त्यात अरुण शौरींनी ‘जुना करार’ आणि ‘कुराण’ मधील धर्मचर्चेद्वारे जीवनातील ऐहिक घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. संकटग्रस्त स्थितीत सामान्य माणूस दैवाधिन होतो, पण शौरींसारखा विचारवंत अदैवी स्पष्टीकरणातून आपल्या मनाची कवाडे खुली करीत दुःखभोगाचे स्वरूप स्पष्ट करतो. हे पुस्तक रुढ अर्थाने वाचनीय नसून विचारणीय आहे. वेदेनेचे नवे तत्त्वज्ञान म्हणून या पुस्तकाकडे पाहावे लागते. हे जरुरी नाही की कुणी शौरींच्या मताशी सहमत व्हावे, पण एक निश्तिच की, हे पुस्तक वाचणारा प्रत्येकजण त्यांच्या दुःखाचा नातलग जरुर होऊन जातो. आयुष्यातला दुःखभोग काय असतो? सेवा, धर्म, कर्तव्य, विधायक, उन्नयन, जीवन कौशल्य, त्याग, समपर्ण, शिक्षण आघात काय असते? याचे उत्तर ज्याने आपल्या ववूâब अन् क्षमतेनीच घ्यायचे. मी बालकल्याण संकुलात अनाथ, निराधार बालकांचे संगोपन, पुनर्वसन कार्य करताना आलेल्या एका प्रसंगाची आठवण मला या पुस्तकाने करून दिली. मी संस्था कार्यालयात काम करीत होतो नि पोलिस पार्टी एक वॉरंट घेऊन आली. ‘एस.टी. स्टँडवर एक लोळागोळा मुलगा पडलाय. चला, ताब्यात घ्या, चला. ‘मी अधिकारी, काळजीवाहक गेलो. मुलाला आम्हाला नेणे शक्य नव्हते म्हणून सरकारी दवाखान्यातून रुग्णवाहिका मागविली. ती नव्हती म्हणून पोस्टमार्टमसाठी आलेली शववाहिका बदली म्हणून आली. ती सूचक होती का का कुणास ठाऊक? पण, दवााखान्यात डॉ. रा.अ.पाठक तेव्हा सिव्हिल सर्जन होते. मोठे रुग्णप्रेमी व सेवाधर्मी डॉक्टर. तपासून मला म्हणाले की, ‘डॉक्टर, इसको यही रखना पडेगा. यह तो बेजान है.’ आम्ही त्याचे ‘मानस’ नाव ठेवले. त्याला सलाईन, पुढे पेज ती पण नळीतूनच भरवत जगवत राहिलो होतो. तो जिवंत असेपर्यंत आमची शर्थ वर्णातच हरली. आम्ही त्याला नाही वाचवू शकलो. तो मानस अरुण शौरींच्या आदित्यसारखाच होता. जुळा भाऊच म्हणा ना. अशी मुले, मुली येतच राहत होती. पुढे त्या दशकात अशा मुलांसाठी कार्य करणाNया ‘चेतना’, ‘स्वयंम्’, ‘चैतन्य’, ‘जिज्ञासा’ अशा एकामागून एक संस्था कोल्हापूर जिल्ह्यात सुरु झाल्या. मी त्यांच्याशी वेगवेगळ्या नात्यांनी जोडला गेलो होतो नि आहे. मला वाचकांना अनुभवाने सांगावेसे वाटते की, ‘कळेल का ‘त्याला’ आईचं मन?’ पुस्तक त्या सर्व तगमगीची कहाणी आहे. ज्यांच्या पोटी बहुव्यंग अपत्य जन्मते त्यांचे जीवन समस्याबहुल राहते ते, ते बाळ पदरी असेपर्यंत. ...Read more

  • Rating StarAmartya Sen March 6, 2017

    "Does He Know a Mother`s Heart?" - one of the best books I know (moving, persuasive and very far-reaching)!"

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more