* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: OUT OF IRAN
  • Availability : Available
  • Translators : VIDULA TOKEKAR
  • ISBN : 9788184980745
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 296
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
BORN INTO THE WEALTHY, WESTERNIZED ELITE OF THE SHAH`S IRAN, SOUSAN AZADI GREW UP IN LUXURY. IN HER PRIVILEGED CIRCLES THE THUNDER OF APPROACHING REVOLUTION WAS EASY TO IGNORE. THEN THE SHAH FELL AND IN THE TERRIFYING NEW FUNDAMENTALIST REGIME OF AYATOLLAH KHOMEINI SOUSAN AND HER FRIENDS WERE BRANDED TAGHOUTI, DEVIL`S FOLLOWERS. THEY WERE HUNTED, THEIR CHILDREN BRAINWASHED, THEIR PROPERTY CONFISCATED. ALON WITH HER SON AFTER THE DEATH OF HER HUSBAND, SOUSAN BECAME AN EASY TARGET. SHE WAS FLUNG INTO JAIL, WHERE SHE WITNESSED TERRIBLE SUFFERING INFLICTED IN THE NAME OF `IMMODEST BEHAVIOUR` AND `INDECENCY`. ONLY WHEN SHE CAUGHT THE EYE OF A MULLAH, WHO CLEARLY EXPECTED SEXUAL FAVOURS IN RETURN, DID SHE ESCAPE. BUT REAL FREEDOM STILL LAY BEYOND THE SNOW-CAPPED ZAGROS MOUNTAINS, IN TURKEY - A HAZARDOUS ROUTE FOR A WOMAN AND CHILD TO TAKE. OUT OF IRAN GRIPS AND INVOLVES THE READER AS IT RECOUNTS ONE WOMAN`S COURAGEOUS STRUGGLE FOR SURVIVAL IN FANATICAL WAR-TORN IRAN.
शाहच्या इराणमध्ये, श्रीमंत, पाश्चात्याळलेल्या उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेली सुझान अगदी संपन्नतेत वाढली. तिच्या विशेष वर्तुळामुळे, येणाऱ्या क्रांतीच्या पडघमांकडे दुर्लक्ष होणं अगदी साहजिक होतं. मग शाहचा पाडाव झाला. मग अयातुल्लाह खोमेनीच्या दडपणाऱ्या, नव्या मूलतत्त्ववादी राजवटीत सुझान आणि तिच्या मित्रमंडळींवर `ताघौती` – सैतानाचे अनुयायी – असा शिक्का बसला. लोक त्यांच्या मागावर राहिले. त्यांच्या मुलांचा बुद्धिभेद केला गेला. त्यांची मालमत्ता जप्त झाली. पतीच्या मृत्यूनंतर, मुलाबरोबर एकटी राहत असलेली सुझान हे फारच `सोपं` सावज होतं. तिला उचलून तुरुंगात टाकलं गेलं. तिथे तिनं `उठवळ वागणं` आणि `असभ्यपणा` यांच्या नावाखाली विलक्षण छळवाद सोसला. एका मुल्लाची नजर तिच्यावर पडल्यानंतर त्यानं सुटकेच्या बदल्यात स्पष्टपणे शरीरसुखाची अपेक्षा व्यक्त केली. नंतर तिची सुटका झाली. पण खरं स्वातंत्र्य हिमाच्छादित झाग्रोस पर्वताच्या पलीकडे तुर्कस्तानात होतं. जिथे पोहोचण्याचा मार्ग एक स्त्री व तिच्या लहानग्यासाठी अत्यंत खडतर होता. धर्मवेड्या, युद्धभग्न इराणमधील एका स्त्रीचा जगण्यासाठीचा धीरोदात्त लढा, `इराणमधून सुटका` वाचकांना खिळवून, गुंतवून टाकतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #IRANMADHUNSUTAKA #OUTOFIRAN #इराणमधूनसुटका #MEMOIRTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIDULATOKEKAR #ANGELAFERRANTE #SOUSANAZADI "
Customer Reviews
  • Rating StarPranav Patil

    इराण मधून सुटका - सुझान आझादी , अँजेला फेरान्ते अनुवाद - विदुला टोकेकर (पुस्तक परिचय - प्रणव पाटील) इराण मधून सुटका हे पुस्तक म्हणजे गाजलेल्या `आउट आॕफ इराण ` या प्रसिध्द पुस्तकाचा अनुवाद आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठच इतकं सुंदर आे की हे पुस्तक हातात घेऊन सहज चाळता चाळता वाचायला लागलो . खरं तरं काही पुस्तकं अशी असतात की त्यात आपण येवढं गुंतून जातो की एखादा thriller चित्रपट पहावा इतक्या वेगाने कथा त्यात पळत असते. इराण मधून सुटका हे असंच पुस्तकं आहे. सुझान आझादी च्या आयुष्यावर बेतलेलं हे पुस्तक तीच्या लहानपणीच्या आठवणीने सुरु होतं. इराण मधे एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेली सुझान तत्कालीन इराणमधल्या जमिनदारी प्रथे बद्दल आणि तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुरुवातीला सांगते. पुढे ती शाळेत असताना तीची आई आजारी पडून दगावते आणि तीचं आयुष्य वेगळ्याच वळणावर जातं. शिक्षणासाठी तीला अमेरिकेत तीच्या मामाकडे पाठवण्यात येतं पुढे कॉलेज मधे खास काही कामगिरी न केल्यामुळे तीची रवानगी पुन्हा इराण ला होते. तत्कालीन शहा पहलवी या राजाच्या राजेशाहीतल्या इराणचं वर्णन तीच्या आठवणींमधे येतं. नुकतंच इराणला तेल सापडलेलं असतं आणि त्या पैशाच्या ओघामधे अनेक बांधकाम व्यवसायीक कुटुंब प्रचंड श्रीमंत झालेली असतात त्यातलंचं सुझानचे कुटुंबीय. यातच एका अतिश्रीमंत बांधकाम व्यवसायीकाशी सुझानचं लग्न होतं. लग्ना नंतर सुझानने या अतिश्रीमंतीत तीने केलेली पैशाची उधळपट्टी ,तत्कालीन इराणी कुटुंब व्यवस्था,समाज याचं सविस्तर वर्णन येतं. काही दिवसातच सुझान ला एक लहान मुलगा होतो पण तीचा पती कॕन्सर मुळे दगावतो आणि पुन्हा एकदा सुझानच्या आयुष्यात वेगळं वळण येतं. परंतु नव-याची मागे असणारी गडगंज संपत्ती या सगळ्याला आधार ठरते आणि सुझान परत एकदा सुखासीन आयुष्याकडे वळते. याच काळात इराण मधे सतत होणारी शहाच्या राजवटीच्या विरोधातली अंदोलने इराणचं राजकीय क्षेत्र ढवळून काढत असतात. पॕरिस मधला खोमेनी आणि त्याचा वाढत चाललेला प्रभाव यातून इराण मधे अखेर क्रांती होते आणि राजेशाही संपुष्टात येऊन इस्लामी शासन व्यवस्था लागू होते. यात सगळ्यात शहाच्या राजवटीतले नवश्रीमंत क्रांती नंतर बळी पडू लागतात. सुझानला मात्र हे तात्पुरतं आहे असं वाटतं पण सगळीकडे हळूहळू परिस्थिती इतकी बिघडते की सुझानलाही या काळात काही दिवस तुरुंगाची हवा खावी लागते आणि तीचे डोळे उघडतात. देशभर धर्मवेड्या क्रांती नंतर स्त्रीयांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. कधीकाळी कमी कपड्यांमधे फिरणा-या स्त्रीयांची जागा बुरखा आणि चादोर घेतलेल्या महिला घेतात. या सगळ्यातून पळून देशाबाहेर जायचं सुझान ठरवते परंतु तीच्यासाठी आपल्या लहान मुलाला घेऊन निसटणं ही सोपी गोष्ट नव्हती. या सगळ्या निसटण्याच्या थरार नाट्याचे तीने लिहून ठेवलेले अनुभव वाचताना आपणही तीच आहोत इतका जिवंतपणा आहे. या सगळ्यातून निसटून जाऊन पुढे सुझान आणि तीच्या नातेवाईकांचं काय होतं हे वाचण्यासारखंच आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK MATRUBHOOMI 3-1-10

    इराणमधून सुटका’ हे सुझान आझादी आणि अँजेला पेâरान्ते यांचे स्वानुभवावर आधारित अनुभवकथन. विदुला टोकेकर यांनी केलेला हा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. इराणमधील सामाजिक, धार्मिक संस्कृतीचा परामर्श या पुस्तकात घेतला आहे. शाहच्या इरणमध्ये श्रीमंत, पाश्चात्य संस्कृतीचा पगडा असलेल्या उच्चभ्रू कुटुंबात सुझानचा जन्म झाला. शाहचा पाडाव झाला. त्यानंतर आलेल्या खोमेनीच्या राजवटीने सुझान आणि तिच्या कुटुंबिय, आप्तेष्टांवर सैतानाचे अनुयायी असा शिक्का मारला. त्यांची मालमत्ता जप्त झाली. पतीचा मृत्यू आणि त्यानंतर मुलांमध्ये केलेला बुद्धीभेद यामुळे समाजाला सुझान हे सोपे सावज झाले होते. तिला तुरुंगात डांबण्यात आले. तिच्या वर्तनावर आक्षेप घेऊन तिचा छळ करण्यात आला. हा सगळा छळ तिने धीरोदत्तपणे सहन केला आणि इराणमधून सुटका हे आत्मकथन लिहिले. हे आत्मकथन वाचकांना गुंगवून ठेवते. झपाटून टाकते. सुझान आझादी यांचे जीवन अनेक चढ-उतारांनी बनलेले आहे. गर्भश्रीमंत माता-पित्यांच्या पोटी जन्माला आलेल्या सुझान यांचा विवाहही अशाच गर्भश्रीमंत व्यक्तीबरोबर झाला. त्यांचे वैवाहिक आयुष्य अत्यल्प ठरले. पतीच्या निधनानंतर सारसरच्या मंडळींचा जाचहाट त्यांना सहन करावा लागला. अर्थात, आर्थिक संपन्नतेच्या बाबतीत त्यांना वैâद होईपर्यंत कोणतीच विवंचना त्यांना भासली नाही. मात्र त्यानंतर इराण सोडून त्यांना परदेशात अत्यंत सामान्य जीवन जगावे लागले. एकेकाळी हजारो-लाखो डॉलर्स मुक्तहस्ते उधळणाऱ्या आझादींवर मुलासोबत सामान्य जीवन जगण्याची वेळ आली. लेखिकेने हे सर्व चढ-उतार आयातुल्ला फोमिनी यांच्या दहशतवादी राजवटीचे चित्र, नोकरशाहीची दादागिरी, भ्रष्टाचार यांचे वर्णन वास्तवदर्शी केले आहे. कथानकात वाचक अक्षरशः गुंग होऊन जातो आणि आझादीच्या जीवनपटात गुंतून जातो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more