* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MARATHESHAHITEEL MANSWINI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663891
  • Edition : 3
  • Publishing Year : 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THROUGH THIS BOOK, DR. DESHPANDE HAS TRIED TO BRING IN LIGHT SOME OF THE GREAT, CAPABLE AND COMPETENT WOMEN FROM THE `MARATHESHAHI`. HE HAS RESEARCHED THE OLD HISTORICAL DOCUMENTS MAINLY THE LETTERS WRITTEN THEN; TO CAST A LIGHT ON THE TRUTH. ALL THESE LADIES HOLD A GREAT POSITION IN THE MINDS OF THE `MARATHAS` YET EACH HAD TO FACE THE WORST TURNS OF DESTINY. THROUGH THE DRASTIC SITUATIONS THEIR SKILLS WERE TESTED. THEIR PATIENCE, THEIR TOLERANCE LEVEL, THEIR PRESENCE OF MIND, AND THEIR DETERMINATION TO TACKLE THE WORST SITUATIONS WERE TESTED. THE AUTHOR HAS DESCRIBED THIS IN A VERY SIMPLE LANGUAGE. HE HAS GIVEN APPROPRIATE HISTORICAL PRECEDENTS WHILE BRINGING THESE LADIES INTO LIMELIGHT. THE POST `PESHWAI` PERIOD HAS ALWAYS SKETCHED LADIES LIKE MASTANI AND ANANDIBAI AS VAMPS, BUT THE THEN CORRESPONDENCE REVEALS THE FACT THAT THESE TWO LADIES ARE NOT TREATED PROPERLY BY THE HISTORIANS. FOR THE FIRST TIME, THROUGH THIS BOOK, WE COME TO KNOW ABOUT THE PROUD REGIME OF JIJABAI OF KARVEER WHILE TRYING HER BEST TO PRESERVE THE KOLHAPUR SANSTHAN. HARDLY, ANYONE HAS EVER WRITTEN IN DETAIL ABOUT HER TILL TODAY. THIS BOOK ALSO REVEALS SOME NEW ASPECTS OF THE NATURE OF THE GREAT LADIES LIKE JIJABAI, THE MOTHER OF SHIVAJI; MAHARANI YESUBAI; AND MAHARANI TARABAI. THIS BOOK WILL SURELY ADD TO THE KNOWLEDGE OF HISTORY LOVERS AND STUDENTS OF HISTORY.
मराठेशाहीतील काही निवडक कर्तबगार-कर्तृत्ववान स्त्रियांचा परिचय डॉ. सुरेश देशपांडे यांनी अस्सल ऐतिहासिक साधनांचा विशेषत: तत्कालीन पत्रांचा धांडोळा घेऊन देण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केला आहे. या सर्व स्त्रियांबद्दल मराठा मंडळात मोठा पूज्यभाव होता; तथापि राजवैभव पायाशी लोटांगण घालत असतानासुद्धा नियतीने प्रत्येकीच्या जीवनात अनेक खडतर प्रसंग उभे केले. या प्रसंगांच्या वेळची त्यांची सोशिकता, सहनशीलता, प्रसंगावधान आणि नियतीवर मात करण्याची जबरदस्त जिद्द व महत्त्वाकांक्षा त्यांच्या जीवनचरित्रातून पाहावयास मिळते. डॉ. सु. र. देशपांडे यांनी अतिशय सोप्या, साध्या व ओघवत्या भाषाशैलीत, ऐतिहासिक दाखले देत ही जीवनचरित्रे शब्दबद्ध केली आहेत. उत्तर पेशवाईतील बखरकारांनी मस्तानी-आनंदीबार्इंसारख्या स्त्रियांना खलनायिका बनविले; मात्र तत्कालीन अस्सल पत्रव्यवहार आणि परिस्थितीजन्य पुरावा पाहता, या स्त्रियांवर इतिहासकारांनी अन्याय केल्याचे जाणवते. याचा परामर्श लेखकाने तत्कालीन ऐतिहासिक दाखले देऊन घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच करवीरच्या जिजाबार्इंची स्वाभिमानी कारकीर्द आणि त्यांनी कोल्हापूर संस्थानच्या संरक्षण-संवर्धनासाठी केलेली खटपट प्रस्तुत पुस्तकात प्रथमच सविस्तर आली आहे. यापूर्वी एखादा अपवाद वगळता या महाराणीवर स्वतंत्ररीत्या कुणी फारसे लिहिले नाही. तसेच शिवमाता जिजाबाई, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई या शिवकालाशी निगडित असलेल्या स्त्रियांविषयी काही नवीन माहिती उजेडात आली आहे. तिचा डॉ. देशपांडे यांनी परामर्श घेतला आहे. त्यामुळे इतिहासप्रेमी व इतिहास विषयाच्या विद्यार्थी वर्गाला आणि अभ्यासकांना हा ग्रंथ खचितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #डॉ.एस.आर.देशपांडे #DR.S.R. DESHPANDE #मराठेशाहीतील मनस्विनी #MARATHESHAHITEEL MANSWINI #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 03-01-2004

    इतिहासातील स्त्रियांचे अज्ञात पैलू… आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भरारी घेताना दिसतात. स्त्रीमुक्तीकडे वाटचाल करणारी, आजच्या म्हणजे आधुनिक काळातील स्त्री ही अधिकाधिक बंधमुक्त होत चालली आहे. अधिक स्वतंत्र, अधिक धीट, अधिक ्यापक क्षेत्रातील आव्हाने स्वीकारणाऱ्या आजच्या स्त्रीचे धडाडीचे व्यक्तिमत्व आपण आज कौतुकाने स्वीकारतो. पण अशाच धडाडीच्या शूर आणि कर्तृत्वान स्त्रिया अगदी तीन-साडेतीनशे वर्षांपूर्वी म्हणजे मध्ययुगीन कालखंडातही होत्या. कट्टर पुरुषप्रधान समाजव्यवस्थेतील या कर्तृत्ववान स्त्रिया इतिहास शिकताना आपल्याला जरूर भेटल्या. त्यातल्या काही तपशीलवारपणे समोर आल्या, तर काही केवळ ओझरत्या दिसल्या. या स्त्रिया कर्तबगार असल्यामुळे अर्थातच इतिहासप्रसिद्ध होत्या. मात्र, त्यांच्या विस्ताराने परिचय किंवा त्यांचे जीवनचरित्र आपल्या वाचनात फारसे न आल्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेले प्रवादच आपल्या अधिक स्मरणात राहतात. राजघरण्यातील किंवा श्रीमंत कुटुंबातील स्त्रिया, नाजूक, ऐतखाऊ, परावलंबी असतात, असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. मात्र मराठेशाहीतील काही लोकोत्तर स्त्रिया आपल्या वैध हक्कांसाठी, सत्तेसाठी, कर्तव्यासाठी, मुलांसाठी, स्वराज्यासाठी, वारशांसाठी संघर्ष करताना, जिवाची बाजी लावताना किंवा प्रसंगी राजकीय कटकारस्थानेही करताना दिसतात. अशा अनेक स्त्रिया मराठेशाहीत होऊन गेल्या. त्यापैकी शिवमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई, महाराणी जिजाबाई (करवीर), मस्तानी, गोपिकाबाई, आनंदीबाई, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई अशा नऊ मनस्विनी स्त्रियांचे जीवनचरित्र डॉ. सुरेश र. देशपांडे यांनी ‘मराठीशाहीतील मनस्विनी’ या पुस्तकाद्वारे वाचकांपुढे मांडले आहे. मराठेशाहीतील अस्सल ऐतिहासिक साधनांचा विशेषत: तत्कालीन पत्रांचा धांडोळा घेऊन या स्त्रियांचा परिचय करून देण्यात आला असल्यामुळे त्यांच्याविषयी काही नवी माहितीही आपल्याला या पुस्तकातून मिळते. राजवैभव पायाशी लोटांगण घालत असतानाही त्यांच्या जीवनात आलेल्या काही खडतर प्रसंगामध्ये या मनस्विनीची सोशिकता, सहनशीलता, प्रसंगावधानता, नियतीवर मात करण्याची जबरदस्त जिद्द आणि महत्त्वाकांक्षा या जीवनचरित्रातून पाहावयास मिळते. जानेवारी १६६४ मध्ये शहाजीराजांचे अपघाती निधन झाल्यावर जिजाबार्इंनी सती जाण्याचा दृढनिश्चय केला. धर्मशास्त्राचे काटेकोर पालन करणाऱ्या समाजात वाढलेल्या जिजाबार्इंनी स्वराज्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सती जाण्याचा निश्चय सोडून देण्याचा धडाडीचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे, तर औरंगजेबाने बाटविलेल्या बजाजी निंबाळकरांना पुन्हा धर्मदीक्षा देवविली. यामुळे ब्राह्मणांनी मोठा गहजब केला. त्याकडे साफ दुर्लक्ष करून बजाजीच्या मुलाशी आपल्या नातीची सोयरिक घडवून आणखी एक प्रागतिक पाऊन टाकले. ही घटना सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीची आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐन वैभवकाळात वीरस्नुषा म्हणून भोसले घराण्यात प्रविष्ट झालेली, महाराणी होऊनही ऐन उमेदीची हयात काबाडकष्टांत, पारतंत्र्यात, तुरुंगात व्यतीत करणारी, खडतर जीवनाला सामोरी जाऊन राजकीय संक्रमणाच्या अवस्थेत आपल्या पराक्रमी, पण तापट स्वभावाच्या पतीमागे छायेप्रमाणे एकदिलाने उभी राहिलेली आणि आप्तस्वकियांचा रोष सांभाळून आपल्या परीने चोख राज्यव्यवहार करणारी महाराणी येसूबाई या पुस्तकात आपल्याला भेटते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर विखुरलेल्या मराठी घराण्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा अथक प्रयत्न करणारी महाराणी ताराबाई आजच्या राजकाराणात सहभागी झालेल्या महिलांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणारी आहे. युद्धक्षेत्र असो वा राज्यकारभार - या दोन्हीवर ताराबार्इंनी जबरदस्त पकड बसविली होती. शक्य तितका किल्ला लढवून मनुष्यहानी टाळायची. शिबंदी संपत आली की वाटाघाटी सुरू करून शत्रूला गुंतवून ठेवायचे आणि वेळ आलीच तर भरपूर पैसे घेऊन नंतरच किल्ला शत्रूच्या स्वाधीन करायचा... किल्ला जिंकल्याचा आनंदशत्रूला उपभोगू द्यायचा नाही, असे ताराबार्इंचे धोरण होते. हंबीरराव मोहिते या सेनापतीची ही कन्या; पण विवाहनंतर तिच्या पदरी नजरकैदच आली. नवऱ्याचा सहवास जेमतेम सात-आठ वर्षे लाभलेल्या या महाराणीने जिद्द, जबरदस्त महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर औरंगजेबासारख्या बलाड्य शत्रूला सळो की पळा करून सोडले. नानासाहेब पेशव्यांच्या निधनाची वार्ता ऐकून ‘माझा सूड मी उगवला, आता मी सुखाने मरेन’, असा आसुरी आनंद व्यक्त करणाऱ्या ताराबाई यांनी आपल्या मरणापूर्वी पेशवार्इंची वस्त्रे थोरल्या माधवरावांस दिली. हे लक्षणीय आहे. ताराबार्इंप्रमाणेच त्यांची सावत्र सून करवीरची महाराणी जिजाबार्इंनेही कोल्हापूरच्या संस्थानाचा विकास, विस्तार करताना संस्थानाचे हित जपून, एकाच वेळी बलवान पेशव्यांशी स्नेहपूर्ण संबंध ठेवून छत्रपती शाहूमहाराजांशी जवळीक साधली व कोल्हापूरच्या गादीचे रक्षण केले. जिजाबाई मुत्सद्देगिरीत चलाख होत्याच. पण रणनीतीतही वाकबगार होत्या. राज्यकारभारातही त्यांचे बारीक लक्ष असे. देवदर्शनसाठी निघालेल्या जिजाबार्इंनी आपल्या गैरहजेरीत भगवंतराव अमात्य यांना करवीर नगरीची व्यवस्था पाहण्याची आज्ञा दिली. भगवंतरावांनी नकार देताच या स्वाभिमानी महाराणीने ‘आपण हे काम न केल्याने फार मोठी अडचण होईल असे समजू नये. हे काम सामान्य कुणबिणींकडूनसुद्धा चालविता येईल,’ असे भगवंतरावांना कळवून गंगू. रंगू, भागू, नागू आणि लिंगू या पाच सुज्ञ कुणबिणींकडून हे काम करवून घेतले. आज विविध क्षेत्रांत अधिकारपदावर असलेल्या महिलांसाठी ही घटना निश्चितच प्रेरणादायी आहे. उत्तर पेशवाईतील बखरकारांनी मस्तानी आणि आनंदीबाईसारख्या स्त्रियांना खलनायिका बनविले. मात्र, तत्कालीन अस्सल पत्रव्यवहार आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे या स्त्रियांवर इतिहासकारांनी अन्याय केल्याचे जाणवल्याचे त्याचा परामर्श ‘मनस्वीनी’त घेण्यात आलेला आहे. आनंदीबार्इंना त्यांच्या जीवनात सुयोग्य जोडीदार लाभला असता तर पेशव्यांच्या कुळात या शहाण्या व धूर्त स्त्रीने एक देशाभिमानी, कर्तबगार स्त्री म्हणून मान्यता मिळविली असते, असे लेखकाचे म्हणणे आहे. पेशव्यांच्या स्त्रियांपेक्षा अधिक प्रभावी असलेल्या गोपिकाबाई महत्त्वाकांक्षी आणि स्वाभिमानी होत्या. रघुनाथरावांनाही त्यांनी प्रायश्चित घेतल्यानंतरच भेट दिली. राजकारण, धूर्तपणा, माणसांची पारख आणि निर्भीडपणा याबाबतीत या तत्कालीन सरदार, कारभाऱ्यांपेक्षा काकणभर सरसच होत्या. आपल्या सेवकवर्गावर त्यांनी पुत्रवत प्रेम केले. देशी औषधांची, वनस्वतींची त्यांना चांगली जाण होती. कित्येकांना त्या औषधोपचारासाठी आपल्या वाड्यात ठेवून घेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची नोंद दुर्लक्षित करण्यासारखी निश्चितच नाही. भारतभरची अवघी प्रजा पोटच्या लेकराप्रमाणे मानून, जनांच्या हालअपेष्टा वर्तमानी गोळा करून, त्यांच्या कष्टदशेचे निवारण व्हावे यासाठी अनेकविध उपाययोजना आखणाऱ्या अतिशय कर्तबगार अशा अहिल्याबाई होळकर आणि तळपती समशेर घेऊन रणांगणावर शत्रूच्या सैन्यावर झेप घेणारी आणि स्वदेहाचा धारातीर्थी बळी देऊन पुढच्या पिढीची संतती, संपत्ती सुरक्षित करणारी झाशीची राणी काही नवीन पैलूंसह या पुस्तकात आपल्यासमोर येते. राजघराण्यातील या तथाकथित अशिक्षित स्त्रिया बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या दृष्टीने आजच्या आधुनिक स्त्रीच्याही चार पावले पुढेच होत्या याचा प्रत्यय येतो. त्या प्रतिगाती कालखंडातह या स्त्रियांचे विचार काही प्रसंगी कमालीचे पुरोगामी कसे होते, हे समजून घेण्यासाठी आजच्या आधुनिक स्त्रीवादी वर्गाने हा ग्रंथ जरूर अभ्यासला पाहिजे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more