* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666250
  • Edition : 8
  • Publishing Year : JANUARY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Sub Category : BUSINESS, INDUSTRY, SPORTS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
J. R. D. TATA IS THE FIRST TO BE FELICITATED WITH THE HIGHEST AWARD, `BHARAT RATNA`; AND HE IS THE ONLY INDUSTRIALIST UPON WHOM THIS HONOUR HAS BEEN BESTOWED. HE HAS ALWAYS PREFERRED THE WELFARE OF THE COUNTRY IN COMPARISON WITH PERSONAL WELFARE. HE ALWAYS FEELS THAT WHATEVER IS BEST FOR MY NATION IS BEST FOR TATA. TODAY THE CULTURE OF TATA HAS MANY SALIENT FEATURES. TATA ALWAYS FOLLOWS PRINCIPLES, REMEMBERS THE CONSCIENCE, ALWAYS CARES FOR THE HANDS AND MINDS THAT KEEP THE BUSINESS RUNNING SUCCESSFULLY, USES THE NATIONAL WEALTH FOR THE WELFARE OF THE NATION, AND ALSO DEVELOPS THE AREA WHERE THEIR INDUSTRIES ARE SET. J. R. D. HAS ALWAYS BOOSTED NEW IDEAS, NEW MINDS. HIS IS THE LION`S SHARE IN SHAPING MANY AN INDUSTRIALISTS. HE TRUDGED ALONG NEW PATHS; HE FOUND NEW WAYS, CREATED NEW TOUCHSTONES. HE HIMSELF HAS A RICH AND VARIED HERITAGE, CULTURED BACKGROUND, AND A VERSATILE PERSONALITY. THE ARTICLES IN THIS BOOK BRING US ACROSS MANY ASPECTS OF HIS PERSONALITY. WHAT WE LIKE THE MOST ABOUT THIS LEADING INDUSTRIALIST IS THE COMPASSIONATE, CONNOISSEUR, SILVER-TONGUED AND HAPPY HUMAN IN HIM.
‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले पहिले अन् एकमेव उद्योगपती जेआरडी टाटा यांनी उद्योगाचा विकास करताना ‘जे देशाच्या भल्याचे ते टाटांसाठी उत्तमच असेल’ हा विचार प्रधान मानला. नीतीमूल्यांची बूज राखत व्यवहार, उद्योग चालवणारे हात अन् मने जपणे, समाजातून मिळवलेली संपत्ती समाजाच्या विकासासाठी वापरणे, उद्योग उभा असलेल्या परिसराचा विकास ही टाटा उद्योगसमूहाची संस्कृती आहे. नव्याचे स्वागत करत जेआरडींनी अनेकजणांना घडवले, नव्या वाटा खोदल्या, नवे मापदंड निर्मिले. त्यांना लाभलेला उज्ज्वल वारसा, व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, नवे आयाम मिळत विकसित झालेले त्यांचे समृद्ध, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व याची ओळख या पुस्तकातील लेख करून देतात. विशेषत: अनेकविध भूमिकांना पुरून वर दशांगुळे उरणारा त्यांच्यातील सहृदय, रसिक, संभाषण चतुर, आनंदी ‘माणूस’ वाचकाला अधिक भावतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#JRDTATA #MADHURISHANBHAG #BHARATRATNA # #JRDTATA #MADHURISHANBHAG #BHARATRATNA #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI
Customer Reviews
  • Rating Starअमित बेलदरे

    जे आर डी - एक चतुरस्त्र माणुस हे आपले पुस्तक वाचले.देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणा-या एका महान उद्योजकाचे विविध पैलु आपण या पुस्तकात मांडले.हे पुस्तक वाचुन खुप आनंद झाला व आपणांस प्रतिक्रिया कळवावी असे वाटले. खुप छान पुस्तक अभिनंदन !

  • Rating StarRevan Lonkar

    " उच्च विचार, उच्च भाषा आणि उच्च वर्तन " हे स्वधर्मीय ब्रीद अक्षरशः जगलेले कुटुंब म्हणजे " टाटा कुटुंब ". टाटा ..नावातच सर्व काही टाटा म्हणजे दूरदृष्टी टाटा म्हणजे समर्पण टाटा म्हणजे दातृत्व टाटा म्हणजे निस्सीम देशभक्ती.. आणि या सरव गुणांचा महामेरू म्हणजे " जहांगीर रतन दादाभाई उर्फ जेआरडी. कोणतीही औपचारिक पदवी हाताशी नसताना दूरदृष्टी , माणसांची पारख , त्यांना हाताळण्याचे कसब , कामाप्रती असलेले समर्पण आणि वेळप्रसंगी घेतलेले कठोर निर्णय यामुळे त्यांनी टाटा उद्योगसमुह एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. आकाशाप्रती असलेल्या प्रेमातून सुरू केलेली विमानसेवा नंतर तेवढ्याच प्रेमाने देशाला अर्पण केली. १ रुपया या नाममात्र वेतनावर सुमारे ५ दशके तिचे अध्यक्षस्थान भूषविले हा तर एक विक्रमच आहे. परिपूर्णतेचा ध्यास असलेल्या जेआरडी यांनी स्टॅटिकल , व्यवस्थापनशास्त्र , प्रशिक्षण केंद्र यांसारखे त्याकाळी एकदम अपरिचित असलेले विभाग सुरू करून दूरदृष्टी दाखवली. "दातृत्व म्हणजे टाटा " या समिकरणास जेआरडी ही जागले. नारळीकर पितापुत्र , शास्त्रज्ञ डॉ. रामन्ना , माजी राष्ट्रपती के आर नारायण आणि या सारख्या सुमारे २००० पेक्षा जास्त बुद्धिवंत लोकांना टाटा स्कॉलरशिप चा लाभ मिळाला.टाटा कॅन्सर हॉस्पिटल , टीआयफर यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कैक संस्थांना टाटांची भरीव देणगी व जेआरडी यांच्या सारखे भक्कम पाठबळ लागले. देशाचा विचार करताना आणलेला " बॉम्बे प्लॅन " असो अथवा लोकसंख्या वाढीचा विचार करता आणलेले " फॅमिली प्लॅंनिंग फौंडेशन " असो. आपल्या समूहाची गरज बाजूला ठेवून त्यांनी नेहरू वा इंदिरा गांधी सरकारला मदतीसाठी अनेक वेळा आपली तज्ञ मंडळी पाठवून दिली.वेळप्रसंगी एक जागरूक नागरिक बनून काही सरकारी विरोधही दर्शवला. खरंतर जेआरडी यांचे इतके पैलू आहेत की ते पुस्तक वाचल्या शिवाय कळणारच नाहीत.त्यांच्या या पैलूंमुळेच त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार " भारतरत्न " प्राप्त झाला. त्यावेळेस असे म्हटले गेले , " भारतरत्न या पुरस्काराचा सन्मान झाला ". ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL

    पुलादनिर्मितीपासून विमानसेवेपर्यंत अनेक क्षेत्रांत जेआरडी टाटा यांचे कर्तृत्व लखलखीत आहे. म्हणूनच ते ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले उद्योजक ठरले. त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाविषयी, त्यांनी मिळवलेल्या व्यावसायिक यशाविषयी सर्सामान्यांना नेहमीच उत्सुकता असते. जेआरडींची जडणघडण, त्यांचे लहानपण, वडील रतन टाटा, फ्रेंच आई, इतर भावंडे, पत्नी या वैयक्तिक बाबी मांडण्यात आल्या आहेत त्यांनी उद्योगसमूहाच्या प्रगतीसाठी घेतलेले कष्ट, त्यांची गुणग्राहकता, हवाई सेवेच्या क्षेत्रात त्यांनी कमावलेले यश याविषयीही येथे माहिती मिळते. त्यांच्याबाबतच्या अनेक प्रसंगांतून वाचकांचे मनोरंजन होईल व बोधही मिळेल. एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. आर. एम. लाला यांच्या इंग्रजी लेखनाच्या आधारे हे पुस्तक लिहिले गेले आहे. -धरित्री जोशी ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 02-07-2006

    एक चतुरस्र माणूस ... ‘अष्टपैलू व्यक्तिमत्त्व’ हा शब्द सर्वपरिचित आहे. परंतु जे आर. डी. यांचे जीवन पाहिले, वाचले म्हणजे वाटते या माणसाच्या जीवनाचे पैलू मोजताच येणार नाहीत. ‘बियाँड द लास्ट ब्ल्यू माऊंटन’ हे आर. एम. लाला यांनी लिहिलेले जे. आर. डी. टाटाचे चरित्र वाचून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारून न जाणारा वाचक विरळाच लाला यांनी टाटा उद्योगसमूहावर अनेक लेख, पुस्तके लिहून सर्वसामान्य वाचकाला जेआरडीची ओळख करून दिली. त्यांच्या पुस्तकाचा व अनेक लेखांचा संदर्भासाठी उपयोग करून प्रा. माधुरी शानभाग यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केले. फक्त बेळगावकरांनाच नाही, तर ‘अग्निपंख, स्वप्नाजमन सत्याकडे’... यासारख्या अनेक पुस्तकांद्वारे हे नाव आता सर्वपरिचित झाले आहे. या पुस्तकाची अर्पण-पत्रिका मला फार भावली. लेखिकेने लिहिले आहे, जेआरडी टाटा उद्योगसमूह, त्यातील माणसे यांची देशाला यथार्थ ओळख करून देणाऱ्या आर. एम. लाला यांच्या अभ्यासपूर्ण लेखणीला सादर समर्पण. पुस्तकाच्या अनुक्रमावरूनच या महान व्यक्तिमत्त्वाची चटकन ओळख पटते आणि व्यक्तिमत्त्वातील अनोखेपण जाणवते. दहा प्रकरणांमध्ये लेखन कंपन्या होत्या. एवूâण व्यवहार सतरा कोटी रुपयांच्या आसपास होता. १९० साली त्यांनी चेअरमनपद सोडले तेव्हा एकूण कंपन्यांची संख्या ९५ होती आणि व्यवहाराने दहा हजार कोटीचा आकडा ओलांडला होता. ‘परफेक्शन इज इन डिटेल्स’ हे त्यांचे सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वाचे सूत्र होते. अचुकता हा कामाचा निकष होता. ‘अंदाजे’ हा शब्द त्यांना आवडत नसे. कोणत्याही उद्योगात, संस्थेत चल-अचल संपत्तीपेक्षा उत्तम माणसे महत्त्वाची, अमोल असतात अशी जेआरडींची धारण होती. तीन वचन सांगते, एक वर्षांची विकास योजना आखायची असेल तर मका पेरा, पंचवीस वर्षे पुढे पाहायची असतील तर झाडांच्या बिया पेरा आणि शंभर वर्षे विकास साधायचा असेल तर माणसे पेरा. जेआरडींनी अशी माणसे पेरली आणि त्यांनी आपापले भोवताल हिरवेगार, समृद्ध केले. अर्थतज्ज्ञ दिनशॉ, जे. डी. चोक्सी, नानी पालखीवाला, होमी मोदी, दलाल, रुसी मोदी, जॉन मथाय, ए. डी. श्रॉफ, मेहता, सुमंत मुळगावकर, अजित केरकर, पेंडसे, दरबारी सेठ, मिनू मसानी अशा अनेकांना निमंत्रण देऊन जेआरडींनी टाटांच्या सेवेत सामावून घेतले. या उद्योगाच्या महामेरूकडे सौंदर्यदृष्टीसुद्धा पुरेपूर होती. याचे सुरेख उदाहरण म्हणजे केरळमधील मुन्नारजवळचे हत्तीसाठी असलेले आरक्षित जंगल अन् हजारो एकर पसरलेले चहाचे मळे. ‘हॉटेल ताजमहाल’ या देशातील पहिल्या पंचतारांकित हॉटेलची उभारणी आणि पुढे यातूनच देशभरात उभी राहिलेली ताल ग्रुप ऑफ हॉटेल्सची साखळी. पारशी वडील, फ्रेंच आई असलेल्या जेआरडींचा जन्म जरी पॅरिसमध्ये झाला, शिक्षण फ्रान्स, इंग्लंड आणि भारतात झाले तरी आपली कर्मभूमी भारत आहे याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. सर्वांत मोठ्या गणल्या जाणाऱ्या उद्योगसमूहाचा प्रमुख म्हणून देशाशी असलेली बांधीलकी त्यांनी कृतीतून व्यक्त केली. देशहिताचे अनेक उपक्रम राबवले. हे देशप्रेम एका कार्यक्षम, कर्तृत्ववान माणसाचे असल्याने ते डोळस, द्रष्टे विस्तारले आहे. १. वारसा– कुटुंबाचा, उद्योगाचा, संस्काराचा, २. उद्योगाचा महामेरू, ३. जडण-घडण, ४. माणसे पेरणारा नेता, ५. आकाशाचा महाराजा, ६. डोळस, द्रष्टा देशभक्त, ७. दातृत्वाची जेथ प्रचीती, ८. वक्ता दशसहस्रेषु, ९. कवडसे, १०. घरातले जेआरडी. यामध्ये आकाशाचा महाराज आणि वक्ता दशसहस्रेषु ही प्रकरणे विस्तारित आणि अभ्यासपूर्ण आहेत. टाटा कुटुंबीय मूळ गुजरातेतील नवसारी या गावचे रहिवासी, कपड्याचा व्यापार करण्यासाठी मुंबईला आले. युरापियन पद्धतीने राहत असलेल्या मुंबईच्या उच्चभ्रू, श्रीमंत समाजात त्यांचा वावर होता. त्यामुळे जेआरडींची आई फ्रान्सची असूनही येथे मिसळून गेली. इंजिनियरिंग पदवीचे शिक्षण घेण्याची इच्छा अपूर्ण ठेऊन त्यांना उद्योगात शिरावे लागले. वडिलांची आज्ञा प्रमाण मानून वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी टाटा सन्समध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. तर नौरोजी सकलानवाला यांच्या अकस्मात मृत्यूनंतर चेअरमनपदी त्यांची नियुक्ती झाली. उद्योगात बदलत जाणाऱ्या गरजेनुसार त्यांनी अ‍ॅडमिनीस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, एअरइंडिया, टाटा कॅन्सर हॉस्पिटल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च, (टीआयएफआर), अ‍ॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज, अशा अनेक संस्था स्थापन केल्या. जेआरडींनी आपल्या हाती सूत्रे घेतली, तेव्हा एकूण टाटा समूहात चौदा .......... आहे याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. सर्वांत मोठ्या गणल्या जाणाऱ्या उद्योगसमूहाचा प्रमुख म्हणून देशाशी असलेली बांधिलकी त्यांनी कृतीतून व्यक्त केली. देशहिताचे अनेक उपक्रम राबवले. हे देशप्रेम एका कार्यक्षम, कर्तृत्ववान माणसाचे असल्याने ते डोळस, द्रष्टे नेतृत्व होते. ‘बॉम्बे प्लॅन’ त्याचेच मूर्त स्वरूप. हवाईसेवेतील योगदानाबद्दल जेआरडींवर अनेक सन्मानांचा वर्षाव झाल. एफ. एस. आय. संस्थेचे सुवर्णपदक, एडवर्ड वर्नर पुरस्कार हे प्रतिष्ठेचे आहेत. ‘डॅनियल गगनहेम’ पदकाने त्यांच्या सन्मानांवर शिरपेच खोवला. जानेवारी १९९२ मध्ये जेआरडींना भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान दिला. एका उद्योगपतीला हा सन्मान मिळालेले हे पहिले अन् एकमेव उदाहरण होय. जेआरडींच्या मिस्किल व खेळकर स्वभावाचे अनेक किस्से वर्णन करून लेखिकेने आपल्या लेखनाला एक किनार तयार केली आहे. एवढ्या उच्च पदावरील माणूस सामान्य लोकांच्यातसुद्धा किती खेळीमेळीने राहू शकतो हे वाचून आश्चर्य वाटते. शेवटी म्हटल्याप्रमाणे– ‘जीवनाची शर्यत उत्तम धावून जिंकली आपली कर्तव्ये उत्कटतेने पार पाडली आत्म्याची शांती माणुसकीने कमावली मानसन्मानांना धावत यावेच लागले हे पवित्र आत्म्या– सुस्वागतम्!’ हेच खरे. जेआरडी म्हणजे काय हे सर्वार्थाने कळण्यासाठी, समजून घेण्यासाठी, हे पुस्तक आबालवृद्धांनी जरूर वाचावे व त्यापासून प्रेरणा घ्यावी. -डॉ. शैलजा यादवाड ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more