* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WARREN BUFFET
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985672
  • Edition : 8
  • Publishing Year : OCTOBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 216
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Sub Category : BUSINESS, INDUSTRY, SPORTS
  • Available in Combos :ATUL KAHATE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EVERYONE IS CURIOUS TO KNOW MORE ABOUT THE GREATEST INVESTOR OF THIS ERA; WARREN BUFFETT. HE HAS NEVER TAKEN UP A JOB OR HAS NOT ESTABLISHED ANY BUSINESS. YET, HE IS ONE OF THE VERY FEW RICHEST PEOPLE OF THIS WORLD. WHAT MAKES IT A MIRACLE IS THE FACT THAT HE HAS NOT OPTED FOR ANY ILLEGAL WAY WHILE MAKING MONEY. EACH ONE OF US HAS A LOT TO LEARN FROM HIM. HIS EXCLUSIVE VISION COMBINED WITH A WITTY MIND WILL SURELY BE HELPFUL TO ONE AND ALL; THE ENTREPRENEURS, THE PROFESSIONALS, THE EMPLOYEES AND PEOPLE WHO WORK-FROM-HOME. THIS BOOK IS A COMPILATION OF FIFTY OF WARREN BUFFET’S FAMOUS QUOTES EXPLAINED IN A SIMPLE LANGUAGE.
गुंतवणूक तसंच शेअरबाजार यांच्यात रस असलेल्या माणसाला ‘वॉरन बफे ’ हे नाव माहीत नसणे, हे केवळ अशक्य आहे. गेली कित्येक दशक बफेनं गुंतवणुकीच्या विश्वात मिळवलेलं यश अफाट आहे. शेअरबाजाराच्या चढ-उतारांवर सातत्यानं मात करून प्रचंड वेगानं त्यानं आपल्या वैयक्तिक संपत्तीत तर भर घातलीच आहे; पण शिवाय आपल्या ‘बर्वशायर हॅथवे’ या कंपनीमधल्या शेअरधारकांनाही कोट्यधीश केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतके पैसे कमावणा-या आणि जागतिक पातळीवरच्या सगळ्यात श्रीमंत माणसांच्या यादीत अग्रस्थानी पोहोचलेल्या या माणसाला पैशांचा उपभोग घेण्यामध्ये अजिबात रस नाही. त्याचं राहणीमान अत्यंत साधं आहे आणि पैसे विनाकारण खर्च करण्याचा त्याला साफ तिटकारा आहे. अतिशय काटकसरी वृत्तीनं राहणा-या बफेनं आपली जवळपास सगळी संपत्ती सामाजिक कामांसाठी खर्च करण्याचं जाहीर करून सगळ्या जगासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. आपल्या कारकिर्दीत कधीही नीतिमत्ता सोडून न वागलेल्या बफेचं माणूस म्हणून महत्त्व याचसाठी खूपच जास्त आहे. अशा या विलक्षण माणसाच्या अफाट आयुष्याची आणि त्याच्या गुंतवणुकीच्या रहस्यांचा उलगडा करणारी ही सफर!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#WARAN BUFFETT#ATUL KAHATE#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarAparna D P

    अतुल कहाते लिखित वॉरन बफे यांच्यावरच हे पुस्तक नुकतंच वाचनात आलं , खरंतर वॉरन बफे या जगातील श्रीमंत माणसाबद्दल खोल माहिती जाणून घेण्याची मला नक्कीच अतिशय उत्सुकता होती. बऱ्याच प्रसार माध्यमांमधून त्यांच्याबद्दलचे लेख ,डॉक्यूमेंट्री ऐकूनत्यांच्याबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे असं वाटत असताना हे पुस्तक हातात पडलं आणि अतुल कहाते यांच्या सोप्या ओघवत्या मराठी लेखन शैलीतून अवतरलेले वॉरन बफे वाचून अवाक व्हायला झालं इतकंच खरं. गुंतवणुकीच्या क्षेत्रात उत्तुंग यशस्वी असलेल्या या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातील काही नाट्यमय घडामोडी वाचायला नक्कीच आवडतात. अर्थशास्त्र , गुंतवणूक ,शेअर बाजार या विषयी कणभर ज्ञान आणि कधी आवड नसणाऱ्याला या क्षेत्रात उत्तुंग यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या बफे यांचा प्रवास खिळवून ठेवणारा आहे हे लेखकाचे यश मी मानते. खरंतर बफे हे अनाकलनीय व्यक्तिमत्व मी म्हणेन सतत आकड्यांच्या जंजाळात स्वतःला गुंतवून ठेवणारे बफे, आयुष्यात भावनांना महत्व नसणारे बफे, कर्करोगग्रस्त पत्नीची काळजी घेणारे बफे आणि पैसा कमवण्यासाठी आयुष्यभर धडपडणारी ही व्यक्ती त्या पैशाचा कधीही उपभोग न घेणारी व्यक्ती. हे वॉरन यांच्या स्वभावातील विरोधाभास म्हणता येतील पण गुंतवणूक तज्ञ आणि माणूस म्हणून बफे कडून आपण बरंच काही शिकू शकतो असं लेखकाने प्रास्तविकात म्हंटल आहे हे अगदीच मान्य! अर्थशास्त्र माहिती आणि तंत्रज्ञानाचा गाढा अभ्यास असणाऱ्या अतुल कहाते यांच्या अभ्यासपूर्ण ओघवत्या लेखन शैलीतील वॉरन बफे नव्याने उमगतात. अतुल कहाते यांनी अशाप्रकारची बरीच अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण पुस्तकं काही स्वलिखित तर काही अनुवादित स्वरूपात आपल्याला मराठीत उपलब्ध करून दिली आहेत त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!! आजच्या चंगळवादी तरुणाईला पैसा खर्च करताना गुंतुवणुकीची जवाबदारी आणि धाडस शिकवणारे वॉरन बफे यांचं हे चरित्र नक्की वाचावे ही मी विनंती करेन. ©अपर्णा…(ADP) ...Read more

  • Rating StarKotwal Bhushan

    काही दिवसांपूर्वीच आपले "वाॅरन बफे" हे पुस्तक वाचले . वाचून अत्यानंद झाला . तसा मी एकवीस वर्षाचा Science background चा विद्यार्थी ; पण वेळ उपलब्ध असल्यामुळे शेअर मार्केट जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि पुस्तकांचा शोध सुरू झाला. त्यातच माझ्या एा मित्राने आपले पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला . पुस्तक आवडण्याचे कारण असे की हा सर्व भाग Commerce आणि Economics चा आहे आणि हे दोघे खूप अवघड असतात , याची मला कल्पना देखील आहे . एवढे अवघड विषय मला कोणी मराठी भाषेत इतक्या सोप्या भाषेत समजावू शकतो यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही , खरोखरच आपल्या लिखाण कौशल्याला आणि बुद्धिमत्तेला दाद द्यायला पाहिजे . शेअर मार्केट आणि सन्माननीय वॉरन बफे यांचे जीवन चरित्र सोप्या भाषेत लिहिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि भविष्यात अशीच पुस्तक लिहून मराठी माणसांचा उत्साह वाढवा . आपल्या पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा ! आपला नम्र कोतवाल भूषण ...Read more

  • Rating StarPratik Deshmukh

    I have Warren Buffett`s biography written by Atul Kahate. I have liked it very much and got very inspired to invest in stock market(long term)

  • Rating StarNilesh Shinde

    वाँरेन बफे एक सामान्य पेपर टाकणारा मुलगा वयाच्या 11 व्या वर्षी पासून गुंतवणूक क्षेत्रात आला आणि आज वयाच्या नव्वदीत तो अमेरिकेतील नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार आहे. आज त्याच्याकडे संपत्ती 6.4 लाख करोड रूपये आणि त्यातही कितीतरी कंन्याची मालकी त्याच्याकडे आहे. त्याच्या बर्कशायर हँथवे हया गुंतवणूक कंपनीचा एक शेअर 2.16 करोड रूपयाला आहे यावरून कळते की त्याच्या गुंतवणूक पद्धतीवर गुंतवणूकदारांचा किती ठाम विश्वास आहे. त्याच्या यशाची सूत्र आणि गुंतवणूक पद्धत हया पुस्तकात सांगितली आहेत त्याच्या व्हँल्यू इन्व्हेस्टींग सूत्रांची माळ गुंफण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक गुंतवणूकपूर्व सल्ले : श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यापेक्षा खरेखुरे श्रीमंत व्हा आपण कितीही महाग कपडे घेतले,गाडी घेतली तरीही आपण कुणाही श्रीमंतापेक्षा गरिबच वाटणार कारण हया तुलनेच्या खेळाला अंत नाही त्यामुळे फक्त गरजांवर खर्च करा अनावश्यक वायफळ खर्च टाळून पैसे वाचवा...आणि आर्थिक असहाय्यतेला नाही म्हणा..... ज्याचा वाचवलेला पैसा घरात आहे त्यांनी तो बँकेत साठवा आणि ज्यांचा साठलेला पैसा खात्यात कुजत पडलाय त्यांनी तो तसाच ठेवण्यापेक्षा गुंतवा. छोट्या छोट्या गोष्टीत बेपर्वा माणसे मोठमोठ्या गोष्टीमध्ये बेफिकीर आणि बेशिस्त असू शकतात आणि लोक जितकी बेपर्वाईने वागतील तितकेच आपण स्वतः जबाबदारीने वागले पाहिजे. माणूस अनुकरणशील प्राणी आहे पण म्हणून इतरांच्या चुकांचे अनुकरण करणे हे पण चुकीचेच होईल गुंतवणूकदार होण्यापूर्वी : आपल्या कुटुंबाचा आयुर्विमा ,आरोग्य विमा (क्रिटिकल इलनेस सह) काढलेला असावा सहा महिन्यांचे उत्पन्न Emergency फंड म्हणून वेगळ्या बँक अकाउंट वर FD सारख्या सुरक्षित पर्यायात गुंतवावेत जेणेकरुन अडचणीच्या वेळी ते कामाला येतील आणि आपली गुंतवणूक दीर्घकालीन ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य होईल. गुंतवणूकदार झाल्यानंतर : ज्याला वेळेचा आणि ज्ञानाचा अभाव आहे आणि पैशाची सुरक्षितता जास्त महत्त्वाची वाटते त्यांनी कमी नफा असले तरी बाँड किंवा FD मध्ये पैसे गुंतवणूक करावी. ज्यांची थोडीफार रिस्क घ्यायची तयारी असेल त्यांनी म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करावी ज्यांना शेअरबाजाराचे जुजबी ज्ञान आहे त्यांनी इंडेक्स फंडात पैसे गुंतवावेत ज्यात सेन्सेक्स निफ्टी लिस्टेड कंपन्याचे शेअर्सच्या प्रमाणानुसार गुंतवणूक केली जाते ज्यांना अकाउंटसचे आणि शेअर बाजार कसा चालतो याचे मूलभूत ज्ञान आहे त्यांनी इक्विटी शेअर्स मधे गुंतवणूक करावी. तसेच शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी अतिबुद्धिवान किंवा गणितज्ञ असण्याची कुठलीही गरज नाही ब्ल्यूचिप कंपन्यात गुंतवणूक करूनही उत्तम परतावा मिळवता येतो. Profit loss, Financial Statement विश्लेषण करता येणे पुरेसे आहे. पण तेवढ्यासाठी पण आपण कुणावर तरी विसंबून राहत असू तर एवढेच लक्षात ठेवा "जो दुसऱ्या वर विसंबला त्याचा कार्यभार संपला" शेअर बाजार खूप अवघड क्लिष्ट आहे असा काही तज्ञ आणि ट्रेनिंग सेंटरने त्यांच्या स्वतःच्या पोटापाण्यासाठी निर्माण केलेला भ्रम आहे आणि टीव्ही ,न्यूजपेपर , मासिक यांनी तो भ्रम आणखी जास्त बळकट केला आहे. त्यामुळे माणसाने स्वतःचा नजरिया बदलावा गुंतवणूक कशी करावी: दरमहा गुंतवणूकीसाठी रक्कम बाजूला काढायची सवय लावावी गुंतवणूक करण्यासाठी बाजूला काढलेली रक्कम ही आयुष्यभर फक्त गुंतवणूकीसाठीच वापरावी. शक्यतो लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करावी जेणेकरून चक्रवाढीचा फायदा आपल्याला भेटेल. ज्या कंपन्या सातत्याने उत्तम नफा कमावतात. अश्या केवळ 8-10 कंपन्यात दीर्घकाळ म्हणजेच दहा आणि त्यापेक्षा जास्त वर्षासाठी गुंतवणूक करावी आणि निश्चिंत राहावे हयात काहीच थ्रिल नाही म्हणून इन्स्टंट पैसा कमवायच्या (Trading , FO, Commodity )मागे धावू नये. हाव भीती आणि मूर्खपणा हे माणसाचे अवगुण असतात त्यामुळे आपल्या अवगुणांवर मात करायची आणि दुसऱ्याच्या हयाच अवगुणांचा फायदा घ्यायचा तसाच मत्सर हा ही माणसाचा मोठा दुर्गुण आहे जो माणसाला कायम असमाधानी बनवतो. त्यावर मात करा आपल्याला कळत नसलेल्या व्यवसायात गुंतवणूक करू नये. लक्षात ठेवा इथे सबुरीने वागणा-या माणसाला सतत कार्यरत माणसे संपत्ती मिळवून देतात. जे सेक्टर कायम चालतात आणि भविष्यात ज्यांची मागणी राहील अशा सेक्टर टाँप कंपन्याची गुंतवणुकीसाठी निवड करावी. गुंतवणूक करताना Lumpsum रक्कम एकदाच गुंतवू शकता ते पण ज्यावेळी मार्केट करेक्शन मोड वर असेल किंवा ज्यावेळी मार्केट भयभीत असेल आणि डिस्काउंटचे बोर्ड झळकत असतील किंवा गुंतवणूकीसाठी SIP पद्धतीचा वापर करू शकता ज्यात महिन्याच्या ठराविक तारखेला ठराविक रक्कम ठराविक शेअर्स खरेदीसाठी वापरली जाते. लक्षात ठेवा गुंतवणूक विषयीचे अज्ञान आणि कर्ज एकत्रितपणे माणसाला डुबवू शकतात त्यामुळे कर्ज काढून गुंतवणूक करू नये गुंतवणूकीचे निर्णय विचारपूर्वक सर्व पर्याय पडताळून, योग्य सल्लागारांच्या मार्गदर्शनाने करावी. कारण अविचाराने केलेली खरेदी आपल्याला निश्चिंत झोप देऊ शकत नाही. सल्लागार निवडताना खूप काळजीपूर्वक निवडावा जो स्वतःच्या कमिशन साठी काम न करता आपल्या हिताला प्राधान्य देईल आणि जेणेकरुन आपले कुठेही नुकसान होणार नाही. आपले वर्तन हे गुंतवणूकदारापेक्षा उद्योजकाप्रमाणे हवे वायफळ खर्च टाळणारा ,नियमांचे पालन करणारा,यशाने हुरळून न जाणारा आणि अपयशाने खचूनही न जाता ध्येयाकडे सतत मार्गक्रमण करणारा उद्योजक व्हावे शेअर मार्केट मध्ये भाकिते करणारे कायम तोंडावर पडतात 100% खात्रीशीर भाकीत कुणीच मांडू शकत नाही. भाकीत मांडणारे कदाचित आपल्या उतावीळपणाचा फायदा घ्यायला टपले असतीलही भविष्यातील निरनिराळ्या शक्यताविषयी कुठलेच अंदाज बांधू नये आणि त्यावर आधारित गुंतवणूक ही नकोच. उदा. EV, AI सार्वमत हे आपल्या विचारांना पर्याय ठरत नाही त्यामुळे सगळेजण एखादा शेअर्स विकताना दिसतात म्हणून आपणही तसेच करू नये. इतर लोकांची मतानुसार नव्हे तर आपल्या उद्दिष्टानुसार आणि आपल्या अभ्यासानुसार शेअर्स बाबत आपले वर्तन असावे त्यामुळे एकदा गुंतवणूक केली तीन वर्षानंतरच पोर्टफोलिओत डोकवायचे, त्यातही सर्व गोष्टी योग्य असतील तर गुंतवणूक दीर्घकाळ तशीच ठेवावी. इथेच रंकाचा राव आणि रावाचा रंक होतो त्यामुळे फूकटचा माज बाळगू नका शेअर मार्केट पेक्षा कुणीही मोठे नाही शेअर्सची किंमत ही कामगिरीनुसार बदलते ट्रेडिंग मुळे वाढलेली किंमत कधीही खालीही येऊ शकते बाजारात अधूनमधून वेगवेगळ्या बूम येतात ,पण लक्षात ठेवा हे जास्त काळ टिकत नाही त्यामुळे दीर्घकाळ टिकणार्या कंपन्या निवडा. खराब कंपनीचे (Fraud Case) व्यवस्थापन बदलले तरीसुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करा. तेजीच्या काळात सगळ्या चांगल्या वाईट कंपन्या तरून जातात कंपनी आणि शेअरहोल्डरची खरी कसोटी बाजार भीतीच्या सावटाखाली असताना लागते. शेअर्स खरेदीचे निर्णय घेण्यापूर्वी कंपनीच्या कामगिरीचा विचार करा. नुसत्या कोरड्या आकडेवारीने किंवा अपूर्ण माहितीने फक्त दिखाव्याला भुलून गुंतवणूक करु नये. ज्या उद्योगांना सतत भांडवलाची आणि कर्जाची गरज लागते अश्या उद्योगातून परतावा नेहमी कमी मिळतो. तसेच काही क्षेत्राला वारंवार अडचणी (कच्च्या माल तुटवडा,आर्थिक घोटाळे ) येतात त्या कंपन्या गुंतवून पडू नका. नफा जरूर कमावयचा पण त्यासाठी अनाठायी धोका पत्करून आपली रात्रीची झोप मात्र गमवायची नाही घिसाडघाईने चुकीचे गुंतवणूक निर्णय घेउन अडचणीत स्वतःला पाडू नका शेअर्स विक्रीचे निर्णय घेण्यापूर्वी कंपनीचे भवितव्य आणि कामगिरी याचाच विचार करा. शेअर्स चे भाव कोसळले म्हणून विकू नका. तसेच दीर्घकाळ आपल्या जवळ शेअर्स बाळगले म्हणून घसरणीमुळे नुकसानही सहन करु नका शेअर बाजारात काय किंवा एकूणच काय ह्रदयापेक्षा मनाला आणि भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्या. कारण बाजार पैशापेक्षा मानसिकतेवर चालतो. Comments ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more