* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEATH AT MY DOORSTEP
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788177667691
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :KHUSHWANT SINGH COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE DEATH HAS A WARRANT IN ITS HANDS, WHOSE NAME IS AT THE TOP TODAY? DEATH, THE ETERNAL TRUTH, THE FACT WHICH IS BREATH-TAKING, SAD, GLOOMY. EVERYONE LOOKS AT DEATH FROM A DIFFERENT ASPECT. SOME CONSIDER IT TO BE THE END OF LIFE, AND FOR SOME IT IS BEGINNING OF A NEW LIFE. SOME FEEL THAT DYING IS CHANGING BODIES BY THE SOULS. SOME FEEL THAT DEATH IS BEING NOTHING. AND SOME FEEL THAT IT IS A FULL-STOP TO EVERYTHING. WHAT IS IT ACTUALLY? WHEN THE BODY BECOMES LIFELESS, WHAT HAPPENS TO THE SOUL? WHAT HAPPENS TO THE MIND SITUATED IN THE BODY? WHAT HAPPENS TO THE FEELINGS IN IT? MANY SUCH QUESTIONS REMAIN UNANSWERED. DEATH IS CONSIDERED TO BE A BLOW, BEREAVEMENT, AN AGONY, A PAIN, MUCH CRYING, MUCH MOURNING. DEATH IS A VERY SERIOUS TOPIC. BUT THIS VERY DEATH MEETS US IN EVERY ARTICLE UNDER THIS BOOK IN THE PECULIAR STYLE OF THE AUTHOR IN A VERY STRAIGHT FORWARD WAY. HIS ARTICLES ON MANY OF THE FAMOUS PERSONALITIES REVEAL THE UNKNOWN SIDES. THEY MAKE US LAUGH, THINK, CRY, AND THEY BEDAZZLE US.
‘‘मृत्यूच्या हातात कसलंसं फर्मान आहे. आज त्या यादीत कुणाची नावं आहेत कुणास ठाऊक!’’ ...मृत्यू ...अटळ सत्य... धडकी भरवणारं, वाईट, खिन्न मानलं जाणारं वास्तव. जीवनातील या मूलभूत वास्तवाकडं पाहण्याचे निरनिराळे दृष्टिकोन आढळतात. कुणी मृत्यू हा शेवट मानतं. कुणी नव्या जीवनाचा आरंभ, तर कुणी मृत्यू हा फक्त देहरुपी वस्त्राचा त्याग मानतात. कुणाला मृत्यू म्हणजे अस्तित्वशून्यता वाटते; तर कुणाला अंतिम पूर्णविराम... पण देहाची चेतना संपली की, मनाचीही संपते? आत्मा म्हणजे काय? तो कुठं असतो? जाणिवांचं काय होतं... असे कितीतरी प्रश्न अनुत्तरीतच राहतात. मृत्यू म्हणजे आघात, वियोग, क्लेष, दु:ख, रडारडी असा हा विषय गहन गंभीर मानला जातो. मात्र या मृत्यू लेखसंग्रहात बुद्धिप्रामाण्यवादी लेखकाचे मृत्यूविषयक विचार खुसखुशीत शैलीत व रोखठोक बाण्यानं प्रकट झाले आहेत. तसंच काही विलक्षण प्रतिभावंतांवर त्यांनी लिहिलेल्या मृत्यूलेखांतून त्या त्या व्यक्तित्वांचे विविधरंगी पदर वाचकाला अस्वस्थ करतात, हसवतात, डोळे दिपवतात; तर कधी अंतर्मुख करतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#KHUSHWANTSINGH #मृत्युनंतर #खुशवंतसिंग #मृत्यूआणिमरण #THOUGHTSONDEATH #TRANSLATIONSINMARATHI #अनुवाद #मराठीअनुवाद # मृत्युलेख # COLLECTIONOFOBITUARIES #THECOMPANYOFWOMEN #
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    खुशवंत सिंगानी प्रथम म्रुत्यु संबंधी आचार्य रजनीश,दलाई लामा आदिंचे विचार नमुद केले आहेत आणि नंतर अनेक व्यक्तिं चा नमुनेदार जीवनपट व त्यांचा अंत या विषयी अतिशय शैलीदार भाषेत विवेचन केलेले.संग्रहणीय पुस्तक!

  • Rating Starराजू गोसावी

    "मृत्यूच्या हातात कसलंस फर्मान आहे. आज त्या यादीत कुणाची नावं आहेत कुणास ठाऊक!" ...मृत्यू...अटळ सत्य... धडकी भरवणार ,वाईट, खिन्न मानलं जाणार वास्तव. जीवनातील या मूलभूत वास्तवाकड पाहण्याचे निरनिराळे दृष्टिकोन आढळतात. कुणी मृत्यू हा शेवट मानत. कणी नव्या जीवनाचा आरंभ, तर कुणी मृत्यू हा फक्त देहरुपी वस्राचा त्याग मानतात. कुणाला मृत्यू म्हणजे अस्तित्वशून्यता वाटते; तर कुणाला अंतिम पूर्णविराम..... पण देहाची चेतना संपली कि, मनाचीहीं संपते ? आत्मा म्हणजे काय ? तो कुठं असतो ? जाणीवांच काय होत... असे कितीतरी प्रश्न अनुत्तरीतच राहतात. मृत्यू म्हणजे आघात, वियोग, क्लेश, दुःख, रडारडी असा हा विषय गहन गंभिर मानला जातो. मात्र या मृत्यू लेखसंग्रहात बुद्धिप्रामाण्यवादी लेखकाचे मृत्यूविषयक विचार खुसखुशीत शैलीत व रोखठोक बाण्याने प्रकट झाले आहेत. तसच काही विलक्षण प्रतिभावंतांवर त्यांनी लिहलेल्या मृत्युलेखातून त्या त्या व्यक्तित्वाचे विविधरंगी पदर वाचकाला अस्वस्थ करतात, हसवतात, डोळे दिपवतात ; तर कधी अंतर्मुख करतात. अस हे मनातल्या एका कोपर्यात दडून बसणार पुस्तक. ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 03-02-2007

    मृत्यू आणि खुशवंतसिंग... मृत्यू... माझ्या उंबरठ्यांशी’ हे खुशवंतसिंग यांचे अनुवादित पुस्तक वाचताना ‘मृत्यू’ या घटनेकडे पाहण्याचे मराठी साहित्यिकांचे सहजपणे आठवतात. ‘देह मृत्यूचे भातुके’, ‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोही पुढे जात आहे’। अशा नेक अभंग, श्लोक, ओव्यांमधून मराठी संतांनी ‘मृत्यू’या शाश्वत सत्याची जाणीव करून दिलेली आहे. अर्थात यामध्ये देहाची नश्वरता, देहाला दिलेले दुय्यम महत्त्व या गोष्टी आहेतच; पण ‘पाखरा येशील का परतून’ सारख्या कवितेत करुण विलापही जाणवतो. ‘कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या’ सारख्या कवितेतून ‘समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही,’ ही मृत्यूसारख्या घटनेतील एकटेपणा, एकाकी असणे ठळकपणे जाणवते. ‘जन्म म्हणे आला आला। जव्हा आलं बोलावनं। मौत म्हणे गेला गेला।’ बहिणाबाई चौधरींसारखी कवयित्री जन्म-मृत्यूमधली सहजता निखळपणे सांगते. ‘पावले तुझी कातड्याची, मरणमाडी चढायची...’ अशा शब्दांत आरती प्रभू मनुष्याची मृण्मय देहाची जाणीव करून देतात. ही स्वातंत्र्यहीन अवस्था आहे हे सांगताना कवी, ‘मागे फिरू नकोस बाबा। कुठे ठेवशिल दरीत पाय।’ असे म्हणतो. अशा अनेक बाजूंनी मराठी साहित्यात मानवी मृत्यूबद्दलचे चिंतन आणि एकूणच जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आठवतो खुशवंतसिंग यांच्या पुस्तकामुळे. ‘डेथ अ‍ॅट माय डोअरस्टेप’ या मूळ खुशवंतसिंगलिखित पुस्तकाचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. या पुस्तकात ‘मृत्यू आणि मरण’ या पहिल्या भागात मृत्यूसंबंधी दलाई लामा, आचार्य रजनीश यांनी मांडलेले विचार संकलित केले आहेत. भारताचे माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग स्वत: कर्करोगाने पीडित आहेत. ‘पाहुणा मृत्यू’ या लेखात व्ही. पी. सिंग यांनी ‘‘दर आठवड्याला मी मृत्युदेवतेला विचारतो: तुझ्यासोबत निघण्याची वेळ झाली का?’’ ती उत्तरते,‘‘नाही, अजून नाही,’’ हे उद्गार व्यक्त केले आहेत. ‘हिट लिस्ट’वर ‘तयार रहा’ यासारख्या लेखांतून मृत्यूकडे पाहण्याची सहज दृष्टी व्यक्त होते. मृतांकडून ‘ज्ञानप्राप्ती’, ‘मृत्यूनंतरचं जीवन’ या लेखांमधून मृत्यूनंतरही ज्ञानप्राप्ती शक्य असल्याची श्रद्धा व्यक्त होते. हा पुन्हा श्रद्धेचा आणि विश्वास-अविश्वासाचा भाग आहे. पुस्तकाचा दुसरा भाग ‘मृत्यूनंतर’ हा आहे. या भागात झेड.ए.भुट्टो यांची फाशी, त्यापूर्वीच न्यायालयीन खटला, फाशीची शिक्षा निश्चित झाल्यानंतर भुट्टोंच्या मनातील निराशा, घालमेल यांचे चित्रण येते. प्रोतिमा बेदी, ‘नर्गिस दत्त’, ‘चेतन आनंद’ या चंदेरी दुनियेतील कलावंतांच्या मृत्यूसंबंधी लेख आहेत, त ‘फैज अहमद फैज’, ‘अली सरदार जाफरी’, ‘आर. के. नारायण’, ‘मुल्कराज आनंद’ इ. साहित्यिकांवर लिहिले. मृत्यूलेख दुसऱ्या भागात एकत्रित केले आहेत. ‘दादी माँ’, ‘राज विलातील छज्जूराम’ यांनी लेखकाच्या व्यक्तिगत आयुष्यातला काही काळ व्यापला आहे. खुशवंतसिंग यांनी पाळलेला ‘सिम्बा’ हा कुत्रा आणि त्याचा मृत्यू, यांचा समावेशही या लेखांमध्ये झालेला आहे. दुसऱ्या भागातील कवी-कलावंत, देशी-विदेशी मित्र-परिचित यांचा निकटचा सहावास लेखकाला लाभलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मृत्युलेख लिहित असताना लेखक व्यक्तीचे वैशिष्ट्य, तिच्या व्यक्तीमत्त्वाची भली-बुरी बाजू रोखठोक भाषेत मांडतो. ज्यांच्या सहवासात खुशवंतसिंग यांना वाईट अनुभव आला. त्या व्यक्तीच्या अवगुणांची परखड कबुली त्यांनी दिली आहे. मरण पावलेल्या व्यक्तीबद्दल बोलताना चांगले बोलावे, हा रूढ संकेत लेखकाने झुगारला आहे. यात एका बाजूने त्यांचे माणूसपण दिसते, पण दुसऱ्या बाजूने मरणदारी, मृत्यूनंतरही माणूस क्षमाशील होऊ शकत नाही का, माणसाच्या मनात कडवटपणा कायमच घर करून कसा काय राहतो, असे प्रश्न पुस्तक वाचताना पडतात. खुशवंतसिंग ‘द हिंदुस्थान टाइम्स’, ‘द ट्रिब्युन’ सारख्या वृत्तपत्रासाठी लिहिणारे लेखक, भारतीय उच्चायुक्त कार्यालयात जनसंपर्क विभागाचा कार्यभार सांभाळणारी व्यक्ती म्हणून परिचित आहेत. उच्च वर्गातील माणसांचा वावर, त्यांच्या अवतीभवती असल्याच्या खुणा त्यांच्या लेखनातून जाणवतात. उच्च वर्गातील स्त्री-पुरुषसंबंधातील मुक्तपणाची चित्रे ‘मृत्यू... माझ्या उंबरठ्याशी’ या पुस्तकातून आली आहेत. दूरदर्शन, खासगी वाहिन्यांच्या माध्यमातून अहोरात्र पाझरणारी करमणूक या पुस्तकरूपाने का यावी? जागतिकीकरणानंतर सर्वत्र पसरलेल्या सुखवादातून अशा प्रकारचे रंजक चित्र पुस्तकातून आले आहे काय, असे प्रश्न मनात येतात, भीष्म सहानींवरील लेख अपूर्ण वाटतो. याशिवाय दुसऱ्या भागात कलावंतांवरचे मृत्यूलेख, लेखक-कवी, अधिकारी-उच्चपदस्थ व्यक्ती, अशी विभागणी करून लेखांचा क्रम लावला नसल्याचे जाणवते. व्यक्तींवरील मृत्यूलेखांचा एकसंध परिणाम होत नाही. कारण या लेखांचे स्वरूप त्रोटक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 07-01-2007

    जगण्याचा संदेश देणारा ‘मृत्यू’... ‘डेथ अ‍ॅट माय डोअरस्टेप’ हे खुशवंत सिंग यांचं सुंदर पुस्तक आता मराठी वाचकांनाही वाचायला मिळेल. ‘मृत्यू... माझ्या उंबरठ्याशी’ हा मूळ पुस्तकाची खुमारी कायम ठेवणारा सुरेख अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. या पुस्तकत मृत्यूविषयीच लेखक बोलत राहतो. खुशवंत सिंग यांनी मृत्युलेख अनेक लिहिले; पण पहिला मृत्युलेख ऐन विशीत असताना लिहिला. ‘मृत्यूनंतर’ या दुसऱ्या भागात हे मृत्युलेख समाविष्ट आहेत. तरुण हुकूमशहा संजय गांधी, मार्क्सवादी लक्षाधीश रजनी पटेल, आर. के. नारायण, प्रोतिमा बेदी, भीष्म सहानी, धर्माकुमार, चेतन आनंद यांच्यावरील मृत्युलेख विशेष वाचनीय आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील या माणसांची लेखकाने केलेली निरीक्षणे विलक्षण आहेत. त्यातून ती माणसे, त्यांचे कार्य नेमकेपणाने मांडले जाते. ‘मृत्यू आणि मरण’ या शीर्षकाचा पहिला भाग मला विशेष आवडला. दलाई लामांचे मृत्यूविषयक विचार, आचार्य रजनीश यांचे मृत्यूचे भय हे लेख सुन्न करतात. मृत्यूनंतरचे जीवन, मृत्यूचा अनुभव हिटलिस्ट या लेखांमधील अनुभव थरारून सोडतो. हे पुस्तक मृत्यूविषयी आहे, त्यामुळे काही काळ आपण अस्वस्थही होतो. पण वाचून पूर्ण झाल्यानंतर हे पुस्तक जगण्याचाच संदेश देत आहे, असा सुंदर अनुभव येतो. - धरित्री जोशी ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more