* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEATH AT MY DOORSTEP
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788177667691
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :KHUSHWANT SINGH COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE DEATH HAS A WARRANT IN ITS HANDS, WHOSE NAME IS AT THE TOP TODAY? DEATH, THE ETERNAL TRUTH, THE FACT WHICH IS BREATH-TAKING, SAD, GLOOMY. EVERYONE LOOKS AT DEATH FROM A DIFFERENT ASPECT. SOME CONSIDER IT TO BE THE END OF LIFE, AND FOR SOME IT IS BEGINNING OF A NEW LIFE. SOME FEEL THAT DYING IS CHANGING BODIES BY THE SOULS. SOME FEEL THAT DEATH IS BEING NOTHING. AND SOME FEEL THAT IT IS A FULL-STOP TO EVERYTHING. WHAT IS IT ACTUALLY? WHEN THE BODY BECOMES LIFELESS, WHAT HAPPENS TO THE SOUL? WHAT HAPPENS TO THE MIND SITUATED IN THE BODY? WHAT HAPPENS TO THE FEELINGS IN IT? MANY SUCH QUESTIONS REMAIN UNANSWERED. DEATH IS CONSIDERED TO BE A BLOW, BEREAVEMENT, AN AGONY, A PAIN, MUCH CRYING, MUCH MOURNING. DEATH IS A VERY SERIOUS TOPIC. BUT THIS VERY DEATH MEETS US IN EVERY ARTICLE UNDER THIS BOOK IN THE PECULIAR STYLE OF THE AUTHOR IN A VERY STRAIGHT FORWARD WAY. HIS ARTICLES ON MANY OF THE FAMOUS PERSONALITIES REVEAL THE UNKNOWN SIDES. THEY MAKE US LAUGH, THINK, CRY, AND THEY BEDAZZLE US.
‘‘मृत्यूच्या हातात कसलंसं फर्मान आहे. आज त्या यादीत कुणाची नावं आहेत कुणास ठाऊक!’’ ...मृत्यू ...अटळ सत्य... धडकी भरवणारं, वाईट, खिन्न मानलं जाणारं वास्तव. जीवनातील या मूलभूत वास्तवाकडं पाहण्याचे निरनिराळे दृष्टिकोन आढळतात. कुणी मृत्यू हा शेवट मानतं. कुणी नव्या जीवनाचा आरंभ, तर कुणी मृत्यू हा फक्त देहरुपी वस्त्राचा त्याग मानतात. कुणाला मृत्यू म्हणजे अस्तित्वशून्यता वाटते; तर कुणाला अंतिम पूर्णविराम... पण देहाची चेतना संपली की, मनाचीही संपते? आत्मा म्हणजे काय? तो कुठं असतो? जाणिवांचं काय होतं... असे कितीतरी प्रश्न अनुत्तरीतच राहतात. मृत्यू म्हणजे आघात, वियोग, क्लेष, दु:ख, रडारडी असा हा विषय गहन गंभीर मानला जातो. मात्र या मृत्यू लेखसंग्रहात बुद्धिप्रामाण्यवादी लेखकाचे मृत्यूविषयक विचार खुसखुशीत शैलीत व रोखठोक बाण्यानं प्रकट झाले आहेत. तसंच काही विलक्षण प्रतिभावंतांवर त्यांनी लिहिलेल्या मृत्यूलेखांतून त्या त्या व्यक्तित्वांचे विविधरंगी पदर वाचकाला अस्वस्थ करतात, हसवतात, डोळे दिपवतात; तर कधी अंतर्मुख करतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#KHUSHWANTSINGH #मृत्युनंतर #खुशवंतसिंग #मृत्यूआणिमरण #THOUGHTSONDEATH #TRANSLATIONSINMARATHI #अनुवाद #मराठीअनुवाद # मृत्युलेख # COLLECTIONOFOBITUARIES #THECOMPANYOFWOMEN #
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    खुशवंत सिंगानी प्रथम म्रुत्यु संबंधी आचार्य रजनीश,दलाई लामा आदिंचे विचार नमुद केले आहेत आणि नंतर अनेक व्यक्तिं चा नमुनेदार जीवनपट व त्यांचा अंत या विषयी अतिशय शैलीदार भाषेत विवेचन केलेले.संग्रहणीय पुस्तक!

  • Rating Starराजू गोसावी

    "मृत्यूच्या हातात कसलंस फर्मान आहे. आज त्या यादीत कुणाची नावं आहेत कुणास ठाऊक!" ...मृत्यू...अटळ सत्य... धडकी भरवणार ,वाईट, खिन्न मानलं जाणार वास्तव. जीवनातील या मूलभूत वास्तवाकड पाहण्याचे निरनिराळे दृष्टिकोन आढळतात. कुणी मृत्यू हा शेवट मानत. कणी नव्या जीवनाचा आरंभ, तर कुणी मृत्यू हा फक्त देहरुपी वस्राचा त्याग मानतात. कुणाला मृत्यू म्हणजे अस्तित्वशून्यता वाटते; तर कुणाला अंतिम पूर्णविराम..... पण देहाची चेतना संपली कि, मनाचीहीं संपते ? आत्मा म्हणजे काय ? तो कुठं असतो ? जाणीवांच काय होत... असे कितीतरी प्रश्न अनुत्तरीतच राहतात. मृत्यू म्हणजे आघात, वियोग, क्लेश, दुःख, रडारडी असा हा विषय गहन गंभिर मानला जातो. मात्र या मृत्यू लेखसंग्रहात बुद्धिप्रामाण्यवादी लेखकाचे मृत्यूविषयक विचार खुसखुशीत शैलीत व रोखठोक बाण्याने प्रकट झाले आहेत. तसच काही विलक्षण प्रतिभावंतांवर त्यांनी लिहलेल्या मृत्युलेखातून त्या त्या व्यक्तित्वाचे विविधरंगी पदर वाचकाला अस्वस्थ करतात, हसवतात, डोळे दिपवतात ; तर कधी अंतर्मुख करतात. अस हे मनातल्या एका कोपर्यात दडून बसणार पुस्तक. ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 03-02-2007

    मृत्यू आणि खुशवंतसिंग... मृत्यू... माझ्या उंबरठ्यांशी’ हे खुशवंतसिंग यांचे अनुवादित पुस्तक वाचताना ‘मृत्यू’ या घटनेकडे पाहण्याचे मराठी साहित्यिकांचे सहजपणे आठवतात. ‘देह मृत्यूचे भातुके’, ‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोही पुढे जात आहे’। अशा नेक अभंग, श्लोक, ओव्यांमधून मराठी संतांनी ‘मृत्यू’या शाश्वत सत्याची जाणीव करून दिलेली आहे. अर्थात यामध्ये देहाची नश्वरता, देहाला दिलेले दुय्यम महत्त्व या गोष्टी आहेतच; पण ‘पाखरा येशील का परतून’ सारख्या कवितेत करुण विलापही जाणवतो. ‘कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या’ सारख्या कवितेतून ‘समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही,’ ही मृत्यूसारख्या घटनेतील एकटेपणा, एकाकी असणे ठळकपणे जाणवते. ‘जन्म म्हणे आला आला। जव्हा आलं बोलावनं। मौत म्हणे गेला गेला।’ बहिणाबाई चौधरींसारखी कवयित्री जन्म-मृत्यूमधली सहजता निखळपणे सांगते. ‘पावले तुझी कातड्याची, मरणमाडी चढायची...’ अशा शब्दांत आरती प्रभू मनुष्याची मृण्मय देहाची जाणीव करून देतात. ही स्वातंत्र्यहीन अवस्था आहे हे सांगताना कवी, ‘मागे फिरू नकोस बाबा। कुठे ठेवशिल दरीत पाय।’ असे म्हणतो. अशा अनेक बाजूंनी मराठी साहित्यात मानवी मृत्यूबद्दलचे चिंतन आणि एकूणच जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आठवतो खुशवंतसिंग यांच्या पुस्तकामुळे. ‘डेथ अ‍ॅट माय डोअरस्टेप’ या मूळ खुशवंतसिंगलिखित पुस्तकाचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. या पुस्तकात ‘मृत्यू आणि मरण’ या पहिल्या भागात मृत्यूसंबंधी दलाई लामा, आचार्य रजनीश यांनी मांडलेले विचार संकलित केले आहेत. भारताचे माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग स्वत: कर्करोगाने पीडित आहेत. ‘पाहुणा मृत्यू’ या लेखात व्ही. पी. सिंग यांनी ‘‘दर आठवड्याला मी मृत्युदेवतेला विचारतो: तुझ्यासोबत निघण्याची वेळ झाली का?’’ ती उत्तरते,‘‘नाही, अजून नाही,’’ हे उद्गार व्यक्त केले आहेत. ‘हिट लिस्ट’वर ‘तयार रहा’ यासारख्या लेखांतून मृत्यूकडे पाहण्याची सहज दृष्टी व्यक्त होते. मृतांकडून ‘ज्ञानप्राप्ती’, ‘मृत्यूनंतरचं जीवन’ या लेखांमधून मृत्यूनंतरही ज्ञानप्राप्ती शक्य असल्याची श्रद्धा व्यक्त होते. हा पुन्हा श्रद्धेचा आणि विश्वास-अविश्वासाचा भाग आहे. पुस्तकाचा दुसरा भाग ‘मृत्यूनंतर’ हा आहे. या भागात झेड.ए.भुट्टो यांची फाशी, त्यापूर्वीच न्यायालयीन खटला, फाशीची शिक्षा निश्चित झाल्यानंतर भुट्टोंच्या मनातील निराशा, घालमेल यांचे चित्रण येते. प्रोतिमा बेदी, ‘नर्गिस दत्त’, ‘चेतन आनंद’ या चंदेरी दुनियेतील कलावंतांच्या मृत्यूसंबंधी लेख आहेत, त ‘फैज अहमद फैज’, ‘अली सरदार जाफरी’, ‘आर. के. नारायण’, ‘मुल्कराज आनंद’ इ. साहित्यिकांवर लिहिले. मृत्यूलेख दुसऱ्या भागात एकत्रित केले आहेत. ‘दादी माँ’, ‘राज विलातील छज्जूराम’ यांनी लेखकाच्या व्यक्तिगत आयुष्यातला काही काळ व्यापला आहे. खुशवंतसिंग यांनी पाळलेला ‘सिम्बा’ हा कुत्रा आणि त्याचा मृत्यू, यांचा समावेशही या लेखांमध्ये झालेला आहे. दुसऱ्या भागातील कवी-कलावंत, देशी-विदेशी मित्र-परिचित यांचा निकटचा सहावास लेखकाला लाभलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मृत्युलेख लिहित असताना लेखक व्यक्तीचे वैशिष्ट्य, तिच्या व्यक्तीमत्त्वाची भली-बुरी बाजू रोखठोक भाषेत मांडतो. ज्यांच्या सहवासात खुशवंतसिंग यांना वाईट अनुभव आला. त्या व्यक्तीच्या अवगुणांची परखड कबुली त्यांनी दिली आहे. मरण पावलेल्या व्यक्तीबद्दल बोलताना चांगले बोलावे, हा रूढ संकेत लेखकाने झुगारला आहे. यात एका बाजूने त्यांचे माणूसपण दिसते, पण दुसऱ्या बाजूने मरणदारी, मृत्यूनंतरही माणूस क्षमाशील होऊ शकत नाही का, माणसाच्या मनात कडवटपणा कायमच घर करून कसा काय राहतो, असे प्रश्न पुस्तक वाचताना पडतात. खुशवंतसिंग ‘द हिंदुस्थान टाइम्स’, ‘द ट्रिब्युन’ सारख्या वृत्तपत्रासाठी लिहिणारे लेखक, भारतीय उच्चायुक्त कार्यालयात जनसंपर्क विभागाचा कार्यभार सांभाळणारी व्यक्ती म्हणून परिचित आहेत. उच्च वर्गातील माणसांचा वावर, त्यांच्या अवतीभवती असल्याच्या खुणा त्यांच्या लेखनातून जाणवतात. उच्च वर्गातील स्त्री-पुरुषसंबंधातील मुक्तपणाची चित्रे ‘मृत्यू... माझ्या उंबरठ्याशी’ या पुस्तकातून आली आहेत. दूरदर्शन, खासगी वाहिन्यांच्या माध्यमातून अहोरात्र पाझरणारी करमणूक या पुस्तकरूपाने का यावी? जागतिकीकरणानंतर सर्वत्र पसरलेल्या सुखवादातून अशा प्रकारचे रंजक चित्र पुस्तकातून आले आहे काय, असे प्रश्न मनात येतात, भीष्म सहानींवरील लेख अपूर्ण वाटतो. याशिवाय दुसऱ्या भागात कलावंतांवरचे मृत्यूलेख, लेखक-कवी, अधिकारी-उच्चपदस्थ व्यक्ती, अशी विभागणी करून लेखांचा क्रम लावला नसल्याचे जाणवते. व्यक्तींवरील मृत्यूलेखांचा एकसंध परिणाम होत नाही. कारण या लेखांचे स्वरूप त्रोटक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 07-01-2007

    जगण्याचा संदेश देणारा ‘मृत्यू’... ‘डेथ अ‍ॅट माय डोअरस्टेप’ हे खुशवंत सिंग यांचं सुंदर पुस्तक आता मराठी वाचकांनाही वाचायला मिळेल. ‘मृत्यू... माझ्या उंबरठ्याशी’ हा मूळ पुस्तकाची खुमारी कायम ठेवणारा सुरेख अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. या पुस्तकत मृत्यूविषयीच लेखक बोलत राहतो. खुशवंत सिंग यांनी मृत्युलेख अनेक लिहिले; पण पहिला मृत्युलेख ऐन विशीत असताना लिहिला. ‘मृत्यूनंतर’ या दुसऱ्या भागात हे मृत्युलेख समाविष्ट आहेत. तरुण हुकूमशहा संजय गांधी, मार्क्सवादी लक्षाधीश रजनी पटेल, आर. के. नारायण, प्रोतिमा बेदी, भीष्म सहानी, धर्माकुमार, चेतन आनंद यांच्यावरील मृत्युलेख विशेष वाचनीय आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील या माणसांची लेखकाने केलेली निरीक्षणे विलक्षण आहेत. त्यातून ती माणसे, त्यांचे कार्य नेमकेपणाने मांडले जाते. ‘मृत्यू आणि मरण’ या शीर्षकाचा पहिला भाग मला विशेष आवडला. दलाई लामांचे मृत्यूविषयक विचार, आचार्य रजनीश यांचे मृत्यूचे भय हे लेख सुन्न करतात. मृत्यूनंतरचे जीवन, मृत्यूचा अनुभव हिटलिस्ट या लेखांमधील अनुभव थरारून सोडतो. हे पुस्तक मृत्यूविषयी आहे, त्यामुळे काही काळ आपण अस्वस्थही होतो. पण वाचून पूर्ण झाल्यानंतर हे पुस्तक जगण्याचाच संदेश देत आहे, असा सुंदर अनुभव येतो. - धरित्री जोशी ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more