* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NAME OF THE BOOK IS NASHTA MEYER, NASHTA GADYA. THE SOCIETY CONSIDERS ME TO BE NASHTA THAT IS THE ONE WHO IS NOW OUT OF HAND. BUT, I PREFER BEING CALLED THAT. BECAUSE IT IS A FACT THAT WHEN A WOMAN WANTS TO OVERCOME HER PAIN, POVERTY AND MISERY; WHEN SHE TRIES TO OPPOSE THE FILTHY RULES OF RELIGION, SOCIETY AND THE COUNTRY, WHEN SHE OPPOSES THE RIGHTS WHICH INSULT HER, WHEN SHE IS ALERT ABOUT HER RIGHTS, THEN THE SO CALLED GENTLEMEN OF THE SOCIETY CALL HER `NASHTA`. IF A WOMAN WANTS TO IMPROVE THEN THE FIRST CONDITION IS SHE HAS TO FORGET HERSELF, SHE HAS TO PERISH HERSELF. UNLESS AND UNTIL A WOMAN IS PERISHED FROM THE SOCIETY, SHE CANNOT BE RELIEVED FROM THE SOCIETY. ON THE CONTRARY THE WOMAN WHO IS PERISHED IN THE EYES OF THE SOCIETY IS IN TRUE SENSE THE HEALTHIEST AND INTELLIGENT HUMAN BEING.
या पुस्तकाचं नाव `नष्ट मेयेर नष्ट गद्य`. समाजाच्या दृष्टीनं मी `नष्ट` म्हणजे `वाया गेलेली` आहे. असं स्वत:ला म्हणवून घेणं मला आवडतं. कारण जी स्त्री स्वत:चं दु:ख, दैन्य, दुर्दशा दूर करायला बघते, धर्म, समाज आणि राष्ट्र यांच्यातील गलिच्छनियमांना विरोध करायला खंबीरपणे उभी राहते, तिचा अपमान करणाऱ्या गोष्टींना विरोध करते, स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूक असते, तिला समाजातील सभ्य लोक `नष्ट` म्हणतात, हे सत्य आहे. स्त्रीला सुधारायचं असेल, तर पहिली अट तिनं `नष्ट` व्हायला पाहिजे. समाजाच्या दृष्टीनं `नष्ट` झाल्याशिवाय समाजाच्या कचाट्यातून स्त्रीची सुटका होणं शक्य नाही. लोक ज्या स्त्रीला `नष्ट` म्हणतात, तीच खरी निकोप आणि बुद्धिमान माणूस असते. तसलिमा नासरिन
उत्कृष्ट अनुवादासाठी रणजीत देसाई पुरस्कार
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 28-05-2004

    जगाकडे बघण्याची लख्ख दृष्टी... स्वत:च्या सन्मानासाठी आणि तत्त्वांसाठी लढा देत आलेली आणि म्हणूनच बदनाम ठरलेली बांगलादेशी लेखिका तस्लिमा नासरिन जगभरच्या वाचकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. स्वत:चा देश सोडून तिला परागंदा व्हावं लागलं, अनेक आरोपांना सामोरं जवं लागलं, पण तिने स्वत:च्या मनाचा सूर ऐकला... कसलीही भीती न बाळगता ती आपल्या पद्धतीने जगत, बोलत आणि लिहित राहिली. पुरुष संस्कृतीच्या आक्रमक स्वार्थीपणाविरुद्ध आणि धर्ममार्तंडाच्या ढोंगाविरुद्ध तस्लिमाने जे लेखन केलं ते एकीकडे तिला अपराधी ठरवून गेलं, तर दुसरीकडे तेजस्वी, ‘लज्जा’, ‘निर्बाचित कलाम’, ‘अमार मेयेबेला’, ‘शोध’, अशा अनेक पुस्तकांतून तस्लिमाने केलेलं लेखन विलक्षण प्रत्ययकारी आहे. तस्लिमाचं आणखी एक विलक्षण पुस्तक म्हणजे ‘नष्ट मेयेर नष्ट गद्य’ तिच्या इतर अनेक पुस्तकांप्रमाणे हेही मराठीत अनुवादित झालं आहे. मृणालिनी गडकरी यांनी ते मराठीत आणलं आहे. तस्लिमाला आक्रस्ताळी, धर्मभ्रष्ट ठरवून तिच्याकडे तिच्या आप्तांनी, मित्रांनी आणि राज्यकर्त्यांनी पाठ फिरवली. तिला बहिष्कृतच केलं. बंगाली अशा व्यक्तीला ‘नष्ट’ म्हणतात. वाया गेलेली, नतद्रष्ट आणि नाठाळ बाई म्हणून तस्लिमाची नाचक्की करण्यात आली, तेव्हा या नतद्रष्ट मुलीने केलेलं लेखनही तसंच असणार अशा कल्पनेनं तिने या पुस्तकाला तेच शीर्षक दिलं! स्वतंत्र जाणिवा घेऊन जगणारी तस्लिमा या लेखनातून आपले मुक्त विचार व्यक्त करते. मुख्यत: बांगलादेशातील स्त्रीजीवनाविषयी ती लिहित असली, तरी तिचं लिखाण जगभरातील स्त्रीची व्यथा-वेदना बोलून दाखवणारी आहे. छोटेखानी लेखांचा समावेश असलेलं हे पुस्तक लेखिकेच्या मनात खदखदणारा क्षोभ आणि असंतोष दाखवनू देते. पुरुष वर्चस्वाच्या दुनियेत स्त्रीवर पदोपदी अन्याय होतो आणि तिला नेहमीच गौण स्थान मिळतं. हा अन्याय आहे असं बोलून दाखवणारी तस्लिमा रोषाला निमंत्रण देणारी ठरते हे ओघाने आलंच. तस्लिमाने या लेखांमध्ये स्त्रियांच्या आणि मुलींच्या जीवनाला वेढणाऱ्या प्रश्नांची दखल घेतलेली दिसते. शाळांमधून मुलींची गळती सुरू असणं तिला खटकतं तेव्हा ती या वास्तवाची नोंद घेते. जाहिरातींच्या क्षेत्रात स्त्री-देहाचा व्यापर करण्याची बोकाळलेली वृत्ती तिच्या मनात संताप जागवते. तोंडी तलाक, मुलगा-मुलगी असा भेद करण्याची परंपरा, स्त्रीची स्वत:च्याच घरात होणारी उपासमार, स्त्रियांना बाळंतपणाची रजा द्यावी लागते, म्हणून त्यांना नोकरीवरच घेणं टाळलं जातं त्याबद्दलही ती कडक शब्दांमध्ये लिहिते. अशा लहान-मोठ्या विषायांमधून ती अतिशय गंभीर प्रश्नांना संवेदनशीलतेने वाचा फोडते. भाषेबाबत जागरूक असणाऱ्या तस्लिमाला भाषेच्या पारंपरिक वापराबद्दलाही आक्षेप घ्यावेसे वाटतात. ‘सर्व मुले औरस असतात.’ या लेखात ती स्त्रीला औरस-अनौरस कल्पनेच्या रूपानं नैतिक जाळ्यात अडकविण्याच्या पुरुषी काव्यावर टीका करते. स्त्रीला बंधनामध्ये जखडून स्वत: मोकळाच राहणारा पुरुष दोषी आहे, असं ती म्हणते. हा ‘अनौरस’ शब्दच शब्दकोशातून हद्दपार केला पाहिजे असं तस्लिमाचं म्हणणं आहे. या लिखाणातून तस्लिमाच्या कविमनाचंही दर्शन घडतं. तस्लिमा म्हणजे केवळ अन्याय-अत्याचाराच्याच गोष्टी करणार या समजुतीला खोटं पाडत ती आपल्या विविध अनुभवांबद्दल लिहिते. शांतिनिकेतनातील वसंतोत्सव तिला फार मोहक वाटतो. आयुष्यातल्या सुंदरतेचा वेध ती त्याबद्दल लिहिताना घेते. रवींद्रनाथ, रवींद्रसंगीत आणि वसंत ऋतूच्या दिवसांमध्ये आनंदाच्या रंगाने न्हाऊन उठलेलं शांतिनिकेतन तस्लिमाच्या मनावर पसरत जातं... तस्लिमाचं हे लिखाण मनाला अंतर्मुख करून जातं. जगाकडे बघण्याची तिची स्वत:ची जी लख्ख दृष्टी आहे, तिचा प्रत्यय ते वाचताना येतो. ...Read more

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    बंडखोर लेखिकेचे अंतर्मुख करणारे वेधक लेख… आपले विचार प्रामाणिकपणे आणि परखड मांडणारी तस्लिमा नसरीन ही बंडखोर बांगलादेशी लेखिका म्हणजे अनेक गोष्टींना मुळापासून उघडेवाघडे करून दाखवणारे एक वादळच आहे. स्वातंत्र्याची आंतरिक ऊर्मी घेऊन जाणारी तस्लिमा जगाकड बघण्याची एक लख्ख अशी दृष्टी बाळगते आणि मनाला कसलीही भीती न वाटू देता आपल्या विचारांना आणि भावनांना लेखणीद्वारे वाट करून देते. स्वत:च्या या मुक्तपणाची किंमतही तिने भरपूर चुकवली आहे. अशा निडर, बंडखोर व्यक्तीला समाज नेहमी नावेच ठेवतो. त्यातूनही ती जर स्त्री असेल तर ती अधिकच बदनाम ठरते. तस्लिमावरही अशा अनेक शेलक्या विशेषणांचा आणि विविध आरोपांचा वर्षाव झाला, पण आपले लेखन तिने सुरूच ठेवले. ‘लज्जा’, ‘निर्वाचित कलाम’, ‘आभार मेयेलेला’ ‘निर्वाचित मेयेर नष्ट गद्य’ आणि आता ‘शोध’ तस्लिमाचा लेखनप्रवास तिच्या जंगप्रवासाइतकाच प्रत्ययकारी. बांगलादेशातील तथाकथित धर्मरक्षक डोळ्यांवर झापडे बांधलेले लोक आणि राजकीय आसन सुरक्षित काकाच्या उद्योगात गुंतलेले राज्यकर्ते अशा सर्वांनीच तस्लिमाकडे पाठ फिरवली. तिला ‘वाया गेलेली बाई’ समजून जणू बहिष्कृतच केले. अशा ‘वाया गेलेल्या’ व्यक्तीला बंगाली भाषेत ‘नष्ट’ म्हणतात. तर या ‘नष्ट’ म्हणजे ‘नाठाळ’ किंवा ‘नतद्रष्ट’ बाईने केलेले लेखनच एका पुस्तकातून वाचकांच्या भेटीला आले. ‘नष्ट मेयेर नष्ट गद्य’, म्हणजे नतद्रष्ट मुलीचे नतद्रष्ट लेखन ! मराठीत या पुस्तकाचा मृणालिनी गडकरी यांनी अनुवाद केला आहे. छोट्या आकाराच्या लेखांचे हे संकलन तस्लिमाच्या मनातील खदखदणाऱ्या क्षोभाचे दर्शन घडवते. पुरुष वर्चस्वाच्या समाजरचनेत स्त्री पदोपदी दुय्यम ठरत जाते आणि अन्यायाची शिकार बनते, त्यामुळे अनेक गोष्टीमधला भेदभाव किंवा अन्याय हा समाजाच्या इतका अंगवळणी पडला आहे, की तो अन्याय आहे हे अनेकांना उमजतच नाही आणि कोणी तसे लक्षात आणून दिले तर त्यांना ते पटत नाही. तस्लिमाच्या लेखनावर गहजब होतो तो याच कारणाने. तस्लिमा प्रामुख्याने बांगलादेशातील स्त्रीजीवनाविषयी लिहित असली, तरी एकूणच जगातील स्त्रियांच्या आयुष्याशी तिच्या या लेखनाच्या प्रश्नाविषयीही तिने लिहिले आहे. या पुस्तकातून तिचे विविध विषयांवरील विचार वाचकांसमोर येतात. तिचे अनुभव आणि भावना शब्दबद्ध होऊन खुलेपणाने आपले अस्तित्व जाणवून देतात. स्त्रीजीवनाबद्दल तस्लिमा अगदी तळमळीने लिहिते. शाळांतून मुलींची रोडावत चाललेली संख्या, जाहिरात क्षेत्रात होत असलेला स्त्रीदेहाचा वापर, मुलींचा वारसा हक्क, तलाकचा प्रश्न अशा अनेक विषयांचे संदर्भ घेऊन तस्लिमा लिहिते. ‘सर्व मुले औरस असतात’ या लेखातून ती स्त्रीला अनौरस-औरस कल्पनांच्या नैतिक जाळ्यात अडकवून पुरुष मात्र मोकळा राहतो. यावर ती टीका करते. ‘अनौरस’ हा शब्दच नष्ट व्हावा अशी मागणी तस्लिमा करते. मुलगा-मुलगी भेद, नवऱ्याचे वर्चस्व, दोन्ही खांद्यावरून पदर घेण्याची दूरदर्शन निवेदकांवर असलेली सक्ती, स्त्रीची घरात होणारी उपासमार, चारित्र्य या संकल्पनेचा फक्त स्त्रियांच्याच संदर्भात होणारा विचार, अशा अनेक मुद्द्यांवर तस्लिमा स्पष्ट शब्दांत लिहिते. स्त्रियांना बाळंतपणाची रजा द्यावी लागते, म्हणून त्यांना नोकरीची संधीच न देण्याच्या प्रवृत्तीवर ती टीका करते. लग्नासाठी मुलगी पाहण्याची प्रथा, स्त्री-पुरुष समानता आणि पतिपत्नी संबंध, बांगलादेशचा ‘पाकिस्तान’ करण्यासंबंधी लहान मुलांवर आजही केले जाणारे संस्कार अशा अनेक घटना व अनुभव तिचे लेखनविषय बनतात. तस्लिमा कविमनाची स्त्री आहे, हे तिच्या लेखनशैलीवरून जाणवत राहते. केवळ अन्याय-अत्याचाराच्या पलिकडचे जीवनही ती एखाद्या लेखात शब्दबद्ध करते. शांतिनिकेतनमधील वसंतोत्सवाबद्दल लिहिताना तिची लेखणी आयुष्यातील सुंदरतेचा वेध घेते. रवींद्रनाथ, रवींद्र संगीत, वसंत ऋतूतील आनंदात रंगलेले शांतिनिकेतन या साऱ्यांनी भारावलेली तस्लिमा ढाक्याला आल्यावरही त्या सुंदर वातावरणातून परतलेलीच नसते. लेखांचा अनुवादही तस्लिमाच्या शैलीचा स्पर्श हरवू न देण्याचा प्रयत्न करणारा आहे. फक्त यात ‘पडदा’ ऐवजी ‘बुरखा’, ‘सावताळ’ ऐवजी ‘संथाळ’ असे मराठीत रूढ असलेले शब्द योजणे अधिक स्वाभाविक ठरले असते असे वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more