* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NAME OF THE BOOK IS NASHTA MEYER, NASHTA GADYA. THE SOCIETY CONSIDERS ME TO BE NASHTA THAT IS THE ONE WHO IS NOW OUT OF HAND. BUT, I PREFER BEING CALLED THAT. BECAUSE IT IS A FACT THAT WHEN A WOMAN WANTS TO OVERCOME HER PAIN, POVERTY AND MISERY; WHEN SHE TRIES TO OPPOSE THE FILTHY RULES OF RELIGION, SOCIETY AND THE COUNTRY, WHEN SHE OPPOSES THE RIGHTS WHICH INSULT HER, WHEN SHE IS ALERT ABOUT HER RIGHTS, THEN THE SO CALLED GENTLEMEN OF THE SOCIETY CALL HER `NASHTA`. IF A WOMAN WANTS TO IMPROVE THEN THE FIRST CONDITION IS SHE HAS TO FORGET HERSELF, SHE HAS TO PERISH HERSELF. UNLESS AND UNTIL A WOMAN IS PERISHED FROM THE SOCIETY, SHE CANNOT BE RELIEVED FROM THE SOCIETY. ON THE CONTRARY THE WOMAN WHO IS PERISHED IN THE EYES OF THE SOCIETY IS IN TRUE SENSE THE HEALTHIEST AND INTELLIGENT HUMAN BEING.
या पुस्तकाचं नाव `नष्ट मेयेर नष्ट गद्य`. समाजाच्या दृष्टीनं मी `नष्ट` म्हणजे `वाया गेलेली` आहे. असं स्वत:ला म्हणवून घेणं मला आवडतं. कारण जी स्त्री स्वत:चं दु:ख, दैन्य, दुर्दशा दूर करायला बघते, धर्म, समाज आणि राष्ट्र यांच्यातील गलिच्छनियमांना विरोध करायला खंबीरपणे उभी राहते, तिचा अपमान करणाया गोष्टींना विरोध करते, स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूक असते, तिला समाजातील सभ्य लोक `नष्ट` म्हणतात, हे सत्य आहे. स्त्रीला सुधारायचं असेल, तर पहिली अट तिनं `नष्ट` व्हायला पाहिजे. समाजाच्या दृष्टीनं `नष्ट` झाल्याशिवाय समाजाच्या कचाट्यातून स्त्रीची सुटका होणं शक्य नाही. लोक ज्या स्त्रीला `नष्ट` म्हणतात, तीच खरी निकोप आणि बुद्धिमान माणूस असते. तसलिमा नासरिन
उत्कृष्ट अनुवादासाठी रणजीत देसाई पुरस्कार
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 28-05-2004

    जगाकडे बघण्याची लख्ख दृष्टी... स्वत:च्या सन्मानासाठी आणि तत्त्वांसाठी लढा देत आलेली आणि म्हणूनच बदनाम ठरलेली बांगलादेशी लेखिका तस्लिमा नासरिन जगभरच्या वाचकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. स्वत:चा देश सोडून तिला परागंदा व्हावं लागलं, अनेक आरोपांना सामोरं जवं लागलं, पण तिने स्वत:च्या मनाचा सूर ऐकला... कसलीही भीती न बाळगता ती आपल्या पद्धतीने जगत, बोलत आणि लिहित राहिली. पुरुष संस्कृतीच्या आक्रमक स्वार्थीपणाविरुद्ध आणि धर्ममार्तंडाच्या ढोंगाविरुद्ध तस्लिमाने जे लेखन केलं ते एकीकडे तिला अपराधी ठरवून गेलं, तर दुसरीकडे तेजस्वी, ‘लज्जा’, ‘निर्बाचित कलाम’, ‘अमार मेयेबेला’, ‘शोध’, अशा अनेक पुस्तकांतून तस्लिमाने केलेलं लेखन विलक्षण प्रत्ययकारी आहे. तस्लिमाचं आणखी एक विलक्षण पुस्तक म्हणजे ‘नष्ट मेयेर नष्ट गद्य’ तिच्या इतर अनेक पुस्तकांप्रमाणे हेही मराठीत अनुवादित झालं आहे. मृणालिनी गडकरी यांनी ते मराठीत आणलं आहे. तस्लिमाला आक्रस्ताळी, धर्मभ्रष्ट ठरवून तिच्याकडे तिच्या आप्तांनी, मित्रांनी आणि राज्यकर्त्यांनी पाठ फिरवली. तिला बहिष्कृतच केलं. बंगाली अशा व्यक्तीला ‘नष्ट’ म्हणतात. वाया गेलेली, नतद्रष्ट आणि नाठाळ बाई म्हणून तस्लिमाची नाचक्की करण्यात आली, तेव्हा या नतद्रष्ट मुलीने केलेलं लेखनही तसंच असणार अशा कल्पनेनं तिने या पुस्तकाला तेच शीर्षक दिलं! स्वतंत्र जाणिवा घेऊन जगणारी तस्लिमा या लेखनातून आपले मुक्त विचार व्यक्त करते. मुख्यत: बांगलादेशातील स्त्रीजीवनाविषयी ती लिहित असली, तरी तिचं लिखाण जगभरातील स्त्रीची व्यथा-वेदना बोलून दाखवणारी आहे. छोटेखानी लेखांचा समावेश असलेलं हे पुस्तक लेखिकेच्या मनात खदखदणारा क्षोभ आणि असंतोष दाखवनू देते. पुरुष वर्चस्वाच्या दुनियेत स्त्रीवर पदोपदी अन्याय होतो आणि तिला नेहमीच गौण स्थान मिळतं. हा अन्याय आहे असं बोलून दाखवणारी तस्लिमा रोषाला निमंत्रण देणारी ठरते हे ओघाने आलंच. तस्लिमाने या लेखांमध्ये स्त्रियांच्या आणि मुलींच्या जीवनाला वेढणाऱ्या प्रश्नांची दखल घेतलेली दिसते. शाळांमधून मुलींची गळती सुरू असणं तिला खटकतं तेव्हा ती या वास्तवाची नोंद घेते. जाहिरातींच्या क्षेत्रात स्त्री-देहाचा व्यापर करण्याची बोकाळलेली वृत्ती तिच्या मनात संताप जागवते. तोंडी तलाक, मुलगा-मुलगी असा भेद करण्याची परंपरा, स्त्रीची स्वत:च्याच घरात होणारी उपासमार, स्त्रियांना बाळंतपणाची रजा द्यावी लागते, म्हणून त्यांना नोकरीवरच घेणं टाळलं जातं त्याबद्दलही ती कडक शब्दांमध्ये लिहिते. अशा लहान-मोठ्या विषायांमधून ती अतिशय गंभीर प्रश्नांना संवेदनशीलतेने वाचा फोडते. भाषेबाबत जागरूक असणाऱ्या तस्लिमाला भाषेच्या पारंपरिक वापराबद्दलाही आक्षेप घ्यावेसे वाटतात. ‘सर्व मुले औरस असतात.’ या लेखात ती स्त्रीला औरस-अनौरस कल्पनेच्या रूपानं नैतिक जाळ्यात अडकविण्याच्या पुरुषी काव्यावर टीका करते. स्त्रीला बंधनामध्ये जखडून स्वत: मोकळाच राहणारा पुरुष दोषी आहे, असं ती म्हणते. हा ‘अनौरस’ शब्दच शब्दकोशातून हद्दपार केला पाहिजे असं तस्लिमाचं म्हणणं आहे. या लिखाणातून तस्लिमाच्या कविमनाचंही दर्शन घडतं. तस्लिमा म्हणजे केवळ अन्याय-अत्याचाराच्याच गोष्टी करणार या समजुतीला खोटं पाडत ती आपल्या विविध अनुभवांबद्दल लिहिते. शांतिनिकेतनातील वसंतोत्सव तिला फार मोहक वाटतो. आयुष्यातल्या सुंदरतेचा वेध ती त्याबद्दल लिहिताना घेते. रवींद्रनाथ, रवींद्रसंगीत आणि वसंत ऋतूच्या दिवसांमध्ये आनंदाच्या रंगाने न्हाऊन उठलेलं शांतिनिकेतन तस्लिमाच्या मनावर पसरत जातं... तस्लिमाचं हे लिखाण मनाला अंतर्मुख करून जातं. जगाकडे बघण्याची तिची स्वत:ची जी लख्ख दृष्टी आहे, तिचा प्रत्यय ते वाचताना येतो. ...Read more

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    बंडखोर लेखिकेचे अंतर्मुख करणारे वेधक लेख… आपले विचार प्रामाणिकपणे आणि परखड मांडणारी तस्लिमा नसरीन ही बंडखोर बांगलादेशी लेखिका म्हणजे अनेक गोष्टींना मुळापासून उघडेवाघडे करून दाखवणारे एक वादळच आहे. स्वातंत्र्याची आंतरिक ऊर्मी घेऊन जाणारी तस्लिमा जगाकड बघण्याची एक लख्ख अशी दृष्टी बाळगते आणि मनाला कसलीही भीती न वाटू देता आपल्या विचारांना आणि भावनांना लेखणीद्वारे वाट करून देते. स्वत:च्या या मुक्तपणाची किंमतही तिने भरपूर चुकवली आहे. अशा निडर, बंडखोर व्यक्तीला समाज नेहमी नावेच ठेवतो. त्यातूनही ती जर स्त्री असेल तर ती अधिकच बदनाम ठरते. तस्लिमावरही अशा अनेक शेलक्या विशेषणांचा आणि विविध आरोपांचा वर्षाव झाला, पण आपले लेखन तिने सुरूच ठेवले. ‘लज्जा’, ‘निर्वाचित कलाम’, ‘आभार मेयेलेला’ ‘निर्वाचित मेयेर नष्ट गद्य’ आणि आता ‘शोध’ तस्लिमाचा लेखनप्रवास तिच्या जंगप्रवासाइतकाच प्रत्ययकारी. बांगलादेशातील तथाकथित धर्मरक्षक डोळ्यांवर झापडे बांधलेले लोक आणि राजकीय आसन सुरक्षित काकाच्या उद्योगात गुंतलेले राज्यकर्ते अशा सर्वांनीच तस्लिमाकडे पाठ फिरवली. तिला ‘वाया गेलेली बाई’ समजून जणू बहिष्कृतच केले. अशा ‘वाया गेलेल्या’ व्यक्तीला बंगाली भाषेत ‘नष्ट’ म्हणतात. तर या ‘नष्ट’ म्हणजे ‘नाठाळ’ किंवा ‘नतद्रष्ट’ बाईने केलेले लेखनच एका पुस्तकातून वाचकांच्या भेटीला आले. ‘नष्ट मेयेर नष्ट गद्य’, म्हणजे नतद्रष्ट मुलीचे नतद्रष्ट लेखन ! मराठीत या पुस्तकाचा मृणालिनी गडकरी यांनी अनुवाद केला आहे. छोट्या आकाराच्या लेखांचे हे संकलन तस्लिमाच्या मनातील खदखदणाऱ्या क्षोभाचे दर्शन घडवते. पुरुष वर्चस्वाच्या समाजरचनेत स्त्री पदोपदी दुय्यम ठरत जाते आणि अन्यायाची शिकार बनते, त्यामुळे अनेक गोष्टीमधला भेदभाव किंवा अन्याय हा समाजाच्या इतका अंगवळणी पडला आहे, की तो अन्याय आहे हे अनेकांना उमजतच नाही आणि कोणी तसे लक्षात आणून दिले तर त्यांना ते पटत नाही. तस्लिमाच्या लेखनावर गहजब होतो तो याच कारणाने. तस्लिमा प्रामुख्याने बांगलादेशातील स्त्रीजीवनाविषयी लिहित असली, तरी एकूणच जगातील स्त्रियांच्या आयुष्याशी तिच्या या लेखनाच्या प्रश्नाविषयीही तिने लिहिले आहे. या पुस्तकातून तिचे विविध विषयांवरील विचार वाचकांसमोर येतात. तिचे अनुभव आणि भावना शब्दबद्ध होऊन खुलेपणाने आपले अस्तित्व जाणवून देतात. स्त्रीजीवनाबद्दल तस्लिमा अगदी तळमळीने लिहिते. शाळांतून मुलींची रोडावत चाललेली संख्या, जाहिरात क्षेत्रात होत असलेला स्त्रीदेहाचा वापर, मुलींचा वारसा हक्क, तलाकचा प्रश्न अशा अनेक विषयांचे संदर्भ घेऊन तस्लिमा लिहिते. ‘सर्व मुले औरस असतात’ या लेखातून ती स्त्रीला अनौरस-औरस कल्पनांच्या नैतिक जाळ्यात अडकवून पुरुष मात्र मोकळा राहतो. यावर ती टीका करते. ‘अनौरस’ हा शब्दच नष्ट व्हावा अशी मागणी तस्लिमा करते. मुलगा-मुलगी भेद, नवऱ्याचे वर्चस्व, दोन्ही खांद्यावरून पदर घेण्याची दूरदर्शन निवेदकांवर असलेली सक्ती, स्त्रीची घरात होणारी उपासमार, चारित्र्य या संकल्पनेचा फक्त स्त्रियांच्याच संदर्भात होणारा विचार, अशा अनेक मुद्द्यांवर तस्लिमा स्पष्ट शब्दांत लिहिते. स्त्रियांना बाळंतपणाची रजा द्यावी लागते, म्हणून त्यांना नोकरीची संधीच न देण्याच्या प्रवृत्तीवर ती टीका करते. लग्नासाठी मुलगी पाहण्याची प्रथा, स्त्री-पुरुष समानता आणि पतिपत्नी संबंध, बांगलादेशचा ‘पाकिस्तान’ करण्यासंबंधी लहान मुलांवर आजही केले जाणारे संस्कार अशा अनेक घटना व अनुभव तिचे लेखनविषय बनतात. तस्लिमा कविमनाची स्त्री आहे, हे तिच्या लेखनशैलीवरून जाणवत राहते. केवळ अन्याय-अत्याचाराच्या पलिकडचे जीवनही ती एखाद्या लेखात शब्दबद्ध करते. शांतिनिकेतनमधील वसंतोत्सवाबद्दल लिहिताना तिची लेखणी आयुष्यातील सुंदरतेचा वेध घेते. रवींद्रनाथ, रवींद्र संगीत, वसंत ऋतूतील आनंदात रंगलेले शांतिनिकेतन या साऱ्यांनी भारावलेली तस्लिमा ढाक्याला आल्यावरही त्या सुंदर वातावरणातून परतलेलीच नसते. लेखांचा अनुवादही तस्लिमाच्या शैलीचा स्पर्श हरवू न देण्याचा प्रयत्न करणारा आहे. फक्त यात ‘पडदा’ ऐवजी ‘बुरखा’, ‘सावताळ’ ऐवजी ‘संथाळ’ असे मराठीत रूढ असलेले शब्द योजणे अधिक स्वाभाविक ठरले असते असे वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more