CHHAYA MAHAJAN

About Author

Birth Date : 12/04/1949


DR. CHHAYA MAHAJAN IS AN MA (ENGLISH) AND HAS OBTAINED A DOCTORATE (PHD) IN ENGLISH. HE HAS WORKED AS A PROFESSOR AND LECTURER OF ENGLISH SUBJECT. AURANGABAD DR. EN. BH. PA. SHE WAS WORKING AS A PRINCIPAL IN A WOMENS COLLEGE. HE HAS ALSO WORKED AS A GUIDE FOR PH.D AND M.PHIL.

डॉ. छाया महाजन या एम.ए.(इंग्रजी), असून त्यांनी इंग्रजी विषयातच डॉक्टरेट (पीएच.डी.) मिळवली आहे. इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका व प्रपाठक म्हणून त्यांनी काम केले आहे. औरंगाबादमधील डॉ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात त्या प्राचार्या म्हणून कार्यरत होत्या. पीएच.डी व एम.फिलच्या मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. आजवर त्यांचे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. यामध्ये स्पर्श , वळणावर , नकळत , मोरबांगडी , एकादश कथा , ओढ हे लघुकथासंग्रह तसेच निळ्या डोळ्यांचा माणूस , हरझॉग हे अनुवादित कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. कॉलेज , मानसी , तन अंधारे या कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. फुलांच्या गोष्टी , मुलांचे प्रेमचंद (३ खंड) या बालसाहित्याचे लिखाणही त्यांनी केले. मोगरा फुलला , भोवरा , रक्ताचा रंग एक या प्रकारच्या प्रौढशिक्षणावर आधारित साहित्य लिहिले. वुइमेन इन पॉल स्कॉटज नॉव्हेल्स यावर इंग्रजीतून संशोधनपर लिखाणही प्रसिद्ध झाले आहे. विविध वृत्तपत्रांतून इंग्रजी साहित्य, स्त्रीवादी साहित्य व विविध विषयांवर लेख व मुलाखाती प्रसिद्ध झाल्या आहेत. विविध साहित्यविषयक, सामाजिक व स्त्रीविषयक परिषदांमध्ये तसेच विविध साहित्य संमेलने व सामाजिक संमेलनांच्या परिसंवादातही त्यांनी सहभाग घेतला आहे. नकळत या लघुकथा संग्रहासाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार (१९९२), कॉलेज या कादंबरीला महाराष्ट्र राज्य शासनाचा वि.स. खांडेकर पुरस्कार (२००७) तसेच स्वातंत्र्यसौनिक श्री. विनायकराव चारठाणकर पुरस्कार मिळाला आहे. महाजन यांना मराठवाडा गौरव पुरस्कार (सामाजिक व शैक्षणिक कार्याप्रीत्यर्थ), मराठवाडा भूषण पुरस्कार (साहित्य क्षेत्रातल्या कार्याप्रीत्यर्थ) ही प्राप्त झाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 7 of 7 total
ADNYAT Rating Star
Add To Cart INR 180
COLLEGE Rating Star
Add To Cart INR 450
DR.CHHAYA MAHAJAN COMBO SET - 6 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1280
EKADASH KATHA Rating Star
Add To Cart INR 230
MANSI Rating Star
Add To Cart INR 160
MULAKHAVEGALA Rating Star
Add To Cart INR 120
YASHODA Rating Star
Add To Cart INR 140

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more