CHHAYA MAHAJAN

About Author

Birth Date : 12/04/1949


DR. CHHAYA MAHAJAN IS AN MA (ENGLISH) AND HAS OBTAINED A DOCTORATE (PHD) IN ENGLISH. HE HAS WORKED AS A PROFESSOR AND LECTURER OF ENGLISH SUBJECT. AURANGABAD DR. EN. BH. PA. SHE WAS WORKING AS A PRINCIPAL IN A WOMENS COLLEGE. HE HAS ALSO WORKED AS A GUIDE FOR PH.D AND M.PHIL.

डॉ. छाया महाजन या एम.ए.(इंग्रजी), असून त्यांनी इंग्रजी विषयातच डॉक्टरेट (पीएच.डी.) मिळवली आहे. इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका व प्रपाठक म्हणून त्यांनी काम केले आहे. औरंगाबादमधील डॉ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात त्या प्राचार्या म्हणून कार्यरत होत्या. पीएच.डी व एम.फिलच्या मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. आजवर त्यांचे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. यामध्ये स्पर्श , वळणावर , नकळत , मोरबांगडी , एकादश कथा , ओढ हे लघुकथासंग्रह तसेच निळ्या डोळ्यांचा माणूस , हरझॉग हे अनुवादित कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. कॉलेज , मानसी , तन अंधारे या कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. फुलांच्या गोष्टी , मुलांचे प्रेमचंद (३ खंड) या बालसाहित्याचे लिखाणही त्यांनी केले. मोगरा फुलला , भोवरा , रक्ताचा रंग एक या प्रकारच्या प्रौढशिक्षणावर आधारित साहित्य लिहिले. वुइमेन इन पॉल स्कॉटज नॉव्हेल्स यावर इंग्रजीतून संशोधनपर लिखाणही प्रसिद्ध झाले आहे. विविध वृत्तपत्रांतून इंग्रजी साहित्य, स्त्रीवादी साहित्य व विविध विषयांवर लेख व मुलाखाती प्रसिद्ध झाल्या आहेत. विविध साहित्यविषयक, सामाजिक व स्त्रीविषयक परिषदांमध्ये तसेच विविध साहित्य संमेलने व सामाजिक संमेलनांच्या परिसंवादातही त्यांनी सहभाग घेतला आहे. नकळत या लघुकथा संग्रहासाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार (१९९२), कॉलेज या कादंबरीला महाराष्ट्र राज्य शासनाचा वि.स. खांडेकर पुरस्कार (२००७) तसेच स्वातंत्र्यसौनिक श्री. विनायकराव चारठाणकर पुरस्कार मिळाला आहे. महाजन यांना मराठवाडा गौरव पुरस्कार (सामाजिक व शैक्षणिक कार्याप्रीत्यर्थ), मराठवाडा भूषण पुरस्कार (साहित्य क्षेत्रातल्या कार्याप्रीत्यर्थ) ही प्राप्त झाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 7 of 7 total
ADNYAT Rating Star
Add To Cart INR 180
COLLEGE Rating Star
Add To Cart INR 280
32 %
OFF
DR.CHHAYA MAHAJAN COMBO SET - 6 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1030 INR 699
EKADASH KATHA Rating Star
Add To Cart INR 150
MANSI Rating Star
Add To Cart INR 160
MULAKHAVEGALA Rating Star
Add To Cart INR 120
YASHODA Rating Star
Add To Cart INR 140

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more