* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KON-TIKI
  • Availability : Available
  • Translators : SHREEYA BHAGWAT
  • ISBN : 9789386175090
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 280
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
KON-TIKI IS THE RECORD OF AN ASTONISHING ADVENTURE—A JOURNEY OF 4,300 NAUTICAL MILES ACROSS THE PACIFIC OCEAN BY RAFT. INTRIGUED BY POLYNESIAN FOLKLORE, BIOLOGIST THOR HEYERDAHL SUSPECTED THAT THE SOUTH SEA ISLANDS HAD BEEN SETTLED BY AN ANCIENT RACE FROM THOUSANDS OF MILES TO THE EAST, LED BY A MYTHICAL HERO, KON-TIKI. HE DECIDED TO PROVE HIS THEORY BY DUPLICATING THE LEGENDARY VOYAGE. ON APRIL 28, 1947, HEYERDAHL AND FIVE OTHER ADVENTURERS SAILED FROM PERU ON A BALSA LOG RAFT. AFTER THREE MONTHS ON THE OPEN SEA, ENCOUNTERING RAGING STORMS, WHALES, AND SHARKS, THEY SIGHTED LAND—THE POLYNESIAN ISLAND OF PUKA PUKA.
‘‘मग तू स्वतःच हा प्रवास करून का पाहत नाहीस?’’ प्रश्न आव्हानात्मक होता. आणि आव्हाने घ्यायची, धाडस करायची वृत्तीच मुळी त्या तरुण संशोधकाच्या अंगी भिनली होती. थॉर हेयेरडाल या तरुण संशोधकाने तराफ्यावरून हजारो सागरी मैलाचा प्रवास करून प्रशांत महासागरापल्याडचा पोलिनेशिया गाठायचा, हे ठरविले. अर्थातच अनेकांनीR त्याला वेड्यात काढले; पण तो ठाम राहिला. कारण त्याच्या सिद्धान्तानुसार कैक हजार वर्षांपूर्वी- अश्मयुगात असेच एका संस्कृतीचे स्थानांतरण झाले होते. मग त्याने अनेक अडथळ्यांवर मात करून, त्या लोकांसारखाच तराफा सिद्ध केला. ही कहाणी, या ‘वेड्या’, अद्भुत वाटाव्या अशा साहसी प्रवासाची... ही कहाणी मानवी संस्कृती, निसर्ग, समुद्री जीवन, जलचर, वादळवारे यांची; मानवी इच्छाशक्तीची, एका शोधाची आणि एका तराफ्याची– ‘कॉन-टिकी’ची!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KON-TIKI #KON-TIKI #कॉन-टिकी #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHREEYABHAGWAT #THORHEYERDAHL "
Customer Reviews
  • Rating StarDivya Marathi 17-2-17

    पूर्वीचे सारेच दर्यावर्दी लाेक हे अाशिया खंडाच्या अाग्नेय भागातून जहाजे वल्हवित प्रशांत समुद्रात गेले हाेते. हे लेखक थाॅर हेयेरडाल यांना मान्य नव्हते. वारे अाणि सगारी प्रवाह विचारात घेतले तर अाशिया खंडातून सरळ पूर्वेस जाणे त्यांना शक्य झाले नसते, पण ाेलिनेशियाकडे जाऱ्याचे दाेन सागरी मार्ग त्यांना उपलब्ध हाेते. पहिला म्हणजे अाग्नये अशियामधून माेठा वळसा घेत वायव्य अमेरिकेकडून हवाई बेटांपर्यंत जाणारा मार्ग अाणि दुसरा म्हणजे दक्षिण अमेरिकेकडून थेट पाेलिनेशियच्या पूर्व किनाऱ्यास जाण्याचा. प्रागैतिहासिक काळात दक्षिण अमेरिकेपासून असा प्रवास करणे शक्य हाेते हे सहा तरुणांनी कसे सिद्ध करून दाखवले, त्याची गाेष्ट या पुस्तकात सांगितली अाहे. वैज्ञानिक अाणि खलाशी यांनी ही शक्यता अाजवर कधी विचारात घेतली नव्हती. दक्षिण अमेररिकेमधील बाल्सा लाकडाचा केलेला तराफा नियमितपणे किनाऱ्यावर नेऊन वाळवला नाही, तर पाण्यात पडेल, असे अभ्यासकांचे ठाम मत हाेते, प्रत्यक्षात मात्र ताे बुचाप्रमाणे अलगद तरंगत राहिला. तसेच प्राचीन काळात अमेरिकेहून जलमार्गाने पाेहाेचण्यास असंभाव्य वाटणारा पाेलिनेशिया हा देश प्रत्यक्षात मात्र पेरूमधील अादिवासी जलप्रवाशांच्या अावाक्यात हाेता, असे सिद्ध झाले. अापली चूक सिद्ध करून दिल्यावर विज्ञान अाणि वैज्ञानिकांकडून काेणती प्रतिक्रिया अाली, तर प्रागाैतिकहासिक नाैकानयनामधील जगातील सर्वात विख्यात अधिकारी म्हणून अाेळखले जाणारे हार्वर्ड विद्यापीठाचे अभ्यासक डाॅक्टर, एस. के. लाॅथ्राॅप यांनी अापली चूक सर्वप्रथम मान्य केली. याच अभ्यासकाचा बाल्सा लाकडाच्या तराफ्याविषयीचा सिद्धांत चूक असल्याचे दाखविण्यात अाले. काॅन-टिकी पुस्तकाने लाेकप्रियतेचा कळस गाठला. ते बेस्टसेलर बनले, पुढे त्याचे ६५ भाषांमध्ये भाषांतर झाले अाणि अाम्ही तयार केलेला काॅन-टिकी प्रवासाचा माहितीपट अाॅस्कर पारिताेषिक विजेता ठरला. १९५१ सालचा सर्वाेत्कृष्ट माहितीपट असे पारिताेषिकही त्याला मिळाले. याच पुस्तकाचा मराठी अनुवाद श्रीया भागवत यांनी केला अाहे. समुद्र ही चीज काय असते हे काॅन-टिकी माेहिमुळे अनुभवायला मिळते. समुद्र हे प्रवासाचे माध्यम अाहे, एकाकीपण भाेगण्याची सजा नाही. अरण्यांमधून वाट काढत रस्ते बांधणे, चक्राचा शाेध लावणे अाणि घाेड्याला माणसाळवून त्यांचा वापर करणे, पाण्यावर तरणारी जहाजे बांधणे या सर्वांच्या अाधी समुद्रच मानवाचा महामार्ग बनला हाेता हेदेखील वाचकाला या पुस्तकातून लक्षात येते. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 23-OCT-2016

    हे लेखन म्हणजे अद्भुत सागरी सफरीचे कथन आहे. थॉर हेयेरडाल या संशोधकाने तराफ्यावरून हजारो सागरी मैलाचा प्रवास करून प्रशांत महासागरापलीकडचा पोलिनेशिया गाठायचा, असे ठरवले. संकटांशी सामना करीत, सर्व अडथळ्यांना पार करीत त्याने ही मोहीम पूर्ण केली. त्या मोहमेचाच हा थरारक वृत्तांत आहे. हा प्रवास म्हणजे कॉन-टिकी सिद्धांत आहे. वारा आणि सागरी प्रवाहांच्या मदतीने ‘फातू हीवा’ नावाच्या सागरी बेटांवर कसे जाऊन पोहोचले याचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यांनी हा प्रवास केला. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more