* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KON-TIKI
  • Availability : Available
  • Translators : SHREEYA BHAGWAT
  • ISBN : 9789386175090
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 280
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
KON-TIKI IS THE RECORD OF AN ASTONISHING ADVENTURE—A JOURNEY OF 4,300 NAUTICAL MILES ACROSS THE PACIFIC OCEAN BY RAFT. INTRIGUED BY POLYNESIAN FOLKLORE, BIOLOGIST THOR HEYERDAHL SUSPECTED THAT THE SOUTH SEA ISLANDS HAD BEEN SETTLED BY AN ANCIENT RACE FROM THOUSANDS OF MILES TO THE EAST, LED BY A MYTHICAL HERO, KON-TIKI. HE DECIDED TO PROVE HIS THEORY BY DUPLICATING THE LEGENDARY VOYAGE. ON APRIL 28, 1947, HEYERDAHL AND FIVE OTHER ADVENTURERS SAILED FROM PERU ON A BALSA LOG RAFT. AFTER THREE MONTHS ON THE OPEN SEA, ENCOUNTERING RAGING STORMS, WHALES, AND SHARKS, THEY SIGHTED LAND—THE POLYNESIAN ISLAND OF PUKA PUKA.
‘‘मग तू स्वतःच हा प्रवास करून का पाहत नाहीस?’’ प्रश्न आव्हानात्मक होता. आणि आव्हाने घ्यायची, धाडस करायची वृत्तीच मुळी त्या तरुण संशोधकाच्या अंगी भिनली होती. थॉर हेयेरडाल या तरुण संशोधकाने तराफ्यावरून हजारो सागरी मैलाचा प्रवास करून प्रशांत महासागरापल्याडचा पोलिनेशिया गाठायचा, हे ठरविले. अर्थातच अनेकांनीR त्याला वेड्यात काढले; पण तो ठाम राहिला. कारण त्याच्या सिद्धान्तानुसार कैक हजार वर्षांपूर्वी- अश्मयुगात असेच एका संस्कृतीचे स्थानांतरण झाले होते. मग त्याने अनेक अडथळ्यांवर मात करून, त्या लोकांसारखाच तराफा सिद्ध केला. ही कहाणी, या ‘वेड्या’, अद्भुत वाटाव्या अशा साहसी प्रवासाची... ही कहाणी मानवी संस्कृती, निसर्ग, समुद्री जीवन, जलचर, वादळवारे यांची; मानवी इच्छाशक्तीची, एका शोधाची आणि एका तराफ्याची– ‘कॉन-टिकी’ची!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KON-TIKI #KON-TIKI #कॉन-टिकी #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHREEYABHAGWAT #THORHEYERDAHL "
Customer Reviews
  • Rating StarDivya Marathi 17-2-17

    पूर्वीचे सारेच दर्यावर्दी लाेक हे अाशिया खंडाच्या अाग्नेय भागातून जहाजे वल्हवित प्रशांत समुद्रात गेले हाेते. हे लेखक थाॅर हेयेरडाल यांना मान्य नव्हते. वारे अाणि सगारी प्रवाह विचारात घेतले तर अाशिया खंडातून सरळ पूर्वेस जाणे त्यांना शक्य झाले नसते, पण ाेलिनेशियाकडे जाऱ्याचे दाेन सागरी मार्ग त्यांना उपलब्ध हाेते. पहिला म्हणजे अाग्नये अशियामधून माेठा वळसा घेत वायव्य अमेरिकेकडून हवाई बेटांपर्यंत जाणारा मार्ग अाणि दुसरा म्हणजे दक्षिण अमेरिकेकडून थेट पाेलिनेशियच्या पूर्व किनाऱ्यास जाण्याचा. प्रागैतिहासिक काळात दक्षिण अमेरिकेपासून असा प्रवास करणे शक्य हाेते हे सहा तरुणांनी कसे सिद्ध करून दाखवले, त्याची गाेष्ट या पुस्तकात सांगितली अाहे. वैज्ञानिक अाणि खलाशी यांनी ही शक्यता अाजवर कधी विचारात घेतली नव्हती. दक्षिण अमेररिकेमधील बाल्सा लाकडाचा केलेला तराफा नियमितपणे किनाऱ्यावर नेऊन वाळवला नाही, तर पाण्यात पडेल, असे अभ्यासकांचे ठाम मत हाेते, प्रत्यक्षात मात्र ताे बुचाप्रमाणे अलगद तरंगत राहिला. तसेच प्राचीन काळात अमेरिकेहून जलमार्गाने पाेहाेचण्यास असंभाव्य वाटणारा पाेलिनेशिया हा देश प्रत्यक्षात मात्र पेरूमधील अादिवासी जलप्रवाशांच्या अावाक्यात हाेता, असे सिद्ध झाले. अापली चूक सिद्ध करून दिल्यावर विज्ञान अाणि वैज्ञानिकांकडून काेणती प्रतिक्रिया अाली, तर प्रागाैतिकहासिक नाैकानयनामधील जगातील सर्वात विख्यात अधिकारी म्हणून अाेळखले जाणारे हार्वर्ड विद्यापीठाचे अभ्यासक डाॅक्टर, एस. के. लाॅथ्राॅप यांनी अापली चूक सर्वप्रथम मान्य केली. याच अभ्यासकाचा बाल्सा लाकडाच्या तराफ्याविषयीचा सिद्धांत चूक असल्याचे दाखविण्यात अाले. काॅन-टिकी पुस्तकाने लाेकप्रियतेचा कळस गाठला. ते बेस्टसेलर बनले, पुढे त्याचे ६५ भाषांमध्ये भाषांतर झाले अाणि अाम्ही तयार केलेला काॅन-टिकी प्रवासाचा माहितीपट अाॅस्कर पारिताेषिक विजेता ठरला. १९५१ सालचा सर्वाेत्कृष्ट माहितीपट असे पारिताेषिकही त्याला मिळाले. याच पुस्तकाचा मराठी अनुवाद श्रीया भागवत यांनी केला अाहे. समुद्र ही चीज काय असते हे काॅन-टिकी माेहिमुळे अनुभवायला मिळते. समुद्र हे प्रवासाचे माध्यम अाहे, एकाकीपण भाेगण्याची सजा नाही. अरण्यांमधून वाट काढत रस्ते बांधणे, चक्राचा शाेध लावणे अाणि घाेड्याला माणसाळवून त्यांचा वापर करणे, पाण्यावर तरणारी जहाजे बांधणे या सर्वांच्या अाधी समुद्रच मानवाचा महामार्ग बनला हाेता हेदेखील वाचकाला या पुस्तकातून लक्षात येते. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 23-OCT-2016

    हे लेखन म्हणजे अद्भुत सागरी सफरीचे कथन आहे. थॉर हेयेरडाल या संशोधकाने तराफ्यावरून हजारो सागरी मैलाचा प्रवास करून प्रशांत महासागरापलीकडचा पोलिनेशिया गाठायचा, असे ठरवले. संकटांशी सामना करीत, सर्व अडथळ्यांना पार करीत त्याने ही मोहीम पूर्ण केली. त्या मोहमेचाच हा थरारक वृत्तांत आहे. हा प्रवास म्हणजे कॉन-टिकी सिद्धांत आहे. वारा आणि सागरी प्रवाहांच्या मदतीने ‘फातू हीवा’ नावाच्या सागरी बेटांवर कसे जाऊन पोहोचले याचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यांनी हा प्रवास केला. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more