* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: UDHVASTA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184981605
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Available in Combos :UMESH KADAM BIRTHDAY OFFER
    UMESH KADAM COMBO SET- 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A TRUE STORY BASED ON THE INCIDENT THAT TOOK PLACE FAR AWAY, IN MI-LAI NEAR THE VILLAGE QUANG-ANGAI IN VIETNAM ON THE FINE MORNING OF 16TH MARCH 1969. AMONG THE MANY PERSONALITIES PICTURED IN THE ABOVE INCIDENT, SOME ARE STILL ALIVE. SOME ARE THOUGH THE RESULT OF A CREATIVE LITERARY MIND. THE DIALOGUES AND THE BEHAVIOUR IS SKETCHED IN THE WAY IT WAS THEN. THE HARMONIOUS BLEND OF THE FACT AND FICTION MAKES IT DIFFICULT TO TELL THEM APART. THIS COMBINATION HAS CREATED A WONDERFUL CHAPTER FOR THE BELIEVERS OF HUMANITY. AN INQUISITIVE MIND MAY FIND IT DIFFICULT TO BELIEVE THE TRUTH YET IT CANNOT DISREGARD THE BEAUTY AND CAPTIVITY OF THE STORY.
‘उद्ध्वस्त’मधली काही व्यक्तिमत्त्वं आज वास्तवातली, हयात असलेली आणि काही नसलेली वाचकांना भेटतील. अशा व्यक्ती प्रत्यक्षात तत्सम प्रसंगी जशा वागल्या-बोलल्या असत्या, तशाच चित्रित केल्या आहेत. या कथानकामध्ये वास्तव आणि कल्फित यांचा संयोग साधून आधुनिक इतिहासातला एक अविश्वसनीय वाटावा असा विदारक आणि हृदयभेदक अध्याय, चित्तवेधक आणि नाट्यफूर्ण रीतीनं मराठी वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बलाढ्य, हेकेखोर अमेरिकेची काळी बाजू उजेडात आणून, दुर्बलांवर राज्य गाजवण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी माणूसपणा टाचेखाली कसा चिरडला जातो, याचं विदारक वर्णन म्हणजे ’उद्ध्वस्त.’

No Records Found
No Records Found
Keywords
"UMESH KADAM# VIETNAM316 MAY 1969# CHARLIE COMPANY# LAI #UDHVASTA #UDHVASTA #उद्ध्वस्त #BIOGRAPHY0&TRUESTORIESMARATHI #UMESHKADAM #उमेशकदम "
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar‎

    अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्या युद्धातील ही एक गोष्ट आहे .मी लाय या क्वांग अंगै खेड्याजवळील छोट्या वस्तीत अमेरिकन सैनिक शिरतात आणि एकूण एक रहिवाश्यांना मारून टाकतात . त्यांच्या अत्याचारातून लहान मुले वृद्ध स्त्रियाही वाचत नाहीत. त्यांच्याबरोबर असलेला रकारी छायाचित्रकार चोरून या संपूर्ण घटनेचे फोटो घेतो . योगायोगाने एक सहा वर्षाची मुलगी यातून वाचते पण तिला आपल्या आईवडिलांची प्रेते पहावी लागतात . अमेरिकन छायाचित्रकार ही सगळी माहिती प्रसारमाध्यमाला देतो आणि अमेरिकेत मोठी खळबळ उडते . सरकारला जनतेचा प्रचंड रोष सहन करावा लागतो. वरिष्ठ पातळीवरून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो .खरे तर ही एक सत्यघटना आहे आणि लेखकाने यात कल्पनाविस्तार केला आहे .मन सुन्न करणारी कादंबरी . ...Read more

  • Rating StarKiran Borkar Vachan Veda

    अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्या युद्धातील ही एक गोष्ट आहे .मी लाय या क्वांग अंगै खेड्याजवळील छोट्या वस्तीत अमेरिकन सैनिक शिरतात आणि एकूण एक रहिवाश्यांना मारून टाकतात . त्यांच्या अत्याचारातून लहान मुले वृद्ध स्त्रियाही वाचत नाहीत. त्यांच्याबरोबर असलेला रकारी छायाचित्रकार चोरून या संपूर्ण घटनेचे फोटो घेतो . योगायोगाने एक सहा वर्षाची मुलगी यातून वाचते पण तिला आपल्या आईवडिलांची प्रेते पहावी लागतात . अमेरिकन छायाचित्रकार ही सगळी माहिती प्रसारमाध्यमाला देतो आणि अमेरिकेत मोठी खळबळ उडते . सरकारला जनतेचा प्रचंड रोष सहन करावा लागतो. वरिष्ठ पातळीवरून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो .खरे तर ही एक सत्यघटना आहे आणि लेखकाने यात कल्पनाविस्तार केला आहे .मन सुन्न करणारी कादंबरी . ...Read more

  • Rating StarVaibhav Mahajan

    मी-लाय या क्वांग अंगैजवळच्या खेड्यामध्ये 16 मार्च, 1969 च्या सकाळी जे काही घडलं त्यावर आधारलेली ही कहाणी आहे. उद्ध्वस्तमधली काही व्यक्तिमत्त्वं आज वास्तवातली, हयात असलेली आणि काही नसलेली आपल्याला भेटतील. अशा व्यक्ती प्रत्यक्षात तत्सम प्रसंगी जशा वागलया-बोलल्या असत्या, तशाच त्या आहेत. या कथानकामध्ये वास्तव आणि कल्पित यांचा संयोग साधून आधुनिक इतिहासातला एक अविश्वसनीय वाटावा असा विदारक आणि हृदयभेदक अध्याय, चित्तवेधक आणि नाट्यपूर्ण रीतीने मराठी वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ...Read more

  • Rating StarVaibhav Mahajan

    मी-लाय या क्वांग अंगैजवळच्या खेड्यामध्ये 16 मार्च, 1969 च्या सकाळी जे काही घडलं त्यावर आधारलेली ही कहाणी आहे. उद्ध्वस्तमधली काही व्यक्तिमत्त्वं आज वास्तवातली, हयात असलेली आणि काही नसलेली आपल्याला भेटतील. अशा व्यक्ती प्रत्यक्षात तत्सम प्रसंगी जशा वागलया-बोलल्या असत्या, तशाच त्या आहेत. या कथानकामध्ये वास्तव आणि कल्पित यांचा संयोग साधून आधुनिक इतिहासातला एक अविश्वसनीय वाटावा असा विदारक आणि हृदयभेदक अध्याय, चित्तवेधक आणि नाट्यपूर्ण रीतीने मराठी वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more