N.R.VADNAP

About Author

Birth Date : 13/11/1923
Death Date : 30/08/2010


N.R.VADNAP WAS WORKING AS A GAZETTED OFFICER OF THE CENTRAL GOVERNMENT. HE RETIRED AT THE END OF 1981. HIS ESSAYS CHATURANGA BHAKTI ANAND, BHIDBIL SHIKA, WRITTEN BY HIM IN THE NEWSPAPERS SAKAL, TARUN BHARAT, LOKMAT AND THE WEEKLY MAGAZINE SAKAL, HAVE BEEN PUBLISHED. A SPECIAL ARTICLE ON CHESS GAME WRITTEN BY HIM HAS BEEN RECORDED IN MARATHI ENCYCLOPAEDIA.

ना.रा. वडनप केंद्र सरकारच्या गॅझेटेड ऑफिसरच्या पदावर कार्यरत होते. १९८१ सालाच्या अखेरीस ते निवृत्त झाले. सकाळ, तरुण भारत, लोकमत या वर्तमानपत्रांमधून आणि साप्ताहिक सकाळ या मासिकातून त्यांनी लिहिलेली चतुरंग बुद्धिबळाचा आनंद, बुद्धिबळ शिका ही सदरे छापून आली आहेत. त्यांनी लिहिलेल्या बुद्धिबळ खेळ या खास लेखाची नोंद मराठी विश्वकोषामध्ये झाली आहे. १९८८ सालच्या विवेकानंद केंद्र पत्रिके मध्ये त्यांचा THE AGE OLD CHESS AND CHESS AGE हा लेख प्रकाशित झाला आहे. बुद्धिबळ शिका, सुसंघटित मारा, चतुरंग (बुद्धिबळातील) सापळे या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. बुद्धिबळाचा श्रीगणेशा या संवादरूपी ग्रंथाचे लेखनही त्यांनी केले आहे. आपल्या पुस्तकांतून केवळ शहरातच नव्हे, तर खेड्यांमधूनही बुद्धिबळाची आवड निर्माण केल्याबद्दल वडनप यांना बुद्धिबळ प्रसारक मंडळाच्या वतीने २२ डिसेंबर, २००८ रोजी कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
Sort by
Show per page
Items 1 to 6 of 6 total
BUDDHIBAL SHIKA Rating Star
Add To Cart INR 295
BUDDHIBALACHA ONAMA Rating Star
Add To Cart INR 150
BUDDHIBALACHA SHREEGANESHA Rating Star
Add To Cart INR 280
CHATURANG (BUDDHIBALATIL) SAPALE Rating Star
Add To Cart INR 160
31 %
OFF
N.R.VADNAP COMBO SET - 5 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1015 INR 701
SUSANGHATIT MARA Rating Star
Add To Cart INR 130

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more