* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BARBALA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669626
  • Edition : 4
  • Publishing Year : APRIL 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 252
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
I NEVER THOUGHT OF MYSELF AS A PROSTITUTE. THERE WAS A CORNER IN MY MIND, WHERE I HAD INSTALLED MY OWN IMAGE, WHICH WAS VERY PURE, UNTOUCHED. IT WAS THE IMAGE OF AN ARTIST. I ALWAYS WANTED TO CHERISH IT, TAKE CARE OF IT. WAS IT POSSIBLE? OUTWARDLY, EVERYONE WAS TRYING TO TAKE ADVANTAGE OF MY SITUATION. THE MALE MEMBERS ALWAYS SEEM TO GET THE SIGNAL THAT I AM AN EASY TARGET AND CAN BE CRUSHED BY ANYBODY, ANYHOW. WHAT WORST WAS YET GOING TO HAPPEN TO ME NOW? NOTHING HAD GONE RIGHT. EVERYTHING HAD GONE WRONG. ALL WRONG DEEDS HAVE ALREADY BEEN DONE. THE WORST HAD ALREADY HAPPENED IN MY CASE. BUT I WAS PREPARED FOR EVERYTHING. I DID NOT WANT TO COMPROMISE WITH THE HUNGER MY CHILDREN WOULD SUFFER FROM. I WANTED IT NOWHERE IN MY SIGHT. I WANTED A GOOD LIFE FOR MY CHILDREN. NO, I WAS NOT PLANNING VERY BIG EVENTS OR CAREERS FOR THEM. MY EXPECTATIONS WERE VERY MEAGER, STILL HOW MUCH WOULD I LIVE? AND, HOW WOULD I LIVE?
मी स्वत:ला वेश्या समजत नव्हते. माझ्या मनाच्या कोप-यात मी स्वत:ची एक प्रतिमा हळुवार जपली होती. बाहेरून मला कोणीही ओरबाडलं, रक्तबंबाळ केलं तरी त्या प्रतिमेला मी प्राणपणाने जपणार होते. ती प्रतिमा एका कलाकाराची होती. मनस्वी कलाकाराची. पण मला हे जमणार होतं का? पुरुषांना जणू माझा वास यायचा, की ही अशी बाई आहे, जिला आपण चिरडू शकतो, वापरू शकतो. माझ्याबाबत घडूनघडून काय घडणार होतं? काय घडायचं राहिलं होतं? जे काय घडायचं ते घडो; पण मला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नको होती. मुलांच्या आयुष्याची नासाडी नको होती. अपेक्षा खूप मोठ्या नव्हत्या पण जे आयुष्य होतं तसंच सुरू राहिलं असतं तर मी किती काळ जिवंत राहू शकले असते? कशा अवस्थेत जिवंत राहू शकले असते?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VAISHALIHALDANKAR #वैशालीहळदणकर #BARBALA #बारबाला #AUTOBIOGRAPHY"
Customer Reviews
  • Rating StarAvinash Pandit

    हे पुस्तक २००६ साली मी संपादित केले. १४०० पानांचे हस्तलिखित होते. त्यातील त्यावेळी न्यायप्रविष्ट असलेला भाग, अशिष्ट भाषा, व्यक्तींची नांवे, भडक प्रसंग वगळून मी ते २५० पानांपर्यंत आणले. मला ज्या ठिकाणी शंका होत्या त्याचे निरसन वर्षाने योग्य ठिकाणी चौकी करून केले. वर्षाने उत्तम प्रास्ताविक लिहिले. टाईम्स हाऊसमध्ये झालेल्या प्रकाशन समारंभात या पुस्तकाचे चूक कोणाची इ. न सांगता वक्त्यांनी योग्य मूल्यमापन केले. माझ्याकरता सांगायचे तर एक दाहक सामाजिक समस्या सांंगणारा दस्तऐवज प्रकाशित करण्यात माझा खारीचा वाटा होता. मी हस्तलिखित वाचायला सुरुवात केली तेव्हा तो शिव्यांचा शब्दकोश आहे, कामसूत्र आहे की बारबालेची गोष्ट आहे तेच कळेना. पत्नीच्या सूचनेवरून काळा मार्कर आणून बरबटलेला मजकूर काळा केला जेणे करून तो वाचता येणार नाही. सुनील मेहतांनी मला संपादन करायला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. पुस्तक वाचल्यावर वैशालीने आपण चुकलो हे कबूल केले. जवळजवळ ३० बारबालांनी आमचे पुस्तक तुम्ही करा असा आग्रह धरला. संवेदनशील विषय कसा हाताळायचा हे मी शिकलो. माझ्या या प्लस पॉईंट्समध्ये भर पडली म्हणजे या विषयावरील वर्षाच्या व्याख्यानावेळी वहिनी, भावजी आणि पैठणी यात रमणारे कार्यक्रम सोडून व्याख्यानाला मोठ्या संख्येने आले. ...Read more

  • Rating StarSuhas Birhade

    बारबालेचं आत्मचरित्र- बारच्या झगमगाटीमागील धगधगीत वास्तव ``कुणी स्वखुशीने वेश्याव्यवसाय किंवा बारबाला बनत नाही`` हे आपण नेहमी ऐकतो. मग असं काय घडतं की मुली या अनैतिक व्यवसायाकडे वळतात. या प्रश्नाचे उत्तर खुद्द बारबाला असलेल्या वैशाली हळदणकरच्या आत्मरित्रातील मिळतं आणि बारच्या झगमगाटामागिल विदारक वास्तव उघड होतं. कलावंत वडील, अभिजन वर्गातील आई अशी पार्श्वभूमी असलेली मुलगी का बारबाला बनते, काय आय़ुष्यात घडतं ते पुस्तकात वाचायला मिळतं. अविश्वसनीय वाटावे असे प्रसंग एकामोगामाग एक उलगडत जातात. सिंगर पासून नबारबाला ते फ्री सर्व्हिस असा वैशालीचा प्रवास तिने प्रामाणिकपणे आणि उलगडला आहे. बारबालांवर अनेक सिनेमे, पुस्तकं आहेत. परंतु बारबालेचं आत्मचरित्र दुर्मिळच. बारबालांच जीवन कसं असतं, त्यांना कुठल्या कुठल्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं ते आत्मचरित्रातून कळतं. बारसंस्कृतीची इत्यंभूत माहितीही वाचकांना होते. वैशाली हळदणकराचं आयुष्य शोकांतिकाच. आत्मचरित्रात अनेक गोष्टी दडवलेल्या असतात. परंतु वैशालीने अगदी बेधडक सर्व काही लिहिलंय. पुरूषी मानसिकता, ढोंगी समाज दिसून येतो. अनेकदा अंगावर काटा यावा असे हे प्रसंग वाचायला मिळतात. मुंबईसह परदेशातील डान्सबार मध्ये वैशालीने काम केलं. तिच्या आय़ुष्यात आलेले पुरूष, तिच्यावर झालेले लैंगिक अत्याचार याची तिने कसलीही भीडभाड न बाळगता माहिती दिलेली आहे. वैशालीचं आत्मचरित्र तिचं असलं तरी ते बारबालांच्या जीवनावचा पट प्रातिनिधिक स्वरूपात उलगडतो. बारबालांची संघटना बांधणाऱ्या वर्षा काळे यांनी वैशालीला आत्मचरित्र लिहिण्यास प्रवृत्त केलं आणि एक माहितीपुर्ण दस्तावेज पुस्तकाच्या रुपात वाचकांना उपलब्ध झाला आहे. ...Read more

  • Rating StarManisha Rohit Joshi

    Khup sundar pustak ahe.. Must read..

  • Rating StarAtmaram Godbole

    वेगळ्या विश्वाची ओळख ...

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more