* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TEEN DAGADACHI CHUL
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660364
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 223
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VIMAL MORE IS BORN IN THE `GONDHALI` TRIBE, ONE OF THE NOMADIC TRIBES. THIS TRIBE LIVES UNDER THE DOMINANCE OF BLIND FAITH, SUPERSTITION, AND IS VERY ORTHODOX. SHE HAS PRESENTED HER AUTOBIOGRAPHY IN THE FORM OF `TEEN DAGDANCHI CHOOL`, WHICH HAS IN TURN ADDED TO ESPECIALLY `DALIT` LITERATURE. THROUGHOUT THIS AUTOBIOGRAPHY, WE DO NOT COME ACROSS HER CONTEMPT OR SOURNESS ABOUT LIFE. SHE DOES NOT COMPLAIN ABOUT THE HARDSHIPS AND ATROCITIES THAT SHE SUFFERED. SHE DOES NOT FALL PREY TO NATURAL FEELINGS LIKE HATRED, ANGER, DISDAIN, OR REVENGE WHICH MAY ARISE AS A RESULT OF A VERY DIFFICULT LIFE. SHE DOES NOT LOOK AT LIFE THROUGH ANY COLORED GLASSES. THIS AUTOBIOGRAPHY IS GREAT IN ALL RESPECTS. FIRSTLY, IT REVEALS THE TRUE LIFE OF A `DALIT`, SECONDLY, IT PRESENTS THE SHEER POVERTY AND ANGUISH, WHICH IN TURN MAKES US REALIZE THE IMPORTANCE TO CHANGE THE SOCIETY AND ITS CLASS BASED CULTURE COMPLETELY. EVERY LEARNED AND PRUDENT CITIZEN SHOULD READ THIS AUTOBIOGRAPHY AND GIVE IT A THOUGHT. IT HAS THE IMMENSE POTENTIAL TO AWAKEN THE HUMAN IN EVERY MIND. VIMAL MORE IS BORN IN THE ‘GONDHALI’ TRIBE, ONE OF THE NOMADIC TRIBES. THIS TRIBE LIVES UNDER THE DOMINANCE OF BLIND FAITH, SUPERSTITION, AND IS VERY ORTHODOX. SHE HAS PRESENTED HER AUTOBIOGRAPHY IN THE FORM OF ‘TEEN DAGDANCHI CHOOL’, WHICH HAS IN TURN ADDED TO ESPECIALLY ‘DALIT’ LITERATURE. THROUGHOUT THIS AUTOBIOGRAPHY, WE DO NOT COME ACROSS HER CONTEMPT OR SOURNESS ABOUT LIFE. SHE DOES NOT COMPLAIN ABOUT THE HARDSHIPS AND ATROCITIES THAT SHE SUFFERED. SHE DOES NOT FALL PREY TO NATURAL FEELINGS LIKE HATRED, ANGER, DISDAIN, OR REVENGE WHICH MAY ARISE AS A RESULT OF A VERY DIFFICULT LIFE. SHE DOES NOT LOOK AT LIFE THROUGH ANY COLORED GLASSES. THIS AUTOBIOGRAPHY IS GREAT IN ALL RESPECTS. FIRSTLY, IT REVEALS THE TRUE LIFE OF A ‘DALIT’, SECONDLY, IT PRESENTS THE SHEER POVERTY AND ANGUISH, WHICH IN TURN MAKES US REALIZE THE IMPORTANCE TO CHANGE THE SOCIETY AND ITS CLASS BASED CULTURE COMPLETELY. EVERY LEARNED AND PRUDENT CITIZEN SHOULD READ THIS AUTOBIOGRAPHY AND GIVE IT A THOUGHT. IT HAS THE IMMENSE POTENTIAL TO AWAKEN THE HUMAN IN EVERY MIND.
अज्ञान-अधंश्रध्देच्या गर्तेत अडकलेल्या आणि रूढी-परंपरांच्या चक्रात गुरफटलेल्या भटक्या-विमुक्त जमातींपैकी ‘गोंधळी’ या जातीत जन्माला आलेल्या विमल मोरे यांनी लिहिलेल्या ‘तीन दगडाची चूल’ या आत्मकथनानं दलित साहित्यातील व पर्यायानं मराठी साहित्यातील आत्मकथनांचं दालन अधिक समृद्ध झालं आहे. या आत्मकथनात भोगलेल्या आणि भोगावं लागणा-या जीवनाबद्दल कुठंही कडवटपणा प्रकट झालेला नाही. चीड, तुच्छता, सूड यांसारख्या अत्यंत स्वाभाविकपणे प्रकट होणा-या भावनात्मक प्रतिक्रियाही व्यक्त झालेल्या नाहीत. जीवनाकडं पाहण्याची दृष्टीही कुठं गढूळ झालेली नाही. हे आत्मकथन दलित जीवनाचं अस्सल, जिवंत चित्रण करणारी वाङ्मयकृती म्हणून श्रेष्ठ आहेच, शिवाय ते अपार दैन्य आणि दु:ख यांचं भेदक चित्रण वाचकांपुढं उभं करीत असतानाच, ही सारी समाजव्यवस्थाच आमूलाग्र बदलून टकण्याची कशी आवश्यकता आहे, हेही वाचकांच्या मनांवर तीव्रपणे ठसवत राहतं. नवा जीवन-संस्कार घडवणारं हे मौलिक आत्मकथन प्रत्येक सुजाण वाचकानं वाचायलाच हवं, असं आहे.
* राज्य पुरस्कार २०००-०१ * भि.ग.रोहमारे पुरस्कार २०००
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIMALMORE #विमल मोरे #TEENDAGADACHICHUL #तीनदगडाचीचूल #AUTOBIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarDnyaneshwar Babruvahan Gund

    अतिशय वास्तववादी, संवेदनशील आणि परिवर्तनाची आस धरून केलेले लेखन..... प्रेरणादायी आत्मकथन....

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 19-08-2001

    सामाजिक भान जागवणारी कादंबरी... ‘तीन दगडांची चूल’ हे विमल मोरे यांची आत्मनिवेदनात्मक कादंबरी अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या आणि रुढी परंपरांच्या चक्रात गुरफटलेल्या भटक्या विमुक्त जमातीपैकी गोंधळी या जमातीमध्ये जन्मलेल्या विमल मोरे यांच्य या आत्मनिवेदनात या समाजाचे आणि जमातीचे प्रतिनिधक चित्रण आले आहे. भटक्या विमुक्तांच्या आयुष्याचे वास्तव चित्र वाचकांसमोर ठेवणारी विमल मोरेंची ही आत्मनिवेदनात्मक कादंबरी म्हणूनच उल्लेखनीय आहे. हातावर पोट घेऊन गावोगावी हिंडणारी ही जमात! गावाबाहेर पाल टाकून गावात देवाच्या नावावर भीक मागणे, हा त्यांचा जन्मजात व्यवसाय. कुटुंबातल्या बायांपासून तो शेंबड्या पोरांपर्यंत गावात भीक मागायची नी काही मिळेल त्यावर गुजराण करायची. विमल मोरे या पालातील अशा एका कुटुंबातल्याच भावाला पोलिसात नोकरी, शिक्षणाचे महत्त्व त्याला पटलेलं आहे. म्हणून आपल्या इतर भावंडांना शिकवण्याचा त्याचा अट्टाहास. आपल्या तुटपुंज्या पगारात स्वत:चा संसार सांभाळून तो आपल्या भावंडांना शाळेत घालतो. पालात राहायची अन् दिवसभर मनाला वाटेल तसं हुंदडायची सवय पडलेल्या विमलला शाळा नको वाटायची. तशाच ‘पोरीला शाळा शिकवून काय कराचं’ हा आईचा प्रश्न तिच्या पथ्यावरच पडायचा. मधूनच आई-बाप तिला पालावर घेऊन जायचे. शाळा बुडायची. भावाचा नि वहिनींचा जीव तुटायचा. पण विमलला शाळा बुडाल्याचं दु:ख कधी झालं नाही. वहिनी या मुलांचा अभ्यास घ्यायची. घरात खाणारी दहा तोंड, तशातही तुटपुंज्या मिळकतीत भावानं विमलचं सातवीपर्यंत शिक्षण केलं. पुढे दादासाहेब मोरे या शिकलेल्या मुलाशी विमलचं लग्न झालं नि अधंश्रद्धेच्या गर्तेत खितपत पडलेल्या विमलला एक नवं जग दिसलं. या जमातीला फक्त पोटाला मिळवणं एवढीच समस्या नाही. दारूचं व्यसन तर त्यांच्या पाचवीला पुजलेलं. दारू पिऊन बायकोला मरेस्तवर झोडून काढणारे नवरे, अंगावर लक्तरं वागवणारी उघडीनागडी पोरं, दिवसभर भटकूनही भीक न मिळाल्यानं उपाशी झोपणारी बायका-मुलं, पाऊसपाण्याच्या दिवसात पालात पाणी शिरल्यावर रात्र रात्र जागून काढणारी ही कुटुंब, एका गावात भीक मिळत नाही म्हणून दुसऱ्या गावात विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर उचलून नेणारी ही माणसं. जमाना बदललाय, लोक भीक घालत नाही म्हणून भांडी विकण्याचा त्यांनी पत्करलेला धंदा. भांड्याच्या व्यवसायातही पोटापुरतं मिळण्याची मारामार. कुणी आजारी पडलं तर डॉक्टरांकडे नेण्याऐवजी बाहेरचं काही झालं म्हणून जादुटोणावर विश्वास ठेवणारे हे लोक. जखम झाल्यावर त्यावर रॉकेल तेल ओतणारी, बाळंतणीला पाच दिवस बिना मिठाच्या कण्या खायला देणारी. सव्वा महिना तिचा विटाळ पाळणारी ही माणसं देवदेव करणारीही आहेत. आषाढ हा त्यांचा मोठा उत्सव. यात्रेला जायचं, नवीन कपडे करायचे, कोंबडा-बकरा कापायचा, मेजवानी झोडायची, एसटीनं गोंधळेवाडीला जायचं. त्यासाठी शाळेत जाणाऱ्या मुलांची शाळा बुडाली तरी त्याचा कुणाला हरिसोस नाही. व्यंग घेऊन जन्माला आलेली मुलं म्हणजे या लोकांच्या मते भूतं... आपल्यापोटी भूत जन्माला आलं ते केव्हा मरते याची वाट पाहणारे अन् असं मूल मेल्यावर आनंद मनवणारे लोक अंध:श्रद्धेच्या किती आहारी गेलेत, याचा प्रत्यय येतो. सगळ्यात या जमातीत हाल होत असतील तर ते बाईचे. ‘या जातीत जनावरालाही किंमत हाय... पर बायला न्हाय’ अशासारख्या वाक्यातून हे वास्तव लेखिकेने वाचकांसमोर ठेवले आहे. ‘आता भीक मागून जगायचं दिस ऱ्हालं न्हायती... आत्ता पयल्यावाणी माणसं भुळी ऱ्हाली न्हायती... आता माणसं देव बिव काय मानत ऱ्हायती... तवा पुज्यारी म्हन, न्हायतर गुरव म्हन... कोन भाकरीचा तुकडा देत न्हाय’ हे वास्तव उमजल्यावर भांडी विकण्याचा व्यवसाय हे लोक पत्करतात. पण अठराविश्वे दारिद्र्य त्यांची पाठ सोडत नाही... ती नाहीच. दादासाहेब मोरेंसारख्या लेखकाशी आपलं लग्न झाल्याचा आनंद अन् अभिमान विमलला आहे. पण लग्नानंतरही पोटाची विवंचना काही सुटत नाही. उलट लग्नाआधी बरं असं म्हणायची वेळ येते. दादासाहेब हे भटक्याविमुक्त जमातीचे एक सक्रिय कार्यकर्ते. या लोकांच्या चुली पेटाव्या म्हणून स्वत:च्या चुलीकडे पाठ फिरवणारे हे तळमळीचे कार्यकर्ते. सभा घे, तर कुठे चर्चासत्र घे, परिसंवाद घे, आज या गावाला तर उद्या त्या गावाला. अशा परिस्थितीती विमलला शाळेची मुलं. पोहोचवण्याचं, डबे तयार करण्याचं काम हाती घ्यावं लागलं. दुसऱ्याचं काम करते म्हणून नातेवाईकांनी तिला हिणवलं. गावभर भीक मागणाऱ्या या लोकांना भीक मागायला कमीपणा वाटत नाही. पण दुसऱ्यांची दोन कामं करून पोटाला खाण्याचा कमीपणा वाटतो. हे अजबच आहे. मोरेंमुळे विमलही सभा संमेलनाला जाऊ लागते, वाचनाची आवड निर्माण होते. आपल्या समाजातील लोकांच्या दु:खाच्या नाना तऱ्हा तिला पाहायला मिळतात. या दु:खापुढे तिला आपली वैयक्तिक दु:ख, समस्या निरर्थक वाटतात. घर खर्च भागवण्यासाठी मला मिळतील तसली लहान मोठी कामं करावी लागत होती. त्याचबरोबर सामाजिक कार्यही सुरू होतं. कौटुंबिक प्रश्नांना आणि अडचणींना कवटाळून आपलीच दु:ख उगाळीत बसण्याच्या मानसिकतेतून मी केव्हाच बाहेर पडले होते. विमलचे हे उदगार म्हणजे एका संकुचित जगातून व्यापक जगाकडे तिची होत चाललेली वाटचाल सूचित करणारे आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या गर्तेतून बाहेर पडून, या जमातीचं सामाजिक भान विमल प्रमाणेच ज्या दिवशी जागेल, तो सुदिन! विमल मोरे यांच्या ‘तिन दगडांची चूल’ या आत्मनिवेदनात्मक कादंबरीने वाचकांच्या ठिकाणी ही अपेक्षा जागवली आहे, हे विशेष! -डॉ. सुनंदा देशपांडे ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 24-02-2002

    विवाहानंतर सामाजिक कार्याची प्रेरणा... भटक्या-विमुक्त जमातीपैकी गोंधळी या जातीत जन्मलेल्या आणि ‘गबाळं’कार दादासाहेब मोरे यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या विमल मोरे लिखित ‘तीन दगडांची चूल’ हे आत्मकथनात्मक पुस्तक पुण्याच्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ या नामवं प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. २१५ पृष्ठसंख्या असलेल्या या आत्मकथनात विमल दादासाहेब मोरे यांना भोगाव्या लागलेल्या दारुण नि दाहक अनुभवाचं जिवंत चित्रण आहे. भटक्या जमातीचं जीवन वाट्याला आल्यामुळे आयुष्यात कोणत्याच प्रकारची स्थिरता नाही, शिक्षणाचा कोणाला गंध नाही, शिक्षणासाठी अनुकूल वातावरण नाही. अंगी कला-कौशल्य नाही, उपजिविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. अशा दारुण परिस्थितीत एका गावाहून दुसऱ्या गावी भटक जाऊन तेथे ‘पालं’ उभारून, तीन दगडांची चूल मांडून, जमेल तितके दिवस (म्हणजे भीक मागून) मिळेल त्यावर पोटाची खळगी भरणे अशा कौटुंबिक परिस्थितीत आणि वातावरणात लेखिकेचं बालपण गेलेलं आहे. इतकंच नव्हे, अज्ञान-अंधश्रद्धा यामुळे लखिकेचा जीवनसंघर्ष अधिकच भीषण व दाहक झालेला आहे. या आत्मकथनातून नव्या कार्यकर्त्यांना आणि विशेषत: महिला चळवळीतील कार्यकर्त्यांना खूप काही शिकण्यासारखं आहे. ग्रामीण बोलीभाषेतले संवाद आणि कादंबरीच्या ढंगाने जाणारी लेखनशैली यामुळे हे पुस्तक ललित वाङमय प्रकाराशी जवळीक साधते. पुस्तकाचा सुमारे दीड तृतीयांश भाग विमलाबार्इंच्या विवाहपूर्व, अर्थात माहेरच्या जीवनक्रमाचं दर्शन घडवितो. स्वत:च्या अस्तित्वासाठी सर्वप्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीशी द्यावा लागलेला झगडा, पराकाष्ठेचं दारिद्र्य आणि केवळ थोरल्या भावाच्या व वहिनीच्या पाठिंब्यामुळे नि अट्टाहासामुळेच प्राप्त झालेलं ९व्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण, त्यात आलेल्या अखंड अडचणी यांचं विमलाबार्इंनी केलेलं वर्णन वाचकाला अस्वस्थ करून सोडतं; तर पुस्तकाचा उर्वरित एक तृतीयांश भाग म्हणजे पृष्ठ १४६पासून शेवटपर्यंत विमलाबार्इंच्या विवाहोत्तर जीवनाचं प्रेरणादायी दर्शन घडविणारा आहे. ६ मार्च १९८८ ला ‘गबाळं’चे लेखक दादासाहेब मोरे यांच्याशी विमलाबार्इंचं लग्न झालं. येथूनच पुढे विमलाबार्इंच्या जीवनाला अगदी वेगळं वळण लागलं, नवा अर्थ प्राप्त झाला. त्यांचे पती महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील धडाडीचे नेते व कार्यकर्ते. असा पती लाभल्यामुळे विमलाबार्इंचं पुढील सारं जीवनच आमूलाग्र बदलून गेल्यास नवल नाही. त्यादेखील स्वत: पतीच्या खांद्याला खांदा लावून स्वत:च्या संसाराकडे विशेष लक्ष न देता दुर्बळ - दुर्लक्षित - निराधार अशा आपल्या सर्व दृष्टीने मागासलेल्या समाजबांधवांचे संसार उभे राहण्यासाठी स्वत:चा वेळ आणि शक्ती खर्च करू लागल्या. त्या स्वत: विविध सामाजिक कार्यात सतत मग्न राहिल्या. पुस्तकाचं अर्थगर्भ अन परिणामकारक मृखपृष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आहे. या पुस्तकाला चरित्र लेखनासाठी राज्य शासनाचा ‘लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार’ तसेच वि.ग. रोहमारे यांच्या नावे ‘ग्रामीण साहित्य पुरस्कार’ नुकताच लाभला तो सर्ववैद योग्यच होय. -क्रांतिसेन रा. आठवले ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    दलित जीवनाचं अस्सल चित्रण… मराठी साहित्यातील आत्मचरित्रांचे दालन अनेक स्री साहित्यिकांनी समृद्ध केले आहे. सौ. विमल दादासाहेब मोरे यांच्या ‘तीन दगडाची चूल’ या आत्मकथनाने त्यात मौलिक भर टाकली आहे. अज्ञानाच्या व अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या आणि रूढ परंपरांच्या चक्रात गुरफटलेल्या भटक्या व विमुक्त जमातीपैकी गोंधळी जातीत जन्मलेल्या मुलीच्या अवहेलनेपासून आत्मभानापर्यंतचा प्रवास या आत्मचरित्रात आहे. कुबट वासाच्या फाटक्यातुटक्या झोपडीत वाढलेल्या या मुलीचे आत्मकथन म्हणजे भटक्या जमातीतील स्रियांच्या वाट्याला येणाऱ्या नरकप्राय यातना. अपार दैन्य व दु:ख यांचे जिवंत चित्रण आहे. गावोगाव भटकणारी, पालं ठोकून राहाणारी. सदैव पोलिसांच्या अत्याचाराला तोंड द्यावी लागणारी जमात. तिला भोगावे लागणारे दु:ख व स्त्री म्हणून भोगाव्या लागणाऱ्या यातना अशी ‘इमी’ स्वतंत्र जीवन जगू लागली. स्रीमुक्तीवर व्याख्याने देऊ लागली. हा तिचा प्रवास खरोखरच उल्लेखनीय आहे. ‘इमी’ चा मोठा भाऊ - अशोकदादा तिला शालेत घालतो. आई-वडिलांचा प्रचंड विरोध सहन करीत सुशिक्षित वहिनी व भाऊ यांच्यामुळे चार अक्षरे शिकायला सुरवात करते. तिच्या विकासाच्या कथेबरोबरच गोंधळी जातीतील सर्व स्त्रियांची कथा ती उलगडते. दारू पिऊन धिंगाणा घालणारे, बायकांना लाथेने तुडवणारे पुरुष व निमूटपणे मार सहन करणाऱ्या स्त्रिया हा त्यांच्या दैनंदिन वास्तवाचाच एक भाग आहे. ‘इमी’च्या ‘अंबुक्का’ चा नवरा भांडी विकून यायला उशीर झाला म्हणून तापवलेलं लोखंडी उलथनं आक्काच्या डाव्या पंजात आरपार घुसवतो. चार-पाच माणसांनाही ते हातातून उपसून काढता येत नाही. तरीही तिच्या नवऱ्याला मारायला धावलेल्या सुखदेवदादाला आंबुक्का म्हणते, ‘सख्या, माजा नवरा हाय - मारू दी न्हायतर तुडू दी- तुला काय करायं हाय?’ आणि दुसऱ्या दिवशी नवऱ्याच्या माराच्या भीतीनं सुजऱ्या हाताने डोळ्यावरची पाटी सांभाळत पुन्हा कामाला जाते. हे वाचताना आपण सुन्न होतो. असे अनेक हेलावून टाकणारे प्रसंग या आत्मकथनात आहेत. गोंधळी समाजातील श्रद्धा व अंधश्रद्धा, धार्मिक विधी यांचे चित्रण ‘तीन दगडाची चूल’ मध्ये आहेत. मुलाच्या जन्माच्या वेळचे विधी, ‘आप्पाढा’ तील मरगम्मादेवीचा उत्सव व गोंधळ, माणकेश्वराच्या ‘सटवाई’च्या नैवेद्याचे वर्णन, गोंधळी जमातीतील विवाहाचे विधी, मुलीला ‘न्हाण’ आल्यानंतरचे विधी, आजीच्या मृत्यूनंतरचे विधी यांचे वर्णन आत्मकथनात येते. त्यामुळे समाजशास्रीय अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा ‘दस्तऐवज’ आहे. दादासाहेब मोरे यांच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्याशी विवाह झाल्यानंतर विमलचे जीवन बदलते. मोरेंच्या बरोबर सभा-संमेलनात ती वावरू लागते. सामाजिक चळवळीत सहभागी होते. दादासाहेब तिच्यातील न्यूनगंड दूर करण्यासाठी धडपडतात, कष्ट घेतात. अनेक कार्यकर्ते त्यांच्या घरी येत असतात. अपुऱ्या पैशात संसाराचे रहाटगाडगे ओढताना तिची जीवघेणी ओढाताण होते. उपासमार होते, पण नुसतं दोन वेळेला पोटभर खाऊन जगणं म्हणजे आयुष्य नाही. दुसऱ्याचा विचार करून जगण्यातच खरं सुख असतं. हे तिचं तत्त्वज्ञान असतं, त्यामुळे याही परिस्थितीत हसूनखेळून ती सर्व निभावून नेते. ज्ञात, अज्ञात समस्यांना तोंड देण्याची जिद्द तिच्यात निर्माण होते आणि ‘विमल’ आधिक आत्मविश्वासाने वावरू लागते. ‘गबाळ’ हे दादासाहेबांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. पण त्याची छाया या आत्मकथनावर पडलेली नाही हे विशेष आहे. तसेच खूप काही सोसूनही भोगलेल्या आणि भोगाव्या लागलेल्या जीवनाबद्दल लेखिका कुठेही कडवपणे लिहित नाही अथवा ज्यांच्यामुळे अपार मनस्ताप भोगावा लागला आहे. त्यांच्याबद्दलची कटुताही ती व्यक्त करीत नाही. भटक्या व विमुक्त जातीतील स्रीनं लिहिलेलं हे पहिलंच आत्मकथन आहे. त्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ‘तीन दगडाची चूल’मध्ये एकीकडे आपार दु:ख व दैन्य यांचे प्रत्यकारी चित्रण आहे, तर दुसरीकडे चळवळीत उतरलेल्या सामाजिक कार्यकत्र्यांच्या जीवनाचे व विचारांचे दर्शनही या साहित्यकृतीतून घडते म्हणूनच त्याला कलात्मकता व महात्मताही प्राप्त झाली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more