* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TEEN DAGADACHI CHUL
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660364
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 223
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VIMAL MORE IS BORN IN THE `GONDHALI` TRIBE, ONE OF THE NOMADIC TRIBES. THIS TRIBE LIVES UNDER THE DOMINANCE OF BLIND FAITH, SUPERSTITION, AND IS VERY ORTHODOX. SHE HAS PRESENTED HER AUTOBIOGRAPHY IN THE FORM OF `TEEN DAGDANCHI CHOOL`, WHICH HAS IN TURN ADDED TO ESPECIALLY `DALIT` LITERATURE. THROUGHOUT THIS AUTOBIOGRAPHY, WE DO NOT COME ACROSS HER CONTEMPT OR SOURNESS ABOUT LIFE. SHE DOES NOT COMPLAIN ABOUT THE HARDSHIPS AND ATROCITIES THAT SHE SUFFERED. SHE DOES NOT FALL PREY TO NATURAL FEELINGS LIKE HATRED, ANGER, DISDAIN, OR REVENGE WHICH MAY ARISE AS A RESULT OF A VERY DIFFICULT LIFE. SHE DOES NOT LOOK AT LIFE THROUGH ANY COLORED GLASSES. THIS AUTOBIOGRAPHY IS GREAT IN ALL RESPECTS. FIRSTLY, IT REVEALS THE TRUE LIFE OF A `DALIT`, SECONDLY, IT PRESENTS THE SHEER POVERTY AND ANGUISH, WHICH IN TURN MAKES US REALIZE THE IMPORTANCE TO CHANGE THE SOCIETY AND ITS CLASS BASED CULTURE COMPLETELY. EVERY LEARNED AND PRUDENT CITIZEN SHOULD READ THIS AUTOBIOGRAPHY AND GIVE IT A THOUGHT. IT HAS THE IMMENSE POTENTIAL TO AWAKEN THE HUMAN IN EVERY MIND. VIMAL MORE IS BORN IN THE ‘GONDHALI’ TRIBE, ONE OF THE NOMADIC TRIBES. THIS TRIBE LIVES UNDER THE DOMINANCE OF BLIND FAITH, SUPERSTITION, AND IS VERY ORTHODOX. SHE HAS PRESENTED HER AUTOBIOGRAPHY IN THE FORM OF ‘TEEN DAGDANCHI CHOOL’, WHICH HAS IN TURN ADDED TO ESPECIALLY ‘DALIT’ LITERATURE. THROUGHOUT THIS AUTOBIOGRAPHY, WE DO NOT COME ACROSS HER CONTEMPT OR SOURNESS ABOUT LIFE. SHE DOES NOT COMPLAIN ABOUT THE HARDSHIPS AND ATROCITIES THAT SHE SUFFERED. SHE DOES NOT FALL PREY TO NATURAL FEELINGS LIKE HATRED, ANGER, DISDAIN, OR REVENGE WHICH MAY ARISE AS A RESULT OF A VERY DIFFICULT LIFE. SHE DOES NOT LOOK AT LIFE THROUGH ANY COLORED GLASSES. THIS AUTOBIOGRAPHY IS GREAT IN ALL RESPECTS. FIRSTLY, IT REVEALS THE TRUE LIFE OF A ‘DALIT’, SECONDLY, IT PRESENTS THE SHEER POVERTY AND ANGUISH, WHICH IN TURN MAKES US REALIZE THE IMPORTANCE TO CHANGE THE SOCIETY AND ITS CLASS BASED CULTURE COMPLETELY. EVERY LEARNED AND PRUDENT CITIZEN SHOULD READ THIS AUTOBIOGRAPHY AND GIVE IT A THOUGHT. IT HAS THE IMMENSE POTENTIAL TO AWAKEN THE HUMAN IN EVERY MIND.
अज्ञान-अधंश्रध्देच्या गर्तेत अडकलेल्या आणि रूढी-परंपरांच्या चक्रात गुरफटलेल्या भटक्या-विमुक्त जमातींपैकी ‘गोंधळी’ या जातीत जन्माला आलेल्या विमल मोरे यांनी लिहिलेल्या ‘तीन दगडाची चूल’ या आत्मकथनानं दलित साहित्यातील व पर्यायानं मराठी साहित्यातील आत्मकथनांचं दालन अधिक समृद्ध झालं आहे. या आत्मकथनात भोगलेल्या आणि भोगावं लागणा-या जीवनाबद्दल कुठंही कडवटपणा प्रकट झालेला नाही. चीड, तुच्छता, सूड यांसारख्या अत्यंत स्वाभाविकपणे प्रकट होणा-या भावनात्मक प्रतिक्रियाही व्यक्त झालेल्या नाहीत. जीवनाकडं पाहण्याची दृष्टीही कुठं गढूळ झालेली नाही. हे आत्मकथन दलित जीवनाचं अस्सल, जिवंत चित्रण करणारी वाङ्मयकृती म्हणून श्रेष्ठ आहेच, शिवाय ते अपार दैन्य आणि दु:ख यांचं भेदक चित्रण वाचकांपुढं उभं करीत असतानाच, ही सारी समाजव्यवस्थाच आमूलाग्र बदलून टकण्याची कशी आवश्यकता आहे, हेही वाचकांच्या मनांवर तीव्रपणे ठसवत राहतं. नवा जीवन-संस्कार घडवणारं हे मौलिक आत्मकथन प्रत्येक सुजाण वाचकानं वाचायलाच हवं, असं आहे.
* राज्य पुरस्कार २०००-०१ * भि.ग.रोहमारे पुरस्कार २०००
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIMALMORE #विमल मोरे #TEENDAGADACHICHUL #तीनदगडाचीचूल #AUTOBIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 19-08-2001

    सामाजिक भान जागवणारी कादंबरी... ‘तीन दगडांची चूल’ हे विमल मोरे यांची आत्मनिवेदनात्मक कादंबरी अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या आणि रुढी परंपरांच्या चक्रात गुरफटलेल्या भटक्या विमुक्त जमातीपैकी गोंधळी या जमातीमध्ये जन्मलेल्या विमल मोरे यांच्य या आत्मनिवेदनात या समाजाचे आणि जमातीचे प्रतिनिधक चित्रण आले आहे. भटक्या विमुक्तांच्या आयुष्याचे वास्तव चित्र वाचकांसमोर ठेवणारी विमल मोरेंची ही आत्मनिवेदनात्मक कादंबरी म्हणूनच उल्लेखनीय आहे. हातावर पोट घेऊन गावोगावी हिंडणारी ही जमात! गावाबाहेर पाल टाकून गावात देवाच्या नावावर भीक मागणे, हा त्यांचा जन्मजात व्यवसाय. कुटुंबातल्या बायांपासून तो शेंबड्या पोरांपर्यंत गावात भीक मागायची नी काही मिळेल त्यावर गुजराण करायची. विमल मोरे या पालातील अशा एका कुटुंबातल्याच भावाला पोलिसात नोकरी, शिक्षणाचे महत्त्व त्याला पटलेलं आहे. म्हणून आपल्या इतर भावंडांना शिकवण्याचा त्याचा अट्टाहास. आपल्या तुटपुंज्या पगारात स्वत:चा संसार सांभाळून तो आपल्या भावंडांना शाळेत घालतो. पालात राहायची अन् दिवसभर मनाला वाटेल तसं हुंदडायची सवय पडलेल्या विमलला शाळा नको वाटायची. तशाच ‘पोरीला शाळा शिकवून काय कराचं’ हा आईचा प्रश्न तिच्या पथ्यावरच पडायचा. मधूनच आई-बाप तिला पालावर घेऊन जायचे. शाळा बुडायची. भावाचा नि वहिनींचा जीव तुटायचा. पण विमलला शाळा बुडाल्याचं दु:ख कधी झालं नाही. वहिनी या मुलांचा अभ्यास घ्यायची. घरात खाणारी दहा तोंड, तशातही तुटपुंज्या मिळकतीत भावानं विमलचं सातवीपर्यंत शिक्षण केलं. पुढे दादासाहेब मोरे या शिकलेल्या मुलाशी विमलचं लग्न झालं नि अधंश्रद्धेच्या गर्तेत खितपत पडलेल्या विमलला एक नवं जग दिसलं. या जमातीला फक्त पोटाला मिळवणं एवढीच समस्या नाही. दारूचं व्यसन तर त्यांच्या पाचवीला पुजलेलं. दारू पिऊन बायकोला मरेस्तवर झोडून काढणारे नवरे, अंगावर लक्तरं वागवणारी उघडीनागडी पोरं, दिवसभर भटकूनही भीक न मिळाल्यानं उपाशी झोपणारी बायका-मुलं, पाऊसपाण्याच्या दिवसात पालात पाणी शिरल्यावर रात्र रात्र जागून काढणारी ही कुटुंब, एका गावात भीक मिळत नाही म्हणून दुसऱ्या गावात विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर उचलून नेणारी ही माणसं. जमाना बदललाय, लोक भीक घालत नाही म्हणून भांडी विकण्याचा त्यांनी पत्करलेला धंदा. भांड्याच्या व्यवसायातही पोटापुरतं मिळण्याची मारामार. कुणी आजारी पडलं तर डॉक्टरांकडे नेण्याऐवजी बाहेरचं काही झालं म्हणून जादुटोणावर विश्वास ठेवणारे हे लोक. जखम झाल्यावर त्यावर रॉकेल तेल ओतणारी, बाळंतणीला पाच दिवस बिना मिठाच्या कण्या खायला देणारी. सव्वा महिना तिचा विटाळ पाळणारी ही माणसं देवदेव करणारीही आहेत. आषाढ हा त्यांचा मोठा उत्सव. यात्रेला जायचं, नवीन कपडे करायचे, कोंबडा-बकरा कापायचा, मेजवानी झोडायची, एसटीनं गोंधळेवाडीला जायचं. त्यासाठी शाळेत जाणाऱ्या मुलांची शाळा बुडाली तरी त्याचा कुणाला हरिसोस नाही. व्यंग घेऊन जन्माला आलेली मुलं म्हणजे या लोकांच्या मते भूतं... आपल्यापोटी भूत जन्माला आलं ते केव्हा मरते याची वाट पाहणारे अन् असं मूल मेल्यावर आनंद मनवणारे लोक अंध:श्रद्धेच्या किती आहारी गेलेत, याचा प्रत्यय येतो. सगळ्यात या जमातीत हाल होत असतील तर ते बाईचे. ‘या जातीत जनावरालाही किंमत हाय... पर बायला न्हाय’ अशासारख्या वाक्यातून हे वास्तव लेखिकेने वाचकांसमोर ठेवले आहे. ‘आता भीक मागून जगायचं दिस ऱ्हालं न्हायती... आत्ता पयल्यावाणी माणसं भुळी ऱ्हाली न्हायती... आता माणसं देव बिव काय मानत ऱ्हायती... तवा पुज्यारी म्हन, न्हायतर गुरव म्हन... कोन भाकरीचा तुकडा देत न्हाय’ हे वास्तव उमजल्यावर भांडी विकण्याचा व्यवसाय हे लोक पत्करतात. पण अठराविश्वे दारिद्र्य त्यांची पाठ सोडत नाही... ती नाहीच. दादासाहेब मोरेंसारख्या लेखकाशी आपलं लग्न झाल्याचा आनंद अन् अभिमान विमलला आहे. पण लग्नानंतरही पोटाची विवंचना काही सुटत नाही. उलट लग्नाआधी बरं असं म्हणायची वेळ येते. दादासाहेब हे भटक्याविमुक्त जमातीचे एक सक्रिय कार्यकर्ते. या लोकांच्या चुली पेटाव्या म्हणून स्वत:च्या चुलीकडे पाठ फिरवणारे हे तळमळीचे कार्यकर्ते. सभा घे, तर कुठे चर्चासत्र घे, परिसंवाद घे, आज या गावाला तर उद्या त्या गावाला. अशा परिस्थितीती विमलला शाळेची मुलं. पोहोचवण्याचं, डबे तयार करण्याचं काम हाती घ्यावं लागलं. दुसऱ्याचं काम करते म्हणून नातेवाईकांनी तिला हिणवलं. गावभर भीक मागणाऱ्या या लोकांना भीक मागायला कमीपणा वाटत नाही. पण दुसऱ्यांची दोन कामं करून पोटाला खाण्याचा कमीपणा वाटतो. हे अजबच आहे. मोरेंमुळे विमलही सभा संमेलनाला जाऊ लागते, वाचनाची आवड निर्माण होते. आपल्या समाजातील लोकांच्या दु:खाच्या नाना तऱ्हा तिला पाहायला मिळतात. या दु:खापुढे तिला आपली वैयक्तिक दु:ख, समस्या निरर्थक वाटतात. घर खर्च भागवण्यासाठी मला मिळतील तसली लहान मोठी कामं करावी लागत होती. त्याचबरोबर सामाजिक कार्यही सुरू होतं. कौटुंबिक प्रश्नांना आणि अडचणींना कवटाळून आपलीच दु:ख उगाळीत बसण्याच्या मानसिकतेतून मी केव्हाच बाहेर पडले होते. विमलचे हे उदगार म्हणजे एका संकुचित जगातून व्यापक जगाकडे तिची होत चाललेली वाटचाल सूचित करणारे आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या गर्तेतून बाहेर पडून, या जमातीचं सामाजिक भान विमल प्रमाणेच ज्या दिवशी जागेल, तो सुदिन! विमल मोरे यांच्या ‘तिन दगडांची चूल’ या आत्मनिवेदनात्मक कादंबरीने वाचकांच्या ठिकाणी ही अपेक्षा जागवली आहे, हे विशेष! -डॉ. सुनंदा देशपांडे ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 24-02-2002

    विवाहानंतर सामाजिक कार्याची प्रेरणा... भटक्या-विमुक्त जमातीपैकी गोंधळी या जातीत जन्मलेल्या आणि ‘गबाळं’कार दादासाहेब मोरे यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या विमल मोरे लिखित ‘तीन दगडांची चूल’ हे आत्मकथनात्मक पुस्तक पुण्याच्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ या नामवं प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. २१५ पृष्ठसंख्या असलेल्या या आत्मकथनात विमल दादासाहेब मोरे यांना भोगाव्या लागलेल्या दारुण नि दाहक अनुभवाचं जिवंत चित्रण आहे. भटक्या जमातीचं जीवन वाट्याला आल्यामुळे आयुष्यात कोणत्याच प्रकारची स्थिरता नाही, शिक्षणाचा कोणाला गंध नाही, शिक्षणासाठी अनुकूल वातावरण नाही. अंगी कला-कौशल्य नाही, उपजिविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. अशा दारुण परिस्थितीत एका गावाहून दुसऱ्या गावी भटक जाऊन तेथे ‘पालं’ उभारून, तीन दगडांची चूल मांडून, जमेल तितके दिवस (म्हणजे भीक मागून) मिळेल त्यावर पोटाची खळगी भरणे अशा कौटुंबिक परिस्थितीत आणि वातावरणात लेखिकेचं बालपण गेलेलं आहे. इतकंच नव्हे, अज्ञान-अंधश्रद्धा यामुळे लखिकेचा जीवनसंघर्ष अधिकच भीषण व दाहक झालेला आहे. या आत्मकथनातून नव्या कार्यकर्त्यांना आणि विशेषत: महिला चळवळीतील कार्यकर्त्यांना खूप काही शिकण्यासारखं आहे. ग्रामीण बोलीभाषेतले संवाद आणि कादंबरीच्या ढंगाने जाणारी लेखनशैली यामुळे हे पुस्तक ललित वाङमय प्रकाराशी जवळीक साधते. पुस्तकाचा सुमारे दीड तृतीयांश भाग विमलाबार्इंच्या विवाहपूर्व, अर्थात माहेरच्या जीवनक्रमाचं दर्शन घडवितो. स्वत:च्या अस्तित्वासाठी सर्वप्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीशी द्यावा लागलेला झगडा, पराकाष्ठेचं दारिद्र्य आणि केवळ थोरल्या भावाच्या व वहिनीच्या पाठिंब्यामुळे नि अट्टाहासामुळेच प्राप्त झालेलं ९व्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण, त्यात आलेल्या अखंड अडचणी यांचं विमलाबार्इंनी केलेलं वर्णन वाचकाला अस्वस्थ करून सोडतं; तर पुस्तकाचा उर्वरित एक तृतीयांश भाग म्हणजे पृष्ठ १४६पासून शेवटपर्यंत विमलाबार्इंच्या विवाहोत्तर जीवनाचं प्रेरणादायी दर्शन घडविणारा आहे. ६ मार्च १९८८ ला ‘गबाळं’चे लेखक दादासाहेब मोरे यांच्याशी विमलाबार्इंचं लग्न झालं. येथूनच पुढे विमलाबार्इंच्या जीवनाला अगदी वेगळं वळण लागलं, नवा अर्थ प्राप्त झाला. त्यांचे पती महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील धडाडीचे नेते व कार्यकर्ते. असा पती लाभल्यामुळे विमलाबार्इंचं पुढील सारं जीवनच आमूलाग्र बदलून गेल्यास नवल नाही. त्यादेखील स्वत: पतीच्या खांद्याला खांदा लावून स्वत:च्या संसाराकडे विशेष लक्ष न देता दुर्बळ - दुर्लक्षित - निराधार अशा आपल्या सर्व दृष्टीने मागासलेल्या समाजबांधवांचे संसार उभे राहण्यासाठी स्वत:चा वेळ आणि शक्ती खर्च करू लागल्या. त्या स्वत: विविध सामाजिक कार्यात सतत मग्न राहिल्या. पुस्तकाचं अर्थगर्भ अन परिणामकारक मृखपृष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आहे. या पुस्तकाला चरित्र लेखनासाठी राज्य शासनाचा ‘लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार’ तसेच वि.ग. रोहमारे यांच्या नावे ‘ग्रामीण साहित्य पुरस्कार’ नुकताच लाभला तो सर्ववैद योग्यच होय. -क्रांतिसेन रा. आठवले ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    दलित जीवनाचं अस्सल चित्रण… मराठी साहित्यातील आत्मचरित्रांचे दालन अनेक स्री साहित्यिकांनी समृद्ध केले आहे. सौ. विमल दादासाहेब मोरे यांच्या ‘तीन दगडाची चूल’ या आत्मकथनाने त्यात मौलिक भर टाकली आहे. अज्ञानाच्या व अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या आणि रूढ परंपरांच्या चक्रात गुरफटलेल्या भटक्या व विमुक्त जमातीपैकी गोंधळी जातीत जन्मलेल्या मुलीच्या अवहेलनेपासून आत्मभानापर्यंतचा प्रवास या आत्मचरित्रात आहे. कुबट वासाच्या फाटक्यातुटक्या झोपडीत वाढलेल्या या मुलीचे आत्मकथन म्हणजे भटक्या जमातीतील स्रियांच्या वाट्याला येणाऱ्या नरकप्राय यातना. अपार दैन्य व दु:ख यांचे जिवंत चित्रण आहे. गावोगाव भटकणारी, पालं ठोकून राहाणारी. सदैव पोलिसांच्या अत्याचाराला तोंड द्यावी लागणारी जमात. तिला भोगावे लागणारे दु:ख व स्त्री म्हणून भोगाव्या लागणाऱ्या यातना अशी ‘इमी’ स्वतंत्र जीवन जगू लागली. स्रीमुक्तीवर व्याख्याने देऊ लागली. हा तिचा प्रवास खरोखरच उल्लेखनीय आहे. ‘इमी’ चा मोठा भाऊ - अशोकदादा तिला शालेत घालतो. आई-वडिलांचा प्रचंड विरोध सहन करीत सुशिक्षित वहिनी व भाऊ यांच्यामुळे चार अक्षरे शिकायला सुरवात करते. तिच्या विकासाच्या कथेबरोबरच गोंधळी जातीतील सर्व स्त्रियांची कथा ती उलगडते. दारू पिऊन धिंगाणा घालणारे, बायकांना लाथेने तुडवणारे पुरुष व निमूटपणे मार सहन करणाऱ्या स्त्रिया हा त्यांच्या दैनंदिन वास्तवाचाच एक भाग आहे. ‘इमी’च्या ‘अंबुक्का’ चा नवरा भांडी विकून यायला उशीर झाला म्हणून तापवलेलं लोखंडी उलथनं आक्काच्या डाव्या पंजात आरपार घुसवतो. चार-पाच माणसांनाही ते हातातून उपसून काढता येत नाही. तरीही तिच्या नवऱ्याला मारायला धावलेल्या सुखदेवदादाला आंबुक्का म्हणते, ‘सख्या, माजा नवरा हाय - मारू दी न्हायतर तुडू दी- तुला काय करायं हाय?’ आणि दुसऱ्या दिवशी नवऱ्याच्या माराच्या भीतीनं सुजऱ्या हाताने डोळ्यावरची पाटी सांभाळत पुन्हा कामाला जाते. हे वाचताना आपण सुन्न होतो. असे अनेक हेलावून टाकणारे प्रसंग या आत्मकथनात आहेत. गोंधळी समाजातील श्रद्धा व अंधश्रद्धा, धार्मिक विधी यांचे चित्रण ‘तीन दगडाची चूल’ मध्ये आहेत. मुलाच्या जन्माच्या वेळचे विधी, ‘आप्पाढा’ तील मरगम्मादेवीचा उत्सव व गोंधळ, माणकेश्वराच्या ‘सटवाई’च्या नैवेद्याचे वर्णन, गोंधळी जमातीतील विवाहाचे विधी, मुलीला ‘न्हाण’ आल्यानंतरचे विधी, आजीच्या मृत्यूनंतरचे विधी यांचे वर्णन आत्मकथनात येते. त्यामुळे समाजशास्रीय अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा ‘दस्तऐवज’ आहे. दादासाहेब मोरे यांच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्याशी विवाह झाल्यानंतर विमलचे जीवन बदलते. मोरेंच्या बरोबर सभा-संमेलनात ती वावरू लागते. सामाजिक चळवळीत सहभागी होते. दादासाहेब तिच्यातील न्यूनगंड दूर करण्यासाठी धडपडतात, कष्ट घेतात. अनेक कार्यकर्ते त्यांच्या घरी येत असतात. अपुऱ्या पैशात संसाराचे रहाटगाडगे ओढताना तिची जीवघेणी ओढाताण होते. उपासमार होते, पण नुसतं दोन वेळेला पोटभर खाऊन जगणं म्हणजे आयुष्य नाही. दुसऱ्याचा विचार करून जगण्यातच खरं सुख असतं. हे तिचं तत्त्वज्ञान असतं, त्यामुळे याही परिस्थितीत हसूनखेळून ती सर्व निभावून नेते. ज्ञात, अज्ञात समस्यांना तोंड देण्याची जिद्द तिच्यात निर्माण होते आणि ‘विमल’ आधिक आत्मविश्वासाने वावरू लागते. ‘गबाळ’ हे दादासाहेबांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. पण त्याची छाया या आत्मकथनावर पडलेली नाही हे विशेष आहे. तसेच खूप काही सोसूनही भोगलेल्या आणि भोगाव्या लागलेल्या जीवनाबद्दल लेखिका कुठेही कडवपणे लिहित नाही अथवा ज्यांच्यामुळे अपार मनस्ताप भोगावा लागला आहे. त्यांच्याबद्दलची कटुताही ती व्यक्त करीत नाही. भटक्या व विमुक्त जातीतील स्रीनं लिहिलेलं हे पहिलंच आत्मकथन आहे. त्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ‘तीन दगडाची चूल’मध्ये एकीकडे आपार दु:ख व दैन्य यांचे प्रत्यकारी चित्रण आहे, तर दुसरीकडे चळवळीत उतरलेल्या सामाजिक कार्यकत्र्यांच्या जीवनाचे व विचारांचे दर्शनही या साहित्यकृतीतून घडते म्हणूनच त्याला कलात्मकता व महात्मताही प्राप्त झाली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more