* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TEEN DAGADACHI CHUL
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660364
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 223
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VIMAL MORE IS BORN IN THE `GONDHALI` TRIBE, ONE OF THE NOMADIC TRIBES. THIS TRIBE LIVES UNDER THE DOMINANCE OF BLIND FAITH, SUPERSTITION, AND IS VERY ORTHODOX. SHE HAS PRESENTED HER AUTOBIOGRAPHY IN THE FORM OF `TEEN DAGDANCHI CHOOL`, WHICH HAS IN TURN ADDED TO ESPECIALLY `DALIT` LITERATURE. THROUGHOUT THIS AUTOBIOGRAPHY, WE DO NOT COME ACROSS HER CONTEMPT OR SOURNESS ABOUT LIFE. SHE DOES NOT COMPLAIN ABOUT THE HARDSHIPS AND ATROCITIES THAT SHE SUFFERED. SHE DOES NOT FALL PREY TO NATURAL FEELINGS LIKE HATRED, ANGER, DISDAIN, OR REVENGE WHICH MAY ARISE AS A RESULT OF A VERY DIFFICULT LIFE. SHE DOES NOT LOOK AT LIFE THROUGH ANY COLORED GLASSES. THIS AUTOBIOGRAPHY IS GREAT IN ALL RESPECTS. FIRSTLY, IT REVEALS THE TRUE LIFE OF A `DALIT`, SECONDLY, IT PRESENTS THE SHEER POVERTY AND ANGUISH, WHICH IN TURN MAKES US REALIZE THE IMPORTANCE TO CHANGE THE SOCIETY AND ITS CLASS BASED CULTURE COMPLETELY. EVERY LEARNED AND PRUDENT CITIZEN SHOULD READ THIS AUTOBIOGRAPHY AND GIVE IT A THOUGHT. IT HAS THE IMMENSE POTENTIAL TO AWAKEN THE HUMAN IN EVERY MIND. VIMAL MORE IS BORN IN THE ‘GONDHALI’ TRIBE, ONE OF THE NOMADIC TRIBES. THIS TRIBE LIVES UNDER THE DOMINANCE OF BLIND FAITH, SUPERSTITION, AND IS VERY ORTHODOX. SHE HAS PRESENTED HER AUTOBIOGRAPHY IN THE FORM OF ‘TEEN DAGDANCHI CHOOL’, WHICH HAS IN TURN ADDED TO ESPECIALLY ‘DALIT’ LITERATURE. THROUGHOUT THIS AUTOBIOGRAPHY, WE DO NOT COME ACROSS HER CONTEMPT OR SOURNESS ABOUT LIFE. SHE DOES NOT COMPLAIN ABOUT THE HARDSHIPS AND ATROCITIES THAT SHE SUFFERED. SHE DOES NOT FALL PREY TO NATURAL FEELINGS LIKE HATRED, ANGER, DISDAIN, OR REVENGE WHICH MAY ARISE AS A RESULT OF A VERY DIFFICULT LIFE. SHE DOES NOT LOOK AT LIFE THROUGH ANY COLORED GLASSES. THIS AUTOBIOGRAPHY IS GREAT IN ALL RESPECTS. FIRSTLY, IT REVEALS THE TRUE LIFE OF A ‘DALIT’, SECONDLY, IT PRESENTS THE SHEER POVERTY AND ANGUISH, WHICH IN TURN MAKES US REALIZE THE IMPORTANCE TO CHANGE THE SOCIETY AND ITS CLASS BASED CULTURE COMPLETELY. EVERY LEARNED AND PRUDENT CITIZEN SHOULD READ THIS AUTOBIOGRAPHY AND GIVE IT A THOUGHT. IT HAS THE IMMENSE POTENTIAL TO AWAKEN THE HUMAN IN EVERY MIND.
अज्ञान-अधंश्रध्देच्या गर्तेत अडकलेल्या आणि रूढी-परंपरांच्या चक्रात गुरफटलेल्या भटक्या-विमुक्त जमातींपैकी ‘गोंधळी’ या जातीत जन्माला आलेल्या विमल मोरे यांनी लिहिलेल्या ‘तीन दगडाची चूल’ या आत्मकथनानं दलित साहित्यातील व पर्यायानं मराठी साहित्यातील आत्मकथनांचं दालन अधिक समृद्ध झालं आहे. या आत्मकथनात भोगलेल्या आणि भोगावं लागणा-या जीवनाबद्दल कुठंही कडवटपणा प्रकट झालेला नाही. चीड, तुच्छता, सूड यांसारख्या अत्यंत स्वाभाविकपणे प्रकट होणा-या भावनात्मक प्रतिक्रियाही व्यक्त झालेल्या नाहीत. जीवनाकडं पाहण्याची दृष्टीही कुठं गढूळ झालेली नाही. हे आत्मकथन दलित जीवनाचं अस्सल, जिवंत चित्रण करणारी वाङ्मयकृती म्हणून श्रेष्ठ आहेच, शिवाय ते अपार दैन्य आणि दु:ख यांचं भेदक चित्रण वाचकांपुढं उभं करीत असतानाच, ही सारी समाजव्यवस्थाच आमूलाग्र बदलून टकण्याची कशी आवश्यकता आहे, हेही वाचकांच्या मनांवर तीव्रपणे ठसवत राहतं. नवा जीवन-संस्कार घडवणारं हे मौलिक आत्मकथन प्रत्येक सुजाण वाचकानं वाचायलाच हवं, असं आहे.
* राज्य पुरस्कार २०००-०१ * भि.ग.रोहमारे पुरस्कार २०००
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIMALMORE #विमल मोरे #TEENDAGADACHICHUL #तीनदगडाचीचूल #AUTOBIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarDnyaneshwar Babruvahan Gund

    अतिशय वास्तववादी, संवेदनशील आणि परिवर्तनाची आस धरून केलेले लेखन..... प्रेरणादायी आत्मकथन....

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 19-08-2001

    सामाजिक भान जागवणारी कादंबरी... ‘तीन दगडांची चूल’ हे विमल मोरे यांची आत्मनिवेदनात्मक कादंबरी अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या आणि रुढी परंपरांच्या चक्रात गुरफटलेल्या भटक्या विमुक्त जमातीपैकी गोंधळी या जमातीमध्ये जन्मलेल्या विमल मोरे यांच्य या आत्मनिवेदनात या समाजाचे आणि जमातीचे प्रतिनिधक चित्रण आले आहे. भटक्या विमुक्तांच्या आयुष्याचे वास्तव चित्र वाचकांसमोर ठेवणारी विमल मोरेंची ही आत्मनिवेदनात्मक कादंबरी म्हणूनच उल्लेखनीय आहे. हातावर पोट घेऊन गावोगावी हिंडणारी ही जमात! गावाबाहेर पाल टाकून गावात देवाच्या नावावर भीक मागणे, हा त्यांचा जन्मजात व्यवसाय. कुटुंबातल्या बायांपासून तो शेंबड्या पोरांपर्यंत गावात भीक मागायची नी काही मिळेल त्यावर गुजराण करायची. विमल मोरे या पालातील अशा एका कुटुंबातल्याच भावाला पोलिसात नोकरी, शिक्षणाचे महत्त्व त्याला पटलेलं आहे. म्हणून आपल्या इतर भावंडांना शिकवण्याचा त्याचा अट्टाहास. आपल्या तुटपुंज्या पगारात स्वत:चा संसार सांभाळून तो आपल्या भावंडांना शाळेत घालतो. पालात राहायची अन् दिवसभर मनाला वाटेल तसं हुंदडायची सवय पडलेल्या विमलला शाळा नको वाटायची. तशाच ‘पोरीला शाळा शिकवून काय कराचं’ हा आईचा प्रश्न तिच्या पथ्यावरच पडायचा. मधूनच आई-बाप तिला पालावर घेऊन जायचे. शाळा बुडायची. भावाचा नि वहिनींचा जीव तुटायचा. पण विमलला शाळा बुडाल्याचं दु:ख कधी झालं नाही. वहिनी या मुलांचा अभ्यास घ्यायची. घरात खाणारी दहा तोंड, तशातही तुटपुंज्या मिळकतीत भावानं विमलचं सातवीपर्यंत शिक्षण केलं. पुढे दादासाहेब मोरे या शिकलेल्या मुलाशी विमलचं लग्न झालं नि अधंश्रद्धेच्या गर्तेत खितपत पडलेल्या विमलला एक नवं जग दिसलं. या जमातीला फक्त पोटाला मिळवणं एवढीच समस्या नाही. दारूचं व्यसन तर त्यांच्या पाचवीला पुजलेलं. दारू पिऊन बायकोला मरेस्तवर झोडून काढणारे नवरे, अंगावर लक्तरं वागवणारी उघडीनागडी पोरं, दिवसभर भटकूनही भीक न मिळाल्यानं उपाशी झोपणारी बायका-मुलं, पाऊसपाण्याच्या दिवसात पालात पाणी शिरल्यावर रात्र रात्र जागून काढणारी ही कुटुंब, एका गावात भीक मिळत नाही म्हणून दुसऱ्या गावात विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर उचलून नेणारी ही माणसं. जमाना बदललाय, लोक भीक घालत नाही म्हणून भांडी विकण्याचा त्यांनी पत्करलेला धंदा. भांड्याच्या व्यवसायातही पोटापुरतं मिळण्याची मारामार. कुणी आजारी पडलं तर डॉक्टरांकडे नेण्याऐवजी बाहेरचं काही झालं म्हणून जादुटोणावर विश्वास ठेवणारे हे लोक. जखम झाल्यावर त्यावर रॉकेल तेल ओतणारी, बाळंतणीला पाच दिवस बिना मिठाच्या कण्या खायला देणारी. सव्वा महिना तिचा विटाळ पाळणारी ही माणसं देवदेव करणारीही आहेत. आषाढ हा त्यांचा मोठा उत्सव. यात्रेला जायचं, नवीन कपडे करायचे, कोंबडा-बकरा कापायचा, मेजवानी झोडायची, एसटीनं गोंधळेवाडीला जायचं. त्यासाठी शाळेत जाणाऱ्या मुलांची शाळा बुडाली तरी त्याचा कुणाला हरिसोस नाही. व्यंग घेऊन जन्माला आलेली मुलं म्हणजे या लोकांच्या मते भूतं... आपल्यापोटी भूत जन्माला आलं ते केव्हा मरते याची वाट पाहणारे अन् असं मूल मेल्यावर आनंद मनवणारे लोक अंध:श्रद्धेच्या किती आहारी गेलेत, याचा प्रत्यय येतो. सगळ्यात या जमातीत हाल होत असतील तर ते बाईचे. ‘या जातीत जनावरालाही किंमत हाय... पर बायला न्हाय’ अशासारख्या वाक्यातून हे वास्तव लेखिकेने वाचकांसमोर ठेवले आहे. ‘आता भीक मागून जगायचं दिस ऱ्हालं न्हायती... आत्ता पयल्यावाणी माणसं भुळी ऱ्हाली न्हायती... आता माणसं देव बिव काय मानत ऱ्हायती... तवा पुज्यारी म्हन, न्हायतर गुरव म्हन... कोन भाकरीचा तुकडा देत न्हाय’ हे वास्तव उमजल्यावर भांडी विकण्याचा व्यवसाय हे लोक पत्करतात. पण अठराविश्वे दारिद्र्य त्यांची पाठ सोडत नाही... ती नाहीच. दादासाहेब मोरेंसारख्या लेखकाशी आपलं लग्न झाल्याचा आनंद अन् अभिमान विमलला आहे. पण लग्नानंतरही पोटाची विवंचना काही सुटत नाही. उलट लग्नाआधी बरं असं म्हणायची वेळ येते. दादासाहेब हे भटक्याविमुक्त जमातीचे एक सक्रिय कार्यकर्ते. या लोकांच्या चुली पेटाव्या म्हणून स्वत:च्या चुलीकडे पाठ फिरवणारे हे तळमळीचे कार्यकर्ते. सभा घे, तर कुठे चर्चासत्र घे, परिसंवाद घे, आज या गावाला तर उद्या त्या गावाला. अशा परिस्थितीती विमलला शाळेची मुलं. पोहोचवण्याचं, डबे तयार करण्याचं काम हाती घ्यावं लागलं. दुसऱ्याचं काम करते म्हणून नातेवाईकांनी तिला हिणवलं. गावभर भीक मागणाऱ्या या लोकांना भीक मागायला कमीपणा वाटत नाही. पण दुसऱ्यांची दोन कामं करून पोटाला खाण्याचा कमीपणा वाटतो. हे अजबच आहे. मोरेंमुळे विमलही सभा संमेलनाला जाऊ लागते, वाचनाची आवड निर्माण होते. आपल्या समाजातील लोकांच्या दु:खाच्या नाना तऱ्हा तिला पाहायला मिळतात. या दु:खापुढे तिला आपली वैयक्तिक दु:ख, समस्या निरर्थक वाटतात. घर खर्च भागवण्यासाठी मला मिळतील तसली लहान मोठी कामं करावी लागत होती. त्याचबरोबर सामाजिक कार्यही सुरू होतं. कौटुंबिक प्रश्नांना आणि अडचणींना कवटाळून आपलीच दु:ख उगाळीत बसण्याच्या मानसिकतेतून मी केव्हाच बाहेर पडले होते. विमलचे हे उदगार म्हणजे एका संकुचित जगातून व्यापक जगाकडे तिची होत चाललेली वाटचाल सूचित करणारे आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या गर्तेतून बाहेर पडून, या जमातीचं सामाजिक भान विमल प्रमाणेच ज्या दिवशी जागेल, तो सुदिन! विमल मोरे यांच्या ‘तिन दगडांची चूल’ या आत्मनिवेदनात्मक कादंबरीने वाचकांच्या ठिकाणी ही अपेक्षा जागवली आहे, हे विशेष! -डॉ. सुनंदा देशपांडे ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 24-02-2002

    विवाहानंतर सामाजिक कार्याची प्रेरणा... भटक्या-विमुक्त जमातीपैकी गोंधळी या जातीत जन्मलेल्या आणि ‘गबाळं’कार दादासाहेब मोरे यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या विमल मोरे लिखित ‘तीन दगडांची चूल’ हे आत्मकथनात्मक पुस्तक पुण्याच्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ या नामवं प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. २१५ पृष्ठसंख्या असलेल्या या आत्मकथनात विमल दादासाहेब मोरे यांना भोगाव्या लागलेल्या दारुण नि दाहक अनुभवाचं जिवंत चित्रण आहे. भटक्या जमातीचं जीवन वाट्याला आल्यामुळे आयुष्यात कोणत्याच प्रकारची स्थिरता नाही, शिक्षणाचा कोणाला गंध नाही, शिक्षणासाठी अनुकूल वातावरण नाही. अंगी कला-कौशल्य नाही, उपजिविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. अशा दारुण परिस्थितीत एका गावाहून दुसऱ्या गावी भटक जाऊन तेथे ‘पालं’ उभारून, तीन दगडांची चूल मांडून, जमेल तितके दिवस (म्हणजे भीक मागून) मिळेल त्यावर पोटाची खळगी भरणे अशा कौटुंबिक परिस्थितीत आणि वातावरणात लेखिकेचं बालपण गेलेलं आहे. इतकंच नव्हे, अज्ञान-अंधश्रद्धा यामुळे लखिकेचा जीवनसंघर्ष अधिकच भीषण व दाहक झालेला आहे. या आत्मकथनातून नव्या कार्यकर्त्यांना आणि विशेषत: महिला चळवळीतील कार्यकर्त्यांना खूप काही शिकण्यासारखं आहे. ग्रामीण बोलीभाषेतले संवाद आणि कादंबरीच्या ढंगाने जाणारी लेखनशैली यामुळे हे पुस्तक ललित वाङमय प्रकाराशी जवळीक साधते. पुस्तकाचा सुमारे दीड तृतीयांश भाग विमलाबार्इंच्या विवाहपूर्व, अर्थात माहेरच्या जीवनक्रमाचं दर्शन घडवितो. स्वत:च्या अस्तित्वासाठी सर्वप्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीशी द्यावा लागलेला झगडा, पराकाष्ठेचं दारिद्र्य आणि केवळ थोरल्या भावाच्या व वहिनीच्या पाठिंब्यामुळे नि अट्टाहासामुळेच प्राप्त झालेलं ९व्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण, त्यात आलेल्या अखंड अडचणी यांचं विमलाबार्इंनी केलेलं वर्णन वाचकाला अस्वस्थ करून सोडतं; तर पुस्तकाचा उर्वरित एक तृतीयांश भाग म्हणजे पृष्ठ १४६पासून शेवटपर्यंत विमलाबार्इंच्या विवाहोत्तर जीवनाचं प्रेरणादायी दर्शन घडविणारा आहे. ६ मार्च १९८८ ला ‘गबाळं’चे लेखक दादासाहेब मोरे यांच्याशी विमलाबार्इंचं लग्न झालं. येथूनच पुढे विमलाबार्इंच्या जीवनाला अगदी वेगळं वळण लागलं, नवा अर्थ प्राप्त झाला. त्यांचे पती महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील धडाडीचे नेते व कार्यकर्ते. असा पती लाभल्यामुळे विमलाबार्इंचं पुढील सारं जीवनच आमूलाग्र बदलून गेल्यास नवल नाही. त्यादेखील स्वत: पतीच्या खांद्याला खांदा लावून स्वत:च्या संसाराकडे विशेष लक्ष न देता दुर्बळ - दुर्लक्षित - निराधार अशा आपल्या सर्व दृष्टीने मागासलेल्या समाजबांधवांचे संसार उभे राहण्यासाठी स्वत:चा वेळ आणि शक्ती खर्च करू लागल्या. त्या स्वत: विविध सामाजिक कार्यात सतत मग्न राहिल्या. पुस्तकाचं अर्थगर्भ अन परिणामकारक मृखपृष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आहे. या पुस्तकाला चरित्र लेखनासाठी राज्य शासनाचा ‘लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार’ तसेच वि.ग. रोहमारे यांच्या नावे ‘ग्रामीण साहित्य पुरस्कार’ नुकताच लाभला तो सर्ववैद योग्यच होय. -क्रांतिसेन रा. आठवले ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    दलित जीवनाचं अस्सल चित्रण… मराठी साहित्यातील आत्मचरित्रांचे दालन अनेक स्री साहित्यिकांनी समृद्ध केले आहे. सौ. विमल दादासाहेब मोरे यांच्या ‘तीन दगडाची चूल’ या आत्मकथनाने त्यात मौलिक भर टाकली आहे. अज्ञानाच्या व अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या आणि रूढ परंपरांच्या चक्रात गुरफटलेल्या भटक्या व विमुक्त जमातीपैकी गोंधळी जातीत जन्मलेल्या मुलीच्या अवहेलनेपासून आत्मभानापर्यंतचा प्रवास या आत्मचरित्रात आहे. कुबट वासाच्या फाटक्यातुटक्या झोपडीत वाढलेल्या या मुलीचे आत्मकथन म्हणजे भटक्या जमातीतील स्रियांच्या वाट्याला येणाऱ्या नरकप्राय यातना. अपार दैन्य व दु:ख यांचे जिवंत चित्रण आहे. गावोगाव भटकणारी, पालं ठोकून राहाणारी. सदैव पोलिसांच्या अत्याचाराला तोंड द्यावी लागणारी जमात. तिला भोगावे लागणारे दु:ख व स्त्री म्हणून भोगाव्या लागणाऱ्या यातना अशी ‘इमी’ स्वतंत्र जीवन जगू लागली. स्रीमुक्तीवर व्याख्याने देऊ लागली. हा तिचा प्रवास खरोखरच उल्लेखनीय आहे. ‘इमी’ चा मोठा भाऊ - अशोकदादा तिला शालेत घालतो. आई-वडिलांचा प्रचंड विरोध सहन करीत सुशिक्षित वहिनी व भाऊ यांच्यामुळे चार अक्षरे शिकायला सुरवात करते. तिच्या विकासाच्या कथेबरोबरच गोंधळी जातीतील सर्व स्त्रियांची कथा ती उलगडते. दारू पिऊन धिंगाणा घालणारे, बायकांना लाथेने तुडवणारे पुरुष व निमूटपणे मार सहन करणाऱ्या स्त्रिया हा त्यांच्या दैनंदिन वास्तवाचाच एक भाग आहे. ‘इमी’च्या ‘अंबुक्का’ चा नवरा भांडी विकून यायला उशीर झाला म्हणून तापवलेलं लोखंडी उलथनं आक्काच्या डाव्या पंजात आरपार घुसवतो. चार-पाच माणसांनाही ते हातातून उपसून काढता येत नाही. तरीही तिच्या नवऱ्याला मारायला धावलेल्या सुखदेवदादाला आंबुक्का म्हणते, ‘सख्या, माजा नवरा हाय - मारू दी न्हायतर तुडू दी- तुला काय करायं हाय?’ आणि दुसऱ्या दिवशी नवऱ्याच्या माराच्या भीतीनं सुजऱ्या हाताने डोळ्यावरची पाटी सांभाळत पुन्हा कामाला जाते. हे वाचताना आपण सुन्न होतो. असे अनेक हेलावून टाकणारे प्रसंग या आत्मकथनात आहेत. गोंधळी समाजातील श्रद्धा व अंधश्रद्धा, धार्मिक विधी यांचे चित्रण ‘तीन दगडाची चूल’ मध्ये आहेत. मुलाच्या जन्माच्या वेळचे विधी, ‘आप्पाढा’ तील मरगम्मादेवीचा उत्सव व गोंधळ, माणकेश्वराच्या ‘सटवाई’च्या नैवेद्याचे वर्णन, गोंधळी जमातीतील विवाहाचे विधी, मुलीला ‘न्हाण’ आल्यानंतरचे विधी, आजीच्या मृत्यूनंतरचे विधी यांचे वर्णन आत्मकथनात येते. त्यामुळे समाजशास्रीय अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा ‘दस्तऐवज’ आहे. दादासाहेब मोरे यांच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्याशी विवाह झाल्यानंतर विमलचे जीवन बदलते. मोरेंच्या बरोबर सभा-संमेलनात ती वावरू लागते. सामाजिक चळवळीत सहभागी होते. दादासाहेब तिच्यातील न्यूनगंड दूर करण्यासाठी धडपडतात, कष्ट घेतात. अनेक कार्यकर्ते त्यांच्या घरी येत असतात. अपुऱ्या पैशात संसाराचे रहाटगाडगे ओढताना तिची जीवघेणी ओढाताण होते. उपासमार होते, पण नुसतं दोन वेळेला पोटभर खाऊन जगणं म्हणजे आयुष्य नाही. दुसऱ्याचा विचार करून जगण्यातच खरं सुख असतं. हे तिचं तत्त्वज्ञान असतं, त्यामुळे याही परिस्थितीत हसूनखेळून ती सर्व निभावून नेते. ज्ञात, अज्ञात समस्यांना तोंड देण्याची जिद्द तिच्यात निर्माण होते आणि ‘विमल’ आधिक आत्मविश्वासाने वावरू लागते. ‘गबाळ’ हे दादासाहेबांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. पण त्याची छाया या आत्मकथनावर पडलेली नाही हे विशेष आहे. तसेच खूप काही सोसूनही भोगलेल्या आणि भोगाव्या लागलेल्या जीवनाबद्दल लेखिका कुठेही कडवपणे लिहित नाही अथवा ज्यांच्यामुळे अपार मनस्ताप भोगावा लागला आहे. त्यांच्याबद्दलची कटुताही ती व्यक्त करीत नाही. भटक्या व विमुक्त जातीतील स्रीनं लिहिलेलं हे पहिलंच आत्मकथन आहे. त्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ‘तीन दगडाची चूल’मध्ये एकीकडे आपार दु:ख व दैन्य यांचे प्रत्यकारी चित्रण आहे, तर दुसरीकडे चळवळीत उतरलेल्या सामाजिक कार्यकत्र्यांच्या जीवनाचे व विचारांचे दर्शनही या साहित्यकृतीतून घडते म्हणूनच त्याला कलात्मकता व महात्मताही प्राप्त झाली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more