* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TEEN DAGADACHI CHUL
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660364
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 223
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VIMAL MORE IS BORN IN THE `GONDHALI` TRIBE, ONE OF THE NOMADIC TRIBES. THIS TRIBE LIVES UNDER THE DOMINANCE OF BLIND FAITH, SUPERSTITION, AND IS VERY ORTHODOX. SHE HAS PRESENTED HER AUTOBIOGRAPHY IN THE FORM OF `TEEN DAGDANCHI CHOOL`, WHICH HAS IN TURN ADDED TO ESPECIALLY `DALIT` LITERATURE. THROUGHOUT THIS AUTOBIOGRAPHY, WE DO NOT COME ACROSS HER CONTEMPT OR SOURNESS ABOUT LIFE. SHE DOES NOT COMPLAIN ABOUT THE HARDSHIPS AND ATROCITIES THAT SHE SUFFERED. SHE DOES NOT FALL PREY TO NATURAL FEELINGS LIKE HATRED, ANGER, DISDAIN, OR REVENGE WHICH MAY ARISE AS A RESULT OF A VERY DIFFICULT LIFE. SHE DOES NOT LOOK AT LIFE THROUGH ANY COLORED GLASSES. THIS AUTOBIOGRAPHY IS GREAT IN ALL RESPECTS. FIRSTLY, IT REVEALS THE TRUE LIFE OF A `DALIT`, SECONDLY, IT PRESENTS THE SHEER POVERTY AND ANGUISH, WHICH IN TURN MAKES US REALIZE THE IMPORTANCE TO CHANGE THE SOCIETY AND ITS CLASS BASED CULTURE COMPLETELY. EVERY LEARNED AND PRUDENT CITIZEN SHOULD READ THIS AUTOBIOGRAPHY AND GIVE IT A THOUGHT. IT HAS THE IMMENSE POTENTIAL TO AWAKEN THE HUMAN IN EVERY MIND. VIMAL MORE IS BORN IN THE ‘GONDHALI’ TRIBE, ONE OF THE NOMADIC TRIBES. THIS TRIBE LIVES UNDER THE DOMINANCE OF BLIND FAITH, SUPERSTITION, AND IS VERY ORTHODOX. SHE HAS PRESENTED HER AUTOBIOGRAPHY IN THE FORM OF ‘TEEN DAGDANCHI CHOOL’, WHICH HAS IN TURN ADDED TO ESPECIALLY ‘DALIT’ LITERATURE. THROUGHOUT THIS AUTOBIOGRAPHY, WE DO NOT COME ACROSS HER CONTEMPT OR SOURNESS ABOUT LIFE. SHE DOES NOT COMPLAIN ABOUT THE HARDSHIPS AND ATROCITIES THAT SHE SUFFERED. SHE DOES NOT FALL PREY TO NATURAL FEELINGS LIKE HATRED, ANGER, DISDAIN, OR REVENGE WHICH MAY ARISE AS A RESULT OF A VERY DIFFICULT LIFE. SHE DOES NOT LOOK AT LIFE THROUGH ANY COLORED GLASSES. THIS AUTOBIOGRAPHY IS GREAT IN ALL RESPECTS. FIRSTLY, IT REVEALS THE TRUE LIFE OF A ‘DALIT’, SECONDLY, IT PRESENTS THE SHEER POVERTY AND ANGUISH, WHICH IN TURN MAKES US REALIZE THE IMPORTANCE TO CHANGE THE SOCIETY AND ITS CLASS BASED CULTURE COMPLETELY. EVERY LEARNED AND PRUDENT CITIZEN SHOULD READ THIS AUTOBIOGRAPHY AND GIVE IT A THOUGHT. IT HAS THE IMMENSE POTENTIAL TO AWAKEN THE HUMAN IN EVERY MIND.
अज्ञान-अधंश्रध्देच्या गर्तेत अडकलेल्या आणि रूढी-परंपरांच्या चक्रात गुरफटलेल्या भटक्या-विमुक्त जमातींपैकी ‘गोंधळी’ या जातीत जन्माला आलेल्या विमल मोरे यांनी लिहिलेल्या ‘तीन दगडाची चूल’ या आत्मकथनानं दलित साहित्यातील व पर्यायानं मराठी साहित्यातील आत्मकथनांचं दालन अधिक समृद्ध झालं आहे. या आत्मकथनात भोगलेल्या आणि भोगावं लागणा-या जीवनाबद्दल कुठंही कडवटपणा प्रकट झालेला नाही. चीड, तुच्छता, सूड यांसारख्या अत्यंत स्वाभाविकपणे प्रकट होणा-या भावनात्मक प्रतिक्रियाही व्यक्त झालेल्या नाहीत. जीवनाकडं पाहण्याची दृष्टीही कुठं गढूळ झालेली नाही. हे आत्मकथन दलित जीवनाचं अस्सल, जिवंत चित्रण करणारी वाङ्मयकृती म्हणून श्रेष्ठ आहेच, शिवाय ते अपार दैन्य आणि दु:ख यांचं भेदक चित्रण वाचकांपुढं उभं करीत असतानाच, ही सारी समाजव्यवस्थाच आमूलाग्र बदलून टकण्याची कशी आवश्यकता आहे, हेही वाचकांच्या मनांवर तीव्रपणे ठसवत राहतं. नवा जीवन-संस्कार घडवणारं हे मौलिक आत्मकथन प्रत्येक सुजाण वाचकानं वाचायलाच हवं, असं आहे.
* राज्य पुरस्कार २०००-०१ * भि.ग.रोहमारे पुरस्कार २०००
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIMALMORE #विमल मोरे #TEENDAGADACHICHUL #तीनदगडाचीचूल #AUTOBIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 19-08-2001

    सामाजिक भान जागवणारी कादंबरी... ‘तीन दगडांची चूल’ हे विमल मोरे यांची आत्मनिवेदनात्मक कादंबरी अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या आणि रुढी परंपरांच्या चक्रात गुरफटलेल्या भटक्या विमुक्त जमातीपैकी गोंधळी या जमातीमध्ये जन्मलेल्या विमल मोरे यांच्य या आत्मनिवेदनात या समाजाचे आणि जमातीचे प्रतिनिधक चित्रण आले आहे. भटक्या विमुक्तांच्या आयुष्याचे वास्तव चित्र वाचकांसमोर ठेवणारी विमल मोरेंची ही आत्मनिवेदनात्मक कादंबरी म्हणूनच उल्लेखनीय आहे. हातावर पोट घेऊन गावोगावी हिंडणारी ही जमात! गावाबाहेर पाल टाकून गावात देवाच्या नावावर भीक मागणे, हा त्यांचा जन्मजात व्यवसाय. कुटुंबातल्या बायांपासून तो शेंबड्या पोरांपर्यंत गावात भीक मागायची नी काही मिळेल त्यावर गुजराण करायची. विमल मोरे या पालातील अशा एका कुटुंबातल्याच भावाला पोलिसात नोकरी, शिक्षणाचे महत्त्व त्याला पटलेलं आहे. म्हणून आपल्या इतर भावंडांना शिकवण्याचा त्याचा अट्टाहास. आपल्या तुटपुंज्या पगारात स्वत:चा संसार सांभाळून तो आपल्या भावंडांना शाळेत घालतो. पालात राहायची अन् दिवसभर मनाला वाटेल तसं हुंदडायची सवय पडलेल्या विमलला शाळा नको वाटायची. तशाच ‘पोरीला शाळा शिकवून काय कराचं’ हा आईचा प्रश्न तिच्या पथ्यावरच पडायचा. मधूनच आई-बाप तिला पालावर घेऊन जायचे. शाळा बुडायची. भावाचा नि वहिनींचा जीव तुटायचा. पण विमलला शाळा बुडाल्याचं दु:ख कधी झालं नाही. वहिनी या मुलांचा अभ्यास घ्यायची. घरात खाणारी दहा तोंड, तशातही तुटपुंज्या मिळकतीत भावानं विमलचं सातवीपर्यंत शिक्षण केलं. पुढे दादासाहेब मोरे या शिकलेल्या मुलाशी विमलचं लग्न झालं नि अधंश्रद्धेच्या गर्तेत खितपत पडलेल्या विमलला एक नवं जग दिसलं. या जमातीला फक्त पोटाला मिळवणं एवढीच समस्या नाही. दारूचं व्यसन तर त्यांच्या पाचवीला पुजलेलं. दारू पिऊन बायकोला मरेस्तवर झोडून काढणारे नवरे, अंगावर लक्तरं वागवणारी उघडीनागडी पोरं, दिवसभर भटकूनही भीक न मिळाल्यानं उपाशी झोपणारी बायका-मुलं, पाऊसपाण्याच्या दिवसात पालात पाणी शिरल्यावर रात्र रात्र जागून काढणारी ही कुटुंब, एका गावात भीक मिळत नाही म्हणून दुसऱ्या गावात विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर उचलून नेणारी ही माणसं. जमाना बदललाय, लोक भीक घालत नाही म्हणून भांडी विकण्याचा त्यांनी पत्करलेला धंदा. भांड्याच्या व्यवसायातही पोटापुरतं मिळण्याची मारामार. कुणी आजारी पडलं तर डॉक्टरांकडे नेण्याऐवजी बाहेरचं काही झालं म्हणून जादुटोणावर विश्वास ठेवणारे हे लोक. जखम झाल्यावर त्यावर रॉकेल तेल ओतणारी, बाळंतणीला पाच दिवस बिना मिठाच्या कण्या खायला देणारी. सव्वा महिना तिचा विटाळ पाळणारी ही माणसं देवदेव करणारीही आहेत. आषाढ हा त्यांचा मोठा उत्सव. यात्रेला जायचं, नवीन कपडे करायचे, कोंबडा-बकरा कापायचा, मेजवानी झोडायची, एसटीनं गोंधळेवाडीला जायचं. त्यासाठी शाळेत जाणाऱ्या मुलांची शाळा बुडाली तरी त्याचा कुणाला हरिसोस नाही. व्यंग घेऊन जन्माला आलेली मुलं म्हणजे या लोकांच्या मते भूतं... आपल्यापोटी भूत जन्माला आलं ते केव्हा मरते याची वाट पाहणारे अन् असं मूल मेल्यावर आनंद मनवणारे लोक अंध:श्रद्धेच्या किती आहारी गेलेत, याचा प्रत्यय येतो. सगळ्यात या जमातीत हाल होत असतील तर ते बाईचे. ‘या जातीत जनावरालाही किंमत हाय... पर बायला न्हाय’ अशासारख्या वाक्यातून हे वास्तव लेखिकेने वाचकांसमोर ठेवले आहे. ‘आता भीक मागून जगायचं दिस ऱ्हालं न्हायती... आत्ता पयल्यावाणी माणसं भुळी ऱ्हाली न्हायती... आता माणसं देव बिव काय मानत ऱ्हायती... तवा पुज्यारी म्हन, न्हायतर गुरव म्हन... कोन भाकरीचा तुकडा देत न्हाय’ हे वास्तव उमजल्यावर भांडी विकण्याचा व्यवसाय हे लोक पत्करतात. पण अठराविश्वे दारिद्र्य त्यांची पाठ सोडत नाही... ती नाहीच. दादासाहेब मोरेंसारख्या लेखकाशी आपलं लग्न झाल्याचा आनंद अन् अभिमान विमलला आहे. पण लग्नानंतरही पोटाची विवंचना काही सुटत नाही. उलट लग्नाआधी बरं असं म्हणायची वेळ येते. दादासाहेब हे भटक्याविमुक्त जमातीचे एक सक्रिय कार्यकर्ते. या लोकांच्या चुली पेटाव्या म्हणून स्वत:च्या चुलीकडे पाठ फिरवणारे हे तळमळीचे कार्यकर्ते. सभा घे, तर कुठे चर्चासत्र घे, परिसंवाद घे, आज या गावाला तर उद्या त्या गावाला. अशा परिस्थितीती विमलला शाळेची मुलं. पोहोचवण्याचं, डबे तयार करण्याचं काम हाती घ्यावं लागलं. दुसऱ्याचं काम करते म्हणून नातेवाईकांनी तिला हिणवलं. गावभर भीक मागणाऱ्या या लोकांना भीक मागायला कमीपणा वाटत नाही. पण दुसऱ्यांची दोन कामं करून पोटाला खाण्याचा कमीपणा वाटतो. हे अजबच आहे. मोरेंमुळे विमलही सभा संमेलनाला जाऊ लागते, वाचनाची आवड निर्माण होते. आपल्या समाजातील लोकांच्या दु:खाच्या नाना तऱ्हा तिला पाहायला मिळतात. या दु:खापुढे तिला आपली वैयक्तिक दु:ख, समस्या निरर्थक वाटतात. घर खर्च भागवण्यासाठी मला मिळतील तसली लहान मोठी कामं करावी लागत होती. त्याचबरोबर सामाजिक कार्यही सुरू होतं. कौटुंबिक प्रश्नांना आणि अडचणींना कवटाळून आपलीच दु:ख उगाळीत बसण्याच्या मानसिकतेतून मी केव्हाच बाहेर पडले होते. विमलचे हे उदगार म्हणजे एका संकुचित जगातून व्यापक जगाकडे तिची होत चाललेली वाटचाल सूचित करणारे आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या गर्तेतून बाहेर पडून, या जमातीचं सामाजिक भान विमल प्रमाणेच ज्या दिवशी जागेल, तो सुदिन! विमल मोरे यांच्या ‘तिन दगडांची चूल’ या आत्मनिवेदनात्मक कादंबरीने वाचकांच्या ठिकाणी ही अपेक्षा जागवली आहे, हे विशेष! -डॉ. सुनंदा देशपांडे ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 24-02-2002

    विवाहानंतर सामाजिक कार्याची प्रेरणा... भटक्या-विमुक्त जमातीपैकी गोंधळी या जातीत जन्मलेल्या आणि ‘गबाळं’कार दादासाहेब मोरे यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या विमल मोरे लिखित ‘तीन दगडांची चूल’ हे आत्मकथनात्मक पुस्तक पुण्याच्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ या नामवं प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. २१५ पृष्ठसंख्या असलेल्या या आत्मकथनात विमल दादासाहेब मोरे यांना भोगाव्या लागलेल्या दारुण नि दाहक अनुभवाचं जिवंत चित्रण आहे. भटक्या जमातीचं जीवन वाट्याला आल्यामुळे आयुष्यात कोणत्याच प्रकारची स्थिरता नाही, शिक्षणाचा कोणाला गंध नाही, शिक्षणासाठी अनुकूल वातावरण नाही. अंगी कला-कौशल्य नाही, उपजिविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. अशा दारुण परिस्थितीत एका गावाहून दुसऱ्या गावी भटक जाऊन तेथे ‘पालं’ उभारून, तीन दगडांची चूल मांडून, जमेल तितके दिवस (म्हणजे भीक मागून) मिळेल त्यावर पोटाची खळगी भरणे अशा कौटुंबिक परिस्थितीत आणि वातावरणात लेखिकेचं बालपण गेलेलं आहे. इतकंच नव्हे, अज्ञान-अंधश्रद्धा यामुळे लखिकेचा जीवनसंघर्ष अधिकच भीषण व दाहक झालेला आहे. या आत्मकथनातून नव्या कार्यकर्त्यांना आणि विशेषत: महिला चळवळीतील कार्यकर्त्यांना खूप काही शिकण्यासारखं आहे. ग्रामीण बोलीभाषेतले संवाद आणि कादंबरीच्या ढंगाने जाणारी लेखनशैली यामुळे हे पुस्तक ललित वाङमय प्रकाराशी जवळीक साधते. पुस्तकाचा सुमारे दीड तृतीयांश भाग विमलाबार्इंच्या विवाहपूर्व, अर्थात माहेरच्या जीवनक्रमाचं दर्शन घडवितो. स्वत:च्या अस्तित्वासाठी सर्वप्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीशी द्यावा लागलेला झगडा, पराकाष्ठेचं दारिद्र्य आणि केवळ थोरल्या भावाच्या व वहिनीच्या पाठिंब्यामुळे नि अट्टाहासामुळेच प्राप्त झालेलं ९व्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण, त्यात आलेल्या अखंड अडचणी यांचं विमलाबार्इंनी केलेलं वर्णन वाचकाला अस्वस्थ करून सोडतं; तर पुस्तकाचा उर्वरित एक तृतीयांश भाग म्हणजे पृष्ठ १४६पासून शेवटपर्यंत विमलाबार्इंच्या विवाहोत्तर जीवनाचं प्रेरणादायी दर्शन घडविणारा आहे. ६ मार्च १९८८ ला ‘गबाळं’चे लेखक दादासाहेब मोरे यांच्याशी विमलाबार्इंचं लग्न झालं. येथूनच पुढे विमलाबार्इंच्या जीवनाला अगदी वेगळं वळण लागलं, नवा अर्थ प्राप्त झाला. त्यांचे पती महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील धडाडीचे नेते व कार्यकर्ते. असा पती लाभल्यामुळे विमलाबार्इंचं पुढील सारं जीवनच आमूलाग्र बदलून गेल्यास नवल नाही. त्यादेखील स्वत: पतीच्या खांद्याला खांदा लावून स्वत:च्या संसाराकडे विशेष लक्ष न देता दुर्बळ - दुर्लक्षित - निराधार अशा आपल्या सर्व दृष्टीने मागासलेल्या समाजबांधवांचे संसार उभे राहण्यासाठी स्वत:चा वेळ आणि शक्ती खर्च करू लागल्या. त्या स्वत: विविध सामाजिक कार्यात सतत मग्न राहिल्या. पुस्तकाचं अर्थगर्भ अन परिणामकारक मृखपृष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आहे. या पुस्तकाला चरित्र लेखनासाठी राज्य शासनाचा ‘लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार’ तसेच वि.ग. रोहमारे यांच्या नावे ‘ग्रामीण साहित्य पुरस्कार’ नुकताच लाभला तो सर्ववैद योग्यच होय. -क्रांतिसेन रा. आठवले ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    दलित जीवनाचं अस्सल चित्रण… मराठी साहित्यातील आत्मचरित्रांचे दालन अनेक स्री साहित्यिकांनी समृद्ध केले आहे. सौ. विमल दादासाहेब मोरे यांच्या ‘तीन दगडाची चूल’ या आत्मकथनाने त्यात मौलिक भर टाकली आहे. अज्ञानाच्या व अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या आणि रूढ परंपरांच्या चक्रात गुरफटलेल्या भटक्या व विमुक्त जमातीपैकी गोंधळी जातीत जन्मलेल्या मुलीच्या अवहेलनेपासून आत्मभानापर्यंतचा प्रवास या आत्मचरित्रात आहे. कुबट वासाच्या फाटक्यातुटक्या झोपडीत वाढलेल्या या मुलीचे आत्मकथन म्हणजे भटक्या जमातीतील स्रियांच्या वाट्याला येणाऱ्या नरकप्राय यातना. अपार दैन्य व दु:ख यांचे जिवंत चित्रण आहे. गावोगाव भटकणारी, पालं ठोकून राहाणारी. सदैव पोलिसांच्या अत्याचाराला तोंड द्यावी लागणारी जमात. तिला भोगावे लागणारे दु:ख व स्त्री म्हणून भोगाव्या लागणाऱ्या यातना अशी ‘इमी’ स्वतंत्र जीवन जगू लागली. स्रीमुक्तीवर व्याख्याने देऊ लागली. हा तिचा प्रवास खरोखरच उल्लेखनीय आहे. ‘इमी’ चा मोठा भाऊ - अशोकदादा तिला शालेत घालतो. आई-वडिलांचा प्रचंड विरोध सहन करीत सुशिक्षित वहिनी व भाऊ यांच्यामुळे चार अक्षरे शिकायला सुरवात करते. तिच्या विकासाच्या कथेबरोबरच गोंधळी जातीतील सर्व स्त्रियांची कथा ती उलगडते. दारू पिऊन धिंगाणा घालणारे, बायकांना लाथेने तुडवणारे पुरुष व निमूटपणे मार सहन करणाऱ्या स्त्रिया हा त्यांच्या दैनंदिन वास्तवाचाच एक भाग आहे. ‘इमी’च्या ‘अंबुक्का’ चा नवरा भांडी विकून यायला उशीर झाला म्हणून तापवलेलं लोखंडी उलथनं आक्काच्या डाव्या पंजात आरपार घुसवतो. चार-पाच माणसांनाही ते हातातून उपसून काढता येत नाही. तरीही तिच्या नवऱ्याला मारायला धावलेल्या सुखदेवदादाला आंबुक्का म्हणते, ‘सख्या, माजा नवरा हाय - मारू दी न्हायतर तुडू दी- तुला काय करायं हाय?’ आणि दुसऱ्या दिवशी नवऱ्याच्या माराच्या भीतीनं सुजऱ्या हाताने डोळ्यावरची पाटी सांभाळत पुन्हा कामाला जाते. हे वाचताना आपण सुन्न होतो. असे अनेक हेलावून टाकणारे प्रसंग या आत्मकथनात आहेत. गोंधळी समाजातील श्रद्धा व अंधश्रद्धा, धार्मिक विधी यांचे चित्रण ‘तीन दगडाची चूल’ मध्ये आहेत. मुलाच्या जन्माच्या वेळचे विधी, ‘आप्पाढा’ तील मरगम्मादेवीचा उत्सव व गोंधळ, माणकेश्वराच्या ‘सटवाई’च्या नैवेद्याचे वर्णन, गोंधळी जमातीतील विवाहाचे विधी, मुलीला ‘न्हाण’ आल्यानंतरचे विधी, आजीच्या मृत्यूनंतरचे विधी यांचे वर्णन आत्मकथनात येते. त्यामुळे समाजशास्रीय अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा ‘दस्तऐवज’ आहे. दादासाहेब मोरे यांच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्याशी विवाह झाल्यानंतर विमलचे जीवन बदलते. मोरेंच्या बरोबर सभा-संमेलनात ती वावरू लागते. सामाजिक चळवळीत सहभागी होते. दादासाहेब तिच्यातील न्यूनगंड दूर करण्यासाठी धडपडतात, कष्ट घेतात. अनेक कार्यकर्ते त्यांच्या घरी येत असतात. अपुऱ्या पैशात संसाराचे रहाटगाडगे ओढताना तिची जीवघेणी ओढाताण होते. उपासमार होते, पण नुसतं दोन वेळेला पोटभर खाऊन जगणं म्हणजे आयुष्य नाही. दुसऱ्याचा विचार करून जगण्यातच खरं सुख असतं. हे तिचं तत्त्वज्ञान असतं, त्यामुळे याही परिस्थितीत हसूनखेळून ती सर्व निभावून नेते. ज्ञात, अज्ञात समस्यांना तोंड देण्याची जिद्द तिच्यात निर्माण होते आणि ‘विमल’ आधिक आत्मविश्वासाने वावरू लागते. ‘गबाळ’ हे दादासाहेबांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. पण त्याची छाया या आत्मकथनावर पडलेली नाही हे विशेष आहे. तसेच खूप काही सोसूनही भोगलेल्या आणि भोगाव्या लागलेल्या जीवनाबद्दल लेखिका कुठेही कडवपणे लिहित नाही अथवा ज्यांच्यामुळे अपार मनस्ताप भोगावा लागला आहे. त्यांच्याबद्दलची कटुताही ती व्यक्त करीत नाही. भटक्या व विमुक्त जातीतील स्रीनं लिहिलेलं हे पहिलंच आत्मकथन आहे. त्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ‘तीन दगडाची चूल’मध्ये एकीकडे आपार दु:ख व दैन्य यांचे प्रत्यकारी चित्रण आहे, तर दुसरीकडे चळवळीत उतरलेल्या सामाजिक कार्यकत्र्यांच्या जीवनाचे व विचारांचे दर्शनही या साहित्यकृतीतून घडते म्हणूनच त्याला कलात्मकता व महात्मताही प्राप्त झाली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MANSA ASHI ANI TASHIHI
MANSA ASHI ANI TASHIHI by RAVINDRA BHAGAVATE Rating Star
ठाणे वार्ता ८ डिसंबर २०२३

कथा लेखक रवींद्र भगवते हे पटकथा, संवाद लेखक,नाटककार, अनुवादक, कवी आणि निवेदक आहेत. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक लोकप्रभा, शब्द रुची, माहेर, रणांगण, गप्पागोष्टी यांमधून कथालेखन केले आहे. काही कथासंग्रह आपल्याला झपाटून टाकतात. त्यातीलच एक म्हणज भगवते यांचा हा कथासंग्रह ! `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हातात घेतला की, अधाशासारखा वाचून झाल्यानंतरच आपल्या मनाला तृप्ती मिळते. नंतर कित्येक दिवस त्यातील पात्रांच्या नशेची झिंग काही उतरत नाही. एक एक कथा वाचत पुढे गेलो की मनात अनेक अस्वस्थ भावनांचे थैमान सुरू होते. खर तर चांगल्या लेखनाचे हेच लक्षण असते की, श्री, ते वाचकांच्या बधीर संवेदना जाग्या करते. तरल मनाचे संवेदनशील कथाकार रवींद्र भगवते यांच्याकडून कोणत्या पात्राला कसा न्याय द्यायचा हे शिकायला मिळते. त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा आपल्या आजू‌बाजूला फिरत असतात. रोजच्या आयुष्यात भेटतात. `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हाती घेतल्यानंतर त्याचे मुखपृष्ठच आपले लक्ष वेधून घेते. निळाशार अथांग असा समुद्र, त्यामध्ये संथ वाहणारी नाव, स्त्री आणि पुरुषाचे एकमेकांकडे पाहणारे रेखाटलेले चेहरे आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारे एकमेकांचे प्रतिबिंब, (जणू काही स्त्री आणि पुरुष हे एकमेकांशिवाय अपूर्णच) `माणसं अशी आणि तशीही` या कथासंग्रहाबद्दल सरदार जाधव यांनी रेखाटलेले हे मुखपृष्ठ खूप काही सांगून जाते. एकेक कथेचा परामर्ष घेत केलेली अतिशय समृद्ध अशी प्रस्तावना ज्येष्ठ, श्रेष्ठ कथा लेखक चांगदेव काळे यांनी लिहिली आहे. या कथा सुंदर का आहेत याविषयी काळे यांनी दिलेली कारणमीमांसा नक्कीच वाचनीय आहे. या संग्रहात एकूण सोळा कथांचा समावेश केला आहे. त्यातील पंधरा कथा लघुकथा या प्रकारात मोडतात तर `अमृता` ही कथा दीर्घ कथा या प्रकारात येते. `अमृता` या कथेत, निशिकांतची आई-बहिण या अमृताला समजून घेऊ शकत नव्हत्या. तेव्हा सहजपणे समाजातील लोकांची गतिमंद माणसाकडे पाहण्याची दृष्टी एका वाक्यातच विशद केली आहे.बरेच लोक मतिमंद किंवा गतिमंद माणसांना समजू शकत नाहीत, ते असं त्यांना लांबून न्याहाळत बसतात. `अमृता` ही या कथासंग्रहातील पहिली कथा तर `रावसाहेब` ही शेवटची कथा पण या दोन्ही कथेमध्ये गतिमंद मुलीची एक वेगळीच कर्म कहाणी आहे. `अमृता` या कथेतील प्रभू काका म्हणजेच अमृताचे वडील यांची एक वेगळीच छाप मनावर उमटते. आपली गतिमंद असणारी मुलगी अमृता हिचं आपल्यानंतर कसे होणार याची काळजी त्यांच्या मनात सतत भेडसावत असते. जेव्हा त्यांच्या लक्षात येते की, अमृताला निशिकांत आवडतो, तेव्हा त्यांच्याकडे येणारा विमा एजंट निशिकांत याला दोन करोड रुपये आणि बंगला देण्याचे कबूल करून निशिकांत आणि अमृताचा त्यांनी लावून दिलेला विवाह, निशिकांत, सुनंदा या पात्र पात्रांची चित्रणे, वाचकाला अनुभवाच्या वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात. मानसिक गरजेइतकीच व्यक्तीची शारीरिक गरज किती महत्त्वाची आहे ते कथा लेखक भगवतेनी अगदी अचूक मांडले आहे. उदा. `कामदेवानं त्याचं अमृताच्या हातातलं बोट काढलं आणि भारल्यासारखा निशिकांत सुनंदाच्या रुमकडे चालू लागला, तो तिच्या शयनमहालात कधी आला, हे त्याचं त्यालाही कळलं नाही." गतिमंद असणाऱ्या अमृताचा मनापासून सांभाळ करणाऱ्या निशिकांतनं शरीराची भूक भागविण्यासाठी सुनंदाशी केलेलं दुसरं लग्न, आणि अमृताला सुनंदा त्रास देतेय म्हणून तिच्याशी अबोला धरलेला निशिकांत... पण कितीही झाले तरी अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतक्याच शरीराच्या असणा-या गरजा भागवणे हे देखील नितांत गरजेच आहे. म्हणूनच कितीही झाले तरी तो अमृताचे हातातील बोट सोडवून सुनंदाकडेच जातोच. अमृता, निशिकांत आणि सुनंदा या तीन प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कथा वाचकाला खिळवून ठेवते. रावसाहेब ही कथा मात्र टिपिकल मर्डर मिस्टरी असली तरी ज्या ज्या व्यक्तींकडे संशयाची सुई वळते त्या त्या व्यक्तिरेखा उसठशीत झाल्यामुळे वाचकाला विचार करायला निश्चित भाग पाडते. `अमृता` या कथेतील गतिमंद अमृता असू दे, नाही तर `राबसाहेब` या कथेतील गतिमंद संगीता असू दे त्यांचा समजूतदारपणा शहाण्या सुरत्या बाईलाही जमणार नाही. भगवते यांनी साकारलेल्या पात्रांच्या जगण्यात पराकोटीचे वैविध्य आणि विषमता ठासून भरलेली आहे त्यातून ते आपापल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी कशी झुंज देतात किंवा जुळवून घेतात. याचा चलतचित्रपट जणू डोळ्यासमोर उभा राहतो. यातल्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात इतक्या चांगल्या आहेत. `तिनं सवत आणली` या कथेत, आजोबांनी कमला काकी आणि शंकरकाकांकडे बघून त्यांच्या मनातील शब्दबद्ध केलेला विचार, `मला महाभारताची आठवण झाली. जरासंधाच्या जनानखान्यात कैद केलेल्या सोळा हजार स्त्रीयांशी श्रीकृष्णानं विवाह केला होता. हा शंकर नव्हे... साक्षात कृष्ण आहे.` एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजू शकते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कमलाकाकी, बाबू गुंडाने आणि त्याच्या सोबतच्या चार पाच व्यक्तींनी सुमनवर केलेला बलात्कार, त्यातून तिला गेलेले दिवस, अशा मुलीशी कोण लग्न करणार करणार म्हणून कमलाकाकीनं घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाची फलश्रुती याविषयी मुळातूनच ही कथा वाचायला हवी. एक मात्र खरं की भगवते यांच्या कथेतील पात्रे ही समजूतदारपणे वागतात. `कुलूप` या कथेत उद्वेगामध्ये दीपा पंडित समोर विकी ठाकूरने काढलेले उद्वार, `स्साला.... हा इतिहासच त्रास देतोय मला. इतिहासाचं काय असतं, तो बिघडत असताना आपल्याला जाणवत नाही; पण एखाद्या भुतासारखा तो आपल्या मानगुटीवर बसतो. विकी ठाकूरला दीपाच्या आक्रमक सौंदर्याची जी भुरळ पड़ते तिला दीपा कसं तोंड देते ते लेखकाच्या खास शैलीत वाचण्यासारखं आहे. `इंटरव्ह्यू` या कथेतील गावावरून आलेला विठ्ठल अडचणींचा सामना करत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी साकारलेल्या पात्रांमध्ये जिद्द आहे, सकारात्मकता आहे. त्यांच्या `लाल टिकली` या कथेतील उर्मिला हिचा नवरा अपघातामध्ये मरण पावतो. तिला समजते त्याच्या सोबत कुणी सिमरन नावाची तरुणीदेखील होती. हे समजल्यावर ऊर्मिला मृत नवऱ्याच्या चारित्र्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पड़ते तेव्हा तिला काय शोध लागतो ? शोध संपवूनच ती मुंबईला परत जाते. त्यांच्या कथेतील नायिका या जिद्दी आहेत. त्यांच्या मनात आलेल्या गोष्टी तडीस नेऊनच त्या शांत बसतात. त्यांची कथालेखनावर उत्तम पकड आहे. त्यांच्या प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा साकार करताना तिचा मनोविश्लेषणात्मक वेध ते इतक्या सूक्ष्मतेने घेतात म्हणूनच या व्यक्तिरेखा आपल्यापुढे जिवंतपणे उभ्या राहतात. त्यांच्या `गॉगल` या कथेतील घरकाम करणाऱ्या संगीतावर रिबानचा गॉगल चोरल्याचा निकिता आरोप करते. एखादा आरोप प्रामाणिक माणसाला कसा अस्वस्थ करतो तो अस्वस्थपणा या कथेत छान टिपला आहे. त्यांच्या कथेतील पात्रांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध कथाविषयाचे बीज आणि त्याला अनुसरून केलेली कथेची मांडणी यातून लेखकाच्या सहजाविष्काराचं सामर्थ्य लक्षात येतं. प्रवाही भाषाशैली, तिच्यातील संवेदनशीलता आणि खिळवून ठेवणारं कथाबीज यामुळे वाचक या कथांमध्ये गुंतत जातो आणि मानवी स्वभावाचे विविध नमुने पाहून स्तिमितही होतो. लेखक भावविश्वात खोल खोल उतरत जातो आणि त्यातून प्रत्येक कथा तिच्या आंतरिक गाभ्यासह वाचकांच्या मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. त्यांच्या `वर्तुळ` या कथेतील अशोक याला प्लॅटफॉर्मवर धावणारी आपली बायको थोडीशी स्थूल वाटते, त्याला ती नकोशीही वाटते. त्याच्या बाजूने जाणारा तरुण-तरुणींचा सुगंधी घोळका पाहून लगेच त्याच्या मनात विचार येतो, अशाच एखाद्या फुलासी आपलं लग्न व्हायला पाहिजे होतं. मग काय सुगंधच सुगंध... आकाशाएवढा त्याच्या मनातलं हे वादळ शमतं का याचं उत्तर ही कथा सकारात्मक पद्धतीने देते. वास्तव जीवनात पाहण्यात येणारे सर्वसामान्यांचं जगणं, त्याची हतबलता, त्यांचं सोसणं, परिस्थितीला शरण जाण्याची वृत्ती, त्यांमधील ताणतणाव यांसारख्या वास्तवातून सापडणारी कथाबीजं लेखकाला जितकी अस्वस्थ करतात, तितकीच त्या कथा वाचणाऱ्यांनाही अस्वस्थ करून जातात. वास्तवातून फुललेल्या या कथेची पातळी वैयक्तिक अनुभवाची न राहता तिला विशाल सामाजिक भावविश्वाचं अधिष्ठान प्राप्त होतं. त्यांच्या अनेक कथामधून काळाची पावले उमटताना दिसतात. त्यांची `अनामिका` ही कथाही मनाला चटका लावून जाते. या कथासंग्रहाची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या कथेतील सर्व पात्रे ही सहज भावनेनं वावरतात. मानवी जीवनमूल्यांची जिवापाड जपणूक करताना दिसतात. कथा विषय नेहमीचेच असले तरी लेखकाची कथा मांडणीची शैली वेगळी आहे. कसदार लेखन, भाषेचा वेगळेपणा, शब्द चमत्कृतीचा नेमका वापर, आटोपशीर प्रसंग अशा अनेक जमेच्या बाजू `माणसं अशी आणि तशीही या कथासंग्रहात दिसतात. त्यांच्या कथा विचार करायला लावतात, या कथासंग्रहातल्या इतर कथांमध्येही लेखकाने अनेक नाविन्यपूर्ण विषय हाताळलेले आहेत. प्रत्येकाने आवर्जून वाचावा आणि आपल्या संग्रही ठेवावा. असा हा कथासंग्रह, कथाकार रवींद्र भगवते यांनी असेच लिहीत जावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा. त्यांच्या साहित्य सेवेस सुयश चिंतिते. ...Read more

THE HUNGRY TIDE
THE HUNGRY TIDE by AMITAV GHOSH Rating Star
जयश्री सोनवणे

बंगालमधील सुंदरबनच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी जन्म घेते कादंबरीत मुख्य पात्रेत अशी चार-पाचच आहेत. कनाई -हा मूळ कलकत्त्याचा पण आता दिलीत राहून तेथे येणाऱ्या परदेशी भाषिकांना दुभाषा पुरवणे हा त्याचा धंदा आहे. पेशाने तो भाषांतरकार आहे. स्वतःच्या धंद्ामध्ये खूपच व्यस्त असणारा हा ४२ वर्षाचा तरुण त्याची मावशी नीलिमा हिच्या निर्वाणीच्या आग्रहावरून तिला भेटायला वेळात वेळ काढून लुसीबारीला आलेला आहे. पिया- ही मुळची बंगाली. पण आई-वडील सिएटलला स्थायिक झाल्यामुळे आता अमेरिकन आहे. ती सुंदरबन मधील डॉल्फिनचा अभ्यास करायला इकडे आलेली आहे आणि येताना रेल्वेमध्ये तिची कनाईशी ओळख झालेली आहे. निर्मल नीलिमा- निर्मल नीलिमा हे जोडपे या प्रदेशात राहणाऱ्या गरिबीने ग्रासलेल्या बहुसंख्य लोकांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य खर्च करायचे हा आदर्श ठेवून १९७० पासून इथे स्थायिक झालेले आहे लुसीबारी येथे त्यांची बडाबन नावाची संस्था आहे दिली माने येथे दवाखाना काढलेला आहे. मोयना- ही लुसी बारीची स्थानिक तरुणी नीलिमाच्या दवाखान्यात नर्स चं काम शिकत आहे. त्याशिवाय अजूनही बरीच कामं ती करत असावी असे दिसते. कारण कनाई साठी जेवण बनवून आणायचं काम निलिमाने तिला सांगितलं आहे. फोकीर- फोकीर हा मोयनाचा नवरा आहे आणि तिथला मासेमारी करणारा कोळी आहे. खाडीच्या प्रदेशात राहत असल्याने मासेमारी व खेकडे हे मुख्य उपजीवीकेचे साधन आहे आणि ते पकडण्यात तो पटाईत आहे. तसेच त्याला इथल्या खाड्चीयां कण न कण माहिती आहे. होरेन - होरेन हा पण एक निष्णात आणि अनुभवी कोळी आहे आणि फोकीरला तो स्वतःच्या मुलासारखा मानतो. सर डॅनियल हॅमिल्टन नावाचा एक स्कॉटिश माणूस ब्रिटिश सरकारकडून १९०३ झाली ही बेटं असलेली दहा एकर जमीन विकत घेतो आणि तिथे मनुष्यवस्ती वसवण्याचा चंग बांधतो. अनेकांना ही जमीन त्याने फुकट दिली आणि १९२० सालापासून ज्यांच्याकडे मालमत्ता, जमीन काहीच नाही अशा अत्यंत गरीब लोकांना या जमिनीच्या मालकीच्या आशेने इथे येऊन वसाहत करण्यास आवाहन केले.१९७१ साली झालेल्या बांगला युद्धामध्ये आणि १९४७ साली झालेल्या फाळणीमध्ये असंख्य निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे या बेटांवर आले तेव्हा इथे फक्त वाघ, मगरी, चित्ते, नाग, आणि शार्क मासे यांचे साम्राज्य होते. असंख्य लोक त्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. जे राहिले जगले ते सतत असुरक्षिततेची मूक भावना घेऊन जगत राहिले. इथे वय वर्ष ३० च्या पुढे जगलेले तरुण खूपच कमी दिसतात. इतकंच नव्हे तर इथल्या स्त्रियांचे नेहमीचे पोशाख सुद्धा विधवेचे वस्त्र धारण करणारे असतात अशी इथली परिस्थिती अत्यंत दारुण आहे. खरंतर या कादंबरीला नायक किंवा खलनायक नाहीच आहे. जर कोणी नायक किंवा खलनायक असेल तर तो निसर्ग आहे, ती भरती-ओहोटी आहे. इथले वाघ, मगरी, साप हे सर्व खलनायक आहेत. इथले वादळी वारे, पाण्याचे सतत बदलते प्रवाह आहेत जे इथल्या मनुष्य जीवनाला कधी होत्याचे नव्हते करून टाकतील हे सांगता येत नाही. फाळणी नंतर आणि युद्धानंतर देशोधडीला लागलेले असंख्य लोक इथे आले. ते अत्यंत गरीब होते. इथल्या भरती ओहोटी, लहरी निसर्ग, हिंस्र प्राणी यांच्याशी आपल्या अस्तित्वासाठी ते लढू लागले. त्यांना जात, धर्म, कूळ, वंश यांच्याशी काही देणंघेणं नव्हतं. कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाईच एवढी बिकट होती की या कशाचं भान असण्याची परिस्थितीच नव्हती. आणि या सर्व लोकांना घुसखोर ठरवून सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना कायम त्रास दिला जात होता. तुरुंगात डांबलं जायचं आणि गोळीबारात मारलं जायचं. निर्मला मात्र क्रांतीसाठीही परिस्थिती अगदी योग्य वाटायची. आपण जेव्हाही कादंबरी वाचायला घेतो तेव्हा ती आपल्या मनाची इतकी पकड घेते की शेवटपर्यंत आपण ती सोडू शकत नाही. संपूर्ण कथानक बाळबोधपणे काळानुसार एका सरळ रेषेत न जाता नदीसारखं वळण घेत, कधी भूतकाळाच्या खाच खळग्यात अडकत, साचत पुढे जाते. मध्येच ते खूप प्रवाही होते, मध्येच संथ होते आणि मध्ये मध्ये निसरड्या शेवाळ्याप्रमाणे फसवं होत जातं. श्री अमिताभ घोष यांचे मूळ इंग्रजी पुस्तक मराठीतून वाचताना हे लक्षात येतं की अनुवादकार श्री. सुनील करमरकर यांची मराठी भाषेवरची पकड ही तितकीच पक्की आहे जितकी त्यांची इंग्रजी भाषेवर पक्की पकड आहे. कादंबरी इंग्रजीत वाचून त्याचा रसास्वाद घेणे ही सहज साध्य गोष्ट आहे. पण त्यातील तरलता आणि जीवनानुभवाला यत्किंचितही धक्का न लावता त्याचा मराठीत अनुवाद करणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे आव्हान सुनील करमरकर यांनी यशस्वीपणे पेललेले आहे. मुळात इंग्रजी भाषेचा बाज, त्याची वाक्यरचना मराठी भाषेपेक्षा खूपच वेगळी असते. पण ही कादंबरी मराठीतून वाचताना कुठेही असं जाणवत नाही की हा अनुवाद आहे म्हणून. ही कादंबरी मुळात मराठीतच लिहिली गेली असावी असं वाटावं इतकी ती अस्सल उतरली आहे. माणसाच्या नात्यातील भावनांचा कल्लोळ आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरी स्वभावाचा कल्लोळ याचे चित्र रेखाटताना केलेली शब्दांची गुंफण खूपच विस्मित करणारी आहे. कादंबरी वाचताना ती माणसे, कांदळवनाचे जाळे, पाण्याचा आणि जंगलाचा गूढपणा, दरारा बसवणारं वादळ या गोष्टी जशाच्या तशा आपल्यासमोर उभ्या राहतात. श्री. सुनील करमरकर यांच्या भाषा कौशल्याचा हा परिणाम आहे. आजच्या काळात जिथे एका मराठी वाक्यात दोन इंग्रजी शब्द नसतील तर आपल्याला कमी लेखले जाईल ही भावना घेऊन भाषेचा वापर करणाऱ्या, न्यूनगंडात गेलेल्या मराठी माणसासाठी ही कादंबरी म्हणजे मराठी अस्खलीतपणाचे उदाहरण आहे. कुठेही अर्थाला, आशयाला, प्रासंगिक वर्णनाला बाधा न आणता मराठी भाषेचे वैभव श्री. सुनील करमरकर आपल्या लिखाणातून, अनुवादातून उलगडत जातात. त्यांनी हे सर्व लिखाण करताना घेतलेले कष्ट नक्कीच जाणवतात. श्री सुनील करमरकर यांचे हे पहिले अनुवादित पुस्तक आहे यावर विश्वास बसणार नाही इतके हे पुस्तक उत्तम झाले आहे. ...Read more