* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SATREIN AUR SATREIN
  • Availability : Available
  • Translators : RAJANI BHAGWAT
  • ISBN : 9788184980646
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 196
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHY DOES IT HAPPEN? YOU LOVE SOMEBODY WITH ALL YOUR SOUL AND THAT SOMEBODY JUST LEAVES YOU IN ANNOYANCE. WHY? YOU EXPECT LOVE FROM THOSE WHO ARE NEAR TO YOU, CLOSER TO YOU AND THEY SIMPLY LEAVE YOUR SIDE, LIKE A BREEZE TOUCHING YOU FOR AN INSTANT... WHY DOES THIS HAPPEN?? YOU TURN INTO A DRIED TREE, DRIED FOREVER.... AGAIN THE SAME QUESTION, WHY DOES THIS HAPPEN? YOUR SOLITUDE ITSELF TRIES TO TURN YOU INTO A MAD PERSON.... WHY DOES THIS HAPPEN? WHY DOES IT BECOME IMPOSSIBLE FOR YOU TO LIVE WITHOUT LOVE? WHY DO YOU FEEL LIKE ENDING YOUR LIFE IN LACK OF LOVE? PEOPLE DO NOT SEEM TO UNDERSTAND YOU, WHY... WHY...? ANITA RAKESH.
तुम्ही ज्यांच्यावर बेहद्द प्रेम करता ते तुमच्यावर रुसून निघून जातात... असं का होतं? तुम्ही आपल्या जवळपास असलेल्या लोकांकडून प्रेमाची मागणी करता आणि ते सरळ सळसळणाऱ्या हवेबरोबर तुमच्या जवळून निघून जातात... असं का होतं? प्रेमावाचून तुम्ही एक शुष्क, वठलेलं झाड होऊन जाता... असं का होतं? तुम्हाला एकटेपणी वेड लागायची पाळी येते... असं का होतं? प्रेमावाचून तुम्हाला जगणं अशक्य का होतं? प्रेमावाचून तुम्हाला मरून जावंसं का वाटतं? लोक तुम्हाला समजून घेऊ शकत नाहीत... असं का होतं? असं का होतं...?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MEEANITARAKESHSANGATEY #SATREINAURSATREIN #मीअनीताराकेशसांगतेय #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMHINDITOMARATHI #RAJANIBHAGWAT #ANITARAKESH "
Customer Reviews
  • Rating Starअनीता राकेश, नवी दिल्ली.

    मेहता पब्लिशर्सद्वारा प्रकाशित मेरी पुस्तक `सतरें ओर सतरें` का मराठी भाषा में प्रो. रजनी भागवतजीने `मी अनीता राकेश सांगतेय` इस नामसे जो अनुवाद किया है, वो पुस्तक नववर्ष २०१० को मिल गई। धन्यवाद। पुस्तक बहुत ही सुरूचिपूर्ण प्रकाशित की गई है और साथ ही ह भी जोड़ना चाहूँगी की पुस्तक के आवरण के लिए श्री चंद्रमोहन कुलकर्णीजी को भी मेरी बधाई दें क्योंकि उनका किया आवरण पुस्तक का सही आईना या फिर प्रतीक है। चाहूँगी कि एक बार और आपके तहेदिलसे धन्यवाद करूं क्योंकि इससे बढ़िया मेरे लिऐ और कोई तोफा (तोहफा) नहीं हो सकता था। राजधानी में भयंकर सर्दी पड़ रही है... इसी से शब्द इतना स्पष्ट नहीं दिख रहे... लेकिन भावना अवश्य समझ जाये, यही अनुरोध है... शुभकामनाओं सहित.... ...Read more

  • Rating Starअरुण भट, ठाणे

    नुकतेच `मी अनीता राकेश सांगतेय` हे अनुवादित पुस्तक वाचले. अनुवाद प्रभावी, प्रवाही झाला आहे. मूळ आत्मकथनाने जशी पकड घेतली तशीच पकड अनुवादानेही घेतली. या आत्मकथनाद्वारा अनीता राकेश यांचा समजूतदारपणा, सहनशीलपणा, संवेदनशीलपणा, सच्चेपणा मनाला चांगलाच भिडत. डॉ. इंद्रनाथ मदान, कमलेश्वर यांचे अभिप्राय थोडक्यात बरंच काही सांगून जाणारे आहेत. या अनुवादाने मराठी साहित्यविश्वात मोलाची भर पडेल ही आपली अटकळ बरोबर आहे. सतत दु:खाशी सामना करणाऱ्या अनीताजींना अनुवांशिकरीत्या आईकडून साहित्यिक गुण मिळाले ही सुखाची गोष्ट आहे. लेखनाच्या वारशामुळे त्यांचं वेदनामय जीवन आपल्यासमोर प्रकट झालं. पुस्तकाचं मुखपृष्ठ आकर्षक व मार्मिक आहे. मेहता प्रकाशन म्हणजे दर्जेदार पुस्तकं हे समीकरण आता घट्ट होत चाललं आहे. आपल्या आगामी लेखन प्रवासास शुभेच्छा़ ...Read more

  • Rating StarPRABHAT / 21-02-2010

    मोहन राकेश यांच्या पत्नी अनिता राकेश यांच्या ‘सतरें और सतरें’ या आत्मकथनाचा ‘मी अनिता राकेश सांगते’ हा मराठी अनुवाद रजनी भागवत यांनी केला आहे. अनिता राकेश यांचे हे दुसरे आत्मनिवेदन. मोहन राकेश यांच्यासारख्या नाट्य-साहित्यक्षेत्रातल्या दिग्गजाची पत्नीअसणाऱ्या अनिता राकेश यांच्या जीवनात घडलेल्या नाट्यपूर्ण घटनांचा हा प्रामाणिक आढावा आहे. अनिता राकेश यांच्या जीवनाबरोबर मोहन राकेश यांचे व्यक्तिमत्व एकरुप झाले होते. मात्र, मोहन राकेश यांच्या मृत्यूनंतर विस्कटून गेलेले जीवन पुन्हा उभारण्यासाठी यांना टोकाची धडपड करावी लागली. ही धडपडही शंभर टक्के यशस्वी झाली असे म्हणता येत नाही. याचे महत्त्वाचे कारण त्यांनी केलेले दुसरे लग्न यशस्वी झाले नाही. संवेदनशील मनाच्या अनिता राकेश आणि त्यांचे दुसरे पती यांचे संबंध कायम तणावाचे राहिले. त्यानंतर त्यांनी पदरातील दोन लहान मुलांसाठी जीवन जगण्याचा निर्णय घेतला. त्यांना सुखाचा मार्ग मोकळा करुन देणे याची कथा म्हणजे ‘मी अनिता राकेश सांगतेय’ हे आत्मनिवेदन आहे. ...Read more

  • Rating StarSAKAL / 28-02-2010

    अनीता राकेश यांच्या `सतरें और सतरें` या प्रसिद्ध हिंदी आत्मकथनाचा हा रजनी भागवत यांनी केलेला अनुवाद. या आत्मकथनात अनीता राकेश यांच्या जीवनाबरोबरच त्यांचे पती मोहन राकेश यांच्याशी, त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाशीही वाचकांचा परिचय होतो. निवेदनातील सचचेपणा हे या आत्मकथनाचे सामथ्र्य होय. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more