* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WISDOM SONG : THE LIFE OF BABA AMTE
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788177669367
  • Edition : 8
  • Publishing Year : FEBRUARY 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 268
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :BABA AMTE BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MURLIDHAR DEVIDAS AAMTE WAS BORN TO A RICH LANDLORD. HE WAS BASICALLY OF VERY AGGRESSIVE AND REVOLUTIONARY NATURE. HE WANTED TO LIVE HIS LIFE FULLY. BUT VERY SOON HE REALISED THE FACT THAT HIS LIFE WAS NOT FOR HIS OWN HAPPINESS. IT WAS FOR OTHERS, OTHERWISE THE RICHES, THE PROSPERITY, THE INTELLIGENCE THAT HE POSSESSED WOULD ALL BE IN VAIN. THIS THOUGHT GAVE RISE TO THE COLONY ESTABLISHED FOR THE SURVIVAL OF THE PATIENTS SURVIVING WITH LEPROSY. THE NEXT STEP WAS THE `BHARAT JODO ABHIYAN` TO SPONSOR THE NATIONAL INTEGRITY AND HARMONY BETWEEN THE NORTH AND THE SOUTH; THE EAST AND THE WEST. THE NEXT PROGRAMME ON HIS AGENDA WAS THE STAY IN THE NARMADA BASINS FOR OVER A PERIOD OF 10 YEARS. HE SUPPORTED THE FAMILIES AFFECTED BY THEIR DISPLACEMENT THROUGH THE HANDS OF THE GOVERNMENT ITSELF IN THE NAME OF ENVIRONMENT. IT WAS DURING THIS PERIOD THAT HE STARTED SUFFERING FROM INCURABLE DISEASE OF HIS SPINAL CORD. NOT ONLY BABA, BUT HIS NEXT TWO GENERATIONS HAVE DEVOTED THEIR LIVES IN THE WELL BEING OF THE PEOPLE. TOGETHER, THEY HAVE HELPED THOUSANDS OF PEOPLE IN MANY WAYS, THEY HAVE CHANGED PEOPLE FOR BETTERMENT. NOT ONLY THE EFFORTS OF THESE THREE GENERATIONS HAVE HELPED BUT THEIR WILL POWERS HAVE ALSO HELPED A LOT IN HELPING THESE PEOPLE. THIS AUTOGRAPHY IS ACTUALLY A VERY INFORMAL PICTURE OF BABA; IT INCLUDES MANY SCENES FROM HIS DAY-TO-DAY LIFE, THE INFORMAL MEETINGS AND DISCUSSIONS, THE INTERVIEWS NOT ONLY WITH HIS FAMILY MEMBERS BUT ALSO WITH HIS NEAR AND DEAR ONES. THIS AUTOGRAPHY GIVES JUSTICE TO THE EXTRA-ORDINARY NATURE OF THIS COUPLE, BABA AND HIS WIFE TAI.
सधन जमीनदारांच्या घरात जन्माला आलेले मुरलीधर देवीदास आमटे हे स्वभावत: बंडखोर वृत्तीचे, आयुष्य भरभरून जगण्याची इच्छा असलेले! पण आयुष्यात फार लवकर एका गोष्टीची त्यांना तीव्रतेने जाणीव झाली; आपल्याला जगायचंय ते स्वत:साठी नाही, तर दुस-यांसाठी. अन्यथा हे सारं वैभव, हा मानसन्मान, ही बुद्धिधमत्ता... हे सगळं फोल, तकलादू, बेगडी ठरेल. ...मग सुरुवात झाली ती आनंदवनात कुष्ठरुग्णांसाठी उभारलेल्या वसाहतीने. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता आणि सलोखा यांचा पुरस्कार करण्यासाठी भारताच्या पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण टोकांना जवळ आणणारं भारत जोडो अभियान झालं. त्यापुढचं पाऊल म्हणजे बाबांचं नर्मदा खो-यातील दहा वर्षांचं प्रदीर्घ वास्तव्य. सरकारने पर्यावरणाचा योजनाबद्ध विनाश चालविला होता, त्यामुळे होरपळून निघणा-या कुटुंबांच्या पाठीशी, बाबा उभे राहिले. हे सर्व करीत असताना पाठीच्या कण्याच्या असाध्य व्याधीने त्यांच्या शरीराला ग्रासून टाकले होते. बाबांच्या ध्येयस्वप्नांची व्याप्ती किती मोठी आहे, याचं तळपतं उदाहरण म्हणजे बाबा आमटे यांच्या मुला-नातवंडांच्या तीन पिढ्यांनी आजवर हजारो लोकांची आयुष्यं आमूलाग्र बदलून टाकली आहेत. बाबांच्या स्वप्नांची पूर्तता होण्यामागे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अदम्य इच्छाशक्तीचाही फार मोठा वाटा आहे. बाबांशी तासन्तास मारलेल्या मनमोकळ्या, अनौपचारिक गप्पा, त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि निकटवर्तीयांच्या मुलाखती या सर्वांमधून निर्माण झालेलं बाबांचं हे चरित्र म्हणजे बाबांना ओळखणा-या असंख्य माणसांची सामूहिक स्मरणगाथाच आहे. सहवेदना, करुणा, निरपेक्ष बुद्धीने केलेली सेवा, या सर्वांचं जितंजागतं प्रतीक असणाNया आपल्या काळातील व्यक्तींचं – ताई आणि बाबांचं – हे यथार्थ चित्रण आहे!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#BABA AMTE #YUDDHKALATIL AASECHA KIRAN #VEDYA AAICHA VEDA MULGA #UTAVIL TARUN #VAYAT YENA #VARSA #AANDAVAN #SOMNATH #HEMALKASA #MAHAROGI SEVA #SAMITI #JANASAMANACHE VAKIL #ENCHAMPALI #BHOPALPATTANAM #BHART JODO #KANYAKUMARI #KASHMIR #PANJAB #PAKISTAN #LIKHIT ANI MOKIKH SHABDHA # KHARYAKHURYA VIKASACHA SWAPNA #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #लीना सोहोनी
Customer Reviews
  • Rating Starगणेश श्रीरंग शेलार

    आमच्या ‍ परिसरातील राहिवाशांचा ग्रुप नुकताच ‍विदर्भातील पर्यटन स्थळांना भेटी देऊन आला त्यात प्रामुख्याने आनंदवनाचा देखिल समावेश होता. साधारणपणे 30 नोव्हेंबर, व 1 व 2 ‍ डिसेंबर 2019 ला आम्ही सहलीवर होतो. तर त्या ठिकाणी कर्मवीर बाबा आमटे यांचं मा.श्रीती निशा मीरचंदानी यांनी ‍लिहिलेलं व आपण अनुवादीत केलेलं ‘अमरगीत’ हे जीवनचरित्र हाती लागलं. त्याविषयी, आदरणीय बाबा आमटेंचा जीवन प्रवास शब्दबध्द करणं हे तसं ‍ जिकरीचं काम पण, लेखिकेनं ते लिलयापणे पेललं. त्यांचं जीवनचरित्र वाचतांना नमुद भाषा, वापरण्यात आलेले शब्दप्रयोग अत्यंत अमोघ आणि रसाळ असल्याने वाचकांच्या थेट काळजाला भीडते. व ही शब्दपर्यायाची कामगिरी आपण अत्यंत चोखपणे बजावली म्हणुन हा शब्दप्रपंच. बाबा आमटे व त्यांचे आनंदवन व हेमलकसा इतकेच काय ते साधारणपणे जनतेला माहिती होते. पण त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकतांना त्यांच्या जीवनातील विविध टप्पे, स्थळे, खडतर प्रवास, शारीरिक व्याधींवर मात करुन केवळ दुर्दम्य ईच्छाशक्तीच्या जोरावर कशी नेत्रदीपक कामगिरी केली याची जाणीव हे पुस्‍तक वाचताना होते. कुटूंबानं घालवुन लावलेल्या अनेक आजार ग्रस्तांच्या, पीडितांच्या व्याधींवर बाबा व त्यांचे एकुणच कुटूंब कशी मायेची फुंकर घालते व व्याधीग्रस्तांसाठी ते आधुनिक काळातील ‘देवमाणसाची’ भुमिका वठवतात. बाबांच्या जीवनचरित्रावरील लेखनाची व्याप्ती प्रचंड मोठी पण ती अत्यंत कसबीने पार पाडली व त्यांच्या प्रत्येक कर्तबगारीची नोंद आपल्या लेखनीने घेऊन त्यांच्या जीवनकार्याचा सन्मानच केला यात कोणतीच शंका नाही. सदिच्छा.. आपला एक वाचक, गणेश श्रीरंग शेलार. ...Read more

  • Rating StarLOKRANG 21 JUNE 2009

    ‘पहिल्या भारत जोडो अभियनाच्या वेळी श्रीनगरजवळील हिरापाल येथे बाबा अत्यंत थकले होते. आपली शेवटची इच्छा एका पत्रात लिहून आपण ते पत्र काळ्या सुटकेसमध्ये ठेवलं असल्याचं त्यांनी विलास मनोहर यांना सांगितलं. त्यानंतर ते म्हणू लागले, ‘असं आई गं....मी आता मरणर!’ अखेर विलास उठले आणि ती काळी सुटकेस उघडू लागले, ‘तुम्ही हे काय करताय? असं बाबांनी विचारताच ते म्हणाले, ‘अहो, तुम्ही सारखं आपण मरणार आहोत,असं म्हणताय ना? मग म्हटलं, तुम्ही मरण्यापूर्वी तुमची अखेरची इच्छा तरी वाचून ठेवावी’ त्यानंतर मात्र बाबांचं ते विव्हळणं, आपल्या आईची आठवण काढून आपण मरणार असल्याचं मोठ्यांदा सांगणं लगेच थांबलं. ‘मी काही बाबांची चेष्टा करण्यासाठी म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगत नाही,’ विलास म्हणाले, उलट एखादा असामान्य माणूससुद्धा किती सामान्य माणसासारखा वागू शकतो, हे पाहून मलाच कुठेतरी मनातून बरं वाटतं. माझ्या मनात आशा निर्माण होते.’ हा प्रसंग वर्णन केलेला आहे ‘अमरगीत’ या पुस्तकात. होय हे बाबा आमटे यांचं जीवनचरित्र आहे. बाबा आमटे यांच्या व्यक्तिमत्त्वात ज्या परस्परविरोधी गोष्टी होत्या त्या, त्यातील गुंतागुंत वाचकांपर्यंत पोचवण्यात लेखिका यशस्वी होतात याचा अनुभव वर वर्णन केलेल्या प्रसंगातून येतो, आणि तो संपूर्ण पुस्तकातूनही वारंवार जाणवत राहतो. या पुस्तकाच्या मूळ लेखिका निशा मीरचंदानी यांची दृष्टी चरित्रकार म्हणून अतिशय स्वच्छ व निर्लेप आहे, अभ्यास आहे. ती दृष्टी आपल्यापर्यंत व्यवस्थितरीत्या पोचवण्याचे श्रेय मराठी अनुवाद समर्थपणे करणा-या लीना सोहनी यांचं आहे. या पुस्तकाचं शीर्षक आहे ‘अमरगीत’. बाबा आमटे आयुष्यभर ज्या पद्धतीने जगले, झगडले त्यामुळे ते अमर झाले आहेत पण त्याचबरोबर त्यांच्या आयुष्याचं गाणंही यात आहे. आयुष्याच्या एका क्षणी त्यांना सच्चा सूर, ताल गवसला आहे. हा त्यांच्या आयुष्यातील सच्चा सूर ताल शब्दात पकडण्यात लेखिकेचे सामर्थ्य आहे. वस्तुत: बाबा आमटे यांचं आयुष्य खूप विरोधाभासांनी भरलेलं आहे. एकीकडे वकिलीचं उत्तम शिक्षण घेणं, दुसरीकडे जंगलात वाघसिहांशी मुकाबला करणं, एकीकडे समृद्ध घरात जन्माला येणं, दुसरीकडे कुष्ठरोग्यांसाठी आडरानात जाऊन स्वत:ला त्यांच्या कार्यासाठी वाहून घेणं, एका बाजूने संस्थाचालक म्हणून हिशोबीपणा, काटकसरीपणा, दुसऱ्या बाजूने बेफाम जगणं हे सारे परस्परविरोधी कंगोरे शब्दांत पकडणं, मांडणं हे खरं तर अवघड काम होतं. पण लेखिकेने ते स्वीकारलं आणि यशस्वी करून दाखवलं. त्यासाठी लेखिकेने घेतलेली मेहनत जाणवते. लेखिका मीरचंदानी बाबांना भेटल्याच पण त्यांच्या भोवतालच्या, सहवासातील महत्त्वाच्या माणसांना भेटल्या, त्यातून व इतर अनेक पद्धतीने त्यांनी चरित्रलेखनाची सामुग्री गोळा केली, ही सामुग्री अतिशय प्रवाहीपणे शब्दांत मांडून वाचकांपर्यंत पोचवली आहे. एका बाजूने बाबांमधले असामान्यत्व लेखिकेने अधोरेखित केले आहे. त्यासाठी नेमके प्रसंग, तपशील दिले आहेत. दुस-या बाजूने विशेष म्हणजे बाबा आमटे यांचे विरोध, टीकाकार यांचीही मतं, विचार दिले आहेत. लेखिका या दोन्ही बाजू आपल्यासमोर मांडते, सुजाण वाचकाला त्यातून नेमका समजायचा तो अर्थ समजतो. हेच या चरित्राचं वैशिष्ट्य म्हणता येईल. बाबा आमटे यांचं काम, क्षेत्र इतकं बोलकं आहे की ते समोर मांडून त्यातून वाचकाला विचारप्रवृत्त करणं हे एका अर्थी म्हटलं तर सोपं होतं कारण या व्यक्तिमत्त्वाला अनेक परस्परविरोधी रंग आहेत. ज्यामुळे हे चरित्र खुलतं. दुसऱ्या बाजूने हे चरित्र लिहिणं ही अवघड गोष्ट होती कारण बाब आमटे यांच्या आयुष्यात इतके विलक्षण प्रसंग, अनुभव आहेत की त्यातून नेमका भाग घेणं, इतर वगळणं हे समुद्रमंथनातून रत्न निवडण्यासारखं होतं. पण लेखिकेने ते सफल करून दाखवलं आहे. बाबा आमटे एक असामान्य कर्मयोगी आणि बाबा आमटे एक सामान्य, सच्चा माणूस या दोहोंचा मेळ पुस्तकात व्यवस्थित घातला आहे. या पुस्तकाच्या मूळ लेखिका निशा मीरचंदानी या अमेरिकेतील एक व्यावसायिक आहेत. पण त्यांची स्वत:ची एक सेवाभावी संस्थाही आहे. त्यांची ही सेवाभावी सच्ची, वृत्ती त्यांच्या या चरित्रलेखनातून प्रतिबिंबित होते. एकीकडे लेखिका म्हणून सहजपणे येणारी तरल संवेदनशीलता दुसरीकडे चरित्रलेखनात आवश्यक ती तटस्थ दृष्टी या दोन्हीतील तोल पुस्तकात व्यवस्थित सांभाळला आहे. या पुस्तकाची सुरुवात बाबा आमटे यांची जडणघडण या भागाने (प्रकरणाने) होते. चरित्रलेखनाचा रूढ क्रम इथे लेखिकेने पाळला आहे. या पहिल्या भागातील वेड्या आईचा वेडा मुलगा हे उपप्रकरण खूप हृदयंगम आहे. बाबा आमटे व त्यांची आई यांच्यातले सूक्ष्म, गहिरे भावबंध यातून आपल्याला जाणवतात. पुस्तकातील दुसऱ्या भागाचे नाव बाबा आमटे यांचा वारसा; कार्य आहे. हा पुस्तकातील एक महत्त्वाचा भाग आहे. यात बाबांनी त्यांच्या कुटुंबाने उभारलेले, चालवलेले आनंदवन, सोमनाथ, हेमलकसा प्रकल्प, महारोगी सेवा समिती यांची माहिती येते. हे प्रकल्प उभे करतेवेळी आलेले अनुभव, त्यात कुटुंबाचे-त्यातही साधनाताई, डॉ. प्रकाश, डॉ.विकास यांचे योगदा, इतरही अनेक नाव नसलेल्या सामान्य पण समर्पित व्यक्ती यांचं चित्रं त्यातून डोळ्यांसमोर साकारतं. या पुस्तकातील तिसरा भाग ‘बाबा आमटे यांचा वारसा वकिली’ असा आहे. यात जनसामान्यांचे वकील म्हणून बाबांचं चित्र रेखाटलं आहे. तसंच भारत जोडो १ व २ पंजाब शांतता यात्रा, नर्मदा बचाओ आंदोलन यांचं सविस्तर वर्णन आहे. त्यातही भारत जोडो अभियान इतवंâ प्रभावीपणे मांडलं आहे (सिद्धार्थ काक यांचा यावरील माहितीपद संदर्भासाठी यात घेतला आहे) की सध्याच्या अस्थिर, दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर ते अधिकच मोलाचं, महत्त्वपूर्ण ठरतं. ‘भारत जोडो’ या भागामुळे (प्रकरणामुळे) वाचकांच्याही मनात अखंड भारताविषयी तशी भावना जागवण्यात लेखिका यशस्वी ठरते. याच्या मुळाशी बाबा आमटे यांची विलक्षण तळमळ आहे, पण ती तळमळ पोचवण्यासाठी लेखिका माध्यम ठरली आहे. पुस्तकातील चौथा भाग ‘बाबा आमटे यांची विद्वत्ता असा आहे. यात बाबा आमटे यांच्या लेखनाचे विशेष मांडले आहेत. त्यांच्यातील एक लेखक, एक परिणामकारक कवी, वक्ता आपल्याला त्यातून उमगतो. तसेच यातील एक उपभाग म्हणजे ‘खऱ्याखुऱ्या विकासाचे स्वप्न’ आहे, ज्याने पुस्तकाचा समारोप होतो. पण लेखिकेने पु.ल.देशपांडे यांच्या शब्दांत म्हटल्याप्रमाणे ‘एकदा का बाबा आमट्यांनी तुमच्या मनाचा कब्जा घेतला की तुम्ही परत पहिल्यासारखे होऊच शकत नाही.’ बाबा, त्यांच्या खऱ्या अर्थाने सहचारिणी साधनाताई यांच्या कौटुंबिक व सामाजिक कार्यातील महत्त्वाची छायाचित्रे पुस्तकात समाविष्ट आहेत, ज्यांनी हे चरित्र अधिकच बोलकं केलं आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more