ATUL KAHATE

About Author

Birth Date : 07/04/1973


ATUL KAHATE IS A GRADUATE IN STATISTICS & HAS DONE HIS MBA. HE HAS WORKED FOR IN 18 YEARS IN INFORMATION TECHNOLOGY INDUSTRY WHERE HE HAS HANDLED VARIOUS RESPONSIBILITIES AT SYNTEL, AMERICAN EXPRESS, DEUTSCHE BANK, L&T INFOTECH AND ORACLE FINANCIAL SERVICES. HE HAS VARIOUS BESTSELLING MARATHI BOOKS TO HIS CREDIT ON VARIOUS TOPICS SUCH AS HISTORY, ECONOMICS, MEDICINE, INTERNATIONAL POLITICS, SCIENCE, TECHNOLOGY, BIOGRAPHY, AND CRICKET. HE HAS RECEIVED VARIOUS AWARDS FOR HIS CONTRIBUTION IN WRITING. HE IS ALSO A REGULAR CONTRIBUTOR TO MARATHI NEWSPAPERS AND TV CHANNELS.

अतुल कहाते संख्याशास्त्राचे पदवीधर आहेत. एम.बी.ए. ही पदवीही त्यांनी प्राप्त केली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे १८ वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. सिंटेल, अमेरिकन एक्स्प्रेस, डॉयचे बँक, एल अँड टी इन्फोटेक आणि आयफ्लेक्स सोल्यूशन्स (आता ओरॅकल) इथे डायरेक्टर पदासह विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. सिंबायोसिस, तसेच पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत अभ्यागत व्याख्याता म्हणून एक दशकाहून अधिक काळाचा त्यांचा अनुभव आहे. इंग्रजीमध्ये ३० आणि मराठीत ४० अशी ७० पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. संगणक क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रोफेशनल्ससाठी नेटवर्क सिक्युरिटी, वेब टेक्नॉलॉजी, ऑपरेटिंग सिस्टिम्स, डेटाबेस मॅनेजमेंट, डेटा कम्युनिकेशन्स, सी प्लस प्लस अशा अनेक पाठ्यपुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यातील अनेक पुस्तकांचा भारतातील तसेच विदेशांतील जवळपास ५० विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश केला गेला आहे. त्यातील दोन पुस्तके चिनी भाषेत अनुवादित झाली आहेत. त्यांच्या क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी या पुस्तकाच्या दीड लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. मराठीमध्ये इतिहास, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, चरित्र, क्रिकेट अशा वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. त्यामधील अलीकडची पुस्तके - इम्रान खान, युद्धखोर अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प, उत्तर कोरिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बखर संगणकाची, अंतराळ स्पर्धा. मराठी साहित्य परिषदेचा ग्रंथकार पुरस्कार (दोन वेळा), उत्तम ग्रंथ पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार; संगणक क्षेत्रामधील योगदानासाठी इंद्रधनू-महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार, कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया अवॉर्ड फॉर आयटी एज्युकेशन अँड लिटरसी, इंदिरा एक्सलन्स अवॉर्ड, सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड, जीआर फाउंडेशनचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. अनेक मान्यवर वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेखन नियमितपणे सुरू असते. तसेच सर्व मराठी टीव्ही चॅनेल्सवर अनेक कार्यक्रमांत त्यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे. क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांत स्कोअरर आणि आकडेवारीतज्ज्ञ म्हणूनही त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 11 of 11 total
ADOLF HITLER Rating Star
Add To Cart INR 425
AMERIKI RASHTRAPATI Rating Star
Add To Cart INR 495
ANTARAL SPARDHA Rating Star
Add To Cart INR 250
22 %
OFF
ATUL KAHATE COMBO SET-10 BOOKS Rating Star
Add To Cart INR 2515 INR 1973
BENJAMIN GRAHAM Rating Star
Add To Cart INR 170
GUNTAVANUKBHAN Rating Star
Add To Cart INR 180
HILLARY CLINTON Rating Star
Add To Cart INR 270
RUPERI SINDHU Rating Star
Add To Cart INR 125
STEVE JOBS : EK ZAPATLELA TANTRADNYA! Rating Star
Add To Cart INR 200
WARREN BUFFET Rating Star
Add To Cart INR 230
WARREN BUFFETCHYA YASHACHE 50 MANTRA Rating Star
Add To Cart INR 170

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more