* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NANA PATIL WAS BORN IN A WARKARI FAMILY. ON THE DAY OF NAMING CEREMONY, HIS GRANNY LAID AROUND HIS NECK A `HOLY-BASIL MAAL (NECKLACE)`. HIS NATIVE PLACE WAS `YEDE MACCHHINDRA` WHERE HE STUDIED TILL SEVENTH STANDARD. LATER, HE BECAME A TALATHI. SINCE CHILDHOOD, HE HAD A KEEN INTEREST IN SOCIAL WELFARE. HE HAD IMMENSE EMPATHY TOWARDS THE POOR PEOPLE. RATHER, WELFARE OF THE POOR WAS HIS LIFE MOTTO. HE ALSO WISHED TO CARRY FORWARD THE WORK OF SATYASHODHAK MOVEMENT INITIATED BY MAHATMA JYOTIBA PHULE. HE HAD PARTICIPATED IN THE `CIVIL DISOBEDIENCE MOVEMENT` INITIATED BY MAHATMA GANDHI. LATER, MAHATMA GANDHI WARNED THE BRITISH WITH THE SLOGAN `GO BACK` IN 1942 WHILE ASKED THE INDIANS TO `DO OR DIE`. NANA PATIL, WHO WAS IN SATARA, WAS INSPIRED BY THIS. HE QUIT HIS JOB AS A TALATHI TO GET ENROLLED IN THE CONGRESS PARTY, BECOMING A FREEDOM FIGHTER THEREAFTER. MANY A TIME, HE WAS PUT BEHIND THE BARS FOR HIS REVOLUTIONARY EFFORTS AGAINST THE BRITISH. HE WENT UNDERGROUND FOR FOUR YEARS OR SO TO COMPLETE HIS TASK. ALONG THE WAY, HE GATHERED MANY HONEST CO-WORKERS WHO HELPED HIM TO FORM PATRI SARKAR IN SATARA DISTRICT. THROUGH THIS VENTURE, PATIL BROUGHT INTO REALITY THE DREAM SEEN BY MAHATMA GANDHI, THAT OF `VILLAGE RAJ`. IT IS IMPERATIVE THAT TODAY`S YOUTH GET TO KNOW THE WORK DONE BY THE GREAT FREEDOM-FIGHTER, THE FOUNDER OF PATRI SARKAR AND THE SUCCESSFUL PERSON WHO IMPLEMENTED `GRAM-RAJYA` IN A TRUE MANNER. THE SAID BOOK IS A PERFECT ONE, INTRODUCING US TO THE LIFE AND WORK OF NANA PATIL.
’क्रांतिसिंह नाना पाटील’ हे संपादित पुस्तक...नाना पाटील यांना लहानपणापासून असलेली सामाजिकतेची जाण व गोरगरिबांविषयी असलेला विशेष कळवळा...किंबहुना, गरिबांच्या कल्याणाची तळमळ हेच त्यांच्या जीवनकार्याचे सूत्र...महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव...महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभाग...1942मध्ये तलाठ्याची नोकरी सोडून काँग्रेस पक्षात सामील होऊन स्वातंत्र्यलढ्यात मारलेली उडी... इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारल्यामुळे अनेक वेळा सोसावा लागलेला तुरुंगवास...सुमारे चार वर्षे भूमिगत राहून सुरू ठेवलेले कार्य...सातारा जिल्ह्यात स्थापन केलेले प्रति-सरकार)...महात्मा गांधींच्या मनातील ग्रामराज्याचा राबवलेला प्रयोग...भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेच्या मागे लागलेल्या काँग्रेसमधील अनेक नेत्यांमुळे सुराज्य स्थापनेच्या संदर्भात पाटील यांचा झालेला भ्रमनिरास...गोरगरीब, शेतकरी व कामगार यांच्यावरील शतकानुशतकाची राजकीय, सामाजिक, आर्थिक व मानसिक गुलामगिरी नष्ट करणे हे क्रांतिसिंह नानांच्या जीवनकार्याचे मूळ सूत्र...त्यामुळे शेतकरी व कामगार पक्षात प्रवेश करून पुढे सुरू ठेवलेले कार्य... पुढे कम्युनिस्ट पक्षात प्रवेश...गावोगावी जाऊन केलेली भाषणे...नाना पाटील यांचे जीवन व कार्याचा सविस्तर परिचय करून देणारा आदर्श ग्रंथ
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#डॉक्टरजयसिंगरावपवार #मेहतापब्लिशिंगहाऊस #महाराष्ट्राचामाळकरीमार्क्सवादी #पत्रीसरकारआणिसमाजवाद #क्रांतिसिंहनानापाटील #चरित्रात्मक #प्रतिसरकारचीतुफानीसेना #सातारचासिंह #प्रतिसरकार #रझाकारविरोधीचळवळ #ग्रामराज्यलोकराज्य #क्रांतिपर्वा #अखेरचेपर्व #संग्रामाचीधगधगतीमशाल #चलेजावआंदोलन #तुफानसेना #बेचाळीसचालढा #मार्क्सवाद #राष्ट्रसेवादल # मराठीसाहित्य #छत्रपतीसंभाजीस्मारकग्रंथ #राजर्षीशाहू #कर्मवीरभाऊरावपाटीलआणिप्रबोधनकारठाकरे #आमच्याइतिहासाचाशोधआणिबोध #शिवचरित्रापासूनआम्हीकायशिकावे? #राजर्षीशाहूछत्रपतींचीभाषणे #राजर्षीशाहूछत्रपती:एक मागोवा #राजर्षीशाहूछत्रपती:पत्रव्यवहारआणिकायदे #राजर्षीशाहूछत्रपतींचेजाहीरनामेवहुकूमनामे #शिवछत्रपती:एकमागोवा #मराठेशाहीचेअंतरंग #छत्रपतीसंभाजी:एकचिकित्सा #मराठ्यांचेस्वातंत्र्ययुद्ध #छत्रपतीसंभाजी:एकचिकित्सा #मराठ्यांचेस्वातंत्र्ययुद्ध #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #VEDHITIHASACHA #DRJAISINGRAOPAWAR #KRANTISINHANANAPATIL #CHARITRQATMAK #PRATISARKARCHITUFANISENA #RASHTRASEWADAL #KARMAVEERBHAURAVPATILAANIPRABODHANKARTHAKARE #AMACHYAITIHASACHASHODHAANIBODH #MARATHESHAHICHEANTARANG #MARATHYANCHESWATANTRAYUDHA
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.