* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9789386342225
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 92
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
P.V.SINDHU IS A NAME WHO MADE HISTORY IN THE FIELD OF INDIAN SPORTS. SINDHU WON SILVER MEDAL FOR BADMINTON AT RIO OLYMPICS . SHE IS THE FIRST INDIAN WOMAN TO WIN SILVER MEDAL IN THE OLYMPIC. EVEN AFTER 2016 RIO OLYMPIC , SINDHU CONTINUOUSLY IS MAKING COUNTRY PROUD BY HER PERFORMANCE AT INTERNATIONAL LEVEL. ‘RUPERI SINDHU’ BOOK BY ATUL KAHATE TALKS ABOUT SINDHU’S PASSION FOR BADMINTON. IT CONTAINS HER JOURNEY FROM CHILDHOOD TO RIO-OLYMPIC & EVEN AFTER THAT. THIS IS AN INSPIRATIONAL GUIDE FOR YOUNGSTERS WHO ARE TRYING TO MAKE THEIR CAREER IN THE SPORTS .
BADMINTON मध्ये RIO ओल्यमपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवण्याचा अभूतपूर्व पराक्रम पी. व्ही . सिंधू या भारतीय खेळाडून करून दाखवला. अत्यंत साध्या परिस्तिथीत वाढलेल्या सिंधून जिद्द,परिश्रम, अथक सराव आणि प्रशिक्षकाचा सल्ला प्रमाण मानून केलेले कष्ट या सगळ्या गोष्टींमुळे सिंधू जागतिक पातळीवर इतक्या यशोशिखरावर जाउन पोहचली. पुढेही ती प्रचंड यश मिळवू शकते , असा आशावाद तिने जागवला आहे. या सिंधूची हि प्रेरणादायी कहाणी.

No Records Found
No Records Found
Keywords
#BADMINTON ASSOCIATION OF INDIA #GOPICHAND ACADEMY #RIO OLYMPICS #P.V. SINDHU #GOPICHAND PULELA #ATUL KAHATE
Customer Reviews
  • Rating Star महेश पाटील

    माझे नाव महेश पाटील असे असून मी मुंबई पोलीस डिपार्टमेंटमध्ये जॉबला आहे. मी ठाणे येथे राहतो. आपण लिहिलेले रुपेरी सिंधू हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. सिंधू आणि गोपिचंद सर यांनी खूप मेहनत, कष्ट घेतले आहेत ते जाणवते. मला त्यांच्या कष्टाची जाणीव आहे कारण मझी लहान मुलगी अपूर्वा महेश पाटील ही इंटरनॅशनल ज्यूडो प्लेअर आहे. आजपर्यंत तिने (गेल्या ९ वर्षांमध्ये) नॅशनलला ६ गोल्ड मेडल आणि ३ सिल्वर मेडल मिळवले आहे. तसेच २५ सप्टेंबर २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या judo commonwealth competition मध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे. गोपीचंद सर आणि सिंधू यांचे हे यश हा प्रवास आपल्या देशाला प्रेरणा देईल असाच आहे. आणि आपला भारत देश स्पोर्ट्समध्ये ही उत्तम यश मिळवेल. याची मला खात्री आहे. आपण एक उत्तम पुस्तक लिहिलेत त्याबद्दल आभारी आहे. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA - 22-09-2017

    रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये दमदार खेळणाऱ्या एका खेळाडूचे नाव आपल्या कायमचे लक्षात राहील. पी. व्ही. सिंधू हे ते नाव. ती आली आणि तिने तिच्या खेळाने सगळ्यांनाच जिंकून घेतले. गेल्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत अभूतपूर्व पराक्रम करून रौप्यपदक मिवणारी सिंधू एका अत्यंत सामान्य घरात वाढली. साध्या परिस्थितीत वाढलेल्या सिंधूची जिद्द, मेहनत, सराव या साऱ्यामुळे आज तिने यशाचे शिखर गाठले आहे. तिच्या याच जिद्दीची, मेहनतीची कहाणी म्हणजे ‘रुपेरी सिंधू’ हे पुस्तक आहे. या पुस्तकात सिंधूचे राहणीमान, तिची जडणघडण, तिचा सराव, प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाल्यानंतरचा तिचा प्रवास असे सगळे वाचायला मिळेल. सिंधूच्या आयुष्याची प्रेरणादायी कहाणी या पुस्तकाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकरणांमधून समोर आली आहे. ...Read more

  • Rating Starप्रबोधन लक्ष्मी हरी स्मृती न्यासाचे मासिक , ऑगस्ट

    २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये साईना नेहवालने कास्यपदक पटकावले आणि त्यानंतरच्या म्हणजेच २०१६ च्या रिओ ऑलिंपिकला पी.व्ही.सिंधू अंतिम सामन्यात प्रवेश करून रौप्य पदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. या अभूतपूर्व यशामुळे भारतात बॅडमिंटनकडे बघण्याचा दृष्टिोनच बदलून गेला. चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे उगीच नाही म्हटलं! अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या सिंधूनं, साईनानं जिद्द, परिश्रम, अथक सराव आणि प्रशिक्षकांचा सल्ला प्रमाण मानून केलेले कष्ट या सगळ्या गोष्टींमुळे दोघी जागतिक पातळीवर इतक्या यशोशिखरावर जाऊन पोहोचल्या आहेत. आपल्या ग्रंथालयात पी.व्ही.सिंधू विषयी माहिती देणारे पुस्तक नव्याने दाखल झाले होते. उत्सुकतेपोटी मी ते लगेच वाचले. अतुल कहाते लिखित हे छोटेखानी पुस्तक एका बैठकीतच वाचून पूर्ण होते. बॅडमिंटन खेळाच्या इतिहासाचा शोध, सिंधूचे बालपण, प्रशिक्षक गोपीचंद यांचे थोडक्यात चरित्र, प्रशिक्षण अकादमी, सिंधूची जडणघडण, रिओसाठी तयारी, रिओनंतरचा पुढचा प्रवास याविषयीची माहिती वाचायला मिळते. पी.व्ही.सिंधू म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते तिची आकर्षक उंची, प्रसन्नचित्त चेहरा आणि बॅडमिंटन कोर्टवरचा आत्मविश्वासपूर्ण वावर! पहाटे चार वाजता उठून आवरून सरावाला आलेली सिंधू दुपारचा सूर्य डोक्यावर आला तरी सरावच करत असते! या पुस्तकातून तिच्या कठोर परिश्रमाची, कसून केलेल्या सरावाची कल्पना येते. कडक डायट, सिनेमा, पार्टीज्, मित्र मैत्रिणींबरोबर सहली कौटुंबिक सणवार गप्पाटप्पांच्या त्यागातूनच ऑलिंपिकच्या यशाची चव सिंधूला चाखता आली हे समजते. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अशा पी.व्ही.सिंधूचे हे पुस्तक एका खेळाडूच्या चॅम्पियन बनण्यापर्यंतचा प्रवास उत्कटपणे उलगडून दाखवते. ग्रंथालयातील सभासदांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL, SAPTARANG 05-03-2017

    रिओ ऑलिंपिक्स स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या पी. व्ही. सिंधू हिची ओळख करून देणारं हे पुस्तक. अतुल कहाते यांनी ते लिहिलं आहे. बॅडिंमटन या खेळाविषयी आणि सिंधूचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्याविषयीही कहाते यांनी माहिती करून दिली आहे. सिंधूची जडणघडण कशी झाल, बॅडमिंटनपटू म्हणून ती कशी घडत गेली, हे त्यांनी नेमकेपणानं लिहिलं आहे. रिओ ऑलिंपिक्ससाठी सिंधूनं कशी तयारी केली, प्रत्यक्ष काय-काय घडामोडी घडत गेल्या, हेही त्यांनी उलगडून दाखवलं आहे. तिच्या आणि गोपीचंद यांच्या काही मुलाखतींचाही पुस्तकात समावेश आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.