* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386342225
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 92
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :ATUL KAHATE COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
P.V.SINDHU IS A NAME WHO MADE HISTORY IN THE FIELD OF INDIAN SPORTS. SINDHU WON SILVER MEDAL FOR BADMINTON AT RIO OLYMPICS . SHE IS THE FIRST INDIAN WOMAN TO WIN SILVER MEDAL IN THE OLYMPIC. EVEN AFTER 2016 RIO OLYMPIC , SINDHU CONTINUOUSLY IS MAKING COUNTRY PROUD BY HER PERFORMANCE AT INTERNATIONAL LEVEL. ‘RUPERI SINDHU’ BOOK BY ATUL KAHATE TALKS ABOUT SINDHU’S PASSION FOR BADMINTON. IT CONTAINS HER JOURNEY FROM CHILDHOOD TO RIO-OLYMPIC & EVEN AFTER THAT. THIS IS AN INSPIRATIONAL GUIDE FOR YOUNGSTERS WHO ARE TRYING TO MAKE THEIR CAREER IN THE SPORTS .
BADMINTON मध्ये RIO ओल्यमपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवण्याचा अभूतपूर्व पराक्रम पी. व्ही . सिंधू या भारतीय खेळाडून करून दाखवला. अत्यंत साध्या परिस्तिथीत वाढलेल्या सिंधून जिद्द,परिश्रम, अथक सराव आणि प्रशिक्षकाचा सल्ला प्रमाण मानून केलेले कष्ट या सगळ्या गोष्टींमुळे सिंधू जागतिक पातळीवर इतक्या यशोशिखरावर जाउन पोहचली. पुढेही ती प्रचंड यश मिळवू शकते , असा आशावाद तिने जागवला आहे. या सिंधूची हि प्रेरणादायी कहाणी.

No Records Found
No Records Found
Keywords
#BADMINTON ASSOCIATION OF INDIA #GOPICHAND ACADEMY #RIO OLYMPICS #P.V. SINDHU #GOPICHAND PULELA #ATUL KAHATE
Customer Reviews
  • Rating Star महेश पाटील

    माझे नाव महेश पाटील असे असून मी मुंबई पोलीस डिपार्टमेंटमध्ये जॉबला आहे. मी ठाणे येथे राहतो. आपण लिहिलेले रुपेरी सिंधू हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. सिंधू आणि गोपिचंद सर यांनी खूप मेहनत, कष्ट घेतले आहेत ते जाणवते. मला त्यांच्या कष्टाची जाणीव आहे कारण मझी लहान मुलगी अपूर्वा महेश पाटील ही इंटरनॅशनल ज्यूडो प्लेअर आहे. आजपर्यंत तिने (गेल्या ९ वर्षांमध्ये) नॅशनलला ६ गोल्ड मेडल आणि ३ सिल्वर मेडल मिळवले आहे. तसेच २५ सप्टेंबर २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या judo commonwealth competition मध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे. गोपीचंद सर आणि सिंधू यांचे हे यश हा प्रवास आपल्या देशाला प्रेरणा देईल असाच आहे. आणि आपला भारत देश स्पोर्ट्समध्ये ही उत्तम यश मिळवेल. याची मला खात्री आहे. आपण एक उत्तम पुस्तक लिहिलेत त्याबद्दल आभारी आहे. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA - 22-09-2017

    रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये दमदार खेळणाऱ्या एका खेळाडूचे नाव आपल्या कायमचे लक्षात राहील. पी. व्ही. सिंधू हे ते नाव. ती आली आणि तिने तिच्या खेळाने सगळ्यांनाच जिंकून घेतले. गेल्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत अभूतपूर्व पराक्रम करून रौप्यपदक मिवणारी सिंधू एका अत्यंत सामान्य घरात वाढली. साध्या परिस्थितीत वाढलेल्या सिंधूची जिद्द, मेहनत, सराव या साऱ्यामुळे आज तिने यशाचे शिखर गाठले आहे. तिच्या याच जिद्दीची, मेहनतीची कहाणी म्हणजे ‘रुपेरी सिंधू’ हे पुस्तक आहे. या पुस्तकात सिंधूचे राहणीमान, तिची जडणघडण, तिचा सराव, प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाल्यानंतरचा तिचा प्रवास असे सगळे वाचायला मिळेल. सिंधूच्या आयुष्याची प्रेरणादायी कहाणी या पुस्तकाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकरणांमधून समोर आली आहे. ...Read more

  • Rating Starप्रबोधन लक्ष्मी हरी स्मृती न्यासाचे मासिक , ऑगस्ट

    २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये साईना नेहवालने कास्यपदक पटकावले आणि त्यानंतरच्या म्हणजेच २०१६ च्या रिओ ऑलिंपिकला पी.व्ही.सिंधू अंतिम सामन्यात प्रवेश करून रौप्य पदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. या अभूतपूर्व यशामुळे भारतात बॅडमिंटनकडे बघण्याचा दृष्टिोनच बदलून गेला. चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे उगीच नाही म्हटलं! अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या सिंधूनं, साईनानं जिद्द, परिश्रम, अथक सराव आणि प्रशिक्षकांचा सल्ला प्रमाण मानून केलेले कष्ट या सगळ्या गोष्टींमुळे दोघी जागतिक पातळीवर इतक्या यशोशिखरावर जाऊन पोहोचल्या आहेत. आपल्या ग्रंथालयात पी.व्ही.सिंधू विषयी माहिती देणारे पुस्तक नव्याने दाखल झाले होते. उत्सुकतेपोटी मी ते लगेच वाचले. अतुल कहाते लिखित हे छोटेखानी पुस्तक एका बैठकीतच वाचून पूर्ण होते. बॅडमिंटन खेळाच्या इतिहासाचा शोध, सिंधूचे बालपण, प्रशिक्षक गोपीचंद यांचे थोडक्यात चरित्र, प्रशिक्षण अकादमी, सिंधूची जडणघडण, रिओसाठी तयारी, रिओनंतरचा पुढचा प्रवास याविषयीची माहिती वाचायला मिळते. पी.व्ही.सिंधू म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते तिची आकर्षक उंची, प्रसन्नचित्त चेहरा आणि बॅडमिंटन कोर्टवरचा आत्मविश्वासपूर्ण वावर! पहाटे चार वाजता उठून आवरून सरावाला आलेली सिंधू दुपारचा सूर्य डोक्यावर आला तरी सरावच करत असते! या पुस्तकातून तिच्या कठोर परिश्रमाची, कसून केलेल्या सरावाची कल्पना येते. कडक डायट, सिनेमा, पार्टीज्, मित्र मैत्रिणींबरोबर सहली कौटुंबिक सणवार गप्पाटप्पांच्या त्यागातूनच ऑलिंपिकच्या यशाची चव सिंधूला चाखता आली हे समजते. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अशा पी.व्ही.सिंधूचे हे पुस्तक एका खेळाडूच्या चॅम्पियन बनण्यापर्यंतचा प्रवास उत्कटपणे उलगडून दाखवते. ग्रंथालयातील सभासदांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL, SAPTARANG 05-03-2017

    रिओ ऑलिंपिक्स स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या पी. व्ही. सिंधू हिची ओळख करून देणारं हे पुस्तक. अतुल कहाते यांनी ते लिहिलं आहे. बॅडिंमटन या खेळाविषयी आणि सिंधूचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्याविषयीही कहाते यांनी माहिती करून दिली आहे. सिंधूची जडणघडण कशी झाल, बॅडमिंटनपटू म्हणून ती कशी घडत गेली, हे त्यांनी नेमकेपणानं लिहिलं आहे. रिओ ऑलिंपिक्ससाठी सिंधूनं कशी तयारी केली, प्रत्यक्ष काय-काय घडामोडी घडत गेल्या, हेही त्यांनी उलगडून दाखवलं आहे. तिच्या आणि गोपीचंद यांच्या काही मुलाखतींचाही पुस्तकात समावेश आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more