* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE SOUL PART 5
  • Availability : Available
  • Translators : USHA MAHAJAN
  • ISBN : 9788184981988
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
“NOT ANOTHER HELPING OF CHICKEN SOUP FOR THE SOUL... JUST WHEN I THOUGHT IT WAS SAFE TO RETURN TO AN UNCARING AND INSULAR EXISTENCE, ANOTHER SHOT OF STORIES ARRIVES REMINDING US THAT THE KEY TO OUR HUMANITY LIES WITHIN OUR SELVES.”LLOYD WEINTRAUB. TELEVISION PRODUCER, AMERICA’S FUNNIEST HOME VIDEOS JACK CANFIELD AND MARK VICTOR HANSEN, WORLDRENOWNED AND UNIVERSALLY LOVED MOTIVATIONAL SPEAKERS, OFFER YOU THEIR LATEST BANQUET OF TIMELESS TALES AND INSPIRING WISDOM. WHETHER YOU ARE A LONGTIME FAN OF THE SERIES OR A FIRSTTIME SAMPLER, YOU WILL TREASURE CHICKEN SOUP FOR THE SOUL’S LATEST TRIBUTE TO LIFE AND HUMANITY. WITH TOPICS RANGING THE EMOTIONAL AND EXPERIENTIAL GAMUT, THESE HEARTWARMING STORIES INVITE YOU TO ENJOY CHICKEN SOUP IN WHATEVER WAY YOU FIND MOST COMFORTING AND APPEALING... BY THE SPOONFUL, THE BOWLFUL OR THE WHOLE SOUP POT IN ONE SITTING. THE AUTHORS OF THESE STORIES SHARE WITH YOU SOME OF THEIR MOST MEANINGFUL LIFE EXPERIENCES. THEIR NARRATIVE GIFTS WILL HELP YOU TO FIND DEEPER MEANING IN YOUR OWN EXPERIENCES AND TO MOVE FORWARD INTO A RICHER, MORE FULFILLING LIFE. REMEMBER, IN YOUR LIFE AND THE LIVES OF THOSE YOU LOVE, THERE IS ALWAYS ROOM FOR MORE WISDOM, MORE INSPIRATION, MORE SHARED STORIES AND, OF COURSE, MORE CHICKEN SOUP. JACK CANFIELD AND MARK VICTOR HANSEN, # 1 NEW YORK TIMES BESTSELLING COAUTHORS, ARE PROFESSIONAL SPEAKERS WHO HAVE DEDICATED THEIR LIVES TO ENHANCING THE PERSONAL AND PROFESSIONAL DEVELOPMENT OF OTHERS. THEY ARE THE COAUTHORS OF EIGHT NEW YORK TIMES BESTSELLERS, INCLUDING CHICKEN SOUP FOR THE SOUL, CHICKEN SOUP FOR THEWOMEN’S SOUL, CHICKEN SOUP FOR THE MOTHER’S SOUL AND CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOUL.
मनाला अतिशय भावणाया हृदयस्पर्शी, स्फूर्तिदायक अशा पुढील कथांचा तुम्हाला आनंद प्राप्त करून देण्यासाठी सादर आहे तुमच्या आवडत्या ‘चिकन सूप फॉर द सोल’ या पुस्तकाचा पाचवा भाग! मानवी आयुष्याला व माणुसकीला मानाचा मुजरा करणाया या कथारूपी पुष्पगुच्छाचा सुगंध प्रत्येकाच्या मनात दरवळेल व असाच अनेकांच्या मनात दरवळत जाऊन साया पृथ्वीतलावर सुगंधित वातावरण निर्माण होईल, शांती प्रस्थापित होईल अशी खात्री आहे. हे ‘चिकन सूप’ चव घेत घेत चमचाचमचा पिऊ शकता. हवं तर वाडगाभर सूप प्राशन करू शकता आणि वाटलंच तर सूपचं भरलेलं पूर्ण पातेलंच एका बैठकीत संपवू शकता! या भागातील सामान्य लोकांच्या जीवनातले असामान्य अनुभव वाचताना एखाद्या वेळी तुम्हाला आलेल्या अनुभवाची आठवण जागी होईल आणि मग त्या कथेचा खरा गर्भितार्थ तुमच्या मनाला अधिक चांगल्या प्रकारे स्पर्श करून जाईल. एक लक्षात ठेवा – तुमच्या व तुमच्या जिवलगांच्या आयुष्यात प्रेमासाठी, स्फूर्तीसाठी भरपूर जागा आहे. तेव्हा ह्या पाचव्या भागातील कथांचा ठेवा मनात जरूर जपून ठेवा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #CHICKENSOUP #USHAMAHAJAN #JACK CANFIELD #MARKVICTORHANSEN #PRADNYAOAK
Customer Reviews
  • Rating StarCHATURANG 10-1-2009

    ‘चिकन सूप फॉर द सोल’ या जगप्रसिद्ध ‘बेस्ट सेलर’ पुस्तक मालिकेतील चौथ्या, पाचव्या व सहाव्या भागातील काही कथांचा उषा महाजन यांनी केलेला स्वैरानुवाद पेश करणारे हे सदर. या तिन्ही भागांच्या अनुवादांचे हक्क ‘मेहता प्रकाशन’ला मिळाले आहेत. यापूर्वी ‘मेहता प्काशन’ने पहिल्या व तिसऱ्या भागाचा अनुवाद पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला आहे. ‘‘माणसाच्या आयुष्यात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात. पहिली म्हणजे दयाळू असणे, दुसरी म्हणजेही दयाळू असणे व तिसरी म्हणजेदेखील दयाळू असणेच!’’ - हेन्री जेम्स एका सकाळी जॉन इव्हॅन्स हा असाच अचानक माझ्या आयुष्यात आला. कोणीतरी दिलेल्या जुन्यापुराण्या अतिशय ढगळ कपड्यातला व शिवणी उसवलेल्या, झिजलेल्या बुटातील ती स्वारी म्हणजे एक गबाळ छोटासा मुलगा. नॉर्थ कॅरोलिना राज्यातील आमच्या लहानशा गावात सफरचंद तोडण्याच्या मोसमात जे भटके कामगार नुकतेच येऊन पोहोचले होते त्यातल्या एकाचा हा मुलगा. ते कामगार तुटपुंज्या वेतनावर आपल्या कुटुंबाची कशीबशी गुजराण करत असत. त्या दिवशी सकाळी आमच्या दुसरीच्या वर्गाच्या दारात उभा असलेला जॉन इव्हॅन्स म्हणजे एक मूर्तिमंत केविलवाणं दृश्यच होतं. एका पायावरून दुसऱ्या पायावर भार देत तो उभा होता व आमच्या वर्गशिक्षिका पार्मिली रजिस्टरमध्ये त्याचं नाव लिहून घेत होत्या. त्या गबाळ्या ध्यानाला पाहून वर्गाच्या प्रत्येक रांगेतून खालच्या आवाजात कुरबूर व नाराजीचा सूर उमटत होता. ‘‘कोण आहे तो?’’ माझ्या मागच्या बाकावरचा मुलगा पुटपुटला. ‘‘ए, कोणीतरी खिडकी जरा उघडा बरं,’’ एक मुलगी खुदुखुदू हसत म्हणाली. पार्मिली बार्इंनी चष्म्यातून वर्गाकडे करडी नजर टाकली. एकदम कुजबूज थांबली व त्या परत आपल्या कामात गुंग झाल्या. ‘‘मुलांनो, हा जॉन इव्हॅन्स बरं का,’’ बार्इंनी उत्साहाच्या आविर्भावात सगळ्यांना सांगितलं. जॉनने चौफेर नजर टाकली व केविलवाणं हसला, कोणीतरी हचून आपल्याला प्रतिसाद देईल या अपेक्षेने. पण कोणीच काही प्रतिक्रिया दिली नाही. तो बिचारा हसतच राहिला. माझ्या बाकावरची शेजारची रिकामी जागा बार्इंना दिसू नये अशी मनात प्रार्थना करत मी श्वास रोखून धरला होता; आणि नेमकी त्यांना तीच जागा दिसली आणि त्यांनी जॉनला माझ्या शेजारी बसायला सांगितलं. बसताना त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला, पण मी मात्र जाणूनबुजून त्याची नजर टाळली. पहिला आठवडा संपता संपता जॉनने वर्गातलं त्याचं सर्वात खालचं स्थान पक्कं केलं. ‘‘ह्यात त्याचाच दोष आहे.’’ एकदा रात्रीच्या जेवणाच्या वेळी मी आईला सांगितलं. ‘‘साधे आकडेदेखील त्याला अजून नीट मोजता येत नाहीत.’’ रोज रात्रीच्या माझ्या जॉनपुराणामुळे आईला मात्र एव्हाना जॉनची बरीच माहिती झाली होती. माझं सगळं बोलणं ती शांतपणे ऐकून घेत असे; पण ‘असं,’ ‘हो का?’ ‘बरं बरं,’ या पलीकडे ती जास्त काही प्रतिक्रिया देत नसे. ‘‘मी बसू तुझ्याजवळ?’’ मधल्या सुट्टीत जेवणाचा ट्रे हातात घेऊन, माझ्या पुढ्यात उभं राहून जॉन हसत हसत विचारत होता. ‘‘बरं ठीक आहे. बस बस,’’ मी कसंबसं म्हणालो. त्याला जेवताना, इकडेतिकडे हिंडताना बघून मी विचार केला की जॉनच्या वाट्याला आलेली एवढी हेटाळणी खरं तर अयोग्यच होती. तो माझ्या जवळपास असला की उलट मला छान वाटायचं व तोही आता जास्त आनंदी दिसू लागला होता. जेवणानंतर खेळाच्या मैदानावर जाऊन सगळ्यांबरोबर आम्ही खूप हुंदडलो. मधली सुट्टी संपल्यावर पार्मिली बार्इंच्या मागे रांगेत उभं असताना मी मनाशी पक्कं केलं की यापुढे जॉन एकाकी राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. ‘‘सगळी मुलं जॉनशी फार दुष्टपणे वागतात, असं तुला वाटतं का गं?’’ एकदा रात्री आई मला पांघरूण घालत असताना मी तिला हा प्रश्न केला. ‘‘मला काही कळत नाहीये. कदाचित असंच वागण्याची सवय असेल.’’ ती खेदाने म्हणाली. ‘‘आई, उद्या जॉनचा वाढदिवस आहे आणि त्याला केक, भेटवस्तू काहीच मिळणार नाही गं. कोणालाच त्याची पर्वाच नाहीये.’’ शाळेतील प्रत्येक मुलाच्या वाढदिवसाला त्याची आई संपूर्ण वर्गासाठी छोटे केक्स व पार्टीसाठी छान छान वस्तू घेऊन शाळेत येई. माझ्या व बहिणीच्या वाढदिवसालाही माझी आई शाळेत येत असे. जॉनची आई तर सफरचंदाच्या बागेत दिवसभर काम करत असे. त्यामुळे त्याचा ‘खास’ दिवस सामान्य दिवसाप्रमाणेच जाणार, असाच विचार मी केला. ‘‘तू काळजी करू नकोस. मला खात्री आहे की सगळं कसं छान, नीटपणे पार पडेल बघ.’’ आईने माझी पापी घेत मला ‘शुभरात्री’ म्हणाली आणि निघून गेली. आईला वाटलेली खात्री नक्कीच खोटी ठरणार, असं मला आयुष्यात पहिल्यांदाच वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी न्याहारीच्या वेळी मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी शाळेत जायचं नाही, असं ठरवलं. ‘‘तुझ्या या निर्णयाचा व जॉनच्या वाढदिवसाचा काही अर्थाअर्थी संबंध आहे का?’’ आईने विचारलं. शरमेने लाल झालेले माझे गालच उत्तर देऊन गेले. ‘‘समजा तुझा एखादा जवळचा मित्र तुझ्या वाढदिवसाला गैरहजर राहिला, तर तुला कसं वाटेल?’’ तिने मला विचारलं. मी क्षणभर विचार करून पटकन तिची पापी घेऊन, टाटा करून शाळेत पळालो. गेल्या गेल्या मी जॉनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या वाढदिवसाची मी आवर्जून आठवण ठेवली, याचा आनंद त्याच्या ओशाळवाण्या हास्यातून जाणवत होता. म्हणजे मला वाटलं होतं तेवढा काही त्याचा दिवस खराब जाणार नव्हता कदाचित! दुपारपर्यंत तर माझा पक्का समज झाला की वाढदिवस म्हणजे काही फार महत्त्वाचा दिवस नसतोच. पार्मिली बाई फळ्यावर एक गणित मांडत होत्या. तेवढ्यात बाहेरच्या हॉलमधून मला ओळखीचा आवाज आला. माझ्या खूप ओळखीच्या त्या आवाजात वाढदिवसाचं शुभेच्छागीत ऐकू येत होतं. काही सेकंदांतच दारातून माझी आई येताना दिसली. तिच्या हातात एक ट्रे होता. त्यात छोटे केक्स व मेणबत्त्या दिसत होत्या. छानशा रंगीत कागदात एक प्रेझेंट दिसत होतं. पार्मिली बाईदेखील चिरक्या आवाजात आईबरोबर गाऊ लागल्या. पूर्ण वर्गाने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. रात्री गाडीच्या प्रखर दिव्यांसमोर भेदरून उभ्या असलेल्या हरणासारखा जॉन आईकडे बघत होता. तिने छोटे केक्स व प्रेझेंट बाकावरती त्याच्यासमोर ठेवलं व म्हणाली, ‘‘वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.’’ माझ्या त्या मित्राने ट्रे हातात घेऊन, शांतपणे प्रत्येक बाकापाशी जाऊन मोठ्या अदबीने ते छोटे केक्स सर्वांना वाटले. आई माझ्याकडेच बघत होती, हे माझ्या लक्षात आलं. मी केकचा तुकडा तोडत असताना तिने माझ्याकडे बघून डोळे मिचकावले. आता भूतकाळात शिरल्यावर जाणवलं की, त्या दिवशी वर्गातल्या ज्या मुलांनी आपला वाढदिवस साजरा केला होता, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांची नावंही नीट आठवत नाहीयेत. काही दिवसांनंतर जॉन इव्हॅन्स आमच्या गावातून निघून गेला. त्यानंतर आजतागायत मला त्याची काहीच खबरबात नाही. पण जेव्हा जेव्हा मी ते वाढदिवसाचं गीत ऐकतो, तेव्हा प्रत्येक वेळी मला तोच दिवस आठवतो... माझ्या आईचं ते सरप्राइझ... आणि माझ्या मित्राच्या डोळ्यातली चमक. - मूळ कथा - रॉबर्ट टेट मिलर A Birthday Song ...Read more

  • Rating StarCHATURANG 7-2-2009

    ‘मुलाला तुमच्या प्रेमाची सर्वात जास्त गरज केव्हा असते? जेव्हा खरंच त्याची/तिची ते प्रेम मिळण्याची योग्यता नसते.’ - अनामिक मला एकूण तीन मुलं. मुलगा एकच सर्वात मोठा- पॉल, ज्याचं नाव त्याच्या वडिलांवरून ठेवलंय. थेरेसा हे आमचं शेंडेफळ. वडिलांसारखे घारेडोळे आणि कुरळे केस असलेली. एलिन ही दोघांच्या मधली. तिचं नाव माझ्यावरून व माझ्या आईवरून (तिचं नाव एलिन अ‍ॅन होतं!) ठेवलंय. माझा जन्म झाल्यानंतर माझ्या आईनं माझं नाव ठेवलं- अ‍ॅन एलिन. मला मुलगी झाल्यावर मीही आईसारखंच करून मुलीचं नाव ठेवलं- एलिन अ‍ॅन. जेमतेम पाच महिन्यांची होत नाही तोवर एलिनमध्ये स्वतंत्रपणे जगण्याचा बाणा दिसू लागला होता. दुसऱ्या कोणी तिच्या तोंडात दुधाची बाटली धरलेली तिला चालत नसे. सगळं स्वत:च्या मर्जीने करण्याचा तिचा हट्ट असे. तीन मुलं घरात आजूबाजूला बागडत असताना त्या काळात खूप मजा येत असे. तिघंही कामात मदत करत. त्यांची थट्टामस्करी, मस्ती चाले. घराघरात जसं घडतं तसंच आमच्याही घरात कधीकधी चर्चा, वादविवादाला तोंड फुटत असे. काही बाबतीत त्यांच्या वर्तणुकीमध्ये सुधारणा झाली पाहिजे असं मला व त्यांच्या वडिलांना वाटत असे, तेव्हा आम्हीच विषयाला हात घालत असू. कधी मुकाट्याने ऐकून घेणं व होकार देणं, तर कधी शाब्दिक विरोध दर्शविणं- अशा पॉल व थेरेसाच्या प्रतिक्रिया होत असत. पण शेवटी सगळं स्पष्टीकरण होऊन, एकमेकांचं ऐकून घेऊन वातावरण शांत होत असे. पण एलिनबरोबर मोकळ्या मनाने चर्चा करण्याची कधीच वेळ येत नसे. आम्ही काही मत दर्शवू शकतो या विचारालाच तिचा विरोध असे. मग थाडथाड पाय आपटत जिना चढून ती तिच्या खोलीत जाऊन धाडकन दार बंद करून घेत असे. खोलीमध्ये जोरजोरात गाणी लावून बसत असे. व तारस्वरात ओरडून सांगत असे की तिला कोणत्याही मुद्यावर चर्चा करण्याची इच्छा नाही. सुरुवातीच्या काळात मी अनेकदा तिला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे तिची चिडचिड व राग अजूनच वाढत असे. एके दिवशी मात्र, एलिनने आमची वाजू ऐकून घेतलीच पाहिजे, अशी निकड निर्माण झाल्यावर मी तिला एक पत्रच लिहिलं. त्या पत्रात माझी व तिच्या वडिलांची बाजू स्पष्ट केली. आम्हाला कोणत्या गोष्टीत तिनं थोडं बदलावं असं वाटत होतं, ते मोकळेपणाने मांडलं. सकाळी ती शाळेत जाईपर्यंत मी थांबून राहिले व नंतर तिच्या खोलीत जाऊन पलंगावर ते पत्र ठेवून आले. तिने कधीच त्या पत्राचा उल्लेखही केला नाही. तिने ते वाचल्याचंही मला कळू दिलं नाही. पण तिच्या वागण्यात थोडीफार सुधारणा मात्र दिसून आली. त्यानंतर काही वर्षांसाठी अशाच प्रकारे ती शाळेत, नोकरीवर, मित्राला भेटायला गेली असताना मी तिला पत्र लिहायची आणि ती पत्रं तिच्या पलंगावर जात राहिली. मला वाटतं, वर्षातून दोन-तीन वेळा तरी मी तिला पत्र लिहिलं. तब्बल १४ वर्षे हा सिलसिला चालू होता. तिने पत्र वाचल्याचं ना मला कधी सांगितलं, ना की त्यातल्या मुद्यावर माझ्याशी काही चर्चा केली. पण तिच्या वागण्यात, स्वभावात सकारात्मक बदल मात्र घडून येत होते. कधी खोलीत जाऊन वरून ओरडून ती सांगत असे, ‘आता ही अशी पत्र लिहीत नको जाऊस मला.’ मी मात्र अर्थातच निग्रहाने लिहीतच राहिले. एलिनच्या वडिलांचे १९९० साली निधन झाले. त्यानंतर तीन वर्षांनी तिचं लग्न ठरलं. वर्चस्व गाजवणारी माता न राहण्याचा मी निश्चय केला. सगळं कसं सुरळीत चालू होतं. पण लग्नाला एकच महिना उरलेला असताना आमच्या दोघींमध्ये जबरदस्त वादावादी, मतभेद झाले. तिने रागानेच मला सुनावलं, ‘‘मी आता २४ वर्षांची झाली आहे. मतिमंद मुलांची एक खास शिक्षिका म्हणून काम करतेय. व लवकरच माझं लग्न होणार आहे. आता त्यामुळे मला पत्र लिहू नये.’’ असं तिने मला स्पष्ट शब्दांत बजावलं, परंतु तरीही मी लिहिलंच पत्र. लग्नाच्या आधी तीन दिवस एलिन तिच्या नव्या घरी जाण्यासाठी सामानाची आवराआवर करत होती. तिच्या कपाटात एक डबा होता. तो फेकून न देता तसाच ठेवून द्यावा, असं तिने मला सांगितलं- ‘आतापर्यंत तू मला जी पत्र लिहिली होतीस, ती सगळी पत्रं या डब्यात मी ठेवलेली आहेत. अधूनमधून मी परत परत ती वाचत असते आणि पुढेमागे कधीतरी माझ्या मुलीला मी ती पत्रं वाचून दाखवेन. थँक यू आई. याबद्दल मी तुझे मनापासून आभार मानते.’ ‘थँक यू एलिन.’ एवढंच मी म्हणू शकले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more