* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SO OFTEN, IT`S THE SIMPLEST ACTS OF COURAGE THAT TOUCH THE LIVES OF OTHERS. SUDHA MURTY-THROUGH THE EXCEPTIONAL WORK OF THE INFOSYS FOUNDATION AS WELL AS THROUGH HER OWN YOUTH, FAMILY LIFE AND TRAVELS-ENCOUNTERS MANY SUCH STORIES... AND SHE TELLS THEM HERE IN HER CHARACTERISTICALLY CLEAR-EYED, WARM-HEARTED WAY. SHE TALKS CANDIDLY ABOUT THE MEANINGFUL IMPACT OF HER WORK IN THE DEVADASI COMMUNITY, HER TRIALS AND TRIBULATIONS AS THE ONLY FEMALE STUDENT IN HER ENGINEERING COLLEGE AND THE UNEXPECTED AND INSPIRING CONSEQUENCES OF HER FATHER`S KINDNESS. FROM THE QUIET JOY OF DISCOVERING THE REACH OF INDIAN CINEMA AND THE ORIGINS OF INDIAN VEGETABLES TO THE SHALLOWNESS OF JUDGING OTHERS BASED ON APPEARANCES, THESE ARE EVERYDAY STRUGGLES AND VICTORIES, LARGE AND SMALL. UNMASKING BOTH THE BEAUTY AND UGLINESS OF HUMAN NATURE, EACH OF THE REAL-LIFE STORIES IN THIS COLLECTION IS REFLECTIVE OF A LIFE LIVED WITH GRACE.
लेखिकेस ज्या ज्या व्यक्तींनी त्यांच्या आयुष्याचे निरनिराळे पदर उलगडून दाखवले, आणि त्यांचा अनुभवाचा घडा ज्ञानानं भरला, त्या अनुभवांचे कथन त्यांनी या पुस्तकातून केले आहे. जसे की, ‘तीन हजार टाके’ या लेखातून त्यांनी देवदासींच्या आयुष्यातील समस्या व त्यांचे निराकरण करण्याचे ठरविल्यावर त्यांना काय अनुभव आले, त्याविषयी लिहिले आहे. सुरवातीला त्या देवदासींना मदत करण्यासाठी गेल्या असता, देवदासींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. कारण सामाजिक कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्यांना सुसंवाद साधण्यासाठी लागणारी कौशल्यं आत्मसात करावी लागणार होती. आपला पेहराव, संभाषणची भाषा गरजू लोकांसारखी बदलायला हवी होती. पण या सर्वांहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण करत असलेल्या कामावर मनापासून प्रेम करावं लागणार होतं याची जाणीव त्यांच्या वडिलांनी त्यांना करून दिली. त्याप्रमाणे त्यांनी स्वतःत बदल घडवले. त्यानंतर त्यांनी देवदासींची संघटना बांधून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची सोय व वगैरे मार्ग काढले. याबद्दल त्यांचा गौरव करताना त्या देवदासी भगिनींनी आपल्या प्रेमाची ऊब देणारे टाके प्रत्येकीने विणून अशा तीन हजार टाक्यांचे भरतकाम केलेल्या गोधडीची भेट दिली. ‘मुलांवर मात’या लेखातून लेखिकेने त्यांच्या काळातील शैक्षणिक परिस्थितीत मुली इंजिनिअरिंगच्या शिक्षणापासून कशा दूर होत्या, त्यामुळे त्या कॉलेजमध्ये त्या एकट्याच असल्याने, मुले प्रथम कशी त्यांच्या खोड्या काढायची याविषयी लिहिले आहे. पण नंतर इंजिनिअरिंग हे पुरुषांचं क्षेत्र आहे, हे साफ खोटं असल्याचं सिद्ध करून दाखवलं. लेखिकेनं सगळा अभ्यास व्यवस्थित समजून केला, व त्यांच्याबरोबर शिकणाऱ्या मुलांपेक्षा अधिक गुण मिळवून त्यांच्यावर कशी मात केली, त्याविषयी वर्णन केले आहे. लेखिका एकदा सहजच मैत्रिणीच्या घरी गेली असता, फक्त मूळ भारतीय असलेल्या अन्नपदार्थांपासूनच श्राद्धाचा स्वयंपाक केला जातो, असं त्यांना कळलं. आपण ज्या गोष्टींना ‘भारतीय’ म्हणतो, त्यांपैकी अनेक गोष्टी भारतीय नाहीत. मिरची, ढबू मिरची, मका, शेंगदाणे, काजू, विविध प्रकारच्या शेंगा, बटाटा, पपई, अननस, सीताफळ, पेरू, चिकू या सर्व भाज्या आणि फळं दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आल्याचं त्यांच्या मैत्रिणीच्या वनस्पतिशास्त्रज्ञ वडिलांनी त्यांना सांगितलं. त्याबद्दलच्या विस्मयकारक पौराणिक व वैज्ञानिक गोष्टीही त्यांनी लेखिकेस सांगितल्या. अशा तऱ्हेने जेवायला गेल्या असता वैचारिक खाद्यही त्यांना लाभले. ‘तीन ओंजळी पाणी’ या लेखात लहानपणी आजीबरोबर लेखिका गंगापूजनाला गेली असता, त्याविषयीची माहिती- ते का करतात, कसं करतात हे कळतं. काही वर्षांनी प्रत्यक्ष काशी-बनारसला गेल्यावर त्याविषयीचा तिचा अनुभव काय, याविषयी लेखिकेने या लेखात लिहिले आहे. ‘घरासारखं दुसरं काही नाही’ या लेखात लेखिकेला मध्यपूर्वेत महिला संघटनांच्या आमंत्रणावरून गेल्या असता, स्वतःजवळचे सर्व पैसे घालवून, अधिक पैसे मिळतात, या आशेने गेलेल्या महिलांवर तेथे गेल्यावर काय परिस्थिती ओढवते, व परत मायदेशी येणे किती मुश्किल होते, याविषयी लेखिका सजग करते. ‘खरा राजदूत’ या लेखात परदेशी गेल्यावर आपली हिंदी सिनेसृष्टी इतर देशांमध्ये आपल्या देशाविषयी, संस्कृतीविषयी कशी उत्सुकता निर्माण करते, तेथील लोकांशी जोडले जाण्याचा अनुभव देते, याची झलक दिसल्यावर चकित होते, त्याविषयी लिहिते. ‘रसीला आणि पोहोण्याचा तलाव’ या लेखात कर्नाटकातील हरिकथेत सांगितल्या जाणाऱ्या कृष्णाच्या आणि गोपिकांच्या रासलीलांच्या गोष्टी आपल्या परदेशातल्या नातींना लेखिका सांगते. याच गोष्टी परदेशी वातावरणाशी जुळवून त्यांच्या नाती त्यांना कशा मार्मिक रीतीने सांगतात, हे वाचणे खूपच रंजक आहे. ‘इन्फोसिस फाउंडेशनमधील एक दिवस’ या लेखात लेखिकेची मैत्रीण ‘तिला लेखिका निवांत भेटत नाही’ अशी तक्रार करते, तेव्हा त्या मैत्रिणीलाच आपल्या कामाच्या ठिकाणी बोलवते, व तिचा दिनक्रम कसा व्यस्त आहे, याचा अनुभव दिवसभर देते. ‘मला जमणार नाही; आपल्याला जमेल’ या लेखातून लेखिकेचा अचानकच व्यसनाधीनांच्या व्यसनांपासून सुटकेसाठी काम करणाऱ्या ‘अल्कोहोलिक अॅपनॉनिमस’ या संस्थेच्या संपर्कात आली. त्यांचे काम कसे चालते, याविषयीच्या मीटिंगला उपस्थित राहण्याची संधीही लेखिकेस मिळाली. त्याविषयीची समस्या सोडवण्यासाठी वाचकास जागृत करणारा, अंगावर शहारा आणणारा अनुभव लेखिकेने आपल्यासमोर ठेवला आहे. एकूणच समाजातील समस्या, माहिती, ज्ञान, चालीरीती अशा सगळ्या कंगोऱ्यांना स्पर्श करणारे रंजक पण विचार करायला भाग पाडणारे विषय लेखिकेने समर्थपणे हाताळले आहेत.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarNiren Apte

    3000 टाक्यांची जन्मकथा -निरेन आपटे. सौ. सुद्धा मूर्ती आणि नारायण मूर्ती ह्यांनी इन्फोसिसद्वारे संपूर्ण जगभर आपले कार्य पोहोचवले आहे. नारायण मूर्तींच्या इन्फोसिस कंपनीने जगभर व्यवसाय नेला तर सौ. सुद्धा मूर्ती ह्यांनी त्यातून मिळणाऱ्या नफ्यामधून ामाजिक कामे केली. अनेकांना आर्थिक मदत केली, शाळांमधून संगणक वाटले, ग्रंथालय उभे केले. कपडे-आवश्यक वस्तूंचे वाटप केले. नैसर्गिक आपत्तीनंतर मदत कार्य केले. सुद्धा मूर्ती ह्या लेखिकाही आहेत. wise and otherwise , dollar bahu , magic of lost temple , महाश्वेता अशी त्यांची अनेक पुस्तके लोकप्रिय झाली. त्या पुस्तकांचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले. त्यांचे आणखी एक पुस्तक खूप लोकप्रिय झाले आणि त्याचे नाव आहे -3000 स्टिचेस. मराठीमध्ये हे पुस्तक ``3000 टाके`` नावाने उपलब्ध असून त्याचा अनुवाद लीना सोहोनी ह्यांनी केला आहे. देवदासी आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर आधारित हे पुस्तक आहे. ह्या महिलांनी सुधाजींना 3000 टाके असलेली एक गोधडी भेट दिली. सुधाजींनी ह्या महिलांसाठी जे काम केले त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही गोधडी दिली आहे. हे पुस्तक वाचनीय आहे आणि त्या पुस्तकाची जन्मकथाही खूप काही सांगणारी आहे. सुद्धा मूर्ती इंजिनिअर झाल्या. पण त्यांचा ओढा सामाजिक कामांकडे जास्त होता. देवदासी प्रथा बंद व्हावी असे त्यांना मनापासून वाटे. म्हणून त्या एकदा देवदासी महिलांच्या वस्तीत गेल्या. त्या महिलांशी संवाद साधायचा होता. त्यावेळी सुधाजी आधुनिक कपड्यात होत्या. देवदासींच्या वस्तीत गेल्यावर तिथल्या महिलांना त्या आपल्यातल्या वाटल्या नाही. सुधाजींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्या महिलांनी चप्पल फेकून त्यांना हाकलून दिले. सुधाजींना वाईट वाटले. पण त्या हरल्या नाहीत. दोन आठवड्याने पुन्हा तिथे गेल्या. त्यावेळी टोमॅटोचा हंगाम होता. त्या बायका टोमॅटो निवडण्याचं काम करत होत्या. सुधाजी पुन्हा आल्या हे पाहून त्यांनी सुधाजींच्या अंगावर टोमॅटो फेकून मारले. पुन्हा मागे फिरावे लागले. सुधाजी हतबल झाल्या. त्यांनी हा किस्सा आपल्या वडिलांना सांगितला. त्यांचे वडील डॉक्टर होते. त्यांनी सुधाला सांगितले, तू आधुनिक वेशभूषेत तिथे गेलीस. त्यामुळे त्या महिलांना तू परकी वाटलीस. जर तू साडी नेसून गेलीस तर त्या तुला आपल्यातली एक समजतील. तुझे बोलणे ऐकतील. सुधाजींना हा सल्ला पटला. त्या साडी नेसून पुन्हा देवदासींच्या वस्तीत गेल्या आणि मोठा फरक झाला. त्या महिला सुधाजींशी बोलू लागल्या. त्या महिलांपैकी काही जण वेश्या व्यवसाय करत होत्या. त्या वस्तीमध्ये काहीच सुविधा नव्हत्या. सुधाजींनी त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप दिली. बँक हा प्रकार त्या महिलांना माहित नव्हता. मग तिथे एक बँक आणली. एड्स आजाराची माहिती दिली. एड्सपासून रक्षण करण्याचे उपाय सांगितले. त्या महिलांचा सुधाजींवर विश्वास बसू लागला. एक नातं तयार झालं. त्यांचे अनेक प्रश्न सुटू लागले. सुधाजी इन्फोसिस फौंडेशन चालवतात ह्या गोष्टी त्या महिलांना माहीतही नव्हत्या. आपली मुले शिक्षण घेत आहेत. परिवर्तन होत आहे हे त्यांना दिसू लागलं. सुधाजींच्या चिकाटीला आणि कष्टाला फळ आलं. त्या महिलांनी एक कार्यक्रम करायचं ठरवलं. ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून सुधाजींनी यावं इतकाच आग्रह करून त्या थांबल्या नाहीत तर सुधाजींना बंगलोरवरून येणं सोपं व्हावं म्हणून वोल्वो एसी बसचं तिकीट पाठवलं. सुधाजी त्या कार्यक्रमाला गेल्या. सुधाजींमुळे 3000 पेक्षा जास्त महिलांचे जीवन बदलले होते. म्हणून त्या महिलांनी सुधाजींना 3000 टाके घातलेली गोधडी भेट दिली. ह्याच घटनेवरून सुधाजींनी 3000 स्टिचेस हे पुस्तक लिहिले आहे. माणुसकीचं एक निराळं उदाहरण ह्या पुस्तकातून दिसून येतं, म्हणून हे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवं. ...Read more

  • Rating StarDrPawan S Chandak

    `तीन हजार टाके` हे सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित पुस्तक नुकतेच वाचले या पुस्तकात `सामान्य व्यक्तींचे पण त असामान्य असे कर्तृत्व` रेखाटले आहे. हे पुस्तक वाचताना विविध व्यक्तिमत्त्वाविषयी सुधा मुर्तींना आलेले अनुभव त्यांचे विचार यातून वाचयला मिळते. देवदासींच्या पुनर्वसनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न व सुरुवातीला जरी प्रतिकूल अनुभव आला तरी त्यास त्यांच्या वडिलांची मिळालेली साथ यामुळे त्या देवदासींच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले काम तसेच या देवदासींना स्वावलंबी बनवून त्यांचे विविध बचत गट किंवा पतसंस्था निर्माण आदी कार्य प्रेरणादायी आहे. `एकटी मुलगी` या कथेतून सुधा मूर्ती यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर त्या कॉलेजमधील त्या एकटी मुलगी होती. तरी देखील कॉलेजमध्ये शिक्षण घेताना आलेले विविध प्रतिकूल अनुभव, मुलांची teasing तरी सुद्धा त्यांनी तितक्याच जिद्द व चिकाटीने या सर्व अनुभवांकडे कोणाकडे सुद्धा तक्रार न करता त्यांचे इंजिनियरिंग चे शिक्षण पूर्ण केले व एक प्रकारे पुरुषी अहंकारावर आपल्या कर्तृत्वाने मात केली. `विचारांसाठी खाद्य` मधून एकदा त्या मैत्रिणीकडे जेवायला गेले असता तेथील यजमानांनी श्राद्ध निमित्त भोजनात देशी भाज्यांचे नैवेद्य केले असता. त्यात त्यांच्या चर्चेतून आपण रोज वापरत असलेल्या विविध भाज्या त्यांचे उगम स्थान यावरून देशी आणि विदेशी भाज्या याविषयी आपल्याला वाचायला खूप मजा येते. `तीन ओंजळी पाणी` या कथेमध्ये कदाचित आपल्या माहीत असेल की वाराणसीमध्ये गंगेत स्नान केल्यावर ओंजळीत पाणी घेऊन आपल्या आवडत्या वस्तूचा त्याग करायचा असतो. मग सुधा मूर्तींनी काय केले असेल बरं ? त्यांनी त्यांच्या सर्वात आवडती वस्तू म्हणजे नवीन साड्या खरेदी करणे या आवडीच्या वस्तूच्या नावे ओंजळीत पाणी घेऊन गंगेत सोडून त्याग केला. `कॅटल क्लास` मधून त्यांना आलेले बिझनेस क्लास vs इकॉनोमिक क्लास आदी विषयी व पेहरावा वरून भेदभावाचा अनुभव व तरीसुद्धा त्यांनी संयम ढळू देता अशा मानसिकतेच्या लोकांना दिलेले उत्तर हे वाचायला खरच मजा आहे `अलिखित आयुष्य` मधून त्यांच्या वडिलांनी डॉक्टर पेशीतून ग्रामीण भागातील दुर्गम भागात केलेली वैद्यकीय सेवा या सेवेतून ज्या पेशंटची त्यांनी प्रसूती केली त्या पैशांची मुलगी पुढे एक नावाजलेली स्त्री रोग तज्ञ होते असा हा प्रवास वाचताना खूप ऊर्जा मिळते. `घरासारखे दुसरे ठिकाण नाही` ही अत्यंत हृदयास हेलावणारी कथा, कारण या कथेमध्ये सुधा मूर्ती जेंव्हा एका शेलटर होम ला भेट देतात तेव्हा त्या ज्या पीडित घरकामगार स्त्रियांना भेटल्यावर त्यांनी सौदी किंवा त्या भागात घरकाम साठी गेलेल्या स्त्रियांना आलेले अत्यंत कटू अनुभव, त्यांच्या वर झालेले अत्याचार, पुढे त्या तिथे अडकून बसल्याने त्यांना परत भारतात आणून त्यांचे पुनर्वसन करणे आदींसाठी इन्फोसिस फाउंडेशन द्वारे सुधा मूर्ती ने केलेली मदत वाचण्यासारखी आहे. इन्फोसिस फाउंडेशन मधील एक दिवस मधून फाउंडेशनची शिष्ट सुधा मूर्ती यांचे उत्कृष्ट प्रशासन एकदा वाचा म्हणजे त्यांच्या कामाविषयी कल्पना येईल. तसेच पुढे `मला जमणार नाही पण आम्हाला जमेल` मधून अल्कोहोल ॲनॉनिमस चे कार्य त्यांनी खूप छान रेखाटले आहे . एकंदरीत मी काही सांगण्यापेक्षा आपण स्वतः पुस्तक वाचून एकदा अनुभव घ्यावा ...Read more

  • Rating StarGayatri Pangarkar, Amravati

    *`पुस्तकप्रेमी`* whatsapp समूह    काही दिवसांपूर्वी KBC च्या `कर्मवीर स्पेशल` एपिसोड मध्ये सुधा मूर्ती जी आल्या होत्या.. तेव्हा अमिताभ त्यांच्या पाया पडून म्हणाले होते ‘हम गर्व से कहते हैं कि, हम उस देश के वासी हैं जिस देश में ‘सुधा मूर्ती’ जी रहत हैं”...काय यथार्थ भावना व्यक्त केल्या एका महापुरुषाने...   आज हे आठवायच निमित्त झालं ते म्हणजे सुधा मूर्ती हस्ते लिखित “तीन हजार टाके” हे वाचनात आलेलं पुस्तकं... या कथा म्हणजे रोजच्या जीवनातील सामान्य व्यक्तींच्या असामान्य जीवन कथा आहे. त्यांना कथा म्हणा, वर्णन म्हणा किंवा अनुभव संकलन आहे म्हणा... ज्याला जे नाव रुचेल ते देऊ शकता.. काय नाहीये या पुस्तकात? या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण आपल्याला एक नवीन गोष्ट शिकवतं, अंतर्मुख करत.  असं हे नितांत सुदंर पुस्तक मी एका बैठकीत वाचून संपवलं... किती तरी गोष्टी शिकले मी यातून.. सगळ्यात जास्त गारुड घातलं ते सुधा ताईंच्या साधेपणाने... त्यां नेसत असलेल्या अगदी साध्या साड्या हीच त्यांची ओळख आहे.. बऱ्याच वेळा आपल्याला वाटत राहतं कि आपले कपडे अगदी out of style आहेत..त्यातून एक न्यूनगंड जन्माला येतो...पण सुधा ताईंना पाहून लक्षात येतं कि class आणि style हे inbuilt असावे लागतात.. घातलेल्या कपड्यांवरून class ठरत नाही ... आजकाल "classy" ची व्याख्या वापरत असलेला महागडा मोबाईल, त्यावर पाहिल्या जाणाऱ्या अगम्य वेब सिरीज, ट्विटर, इंस्टा वर किती फॉलोअर्स ह्या आणि यासारख्या अनेक दिखाऊ गोष्टींवरून ठरवली जाते.. ते किती चुकीचं आहे हेच सुधाताईंकडे पाहून लक्षात येतं.. दुसरी भावलेली गोष्ट म्हणजे सुधा ताईंचा आत्मविश्वास.. आणि तो मिळवायला करावा लागतो अखंड अभ्यास आणि अथक परिश्रम... there is no substitute to hard work...कित्येक वेळा एखाद काम टाळून ते का टाळलं यासाठी आपण स्वतःला excuses देत असतो.. सुधा ताईंना समजून घेतल्यावर आपल्या या सवयीत नक्की बदल व्हायला मदत होईल... आणि लास्ट बट नॉट लिस्ट, खूप खूप महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे “ पालकत्व हि एक जवाबदारी आहे” सुधा ताईंचं असामान्य व्यक्तिमत्व घडविण्यात त्यांच्या पालकांचा मुख्य वाटा आहे.. "संस्कार करावे नाही तर पेरावे लागतात" मुलं आपल्या पालकांच अनुकरण करत, त्यांना निरखत च मोठी होतात.. संस्कारी आणि यशस्वी मुलं त्यांच्या पालकांचं च प्रतिकरूप असतात..  केवळ पालकत्वाची पुस्तक वाचून responsible पालक होता येत नाही... मदत जरूर होते.. पण प्रत्येक पालकत्वाची काही ना काही व्यथा ही असतेच.. ज्याला त्या व्यथेची कथा करता आली तेच जवाबदार पालकत्व म्हणून नावाजलं जातं... पुस्तकाविषयी आणि सुधा ताईंविषयी कितीही लिहिलं तरी कमीच आहे..कारण शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी या समर्थ व्यक्तिमत्वाकडे आहेत... इतिहास, पुराण आणि अंडरवल्ड चा फेरफटका मारल्यावर वास्तवात परतण्यासाठी ‘तीन हजार टाके’ हे पुस्तक वाचा च....👌👌👌👌👌👌👌👌   ...Read more

  • Rating StarVaishali Patil Waghirkar

    सुधा मुर्ती यांच्या या कथासंग्रहातील सर्व कथा सत्य कथा आहेत.मानवी स्वभावाचं सौंदर्य आणि त्यांच घृणास्पद हे दोन्हीही उघड करुन दाखावणा-या या कथांमधुन आयुष्य सन्मानानं कसं जगता येत, हेच प्रतिबिंबित होत.त्यांची खास शैलीत त्यांच निरीक्षण नेमक्या शब्दात माडलेले आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHUJABA
KHUJABA by DR.SANJAY DHOLE Rating Star
लोकसत्ता १६-०४-२०२३

आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी माणसाने नेहमी विज्ञानाची मदत घेतलेली आहे. त्यामुळे माणूस सतत विज्ञानात संशोधन करत असतो. आज भौतिक, रसायन, वनस्पती, अंतराळ, हवामान शास्त्रासोबतच जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवभौतिकी, जैवरसायन, जैवमाहिती, जनुकीयसारख्या आंतरपरणाली शाखांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. या विविध प्रयोगांची दखल विज्ञान कथालेखक आपल्या कथांमध्ये घेताना दिसत आहेत. सशक्त विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आधारित विज्ञान कथा लिहिणारे डॉ. संजय ढोले एक नावाजलेले विज्ञान कथालेखक आहेत. त्यांचा ‘खुजाबा’ हा सातवा विज्ञान कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात विज्ञानाची परिभाषा करणाऱ्या व समाजातील विसंगतीवर बोट ठेवणाऱ्या अशा १२ कथांचा समावेश आहे. कथासंग्रहाच्या सुरुवातीला डॉ. संजय ढोले यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे की, विज्ञान कथांमधले विज्ञान हे खरे असून, आज चालू असलेला प्रयोग कदाचित उद्या एक वेगळी तंत्रज्ञानक्रांती घडवून आणू शकतो. एखाद्या विज्ञान कथेतील विज्ञान हे पाच-दहा वर्षांनंतर खरे ठरू शकते. सध्या तंत्रज्ञान एवढं झपाटय़ानं विकसित होत आहे की कितीतरी अशक्य गोष्टी शक्य होताना आपल्याला दिसत आहेत. या बदललेल्या तंत्रज्ञानाचा माणूस चांगल्या कामांसाठी जसा उपयोग करू शकतो, तसाच तो स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा दुरुपयोगही करू शकतो. या सगळय़ांचा विचार ‘खुजाबा’ संग्रहातील कथा लिहिताना लेखकाने केलेला दिसून येतो. गुन्हेगारांना शोधणे हे काम पोलिसांचे आहे. परंतु जेव्हा गुन्हेगार सापडत नाही, तेव्हा त्यांना शोधण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे ‘अपहरण’ व ‘साक्षीदार’ या कथांमधून दिसून येते. संशोधन करणारे काही शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाचा दुरुपयोग करून देशाचे कसे शत्रू बनू शकतात, हे आपल्याला ‘आगंतुक’, ‘अंधार गुणिले अंधार’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मासिक पाळीला अपवित्र मानणाऱ्या स्त्रीला त्याच मासिक पाळीमुळे दुर्धर आजारावर मात करायला कशी मदत होते व तिच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे ‘कलाटणी’ या कथेत वाचण्यासारखे आहे. जसे आपले शत्रू आपल्या पृथ्वीवर आहेत, तसेच ते परग्रहावरदेखील असतील अशी कल्पना माणसाच्या मनात नेहमी येत असते. हे परग्रहावरून येणारे आव्हान कसे असू शकेल याची झलक ‘अज्ञात जीवाणू’ व ‘संकेत’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मानवाने आपल्याला मदत व्हावी म्हणून यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. पण यंत्रमानवात जर मानवासारख्या जाणिवा प्रगल्भ झाल्या तर तो स्वत: निर्णय घेऊन मानवाचा कसा घात करू शकतो हे ‘अपघात’ या कथेत वाचायला मिळते. हा यंत्रमानव जर नॅनो टेक्नोलॉजीने बनलेला, डोळय़ांनी न दिसणारा खुजाबा म्हणजे नॅनो यंत्रमानव असला तरी तो किती भयंकर उत्पात करू शकतो हे ‘खुजाबा’ कथेत वाचून आपण अवाक् होतो. कथासंग्रहाला दिलेल्या शीर्षकाची ही कथा तंत्रज्ञानापुढे माणूस हतबल होऊ शकतो हे दर्शविणारी आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे डोळे, किडनी, यकृत, हृदय, स्वादुपिंड, फुप्फुस या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. पण जर मेंदूचे प्रत्यारोपण यशस्वी झाले तर काय होऊ शकते हे ‘कालचक्र’ या कथेत वाचायला मिळते. नाभिकीय क्षेत्राशी संबंधित असणारी ‘अगम्य’ कथा व जीवाणू, विषाणूंच्या डी.एन.ए.मध्ये परिवर्तन केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो हे दर्शविणारी ‘शिखंडी’ कथाही वाचण्यासारखी आहे. डॉ. संजय ढोले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक असल्यामुळे त्यांच्या कथांमधून विज्ञानप्रसाराबरोबर प्रबोधनही होताना दिसते. प्रत्येक कथेचा बाज वेगळा असल्यामुळे वाचकाची कथा वाचत असताना उत्सुकता ताणली जाते. कथासंग्रहाची भाषा सामान्य वाचकाला समजेल अशी आहे. कथासंग्रहाचे मुखपृष्ठ आकर्षक व कथांना साजेसे आहे. लहानात लहान पेशींपासून माणसाने बनविलेला जीवाणू, जेव्हा माणसासारखा मेंदूचा वापर करू लागतो तेव्हा तो त्याला बनविणाऱ्या माणसालाच खुजं करून अगतिक होण्यास भाग पाडतो. हा आशय बोलका करणारं चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ वाचकांना आकर्षित करणारं आहे. २१ व्या शतकातील बदलत्या विज्ञान व तंत्रज्ञानाची साक्ष देणाऱ्या ‘खुजाबा’ कथासंग्रहातील विज्ञानकथा विज्ञान अभ्यासकांबरोबर सामान्य वाचकांनाही आवडतील अशा आहेत. ...Read more

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
डाॅ. बि.एन.जाजू, पुणे.

परवाच जी. बी. देशमुखांच "अ-अमिताभचा " हे पुस्तक वाचून झालं. खूप छान लिहिलंय त्यांनी. प्रत्येक चित्रपटाचा बारकाईनं केलेला अभ्यास, त्यातील प्रसंगांचं आणि अमिताभच्या अभिनयाचं समृद्ध भाषेत केलेलं लेखन आणि लिखाणाचा ओघ (flow) सर्वच अप्रतिम.