* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SO OFTEN, IT`S THE SIMPLEST ACTS OF COURAGE THAT TOUCH THE LIVES OF OTHERS. SUDHA MURTY-THROUGH THE EXCEPTIONAL WORK OF THE INFOSYS FOUNDATION AS WELL AS THROUGH HER OWN YOUTH, FAMILY LIFE AND TRAVELS-ENCOUNTERS MANY SUCH STORIES... AND SHE TELLS THEM HERE IN HER CHARACTERISTICALLY CLEAR-EYED, WARM-HEARTED WAY. SHE TALKS CANDIDLY ABOUT THE MEANINGFUL IMPACT OF HER WORK IN THE DEVADASI COMMUNITY, HER TRIALS AND TRIBULATIONS AS THE ONLY FEMALE STUDENT IN HER ENGINEERING COLLEGE AND THE UNEXPECTED AND INSPIRING CONSEQUENCES OF HER FATHER`S KINDNESS. FROM THE QUIET JOY OF DISCOVERING THE REACH OF INDIAN CINEMA AND THE ORIGINS OF INDIAN VEGETABLES TO THE SHALLOWNESS OF JUDGING OTHERS BASED ON APPEARANCES, THESE ARE EVERYDAY STRUGGLES AND VICTORIES, LARGE AND SMALL. UNMASKING BOTH THE BEAUTY AND UGLINESS OF HUMAN NATURE, EACH OF THE REAL-LIFE STORIES IN THIS COLLECTION IS REFLECTIVE OF A LIFE LIVED WITH GRACE.
लेखिकेस ज्या ज्या व्यक्तींनी त्यांच्या आयुष्याचे निरनिराळे पदर उलगडून दाखवले, आणि त्यांचा अनुभवाचा घडा ज्ञानानं भरला, त्या अनुभवांचे कथन त्यांनी या पुस्तकातून केले आहे. जसे की, ‘तीन हजार टाके’ या लेखातून त्यांनी देवदासींच्या आयुष्यातील समस्या व त्यांचे निराकरण करण्याचे ठरविल्यावर त्यांना काय अनुभव आले, त्याविषयी लिहिले आहे. सुरवातीला त्या देवदासींना मदत करण्यासाठी गेल्या असता, देवदासींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. कारण सामाजिक कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्यांना सुसंवाद साधण्यासाठी लागणारी कौशल्यं आत्मसात करावी लागणार होती. आपला पेहराव, संभाषणची भाषा गरजू लोकांसारखी बदलायला हवी होती. पण या सर्वांहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण करत असलेल्या कामावर मनापासून प्रेम करावं लागणार होतं याची जाणीव त्यांच्या वडिलांनी त्यांना करून दिली. त्याप्रमाणे त्यांनी स्वतःत बदल घडवले. त्यानंतर त्यांनी देवदासींची संघटना बांधून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची सोय व वगैरे मार्ग काढले. याबद्दल त्यांचा गौरव करताना त्या देवदासी भगिनींनी आपल्या प्रेमाची ऊब देणारे टाके प्रत्येकीने विणून अशा तीन हजार टाक्यांचे भरतकाम केलेल्या गोधडीची भेट दिली. ‘मुलांवर मात’या लेखातून लेखिकेने त्यांच्या काळातील शैक्षणिक परिस्थितीत मुली इंजिनिअरिंगच्या शिक्षणापासून कशा दूर होत्या, त्यामुळे त्या कॉलेजमध्ये त्या एकट्याच असल्याने, मुले प्रथम कशी त्यांच्या खोड्या काढायची याविषयी लिहिले आहे. पण नंतर इंजिनिअरिंग हे पुरुषांचं क्षेत्र आहे, हे साफ खोटं असल्याचं सिद्ध करून दाखवलं. लेखिकेनं सगळा अभ्यास व्यवस्थित समजून केला, व त्यांच्याबरोबर शिकणाऱ्या मुलांपेक्षा अधिक गुण मिळवून त्यांच्यावर कशी मात केली, त्याविषयी वर्णन केले आहे. लेखिका एकदा सहजच मैत्रिणीच्या घरी गेली असता, फक्त मूळ भारतीय असलेल्या अन्नपदार्थांपासूनच श्राद्धाचा स्वयंपाक केला जातो, असं त्यांना कळलं. आपण ज्या गोष्टींना ‘भारतीय’ म्हणतो, त्यांपैकी अनेक गोष्टी भारतीय नाहीत. मिरची, ढबू मिरची, मका, शेंगदाणे, काजू, विविध प्रकारच्या शेंगा, बटाटा, पपई, अननस, सीताफळ, पेरू, चिकू या सर्व भाज्या आणि फळं दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आल्याचं त्यांच्या मैत्रिणीच्या वनस्पतिशास्त्रज्ञ वडिलांनी त्यांना सांगितलं. त्याबद्दलच्या विस्मयकारक पौराणिक व वैज्ञानिक गोष्टीही त्यांनी लेखिकेस सांगितल्या. अशा तऱ्हेने जेवायला गेल्या असता वैचारिक खाद्यही त्यांना लाभले. ‘तीन ओंजळी पाणी’ या लेखात लहानपणी आजीबरोबर लेखिका गंगापूजनाला गेली असता, त्याविषयीची माहिती- ते का करतात, कसं करतात हे कळतं. काही वर्षांनी प्रत्यक्ष काशी-बनारसला गेल्यावर त्याविषयीचा तिचा अनुभव काय, याविषयी लेखिकेने या लेखात लिहिले आहे. ‘घरासारखं दुसरं काही नाही’ या लेखात लेखिकेला मध्यपूर्वेत महिला संघटनांच्या आमंत्रणावरून गेल्या असता, स्वतःजवळचे सर्व पैसे घालवून, अधिक पैसे मिळतात, या आशेने गेलेल्या महिलांवर तेथे गेल्यावर काय परिस्थिती ओढवते, व परत मायदेशी येणे किती मुश्किल होते, याविषयी लेखिका सजग करते. ‘खरा राजदूत’ या लेखात परदेशी गेल्यावर आपली हिंदी सिनेसृष्टी इतर देशांमध्ये आपल्या देशाविषयी, संस्कृतीविषयी कशी उत्सुकता निर्माण करते, तेथील लोकांशी जोडले जाण्याचा अनुभव देते, याची झलक दिसल्यावर चकित होते, त्याविषयी लिहिते. ‘रसीला आणि पोहोण्याचा तलाव’ या लेखात कर्नाटकातील हरिकथेत सांगितल्या जाणाऱ्या कृष्णाच्या आणि गोपिकांच्या रासलीलांच्या गोष्टी आपल्या परदेशातल्या नातींना लेखिका सांगते. याच गोष्टी परदेशी वातावरणाशी जुळवून त्यांच्या नाती त्यांना कशा मार्मिक रीतीने सांगतात, हे वाचणे खूपच रंजक आहे. ‘इन्फोसिस फाउंडेशनमधील एक दिवस’ या लेखात लेखिकेची मैत्रीण ‘तिला लेखिका निवांत भेटत नाही’ अशी तक्रार करते, तेव्हा त्या मैत्रिणीलाच आपल्या कामाच्या ठिकाणी बोलवते, व तिचा दिनक्रम कसा व्यस्त आहे, याचा अनुभव दिवसभर देते. ‘मला जमणार नाही; आपल्याला जमेल’ या लेखातून लेखिकेचा अचानकच व्यसनाधीनांच्या व्यसनांपासून सुटकेसाठी काम करणाऱ्या ‘अल्कोहोलिक अॅपनॉनिमस’ या संस्थेच्या संपर्कात आली. त्यांचे काम कसे चालते, याविषयीच्या मीटिंगला उपस्थित राहण्याची संधीही लेखिकेस मिळाली. त्याविषयीची समस्या सोडवण्यासाठी वाचकास जागृत करणारा, अंगावर शहारा आणणारा अनुभव लेखिकेने आपल्यासमोर ठेवला आहे. एकूणच समाजातील समस्या, माहिती, ज्ञान, चालीरीती अशा सगळ्या कंगोऱ्यांना स्पर्श करणारे रंजक पण विचार करायला भाग पाडणारे विषय लेखिकेने समर्थपणे हाताळले आहेत.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating Starडॉ. अनिल कुलकर्णी, सामना

    काही पुस्तके वाचायलाच हवीत. कारण पुस्तके प्रेरणा देतात, संघर्षात जगायला शिकवतात आणि संघर्ष माणसाला घडवतो. अपयशाच्या रस्त्यामधूनच एक दिवस यशाचा रस्ता सापडतो. नैराश्याचे ढग काही काळ अवकाश व्यापून राहतात पण जेव्हा बरसतात ते अंकुरसोबत घेऊन आसमंत उजळून टातात. केवळ आर्थिक मदत करून काहीच होणार नाही, तर या स्त्रियांचे आत्मसन्मानाने मनोबल वाढवण्याची गरज आहे हे सुधा मूर्तीना कळून चुकले. मग त्यांनी व देवदासींनी एकत्र येऊन एक संघटना उभी केली. परमेश्वराला काही सगळीकडे.. उपस्थित राहणे शक्य नसते. म्हणून तो काही काही व्यक्तींच्या रूपाने मदतीला धावून येतो या गोष्टीवर प्रतिकूल परिस्थितीत इंजिनीअरिंगचे शिक्षण त्यांचा ठाम विश्वास होता. तीन हजार टाके.... घेतल्यानंतर सुधा मूर्ती यांनी ३००० स्त्रियांचे जटानिर्मूलन केले. त्या देवदासी म्हणून वेश्या व्यवसाय करायच्या. आपण देवाला वाहिलेल्या आहोत म्हणून त्या जटा काढतच नसत. दोनदा अपयश आल्यानंतरही सुधा मूर्ती मागे हटल्या नाहीत. तिसऱ्यांदा त्यांना समजावण्यात यश आले व हळूहळू देवदासी प्रथेवरील देवदासींचा विश्वास उडून सत्य त्यांना कळू लागले. १९९६ मध्ये इन्फोसिस फाऊंडेशनची स्थापना झाली. इन्फोसिस फाऊंडेशन सुरू करण्याची कल्पना सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणणे ही होती. म्हणजेच `बहुजन हिताय बहुजन सुखाय` गरजवंताची जात, धर्म, भाषेचा विचार न करता त्यांच्या मदतीला धावून जाणे हे त्यात मायेची ऊब होती. फाऊंडेशनचे मुख्य उद्दिष्ट होते. `देवदासी" या शब्दाचा खरं तर अर्थ ईश्वराची सेवा करणारी असा आहे. पूर्वीच्या काळी देवदासी गायन, वादन, नृत्य अशा कलांत निपुण असत. कलेच्या माध्यमातून त्या ईश्वराची उपासना करत. पण काही दिवसांनी `देवदासी` या शब्दाला `शरीरविक्रय करून उदरनिर्वाह करणारी स्त्री असा एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला. ज्या देवदासीच्या पोटी जन्माला आल्या त्याही पुढे देवदासी बनल्या. काही मुलींना त्यांचे आईवडीलच वेगवेगळ्या कारणाने देवाला अर्पण करायचे दारिद्र्याने अस्वच्छ, अनारोग्यपूर्ण राहणीमुळे एखाद्या मुलीच्या केसात जट आली की, ती देवदासी होण्यासाठी जन्माला आली आहे असा साक्षात देवानेच कौल दिला असल्याचा अर्थ लावून तिचे देवाच्या चरणी सेवेसाठी लग्न करण्याची अनिष्ट प्रथा सुरू झाली. देवदासी समस्येचे काम सुधा मूर्तीनी हातात घेतले. संवाद साधणे अतिशय अवघड होते. त्यांनी खूप अपमान सहन केले. "तुम्ही काय सरकारी दलाल आहात का ?" वगैरे त्यांची हेटाळणी झाली, त्यांच्या अंगावर चपला फेकून मारल्या गेल्या तरी त्या डगमगल्या नाहीत या उपक्रमाचे यश म्हणजे तीन वर्षांच्या आत बँकेकडे डिपॉझिट स्वरूपात ऐंशी लाख रुपये जमले. पूर्वी देवदासी असलेल्या स्त्रियांना या बँकेत नोकरी देण्यात आली, परंतु या उपक्रमाचे सर्वात मुख्य यश म्हणजे ३००० देवदासी शरीरविक्रय व्यवसायातून बाहेर पडल्या. अनेकांची मुलं शिकून, मोठी होऊन आपापल्या व्यवसायात यशस्वी झाली. त्यात डॉक्टर, वकील, कारकून, सरकारी नोकर, शिक्षक, रेल्वे कर्मचारी, बैंक अधिकारी असे सगळे होते. देवदासी प्रथेतून बाहेर पडलेल्या महिलांनी एका कार्यक्रमामध्ये भरतकाम केलेली गोधडी सुधा मूर्ती यांना भेट दिली. तीन हजार टाके घातलेल्या या गोधडीवर सुंदर नक्षीकाम नसलं तरी त्याला प्रत्येकीचा हात लागला होता. आपल्या मनोगतात त्या म्हणतात, "ही आमच्या हृदयाकडून तुमच्या हृदयाला भेट आहे. हे पांघरूण तुम्हाला उन्हाळ्यात शीतलता आणि हिवाळ्यात ऊब देईल. आमची माया यातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. आमच्या संकटकाळी तुम्ही आमच्यासाठी धावून आलात. आता आम्हाला तुमची साथ सोडायची नाही." सुधा मूर्ती म्हणतात, आजवर मला मिळालेली ही सर्वात सुंदर भेट आहे. सुधा मूर्तीच्या शब्दांत सांगायचं झालं तर "मानवी स्वभावाचे सर्व पैलू नीट समजावून घेणं आणि संकटात सापडलेल्या माणसांना मदतीचा हात देऊन त्यांना त्या संकटातून बाहेर काढण हेसुद्धा आपल्या आयुष्याचं ध्येय असू शकत. आपण सगळेच आयुष्यात छोटया छोटया लढाया जरी हरलो तरी महासंग्राम जिंकू शकतो. आयुष्यात आशेला नेहमीच स्थान असतं. " व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार करायचा असेल तर कोषातून बाहेर यायलाच हवं. एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वानेच बदलाची प्रक्रिया सामूहिक व्हायला सुरुवात होते. काही पुस्तके, काही माणसे आजच्या पिढीला माहीत व्हायलाच हवीत. ...Read more

  • Rating StarNiren Apte

    3000 टाक्यांची जन्मकथा -निरेन आपटे. सौ. सुद्धा मूर्ती आणि नारायण मूर्ती ह्यांनी इन्फोसिसद्वारे संपूर्ण जगभर आपले कार्य पोहोचवले आहे. नारायण मूर्तींच्या इन्फोसिस कंपनीने जगभर व्यवसाय नेला तर सौ. सुद्धा मूर्ती ह्यांनी त्यातून मिळणाऱ्या नफ्यामधून ामाजिक कामे केली. अनेकांना आर्थिक मदत केली, शाळांमधून संगणक वाटले, ग्रंथालय उभे केले. कपडे-आवश्यक वस्तूंचे वाटप केले. नैसर्गिक आपत्तीनंतर मदत कार्य केले. सुद्धा मूर्ती ह्या लेखिकाही आहेत. wise and otherwise , dollar bahu , magic of lost temple , महाश्वेता अशी त्यांची अनेक पुस्तके लोकप्रिय झाली. त्या पुस्तकांचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले. त्यांचे आणखी एक पुस्तक खूप लोकप्रिय झाले आणि त्याचे नाव आहे -3000 स्टिचेस. मराठीमध्ये हे पुस्तक ``3000 टाके`` नावाने उपलब्ध असून त्याचा अनुवाद लीना सोहोनी ह्यांनी केला आहे. देवदासी आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर आधारित हे पुस्तक आहे. ह्या महिलांनी सुधाजींना 3000 टाके असलेली एक गोधडी भेट दिली. सुधाजींनी ह्या महिलांसाठी जे काम केले त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही गोधडी दिली आहे. हे पुस्तक वाचनीय आहे आणि त्या पुस्तकाची जन्मकथाही खूप काही सांगणारी आहे. सुद्धा मूर्ती इंजिनिअर झाल्या. पण त्यांचा ओढा सामाजिक कामांकडे जास्त होता. देवदासी प्रथा बंद व्हावी असे त्यांना मनापासून वाटे. म्हणून त्या एकदा देवदासी महिलांच्या वस्तीत गेल्या. त्या महिलांशी संवाद साधायचा होता. त्यावेळी सुधाजी आधुनिक कपड्यात होत्या. देवदासींच्या वस्तीत गेल्यावर तिथल्या महिलांना त्या आपल्यातल्या वाटल्या नाही. सुधाजींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्या महिलांनी चप्पल फेकून त्यांना हाकलून दिले. सुधाजींना वाईट वाटले. पण त्या हरल्या नाहीत. दोन आठवड्याने पुन्हा तिथे गेल्या. त्यावेळी टोमॅटोचा हंगाम होता. त्या बायका टोमॅटो निवडण्याचं काम करत होत्या. सुधाजी पुन्हा आल्या हे पाहून त्यांनी सुधाजींच्या अंगावर टोमॅटो फेकून मारले. पुन्हा मागे फिरावे लागले. सुधाजी हतबल झाल्या. त्यांनी हा किस्सा आपल्या वडिलांना सांगितला. त्यांचे वडील डॉक्टर होते. त्यांनी सुधाला सांगितले, तू आधुनिक वेशभूषेत तिथे गेलीस. त्यामुळे त्या महिलांना तू परकी वाटलीस. जर तू साडी नेसून गेलीस तर त्या तुला आपल्यातली एक समजतील. तुझे बोलणे ऐकतील. सुधाजींना हा सल्ला पटला. त्या साडी नेसून पुन्हा देवदासींच्या वस्तीत गेल्या आणि मोठा फरक झाला. त्या महिला सुधाजींशी बोलू लागल्या. त्या महिलांपैकी काही जण वेश्या व्यवसाय करत होत्या. त्या वस्तीमध्ये काहीच सुविधा नव्हत्या. सुधाजींनी त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप दिली. बँक हा प्रकार त्या महिलांना माहित नव्हता. मग तिथे एक बँक आणली. एड्स आजाराची माहिती दिली. एड्सपासून रक्षण करण्याचे उपाय सांगितले. त्या महिलांचा सुधाजींवर विश्वास बसू लागला. एक नातं तयार झालं. त्यांचे अनेक प्रश्न सुटू लागले. सुधाजी इन्फोसिस फौंडेशन चालवतात ह्या गोष्टी त्या महिलांना माहीतही नव्हत्या. आपली मुले शिक्षण घेत आहेत. परिवर्तन होत आहे हे त्यांना दिसू लागलं. सुधाजींच्या चिकाटीला आणि कष्टाला फळ आलं. त्या महिलांनी एक कार्यक्रम करायचं ठरवलं. ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून सुधाजींनी यावं इतकाच आग्रह करून त्या थांबल्या नाहीत तर सुधाजींना बंगलोरवरून येणं सोपं व्हावं म्हणून वोल्वो एसी बसचं तिकीट पाठवलं. सुधाजी त्या कार्यक्रमाला गेल्या. सुधाजींमुळे 3000 पेक्षा जास्त महिलांचे जीवन बदलले होते. म्हणून त्या महिलांनी सुधाजींना 3000 टाके घातलेली गोधडी भेट दिली. ह्याच घटनेवरून सुधाजींनी 3000 स्टिचेस हे पुस्तक लिहिले आहे. माणुसकीचं एक निराळं उदाहरण ह्या पुस्तकातून दिसून येतं, म्हणून हे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवं. ...Read more

  • Rating StarDrPawan S Chandak

    `तीन हजार टाके` हे सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित पुस्तक नुकतेच वाचले या पुस्तकात `सामान्य व्यक्तींचे पण त असामान्य असे कर्तृत्व` रेखाटले आहे. हे पुस्तक वाचताना विविध व्यक्तिमत्त्वाविषयी सुधा मुर्तींना आलेले अनुभव त्यांचे विचार यातून वाचयला मिळते. देवदासींच्या पुनर्वसनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न व सुरुवातीला जरी प्रतिकूल अनुभव आला तरी त्यास त्यांच्या वडिलांची मिळालेली साथ यामुळे त्या देवदासींच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले काम तसेच या देवदासींना स्वावलंबी बनवून त्यांचे विविध बचत गट किंवा पतसंस्था निर्माण आदी कार्य प्रेरणादायी आहे. `एकटी मुलगी` या कथेतून सुधा मूर्ती यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर त्या कॉलेजमधील त्या एकटी मुलगी होती. तरी देखील कॉलेजमध्ये शिक्षण घेताना आलेले विविध प्रतिकूल अनुभव, मुलांची teasing तरी सुद्धा त्यांनी तितक्याच जिद्द व चिकाटीने या सर्व अनुभवांकडे कोणाकडे सुद्धा तक्रार न करता त्यांचे इंजिनियरिंग चे शिक्षण पूर्ण केले व एक प्रकारे पुरुषी अहंकारावर आपल्या कर्तृत्वाने मात केली. `विचारांसाठी खाद्य` मधून एकदा त्या मैत्रिणीकडे जेवायला गेले असता तेथील यजमानांनी श्राद्ध निमित्त भोजनात देशी भाज्यांचे नैवेद्य केले असता. त्यात त्यांच्या चर्चेतून आपण रोज वापरत असलेल्या विविध भाज्या त्यांचे उगम स्थान यावरून देशी आणि विदेशी भाज्या याविषयी आपल्याला वाचायला खूप मजा येते. `तीन ओंजळी पाणी` या कथेमध्ये कदाचित आपल्या माहीत असेल की वाराणसीमध्ये गंगेत स्नान केल्यावर ओंजळीत पाणी घेऊन आपल्या आवडत्या वस्तूचा त्याग करायचा असतो. मग सुधा मूर्तींनी काय केले असेल बरं ? त्यांनी त्यांच्या सर्वात आवडती वस्तू म्हणजे नवीन साड्या खरेदी करणे या आवडीच्या वस्तूच्या नावे ओंजळीत पाणी घेऊन गंगेत सोडून त्याग केला. `कॅटल क्लास` मधून त्यांना आलेले बिझनेस क्लास vs इकॉनोमिक क्लास आदी विषयी व पेहरावा वरून भेदभावाचा अनुभव व तरीसुद्धा त्यांनी संयम ढळू देता अशा मानसिकतेच्या लोकांना दिलेले उत्तर हे वाचायला खरच मजा आहे `अलिखित आयुष्य` मधून त्यांच्या वडिलांनी डॉक्टर पेशीतून ग्रामीण भागातील दुर्गम भागात केलेली वैद्यकीय सेवा या सेवेतून ज्या पेशंटची त्यांनी प्रसूती केली त्या पैशांची मुलगी पुढे एक नावाजलेली स्त्री रोग तज्ञ होते असा हा प्रवास वाचताना खूप ऊर्जा मिळते. `घरासारखे दुसरे ठिकाण नाही` ही अत्यंत हृदयास हेलावणारी कथा, कारण या कथेमध्ये सुधा मूर्ती जेंव्हा एका शेलटर होम ला भेट देतात तेव्हा त्या ज्या पीडित घरकामगार स्त्रियांना भेटल्यावर त्यांनी सौदी किंवा त्या भागात घरकाम साठी गेलेल्या स्त्रियांना आलेले अत्यंत कटू अनुभव, त्यांच्या वर झालेले अत्याचार, पुढे त्या तिथे अडकून बसल्याने त्यांना परत भारतात आणून त्यांचे पुनर्वसन करणे आदींसाठी इन्फोसिस फाउंडेशन द्वारे सुधा मूर्ती ने केलेली मदत वाचण्यासारखी आहे. इन्फोसिस फाउंडेशन मधील एक दिवस मधून फाउंडेशनची शिष्ट सुधा मूर्ती यांचे उत्कृष्ट प्रशासन एकदा वाचा म्हणजे त्यांच्या कामाविषयी कल्पना येईल. तसेच पुढे `मला जमणार नाही पण आम्हाला जमेल` मधून अल्कोहोल ॲनॉनिमस चे कार्य त्यांनी खूप छान रेखाटले आहे . एकंदरीत मी काही सांगण्यापेक्षा आपण स्वतः पुस्तक वाचून एकदा अनुभव घ्यावा ...Read more

  • Rating StarGayatri Pangarkar, Amravati

    *`पुस्तकप्रेमी`* whatsapp समूह    काही दिवसांपूर्वी KBC च्या `कर्मवीर स्पेशल` एपिसोड मध्ये सुधा मूर्ती जी आल्या होत्या.. तेव्हा अमिताभ त्यांच्या पाया पडून म्हणाले होते ‘हम गर्व से कहते हैं कि, हम उस देश के वासी हैं जिस देश में ‘सुधा मूर्ती’ जी रहत हैं”...काय यथार्थ भावना व्यक्त केल्या एका महापुरुषाने...   आज हे आठवायच निमित्त झालं ते म्हणजे सुधा मूर्ती हस्ते लिखित “तीन हजार टाके” हे वाचनात आलेलं पुस्तकं... या कथा म्हणजे रोजच्या जीवनातील सामान्य व्यक्तींच्या असामान्य जीवन कथा आहे. त्यांना कथा म्हणा, वर्णन म्हणा किंवा अनुभव संकलन आहे म्हणा... ज्याला जे नाव रुचेल ते देऊ शकता.. काय नाहीये या पुस्तकात? या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण आपल्याला एक नवीन गोष्ट शिकवतं, अंतर्मुख करत.  असं हे नितांत सुदंर पुस्तक मी एका बैठकीत वाचून संपवलं... किती तरी गोष्टी शिकले मी यातून.. सगळ्यात जास्त गारुड घातलं ते सुधा ताईंच्या साधेपणाने... त्यां नेसत असलेल्या अगदी साध्या साड्या हीच त्यांची ओळख आहे.. बऱ्याच वेळा आपल्याला वाटत राहतं कि आपले कपडे अगदी out of style आहेत..त्यातून एक न्यूनगंड जन्माला येतो...पण सुधा ताईंना पाहून लक्षात येतं कि class आणि style हे inbuilt असावे लागतात.. घातलेल्या कपड्यांवरून class ठरत नाही ... आजकाल "classy" ची व्याख्या वापरत असलेला महागडा मोबाईल, त्यावर पाहिल्या जाणाऱ्या अगम्य वेब सिरीज, ट्विटर, इंस्टा वर किती फॉलोअर्स ह्या आणि यासारख्या अनेक दिखाऊ गोष्टींवरून ठरवली जाते.. ते किती चुकीचं आहे हेच सुधाताईंकडे पाहून लक्षात येतं.. दुसरी भावलेली गोष्ट म्हणजे सुधा ताईंचा आत्मविश्वास.. आणि तो मिळवायला करावा लागतो अखंड अभ्यास आणि अथक परिश्रम... there is no substitute to hard work...कित्येक वेळा एखाद काम टाळून ते का टाळलं यासाठी आपण स्वतःला excuses देत असतो.. सुधा ताईंना समजून घेतल्यावर आपल्या या सवयीत नक्की बदल व्हायला मदत होईल... आणि लास्ट बट नॉट लिस्ट, खूप खूप महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे “ पालकत्व हि एक जवाबदारी आहे” सुधा ताईंचं असामान्य व्यक्तिमत्व घडविण्यात त्यांच्या पालकांचा मुख्य वाटा आहे.. "संस्कार करावे नाही तर पेरावे लागतात" मुलं आपल्या पालकांच अनुकरण करत, त्यांना निरखत च मोठी होतात.. संस्कारी आणि यशस्वी मुलं त्यांच्या पालकांचं च प्रतिकरूप असतात..  केवळ पालकत्वाची पुस्तक वाचून responsible पालक होता येत नाही... मदत जरूर होते.. पण प्रत्येक पालकत्वाची काही ना काही व्यथा ही असतेच.. ज्याला त्या व्यथेची कथा करता आली तेच जवाबदार पालकत्व म्हणून नावाजलं जातं... पुस्तकाविषयी आणि सुधा ताईंविषयी कितीही लिहिलं तरी कमीच आहे..कारण शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी या समर्थ व्यक्तिमत्वाकडे आहेत... इतिहास, पुराण आणि अंडरवल्ड चा फेरफटका मारल्यावर वास्तवात परतण्यासाठी ‘तीन हजार टाके’ हे पुस्तक वाचा च....👌👌👌👌👌👌👌👌   ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.