* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RANGRESHA
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788177662528
  • Edition : 5
  • Publishing Year : FEBRUARY 1999
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
I HAVE ALWAYS LOVED WRITING FROM NEWSPAPERS. MANY SMALL EVENTS IN DAILY LIFE, MEETINGS AND INTERACTIONS WITH PEOPLE OF DIFFERENT ATTITUDES, MANY EMOTIONS OF NATURE, VARIOUS RITUALS THAT ARE INSTILLED IN THE MIND THROUGH DAILY READING - FROM THESE SOURCES, I SUGGEST TOPICS FOR WRITING. IT IS MY EXPERIENCE THAT THERE IS NO OTHER MEDIUM LIKE WRITING TO EXPRESS MUCH THAT CANNOT BE EXPRESSED IN ANY OTHER FORM OF LITERATURE.
वृत्तपत्रांतून सदरलेखन करणे मला नेहमीच आवडत आले आहे. दैनंदिन जीवनातील अनेक लहानमोठ्या घटना, वेगवेगळ्या वृत्तिप्रवृत्तींच्या माणसांशी या ना त्या कारणाने होणाया भेटी आणि संवाद, निसर्गाच्या अनेक भाववृत्ती, नित्याच्या वाचनातून मनावर होणारे विविध संस्कार – या सायांमधून मला सदरलेखनासाठी विषय सुचतात. बरेचसे काही, जे इतर कोणत्याच साहित्यरूपाने प्रकट होऊ शकत नाही, ते व्यक्त करण्यासाठी सदरलेखनासारखे अन्य माध्यम नाही, असा माझा अनुभव आहे....
एफ.आय.पी पुरस्कार २०००
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating Starसौ अपर्णा अनंत मिसे, ठाणे पश्चिम

    नमस्कार मंडळी, केसरी ह्या वृत्तपत्रात श्रीमती शांताबाई शेळके "*रंगरेषा*" हे सदर लिहीत असत. वृत्तपत्रातील असे सदर वाचकांना दैनंदिन जीवनातील लहान मोठ्या घटना,वेगवेगळ्या वृतीप्रवृत्तीच्या माणसांशी या ना त्या कारणाने होणाऱ्या भेटी आणि संवाद,निसर्गाच्या अेक भाववृत्ती, नित्याच्या वाचनातून मनावर होणारे संस्कार, याबद्दल लेखिकेला आलेल्या अनुभवांचे साहित्य रूपाने प्रकटीकरण आहे.हे सगळे ललित लेख शांताबाई सारख्या भाषेवर प्रभुत्व असलेल्या लेखिकेने लिहिले आहेत. त्यामुळे सगळ्या लेखांना शांताबाई या नावाचा परीसस्पर्श झाला आहे.सगळेच लेख अत्यंत वाचनीय आहेत. या सदरात *29* ललित लेख आहेत. संग्रहातील काही लेखांचा संक्षिप्त परिचय करून देत आहे. परिचय मी त्यांच्याच शब्दांमध्ये करून देत आहे. लेखातील अनेक वाक्ये उद्धृत करण्यामागे उद्देश्य हा की, लेखातील गोडवा अन् शब्द सौंदर्य कायम राहावे असा आहे. *घटातील पोकळी* नववर्षाच्या शुभेच्छा निमित्त एक ग्रीटिंग कार्ड आले.त्यावरील चित्राने मन वेधून घेतले. ओल्या मातीचा गोळा चाकावर घालून कुंभार त्याला मडक्याचा आकार देत आहे. असं ते चित्र होतं. त्याहीपेक्षा कार्डाच्या आतल्या बाजूला असलेला मजकूर अर्थपूर्ण वाटला.त्याचा आशय असा होता, मातीच्या गोळ्यापासून मडके तयार होते.पण मडक्याचा खरा अर्थ म्हणजे आतील पोकळी. मडक्याचा देह हा खापराचा असतो.ही त्याची व्यावहारिक उपयुक्ततता पण मडक्याच्या आतील पोकळी हा त्याचा आत्मा आहे. तो त्याचा जीवनाशय आहे. पोकळी म्हणजे शून्य.शून्य या शब्दाला आपल्या अध्यात्मात विशिष्ट महत्त्व आहे. शून्य आणि पूर्ण दोघांचा अर्थ एकच मानला जातो.पूर्णातून पूर्ण वजा केले तरी पूर्णच राहते. अशा अर्थाचा एक श्लोक आहे *`पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते`* शून्यातून शून्य वजा केले तरी शून्यच येते. या शून्याची एक गंमतच आहे. म्हटले तर ते अगदी लहान असते. आणि म्हटले तर ते साऱ्या विश्वाला गवसणी घालण्याइतके विराटही होते. प्रारंभी एकाच व्यक्तीच्या ठायी केंद्रित असणारे प्रेम साऱ्या विश्वापर्यंत पसरत जाणे. याचेच नाव अध्यात्म. शांताबाईंनी जिगर मुरादाबादी यांचा एक शेर येथे दिला आहे. *इस लफ्जे मुहब्बतका* *इतनाहि फसाना हैं* *सिमटे तो दिले -आशिक* *फैले तो जमाना हैं !* शेराचा अर्थ - प्रेमाच्या एका शब्दाची इतकीच कहाणी असते.ते संकुचित झाले तर प्रिय व्यक्तीच्या हृदयात सामावून राहते. आणि त्याचा विस्तार झाला तर ते साऱ्या विश्वाला व्यापून टाकते. ते प्रेम म्हणजेही आपल्या अध्यात्माने सुचवलेले घटातील पोकळी आणि बाहेरचे अंतराळ यांचे अभिन्नत्वच! सर्वसामान्य माणसाजवळ प्रेम करण्याची ताकद असते. एकमेकांच्या गरजा जाणून घेतो. एकमेकांच्या साहाय्याला धावून जातो. ज्याची जितकी कुवत असेल तितका तो स्वतःची प्रगती करून घेतो.आणि मला वाटते हेच आपल्यासारख्यांना उमगणारे अध्यात्म. याहून वेगळे अध्यात्म आपल्याला कधी भेटणार नाही आणि आपल्याला त्याची आवश्यकताही नाही. *जीवनाविषयी थोडेसे* ज्याने *जीवन* हा प्रतिशब्द आयुष्यासाठी प्रथम वापरला तो माणूस मोठा रसिक व कल्पक असला पाहिजे. पाण्यालाही संस्कृतमध्ये जीवन म्हणतात. आणि मानवी जीवन पाण्यासारखेच असते. एकदा बादशहाने बिरबलाला विचारले, क्षणभरही न थांबता रात्रंदिवस अखंड चालू राहणारी गोष्ट कोणती? बिरबलाने उत्तर दिले ,अशी गोष्ट म्हणजे, सावकाराचे व्याज. मला वाटते बादशहाच्या प्रश्नाला बिरबलाने मानवी जीवन असे उत्तर दिले असते, तरी ते तितकेच समर्पक ठरले असते. काळ कोणासाठी थांबत नाही तो सुखाचा असो या दुःखाचा. सुख भोगतांना माणूस म्हणतो `हे सुखाचे दिवस हा हा म्हणता संपणार आहेत बरे!` आणि दुःखातही तो स्वतःला दिलासा देतो,`हे ही दिवस आज ना उद्या निघून जातील ते कायमचे राहणार आहेत थोडेच?` म्हणजे काय तर जीवनाची अखंडितता आणि त्याची गतिमानता या दोन्ही गोष्टी ध्यानात घेऊनच माणसाने जगायला शिकले पाहिजे. *जीवित म्हणजे असंख्य क्षणांचा गुंफलेला एक सुंदर हार आहे.* प्रत्येक क्षण मागच्या क्षणाला जबाबदार असतो. लोकमान्य टिळकांची एक कथा बहिणाबाईंनी दिली आहे. ती अशी की प्लेगच्या साथीत लोकमान्यांच्या मुलाचे निधन झाले.त्यावेळी मुलाला ते स्मशानात पोचवून आल्यावर लगेचच केसरीचा अग्रलेख लिहायला बसले. पुत्रशोकाच्या अथांग सागराचे एका घोटात आचमन घेऊन त्यांनी जीवनातील नित्याची कर्तव्ये करावयास प्रारंभ केला. स्थितप्रज्ञ वृत्तीचे मर्म कसे आत्मसात केले होते हेच ही कथा आपल्याला सांगत नाही काय?शेवटी काय खेळ चालू राहिला पाहिजे.मग तो रंगमंचावरचा असो, की जीवनाच्या मंचावरचा असो! *खुंट्या ईगो टांगण्यासाठी*. एका वाड्यात एक बाई राहत असे. ती मरतांना तिने तिच्या मुलीला हेमगर्भाची मात्रा दिलेली असते. ही मात्रा माणूस अगदी आसन्नमरण झाला म्हणजे त्याला उगाळून चाटवितात .की त्याचं मरण काही चार, दोन मिनिटे लांबवता येते. एवढाच या मात्रेचा उपयोग. पण ज्या बाईजवळ ही मात्रा असते तिला त्याचा भयंकर अभिमान. बिऱ्हाडात कुणी आजारी पडले, अत्यवस्थ झाले की ही मागला पुढला विचार न करता खुशाल सांगते, काही काळजी करू नका बरं का! तशीच जर वेळ आली ना तर माझ्याजवळ हेमगर्भाची मात्रा आहे. अगदी संकोच न करता मागा. हिला कुणाच्या आजाराचा ओझरता सुगावा लागला तरी त्या घराभोवती घारीसारख्या घिरट्या घालत राहते. काय म्हणावं या बाईला ?कसला तो अहंकार! माणसांच्या अहंकाराचे इतके गमतीदार प्रकार बघायला मिळतात . एक बाई तर आपली निवड एकदमच भारी हे सांगण्यासाठी मला बाई,माझ्या नवऱ्याने काहीही आणलेले मला आवडत नाही. एक मनुष्य त्याला वाटते, आपण खूपच मार्मिक व विनोदी बोलतो. खूप श्रवणीय बोलतो.ते गृहस्थ प्रत्येक शब्दावर कोट्या करतात. कोणी हसो ना हसो स्वतःच मोठ मोठ्याने असतात. खरंच माणसं स्वतःची अशी प्रतिमा का तयार करतात? वास्तविक आपण कोण? आपली कुवत किती आहे.हे ज्याचे त्याला पक्के ठाऊक असते. मानसशास्त्राचा असा एक सिद्धांत आहे की, अहंकार हे न्यूनगंडाचेच एक वेगळे रूप असते. या कॉम्प्लेक्सने पछाडलेली माणसे मग आपला अहंकार जोपासण्यासाठी खरे, खोटे आधार निर्माण करतात.आपला ईगो टांगून ठेवण्यासाठी कसल्या ना कसल्या खुंट्या बनवतात. त्या खुंट्या जन्मभर जपत राहतात. *दळण सरलं सरलं म्हणू कशी?* जपानमध्ये जेव्हा एखादे घर बांधतात तेव्हा त्या घरामध्ये एक, दोन विटांची जागा रिकामी ठेवतात. हे असे करण्याचे कारण काय?तर घर अपुरे राहावे. त्याची बांधणी पूर्ण करू नये. कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला नेणे म्हणजे ती संपवणे. काही संपवणे, कशाचा शेवट करणे म्हणजे जीवनाचाच अंत करणे अशी काहीशी त्यांची यामागची कारणपरंपरा आहे. जीवनाचे सातत्य कायम राहिले पाहिजे, त्याचा प्रवाह कुठेही खंडित होता कामा नये.तसे करणे म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध जाणे आहे. अशी जपानी माणसाच्या मनाची धारणा आहे. जीवन भंगुर आहे.जे जे उत्पन्न झाले ते शेवटी लयाला जाणार आहे.हे सत्य, जे मला कळते, तुम्हाला कळते, ते न कळण्या इतका जपानी माणूस वेडा आहे का? शांताबाई म्हणतात माझ्या लहानपणी घरात जाते होते.आजी, मामी त्या जात्यावर रोज दळण दळत.मुठभर धान्य आवर्जून मागे ठेवीत. मी विचारलं तर म्हणे,दळण संपवायचं नसतं. संपलं असं म्हणायचंही नसतं व लगेच ओवी पण ऐकवी , *दळण सरलं सरलं म्हणू कशी?* *सासर -माहेर भरल्या दोन्ही राशी!* *दळण सरलं सरलं म्हणू नाही* *पाहुण्या-रावळ्यांची वर्दळ सदा राही* थोडक्यात काय तर घर नेहमी भरलेलं असावं . रात्रीचे जेवण आटोपले की निदान कोरभर भाकर आई, आजी शिंकेवरच्या टोपलीत राखून ठेवत. टोपली कधी रिकामी राहू देत नसत. घरातलं जेवण संपता कामा नये ही भावना. कोणाच्या घरी गेलो तर तिथून निघतांना `जातो` म्हणत नाही `येतो`असे म्हणतो .घरातल्या माणसांनी `परत या हं!`असे म्हणूनच त्याला निरोप द्यायचा. म्हणजे येण्या जाण्याची प्रथा चालू राहावी त्यात खंड पडू नये ही त्यामागची भावना असते. घरी देव बसवल्यानंतर जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा त्यांनी देखील आपण `पुनरागमनाय च` या शब्दात निरोप देऊन स्नेहबंधनाचा धागा अतूट राखतो. `पुन्हा यायचे बरे का!` अशी प्रेमळ सूचना देवांना देतो. काहीही संपू नये, कशाचाही शेवट होऊ नये ही जी भावना आपल्या मनात खोलवर रुजलेली आहे तिचा परिणाम आपल्या दैनंदिन भाषेवरही कसा झाला आहे ते बघण्याजोगे आहे.`दिवा मालवा` असे कधी म्हणत नाही. `दिव्याला निरोप द्या` असे म्हणतो. निरोपामागे तो उद्या पुन्हा घरात तेवणारच आहे हा दृढ विश्वास. बांगड्या फुटल्या, कुंकू पुसले असे अभद्र शब्द न काढता बांगड्या वाढवल्या, कुंकू वाढवले असे म्हणायचे. अन्त नाकारण्याची आणि जीवनाचे सातत्य मानण्याची ही कल्पना आपल्याला इतकी का बरे महत्त्वाची वाटावी? पौर्वात्य मन हे खरोखरीच जीवनाच्या सातत्याबद्दल निःशंक असेल का? ते काही असो संकेत मात्र फार सुंदर मनाला धीर व दिलासा देणारा आहे .त्यामुळे आजीच्या ओवीतही अंधश्रद्धा नसून जीवनाविषयीचे खोल शहाणपण आणि स्वीकारशीलता त्यात सामावलेली आहे असे वाटते. *`दळण सरलं सरलं म्हणून कशी`!* जीवनाचे हे जाते असेच अविरत फिरत राहणार आहे. तर असे एकापेक्षा एक सरस लेख.खूप सुंदर. धन्यवाद! ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    ‘तिळा उघड’चा मंत्र देऊन बहुमोल अनुभवांची गुहा खुले करणारे ललित लेख… विख्यात गीतकार आणि ललित लेखिका शांता शेळके यांना स्तंभलेखनाची आवड आहे आणि त्यांच्या स्तंभलेखनाची आजवर अनेक पुस्तके निघाली आहेत. ‘रंगरेषा’ हे नवे पुस्तक म्हणजे केसरीच्या रविवारी पुरणीत त्यांनी त्याच नावाने जे सदर चालवले होते, त्यात आलेल्या २९ लेखांचे संकलन आहे. प्रास्ताविकात त्यांनी म्हटले आहे, ‘‘ दैनंदिन जीवनातील अनेक लहानमोठ्या घटना, वेगवेगळ्या वृत्तिप्रवृत्तींच्या माणसांशी या ना त्या कारणाने होणाऱ्या भेटी आणि संवाद, निसर्गाच्या अनेक भाववृत्ती, नित्याच्या वाचनातून मनावर होणारे संस्कार, या साऱ्यांमधून मला सदर लेखनासाठी विषय सुचतात. जे इतर कोणत्याच साहित्यरूपाने प्रकट होऊ शकत नाही, असे बरेचसे काही व्यक्त करण्यासाठी सदर लेखनासारखे अन्य माध्यम नाही असा माझा अनुभव आहे. शांताबार्इंचे वाचन संस्कृत, प्राकृत, इंग्रजी, उर्दू, मराठी असे सार्वदेशीय आहे; त्यांचे लोकसाहित्यातील अवगाहन अफाट आहे, पाठांतरही विस्मयकारक आहे. पत्रकारिता-लेखन-प्रकाशन-कार्यक्रम या निमित्ताने अमाप मित्रपरिवार आणि चाहत्यांचा वर्ग त्यांना लाभला आहे. नवीन प्रवाहांशी कौतुकाने त्या सलगी करतात परंतु आपल्या मूळ स्मरणरंजनाशी त्यांच्या निष्ठा अविचल आहेत. एकूण भूमिका आस्वादकाची असल्याने आपल्या प्रौढत्वीही त्यांनी आपले शैशव मनोभावे जपले आहे. शांताबाई गोष्टीवेल्हाळ आहेत; गप्पांचा त्यांना कंटाळा कधी येत नाही. त्यामुळे त्यांच्या ललित लेखांमधून त्या आपल्याशी मोकळ्या मनाने गप्पा मारत आहेत असेच जाणवत राहते; आणि त्यांच्या विविध विषयांवरील आत्मीयतेच्या टीकाटिपणीने आपल्या रसिकतेच्या कक्षा अलगदपणे विस्तारत जातात. मग एखादा हायकूही त्यांच्या स्पर्शाने आपल्या लेखी परीसाचे काम करून आपल्या भावजीवनाला सुवर्णाची झळाळी आणतो. शांताबार्इंच्या लेखनाचे जे चहाते आहेत, ते त्यांच्या शब्दांच्या परीसस्पर्शासाठी असे आतुर असतात, ते उगाच नव्हे. नेहमीच्या चिरपरिचित गोष्टींनाही शांताबाई आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या वलयाने अलीबाबाच्या गुहेतील अमाप खजिन्याची श्रीमंती बहाल करतात. ‘रंगरेषा’मधील लेख वाचतानाही या त्यांच्या किमयेची प्रचीती येते. लेखांचे विषय तसे नेहमीचेच आहेत, पण त्याकडे पाहण्याची शांताबार्इंची जी दृष्टी ती वेगळी आहे; त्यामुळे खरी मजा येते. वाङ्मयीन संदर्भांनी त्यांचे सारे लेखन दुथडी भरून वाहन असते. आत्मचरित्रात्मक व व्यक्तिपरिचयात्मक उल्लेखही सतत येतात. सहजपणे येतात. विषय नेहमीचे म्हणजे काय? तर या संग्रहातल्या काही लेखांची शीर्षकेच त्याबद्दल सांगतील. पेशवेकालीन पुणे, मैत्रीचे निकष आणि मर्यादा, शब्दांची गंमत-गमतीचे शब्द. नातेसंबंध-जुने आणि नवे, रिमझिम पाऊस पडतो बाई, जुनी फाईल, बातमीचा बळी (डायनाचा मृत्यू), इ. आणि आपल्याच जीवनातील काही आठवणींना उजाळा देणारे प्रसंग व व्यक्तिविशेष टिपणारे लेख उदा. सेन्सॉर बोर्डाचे दिवस, बिऱ्हाडकरू, आजीची ताटली लोटी, लेखक असल्यामुळे, प्रतिबिंब (फोटो काढण्याचे अनुभव), जीवनाविषयी थोडेसे, इ. लेखनाने पैसा फारसा मिळत नाही. लेखनाने आपल्याला फारसे द्रव्य दिलेले नाही, फारसे निर्मितीचे समाधानही अजून लाभलेले नाही; आपल्या लेखनातील उणिवा व कलात्मक मर्यादा यांची आपल्याला जाण आहे, असे शांताबाई म्हणतात. ‘‘मी सर्वसामान्य माणूस आहे आणि कधी कधी थोडीशी लेखक आहे, हीच माझी माझ्यापुरती स्वत:शी असलेली ओळख (आयडेंटिटी) आहे.’’ असेही त्या सांगतात. व्यवसाय म्हणून लेखनाचा मार्ग स्वीकारल्यामुळे आपण ‘केवळ कलानिर्मितीसाठी एकाग्र, व्रतस्थ आणि उग्र साधना करणाऱ्या ‘‘थोर लेखकांपैकी नाही हेही त्या कबूल करतात. परंतु लेखन ही माझ्या जीवनातली आनंदाची गोष्ट आहे आणि लिहिताना मला जे समाधान लाभते तीच माझ्या लेखनाची फलश्रुती आहे... पानेच्या पाने लिहिणे, डोळे-हात-मान दुखेपर्यंत लिहिणे ही माझी गरजच आहे, केवळ मानसिक नव्हे तर शारीरिकसुद्धा.’’ अशी त्यांची श्रद्धा आहे. आपल्या लेखनाला दाद देणारे वाचक त्यांना भेटतात; त्याबद्दल त्यांना मोठा आनंद वाटतो. कुणाशी तरी आपला सूर जुळतो याचे समाधान मिळते. वाचक-लेखक जवळीक हा प्रकार उभयपक्षी आनंददायक असतो. कधी कधी त्यामुळे अनेक जण आपल्या आयुष्यातले पेचप्रसंग सांगायलाही त्यांच्याकडे येतात. ‘‘तुम्ही माझ्या जीवनावर एक कादंबरी लिहा. नाहीतर झकास नाटकच लिहून टाका. बेफाम होईल बघा...’’ असाही कोणी पाठपुरावा करतात. पेशवेकालीन पुण्याचे वर्णन प्रा. चिं. ग. भानू यांच्या शृंगेरीची लक्ष्मी या कादंबरीच्या आधारे त्या करतात, आणि सवाई माधवरावाच्या काळातील पुण्यातील रंगढंग आणि श्रीमंती याकडे लक्ष वेधतात. त्यावेळी सराफ कट्ट्याजवळच्या शाक्ताश्रमात नेमनिष्ठ ब्राह्मण ताडी प्यायला जात असाही प्रसंग त्या कादंबरीत आहेत; आणि लक्ष्मी ही नायिका गाण्याद्वारे अर्थार्जन करीत असली तरी शृंगेरी धर्मपीठाला ती बहुतांश कमाई देते असे दाखवले आहे. य. गो. जोशी यांच्या ‘हेमगर्भाची मात्रा’ या कथेची नायिका आसन्नमरण व्यक्तीला हेमगर्भाची मात्रा देऊन बरे करते. ती तशा मृत्युशय्येवर असणाऱ्या व्यक्तींच्या शोधातच राहते. हे शांताबार्इंना चमत्कारिक वाटते. तिच्याजवळ अभिमान वाटावा अशी हेमगर्भाची मात्रा हीच एक वस्तू आहे; आणि आपला अहंकार वा प्रतिमा हेमगर्भाच्या मात्रेची मालकीण म्हणूनच तिला मिरवणे शक्य होते. त्यावरून आपल्या इगोसाठी लोक काय काय करतात याबद्दलचे विवेचन शांताबाई करतात. काहीशा खोडकर-खट्याळपणे त्या म्हणतात, ‘‘आपला इगो टांगून ठेवण्यासाठी लोक कसल्या ना कसल्या खुंट्या बनवतात. जन्मभर जपत राहतात.’’ तर काही माणसे अहंकार दुखावला गेल्यामुळे जन्मभर कडवटपणे प्रत्येक गोष्टीवर टीकेचा भडिमार करीत राहतात. इतरांची टवाळी करीत राहतात; कुत्सित बोलत राहतात. आपले जिवलग मित्रही काही वेळा मानसिक आधार देण्याऐवजी मत्सराच्या पोटी भांडणे, चिडचिडेपणा, आक्रस्ताळेपणा यांच्या आहारी जातात. शांताबाई त्यावर भाष्य करतात, ‘‘जगामध्ये सारेच काही सुंदर, विलोभनीय नसते. इथे हेवेदावे आहेत, असूया आहे. मत्सर आहे. कुजकेपणा आहे. जे दुसऱ्याला मिळाले ते मला मिळाले नाही, कदाचित माझी लायकी त्याच्यापेक्षा जास्त असूनही मिळाले नाही या जाणिवेमुळे मनातून उमटणारे असंतोषाचे फणकारे आहेत. सारे काही आहे आणि मुख्य म्हणजे आपणांपैकी कुणीही साऱ्या मनोविकारांवर प्रभुत्व मिळवून स्थितप्रज्ञतेच्या पदवीला पोचलेला नाही. पण म्हणून तर मैत्रीचे महत्त्व, प्रेमाचे महत्व. त्याचा बळी देऊन मिळवावे इतके मोलाचे आणि आनंददायक असे दुसरे काही नाही. अगदी आपले आत्मप्रेमसुद्धा.’’ –असा आपुलकीचा सल्लाही या लेखांमध्ये सहजपणे मिळत राहतो. म्हणून हा लेखसंग्रह सतत जवळ ठेवायला हवा. शांताबार्इंचे मित्रपण त्यांच्या प्रत्येक लेखांतून आपल्याला साद घालत राहते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more