* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RANGRESHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662528
  • Edition : 5
  • Publishing Year : FEBRUARY 1999
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
I HAVE ALWAYS LOVED WRITING FROM NEWSPAPERS. MANY SMALL EVENTS IN DAILY LIFE, MEETINGS AND INTERACTIONS WITH PEOPLE OF DIFFERENT ATTITUDES, MANY EMOTIONS OF NATURE, VARIOUS RITUALS THAT ARE INSTILLED IN THE MIND THROUGH DAILY READING - FROM THESE SOURCES, I SUGGEST TOPICS FOR WRITING. IT IS MY EXPERIENCE THAT THERE IS NO OTHER MEDIUM LIKE WRITING TO EXPRESS MUCH THAT CANNOT BE EXPRESSED IN ANY OTHER FORM OF LITERATURE.
वृत्तपत्रांतून सदरलेखन करणे मला नेहमीच आवडत आले आहे. दैनंदिन जीवनातील अनेक लहानमोठ्या घटना, वेगवेगळ्या वृत्तिप्रवृत्तींच्या माणसांशी या ना त्या कारणाने होणाया भेटी आणि संवाद, निसर्गाच्या अनेक भाववृत्ती, नित्याच्या वाचनातून मनावर होणारे विविध संस्कार – या सायांमधून मला सदरलेखनासाठी विषय सुचतात. बरेचसे काही, जे इतर कोणत्याच साहित्यरूपाने प्रकट होऊ शकत नाही, ते व्यक्त करण्यासाठी सदरलेखनासारखे अन्य माध्यम नाही, असा माझा अनुभव आहे....
एफ.आय.पी पुरस्कार २०००
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating Starसौ अपर्णा अनंत मिसे, ठाणे पश्चिम

    नमस्कार मंडळी, केसरी ह्या वृत्तपत्रात श्रीमती शांताबाई शेळके "*रंगरेषा*" हे सदर लिहीत असत. वृत्तपत्रातील असे सदर वाचकांना दैनंदिन जीवनातील लहान मोठ्या घटना,वेगवेगळ्या वृतीप्रवृत्तीच्या माणसांशी या ना त्या कारणाने होणाऱ्या भेटी आणि संवाद,निसर्गाच्या अेक भाववृत्ती, नित्याच्या वाचनातून मनावर होणारे संस्कार, याबद्दल लेखिकेला आलेल्या अनुभवांचे साहित्य रूपाने प्रकटीकरण आहे.हे सगळे ललित लेख शांताबाई सारख्या भाषेवर प्रभुत्व असलेल्या लेखिकेने लिहिले आहेत. त्यामुळे सगळ्या लेखांना शांताबाई या नावाचा परीसस्पर्श झाला आहे.सगळेच लेख अत्यंत वाचनीय आहेत. या सदरात *29* ललित लेख आहेत. संग्रहातील काही लेखांचा संक्षिप्त परिचय करून देत आहे. परिचय मी त्यांच्याच शब्दांमध्ये करून देत आहे. लेखातील अनेक वाक्ये उद्धृत करण्यामागे उद्देश्य हा की, लेखातील गोडवा अन् शब्द सौंदर्य कायम राहावे असा आहे. *घटातील पोकळी* नववर्षाच्या शुभेच्छा निमित्त एक ग्रीटिंग कार्ड आले.त्यावरील चित्राने मन वेधून घेतले. ओल्या मातीचा गोळा चाकावर घालून कुंभार त्याला मडक्याचा आकार देत आहे. असं ते चित्र होतं. त्याहीपेक्षा कार्डाच्या आतल्या बाजूला असलेला मजकूर अर्थपूर्ण वाटला.त्याचा आशय असा होता, मातीच्या गोळ्यापासून मडके तयार होते.पण मडक्याचा खरा अर्थ म्हणजे आतील पोकळी. मडक्याचा देह हा खापराचा असतो.ही त्याची व्यावहारिक उपयुक्ततता पण मडक्याच्या आतील पोकळी हा त्याचा आत्मा आहे. तो त्याचा जीवनाशय आहे. पोकळी म्हणजे शून्य.शून्य या शब्दाला आपल्या अध्यात्मात विशिष्ट महत्त्व आहे. शून्य आणि पूर्ण दोघांचा अर्थ एकच मानला जातो.पूर्णातून पूर्ण वजा केले तरी पूर्णच राहते. अशा अर्थाचा एक श्लोक आहे *`पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते`* शून्यातून शून्य वजा केले तरी शून्यच येते. या शून्याची एक गंमतच आहे. म्हटले तर ते अगदी लहान असते. आणि म्हटले तर ते साऱ्या विश्वाला गवसणी घालण्याइतके विराटही होते. प्रारंभी एकाच व्यक्तीच्या ठायी केंद्रित असणारे प्रेम साऱ्या विश्वापर्यंत पसरत जाणे. याचेच नाव अध्यात्म. शांताबाईंनी जिगर मुरादाबादी यांचा एक शेर येथे दिला आहे. *इस लफ्जे मुहब्बतका* *इतनाहि फसाना हैं* *सिमटे तो दिले -आशिक* *फैले तो जमाना हैं !* शेराचा अर्थ - प्रेमाच्या एका शब्दाची इतकीच कहाणी असते.ते संकुचित झाले तर प्रिय व्यक्तीच्या हृदयात सामावून राहते. आणि त्याचा विस्तार झाला तर ते साऱ्या विश्वाला व्यापून टाकते. ते प्रेम म्हणजेही आपल्या अध्यात्माने सुचवलेले घटातील पोकळी आणि बाहेरचे अंतराळ यांचे अभिन्नत्वच! सर्वसामान्य माणसाजवळ प्रेम करण्याची ताकद असते. एकमेकांच्या गरजा जाणून घेतो. एकमेकांच्या साहाय्याला धावून जातो. ज्याची जितकी कुवत असेल तितका तो स्वतःची प्रगती करून घेतो.आणि मला वाटते हेच आपल्यासारख्यांना उमगणारे अध्यात्म. याहून वेगळे अध्यात्म आपल्याला कधी भेटणार नाही आणि आपल्याला त्याची आवश्यकताही नाही. *जीवनाविषयी थोडेसे* ज्याने *जीवन* हा प्रतिशब्द आयुष्यासाठी प्रथम वापरला तो माणूस मोठा रसिक व कल्पक असला पाहिजे. पाण्यालाही संस्कृतमध्ये जीवन म्हणतात. आणि मानवी जीवन पाण्यासारखेच असते. एकदा बादशहाने बिरबलाला विचारले, क्षणभरही न थांबता रात्रंदिवस अखंड चालू राहणारी गोष्ट कोणती? बिरबलाने उत्तर दिले ,अशी गोष्ट म्हणजे, सावकाराचे व्याज. मला वाटते बादशहाच्या प्रश्नाला बिरबलाने मानवी जीवन असे उत्तर दिले असते, तरी ते तितकेच समर्पक ठरले असते. काळ कोणासाठी थांबत नाही तो सुखाचा असो या दुःखाचा. सुख भोगतांना माणूस म्हणतो `हे सुखाचे दिवस हा हा म्हणता संपणार आहेत बरे!` आणि दुःखातही तो स्वतःला दिलासा देतो,`हे ही दिवस आज ना उद्या निघून जातील ते कायमचे राहणार आहेत थोडेच?` म्हणजे काय तर जीवनाची अखंडितता आणि त्याची गतिमानता या दोन्ही गोष्टी ध्यानात घेऊनच माणसाने जगायला शिकले पाहिजे. *जीवित म्हणजे असंख्य क्षणांचा गुंफलेला एक सुंदर हार आहे.* प्रत्येक क्षण मागच्या क्षणाला जबाबदार असतो. लोकमान्य टिळकांची एक कथा बहिणाबाईंनी दिली आहे. ती अशी की प्लेगच्या साथीत लोकमान्यांच्या मुलाचे निधन झाले.त्यावेळी मुलाला ते स्मशानात पोचवून आल्यावर लगेचच केसरीचा अग्रलेख लिहायला बसले. पुत्रशोकाच्या अथांग सागराचे एका घोटात आचमन घेऊन त्यांनी जीवनातील नित्याची कर्तव्ये करावयास प्रारंभ केला. स्थितप्रज्ञ वृत्तीचे मर्म कसे आत्मसात केले होते हेच ही कथा आपल्याला सांगत नाही काय?शेवटी काय खेळ चालू राहिला पाहिजे.मग तो रंगमंचावरचा असो, की जीवनाच्या मंचावरचा असो! *खुंट्या ईगो टांगण्यासाठी*. एका वाड्यात एक बाई राहत असे. ती मरतांना तिने तिच्या मुलीला हेमगर्भाची मात्रा दिलेली असते. ही मात्रा माणूस अगदी आसन्नमरण झाला म्हणजे त्याला उगाळून चाटवितात .की त्याचं मरण काही चार, दोन मिनिटे लांबवता येते. एवढाच या मात्रेचा उपयोग. पण ज्या बाईजवळ ही मात्रा असते तिला त्याचा भयंकर अभिमान. बिऱ्हाडात कुणी आजारी पडले, अत्यवस्थ झाले की ही मागला पुढला विचार न करता खुशाल सांगते, काही काळजी करू नका बरं का! तशीच जर वेळ आली ना तर माझ्याजवळ हेमगर्भाची मात्रा आहे. अगदी संकोच न करता मागा. हिला कुणाच्या आजाराचा ओझरता सुगावा लागला तरी त्या घराभोवती घारीसारख्या घिरट्या घालत राहते. काय म्हणावं या बाईला ?कसला तो अहंकार! माणसांच्या अहंकाराचे इतके गमतीदार प्रकार बघायला मिळतात . एक बाई तर आपली निवड एकदमच भारी हे सांगण्यासाठी मला बाई,माझ्या नवऱ्याने काहीही आणलेले मला आवडत नाही. एक मनुष्य त्याला वाटते, आपण खूपच मार्मिक व विनोदी बोलतो. खूप श्रवणीय बोलतो.ते गृहस्थ प्रत्येक शब्दावर कोट्या करतात. कोणी हसो ना हसो स्वतःच मोठ मोठ्याने असतात. खरंच माणसं स्वतःची अशी प्रतिमा का तयार करतात? वास्तविक आपण कोण? आपली कुवत किती आहे.हे ज्याचे त्याला पक्के ठाऊक असते. मानसशास्त्राचा असा एक सिद्धांत आहे की, अहंकार हे न्यूनगंडाचेच एक वेगळे रूप असते. या कॉम्प्लेक्सने पछाडलेली माणसे मग आपला अहंकार जोपासण्यासाठी खरे, खोटे आधार निर्माण करतात.आपला ईगो टांगून ठेवण्यासाठी कसल्या ना कसल्या खुंट्या बनवतात. त्या खुंट्या जन्मभर जपत राहतात. *दळण सरलं सरलं म्हणू कशी?* जपानमध्ये जेव्हा एखादे घर बांधतात तेव्हा त्या घरामध्ये एक, दोन विटांची जागा रिकामी ठेवतात. हे असे करण्याचे कारण काय?तर घर अपुरे राहावे. त्याची बांधणी पूर्ण करू नये. कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला नेणे म्हणजे ती संपवणे. काही संपवणे, कशाचा शेवट करणे म्हणजे जीवनाचाच अंत करणे अशी काहीशी त्यांची यामागची कारणपरंपरा आहे. जीवनाचे सातत्य कायम राहिले पाहिजे, त्याचा प्रवाह कुठेही खंडित होता कामा नये.तसे करणे म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध जाणे आहे. अशी जपानी माणसाच्या मनाची धारणा आहे. जीवन भंगुर आहे.जे जे उत्पन्न झाले ते शेवटी लयाला जाणार आहे.हे सत्य, जे मला कळते, तुम्हाला कळते, ते न कळण्या इतका जपानी माणूस वेडा आहे का? शांताबाई म्हणतात माझ्या लहानपणी घरात जाते होते.आजी, मामी त्या जात्यावर रोज दळण दळत.मुठभर धान्य आवर्जून मागे ठेवीत. मी विचारलं तर म्हणे,दळण संपवायचं नसतं. संपलं असं म्हणायचंही नसतं व लगेच ओवी पण ऐकवी , *दळण सरलं सरलं म्हणू कशी?* *सासर -माहेर भरल्या दोन्ही राशी!* *दळण सरलं सरलं म्हणू नाही* *पाहुण्या-रावळ्यांची वर्दळ सदा राही* थोडक्यात काय तर घर नेहमी भरलेलं असावं . रात्रीचे जेवण आटोपले की निदान कोरभर भाकर आई, आजी शिंकेवरच्या टोपलीत राखून ठेवत. टोपली कधी रिकामी राहू देत नसत. घरातलं जेवण संपता कामा नये ही भावना. कोणाच्या घरी गेलो तर तिथून निघतांना `जातो` म्हणत नाही `येतो`असे म्हणतो .घरातल्या माणसांनी `परत या हं!`असे म्हणूनच त्याला निरोप द्यायचा. म्हणजे येण्या जाण्याची प्रथा चालू राहावी त्यात खंड पडू नये ही त्यामागची भावना असते. घरी देव बसवल्यानंतर जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा त्यांनी देखील आपण `पुनरागमनाय च` या शब्दात निरोप देऊन स्नेहबंधनाचा धागा अतूट राखतो. `पुन्हा यायचे बरे का!` अशी प्रेमळ सूचना देवांना देतो. काहीही संपू नये, कशाचाही शेवट होऊ नये ही जी भावना आपल्या मनात खोलवर रुजलेली आहे तिचा परिणाम आपल्या दैनंदिन भाषेवरही कसा झाला आहे ते बघण्याजोगे आहे.`दिवा मालवा` असे कधी म्हणत नाही. `दिव्याला निरोप द्या` असे म्हणतो. निरोपामागे तो उद्या पुन्हा घरात तेवणारच आहे हा दृढ विश्वास. बांगड्या फुटल्या, कुंकू पुसले असे अभद्र शब्द न काढता बांगड्या वाढवल्या, कुंकू वाढवले असे म्हणायचे. अन्त नाकारण्याची आणि जीवनाचे सातत्य मानण्याची ही कल्पना आपल्याला इतकी का बरे महत्त्वाची वाटावी? पौर्वात्य मन हे खरोखरीच जीवनाच्या सातत्याबद्दल निःशंक असेल का? ते काही असो संकेत मात्र फार सुंदर मनाला धीर व दिलासा देणारा आहे .त्यामुळे आजीच्या ओवीतही अंधश्रद्धा नसून जीवनाविषयीचे खोल शहाणपण आणि स्वीकारशीलता त्यात सामावलेली आहे असे वाटते. *`दळण सरलं सरलं म्हणून कशी`!* जीवनाचे हे जाते असेच अविरत फिरत राहणार आहे. तर असे एकापेक्षा एक सरस लेख.खूप सुंदर. धन्यवाद! ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    ‘तिळा उघड’चा मंत्र देऊन बहुमोल अनुभवांची गुहा खुले करणारे ललित लेख… विख्यात गीतकार आणि ललित लेखिका शांता शेळके यांना स्तंभलेखनाची आवड आहे आणि त्यांच्या स्तंभलेखनाची आजवर अनेक पुस्तके निघाली आहेत. ‘रंगरेषा’ हे नवे पुस्तक म्हणजे केसरीच्या रविवारी पुरणीत त्यांनी त्याच नावाने जे सदर चालवले होते, त्यात आलेल्या २९ लेखांचे संकलन आहे. प्रास्ताविकात त्यांनी म्हटले आहे, ‘‘ दैनंदिन जीवनातील अनेक लहानमोठ्या घटना, वेगवेगळ्या वृत्तिप्रवृत्तींच्या माणसांशी या ना त्या कारणाने होणाऱ्या भेटी आणि संवाद, निसर्गाच्या अनेक भाववृत्ती, नित्याच्या वाचनातून मनावर होणारे संस्कार, या साऱ्यांमधून मला सदर लेखनासाठी विषय सुचतात. जे इतर कोणत्याच साहित्यरूपाने प्रकट होऊ शकत नाही, असे बरेचसे काही व्यक्त करण्यासाठी सदर लेखनासारखे अन्य माध्यम नाही असा माझा अनुभव आहे. शांताबार्इंचे वाचन संस्कृत, प्राकृत, इंग्रजी, उर्दू, मराठी असे सार्वदेशीय आहे; त्यांचे लोकसाहित्यातील अवगाहन अफाट आहे, पाठांतरही विस्मयकारक आहे. पत्रकारिता-लेखन-प्रकाशन-कार्यक्रम या निमित्ताने अमाप मित्रपरिवार आणि चाहत्यांचा वर्ग त्यांना लाभला आहे. नवीन प्रवाहांशी कौतुकाने त्या सलगी करतात परंतु आपल्या मूळ स्मरणरंजनाशी त्यांच्या निष्ठा अविचल आहेत. एकूण भूमिका आस्वादकाची असल्याने आपल्या प्रौढत्वीही त्यांनी आपले शैशव मनोभावे जपले आहे. शांताबाई गोष्टीवेल्हाळ आहेत; गप्पांचा त्यांना कंटाळा कधी येत नाही. त्यामुळे त्यांच्या ललित लेखांमधून त्या आपल्याशी मोकळ्या मनाने गप्पा मारत आहेत असेच जाणवत राहते; आणि त्यांच्या विविध विषयांवरील आत्मीयतेच्या टीकाटिपणीने आपल्या रसिकतेच्या कक्षा अलगदपणे विस्तारत जातात. मग एखादा हायकूही त्यांच्या स्पर्शाने आपल्या लेखी परीसाचे काम करून आपल्या भावजीवनाला सुवर्णाची झळाळी आणतो. शांताबार्इंच्या लेखनाचे जे चहाते आहेत, ते त्यांच्या शब्दांच्या परीसस्पर्शासाठी असे आतुर असतात, ते उगाच नव्हे. नेहमीच्या चिरपरिचित गोष्टींनाही शांताबाई आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या वलयाने अलीबाबाच्या गुहेतील अमाप खजिन्याची श्रीमंती बहाल करतात. ‘रंगरेषा’मधील लेख वाचतानाही या त्यांच्या किमयेची प्रचीती येते. लेखांचे विषय तसे नेहमीचेच आहेत, पण त्याकडे पाहण्याची शांताबार्इंची जी दृष्टी ती वेगळी आहे; त्यामुळे खरी मजा येते. वाङ्मयीन संदर्भांनी त्यांचे सारे लेखन दुथडी भरून वाहन असते. आत्मचरित्रात्मक व व्यक्तिपरिचयात्मक उल्लेखही सतत येतात. सहजपणे येतात. विषय नेहमीचे म्हणजे काय? तर या संग्रहातल्या काही लेखांची शीर्षकेच त्याबद्दल सांगतील. पेशवेकालीन पुणे, मैत्रीचे निकष आणि मर्यादा, शब्दांची गंमत-गमतीचे शब्द. नातेसंबंध-जुने आणि नवे, रिमझिम पाऊस पडतो बाई, जुनी फाईल, बातमीचा बळी (डायनाचा मृत्यू), इ. आणि आपल्याच जीवनातील काही आठवणींना उजाळा देणारे प्रसंग व व्यक्तिविशेष टिपणारे लेख उदा. सेन्सॉर बोर्डाचे दिवस, बिऱ्हाडकरू, आजीची ताटली लोटी, लेखक असल्यामुळे, प्रतिबिंब (फोटो काढण्याचे अनुभव), जीवनाविषयी थोडेसे, इ. लेखनाने पैसा फारसा मिळत नाही. लेखनाने आपल्याला फारसे द्रव्य दिलेले नाही, फारसे निर्मितीचे समाधानही अजून लाभलेले नाही; आपल्या लेखनातील उणिवा व कलात्मक मर्यादा यांची आपल्याला जाण आहे, असे शांताबाई म्हणतात. ‘‘मी सर्वसामान्य माणूस आहे आणि कधी कधी थोडीशी लेखक आहे, हीच माझी माझ्यापुरती स्वत:शी असलेली ओळख (आयडेंटिटी) आहे.’’ असेही त्या सांगतात. व्यवसाय म्हणून लेखनाचा मार्ग स्वीकारल्यामुळे आपण ‘केवळ कलानिर्मितीसाठी एकाग्र, व्रतस्थ आणि उग्र साधना करणाऱ्या ‘‘थोर लेखकांपैकी नाही हेही त्या कबूल करतात. परंतु लेखन ही माझ्या जीवनातली आनंदाची गोष्ट आहे आणि लिहिताना मला जे समाधान लाभते तीच माझ्या लेखनाची फलश्रुती आहे... पानेच्या पाने लिहिणे, डोळे-हात-मान दुखेपर्यंत लिहिणे ही माझी गरजच आहे, केवळ मानसिक नव्हे तर शारीरिकसुद्धा.’’ अशी त्यांची श्रद्धा आहे. आपल्या लेखनाला दाद देणारे वाचक त्यांना भेटतात; त्याबद्दल त्यांना मोठा आनंद वाटतो. कुणाशी तरी आपला सूर जुळतो याचे समाधान मिळते. वाचक-लेखक जवळीक हा प्रकार उभयपक्षी आनंददायक असतो. कधी कधी त्यामुळे अनेक जण आपल्या आयुष्यातले पेचप्रसंग सांगायलाही त्यांच्याकडे येतात. ‘‘तुम्ही माझ्या जीवनावर एक कादंबरी लिहा. नाहीतर झकास नाटकच लिहून टाका. बेफाम होईल बघा...’’ असाही कोणी पाठपुरावा करतात. पेशवेकालीन पुण्याचे वर्णन प्रा. चिं. ग. भानू यांच्या शृंगेरीची लक्ष्मी या कादंबरीच्या आधारे त्या करतात, आणि सवाई माधवरावाच्या काळातील पुण्यातील रंगढंग आणि श्रीमंती याकडे लक्ष वेधतात. त्यावेळी सराफ कट्ट्याजवळच्या शाक्ताश्रमात नेमनिष्ठ ब्राह्मण ताडी प्यायला जात असाही प्रसंग त्या कादंबरीत आहेत; आणि लक्ष्मी ही नायिका गाण्याद्वारे अर्थार्जन करीत असली तरी शृंगेरी धर्मपीठाला ती बहुतांश कमाई देते असे दाखवले आहे. य. गो. जोशी यांच्या ‘हेमगर्भाची मात्रा’ या कथेची नायिका आसन्नमरण व्यक्तीला हेमगर्भाची मात्रा देऊन बरे करते. ती तशा मृत्युशय्येवर असणाऱ्या व्यक्तींच्या शोधातच राहते. हे शांताबार्इंना चमत्कारिक वाटते. तिच्याजवळ अभिमान वाटावा अशी हेमगर्भाची मात्रा हीच एक वस्तू आहे; आणि आपला अहंकार वा प्रतिमा हेमगर्भाच्या मात्रेची मालकीण म्हणूनच तिला मिरवणे शक्य होते. त्यावरून आपल्या इगोसाठी लोक काय काय करतात याबद्दलचे विवेचन शांताबाई करतात. काहीशा खोडकर-खट्याळपणे त्या म्हणतात, ‘‘आपला इगो टांगून ठेवण्यासाठी लोक कसल्या ना कसल्या खुंट्या बनवतात. जन्मभर जपत राहतात.’’ तर काही माणसे अहंकार दुखावला गेल्यामुळे जन्मभर कडवटपणे प्रत्येक गोष्टीवर टीकेचा भडिमार करीत राहतात. इतरांची टवाळी करीत राहतात; कुत्सित बोलत राहतात. आपले जिवलग मित्रही काही वेळा मानसिक आधार देण्याऐवजी मत्सराच्या पोटी भांडणे, चिडचिडेपणा, आक्रस्ताळेपणा यांच्या आहारी जातात. शांताबाई त्यावर भाष्य करतात, ‘‘जगामध्ये सारेच काही सुंदर, विलोभनीय नसते. इथे हेवेदावे आहेत, असूया आहे. मत्सर आहे. कुजकेपणा आहे. जे दुसऱ्याला मिळाले ते मला मिळाले नाही, कदाचित माझी लायकी त्याच्यापेक्षा जास्त असूनही मिळाले नाही या जाणिवेमुळे मनातून उमटणारे असंतोषाचे फणकारे आहेत. सारे काही आहे आणि मुख्य म्हणजे आपणांपैकी कुणीही साऱ्या मनोविकारांवर प्रभुत्व मिळवून स्थितप्रज्ञतेच्या पदवीला पोचलेला नाही. पण म्हणून तर मैत्रीचे महत्त्व, प्रेमाचे महत्व. त्याचा बळी देऊन मिळवावे इतके मोलाचे आणि आनंददायक असे दुसरे काही नाही. अगदी आपले आत्मप्रेमसुद्धा.’’ –असा आपुलकीचा सल्लाही या लेखांमध्ये सहजपणे मिळत राहतो. म्हणून हा लेखसंग्रह सतत जवळ ठेवायला हवा. शांताबार्इंचे मित्रपण त्यांच्या प्रत्येक लेखांतून आपल्याला साद घालत राहते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more