DR.ATUL GAWANDE

About Author

Birth Date : 05/11/1965


DR. ATUL GAWANDE IS THE AUTHOR OF FOUR POPULAR BOOKS. COMPLICATIONS, WHICH WAS A NATIONAL BOOK AWARD FINALIST; BETTER, WHICH WAS SELECTED BY AMAZON.COM AS ONE OF THE TEN BEST BOOKS, AND THE CHECKLIST MANIFESTO IS HIS THIRD BOOK. HE IS A SURGEON AT BRIGHAM AND WOMENS HOSPITAL IN BOSTON, A WRITER FOR THE NEW YORKER, AND A PROFESSOR AT HARVARD MEDICAL SCHOOL AND THE HARVARD SCHOOL OF PUBLIC HEALTH.

डॉ. अतुल गवांदे हे चार लोकप्रिय पुस्तकांचे लेखक आहेत. कॉम्प्लिकेशन्स, जे पुस्तक नॅशनल बुक अ‍ॅवार्डच्या अंतिम फेरीसाठी निवडलं गेलं होतं; बेटर, ज्याची निवड अ‍ॅमेझॉन डॉट कॉमनं दहा सर्वोत्तम पुस्तकांमध्ये केली होती आणि द चेकलिस्ट मॅनिफेस्टो हे त्यांचं तिसरं पुस्तक. बोस्टनमधल्या ब्रिहॅम अ‍ॅन्ड विमेन्स हॉस्पिटल चे ते शल्यतज्ज्ञ आहेत, द न्यू यॉर्करचे ते लेखक आहेत आणि हॉर्वर्ड मेडिकल स्कूल आणि हॉर्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे ते प्राध्यापक आहेत. विज्ञानावर लिहिलेल्या लेखांमुळे त्यांना लेविस थॉमस प्राइझ मिळाले आहे. मॅकऑर्थर फेलोशिप आणि दोन नॅशनल मॅगझिन अ‍ॅवार्ड मिळाले आहेत. सामाजिक आरोग्याविषयी त्यांचा सहभाग : ते अरियाडने लॅब्स चे संचालक आहेत, जे आरोग्यप्रणालीच्या पुनर्निर्माणासाठीचं संयुक्त केंद्र आहे आणि लाइफबॉक्स या ना नफा, ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या शस्त्रक्रिया जगभर सुरक्षितपणे व्हाव्यात म्हणून कार्य करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते आणि त्यांची पत्नी कॅथलीन आपल्या तीन मुलांसोबत न्यूटन, मॅसॅच्युएट्स इथे राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
25 %
OFF
ATUL GAWANDE COMBO SET-4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1090 INR 819
BEING MORTAL Rating Star
Add To Cart INR 295
BETTER Rating Star
Add To Cart INR 295
JIV JITHE GUNTALELA Rating Star
Add To Cart INR 300
YASHPRAPTICHA JAHIRNAMA Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more