DR.ATUL GAWANDE

About Author

Birth Date : 05/11/1965


DR. ATUL GAWANDE IS THE AUTHOR OF FOUR POPULAR BOOKS. COMPLICATIONS, WHICH WAS A NATIONAL BOOK AWARD FINALIST; BETTER, WHICH WAS SELECTED BY AMAZON.COM AS ONE OF THE TEN BEST BOOKS, AND THE CHECKLIST MANIFESTO IS HIS THIRD BOOK. HE IS A SURGEON AT BRIGHAM AND WOMENS HOSPITAL IN BOSTON, A WRITER FOR THE NEW YORKER, AND A PROFESSOR AT HARVARD MEDICAL SCHOOL AND THE HARVARD SCHOOL OF PUBLIC HEALTH.

डॉ. अतुल गवांदे हे चार लोकप्रिय पुस्तकांचे लेखक आहेत. कॉम्प्लिकेशन्स, जे पुस्तक नॅशनल बुक अ‍ॅवार्डच्या अंतिम फेरीसाठी निवडलं गेलं होतं; बेटर, ज्याची निवड अ‍ॅमेझॉन डॉट कॉमनं दहा सर्वोत्तम पुस्तकांमध्ये केली होती आणि द चेकलिस्ट मॅनिफेस्टो हे त्यांचं तिसरं पुस्तक. बोस्टनमधल्या ब्रिहॅम अ‍ॅन्ड विमेन्स हॉस्पिटल चे ते शल्यतज्ज्ञ आहेत, द न्यू यॉर्करचे ते लेखक आहेत आणि हॉर्वर्ड मेडिकल स्कूल आणि हॉर्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे ते प्राध्यापक आहेत. विज्ञानावर लिहिलेल्या लेखांमुळे त्यांना लेविस थॉमस प्राइझ मिळाले आहे. मॅकऑर्थर फेलोशिप आणि दोन नॅशनल मॅगझिन अ‍ॅवार्ड मिळाले आहेत. सामाजिक आरोग्याविषयी त्यांचा सहभाग : ते अरियाडने लॅब्स चे संचालक आहेत, जे आरोग्यप्रणालीच्या पुनर्निर्माणासाठीचं संयुक्त केंद्र आहे आणि लाइफबॉक्स या ना नफा, ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या शस्त्रक्रिया जगभर सुरक्षितपणे व्हाव्यात म्हणून कार्य करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते आणि त्यांची पत्नी कॅथलीन आपल्या तीन मुलांसोबत न्यूटन, मॅसॅच्युएट्स इथे राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
25 %
OFF
ATUL GAWANDE COMBO SET-4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1090 INR 819
BEING MORTAL Rating Star
Add To Cart INR 295
BETTER Rating Star
Add To Cart INR 295
JIV JITHE GUNTALELA Rating Star
Add To Cart INR 300
YASHPRAPTICHA JAHIRNAMA Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more