* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A NEW EARTH
  • Availability : Notify Me
     
  • Translators : NILIMA JOSHI
  • ISBN : 9789387319974
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ECKHART TOLLE`S A NEW EARTH WILL BE A CORNERSTONE FOR PERSONAL SPIRITUALITY AND SELF-IMPROVEMENT FOR YEARS TO COME, LEADING READERS TO A NEW LEVELS OF CONSCIOUSNESS AND INNER PEACE. TAKING OFF FROM THE INTROSPECTIVE WORK THE POWER OF NOW, WHICH IS A NUMBER ONE BESTSELLER AND HAS SOLD MILLIONS OF COPIES WORLDWIDE, TOLLE PROVIDES THE SPIRITUAL FRAMEWORK FOR PEOPLE TO MOVE BEYOND THEMSELVES IN ORDER TO MAKE THIS WORLD A BETTER, MORE SPIRITUALLY EVOLVED PLACE TO LIVE. SHATTERING MODERN IDEAS OF EGO AND ENTITLEMENT, SELF AND SOCIETY, TOLLE LIFTS THE VEIL OF FEAR THAT HAS HUNG OVER HUMANITY DURING THIS NEW MILLENNIUM, AND SHINES AN ILLUMINATING LIGHT THAT LEADS TO HAPPINESS AND HEALTH THAT EVERY READER CAN FOLLOW.
एकदा का मनुष्याला आपल्या स्वत:मधल्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्याचं अवधान जागृत झालं की, स्वत:च्या ठिकाणचा दिव्यांश आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असलेली चेतना एक आहेत याची त्याला जाणीव होते. त्या जीवाविषयी त्याला प्रेम वाटू लागतं. जोवर हे घडत नाही तोवर बहुतेक लोक बाह्यरूपाकडे, मनोकायिक अस्तित्वाकडेच पाहतात. स्वत:च्या आणि आंतरिक चेतनेचं त्यांना भान नसतं. ज्यांना हे भान असतं त्यांना भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे काहीतरी अधिक आहे, याची जाणीव असते. बुद्ध, जीझस आणि अन्य अनाम आत्मे मनुष्य चेतनेच्या बहराची उमलण्याची साक्ष आहेत. त्यांनी मनुष्यजातीला दिलेल्या संदेशांचे आज विकृतीकरण झाले आहे. मनुष्यजातीची मनोरचना यांत्रिक झाली आहे. तिच्या जडतेतून चैतन्याचा प्रकाश आरपार जाऊन ती पारदर्शक होईल का? नाम, रूप, व्यक्तिमत्त्व, अहं यांच्या पिंजऱ्यातून ती मुक्त होईल का? या आंतरिक परिवर्तनाची गती कशी वाढवता येईल? अहं केंद्रित अशा चेतनेच्या प्राचीन काळापासून असलेल्या स्थितीला कसं ओळखायचं? नव्याने उदित होत असलेल्या मुक्त चेतनेची तरी खूण काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि सृष्टिविकासाला अनुकूल अशी नवी जीवनपद्धती या पुस्तकात सांगितली आहे. अहंकाराला दूर सारून चेतना जागरणाची सुरुवात करणं आणि स्वरूपाचा म्हणजे स्वत:चा शोध घेणं हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EARTH# ECKHART TOLLE# EGO BETTER LIFE# SPIRITUALITY# RELIGION# TRANSFORMATION# INNER BODY# FORGETFULNESS# PEACE# HUMANITY# MATERIALITY# TRUE IDENTITY# PAIN-BODY# HAPPINESS# PARENTING# A NEW EARTH# AVANI EK NAVI# NILIMA JOSHI# मानवी चेतना# आध्यात्मिकता# धर्म# अहंता# अहंकार# तादात्म्यता# अस्तित्व# व्यथाशीर# भावना# स्वरूपाचा शोध# जागृत चेतना# मानवाचा स्थायीभाव# शांती# आतील अस्तित्वाची जाणीव# नवी चेतना# नवी धरा# मनुष्य जातीची विकृती# स्वामित्वाचा भ्रम# नीलिमा जोशी# अवनी एक नवी# एकहार्ट टोले# अ न्यू अर्थ#
Customer Reviews
  • Rating StarlOKPRABHA - 24-09-2021

    स्व-शोधाचा मार्ग... मन एकाग्र करण्यात षड् रिपूंमुळे अडचणी येतात. या षड् रिपूंमधील एखादा विकारसुद्धा माणसाला शांतता, स्वस्थता आणि आरोग्य लाभू देत नाही. हे सर्वच विकार मानवाच्या ठायी मोठ्या प्रमाणात असतील, तर त्याचे जीवन नरकयातनांनी भरून जाते, यात शंकच नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या विकारांना दूर सारणे सोपे नसले, तरी ते अशक्य नक्कीच नाही. ‘अवनी एक नवी’ या पुस्तकात लेखक एकहार्ट टोले हेच सांगू पाहतात. चेतना जागरणाचा प्रारंभ करण्यास आणि स्वत:चा शोध घेण्यास हे पुस्तक प्रवृत्त करते. पुस्तकात एकूण १० प्रकरणे आहेत. ज्याला इथे संवाद म्हटले आहे. या वेगवेगळ्या संवादांत मनुष्याच्या दु:खाचे मूळ म्हणजेच षड् रिपू आणि त्यांच्याशी निगडित प्रसंग मांडले आहेत. त्यातून संदेश दिले आहेत. अस्मिता म्हणजे ‘मी पणा’ची जाणीव. परंतु, मीपणा हे आध्यात्मिक दृष्टीने अज्ञान आहे. आपण जेव्हा मी या शब्दाचा उपयोग करतो, तेव्हा बहुतेक वेळा आपला अहंकारच बोलत असतो. प्रत्येक व्यक्तीचा अहंकार स्वतंत्र असतो, असे लेखक सांगतात. आपल्या दु:खाचे, अस्वस्थतेचे मूळ अहंकारात आहे. ‘अहंकार असतो तरी कसा?’ याचा सविस्तर ऊहापोह करत लेखकाने अहंकाराची विविध रूपं आपल्यासमोर उलगडली आहेत. ‘अहंकाराची व्याधी रूप’, ‘अहंकार आणि कीर्ती’, ‘व्याधिग्रस्त अहंकार’, ‘अहंकारासहित कर्म आणि अहंकाररहित कर्म’ अशा कित्येक पाठांतून आपल्यातील अहंकाराची जाणीव, ओळख लेखकाने करून दिली आहे. अहंकार दूर करण्यासाठी महत्त्वाची आहे ती जाणीव, स्वत:ची, स्व-अस्तित्वाची. मानवाला एकदा आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली, त्याचं अवधान जागृत झालं, की स्वत:तील दिव्यांश आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असलेली चेतना एक आहेत, याचे आकलन त्याला होते. त्या जीवाविषयी त्याला प्रेम वाटू लागते. जोवर हे घडत नाही तोवर बहुतेक लोक बाह्यरूपाकडे, मनोकायिक अस्तित्वाकडेच पाहतात. स्वत:च्या आणि आंतरिक चेतनेचे त्यांना भान नसते. आपण सदाचारी होण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र जोवर चेतनेचे परिवर्तन होत नाही. तोपर्यंत प्रयत्न यशस्वी होत नाहीत. ज्यांना हे भान असते त्यांना भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे काहीतरी अधिक आहे, याची जाणीव असते. ही जाणीव जागृत करण्याचे काम अनेक संत महात्म्यांनी केले आहे. त्याचीही शिकवण पुस्तकात ओघाने येते. उपनिषदे, बौद्ध वाङ्मय, चिनी अध्यात्म, जे. कृष्णमूर्ती आणि खिस्त साधना या सर्वांचे संदर्भ लेखकाने दिले आहेत. त्यातून त्यांचा इतर धर्मांचा सखोल अभ्यास दिसून येतो. जुन्या काळापासून जपलेल्या आणि जागृत असलेल्या प्रत्येकाच्या सूक्ष्म शरीरातल्या नकारात्मक भावनांना लेखकाने व्यथाशरीर हे नाव दिले आहे. हे सांगतानाच लेखक आपल्या अशांत मनातील वेदना संपवण्याचा मंत्र देतात. सृष्टी विकासाला अनुकूल अशी नवी जीवनपद्धती या पुस्तकात सांगितली आहे. अहंकाराला दूर सारून चेतना जागरणाची सुरुवात करणे आणि स्वरूपाचा म्हणजे स्वत:चा शोध घेणे हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. पुस्तकाचा अनुवाद नीलिमा जोशी यांनी केला आहे. लेखकाचे मुद्दे अथवा प्रेरणा तितक्याच प्रभावीपणे आणि परिपूर्ण शब्दांत त्यांनी मांडल्या आहेत. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 29-07-2018

    सध्याच्या धावपळीत जगात आपण नको तितका विचार करतो, नको तेवढ्या गोष्टींच्या मागे धावतो आणि जगण्यातील निखळ आनंद हरवून बसतो. लोक आपल्याला काय म्हणतील? मित्र, कुटुंब आणि शेजारच्यांच्या तुलनेत आपण कुठे, कसे आहोत, याचा विचार करतो आणि आत खोलवर कुठेतरी आपल्याल चिंता वाटते, की जसे आपण इतरांच्या दृष्टीत असायला हवे, तसे नाही आहोत की काय? हे पुस्तक स्वत:चा शोध घ्यायला लावते. प्रसन्नतेचे आणि मुक्तपणे जीवन जगायला लावण्याची सवय त्यामुळे लागेल. ‘जाऊ या उन्नत जगाकडे’ हा मंत्र लेखकाने अधोरेखित केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more