* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A BEND IN THE GANGES
  • Availability : Available
  • Translators : SHRI J JOSHI
  • ISBN : 9789357200202
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2023
  • Weight : 375.00 gms
  • Pages : 320
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"INDIA, 1939. GIAN, A GANDHIAN PACIFIST, COMMITS A MURDER; DEBI-DAYAL, AN ARDENT REVOLUTIONARY, IS CAUGHT WHILE SETTING FIRE TO A BRITISH PLANE. BOTH MEN ARE SENT TO THE ANDAMANS PENAL COLONY. IN THE BEEHIVE LIFE OF THE PRISON, THEY WORK IN OPPOSITE CAMPS-PRO-BRITISH AND ANTI-BRITISH. DURING WORLD WAR II, WHEN THE JAPANESE TAKE OVER THE ISLANDS, ALL THE CONVICTS SUDDENLY FIND THEMSELVES FREE. GIAN AND DEBI MANAGE TO RETURN TO INDIA ONLY TO GET SUCKED INTO THE VIOLENCE OF PARTITION. AN EPIC SAGA OF A NATION IN TRANSITION, A BEND IN THE GANGES, NOW AVAILABLE IN A STUNNING NEW EDITION, DEPICTS THE CATACLYSMIC EVENTS LEADING UP TO PARTITION AND THE CONFLICT THAT ARISES BETWEEN IDEOLOGIES OF VIOLENCE AND NON-VIOLENCE "
"1939 चा भारत. गांधीवादी शांततावादी ग्यान भाऊबंदकीतून खून करतो; प्रखर क्रांतिकारक देबीदयाळ ब्रिटिश विमानाला आग लावली म्हणून पकडला जातो. दोघांना अंदमानच्या सेल्युलर जेल मध्ये नेलं जातं. तुरुंगातील जीवनात त्यातील एक ब्रिटीश समर्थक आणि एक ब्रिटिश विरोधी अशा विरुद्ध छावण्यांमध्ये काम करतात. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, जपानी लोक बेटांचा ताबा घेतात तेव्हा सर्व दोषी अचानक मुक्त होतात. जेल मधून सुटतात आणि फाळणीच्या हिंसाचारात अडकण्यासाठी ग्यान आणि देबी भारतात परत येतात. फाळणीपर्यंतच्या आपत्तीजनक घटना, हिंसा आणि अहिंसेच्या विचारसरणींमध्ये उद्भवलेला संघर्ष यांचे चित्रण या कादंबरीत आहे. मनोहर माळगोनकर यांची अभिजात साहित्यकृती आणि पाच दशकांहून अधिक काळापासून बेस्ट सेलर असणाऱ्या अ बेंड इन गंगा या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद इथे थबकली गंगामाई. संक्रमणावस्थेत असलेल्या राष्ट्राची महाकथा.. आता नव्या स्वरूपात उपलब्ध आहे. "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #श्रीजजोशी #मनोहरमाळगोनकर #कादंबरी #अनुवाद #क्लासिक #इतिहास #फाळणी #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE #MANOHARMALGONKAR #SHRIJJOSHI #FICTION #TRANSLATION
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more