* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NIYATI
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618316
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 1986
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MADHAVI DESAI COMBO 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A LONG PATH STRETCHES BEFORE THE EYES. MEANDERING THROUGH THE GREEN FOLIAGE – LONELY! BUT THEN LIFE IS LIKE THAT. THE PATH BECKONS – WITH ITS SCENTS AND SOUNDS. TREES OFFER SHADE. BIRDS SING. STREAMS BURBLE. THE SKY – SOMETIMES OFFERS SHADE, WITH LOVE AND AFFECTION; SOMETIMES SCORCHES. ONE FINDS COMPANIONSHIP; WHICH SOMETIMES BREAKS. ULTIMATELY, MAN IS ALONE…ABSOLUTELY ALONE! THERE IS SOMETHING LIKE THE MIND, BEYOND THE BODY. IF THIS MIND IS MATURE, ONE CAN FIGHT ALL KINDS OF ADVERSITIES, EVEN LONELINESS! JUST PEEP INTO ANY HOUSE, AND YOU SHALL FIND SILENT SUFFERING. THE SUFFERING OF LONELINESS. BUT EACH ONE TO HIS FATE…INEVITABLE FATE!
नजरेसमोर एक लांबसडक वाट असते. हिरव्या वनराईतून गेलेली - निर्मनुष्य - एकाकी! असंच तर असतं जीवन. ती वाट खुणावत असते. सारे गंध, स्वर सभोवताली लवलवत असतात. झाडं सावली देतात. पक्षी रिझवतात. निर्झर गुणगुणतात. आकाश - कधी सावली देत मायेनं गोंजारतं, तर कधी भाजून काढतं. साथ भेटते. तुटते. पण कुणीच कुणाचं नसतं. शेवटी - माणूस एकटाच! एकटा. या शरीरापलीकडे एक मन असतं. ते मन जर प्रगल्भ असेल, तरच साऱ्या संकटांवर मात करता येते. एकटेपणावरही! प्रत्येक घरात, जाता-जाता सहज जरी डोकावलं, तरी एक मूक सल जाणवतो. एकाकीपणाचा सल! ती ज्याची त्याची नियती असते. अटळ नियती!

No Records Found
No Records Found
Keywords
#MADHAVIDESAI #NIYATI #HAEVALELYAVATA #MANJIRI #KANCHANGANGA #PRARTHANA #DHUMARE #SAGAR #SHUKRACHANDANI #ASA MHANUNAKOS #KATHASAVALICHI #
Customer Reviews
  • Rating StarGAOKARI, NASHIK 05-07-1987

    नाजूक विषयाची समर्थ हाताळणी करणारे : नियती माधवी देसाई यांची नियती ही सामाजिक कादंबरी मन, शरीर, प्रतिष्ठा, प्रारब्ध ह्या सर्व अंगांचा सखोल विचार करून लिहिली गेली आहे. एका नाजूक विषयाची ही कादंबरी आपणासही निश्चित मानवी स्वभावाचा अभ्यास करावयास लावते खोट्या प्रतिष्ठेपायी दिले जाणारे बळी, शारीरिक आकर्षणातून निर्माण होणाऱ्या समस्या व त्यातून निर्माण होणारी तडजोड प्रारब्ध आणि नियतीच्या चक्री वादळातले प्रवासी या सर्व गोष्टींचा लेखिकेने अतिशय सूक्ष्म विचार ह्या कादंबरीत केला आहे. नुसता विचारच नव्हे, तर काही मार्गदर्शनही मिळू शकते. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी मानसी. जिनं कधी दुःखं पाहिलच नव्हतं. ती एका श्रीमंत घरात लग्न करुन येते. आई-वडील सुखावतात तर मानसीच्या दुःखाला प्रारंभ होते. रितेनसारखा सुंदर, रुबाबदार नवरा मिळूनही ती दुःखी असते. रितेनकडून शारीरिक सुख तिला मिळणार नसतं तरी रितेन तिला तिच्या सोबतीची भीक मागतो. २४ तासांची मुदत देतो. दोन मनांच्या संघर्षातून सुसंस्कारी मानसी रितेनचा स्वीकार करते, त्याला सुखी करण्याचा निर्णय घेते. विधवा आत्याच्या शारीरिक आकर्षणातून निर्माण झालेला रितेनमधील हा दोष ती सहृदयतेने बाजूला ठेवते. पण विधीलिखीत वेगळेच असते. रितेन फॉरिनला जातो. मानसीची नणंद ४ दिवसांसाठी मानसीला आपल्या घरी घेऊन जाते. रितेन बरोबरचाच तिचा मुलगा संतोष व मानसीची मैत्री जमते. त्यात जे नको घडायला ते घडतं. साधी भोळी मानसी संतोषकडे लग्नाची मागणी करते. संतोष प्रतिष्ठेला सांभाळून असतो. तो छुप्या संबंधासाठी तयार होतो. तर मानसी लग्न करुन उघडपणे संसार मांडायला तयार असते. संतोषच्या नकारानं ती उन्मळून पडते. आपल्या घरी येते. दुःखाचं ताट पुढे वाढून ठेवलेलच असतं. तिला दिवस जातात. घरातल्यांना तोंड दाखवणं मुश्कील होतं. पण सगळा वेगळाच प्रकार दिसून येतो. सासूबार्इंच्या आनंदाला ऊधाण आलेलं असतं. ही दुःखानं पिचून जाते आणि अशातच सासूबाई गौप्यस्फोट करतात. सारा डाव त्यांनीच आखलेला असतो. विधवा आत्यावर मुलाला सोपवणारी आई-आपल्या चुकीचं परिमार्जन अशा रितीने करते. मानसी चक्रावून जाते. तिला माणसाच्या प्रवृत्तींची घृणा आलेली असते. रितेन आल्यावर तोच प्रकार होतो. तो आनंदाने बेहोश होतो. वरील कथा पाहता प्रत्येक पात्र विचार करायला लावणारं असंच आहे. मानसीचा निर्णय, संतोषचा नकार, आत्याचा अतिरेक, आईचा खोटेपणा, रितेनची अनैतिक मूल सांभाळण्याची तयारी ही प्रत्येक घटना काय सांगते ? तर प्रत्येकाला प्रतिष्ठा हवी आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी कोण काय करेल ह्याचा नेम नाही. काही ह्यातले नियतीचे बळी तर काही प्रतिष्ठेचे बळी शेवटी लेखिका म्हणते स्वतःचे दुःख कुरवाळीत बसण्यापेक्षा स्वतःच अंतरंग स्वच्छ मनानं पाहिलं तर कितीतरी संसार सुखी होतील व जीवन सुसह्य होईल. एकंदरीत कठीण विषय लेखिकेने फार सहजतेने हाताळला असून कोणत्याही पात्रावर अन्याय न करता प्रत्येक पात्राची त्याच्या वागण्यामागची कारणमिमांसा शोधून काढली आहे. सुंदर भाषाशैली, काकतालीय न्याय कथेची मांडणी आणि जीवन सुसह्य होण्याचा मार्ग सर्वच काही कादंबरीत सापडते. प्रस्तावनेपासून कादंबरी वाचण्यास सुरुवात करायला हवी. प्रस्तावनादेखील काहीतरी देऊन जाते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो