* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A LONG PATH STRETCHES BEFORE THE EYES. MEANDERING THROUGH THE GREEN FOLIAGE – LONELY! BUT THEN LIFE IS LIKE THAT. THE PATH BECKONS – WITH ITS SCENTS AND SOUNDS. TREES OFFER SHADE. BIRDS SING. STREAMS BURBLE. THE SKY – SOMETIMES OFFERS SHADE, WITH LOVE AND AFFECTION; SOMETIMES SCORCHES. ONE FINDS COMPANIONSHIP; WHICH SOMETIMES BREAKS. ULTIMATELY, MAN IS ALONE…ABSOLUTELY ALONE! THERE IS SOMETHING LIKE THE MIND, BEYOND THE BODY. IF THIS MIND IS MATURE, ONE CAN FIGHT ALL KINDS OF ADVERSITIES, EVEN LONELINESS! JUST PEEP INTO ANY HOUSE, AND YOU SHALL FIND SILENT SUFFERING. THE SUFFERING OF LONELINESS. BUT EACH ONE TO HIS FATE…INEVITABLE FATE!
नजरेसमोर एक लांबसडक वाट असते. हिरव्या वनराईतून गेलेली - निर्मनुष्य - एकाकी! असंच तर असतं जीवन. ती वाट खुणावत असते. सारे गंध, स्वर सभोवताली लवलवत असतात. झाडं सावली देतात. पक्षी रिझवतात. निर्झर गुणगुणतात. आकाश - कधी सावली देत मायेनं गोंजारतं, तर कधी भाजून काढतं. साथ भेटते. तुटते. पण कुणीच कुणाचं नसतं. शेवटी - माणूस एकटाच! एकटा. या शरीरापलीकडे एक मन असतं. ते मन जर प्रगल्भ असेल, तरच साऱ्या संकटांवर मात करता येते. एकटेपणावरही! प्रत्येक घरात, जाता-जाता सहज जरी डोकावलं, तरी एक मूक सल जाणवतो. एकाकीपणाचा सल! ती ज्याची त्याची नियती असते. अटळ नियती!

No Records Found
No Records Found
Keywords
#MADHAVIDESAI #NIYATI #HAEVALELYAVATA #MANJIRI #KANCHANGANGA #PRARTHANA #DHUMARE #SAGAR #SHUKRACHANDANI #ASA MHANUNAKOS #KATHASAVALICHI #
Customer Reviews
  • Rating StarGAOKARI, NASHIK 05-07-1987

    नाजूक विषयाची समर्थ हाताळणी करणारे : नियती माधवी देसाई यांची नियती ही सामाजिक कादंबरी मन, शरीर, प्रतिष्ठा, प्रारब्ध ह्या सर्व अंगांचा सखोल विचार करून लिहिली गेली आहे. एका नाजूक विषयाची ही कादंबरी आपणासही निश्चित मानवी स्वभावाचा अभ्यास करावयास लावते खोट्या प्रतिष्ठेपायी दिले जाणारे बळी, शारीरिक आकर्षणातून निर्माण होणाऱ्या समस्या व त्यातून निर्माण होणारी तडजोड प्रारब्ध आणि नियतीच्या चक्री वादळातले प्रवासी या सर्व गोष्टींचा लेखिकेने अतिशय सूक्ष्म विचार ह्या कादंबरीत केला आहे. नुसता विचारच नव्हे, तर काही मार्गदर्शनही मिळू शकते. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी मानसी. जिनं कधी दुःखं पाहिलच नव्हतं. ती एका श्रीमंत घरात लग्न करुन येते. आई-वडील सुखावतात तर मानसीच्या दुःखाला प्रारंभ होते. रितेनसारखा सुंदर, रुबाबदार नवरा मिळूनही ती दुःखी असते. रितेनकडून शारीरिक सुख तिला मिळणार नसतं तरी रितेन तिला तिच्या सोबतीची भीक मागतो. २४ तासांची मुदत देतो. दोन मनांच्या संघर्षातून सुसंस्कारी मानसी रितेनचा स्वीकार करते, त्याला सुखी करण्याचा निर्णय घेते. विधवा आत्याच्या शारीरिक आकर्षणातून निर्माण झालेला रितेनमधील हा दोष ती सहृदयतेने बाजूला ठेवते. पण विधीलिखीत वेगळेच असते. रितेन फॉरिनला जातो. मानसीची नणंद ४ दिवसांसाठी मानसीला आपल्या घरी घेऊन जाते. रितेन बरोबरचाच तिचा मुलगा संतोष व मानसीची मैत्री जमते. त्यात जे नको घडायला ते घडतं. साधी भोळी मानसी संतोषकडे लग्नाची मागणी करते. संतोष प्रतिष्ठेला सांभाळून असतो. तो छुप्या संबंधासाठी तयार होतो. तर मानसी लग्न करुन उघडपणे संसार मांडायला तयार असते. संतोषच्या नकारानं ती उन्मळून पडते. आपल्या घरी येते. दुःखाचं ताट पुढे वाढून ठेवलेलच असतं. तिला दिवस जातात. घरातल्यांना तोंड दाखवणं मुश्कील होतं. पण सगळा वेगळाच प्रकार दिसून येतो. सासूबार्इंच्या आनंदाला ऊधाण आलेलं असतं. ही दुःखानं पिचून जाते आणि अशातच सासूबाई गौप्यस्फोट करतात. सारा डाव त्यांनीच आखलेला असतो. विधवा आत्यावर मुलाला सोपवणारी आई-आपल्या चुकीचं परिमार्जन अशा रितीने करते. मानसी चक्रावून जाते. तिला माणसाच्या प्रवृत्तींची घृणा आलेली असते. रितेन आल्यावर तोच प्रकार होतो. तो आनंदाने बेहोश होतो. वरील कथा पाहता प्रत्येक पात्र विचार करायला लावणारं असंच आहे. मानसीचा निर्णय, संतोषचा नकार, आत्याचा अतिरेक, आईचा खोटेपणा, रितेनची अनैतिक मूल सांभाळण्याची तयारी ही प्रत्येक घटना काय सांगते ? तर प्रत्येकाला प्रतिष्ठा हवी आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी कोण काय करेल ह्याचा नेम नाही. काही ह्यातले नियतीचे बळी तर काही प्रतिष्ठेचे बळी शेवटी लेखिका म्हणते स्वतःचे दुःख कुरवाळीत बसण्यापेक्षा स्वतःच अंतरंग स्वच्छ मनानं पाहिलं तर कितीतरी संसार सुखी होतील व जीवन सुसह्य होईल. एकंदरीत कठीण विषय लेखिकेने फार सहजतेने हाताळला असून कोणत्याही पात्रावर अन्याय न करता प्रत्येक पात्राची त्याच्या वागण्यामागची कारणमिमांसा शोधून काढली आहे. सुंदर भाषाशैली, काकतालीय न्याय कथेची मांडणी आणि जीवन सुसह्य होण्याचा मार्ग सर्वच काही कादंबरीत सापडते. प्रस्तावनेपासून कादंबरी वाचण्यास सुरुवात करायला हवी. प्रस्तावनादेखील काहीतरी देऊन जाते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more