- सौ. शारदाताई दाते
कालच आपले `अँबिग्युअस लॉस` हे अनुवादित पुस्तक वाचनात आले. खूप आवडले. एवढेच नव्हे तर मनाला एक वेगळेपण जाणवले. आपण खूप सुंदर अनुवाद केलेला आहे.
मानवी मनाची रचना आणि जीवनातले भलेबुरे अनुभव जगभरातल्या माणसांच्या बाबतीत सारखेच असतात. माणसांची नावे बदलतील, गावे बदलतील, विचार बदलतील, संस्कार बदलतील, पण येणारे भलेबुरे अनुभव सारखेच असतील. मानवी मनाची रचना ही खरोखरीच एकसारखी असते. मला हे अगदी तंतोतंत पटले. कोठेही जा पळसाला पाने तीन असे म्हणतात ते खरेच आहे.
- DAINIK GOADOOT 7-2-2010
वर्षांनुवर्षे कुरतडत राहणारी आठवण, जीव जाळत राहणाऱ्या मानसिक व्यथा, दूरदेशी गेलेल्यांच्या आठवणी, जीवघेण्या आजारामुळे डोळ्यांसमोर दिसत असूनही वास्तवात हरवलेली नाती... अशा सर्व गोष्टींचा या यातना भोगणाऱ्या व्यक्तींवर कळत न कळत परिणाम होत असतो. वरवर सुव्यवस्थित चाललेले जीवन कमतरतेच्या जाणिवेने पोखरत जाण्याची भावना त्या व्यक्तींमध्ये आढळते. तिचा केवळ त्या व्यक्तीवरच नव्हे तर कुटुंबातील इतर व्यक्तींवरही परिणाम होत राहतो. ते कुटुंब जर त्यातून सावरले नाही तर कुटुंब उद्धवस्तेकडे झुकते.
कौटुंबिक सल्लागाराचे काम करणाऱ्या डॉ. पॉलिन बॉस यांना त्यांच्या बालपणापासूनच या प्रकारच्या कौटुंबिक प्रश्नांना सामोरे जावे लागले. त्यांची आजी मूळची स्वित्झर्लंडमधली. नवऱ्याबरोबर ती अमेरिकेत स्थलांतरित झाली. दशके लोटली तरी तिचे मन मायदेश आणि माहेरच्या नातेवाईकांपासून सुटू शकले नाही. घरच्या गरिबीमुळे एकदाही परत स्वित्झर्लंडला तिला जाता आले नाही. जन्मभर मुलांबाळात व संसारात राहूनही ती त्यात नसल्यासारखी होती. लेखिकेच्या आईला बालपणापासून स्वतःच्या विश्वात हरविलेल्या व मातृसुख देऊ न शकणाऱ्या आईला व नंतर झालेल्या भावंडांना सांभाळून घ्यावे लागले. स्वतःच्या घरातच अशा स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या संदिग्धतेच्या फेऱ्यात अडकलेल्या आजीच्या अनुभवाची पार्श्वभूमी लाभलेल्या लेखिकेने आपल्या आयुष्यात त्याच प्रकारच्या कौटुंबिक प्रश्नाचा अभ्यास करण्यास वाहून घेतले.
या पुस्तकात वाहून गेलेल्या तीन मुलांच्या आठवणीने व्यावूâळ होऊन ४० वर्षांनंतर त्यांना परतीची हाक देणाऱ्या जोडप्याची व्यथा आहे. कायदा झुगारून रस्त्यावर उतरलेल्या व्हिएतनाममध्ये लुप्त झालेल्या अमेरिकेच्या सैनिकांच्या बायका आहेत, अलझायमर होऊन स्वतःचे व्यक्तिमत्व हरविलेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या व्यथा आहेत, घटस्फोट झाल्यानंतरही सोडून गेलेल्या नवऱयांची घरगुती प्रश्नांमध्ये आधार घेणाऱ्या महिला आहेत. घटस्फोट व पुनर्विवाह केलेल्या जोडप्यांच्या मुलांच्या मानसिक कुतरओढीच्या समस्या आहेत, एकत्र कुटुंब पद्धतीतून एकाएकी वेगळ्या, छोट्या स्वकेंद्रित कुटुंब व्यवस्थेत गेलेल्यांच्या व्यथा आहेत.
जीवनमान वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येला सामोरे जाण्यासाठी योग्य मनोभूमिका स्वीकारण्याचे मार्गदर्शनही या पुस्तकात मिळते. दुसरी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अमेरिकेतील आदिवासी विशेषतः महिला या प्रकारच्या कौटुंबिक प्रश्नांना अधिक सकारात्मक मनोभूमिकेतून सामोरे जाताना दिसतात. ती ताकद खिश्चन कुटुंबात कमी दिसते.
भारतातही यापुढे अशा द्विधा मनःस्थितीत असणाऱ्या लोकांची संख्या वाढणार आहे. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना मार्गदर्शक ठरेल असे हे पुस्तक आहे. त्यात दिलेली उत्तरे व मानसिक भूमिका आपल्या समाजालाही लागू होतील.
- DAINIK SAGAR 15-3-2010
न उमजलेलं दु:ख घेऊन जगायचं कसं, त्याची शिकवण ‘अँबिग्युअस लॉस’ असं या पुस्तकावर लिहिलंय. खऱ्या अर्थाने वाचकांना दु:ख घेऊन जगायचं कसं हे या पुस्तकातून कळतं. संशोधक म्हणून नावलौकिक असणाऱ्या डॉ. पॉलिन बॉस यांच्या पुस्तकाचा हा अनुवाद. त्यांनी अनिश्चित दु:ख घेऊन जी माणसे जगत आहेत, त्यांच्यावर उपचार करणारे आणि त्यांचे नातेवाईक यांनी त्या दु:खी माणसांना पूर्वस्थितीत कसे आणावे, याच्या काही पद्धती या पुस्तकात त्यांनी दिल्या आहेत, जे या पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे. हे पुस्तक स्पॅनिश, जर्मन, मेनलँड, चायनीज, तैवान, चायनीज आणि जपानी भाषेत अनुवादित झाले आहे. सुनंदा अमरापूरकर यांनी मराठीत याचा अनुवाद करून मराठी वाचकांपर्यंत ही शिकवण पोहोचवली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ लक्षवेधी ठरले आहे. काही शब्दांचे अर्थ वाचकांना उमजले नाहीत, तर त्याचे अर्थ सांगणाऱ्या टिपा शेवटच्या पानावर देण्यात आल्या आहेत.
- DAINIK AIKYA SATARA 15-11-2009
न उमजलेलं दु:ख घेऊन जगायचं कसं, त्याची शिकवण देणारं पुस्तक म्हणून ‘अँबिग्युअस लॉस’चा उल्लेख करण्यात आला आहे. डॉ. पॉलिन बॉस यांच्या या पुस्तकाचा अनुवाद सुनंदा अमपूरकर यांनी केला आहे. छुपेपणाने माणसाचं मन आणि जीवन ग्रासून टाकणाऱ्या, नकळत होणाऱ्या, किती काळ भोगावं लागणार तेही नक्की नसणाऱ्या, अटळ अशा दु:खासंबंधी डॉ. पॉलिन बॉस या अमेरिकन विदुषीने अनेक वर्षे संशोधन, अभ्यास केला. त्याचं फलित म्हणजे तिचा ‘अँबिग्युअस लॉस’चा शोध. या शोधाबद्दल जनसामान्यांना सांगण्याच्या जिव्हाळातून हे पुस्तक आकाराला आलं आहे. अत्यंत सोप्या भाषेत लिहिण्यात आलेल्या या पुस्तकाचा मराठी अनुवादही तेवढ्याच सोप्या पद्धतीने करण्यात आला आहे. ‘अँबिग्युइटी’ म्हणजे अनिश्चितता आणि लॉस म्हणजे काही तरी गमवाणं. अँबिग्युअस लॉस’ या नावामध्ये ती सहजपणे एकमेकांमध्ये मिसळली आहे.
प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा अँबिग्युअस लॉस अनुभवावा लागतो. त्यावेळी काही तरी निश्चित, स्पष्टपणे कळायला हवं, असं आपल्याला वाटत राहतं. तसं झालं नाही तर हे विचित्र, धूसर, उलगडा न झालेलं नुकसान, हे दु:ख घेऊन जगावं तरी कसं असा प्रश्न माणसांना अस्वस्थ करुन सोडतो. आपल्या परीने शोधताना प्रत्येकाची उत्तरं वेगळीच असतात. पण अँबिग्युअस लॉस पुस्तक वाचल्यानंतर येणारं उत्तरंही प्रश्नांपेक्षा सोपी वाटतात. हेच या पुस्तकाचं यश म्हणता येईल.
- NEWSPAPER REVIEW
‘अँ बिग्युअस लॉस’ या पुस्तकाच्या मूळ लेखिका पॉलिन बॉस या अमेरिकन संशोधक. त्यांच्या प्रस्तुत पुस्तकाचा अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केलेला आहे. या पार्श्वभूमीवर मूळ लेखिका अमेरिकन संस्कृतीच्या म्हणजेच आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीपेक्षा भिन्न. परंतु मानवी मनाची रचना आणि प्रत्येक व्यक्तीला जीवनात येणारे अनुभव सारखेच असतात. ही वस्तुस्थिती हे पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येते.
मनाचा झालेला कोंडमारा, यामुळेच होणारी हानी ‘गोठणारं दु:ख’मधून लेखिकेने विशद केलेली आहे. मनोवैज्ञानिक चिकित्सेसंबंधी साहित्यात नकळत होणारे अनिश्चित व अदृश्य नुकसान म्हणजेच अँबिग्युअस लॉस. याची काही उदाहरणे लेखिकेने दिलेली आहेत. हे नुकसान सर्वात अधिक असतं असं लेखिका ठामपणे म्हणते.१९८६ ते १९९१ या कालखंडात लेखिकेने जवळपास ७० कुटुंबांचा अभ्यास करून शोधनिबंध पूर्ण केला. मनात साचलेलं दु:ख विंâवा व्यथा यामुळे झालेला हा मानसिक रोग असल्याचा निष्कर्ष लेखिकेने या तिने केलेलय संशोधनातून मांडलेला आहे. तसेच या रोगी मंडळींचे म्हणणे शांतपणे ऐकून त्यांना धीर दिला, मार्ग दाखवला तर ते चांगले सुखासीन जीवन पुन्हा जगू शकतात. यामुळे समाजस्वास्थ्य निरोगी राहण्यास मदत होईल.
जसं बेपत्ता मृत सैनिकांच्या बाबतीतलं उदाहरण तसंच घटस्फोट घेतलेल्यांची उदाहरणे लेखिकेने मांडलेली आहेत. दैनंदिन जीवनात घेतले जाणारे निरोप, स्थलांतरामुळे होणरे प्रियजनांचे वियोग यावरही लेखिकेने भाष्य केलंय.
‘वियोगाशिवाय निरोप’मध्ये होणारा अँबिग्युअस लॉस हा तीव्र निराशेमुळे होऊ शकतो, असं लेखिका म्हणते. स्मृतिभ्रंश, असंबद्ध बडबडणं ही या रोगाची लक्षणं दिसतात. मानसिक तीव्र आघात, मेंदूला झालेली दुखापत, मानसिक अनुपस्थिती या कारणांमुळे रोगी उद्ध्वस्त होतो.
‘संमिश्र भावना’त द्विधा मन:स्थिती आणि मानवी मनाची परस्परविरुद्ध आंदोलनं यासंबंधी लेखिकेच मत आहे. ‘चढ आणि उतार’मध्ये जॉन आणि सारा यांची कथा आहे. अल्झायमर्स जडलेल्या माणसाची व्यथा वाचून मन खिन्न होतं. आणि ‘सारा’ला मिळालेलं दु:ख कुणाच्याही नशिबी येऊ नये असं वाटतं. याप्रमाणेच कौटुंबिक जुगार, संशयाचा फायदा आदी प्रकरणांतून लेखिकेने मांडलेल्या ‘अँबिग्युअस लॉस’च्या व्यथा वाचकांना व्यथित करतात.
लेखिकेचे मोलाचे संशोधन, कार्य व तिने केलेले प्रयत्न मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना नक्कीच उपयुक्त ठरतील. सामान्य माणसाला जरी हा विषय क्लिष्ट वाटत असला तरी मानवी जीवनाचा एक भाग आहे, तो प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे.
- DAINIK SAMANA 13-12-2009
‘अँ बिग्युअस लॉस’ या पुस्तकाच्या मूळ लेखिका पॉलिन बॉस या अमेरिकन संशोधक. त्यांच्या प्रस्तुत पुस्तकाचा अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केलेला आहे. या पार्श्वभूमीवर मूळ लेखिका अमेरिकन संस्कृतीच्या म्हणजेच आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीपेक्षा भिन्न. परंतु मानवी मनाची रचना आणि प्रत्येक व्यक्तीला जीवनात येणारे अनुभव सारखेच असतात. ही वस्तुस्थिती हे पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येते.
मनाचा झालेला कोंडमारा, यामुळेच होणारी हानी ‘गोठणारं दु:ख’मधून लेखिकेने विशद केलेली आहे. मनोवैज्ञानिक चिकित्सेसंबंधी साहित्यात नकळत होणारे अनिश्चित व अदृश्य नुकसान म्हणजेच अँबिग्युअस लॉस. याची काही उदाहरणे लेखिकेने दिलेली आहेत. हे नुकसान सर्वात अधिक असतं असं लेखिका ठामपणे म्हणते.१९८६ ते १९९१ या कालखंडात लेखिकेने जवळपास ७० कुटुंबांचा अभ्यास करून शोधनिबंध पूर्ण केला. मनात साचलेलं दु:ख विंâवा व्यथा यामुळे झालेला हा मानसिक रोग असल्याचा निष्कर्ष लेखिकेने या तिने केलेलय संशोधनातून मांडलेला आहे. तसेच या रोगी मंडळींचे म्हणणे शांतपणे ऐकून त्यांना धीर दिला, मार्ग दाखवला तर ते चांगले सुखासीन जीवन पुन्हा जगू शकतात. यामुळे समाजस्वास्थ्य निरोगी राहण्यास मदत होईल.
जसं बेपत्ता मृत सैनिकांच्या बाबतीतलं उदाहरण तसंच घटस्फोट घेतलेल्यांची उदाहरणे लेखिकेने मांडलेली आहेत. दैनंदिन जीवनात घेतले जाणारे निरोप, स्थलांतरामुळे होणरे प्रियजनांचे वियोग यावरही लेखिकेने भाष्य केलंय.
‘वियोगाशिवाय निरोप’मध्ये होणारा अँबिग्युअस लॉस हा तीव्र निराशेमुळे होऊ शकतो, असं लेखिका म्हणते. स्मृतिभ्रंश, असंबद्ध बडबडणं ही या रोगाची लक्षणं दिसतात. मानसिक तीव्र आघात, मेंदूला झालेली दुखापत, मानसिक अनुपस्थिती या कारणांमुळे रोगी उद्ध्वस्त होतो.
‘संमिश्र भावना’त द्विधा मन:स्थिती आणि मानवी मनाची परस्परविरुद्ध आंदोलनं यासंबंधी लेखिकेच मत आहे. ‘चढ आणि उतार’मध्ये जॉन आणि सारा यांची कथा आहे. अल्झायमर्स जडलेल्या माणसाची व्यथा वाचून मन खिन्न होतं. आणि ‘सारा’ला मिळालेलं दु:ख कुणाच्याही नशिबी येऊ नये असं वाटतं. याप्रमाणेच कौटुंबिक जुगार, संशयाचा फायदा आदी प्रकरणांतून लेखिकेने मांडलेल्या ‘अँबिग्युअस लॉस’च्या व्यथा वाचकांना व्यथित करतात.
लेखिकेचे मोलाचे संशोधन, कार्य व तिने केलेले प्रयत्न मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना नक्कीच उपयुक्त ठरतील. सामान्य माणसाला जरी हा विषय क्लिष्ट वाटत असला तरी मानवी जीवनाचा एक भाग आहे, तो प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे.
- DAILY SAKAL 10-1-2010
`अँबिग्युअस लॉस` या मानसशास्त्रीय सिद्धांतावर आधारित पुस्तकाच्या मूळ लेखिका डॉ.पॉलिन बॉस आहेत. त्यांच्या या पुस्तकाचा अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केला आहे. `उमजलेलं दु:ख घेऊन जगायचं कसं`, त्याची शिकवण देणारं पुस्तक, असं त्याचं वर्णन करता येईल. अनिश्चित दु:ख घेऊन जी माणसं जगत आहेत, त्यांच्यावर उपचार करणारे आणि त्यांचे नातेवाईक यांनी त्या दु:खी माणसांना पूर्वस्थितीत कसं आणावं, याच्या काही पद्धती या पुस्तकात दिल्या आहेत. या पुस्तकाचा तो मुख्य भाग आहे. (डॉ. पॉलिन बॉस यांनी अनेक वर्षं `अनिश्चित दु:ख` या विषयावर सखोल अभ्यास आणि संशोधन करुन काही सिद्धांत, तत्त्वं मांडली आहेत. ही तत्त्व `थिअरी ऑफ अँबिग्युअस लॉस` या नावाने ओळखली जातात. डॉ. बॉस यांनी संशोधन करताना आलेल्या अनुभवांतून अनिश्चित दु:ख घेऊन जगणाऱ्या लोकांना त्यातून उभारी घेऊन आयुष्य पुढे चालू करणं व ते अर्थपूर्ण बनवणं ही कौशल्य शिकवण्यासाठी `अँबिग्युअस लॉस` हे पुस्तक लिहिलं आहे.)
माणसाला होणाऱ्या दु:खाचे दोन प्रमुख पैलू आहेत. व्यक्तिगत नातेसंबंधातील अनिश्चितता, भावनांशिवाय उरलेली निष्प्राण नाती, किंवा नात्याची कलेवर या सा-यांना घेऊन माणसं जगतात.
युद्धामध्ये बेपत्ता होणारे सैनिक, अल्झामयरनं ग्रस्त असलेल्या रुग्णांबरोबर जगणारी निरोगी माणसं, स्मृतिभ्रंश, स्किझोफ्रेनिया, तीव्र मानसिक असंतुलन, कर्करोगासारख्या असाध्य रोगाने ग्रस्त रुग्ण, त्यांच्या सहवासात राहणारे नातेवाईक, स्नेही यांना अनिश्चित घटना, व्यक्त होणाऱ्या मानवी भावना यांना सामोरं जावं लागतं. नैसर्गिक आपत्ती, घातपाती कृत्यं, यांना कुटुंबातले लोक बळी पडतात. अशा प्रसंगी मागं राहिलेल्या कुटुंबीयांची, आप्तस्नेह्यांची जबाबदारी घ्यावी लागते. अशा दु:खाचं निराकरण सहजी होऊ शकत नाही. ज्यांना भेटायची आपली उत्कट इच्छा आहे; पण कोणत्या तरी कारणानं आपण त्यांच्यापर्यंत पोचू शकत नसतो, तर अशी इच्छा आपल्याला जागीच गोठवून ठेवते. अशा दु:खाला, हानीला तोंड दिलं नाही, तर आपलं आयुष्य जागीच थांबण्याची शक्यता असते.
मात्र, आपल्या नियंत्रणात नसलेल्या घटनांचा मनापासून स्वीकार करणं गरजेचं असतं. स्वत:मध्ये केलेल्या छोट्या बदलांमुळे आपण असहाय्य आहोत, असं वाटत नाही, एकमेकांशी सतत बोलणं, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून त्याला मान देणं, आपण काय गमावलं आणि काय परत कमवू शकतो याची नेमकी जाणीव होणं, यामुळे दु:ख मोकळं होतं. मानवी नात्यात सहभागी नसलेला आणि असलेला भाग, बाजू कोणती हे स्वत:च समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाची वाट वेगळी आणि उत्तरंही वेगळी येणार. ती स्वीकारणीय असतील.