DR. PAULINE BOSS

About Author


DR. PAULINE BOSS IS A TRAINER AND RESEARCHER. AFTER THOROUGH STUDY AND RESEARCH ON THE SUBJECT OF AMBIGUOUS LOSS, HE PRESENTED SOME THEORIES OR PRINCIPLES TO THE WORLD, WHICH ARE KNOWN AS THEORY OF AMBIGUOUS LOSS. UNDER THE RESEARCH OF THIS SUBJECT SINCE 1973, DR. BOSS HAS NOT ONLY WORKED WITH BUT ALSO TRAINED MANY PSYCHOLOGISTS AND COUNSELLORS.

डॉ. पॉलिन बॉस एक प्रशिक्षक आणि संशोधक आहेत. अनिश्चित दु:ख या विषयावर सखोल अभ्यास आणि संशोधन करून काही सिद्धांत किंवा तत्त्वे त्यांनी जगासमोर ठेवली, जी थिअरी ऑफ अँबिग्युअस लॉस या नावाने ओळखली जातात. या विषयाच्या संशोधनांतर्गत १९७३ पासून डॉ. बॉस यांनी अनेक सायकॉलॉजिस्ट्स आणि काऊन्सेलर्स यांच्याबरोबर केवळ कामच केले नाही तर त्यांना प्रशिक्षितही केले आहे. या संशोधनामध्ये त्यांना आलेल्या अनुभवांतून त्यांनी अनिश्चित दु:ख घेऊन जगणाऱ्या लोकांना त्यातून उभारी घेऊन आयुष्य पुढे चालू करणे व ते अर्थपूर्ण बनवणे, ही कौशल्ये शिकवण्याचे ठरवले. १९७५ मध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड फॅमिली स्टडीज या विषयात त्यांना विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाकडून डॉक्टरेट देण्यात आली. १९७५ ते १९८१ या कालावधीत त्यांनी याच विद्यापीठात काही काळ सह-प्राध्यापक म्हणून काम केले. १९८१ नंतर २००५ पर्यंत त्यांनी मिनेसोटा विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ फॅमिली सोशल सायन्स येथे काम सुरू केले. अनिश्चित दु:ख घेऊन जी माणसे जगत आहेत, त्यांच्यावर उपचार करणारे आणि त्यांचे नातेवाईक, यांनी त्या दु:खी माणसांना पूर्वस्थितीत कसे आणावे, याच्या काही पद्धती या पुस्तकात त्यांनी दिल्या आहेत, जे या पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे. हे पुस्तक स्पॅनिश, जर्मन, मेनलँड चायनीज, तैवान चायनीज आणि जपानी भाषेत अनुवादित झाले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
AMBIGUOUS LOSS Rating Star
Add To Cart INR 280

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more