DR. PAULINE BOSS

About Author


DR. PAULINE BOSS IS A TRAINER AND RESEARCHER. AFTER THOROUGH STUDY AND RESEARCH ON THE SUBJECT OF AMBIGUOUS LOSS, HE PRESENTED SOME THEORIES OR PRINCIPLES TO THE WORLD, WHICH ARE KNOWN AS THEORY OF AMBIGUOUS LOSS. UNDER THE RESEARCH OF THIS SUBJECT SINCE 1973, DR. BOSS HAS NOT ONLY WORKED WITH BUT ALSO TRAINED MANY PSYCHOLOGISTS AND COUNSELLORS.

डॉ. पॉलिन बॉस एक प्रशिक्षक आणि संशोधक आहेत. अनिश्चित दु:ख या विषयावर सखोल अभ्यास आणि संशोधन करून काही सिद्धांत किंवा तत्त्वे त्यांनी जगासमोर ठेवली, जी थिअरी ऑफ अँबिग्युअस लॉस या नावाने ओळखली जातात. या विषयाच्या संशोधनांतर्गत १९७३ पासून डॉ. बॉस यांनी अनेक सायकॉलॉजिस्ट्स आणि काऊन्सेलर्स यांच्याबरोबर केवळ कामच केले नाही तर त्यांना प्रशिक्षितही केले आहे. या संशोधनामध्ये त्यांना आलेल्या अनुभवांतून त्यांनी अनिश्चित दु:ख घेऊन जगणाऱ्या लोकांना त्यातून उभारी घेऊन आयुष्य पुढे चालू करणे व ते अर्थपूर्ण बनवणे, ही कौशल्ये शिकवण्याचे ठरवले. १९७५ मध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड फॅमिली स्टडीज या विषयात त्यांना विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाकडून डॉक्टरेट देण्यात आली. १९७५ ते १९८१ या कालावधीत त्यांनी याच विद्यापीठात काही काळ सह-प्राध्यापक म्हणून काम केले. १९८१ नंतर २००५ पर्यंत त्यांनी मिनेसोटा विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ फॅमिली सोशल सायन्स येथे काम सुरू केले. अनिश्चित दु:ख घेऊन जी माणसे जगत आहेत, त्यांच्यावर उपचार करणारे आणि त्यांचे नातेवाईक, यांनी त्या दु:खी माणसांना पूर्वस्थितीत कसे आणावे, याच्या काही पद्धती या पुस्तकात त्यांनी दिल्या आहेत, जे या पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे. हे पुस्तक स्पॅनिश, जर्मन, मेनलँड चायनीज, तैवान चायनीज आणि जपानी भाषेत अनुवादित झाले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
AMBIGUOUS LOSS Rating Star
Add To Cart INR 120

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more