* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`LITTLE WOMEN` WAS PUBLISHED FIRST IN THE YEAR 1868, IT WAS WRITTEN BY THE FAMOUS AMERICAN AUTHOR LOUISA MAY ALCOTT. IT WAS A BEST SELLER. IT WAS TRANSLATED IN MANY LANGUAGES. HOLLYWOOD USED THE THEME FOR TWO OF ITS MOVIES. `LITTLE WOMEN` IS THE STORY OF THE MARCH FAMILY; ESPECIALLY OF THE FOUR SISTERS NAMELY MEG, JYO, BETH, AND AMY, IN AMERICA. THESE CHARACTERS ARE BASED ON THE ORIGINAL AUTHOR`S REAL SISTERS. THIS STORY IS VERY TOUCHY AND MAGNIFICENT. WE GET INVOLVED IN IT WITH THE OTHER CHARACTERS, THE OLD, HANDSOME NEIGHBOUR LAWRENCE AND HIS EQUALLY HANDSOME AND LOVING GRANDSON LORRY. THESE MARCH SISTERS ARE TOTALLY DIFFERENT FROM EACH OTHER. BUT THEY LOVE EACH OTHER TRULY. THEY ARE VERY MUCH FOND OF EACH OTHER. THIS NOVEL IS BECOME READABLE BECAUSE OF THE NATURAL ASPECTS OF A FAMILY; WHILE READING WE COME ACROSS WITH THE HOPES, AMBITIONS, HAPPINESS, SADNESS, THEIR PLANS FOR FUTURE, THE HUMOUR IN THEIR LIFE, THE TOUCHING AND MELTING MOMENTS IN THEIR LIFE; EVERYTHING MAKES THE STORY VERY COMMON, AS IF IT IS HAPPENING IN OUR LIVES, AS IF SOMEONE IS REVEALING OUR FAMILY LIFE. THIS CLOSENESS INVOLVES US MORE AND MORE IN THE LIVES OF MARCH SISTERS AND THIS SIMPLICITY IS THE SECRET OF THE SUCCESS OF THIS NOVEL.
मुग्ध शैशवातली कोवळी सुखदु:खे ..... लुइसा मे अलकॉट या ख्यातनाम अमेरिकन लेखिकेची ‘लिटल् वुइमेन’ ही कादंबरी अठराशे अडुसष्ट साली प्रथम प्रकाशित झाली. प्रसिद्धीबरोबरच तिला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली. अनेक भाषांमधून ती अनुवादित झाली आहे. हॉलिवुडने तिच्यावर दोन वेळा चित्रपटही काढले आहेत. ‘लिटल् वुइमेन’ ही अमेरिकेतल्या ‘मार्च’ कुटुंबाची – विशेषत: त्यातल्या मेग, ज्यो, बेथ आणि अ‍ॅमी या चार बहिणींची – कहाणी आहे. या व्यक्तिरेखा लेखिकेने आपण व आपल्या बहिणी यांच्यावरूनच बहुतांशी रंगवल्या आहेत. शेजारचे वृद्ध लॉरेन्स आजोबा आणि त्यांचा देखणा प्रेमळ नातू लॉरी यांनी या कथेत आणखी अनोखे रंग भरले आहेत. हे एक अतिशय हृद्य आणि विलोभनीय असे कुटुंबचित्र आहे. एकमेकींपासून स्वभावाने अगदी वेगळ्या असलेल्या मार्च बहिणींचे परस्परांवरील उत्कट प्रेम, त्यांच्या आशाआकांक्षा, कोवळी सुखदु:खे, भविष्याची स्वप्ने याचे हे कधी विनोदी, तर कधी हृदयस्पर्शी असे चित्रण आपल्या साध्या सच्चेपणामुळे वाचकाला थेट अखेरपर्यंत गुंतवून ठेवते...
CHAUGHIJANI
No Records Found
No Records Found
Keywords
#LOUISA M. ALCOTT#LITTLE WOMAN # SHANTA SHELKE #आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarArchana Paike

    चौघीजणी ! मेग, ज्यो, बेथ आणि अॅमी या चौघी बहिनी त्यांची कुटूंबवत्सल आई मिसेस मार्च आणि वडिल मिस्टर मार्च ! शेजारी वृद्ध मिस्टर लाॅरेन्स आणि त्यांचा नातु लाॅरी . ही ह्या पुस्तकामधिल महत्वाची पाञ . लेखिका शांता ज. शेळके यांनी अतिशय सुंद अनुवाद करून मराठी वाचकांसाठी एक अत्यंत सहज , सुंदर पुस्तक मिळवुन दिलं आहे. पुस्तक वाचतांना मनाची इतकी उत्कंठता वाढत जाते की आपणास पुस्तक सोडवत नाही. विचारांची दिशा सहजपणे चांगल्या ,सत्य गोष्टी अंगिकारण्याकडे नेण्याचे सामर्थ्य या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये आहे. भाषाशैली सहज , सुंदर असते पण भाषेतुन ओघवता परिचय करवुन मनुष्यस्वभाव आणि घडणारी परिवर्तने आपणास इथे पाहवयास मिळतात. वेगवगेवळ्या स्वभावाच्या, व्यक्तिमत्वाच्या , वयाच्या चार मुलींना योग्य- अयोग्याची नुसती जाण च नव्हे तर स्वतःतील वाईटवृत्तीला दुर करून चांगली वृत्ती अंगिकरण्याचे वळण एक आई च कशी सहजपणे त्यांना लावते, हे वाचतांना पदोपदी प्रत्येक आईने हे पुस्तक वाचलेच पाहिजे असे मनात सतत येऊन गेले. मुळ लेखिका लुइसा मे अल्काॅट ह्या वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी अठराशे अठ्याऐंशी साली निधन पावल्या. ` लिटेल वुइमेन ` हे पुस्तक तिचे खरे वाड्ंमयीन स्मारक होय. गेली शंभर वर्षे देशोदेशीच्या तरूण मुला मुलींना आपल्या मुग्ध शैशवाचे रमणिय चिञ या सुंदर पुस्तकात सतत पाहावयास मिळाले आहे आणि एका निर्मळ पण उदास आनंदाचा त्यांना त्यातून प्रत्यय आला आहे....शांता शेळके. एकमेकींच्या स्वभावाच्या एकदम वेगळ्या मार्च बहिनी वाचतांना आपण सहजपणे त्या कुटूंबात दाखल होतोत. वय जसे जसे वाढते तस तसे आपण मुलांना हव्या त्या सवलती देतो, त्यांना सर्व सुखसोयी देऊन नकळत कुठेतरी काही गोष्टी चुकत जातो. बारा वर्षाच्या अॅमी पासुन सोळा वर्षाच्या मेग पर्यंत ...आई ही वयाने वाढणार्‍या लेकींना वयासोबत गुणांनी वाढवत आणि दोषांना कमी करत जे संस्कार देते..नतमस्तक त्या मिसेस मार्च च्या विचारसरणीला आणि आईत्वाला ..! सण आला की आपण खरेदी करतो मुलांसाठी..पण हा विचार येतो का ?... की ह्या सणाला मुलांना त्यांचे स्वभाव दोष स्वतःच कमी करण्यास शिकवुन दुसर्‍यासाठी त्याग करण्यास शिकवावे? सुंदर केस कापुन ज्यो वडिलांसीठी पंचवीस डाॅलर पाठवते..तेंव्हा ती म्हणते की पैस्यासोबत मी हा पण विचार केला की मला माझ्या केसांचा खुप गर्व होता...त्यांना कापुन मी जे वडिलांसाठी केले त्याने माझे गर्वाहरण मीच स्वतः केले! अॅमी छोटी पोर..जीचे सर्वजण लाड पुरवत आणि जेंव्हा ती आंट कडे राहण्यास जाते तेंव्हा आंटच्या कुञ्याचे केस साफ करणे, पोपटाचा पिंजरा साफ करणे, आंटला पुस्तक वाचुन दाखवणे, दोन तास अभ्यास करणे,छोटी- छोटी कामे करणे ह्यात अगदी ञासुन जाते आणि विचार करते आपली कोणास कदर नाही. माञ नंतर कुठलीच अभिलाषा न करता सर्व गोष्टी मनापासुन करते तेंव्हा लक्षात येते की प्रत्येकजण वेगळा असतो फक्त तो स्विकारला की आयुष्य सोप्पे जाते. मिसेस मार्चला भय असते की श्रीमंत कुटुंबात गेल्यास मेगला श्रींमंतीच, पार्ट्यांच आकर्षण वाटुन स्वतःच्या गरिब घराबद्दल वाईट वाटेल का? परंतु मेगचं त्यांच्यात राहुन येऊन आपल्या उबदार प्रेमळ छञछायेला नावाजलेल पाहुन आपली पोर मोठी झाली हा साक्षात्कार होऊन समाधान वाटते. मुलीला प्रेम कस असावे, मैञी कशी असावी, होणारा जोडीदार कसा निवडावा..आकर्षण आणि प्रेम ह्या मधिल नाजुक संबंध कसा हाताळावा याच इतक सुंदर सहज वर्णन या पुस्तकात आहे की प्रत्येक मुलीच्या आईने या पुस्तकास आवर्जुन वाचाव. मुलींना स्वयंपाक का यावा याच सहज सोप्प उत्तर मिसेस मार्च नी या पुस्तकात सांगितलय. आपल्या मुला मुली मधिल कलागुणांना कसा वाव मिळावा? त्यांची अंगभुत कौशल्य बाहेर पडावीत, त्यांच्या वेगवेगळ्या स्वभावांना एकञ आणुन एकजुटी निर्माण करत कौटुंबिक ऐक्य कस टिकवाव हे खुप छान मिसेस मार्चला वाचतांना कळत . वृध्द लाॅरेन्स आणि त्यांचा प्रेमळ नातु ...वाचतांना कित्येकवेळेस मन भरून येत. जाॅन, मेग यांचा संसार वाचतांना छोट्याश्या भांडणास मिटवणारी ही पती पत्नी आपल्यातीलच वाटतात..आणि स्वभावतत्व आणि संस्काराची सांगड कळते ! भरपुर प्रेम, आदर, दयाळु वृत्ती, प्रामाणिकपणा, सद् सदविवेकबुद्धी, त्याग आणि सत्य ...ह्या सर्व गोष्टींचे संस्कार आपल्या मुलांना आपणच देऊ शकतो दुसरे कोणीच नाही..हे मला प्रकर्षाने हे पुस्तक वाचतांना वाटले. मोठेपणाच्या खोट्या गोष्टी, लालच, कठोरता, द्वेष ,घमेंड ही सर्व दुर्गुण आपणच मुलांपासुन दुर ठेऊ शकतो! पौंगडअवस्था ते तारूण्य हा काळ आईचा परिक्षेचा काळ नव्हे तर खुप सार्‍या प्रेमाचा अतिउच्च काळ असे मला वाटुन राहिले..पदोपदी माझी आई आणि मी आणि भाऊ, माझी मुले आणि मी, पति , असे नजरेसमोर राहत होते. खुप शिकवुन गेल्या ह्या चारचौघी मला !!!!!Specially..ज्यो.. माझ्या अंतकरणाचा ठाव घेतला या व्यक्तिरेखेने !!!! आवर्जुन वाचाव..` चारचौघी` लेखिका आणि अनुवादिका दोघी पण आज या जगात नाहित ...नमन त्या दोघींना एका आईचे !! धन्यवाद माझ्या बालमैञिन डाॅ. शितल काळेचे जीने एवढे अप्रतिम पुस्तक मला दिले ! सौ. अर्चना सिध्देश्वर पैके. दि. 17/जुन/2021 ...Read more

  • Rating StarMonika Pawar - Jagtap

    #माझ्या_खजिन्यातून हि गोष्ट आहे त्या चौघिंची.... वेगवगळ्या व्यक्तिमत्वाच्या पण एकाच संस्काराच्या छत्राखाली वाढलेल्या मनस्वी बहिणींची.... यात भव्यदिव्य.... उद्दात्त.... रहस्य.... आदी आदी काहीही नाही.... यात आहे सध्या भोळ्या मनांची एकमेकांमध्ये सलेली गुंतावळ..... मेग म्हणजे... आत्मसमाधानाचा आविष्कार.... ज्यो म्हणजे... वेंधळी महत्त्वाकांक्षा... बेथ म्हणजे... सर्वांना हवीहवीशी... तरीही हुरहूर चुटपुट... ॲमी म्हणजे.... स्वप्नरंजनात न रमता सारासार विचार.... आणि मार्मी म्हणजे सगळ्यांना गुंफून ठेवणारा एकसंध धागा..... शांता शेळके यांच्या लेखणीतून अनुवादित झालेले एक भन्नाट पुस्तक... चौघीजणी चार बहिणींच्या लहानपणापासून सुरू झालेला प्रवास त्यांचा तारुण्यात प्रवेश आणि शेवटी ध्येयप्राप्ती...... प्रत्येक पानामध्ये वाचकाला गुंतवून ठेवणारं... कायम स्मृतीत घर करणारं... कधी आनंद कधी आसू कधी हुरहूर कधी डोळ्यात अंजन कधी विस्मय अश्या खूप खूप भाव आविष्काराने नटलेले एक नितांत सुंदर कधीही संपूच नये असे हवेहवेसे वाटणारे , खूपसे relate होणारे पुस्तक..... #चौघीजणी ...Read more

  • Rating StarAshwini Jagtap

    "लुईसा मे अल्कॉट" या अमेरिकन लेखिकेचे "लिटल वुईमन" या पुस्तकाचा "शांता शेळके "यांनी केलेला अनुवाद म्हणजे "चौघीजणी". मार्च कुटुंबातील मेग , ज्यो, बेथ आणि अँमी यांच्या आयुष्य भोवती गुंफलेली ही कथा .चौघी बहिणींचे आत्यंतिक स्नेह ,माया याने ओप्रोत असे यांचे नाते, तरीही प्रत्येकीचे स्वप्न आशा- आकांक्षा वेगवेगळ्या आणि ते साध्य करण्यासाठी असलेली चौघींची धडपड त्यांची सुखे त्यांची दुःखे यांचे कधी विनोदी तर कधी हृदयस्पर्शी वाटणारे असे वर्णन. यात असलेला साधेपणा, सच्चेपणा आपल्या मनाला मोहवतो.चौघींचे आपल्या मातापित्यांशी असलेले नाते इतके सच्चे आहे की आपण त्याने प्रभावित होतो . पैसा हा सुखासीन आयुष्यासाठी जरी आवश्यक असला तरी परस्परातील प्रेम ,जिव्हाळा यावरच नात्याचे खरे सौंदर्य अवलंबून असते, हा मौलिक विचार सहज मनावर बिंबवला जातो ,ज्याची खरतर आज खूप गरज आहे. ज्यो ,मेग ,बेथ ,अँमी त्यांच्या शेजारी राहणारा त्यांचा बालमित्र लाँरी यांच्यातील प्रेमळ नाते ,त्यांच्या मुग्ध शैशवाचे रमणीय चित्र आपणाला या पुस्तकात पहावयास मिळते. त्याचबरोबर उत्तम ,श्रेष्ठ अशा नीती मूल्यांचे संस्कार अतिशय अलगद- हळुवारपणे वाचकांवर होतात, कोठेही बटबटीतपणा अथवा कंटाळवाणेपणा जाणवत नाही . अतिशय हृद्य आणि विलोभनीय असे कुटुंब -चित्र लेखिकेने आपल्यासमोर प्रस्तुत केले आहे. आणि शांता शेळके यांच्या लेखणीने यावर "चार चाँद "लावले आहेत .त्यांनी केलेला हा अनुवाद कोठेही रटाळ होत नाही तर, शब्दाशब्दातून तो अधिक खुलत जातो आणि अखेरपर्यंत आपल्याला गुंतवून ठेवतो. अश्विनी जगताप संभाजी नगर ...Read more

  • Rating StarSunil Shirvadkar

    "चौघीजणी" लॉकडाऊन काळात वाचलेले सर्वोत्कृष्ट पुस्तक.`चौघीजणी`..लेखिका शांता शेळके. मुळ लेखिका लुइसा मे अल्कॉट. लुइसा अल्कॉट या अमेरिकेन लेखिका.१८६८ साली त्यांनी ही कादंबरी लिहीली.तिला अफाट लोकप्रियता लाभली. जगातील बहुतांश भाषांमध्ये ती अनुवादितझाली. हॉलिवूडमध्ये तिच्यावर दोन चित्रपटही निघाले. खरंतर अनुवादित पुस्तके.. त्यातही इंग्लिश पुस्तकांचे अनुवाद मी वाचलेच नाही कधी. त्या वातावरणाशी आपण एकरुप होऊ शकु की नाही ही एक शंका असायची मनात. जॉन म्हणाला.. मेरी म्हणाली.. अश्या वाक्यांमधुन पुढे पुढे जाणारे लिखाण वाचायला नको वाटायचे. `चौघीजणी` बद्दल खुप ऐकलं होतं.वाचायला तर घेतली. एवढी जाडजूड सहाशे पानांची कादंबरी आपण वाचु शकु का..मुख्य म्हणजे त्याच्याशी एकरुप होऊ शकु का ही शंका होती. सुरुवातीला दहा वीस पानं जरा अडखळलो..पात्रांची नावे..त्यांचे एकमेकांशी असलेले नाते..अमेरिकन वातावरण हे जसंजसं परीचीत होत गेलं..तसं तसं त्यात गुंतत गेलो. दिडशे वर्षापूर्वीचे कथानक. मार्च कुटुंब.. आई,वडील, आणि चौघी बहिणी. मेग..बेथ..ज्यो..आणि एमी.चौघीजणी वेगवेगळ्या स्वभावाच्या.. तसं म्हटलं तर हे एक गरीब कुटुंब.पुस्तक वाचत जातो..तसं आपण त्यांच्या घरामधले एक होऊन जातो.त्यांचे स्वभाव.. आशाआकांक्षा.. त्यांची स्वप्नं..आणि समस्याही ह्या आपल्या होऊन जातात. उत्तम व्यक्ती चित्रण..वेधक संवाद.. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कौटुंबिक भावबंध.. त्यातली उत्कटता कमालीच्या सुंदरपणे रेखाटली आहे. बहिणी बहिण मधील प्रेम..शेजारच्या लॉरीशी जमलेला स्नेह..मेगचं लग्न.. तिचे..वैवाहिक जीवन.. संसार असे कितीतरी ह्र्दय स्पर्शी प्रसंग जागोजागी रेखाटले आहेत. खरंतर कळत नकळत आदर्श नीतीमुल्यांचे संस्कार. वाचकांवर घडवले जातात. हे पुस्तक कुठेही कंटाळवाणे होत नाही. तत्कालीन अमेरिकन जीवन.. तेथील रुढी, परंपरा, जीवनशैली आपल्याला समजत जाते. कादंबरीच्या उत्तरार्धात एमी युरोपला जाते. मग आपल्या समोर अजुन एक नवीन जग उलगडत जातं.फ्रान्स..इटली, जर्मनी.. स्वित्झर्लंड येथील त्या काळातील वातावरणाशी आपण समरस होऊन जातो.तेथील शहरी जीवन..आणि सुंदर, स्वच्छ निसर्ग आपण अनुभवतो.एमी आणि लॉरी यांच्यातले भावबंध.. त्यांचं एकत्र येणं..अमीर,उमराव घराण्यातील पार्ट्या.. त्यांची वेशभुषा.. चालीरिती सगळं सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं रहातं. `लिटल् वुईमेन` ही लुउसा अल्कॉट यांची मुळ कादंबरी.१८४३ साली जन्म झालेल्या लेखिकेने खरंतर यातील व्यक्ती रेखा आपल्या स्वतःच्या कुटुंबावरुनच रेखाटल्या आहेत. यातील `ज्यो` हे लेखिकेचेच प्रतिरूप आहे. असं म्हणतात की मुळ पुस्तकापेक्षा त्याचा अनुवाद जास्त सुंदर आहे. आणि अर्थातच त्याचे शांता शेळके यांचे. शांता शेळके यांनी या पुस्तकात काय आहे हे एका ओळीत सांगितले आहे. `मुग्ध शैशवातील कोवळी सुखदुःखे` खरंच.. चौघी बहीणींचे हे कोवळ्या शैशवातील जीवन साध्या सच्चेपणामुळे आपल्याला अखेरपर्यंत गुंतवून ठेवते. सुनील शिरवाडकर. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more