DR.M.B.KULKARNI

About Author

Birth Date : 10/09/1930
Death Date : 29/01/2014


PROF. DR. M.BA. KULKARNIS EDUCATION IS MA (SANSKRIT), MA (MARATHI), PH. D (SANSKRIT), B.ED. IT HAS HAPPENED. HE WORKED AS A JOURNALIST, SECONDARY SCHOOL TEACHER FOR SOME YEARS. AFTER THAT, HE TAUGHT MARATHI AND SANSKRIT SUBJECTS FOR TEN YEARS IN RATNAGIRIS GOGTE COLLEGE AND FOR TWENTY ONE YEARS IN NASHIK GOKHALE EDUCATION SOCIETYS COLLEGES IN UNDERGRADUATE AND POSTGRADUATE DEPARTMENTS.

प्रा. डॉ. म.बा. कुलकर्णी यांचे शिक्षण एम.ए.(संस्कृत), एम.ए.(मराठी), पीएच. डी (संस्कृत), बी.एड. असे झालेले आहे. त्यांनी काही वर्षे पत्रकार, माध्यमिक शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर दहा वर्षे रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजात व एकवीस वर्षे नाशिक गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजांमध्ये पदवी व पदव्युत्तर विभागांतून ते मराठी व संस्कृत या विषयांचे अध्यापन करीत. त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात पीएच डी(संस्कृत) साठी मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. प्रारंभी सा. विवेकमधून व नंतर नाशिक येथील अमृत मासिक, तसेच दै. गावकरी, दै. लोकमत इत्यादी नियतकालिकांमधून त्यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे. डॉ. कुलकर्णी यांची उपनिषदांतील कथा, पराक्रमी युवक : अनंत कान्हेरे, नव्याने रामकथा गाऊ, मनू आणि स्त्री, व्यावहारिक शहाणपणासाठी ३०१ सुभाषिते, सोन्याचा पाऊस (बालकथा) ही पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी मुक्त विद्यापीठासाठी काही पुस्तकांचे लेखन व संपादनही केले आहे. त्यांनी अनेक ठिकाणी रामायण व महाभारत या विषयांवर व्याख्याने दिली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SHABDACHARCHA Rating Star
Add To Cart INR 400

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more