* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CAT O NINE TALES
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788184980653
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :JEFFREY ARCHER COMBO - 32 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
CAT O` NINE TALES IS THE FIFTH COLLECTION OF IRRESISTIBLE SHORT STORIES FROM THE MASTER STORYTELLER. THESE YARNS ARE INGENIOUSLY PLOTTED, WITH RICHLY DRAWN CHARACTERS AND DELICIOUSLY UNEXPECTED CONCLUSIONS, AND WITH THE ADDED BONUS OF ILLUSTRATIONS BY THE INTERNATIONALLY ACCLAIMED ARTIST, RONALD SEALER. WHILE INCARCERATED FOR TWO YEARS IN FIVE DIFFERENT PRISONS. JEFFREY ARCHER PICKED UP SEVERAL IDEAS FOR SHORT STORIES. THEY RANGE FROM A TALE OF THE MAN WHO ROBBED HIS OWN POST OFFICE TO THE STORY OF A COMPANY CHAIRMAN WHO TRIED TO POISON HIS WIFE WHILE ON A TRIP TO ST PETERSBURG - BOTH WITH UNEXPECTED CONSEQUENCES. IN ANOTHER , MAESTRO, AN ITALIAN RESTAURATEUR ENDS UP IN JAIL, UNABLE TO EXPLAIN TO THE TAX MAN HOW HE CAN AFFORD A YACHT, A FERRARI AND A HOME IN FLORENCE, WHILE ONLY DECLARING A PROFIT OF 1000000 POUNDS A YEAR. THE RED KING IS A TALE ABOUT A CON MAN WHO DISCOVERS THAT AN ENGLISH LORD REQUIRES ONE MORE CHESS PIECE TO COMPLETE A SET THAT WOULD BE WORTH A FORTUNE. IN ANOTHER TALE OF DECEPTION, THE COMMISSIONER, A BOMBAY CON ARTIST ENDS UP IN THE MORGUE AFTER HE USES THE POLICE CHIEF AS BAIT IN HIS LATEST SCAM. THE ALIBI REVEALS HOW A CONVICT MANAGES TO REMOVE AN OLD ENEMY WHILE HE`S LOCKED UP IN JAIL, AND THEN SET UP TWO PRISON OFFICERS AS HIS ALIBI. IN CONTRAST IS THE ACCOUNTANT, WHO, IN CHARITY BEGINS AT HOME, REALIZES HE HAS ACHIEVED NOTHING IN HIS LIFE AND SETS OUT TO MAKE A FORTUNE BEFORE HE RETIRES. AND THEN THERE IS ARCHER`S FAVORITE, WHICH HE CAME ACROSS AFTER LEAVING PRISON, IN THE EYE OF THE BEHOLDER, WHERE A HANDSOME PREMIER DIVISION FOOTBALLER FALLS IN LOVE WITH A TWENTY-STONE WOMAN...WHO JUST HAPPENS TO BE THE NINTH RICHEST WOMAN IN ITALI.
विख्यात कथाकार जेफ्री आर्चर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला ‘कॅट ओ’नाईन टेल्स’ हा पाचवा कथासंग्रह. अत्यंत कल्पकतेने गुंफलेल्या या कथांमधे सशक्त व्यक्तीचित्रं आहेत आणि या कथांचे शेवट वाचकांची मती कुंठित करणारे आहेत. जेफ्री आर्चर यांनी दोन वर्षांच्या कालावधीत एकूण पाच वेगवेगळ्या कारागृहात वास्तव्य केले. त्या काळात अनेक लघुकथांचे धागे त्यांना मिळाले. स्वत:च्याच मालकीचे पोस्ट ऑफिस लुटणा-या माणसापासून ते रशियाच्या दौ-यावर असताना आपल्या पत्नीच्या खुनाचे कारस्थान करणा-या माणसाची कथा रंगतदार शैलीत त्यांनी मांडली आहे. प्रत्येक कथेचा शेवट मात्र अनपेक्षित आहे, धक्कादायक आहे. या कथासंग्रहात एक रेस्टॉरंटचा मालक आहे, जो मोठा धूर्त आणि चलाख आहे. फेरारीतून हिंडणारा आणि फ्लोरेन्समधे प्रासादतुल्य व्हिलात सुटीसाठी जाऊन राहणारी ही असामी टॅक्स चुकवण्यासाठी काय काय क्ऌप्त्या योजते याची मनोरंजक कहाणी आहे. ‘लाल बादशहा’ कथेमधे एका संग्राहकाला एका बुद्धिबळातील सेटमधील लाल रंगाचा राजा मिळवून देण्यासाठी एक भामटा कसा जिवाचा आटापिटा करतो त्याची वाचकांना थक्क करून सोडणारी हकिकत आहे. ‘द कमिशनर’ ही कथा तर चक्क मुंबईतील एका निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पोलीस कमिशनरच्याच आयुष्यात घडते. ‘द अ‍ॅलिबी’ आणि ‘चॅरिटी बिगिन्स अ‍ॅट होम’ या कथाही अशाच वाचकांना हतबुद्ध करून सोडणा-या आहेत. शेवटची कथा ‘इन द आय ऑफ द बिहोल्डर’ ही कथा लेखक जेफ्री आर्चर यांची सर्वांत आवडती कथा. तुरुंगवासाच्या अखेरच्या दिवसांमधे त्यांना त्या कथेचा धागा गवसला. आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत हा बारा कथांचा संग्रह त्यांनी वाचकांसाठी सादर केला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #जेफ्रीआर्चर #JEFFREYARCHER #ANJANINARAVANE #AJITTHAKUR #SUDHAKARLAWATE #LEENASOHONI #NOTAPENNYMORENOTAPENNYLESS #नॉटअपेनीमोअरनॉटअपेनीलेस #SONSOFFORTUNE #सन्सऑफफॉर्च्युन #FALSEIMPRESSION #फॉल्सइम्प्रेशन #APRISONEROFBIRTH #अप्रिझनरऑफबर्थ #KANEANDABLE #केनअँडएबल #CATONINETALES #कॅटओनाइनटेल्स #TOCUTALONGSTORYSHORT #टूकटअलाँगस्टोरीशॉर्ट #ANDTHEREBYHANGSATALE #अ‍ॅण्डदेअरबायहँग्जअटेल PATHS OF GLORY पाथ्स् ऑफ ग्लॉरी "
Customer Reviews
  • Rating StarBhagwatkinkar AakashRajnath

    जेफ्री आर्चरचं आणखी एक अप्रतिम पुस्तक खरोखर काय अवलिया माणूस आहे हा!

  • Rating StarDAINIK HINDUSTAN

    जेफ्री आर्चर यांचा ‘कॅट ओ-नाईन टेल्स’ हा पाचवा कथासंग्रह. या कथासंग्रहातील व्यक्तीचित्रे अत्यंत स्पष्ट, ठसठशीत आणि सशक्त आहेत. कथांचे शेवट वाचकांची मती गुंग करणारे आहेत. जेफ्री आर्चर यांचे नाव जगातील सर्वात्कृष्ट दहा लेखकांमध्ये होते. त्यांनी अनेक कथ, कादंबऱ्या, लघुकथा, नाटके लिहिली. त्यांच्या कादंबऱयांवर आधारीत दूरवाहिन्यांवर मालिकाही गाजल्या आहेत. त्यांच्या तुरुंगवासातील अनुभवावर आधारीत ‘प्रिझनर डायरी’चे तीन खंड प्रकाशित झाले आहेत. शारीरिक शिक्षणाचे शिक्षक, धावपटू त्यानंतर उद्योजक, कंपनीचे दिवाळे वाजल्यामुळे दिवाळखोर आणि शेवटी संसद सदस्य, महापौरपदाचे उमेदवार असे विविधांगी जीवन ते जगले. फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांनी तुरुंगवास भोगला आणि त्यांचे जीवन कादंबरीचा विषय होऊन राहिला. तुरुंगातील विविध अनुभवांचे कथाबीज त्यांना मिळाले. त्यांनी या बीजावर साहित्याचा मोठा वृक्ष निर्माण केला. ‘कॅट ओ-नाईन टेल्स’ या कथासंग्रहात बारा कथा आहेत. प्रत्येक कथेचा शेवट अनपेक्षित आहे. ‘द रेड किंग’ या कथेत एका संग्राहकाला एका बुद्धिबळाच्या सेटमधील लाल रंगाचा राजा मिळवून देण्यासाठी एक तर मुंबईतील एका निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोलीस कमिशनरच्या आयुष्यावर घडलेली ‘द कमिशन’ ही कथा वाचकांना थक्क करून सोडणारी आहे. ‘इन द आय ऑफ दी होल्डर’ ही जेफ्री आर्चर यांना सर्वांत आवडणारी कथा या संग्रहात आहे. सर्व कथांचे अनुवाद लीना सोहोनी यांनी अत्यंत समर्थपणे केले आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची पृष्ठे २१७ असून किंमत २०० रूपये इतकी आहे. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 21-2-2010

    जेफ्री आर्चर...आपल्या लेखनाने स्वत:च एक ब्रॅण्ड झालेला हा इंग्लिश लेखक. ‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस’ या पहिल्याच कादंबरीने त्यांना प्रकाशझोतात आणलं. तब्बल १७ देशांमध्ये त्यांची ही कादंबरी विकली गेली. लेखक, अभिनेता, नाटककार, राजकारणी अशी जेफ्री यंची ओळख असली, तरी फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांनी तुरुंगवासही भोगलाय. कंपनीत गुंतवलेले पैसे बुडाल्याने ते दिवाळखोर झाले होते. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी लेखन सुरू केलं आणि पहिल्याच फटक्यात ते जगभर प्रसिद्ध झाले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनाही एखाद्या पिक्चरप्रमाणे रोमांचकारी आहेत. आयुष्याच्या चढउतारावर भेटलेल्या अनेक प्रसंगांचा अनुभव त्यांच्या लेखणीतून व्यक्त होतो... स्टोरी नरेट करण्याची जेफ्री यांची स्वत:ची आहे. त्यांची कादंबरी एकदा हातात घेतली, की पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटत नाही. ‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस’ प्रिझन डायरीज, फर्स्ट अमंग इक्वल्स अशा अनेक कादंबऱ्या हे याचं उदाहरण. इंग्रजीमधील त्यांचं दर्जेदार आणि इण्टरेस्टिंग साहित्य आता मराठीतही येतंय. ‘कॅट ओ’नाईन टेल्स’ हा त्यांचा पाचवा कथासंग्रह मेहतांनी मराठीत आणलाय. एकूण १२ कथांचा अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे. दोन वर्षांच्या तुरुंगवासात आर्चर पाच वेगवेगळ्या तुरुंगात राहिले. या दरम्यान त्यांना भेटलेल्या व्यक्तींच्या या कथा आहेत. स्वत:च्या मालकाचे पोस्ट ऑफिस लुटणारं जोडपं, पत्नीच्या खुनाचं कारस्थान रचणारा माणूस, टॅक्स चुकवण्यासाठी निरनिराळ्या कल्पना लढवणारा हॉटेलिअर, घटस्फोटानंतर प्रॉपर्टीची मागणारी लोभी पत्नी अशा अनेक एकाहून एक सुरस कथा यात आहेत. रंगतदार अशा या कथा वाचता-वाचता आपण नकळत त्यात गुंततो. कथा पुढे काय वळण घेणार, याची अपार उत्सुकता लागते. कथा संपत आल्यावर शेवट ‘प्रेडिक्ट’ करणार तेवढ्यात अनपेक्षित असतो, तेवढाच धक्कादायकाही. त्यामुळेच कथा वाचण्याची ही गंमत अनुभवायला हवी. आर्चर यांची कथा सांगण्याची ओघवती शैली मराठीतही जपण्याची काळजी लीना सोहोनी यांनी घेतली आहे. सोपी आणि ओघवती भाषा, रंगतदार कथा आणि अनपेक्षित असा शेवट यामुळे पुस्तक खरंच इण्टरेस्टिंग होतं. एकदा तरी वाचून त्या अनुभवायला हवं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more